DNA मराठी

राजकीय

AIMIM News : … तर नाक रगडून माफी मागा आणि राजीनामा द्या, परवेज अशरफींचा मुख्यमंत्र्यांना पत्र

AIMIM News :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने राज्यात राजकारण चांगलंच तापला आहे.  सध्या या प्रकरणावरून विरोधी पक्षांनी महायुतीच्या नेत्यांवर जोरदार टीका करत मुख्यमंत्र्यांकडे राजीनाम्याची मागणी केली. यातच अहमदनगर एआयएमआयएम जिल्हाप्रमुख  डॉ. परवेज अशरफी यांनी देखील मुख्यमंत्र्यांना राजीनामा देण्याची मागणी केली आहे. आपल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा महायुती सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचे हस्ते डिसेंबर २०२३   राजकोट, मालवण येथे उभारला आणि त्याचे श्रेय लाटले. परंतु सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा एक वर्ष ही टिकला नाही.  महाराष्ट्रातील रयतेचे राजे ज्यांनी १८ पगड जाती आणि १२  बलुतेदार यांना एकत्र घेऊन रयतेचे राज्य स्थापन केले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा आठ महिन्यातच पाडला. यावरून स्पष्ट दिसते की महायुती सरकार आणि त्यांनी दिलेला ठेकेदार हे सर्वांनी भ्रष्टाचार करण्यात महाराजांनाही सोडलं नाही. पुतळा उभारण्यात ज्या ज्या बाबींची दक्षता घेणे आवशक होते त्या बाबींचा सरकारने विचार केलेला दिसत नाही. अवघ्या दोन महिन्यात सरकारने महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी मंजुरी देऊन इतका मोठा पुतळा उभारण्याचा ज्याला काहीही अनुभव नाही अश्या व्यक्तीची शिफारस करून काम दिले.   मागील १० वर्षात मोदी सरकार यांनी बांधलेले पूल पैकी बहुतांश कोसळले, भव्य प्रभू रामाचे मंदिर सुधा गळायला लागले, नवीन संसद गळायला लागले, प्रभू राम मंदिर जवळील नवीन झालेले रस्त्यात मोठ मोठे खड्डे झाले,  ज्यावेळेस पुतळा उभारण्यात आला होता. तेव्हा काही शिवप्रेमींनी शंका व्यक्त केली होती की सदर महाराजांचा पुतळा याचा दर्जा टिकण्या सारखे नसून चहेऱ्यावरचे  हावभाव महाराजांचे नाही परंतु त्या विषयाला महायुती सरकारने दुर्लक्ष केले.  महाराजांचे नावाने  राजकारण करतात त्याच महाराजांचे पुतळ्यात महायुती सरकारात भ्रष्टाचार केल्याचे दिसत आहे. पुतळा कोसळल्यावर मुख्यमंत्री यांनी पत्रकारांना सांगितले की वारे जोराने वाहत होते त्यामुळे पुतळा कोसडला. यावरून असे दिसते की मुख्यमंत्री यांना घटनेचा कोणताही गांभीर्य नव्हता किंवा त्यांनी हा प्रकार गांभीर्याने घेतलेला नाही. प्रधानमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी जनतेची माफी मागितली. परंतु सदर माफी ही फक्त ढोंग  किंवा राजकीय नुकसान वाचवण्याचे हेतूने मागितली आहे. म्हणजेच  मागितलेली माफी ही फक्त जनतेची दिशाभूल करणारी असल्याचा टोला डॉ परवेज अशरफी यांनी लावला. खरंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर आणि सन्मान असेल तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म स्थळी जाऊन नाक रगडून माफी मागावी आणि कोणताही विलंब न करता आपले पदाचे राजीनामे द्यावे असा सल्ला डॉ परवेज अशरफी यांनी दिला. महाराजांचा पुतळा उभारण्यात जी सरकार भ्रष्टाचार करत असेल तर महाराजांच्या जनतेला न्याय कुठून देणार? असेही त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

AIMIM News : … तर नाक रगडून माफी मागा आणि राजीनामा द्या, परवेज अशरफींचा मुख्यमंत्र्यांना पत्र Read More »

