DNA मराठी

स्पोर्ट्स

इंग्लंड दौऱ्यापूर्वी भारताला धक्का, रोहित शर्मानंतर विराट कोहलीही करणार कसोटी क्रिकेटला टाटा- बाय?

Virat Kohli: काही दिवसांपूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तर आता आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली देखील कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार करत आहे. माहितीनुसार, विराट कोहली इंग्लंड दौऱ्यापूर्वी कसोटीमधून निवृत्ती जाहीर करणार आहे. त्याने याबाबत बीसीसीआयला देखील माहिती दिली आहे. भारताचा इंग्लड दौरा 20 जूनपासून सुरू होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. कोहलीने काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयला त्याच्या निर्णयाची माहिती दिली आहे आणि आता इंग्लंड दौऱ्यात खेळण्याची त्याची शक्यता खूप कमी आहे. कोहलीच्या या निर्णयावरून बीसीसीआयमध्ये बराच गोंधळ सुरू आहे. बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या विषयावर विराट कोहलीशी बोलले आहे आणि त्याला त्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. मात्र कोहलीने आपले हेतू स्पष्ट केले आहेत आणि इंग्लंड दौऱ्यापासून स्वतःला दूर ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून अचानक निवृत्ती घेतल्यानंतर, विराट कोहलीनेही या फॉरमॅटमधून निवृत्तीची बातमी भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी धक्कादायक आहे. यापूर्वी, दोन्ही दिग्गज फलंदाजांनी टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, जी भारताच्या विश्वचषक विजयानंतर झाली. जर कोहलीनेही कसोटीतून निवृत्ती घेतली तर भारतीय कसोटी संघाला फलंदाजीच्या क्रमात अनुभवाची मोठी कमतरता भासेल. त्यामुळे यशस्वी जयस्वाल, केएल राहुल आणि शुभमन गिल सारख्या तरुण खेळाडूंवर मोठी जबाबदारी येईल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कोहली अपयशी ठरला 2024-25 च्या कसोटी मालिकेत कोहलीची कामगिरी निराशाजनक होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेत त्याने फक्त 190 धावा केल्या. पर्थ कसोटीत शानदार शतक केल्यानंतर, उर्वरित चार सामन्यांमध्ये तो फक्त 85 धावा करू शकला. हा दौरा त्याच्यासाठी खूप आव्हानात्मक होता. कोहलीची कसोटी कारकीर्द विराट कोहलीने आतापर्यंत 123 कसोटी सामने खेळले आहेत आणि एकूण 9,230 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याच्या नावावर 30 शतके आहेत.

इंग्लंड दौऱ्यापूर्वी भारताला धक्का, रोहित शर्मानंतर विराट कोहलीही करणार कसोटी क्रिकेटला टाटा- बाय? Read More »

RCB vs PBKS : सुरुवातीला पाऊस अन् नंतर घरच्या मैदानावर पुन्हा आरसीबी पराभूत

RCB vs PBKS: आयपीएल 2025 मध्ये बंगळुरू च्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पुन्हा एकदा पराभव स्वीकारावा लागला आहे. पावसामुळे हा सामना 14 – 14 ओव्हर्सचा करण्यात आला होता. प्रथम गोलंदाजी करताना या सामन्यात पंजाब किंग्जने शानदार गोलंदाजी करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पाच विकेट्सने पराभव केला. बंगळुरूचा संघ फक्त 95 धावांवर बाद झाला. टिम डेव्हिडने 26 चेंडूत नाबाद 50 धावा केल्या. आयपीएल 2025 मध्ये आरसीबीने आतापर्यंत बाहेर खेळलेल्या चारही सामन्यात विजय मिळवला आहे, तर घरच्या मैदानावर खेळलेल्या तिन्ही सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर पंजाब किंग्जने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीने पहिल्या चेंडूवर फिल साल्ट, रजत पाटीदार आणि टिम डेव्हिड यांनी चौकार मारून चांगली सुरुवात केली, परंतु तरीही फक्त दोन फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. आरसीबीच्या डावातील सर्वात मोठी भागीदारी शेवटच्या विकेटसाठी 32 धावांची होती. विशेष म्हणजे संघातील पहिल्या सहा फलंदाजांपैकी पाच खेळाडू पाचपेक्षा कमी धावा काढून बाद झाले. पावसामुळे बराच काळ झाकलेल्या खेळपट्टीच्या संथ आउटफिल्डसह उसळीमुळे फलंदाजांना त्रास झाला. पंजाबच्या गोलंदाजांची उत्कृष्ट कामगिरी श्रेयस अय्यरने पाच गोलंदाजांचा वापर केला आणि सर्वांनी विकेट घेतल्या. अर्शदीप सिंगने फिल साल्ट आणि कोहलीला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. युझवेंद्र चहलने रजत पाटीदार आणि जितेश शर्माला बाद केले, तर मार्को जॅनसेनने क्रुणाल पांड्या आणि प्रभावशाली खेळाडू मनोज बंडाजे यांना बाद केले. हरप्रीत ब्रारने भुवनेश्वर कुमार आणि यश दयाल यांचे बळी घेतले आणि आरसीबीला 95/9 पर्यंत रोखले. पंजाबची सावध सुरुवात पंजाब किंग्जचे सलामीवीर प्रियांश आर्य (16) आणि प्रभसिमरन सिंग (13) यांनी मोठी धावसंख्या उभारली नसली तरी त्यांच्या जलद सुरुवातीमुळे संघावरील दबाव कमी झाला. आरसीबीकडून जोश हेझलवूडने 14 धावा देत तीन विकेट घेतले. नेहल वधेराने 19 चेंडूत नाबाद 33 धावा करत पंजाबला पाच विकेट्सनी विजय मिळवून दिला. या विजयासह, पंजाब किंग्ज पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

