DNA मराठी

राजकीय

Maratha Reservation : मराठा आरक्षणावर खासदार विखेंचे मोठे विधान! म्हणाले,ओबीसी समाज……

Maratha Reservation: राज्यात सध्या मराठा आरक्षणावरून राजकारण तापले आहे.  यातच मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा लढा तीव्र केला आहे. आणि सरकारला दिलेली डेडलाईन बदलली जाणार नाही अशी देखील भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यात राजकारण तापण्याची शक्यता आहे.   या वर खासदार सुजय विखे यांना प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले की, चर्चेनेच विषय मार्गे लागणार आहे. तसेच मराठा समाजाने देखील संयम दाखवला आहे. त्याचबरोबर सरकार देखील याबाबत सकारात्मक आहे.  त्यामुळे कोणत्याही निकषापर्यंत येण्याऐवजी आणखी काही कालावधी आहे. ओबीसी समाज असो अथवा मराठा समाज या दोन्हीही समाजाच्या भावना लक्षात घेत दोन्ही समाजाचे हित जोपासण्याचा काम राज्य सरकारकडून केलं जाईल अशी प्रतिक्रिया खासदार सुजय विखे यांनी दिली. सरकारला 24 डिसेंबरची डेडलाईन मराठा आरक्षणसाठी मनोज जरांगे यांच्याकडून देण्यात आली आहे. मात्र डेडलाईन जवळ आली असता देखील कोणत्याही हालचाली करण्यात आलेल्या नाहीत त्यामुळे जरांगे यांनी देखील सरकारला इशारा दिला आहे.  जरांगे पुन्हा आक्रमक मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आणि मराठा समाजाच्यावतीने सरकारला दिलेली डेडलाईन दोन दिवसांवर आली आहे. मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेली मुदत 24 डिसेंबर असून, त्यानंतर आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करण्याच्या भूमिकेवर जरांगे ठाम असल्याचे दिसून येत आहे.  दरम्यान पुन्हा एकदा जरांगेंनी आज माध्यमांशी बोलताना देखील दिलेल्या तारखेनंतर आमचं आंदोलन शांततेत होणार आणि आरक्षणाचा मुद्दा अग्रस्थानी ठेवूनच चर्चा करणार, असं म्हटलं आहे.

Maratha Reservation : मराठा आरक्षणावर खासदार विखेंचे मोठे विधान! म्हणाले,ओबीसी समाज…… Read More »

Satyajeet Tambe : मान्यता मिळूनही ‘ती’ दोन रुग्णालये कागदावरच का?… आ. सत्यजीत तांबे

Satyajeet Tambe – राज्यातील सरकारी रुग्णालयांची अवस्था बिकट असताना श्रीगोंदा आणि संगमनेर येथे सरकारी रुग्णालयांची वानवा आहे या दोन्ही रुग्णालयांना मान्यता मिळूनही ही रुग्णालये अद्याप कागदावरच आहेत. या रुग्णालयांचे बांधकाम तातडीने पूर्ण करून श्रीगोंदा व संगमनेर तालुक्यांमधील लाखो रुग्णांना दिलासा द्या, अशी मागणी आ. सत्यजीत तांबे यांनी केली. फेब्रुवारी 2022 च्या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा व संगमनेर येथील 50 ते 100 खाटांच्या शासकीय रुग्णालयांचे बांधकाम अजूनही प्रलंबित आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे दोन्ही ठिकाणी रुग्णांसाठी रुग्णालयांची आवश्यकता असून ग्रामस्थांना 60 ते 50 किलोमीटर जावे लागत आहे.  इतकी वणवण करून देखील रुग्णालय जवळपास उपलब्ध नसल्याने रुग्णांचा रस्त्यातच जीव जातो. या दोन्ही रुग्णालयांच्या बांधकामांना सरकारने गेल्या वर्षीच मान्यता दिली असून त्याचे काम अजूनपर्यंत पूर्ण का झाले नाही? असा प्रश्न आ. तांबे यांनी आरोग्य मंत्र्यांना केले. यावर बोलताना आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत म्हणाले की, श्रीगोंदा व संगमनेर येथे सद्यस्थितीत 30 खाटांचे रुग्णालय कार्यान्वयीत आहे. श्रीगोंदा येथील 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालय बांधकामास शासन निर्णय फेब्रुवारी 2022 प्रमाणे 1 हजार 60 लक्ष रुपयांच्या बांधकामास मान्यता देण्यात आली आहे.  तसेच घुलेवाडी (संगमनेर) येथे 100 खाटांच्या 2 हजार 970 लक्ष रूपयांच्या रुग्णालय बांधकामास मार्च 2022 रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सदर बांधकामाची निविदेबाबतची कार्यवाही सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यास्तरावर सुरू आहे.