‘मी 100 वेळा माफी मागायला तयार…’, एकनाथ शिंदे

Eknath Shinde: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने राज्य सरकारवर जोरदार टीका होताना दिसत आहे.  यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याबद्दल शंभर वेळा माफी मागू शकतो, असे म्हटले आहे. यात मागेपुढे पाहणार नाही. असेही शिंदे म्हणाले. शिंदे म्हणाले की, विरोधकांकडे राजकारण करण्यासाठी इतर मुद्दे आहेत, पण महाराष्ट्राचे थोर व्यक्तिमत्त्व शिवाजी महाराजांना त्यापासून दूर ठेवावे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात चार दिवसांपूर्वी पुतळा कोसळल्याने प्रकरण तापत आहे. राज्य सरकारने अपघाताचे कारण शोधण्यासाठी तांत्रिक समिती स्थापन केली, तर उपमुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी या घटनेबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात मूक निदर्शने केली. काय म्हणाले एकनाथ शिंदे? अशा स्थितीत आता शिंदे म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहेत. मी त्याच्या पायाला 100 वेळा हात लावून माफी मागायला तयार आहे. मी माफी मागण्यापासून मागे हटणार नाही. आमचे सरकार त्यांचे  आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करते. महाराजांचा 35 फूट उंचीचा पुतळा, राजकोट किल्ला संकुलात 26 ऑगस्ट रोजी कोसळला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे अनावरण केल्यानंतर सुमारे नऊ महिन्यांनी, राज्यात राजकीय वादळ निर्माण झाले. भारतीय नौदलाचे विधान हा प्रकल्प भारतीय नौदलाद्वारे चालवला जात असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. शिवरायांचा पुतळा बसवण्याचा प्रकल्प राज्य सरकारच्या समन्वयाने साकारला आणि त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला, असे नौदलाने गुरुवारी सांगितले. एका निवेदनात, नौदलाने पुतळ्याची दुरुस्ती आणि जीर्णोद्धार शक्य तितक्या लवकर सर्व उपायांमध्ये मदत करण्यास वचनबद्ध असल्याचे म्हटले आहे.

‘मी 100 वेळा माफी मागायला तयार…’, एकनाथ शिंदे Read More »

Laxman Hake : निवडणुकीत ओबीसी उमेदवारांनाच मतदान करा- लक्ष्मण हाके

Laxman Hake : ओबीसी आंदोलक  लक्ष्मण हाके यांचे नांदेडच्या लोहा येथे जंगी स्वागत करण्यात आले.ओबीसी जनजागृती साठी प्राध्यापक लक्ष्मण हाके हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. अनेक ठिकाणी ते ओबीसींचे मेळावे घेत आहेत.लोहा येथे देखील ओबीसी बांधवाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यासाठी ओबीसी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाजाने ओबीसींच्याच उमेदवारांना मतदान करावे.जर ओबीसी उमेदवार नसेल तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,अल्पसंख्याक उमेदवारांना ओबीसींनी मतदान करावे असे आवाहन प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी ओबीसी बांधवांनी केले आहे.  गेल्या काही दिवसांपूर्वी लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी उपोषण केला होता.

Laxman Hake : निवडणुकीत ओबीसी उमेदवारांनाच मतदान करा- लक्ष्मण हाके Read More »

Ahmednagar News: नितेश राणेंच्या अडचणीत वाढ, अहमदनगर अखंड मराठा समाजाकडून पोलीस अधीक्षकांना निवेदन

Ahmednagar News: अहमदनगर शहरात 01 सप्टेंबर रोजी रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ भाजप आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वात रॅली आणि सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र या सभेच्या माध्यमातून शहरातील सामाजिक सलोखा खराब होऊ नये यासाठी अहमदनगर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे अहमदनगर अखंड मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.  मालवण येथील राजकोट किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याविषयी घडलेल्या घटनेने शिवप्रेमी व अखंड मराठा समाजाच्या त्रीव भावन लक्षात घेवून या सभेच्या माध्यमातून सामाजिक सलोखा खराब होऊ नये याची खबरदारी घेण्यात आला अशी विनंती या निवेदनाद्वारे अहमदनगर अखंड मराठा समाजाकडून करण्यात आली.