RCB vs PBKS : सुरुवातीला पाऊस अन् नंतर घरच्या मैदानावर पुन्हा आरसीबी पराभूत Read More »

“माझ्यासाठी काहीच किंमत नाही…”करुण नायरची Karun Nair खेळी झळकली, पण संघाच्या पराभवाने खंत व्यक्त

Karun Nair – दिल्ली कॅपिटल्सचा अनुभवी फलंदाज करुण नायरने [Karun Nair] आयपीएलमध्ये दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर केलेल्या पुनरागमनात चमकदार खेळी केली, परंतु संघाच्या पराभवाने त्याच्या आनंदाला मात्र ओहोटी लागली. मुंबई इंडियन्सविरुद्ध २०६ धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना नायरने अवघ्या ४० चेंडूंमध्ये ८९ धावा करत अप्रतिम फलंदाजी सादर केली. त्याच्या या खेळीत जसप्रीत बुमराहच्या एका षटकात दोन षटकार मारण्यासारखी दुर्मीळ कामगिरीदेखील समाविष्ट होती. तयारीची गुरुकिल्ली करुण नायरने स्थानिक क्रिकेटमध्येही आपली तयारी सिद्ध केली आहे. विदर्भासाठी सर्व फॉरमॅटमध्ये १८७० धावा करत त्याने आपले फॉर्म आणि फिटनेस टिकवून ठेवले. याच मेहनतीच्या जोरावर तो आयपीएलमध्ये पुन्हा ठसा उमठवू शकला. “मी आधी आयपीएलमध्ये खेळलो आहे. मला माहित आहे की ही लीग किती स्पर्धात्मक आहे आणि विरोधी संघांकडून कशी तयारी असते. त्यामुळे मानसिकदृष्ट्या मी पूर्णपणे तयार होतो,” असं नायरने पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. वैयक्तिक यशापेक्षा संघाचं महत्त्व त्याच्या वैयक्तिक खेळीबद्दल बोलताना करुण नायर [Karun Nair] म्हणाला, “बघा, त्याबद्दल बोलण्यात काही फायदा नाही. मी चांगला खेळलो, पण माझा संघ सामना गमावला, त्यामुळे खरोखर काही फरक पडत नाही. जर माझा संघ जिंकू शकत नसेल तर अशा खेळी माझ्यासाठी काहीच अर्थ नाहीत.” या विधानातून नायरची संघभावना आणि खेळातील परिपक्वता अधोरेखित झाली. संधीची वाट पाहत केलेली तयारी नायरने पहिल्या चार सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती. पण तरीही त्याने संयम राखून स्वतःची तयारी सुरू ठेवली. “संघात निवड होणं हे नेहमीच कठीण असतं. पण मी माझ्या प्रक्रियेवर विश्वास ठेवला. जेव्हा संधी मिळाली तेव्हा मी पूर्ण तयार होतो,” असं त्याने सांगितलं. त्याने स्पष्ट केलं की पॉवरप्लेमध्ये पारंपरिक शॉट्सवर भर देणं आणि नंतर गरजेनुसार इम्प्रोव्हायझेशन करणं, ही त्याची रणनीती होती. “स्वतःला थोडा वेळ द्या, सामान्य शॉट्स खेळा आणि नंतर परिस्थितीनुसार बदल करा,” असा त्याचा दृष्टिकोन. संघासाठी झपाटलेपणाचं दर्शन करुण नायरने [Karun Nair] याआधी भारतासाठी कसोटीत त्रिशतक ठोकून आपली प्रतिभा सिद्ध केली आहे. IPL सारख्या वेगवान फॉरमॅटमध्येही त्याचा अनुभव आणि शांत डोकं संघासाठी मोलाचं ठरू शकतं. “माझं एकच लक्ष आहे – संघासाठी कामगिरी करणे. मी नेहमीच संघाच्या यशाला प्राधान्य दिलं आहे,” असं तो नम्रपणे म्हणाला. करुण नायरची ही खेळी भलेही संघासाठी विजय मिळवून देऊ शकली नाही, पण त्याच्या जिद्दीची, मेहनतीची आणि संघनिष्ठेची कथा क्रिकेटरसिकांच्या मनात नक्कीच उमटली. आगामी सामन्यांमध्ये त्याच्या अनुभवाचा आणि फॉर्मचा फायदा दिल्ली कॅपिटल्सला निश्चितच होऊ शकतो.