Satyajeet Tambe : मान्यता मिळूनही ‘ती’ दोन रुग्णालये कागदावरच का?… आ. सत्यजीत तांबे Read More »

Ram Shinde : तुम्ही स्वतः च पाहा! ‘त्या’ प्रकरणात राम शिंदे यांचा रोहित पवारांना टोला

Ram Shinde :  राज्यात येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुका होणार आहे. या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षासह इतर राजकीय पक्षांनी देखील तयारी सुरू केली आहे.  यातच कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आगामी निवडणुका महायुतीतील घटक पक्ष हे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवतील टीका केली होती. आता या टीकेला उत्तर देत आमदार राम शिंदे यांनी रोहित पवारांसह विरोधकांना टोला लगावला. राम शिंदे एका कार्यक्रमानिमित्त अहमदनगर शहरात आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले, संजय राऊत, जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांनी आपल्या पक्षावर लक्ष देणे गरजेचे आहे.  आम्ही कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार याचा आम्ही निर्णय घेऊ. त्यांना आमच्या घरात काय चाललंय हे डोकं पाहण्यापेक्षा स्वतःच्या घरात काय चाललं याकडे लक्ष दिले पाहिजे. कर्जत एमआयडीसी वर बोलताना राम शिंदे म्हणाले की तो प्रस्ताव सदोष होता त्या प्रकल्पाला गावकऱ्यांनी देखील विरोध केला तसेच ती जमीन विवादातील होती.  त्यामुळे नव्याने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून टीम ही कर्जत तालुक्यात गेली असून त्यांच्याकडून चाचणी केली जात आहे. तसेच पुढे बोलताना राम शिंदे म्हणाले की याबाबत मी एक प्रशासकीय बैठक देखील घेतलेली आहे. याबाबतचा अहवाल तयार करण्यात यावा असे निर्देश मी दिलेले होते त्या अनुषंगाने आजच त्या टीमने सहा क जागांची पाहणी केली आहे. त्यामुळे लवकरच शासनाकडे आराखडा पाठवला जाईल अशी माहिती यावेळी राम शिंदे यांनी दिली.

Ram Shinde : तुम्ही स्वतः च पाहा! ‘त्या’ प्रकरणात राम शिंदे यांचा रोहित पवारांना टोला Read More »

Ahmednagar News: 31 डिसेंबरपर्यंत शिवछत्रपती पुरस्कारांच्या यादीत योगाचा समावेश: आ. सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