Ahmednagar News: नितेश राणेंच्या अडचणीत वाढ, अहमदनगर अखंड मराठा समाजाकडून पोलीस अधीक्षकांना निवेदन Read More »

झिरो बॅलन्सवर आजच उघडा PMJDY खाते, मिळणार 2 लाखांचा विमा

Modi Government: प्रधानमंत्री जन धन योजनेला (PMJDY) आज 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. कोट्यवधी लोकांना या योजनेचा लाभ झाला आहे. ही योजना 28 ऑगस्ट 2014 रोजी सुरू करण्यात आली. 28 ऑगस्ट 2018 रोजी सरकारने PMJDY 2.0 लाँच केले. तेव्हापासून उघडलेल्या PMJDY खात्यांसाठी RuPay कार्डवरील अपघात विमा संरक्षण दुप्पट करून 2 लाख रुपये करण्यात आले. या विम्यासाठी कोणताही प्रीमियम आकारला जात नाही. हे NPCI द्वारे दिले जाते. सध्या प्रीमियम 0.47 रुपये प्रति कार्ड आहे. जाणून घ्या PMJDY चे काय फायदे आहेत. झिरो बॅलन्सवर खाते उघडले सर्वसामान्यांना बँकिंग व्यवस्थेशी जोडण्याच्या उद्देशाने पंतप्रधान जन धन योजना सुरू करण्यात आली. यामध्ये अगदी गोरगरिबांची बँक खाती शून्य शिल्लक ठेवून उघडली जातात. या योजनेत सामाजिक सुरक्षा योजनांचे लाभ थेट बँक हस्तांतरण (DBT) द्वारे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतात. कर्ज, विमा, पेन्शन मिळणे सोपे प्रधानमंत्री जन-धन योजनेचा उद्देश गरीब वर्गांना बँकिंग प्रणालीशी जोडणे, बचत खाती उघडणे आणि कर्ज, विमा आणि पेन्शन सुविधा सुनिश्चित करणे हे आहे. यामध्ये कोणत्याही जामीनदाराची गरज नाही. सरकारी आकडेवारीनुसार, आतापर्यंत 52.39 कोटींहून अधिक लोकांची जन धन खाती उघडण्यात आली आहेत. शून्य प्रीमियमवर अपघात विमा जन धन खात्यांमध्ये जमा केलेल्या रकमेवर व्याज मिळते. 1 लाख रुपयांचा अपघात विमा आणि 30,000 रुपयांचे जीवन संरक्षण देखील उपलब्ध आहे. 2018 नंतर उघडलेल्या खात्यांवर अपघात विमा 2 लाख रुपयांपर्यंत आहे. त्याचा प्रीमियमही शून्य आहे. किमान शिल्लक राखण्याचे कोणतेही टेन्शन नाही जन धन खात्यांमध्ये किमान शिल्लक ठेवण्याची गरज नाही. खात्यात 10,000 रुपयांची ओव्हरड्राफ्ट सुविधाही उपलब्ध आहे. जन धन खाते उघडल्यानंतर, लाभार्थ्यांना रुपे डेबिट कार्ड देखील दिले जाते. पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडता येते बँकांशिवाय पोस्ट ऑफिसमध्येही जन धन खाते उघडले जाते. यासाठी फक्त पॅन कार्ड आणि आधार कार्ड असणे आवश्यक आहे. यासोबतच जन धन खातेही ऑनलाइन उघडता येणार आहे.

झिरो बॅलन्सवर आजच उघडा PMJDY खाते, मिळणार 2 लाखांचा विमा Read More »