“माझ्यासाठी काहीच किंमत नाही…”करुण नायरची Karun Nair खेळी झळकली, पण संघाच्या पराभवाने खंत व्यक्त Read More »

IPL 2025: बुमराह – करुण नायर वाद अन् रोहित शर्माचा रिएक्शन व्हायरल

IPL 2025 : रविवारी झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यात मुंबई इंडियन्सने शानदार कामगिरी करत दिल्ली कॅपिटल 12 धावांनी पराभव करत विजय नोंदवला आहे. मुंबईच्या विजयानंतर सध्या सोशल मीडियावर रोहित शर्माचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यावर चाहते वेगवेगळे कॉमेंट करताना दिसत आहे. करुण नायर – बुमराह वाद दिल्ली कॅपिटल्सकडून करुण नायरने शानदार कामगिरी केली. त्याने 89 धावांची खेळी खेळून संघाला विजयाच्या जवळ आणले. करुणने जसप्रीत बुमराहच्या षटकात 9 चेंडूंचा सामना करत 26 धावा काढल्या. दरम्यान, बुमराह आणि करुणमध्ये वाद झाला. करुणने बुमराहच्या चेंडूवर दोन धावा घेऊन आपले अर्धशतक पूर्ण केले, पण धाव घेताना दोघांमध्ये टक्कर झाली, जी बुमराहला आवडली नाही. ड्रिंक्स ब्रेक दरम्यान, बुमराहने करुणला काहीतरी सांगितले, ज्यावर करुण नायरने प्रत्युत्तर दिले आणि दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. यादरम्यान, मुंबईचा कर्णधार रोहित शर्माची मजेदार प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली. व्हिडिओमध्ये असे दिसून येते की जेव्हा बुमराह आणि करुण वाद घालत होते, तेव्हा रोहित शर्माने मान वळवून मजेदार पद्धतीने प्रतिक्रिया दिली. त्याची ही प्रतिक्रिया चाहत्यांना खूप आवडली आणि ती सोशल मीडियावर व्हायरल झाली. दिल्ली कॅपिटल्सचा पराभव या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 205 धावा केल्या. त्यानंतर दिल्लीचा संघ 19 षटकांत 193 धावांवर सर्वबाद झाला आणि मुंबईला 12 धावांनी सामना जिंकता आला. या विजयासह, सलग दोन पराभवांनंतर मुंबईने हंगामातील पहिला विजय मिळवला. त्याच वेळी, सलग विजयांनंतर दिल्लीला या हंगामातील पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. दिल्लीकडून करुण नायरने 89 धावा केल्या तर मुंबईकडून कर्ण शर्माने तीन विकेट्स घेत सामन्याचा मार्ग बदलला. मुंबईने 205 धावा केल्यानंतर, दिल्लीला 206 धावांचा पाठलाग करणे कठीण झाले.