Ahmednagar News:  निरोगी आणि सकारात्मक आयुष्य जगण्यासाठीचा महत्त्वाचा क्रीडाप्रकार अशी ओळख असलेल्या योगविद्येचा समावेश आता शिवछत्रपती पुरस्कारांच्या यादीतही होणार आहे.  गेल्या दोन अधिवेशनांपासून आमदार सत्यजीत तांबे यांनी योगाला क्रीडाप्रकाराचा दर्जा द्यावा व या खेळाचा समावेश शिवछत्रपती पुरस्कारांच्या यादीत व्हावा, यासाठी पाठपुरावा केला होता. आता हिवाळी अधिवेशनातही त्यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला. क्रीडामंत्री संजय बनसोड यांनी 31 डिसेंबरच्या आत नियमावली तयार करून शिवछत्रपती पुरस्कारांच्या यादीत योगाचा समावेश केला जाईल, असं आश्वासन दिलं. त्यामुळे आ. सत्यजीत तांबे यांनी आणखी एक प्रश्न तडीला लावल्याची भावना व्यक्त होत आहे.  भारतीय संस्कृतीत उगम झालेली योगविद्या ही निरोगी आयुष्यासाठी अत्यावश्यक आहे. योगविद्येचा अभ्यास करणाऱ्यांना शारीरिक फायद्यांसोबतच मानसिक स्वास्थ्यही लाभते. त्यामुळे योगासनांचा समावेश क्रीडाप्रकारांत व्हावा, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी आमदार झाल्यानंतरच्या पहिल्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. तसंच योगासनं करणाऱ्यांचा विचार शिवछत्रपती पुरस्कारांसाठी व्हावा व या पुरस्कारांच्या यादीत योगाचा समावेश व्हावा, याबाबतही ते आग्रही होते. त्यानुसार योगविद्येला क्रीडाप्रकाराचा दर्जा याआधीच मिळाला होता. आता हिवाळी अधिवेशनात पुन्हा एकदा आ. तांबे यांनी योगाचा समावेश शिवछत्रपती पुरस्कारांच्या यादीत व्हावा, याबाबत प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाला क्रीडामंत्री संजय बनसोड यांनी सकारात्मक प्रतिसाद देत 31 डिसेंबरच्या आधीच याबाबत नियमावली तयार केली जाईल, अशी ग्वाही सभागृहाला दिली. 9 खेळांचा शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत समावेश व्हावा! स्कुल फेडरेशन ऑफ इंडियाने रोलबॉल, आट्यापाट्या, बॉल बॅडमिंटन, सिकई-मार्शल आर्ट, थ्रो बॉल, डॉज-बॉल, टेनिक्वाईट, शूटिंग बॉल आणि कॅरम हे खेळ शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधून वगळले होते. त्यामुळे हे खेळ खेळणारे खेळाडू ग्रेस मार्क, सरकारी नोकरीत पाच टक्के आरक्षण अशा सुविधांपासून वंचित झाले होते. हा या खेळाडूंवर अन्याय आहे.  परिणामी स्कुल फेडरेशन ऑफ इंडियाने हे नऊ खेळ वगळण्याच्या आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करायला हवा, अशी मागणी आ. सत्यजीत तांबे यांनी केली. या मागणीची दखल घेत खेळाडूंच्या अडचणींचा आणि भवितव्याचा विचार करून या खेळांचा समावेश शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत करण्यासाठी योग्य ती कार्यवाही केली जात असल्याचं स्पष्टीकरण दिलं.

Ahmednagar News: 31 डिसेंबरपर्यंत शिवछत्रपती पुरस्कारांच्या यादीत योगाचा समावेश: आ. सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्याला यश Read More »

Chhatrapati Shivaji Maharaj : मनपाच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे लोकार्पण सोहळा संपन्न 

Chhatrapati Shivaji Maharaj : आज अहमदनगर महापालिकाच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे लोकार्पण सोहळा संपन्न. यावेळी खासदार सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे आमदार संग्राम जगताप देखील उपस्थित होते.  आपण पुतळे उभारतो मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांचे आचार आणि विचार आपल्या मुलांमध्ये रुजवले गेले पाहिजे असे मत खासदार सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे यांनी व्यक्त केलं अहमदनगर महानगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण खासदार विखे यांच्या पत्नी धनश्री विखे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शहरातील अहमदनगर महानगरपालिकेचे पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते  यावेळी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, आमदार संग्राम जगताप, महापौर रोहिणी शेंडगे, आयुक्त डॉ. पंकज जावळे, रणरागिणी महिला मंचच्या धनश्री विखे पाटील, उपमहापौर गणेश कवडे, सभापती गणेश कवडे, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर,  अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे सभागृह नेते विनीत पाऊलबुद्धे, सुनील त्र्यंबके, सभापती पुष्पाताई बोरूडे, मीनाताई चोपडा, रूपाली वारे आदींसह सर्वपक्षीय नगरसेवक उपस्थित होते. दरम्यान, महापौर रोहिणी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, सभापती गणेश कवडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी केले. सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले तर, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे यांनी आभार मानले. प्रशासकाचा कारभार माझ्याकडे यावा नगर शहराला 500 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शहराच्या वैभवात भर घालणार महत्त्वाचा पैलू आहे. मनपाचा प्रशासकीय कारभार माझ्याकडे असल्यास सीना नदी अतिक्रमण मुक्त करण्यासाठी प्रयत्न करू. ज्या शहरात नदी वाहते त्या शहराचा विकास होतो. नगरसेवकांनी छत्रपतींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करावे. शहराचे प्रश्न सोडविण्यासाठी नगरकरांच्या बाजूने उभे राहू, असे आश्वासन जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी दिले.