Ahmednagar News: जिल्हा परिषदेवर धडकला पोषण आहार कर्मचाऱ्यांचा संघर्ष मोर्चा

Ahmednagar News: श्रमिक मजदूर संघ शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्या वतीने शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेवर संघर्ष मोर्चा काढण्यात आला. पोषण आहार कर्मचाऱ्यांनी विविध प्रश्‍न व समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात जोरदार निदर्शने करून ठिय्या आंदोलन केले.  या मोर्चात जिल्ह्यातील पोषण आहार कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनात संस्थापक अध्यक्ष महेंद्र विधाते, राज्य उपाध्यक्ष कविता धिवारे, राज्य समन्वयक सविता विधाते, सुभाष सोनवणे, शितल दळवी, कावेरी साबळे, उत्तम गायकवाड, कैलास पवार, विद्या अभंग, मेजबीन सय्यद, अश्‍विनी दळवी, छाया भूमकर, बाबासाहेब गोर्डे आदींसह सर्व तालुकाध्यक्ष, पदाधिकारी व महिला कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.  मार्केटयार्ड चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मोर्चाची सुरुवात करण्यात आली. जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मोर्चा जिल्हा परिषदेवर धडकला. पोषण आहार कर्मचाऱ्यांनी केलेल्या जोदरार घोषणाबाजी जिल्हा परिषदेचा संपूर्ण परिसर दणाणून निघाला.  जोपर्यंत विद्यार्थी आहे, तोपर्यंत शालेय पोषण आहार सुरु राहणार असल्याने सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, शासकीय सेवेत सामावून घेत नाही तोपर्यंत किमान वेतन कायद्याप्रमाणे 15 हजार रुपये मानधन द्यावे, इतर केडर प्रमाणे शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना गणवेश मिळावा, गॅस सारख्या ज्वलनशील पदार्थ सोबत काम करायचे असल्याने दुर्दैवाने एखादी दुर्घटना घडल्यास त्या कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून किमान कर्मचाऱ्यांचा 20 लाखाचा विमा उतरवावा, कर्मचाऱ्यांना औषधोपचारासाठी किमान 50 हजार रुपयाची मदत मिळावी, दरवर्षीच्या करार ऐवजी किमान तीन वर्षातून एकदा करार करावा, शालेय परिसर, वर्ग स्वच्छता, स्वच्छतागृह इत्यादींची साफसफाई करण्यासाठी संबंधित शालेय यंत्रणेकडून कर्मचाऱ्यांवर दबाव आनला जात असून, शासन निर्णयानुसार ही कामे करण्यास दबाव आणू नये, गरोदर महिला कर्मचारी यांना बालसंगोपणासाठी सहा महिन्याची पगारी रजा मिळावी, विनाकारण कुणाला कामावरून कमी न करता त्या कर्मचाऱ्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी द्यावी, प्रशिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांना नियुक्ती द्यावी, ज्याच्या नावावर करार त्यांचीच प्रत्यक्ष नेमणूक करावी, सेंट्रल किचन पद्धती तात्काळ बंद करून पूर्वीप्रमाणे जे कर्मचारी काम करत होते त्यांना तात्काळ कामावर घेण्याची मागणी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली आहे.  या मागणीचे निवेदन जिल्हा शालेय पोषण आहारचे लेखा अधिकारी रुपेश भालेराव यांना देण्यात आले.

Ahmednagar News: जिल्हा परिषदेवर धडकला पोषण आहार कर्मचाऱ्यांचा संघर्ष मोर्चा Read More »

Maharashtra Election: भाजपाचे विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना डावलुन शेवगांवांत भाजपाचा भव्य मेळावा….!

Maharashtra Election: शेवगांव व पाथर्डी तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचा निर्धार मेळावा शेवगांव येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अरुण मुंढे तसेच ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष गोकुळ दौंड यांच्या नेतत्वाखाली मेळावा पार पडला. शेवगांव-पाथर्डी विधानसभेच्या भाजपाच्या आमदार मोनिका राजळे यांना डावलुन हा निर्धार मेळावा भाजपाचे राज्य सरचिटणीस अरुण मुंढे आणी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड यांनी निर्धार मेळाव्याचे भव्य आयोजन करून अरुण मुंडे व गोकुळ दौंड यांनी आमदार मोनिका राजळे यांच्या विरोधात शेवगांव-पाथर्डी विधानसभेसाठी दंड थोपटले आहे.  मेळाव्यात अरुण मुंढे किंवा गोकुळ दौंड या दोघांपैकी कोणी एकाला पक्षाने विधानसभेची उमेदवारी द्यावी अशा मागणीने जोर धरला असुन विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना पक्षश्रेष्ठींनी पुन्हा उमेदवारी देऊ नये अन्यथा शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे पदाधिकारी सामुहिक राजीनामे देणार असल्याचे वक्तव्य यांनी केले.  यावेळी भाजपचे शेवगांव तालुकाध्यक्ष तुषार वैद्य, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड, जय शिवसंग्राम पक्षाचे जिल्हाध्यक्ष नवनाथराव ईसारवाडे, बाळासाहेब सोनवने, आत्माराम कुंडकर, बाळासाहेब कोळगे, संजय मरकड सह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Maharashtra Election: भाजपाचे विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना डावलुन शेवगांवांत भाजपाचा भव्य मेळावा….! Read More »