IPL 2025: बुमराह – करुण नायर वाद अन् रोहित शर्माचा रिएक्शन व्हायरल Read More »

SRH vs GT: सिराज ‘चमकला’, हैदराबादवर गुजरातचा दणदणीत विजय

SRH vs GT : आयपीएल 2025 मध्ये रविवारी झालेल्या गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्यात मोहम्मद सिराजच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादचा 7 विकेट्सने पराभव केला. नाणेफेक जिंकल्यानंतर गुजरात टायटन्सने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो त्याच्यासाठी फायदेशीर ठरला. मोहम्मद सिराजच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे हैदराबाद संघाला फक्त 152 धावा करता आल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातने फक्त 16.5 षटकांत विजय मिळवला. हैदराबादचा हा चौथा पराभव होता. हैदराबादचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेड (08) ने सिराजच्या चेंडूवर चौकार मारला पण नंतरच्या गोलंदाजाने त्याला बाद केले. यानंतर, सिराजच्या चेंडूवर मिड-ऑनवर झेल देऊन अभिषेक शर्माही पॅव्हेलियनमध्ये परतला. अशाप्रकारे संघाचा स्कोअर 2 बाद 45 धावा असा झाला. यानंतर नितीश कुमार रेड्डी आणि हेनरिक क्लासेन यांनी चौथ्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी केली, परंतु रेड्डी 31 धावा काढून बाद झाला. हैदराबादकडून नितीश कुमार रेड्डीने सर्वाधिक 31 धावा केल्या. कर्णधार पॅट कमिन्स 22 धावांसह नाबाद राहिला आणि संघाचा धावसंख्या 153 धावांवर पोहोचला. गिलने 43 चेंडूत 61 धावांची शानदार खेळी गुजरातकडून शुभमन गिलने 43 चेंडूत 61 धावांची शानदार खेळी केली. वॉशिंग्टन सुंदरने 29 चेंडूत 49 धावा केल्या, तर रदरफोर्डने 16 चेंडूत 35 धावा केल्या. गुजरातने हे लक्ष्य फक्त 16.4 षटकांत पूर्ण केले. हैदराबादकडून मोहम्मद शमीने 2 आणि पॅट कमिन्सने 1 विकेट घेतली.

SRH vs GT: सिराज ‘चमकला’, हैदराबादवर गुजरातचा दणदणीत विजय Read More »

हैदराबादला धक्का देत KKR ने मारली बाजी, वेंकटेश अय्यर ठरला हिरो

KKR vs SRH: आयपीएल 2025 मध्ये गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादवर 80 धावांनी शानदार विजय मिळवला. कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात केकेआरने प्रथम फलंदाजी करताना 6 विकेट्स गमावून 200 धावा केल्या. वेंकटेश अय्यर, अंगकृष रघुवंशी आणि रिंकू सिंग यांच्या उत्कृष्ट खेळीमुळे कोलकाताने चांगली धावसंख्या उभारली. 29 चेंडूत 60 धावा अय्यरने 29 चेंडूत सात चौकार आणि तीन षटकारांसह 60 धावा केल्या तर रिंकू सिंगने 17 चेंडूत 32 धावा केल्या, तर अंगकृष रघुवंशीने 32 चेंडूत 50 धावा केल्या. शेवटच्या पाच षटकांत कोलकाताने 78 धावा जोडल्या. हैदराबादचा हा सलग तिसरा पराभव होता. यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्सने त्यांना पराभूत केले होते. हैदराबादला विजयासाठी 201 धावांची आवश्यकता होती, पण कोलकाताच्या गोलंदाजी समोर त्यांचा फलंदाजीचा क्रम कोसळला त्यामुळे संपूर्ण संघ 120 धावांवर ऑल आऊट झाला. ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा अपयशी ठरलेहैदराबादचे ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा हे दोघेही लवकर बाद झाले. पहिल्या षटकात हेडने चौकार मारला पण पुढच्या षटकात हर्षित राणाने त्याला झेलबाद केले. दुसऱ्याच षटकात राणाने अभिषेकलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर, इशान किशन आणि नितीश कुमार रेड्डी देखील लवकर बाद झाले. हेनरिक क्लासेनने 21 चेंडूत 33 धावा केल्या, पण तोही लवकर बाद झाला.