Chhatrapati Shivaji Maharaj : मनपाच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे लोकार्पण सोहळा संपन्न  Read More »

Chhagan Bhujbal : महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात नवा ट्विस्ट, छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ? वाचा सविस्तर

Chhagan Bhujbal – राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. याचा मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. या प्रकरणात मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या खटल्यातील तीन आरोपींनी माफीचे साक्षीदार होण्यासाठी केलेल्या अर्जावर सुनावणी करण्याचे न्यायालयाने मान्य केले आहे.  महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी सुनील नाईक, सुधीर साळसकर आणि अमित बलराज या तीन आरोपींना अटक करण्यात आली असून  या तिन्ही आरोपींनी माफीचे साक्षीदार होण्यासाठी अर्ज दाखल केले आहे.  या प्रकरणात मुख्य आरोपी छगन भुजबळ यांच्यासह इतरांनी दोषमुक्तीसाठी याचिका दाखल केली होती. मात्र, ही सुनावणी थांबवून आधी आमच्या माफीचे साक्षीदार होण्यासाठी त्यांच्या अर्जावर निर्णय घ्या, अशी मागणी तिघांनी केली होती  न्यायालयाने ती मान्य केली आहे. सुनील नाईक, सुधीर साळसकर आणि अमित बलराज या तीन आरोपींनी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर माफीनामा पत्र सादर केले होते.  आरोपी सुनील नाईक, सुधीर साळसकर आणि अमित बलराज यांनी साक्षीतून वगळण्यासाठी अर्ज सादर केला होता. या अर्जावर ईडीला 20 डिसेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले होते. या प्रकरणात विद्यमान मंत्री छगन भुजबळ हे मुख्य आरोपी आहेत. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत  सन 2005 मध्ये कोणतीही निविदा प्रक्रिया न करता विकासकाची नियुक्ती केल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर ईडीनेही या प्रकरणात पीएमएलए अंतर्गत कारवाई केली. ACB ने मुंबई सत्र न्यायालयात IPC कलम 409 (लोकसेवक असूनही सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे) आणि 471 (A) (खोटी कागदपत्रे तयार करणे) अंतर्गत आरोप दाखल केले. काय आहे महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरण? मुंबईतील अंधेरी येथील ‘आरटीओ’च्या जमिनीवर झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाला परवानगी देताना राज्य सरकारने दिल्लीतील महाराष्ट्र सदन इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी तसेच मुंबईतील मलबार हिल येथील विश्रामगृहाच्या बांधकामाचे कंत्राट संबंधित कंपनीला दिले. या कामासाठी कोणतीही निविदा प्रक्रिया झाली नाही. कालांतराने संबंधित कंपनीने दुसऱ्या विकास कंपनीशी करार करून विकास हक्क विकले.  यापूर्वी विकासकाला 80 टक्के नफा मिळत होता, तर कंत्राटदार आस्थापनेला राज्य सरकारच्या निकषानुसार 20 टक्के नफा मिळणे अपेक्षित होते. यामध्ये आस्थापनाला 190 कोटी रुपयांचा नफा झाला.  भुजबळ कुटुंबीयांना 13 कोटी 50 लाख रुपये आस्थापनेकडून दिल्याचा आरोप लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने केला आहे.