Nanded News : विविध मागण्यांसाठी आदिवासी समाज बांधवांचा मोर्चा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला

Nanded News : विविध मागण्यांसाठी आदिवासी समाज बांधवांचा मोर्चा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. नांदेड शहरातील महात्मा फुले पुतळा पासून या मोर्चाला सुरुवात झाली. महात्मा फुले पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. आदिवासी समाजातील नरहरी झिरवळ,किरण लमहाटे,डॉ राजेंद्र भारुड यांच्या प्रतिमेचे काही समाज कंटकांनी जागतिक आदिवासी दिनी  दहन केले,त्या समाज कंटकांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत,12 हजार 500 जागांवर भरती प्रक्रिया राबविण्यात यावी,पेसा अंतर्गत भरती प्रक्रिया तात्काळ घेण्यात यावी,यासह इतर मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  शासनाने तात्काळ आमच्या मागण्याची दखल घेऊन मागण्या मान्य कराव्यात अन्यथा या मागण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आदिवासी समाज बांधव रस्त्यावर उतरले असा इशारा माजी आमदार संतोष टारफे यांनी दिलाय.

Nanded News : विविध मागण्यांसाठी आदिवासी समाज बांधवांचा मोर्चा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला Read More »

IAS Iqbal Singh Chahal यांच्या नियुक्तीवरून शिंदे सरकारवर विरोधकांचा हल्लाबोल, लावले गंभीर आरोप

IAS Iqbal Singh Chahal: राज्यातील गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून बीएमसीचे माजी आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची नियुक्ती केल्यावरून ठाकरे गटाने राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.   सरकारच्या या निर्णयावर उद्धव ठाकरेंचे शिवसेना नेते आनंद दुबे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत दुटप्पीपणाचा आरोप केला आहे. सरकारवर निशाणा साधत दुबे म्हणाले की, भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेने ज्या आयएएस अधिकारी इक्बाल चहलवर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, त्याच आयएएस अधिकारी इक्बाल चहल यांना आज राज्यात मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. बीएमसीच्या कथित कोविड हॉस्पिटल घोटाळ्याप्रकरणी चहलला गेल्या वर्षी अंमलबजावणी संचालनालयाने बोलावून चौकशी केली होती. इक्बाल सिंग यांचे नाव कोविड घोटाळा आणि फर्निचर घोटाळ्यात  आनंद दुबे यांनी जारी केलेल्या व्हिडिओ स्टेटमेंटमध्ये सरकार आणि चहलवर आरोप करताना ते म्हणाले, ‘हे दुटप्पीपणाचे आणखी एक प्रकरण आहे. बीएमसीचे माजी आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची एसीएस होम म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, ज्याचे प्रमुख भाजप नेते देवेंद्र फडणवीस आहेत. विचित्र गोष्ट म्हणजे कोविड घोटाळा आणि फर्निचर घोटाळ्यातही भाजप नेत्यांनीच चहलवर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. चहलला ईडीने बोलावून चौकशी केली, पण आता तपासात काय प्रगती झाली, याबाबत कोणालाच माहिती नाही. जेव्हा तुम्ही सरकारशी जवळीक साधून काम करता तेव्हा अशा मोठमोठ्या पोस्टिंग दिल्या जातात. हे सरकार प्रत्येक वेळी वॉशिंग पावडर का घेऊन जाते? अजित पवारांच्या बाबतीतही असेच घडले. दोन्ही प्रकरणांमध्ये त्याच भाजप नेत्याने गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते आणि आता चहल आणि अजित पवार हे दोघेही सरकारचा भाग आहेत. ती व्यक्ती प्रशासक असो की राजकारणी, तपास व्हायला हवा. या राज्यातील जनता सर्व काही पाहत असून येत्या निवडणुकीत याचा बदला नक्कीच घेईल. इक्बाल चहल हे 1989 च्या बॅचचे आयएएस अधिकारी  1989 च्या बॅचचे आयएएस अधिकारी चहल यांनी मे 2020 ते या वर्षी मार्च या कालावधीत बीएमसी आयुक्त म्हणून काम केले आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयुक्तांच्या सूचनेनुसार त्यांची अतिरिक्त मुख्य सचिव पदावर मुख्यमंत्री कार्यालयात बदली करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बदलापूर बलात्कार प्रकरण आणि त्यानंतर झालेल्या आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र सरकारवर तीव्र टीका झाली. यानंतर चहल यांची गृह खात्यातील अतिरिक्त मुख्य सचिव गृह या महत्त्वाच्या पदावर तातडीने नियुक्ती करण्यात आली.