हैदराबादला धक्का देत KKR ने मारली बाजी, वेंकटेश अय्यर ठरला हिरो Read More »

Ashwini Kumar- मुंबई इंडियन्सचा शानदार विजय, अश्वनी कुमारच्या पदार्पणात चार बळी

कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) Ashwini Kumar – मुंबई, 31 मार्च 2025: मुंबई इंडियन्सने आयपीएल 2025 मध्ये त्यांची पहिली विजयाची नोंद केली आहे, वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्सवर आठ विकेटनी दणदणीत विजय मिळवला आहे. हा सामना मुंबईच्या पदार्पणवीर गोलंदाज अश्वनी कुमारच्या शानदार कामगिरीची आठवण करून देणारा आहे. त्याने आयपीएलमध्ये पदार्पण करतानाच 24 धावांत चार महत्त्वपूर्ण विकेट्स घेत केकेआरला व्यवस्थित बांधले. अश्वनी कुमार (Ashwini Kumar)च्या इम्प्रेसिव्ह कामगिरीनंतर मुंबईच्या फलंदाजांनी 116 धावांचे साधे लक्ष्य 12.5 षटकांत पूर्ण करून सीजनची पहिली विजयाची लय तयार केली. रायन रिकल्टनने त्याच्या अर्धशतकी खेळीने संघाला मजबूत आधार दिला, तर सूर्यकुमार यादवने वेगवान फटकेबाजी करून विजयाचा षटकार लगावला. मुंबईच्या कप्तान हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, हा निर्णय अगदी योग्य ठरला. ट्रेंट बोल्ट आणि दीपक चहर या गोलंदाजी जोडीने केकेआरच्या सलामीवीरांना लवकरच खेळातून बाद केले. केकेआरने 16.2 षटकांत उर्वरित फलंदाजांची विकेट घेत संघ 116 धावांत गुंडाळला. मुंबईने आयपीएल २०२५ मधील पहिल्या दोन सामन्यात पराभवाचा सामना केल्यानंतर या विजयाने संघाच्या मनोधैर्याला चांगला उंचावला आहे. या विजयामुळे मुंबईने गुणतालिकेत आपली स्थिती मजबूत केली आणि ते आता सहाव्या स्थानावर आहेत. १. केकेआरचा धोकादायक डाव कोसळला, अश्वनीचा जादुई स्पेल २. बोल्ट-चहरची सुरुवातीची मदत ३. केकेआरचा धीरगंभीर प्रयत्न, पण अपुरा ४. एमआयचा सहज पाठलाग, रिकेल्टन-स्कायचा धमाका

Ashwini Kumar- मुंबई इंडियन्सचा शानदार विजय, अश्वनी कुमारच्या पदार्पणात चार बळी Read More »

मुंबई पोलिसांच्या मदतीने IPL मध्ये बेटींग, विरोधीपक्ष नेते अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

Ambadas Danve : मुंबई पोलीस विभागातील मोठ्या अधिकाऱ्यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात बेटिंग सुरू असल्याचा गंभीर आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी करत त्या संभाषणाचा पेनड्राइव्हच सभापतींकडे सादर केला. बेटिंग करणाऱ्यांमध्ये मेहुल जैन, कमलेश जैन आणि हिरेन जैन या व्यक्तींचा समावेश असून त्यांच्याकडून पाकिस्तानी खेळाडूंचा यासाठी वापर केला जात असल्याचा गंभीर आरोपही विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे. नुकत्याच पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉपी मध्ये लोटस 24 नावाच्या ऍपच्या माध्यमातून बेटिंग केल्यानंतर आता या सर्व व्यक्ती मुंबईत आयपीएल साठी आल्याची माहिती दानवे यांनी अंतिम आठवडावरील प्रस्तावावरील भाषणात सभागृहाला दिली. राज्याच्या परिवहन, सिडको, महसूल, आरोग्य विभागातील घोटाळे, मंत्र्यावर असलेले भ्रष्टाचाराचे आरोप, अधिकाऱ्यांचे घोटाळे सादर करत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारचे वाभाढे काढले. तसेच राज्यातील आर्थिक स्थिती रसातळाला जात असल्याचे म्हणत दानवे यांनी सरकारच्या कार्यपध्दतीवर निषेध व्यक्त केला. राज्याने गेल्या दोन वर्षांपासून क्राईम इन महाराष्ट्र अहवाल प्रसिध्द केला नाही. राज्यात 564 विविध गुन्हे दाखल झाले असून दंगलीच्या घटना घडल्या आहेत. नागपुर, पुणे,संभाजीनगरमध्ये बलात्कराच्या घटनांचा आलेख वाढला असून दररोज 22 बलात्कार, 45 विनयभंगाच्या घटना घडत आहेत. कायद्याचा धाक नसल्यामुळे या सर्व घटना घडत असल्याचे दानवे म्हणाले. सरकारने सुरु केलेले मिशन शक्ती अभियानात आतापर्यंत 22 टक्के रक्कम खर्च झाली असून ही दुर्देवी बाब असल्याचेही ते म्हणाले. कारागृहाची बंदीची क्षमता 27 हजार 114 बंदी असताना 43 हजार बंदी कोंबून ठेवले आहेत. राज्यात 51 हजार कोटी रुपयांची फसवणूकीच्या घटना घडल्या आहेत. राज्यात गुन्हयांच व सायबर गुन्ह्याच प्रमाण वाढल असून ते रोखण्यासाठी सायबर सेल प्रभावी होण्याची आवश्यकता आहे. अभिनेता सैफ अली खान यांच्या घरात घुसून चोरी करून त्याला मारण्याचा प्रयत्न झाला. बीड मस्साजोग सरपंच हत्येतील आरोपी अद्याप पकडला जात नाही. सोमनाथ सुर्यवंशी याचा मृत्यू मानव आयोगाच्या अहवालात पोलिसांनी केलेल्या मारहाणीत झाल्याचे स्पष्ट झाले. मंत्र्यांचा परदेशात चाललेल्या मुलाच विमान वळवलं जातं परंतु सूर्यवंशीला मारहाण करणाऱ्या लोकांवर सरकार कारवाई करू शकत नाही अशा शब्दांत दानवे यांनी नाराजी व्यक्त केली. अहमदाबादमधील सुधीर कोठडिया नावाच्या व्यक्तीने 2 हजार कोटी रुपये डिजिटल पध्दतीने जमवून हवाला मार्फत ते विदेशात पाठवले. यातील गुंतवणूकदारांची फसवणूक केली, याबाबत पराग अशोककुमार शहा यांनी तक्रार केली. मात्र याबाबत पुणे कि नारायण गावात गुन्हा दाखल व्हायला होता मात्र ठाण्यात पोलीस उपायुक्तांच्या सांगण्यावरून पोलीस आयुक्त गुन्हा दाखल करतात. याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी दानवे यांनी केली. सिडको योजनेतील खरपुडीची 247 हेक्टर क्षेत्र जमीन शेतकऱ्यांकडून सतीश अग्रवाल, कृष्णकुमार गोयल, राधेश्याम, चिप्पा रखमाजी आदींनी विकत घेतली. 