IAS Iqbal Singh Chahal यांच्या नियुक्तीवरून शिंदे सरकारवर विरोधकांचा हल्लाबोल, लावले गंभीर आरोप Read More »

PM Kisan Samman Nidhi Yojana : शेतकऱ्यांनो ‘या’ तारखेला मिळणार 2,000 रुपये

PM Kisan Samman Nidhi Yojana : देशभरातील सुमारे 12 कोटी शेतकरी आता पुढील म्हणजेच 18 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. सरकार लवकरच शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देणार आहेत.पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढचा म्हणजेच 18 वा हप्ता खात्यात जमा होणार आहे.  मोदी सरकार ऑक्टोबरच्या अखेरीस पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता जारी करण्याच्या विचारात आहे. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.  पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्याच्या रकमेबाबत मोदी सरकारने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मीडिया रिपोर्ट्समध्ये हा सर्व दावा केला जात आहे. शेतकऱ्यांनी हे काम लवकरात लवकर पूर्ण करा पीएम किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित लोकांनी काही काम तात्काळ पूर्ण करावे, अन्यथा 18 व्या हप्त्याचे 2,000 रुपये अडकले जातील. शेतकरी आधी ई-केवायसीचे काम करून घेऊ शकतात. याशिवाय शेतकऱ्यांना जमीन पडताळणीचे काम मिळू शकते, जे एक चांगली ऑफर आहे. ज्या शेतकऱ्यांनी जमीन पडताळणी व ई-केवायसीचे काम केले नव्हते त्यांचे पैसे अडकले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या निराशेला सामोरे जावे लागले. ई-केवायसी करण्यासाठी, शेतकऱ्यांना प्रथम योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जावे लागेल. येथे पोहोचून तुम्ही हे काम सहजपणे पूर्ण करू शकता, ज्यामुळे तुमच्या सर्व उणिवा दूर होतील.    मोदी सरकारने 2019 मध्ये शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी ही योजना सुरू केली. या योजनेंतर्गत सरकार दर 4 महिन्यांनी 2,000 रुपयांचा हप्ता जारी करते. 6,000 रुपये हस्तांतरित करण्याचे काम तीन हप्त्यांमध्ये केले जाते. सर्वप्रथम, तुम्हाला किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जाऊन क्लिक करावे लागेल. यानंतर पूर्वीच्या कोपर्यावर क्लिक करणे आवश्यक असेल. मग एक नवीन पेज उघडेल. तुम्हाला लाभार्थी यादी पर्याय निवडावा लागेल. एक नवीन फॉर्म उघडेल. येथे तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा आणि नंतर गावाचे नाव निवडावे लागेल. ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला Get Report वर क्लिक करावे लागेल. लाभार्थ्यांची यादी सहज उघडेल. जर तुमचे नाव या यादीत असेल तर हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात दिसतील.

PM Kisan Samman Nidhi Yojana : शेतकऱ्यांनो ‘या’ तारखेला मिळणार 2,000 रुपये Read More »