18 जून 2008 ला हे प्रदूषित क्षेत्र म्हणून घोषित केले त्यानंतर आर्थिक साहाय्यता नसल्यामुळे हा प्रकल्प रद्द केला होता. यात सिडकोचे उपाध्यक्ष विजय सिंघल यांनी डी एसके लीगल सर्व्हिसेसची अवैध नेमणूक करून देयके दिल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी चौकशीची मागणी केली. मंत्री संजय राठोड यांचे खासगी सचिव विशाल राठोड यांनी स्वत:च्या सहीने गो बंजारा ट्रस्टची जागा मंत्र्याच्या नावे करून घेतली. उल्हास नगर महानगरपालिकेत युडीच उल्लंघन करून टीडीआर घोटाळा झाला आहे. यात ललित खोब्रागडे नावाच्या अधिकाऱ्याने युडीसिपीआर उल्लंघन केल्याचा गंभीर आरोपही दानवे यांनी केला. अंधेरी, के पश्चिम विभागातील चक्रपाणी नावाचे उपायुक्तांच्या वरदहस्ताने अवैध बांधकाम सुरु आहे. बोरिवली येथील पालिकेचे भगवतीचे हॉस्पीटलचे खासगीकरण करण्याचं प्रयत्न महापालिका करतेय.शत्रू संपत्तीबाबत पाकिस्तानच्या बॉंड वर आपल्याकडे कारवाई झाली. याबाबत मीरा भाईंदरच्या राजू शहा यांनी तक्रार केली असता, त्याला पाकिस्तान मधून धमकीचे फोन येत असल्याची माहितीही दानवे यांनी सभागृहात दिली. परिवहन विभागाने वाहतूक स्पीडवर मीटर मर्यादा निर्बंधाचा उल्लेख केला पाहिजे. वाहतूक स्पीडवर वेग नियंत्रक असले पाहिजे, त्यावर परिवहन विभाग लक्ष देत नाही. बेस्ट, टीएमटी, एनएमटीच्या बस धावत असलेल्या मार्गावर सिटी फ्लोच्या बसेस धावतात, त्यामुळे सार्वजनिक वाहतूकीच्या बसेसवर बंधन येतात, त्यामुळे सीटी फ्लोच्या बसेस बंद करण्याची मागणी दानवे यांनी केली. भोसरी एमआयडीसीत खुल्या जागेवर 150 शेड अवैधरित्या उभारले गेले. यासाठी विकी गोयल या व्यक्तीने बनावट कागदपत्रे बनवली. संभाजी नगरमध्ये हॉकी मैदानासाठी आलेले 21 कोटी रुपये संजय सबनीस व सुहास पाटील या अधिकाऱ्यांनी कंत्राटी कामगार हर्षकुमार क्षीरसागर यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर करून गैरव्यवहार केला. रोहयोमध्ये पालघर येथे निवृत्त अधिकारी नंदकुमार यांच्यासाठी मिशन महासंचालक पद निर्माण केलं, त्यासाठी केंद्राने यावर आक्षेप घेतल गेले. मुंबईत आकाश ग्राहक नावाची संस्था नवीनचंद्र चालवितात आणि ते तांदळावर पॉलिश करून परराज्यात विकतात. त्यासाठी त्यांनी खोटी कागदपत्रे सादर करुन मुंबई, ठाणे जिल्हा विभाग असा उल्लेख करून शासनाची दिशाभूल केली. आता कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र दाखवल आहे, त्यामुळे याची चौकशी करण्याची मागणीही दानवे यांनी केली आहे. आरोग्य विभागात बनावट औषधांचा पुरवठा झाला. तत्कालीन आरोग्य मंत्री यांनी यांत्रिक पध्दतीने स्वच्छता करण्याच्या निविदेसाठी ७७ कोटी रुपये खर्च येणार असताना ६६८ कोटी रुपये दाखवून गैरव्यवहार केल्याचा आरोप दानवे यांनी केला. मुंबई ठाण्यातील हॉटेलमध्ये रुफ टॉपवर विदेशी दारू पुरविणे सुरु आहे. लीव्हीन लिक्वीड नावाची कंपनी त्यांच्या ऍपवर विदेशी दारू घर पोहच करून नियमाच उल्लंघन करतेय , त्यामुळे फोरेन लिकर बॉंडचे धोरण सरकारने स्पष्ट करण्याची मागणीही दानवे यांनी केली आहे. जलसंपदा विभागातील अधिकारी जलसंधारणमध्ये घेतले जातात, यामुळे या विभागातील अभियंतांवर अन्याय होतो. औरंगजेबच्या कबरीच्या देखभालीसाठी साडेसहा लाख रुपये तर सिंधुदूर्गमधील शिवरायांच्या मंदिरांच्या देखभालीसाठी 250 रुपये येतात. नागपूरमध्ये झालेल्या दंगलीचा उल्लेख करताना दानवे यांनी इतर धर्मांचाही मान राखला पाहिजे असे म्हणत हिंदूत्वादी म्हणणाऱ्या सरकारला सुनावले.

मुंबई पोलिसांच्या मदतीने IPL मध्ये बेटींग, विरोधीपक्ष नेते अंबादास दानवेंचा गंभीर आरोप Read More »

चॅम्पियन्स ट्रॉफीमधून परतताच केएल राहुलने घेतला मोठा निर्णय, नाकारली चक्क कर्णधारपदाची ऑफर

IPL 2025 : भारतीय संघाने शानदार कामगिरी करत आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये न्यूझीलंडचा 4 विकेट्सने पराभव करत स्पर्धा जिंकली आहे. या संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघासाठी केएल राहुलने जबरदस्त कामगिरी केली आहे. नुकतंच तो भारतात परतला असून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. माहितीनुसार, त्याने आयपीएल 2025 मध्ये कर्णधारपदाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुलने आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद स्वीकारण्याची ऑफर नाकारली आहे. माहितीनुसार दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीने राहुलला कर्णधारपदाची ऑफर दिली होती, मात्र त्याने ऑफर स्वीकारण्यास नकार दिला. अक्षर पटेल कर्णधार होणार?तर दुसरीकडे केएल राहुलने कर्णधारपदाची ऑफर नाकारल्यामुळे अक्षर पटेल दिल्ली फ्रँचायझीची कमान सांभाळू शकतो अशी अटकळ बांधली जात आहे. आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्सने केएल राहुलला 14 कोटी रुपयांची बोली लावून खरेदी केले. कारण राहुलला याआधी आयपीएलमध्ये कर्णधारपद भूषवण्याचा अनुभव आहे. 2020-21 मध्ये तो पंजाब किंग्जचा कर्णधार होता आणि 2022 -2024 पर्यंत तो लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार होता. त्यामुळे तो दिल्लीची कमान सांभाळणार याबाबत चर्चा सुरू झाली होती. मात्र आता मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की तो फक्त एक खेळाडू म्हणून खेळू इच्छितो, त्यामुळे राहुलचा हा निर्णय दिल्लीसाठीही किती फायदेशीर ठरणार हे पाहावे लागेल.

चॅम्पियन्स ट्रॉफीमधून परतताच केएल राहुलने घेतला मोठा निर्णय, नाकारली चक्क कर्णधारपदाची ऑफर Read More »

भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला दिला धक्का, ‘या’ 5 चुका अन् स्वप्न भंग

Champions Trophy Final: आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारतीय संघाने न्यूझीलंडचा 4 विकेट्सने पराभव करत चॅम्पियन ट्रॉफी 2025 चे विजेतेपद जिंकले आहे. मात्र या स्पर्धेच्या सुरवातीपासून जबरदस्त फॉर्मात असलेल्या न्यूझीलंड संघाला फायनलमध्ये पाच चुका भारी पडल्या ज्यामुळे त्यांना अंतिम सामन्यात भारताकडून पराभव पत्करावा लागला. मॅट हेन्री अंतिम सामन्यातून बाहेरन्यूझीलंडच्या आशांना सर्वात मोठा धक्का सामन्यापूर्वीच बसला कारण या स्पर्धेत सर्वाधिक 10 बळी घेणारा वेगवान गोलंदाज मॅट हेन्री दुखापतीमुळे अंतिम सामना खेळू शकला नाही. त्याच्या जागी खेळणाऱ्या नाथन स्मिथने 2 षटकांत 22 धावा दिल्या. फिरकी गोलंदाजी खेळता आली नाहीया सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या फलंदाजांनी भारतीय वेगवान गोलदाजांवर हल्लाबोल केला मात्र त्यानंतर फिरकी गोलंदाजी सुरू होताच विकेट पडू लागल्या. पहिल्या 75 धावांमध्ये, फॉर्ममध्ये असलेले तिन्ही फलंदाज यंग, रॅचिन आणि विल्यमसन फिरकीच्या जाळ्याचे बळी पडले. मधल्या षटकांच्या फलंदाजी स्लोमधल्या षटकांच्या टप्प्यात किवी फलंदाजांना एकेरी आणि दुहेरी धावा करता आल्या नाहीत. डॅरिल मिशेलने 63 धावा केल्या असतील, पण त्यासाठी त्याला 101 चेंडू लागले. अशा परिस्थितीत, धावगती बरीच कमी झाली आणि त्यानंतर, न्यूझीलंडला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. वेगवान गोलंदाजी निराशाजनक कामगिरीजेव्हा किवी गोलंदाज गोलंदाजी करायला आले तेव्हा रोहित शर्माने त्यांच्यावर वर्चस्व गाजवले आणि त्यांना बॅकफूटवर नेले. त्यानंतर वेगवान गोलंदाजांना विकेट घेण्यात अपयश आले आणि पहिल्या 10 षटकांत त्यांनी भरपूर धावा दिल्या. त्यामुळे 252 चा स्कोअर आणखी कमी झाला. श्रेयस अय्यरचा महत्त्वाचा झेल सोडलाएकेकाळी लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडिया अडचणीत सापडल्याचे दिसत होते, परंतु श्रेयस अय्यरने शानदार पुनरागमन केले. त्यानंतर, जेव्हा भारताला जिंकण्यासाठी 100 पेक्षा जास्त धावांची आवश्यकता होती, तेव्हा 44 धावांवर अय्यरचा सोपा झेल सोडला. त्यानंतर गती भारताकडे सरकली आणि किवींचे खांदे झुकले.

भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला दिला धक्का, ‘या’ 5 चुका अन् स्वप्न भंग Read More »