Chhagan Bhujbal : महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात नवा ट्विस्ट, छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ? वाचा सविस्तर Read More »

Agriculture News : राज्यातील 72 टक्के दूध खाजगी संस्थांना ! अनुदान फक्त सहकारीला

Agriculture News : राज्यातील शेतकरी गेल्या दोन महिन्यापासून दुधाचे दर कोसळल्याने अडचणीत सापडला आहे. यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना अनुदान द्यावे या मागणीसाठी किसान सभा, विविध शेतकरी संघटना व दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती गेले दोन महिने सातत्याने आंदोलन करत आहे.  आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी 22 नोव्हेंबर 2023 रोजी सह्याद्री अतिथीगृहावर बोलावलेल्या बैठकीतही किसान सभेने याबाबत जोरदार मागणी केली होती. राज्यभर तहसील कार्यालयांवर दुध ओतून करण्यात आलेल्या आंदोलनांमध्येही हीच मागणी करण्यात आली होती.  आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर सरकार याबाबत सकारात्मक निर्णय करेल असे आश्वासन विखे पाटील यांनी वारंवार दिले होते. मात्र बैठकीला आज महिना उलटून गेला तरी प्रत्यक्ष अनुदानाची घोषणा अजूनही करण्यात आलेली नाही.  विधी मंडळाच्या नागपूर अधिवेशनात अर्थातच याचे पडसाद उमटले. सभागृहात दूध प्रश्नाबाबत दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना आ. हरिभाऊ बागडे, आ. बाळासाहेब थोरात, आ. जयंत पाटील, आ. राजेश टोपे  यांनी लक्षवेधी अंतर्गत  प्रश्न विचारले.  किमान या प्रश्नांना उत्तर देताना तरी दुग्धविकास मंत्री अनुदानाची घोषणा करतील अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. सरकार अनुदान देण्याबाबत सकारात्मक आहे हीच ध्वनीफीत यावेळीही वाजविण्यात आली.  दुध अनुदानाबाबतची सरकारची ही चालढकल संतापजनक असून अनुदान देण्यात होणारी ही दिरंगाई दुध कंपन्यांना लाभ पोहचविण्यासाठीच केली जात आहे. सध्या दुध क्षेत्रात पृष्ठकाळ (फ्लश सीजन) सुरु आहे. या काळात दुधाचे उत्पादन वाढलेले असते.  दुध कंपन्या या काळात स्वस्तात दुध घेऊन त्याची पावडर बनवितात. जानेवारीनंतर हळूहळू दुधाचे उत्पादन कमी होते. परिणामी दुधाचे भाव आपोआप वाढू लागतात. मार्च अखेरपर्यंत फ्लश सीजन संपून लीन सीजन सुरु होतो.  दुधाचे भाव तेंव्हा पुरवठा घटल्याने स्वाभाविकपणे वाढलेले असतात. जेंव्हा भाव आपोआप वाढतात तेंव्हा अनुदान देण्याचा मुहूर्त साधून त्याचा  लाभ कंपन्यांना पोहचविला जातो. अनुदानाबाबत  आजवरचा हाच अनुभव शेतकरी घेत आले आहेत. यावेळीही अनुदान जाहीर करण्यात होत असलेली दिरंगाई यासाठीच सुरु आहे.   दुग्धविकास मंत्र्यांनी अधिवेशन संपण्यापूर्वी अनुदानाची घोषणा होईल असे सांगितले असले तरी प्रत्यक्षात किती अनुदान देणार याबाबत खुलासा केलेला नाही ही बाबही चिंताजनक आहे.  भेसळ रोखण्यासाठीचे अधिकार दुग्धविकास विभागाला द्यावेत ही किसान सभेची मागणी आहे. सभागृहात लक्षवेधीला उत्तर देताना ही मागणी मान्य झाल्याचे दुग्धविकास मंत्र्यांनी  सभागृहात जाहीर केले आहे. मात्र मिल्कोमिटर व वजन काट्यात होणारी लूटमार रोखण्याबाबत असलेल्या मागणीबाबत अद्यापही धोरण घेण्यात आलेले नाही.  पशुखाद्याचे भाव कमी करण्याबाबतही  सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे. तत्काळ किमान भाव फरका इतकी रक्कम अनुदान म्हणून जाहीर करून पूर्वलक्षी प्रभावाने गेले दोन महिन्याचा भाव फरक सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावा, पुढील काळातही हे अनुदान शेतकऱ्यांना सरळ खात्यावर द्यावे तसेच पशुखादय, औषधे व चाऱ्याचे  दर कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी किसान सभा व दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती करत आहे.  डॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले, उमेश देशमुख, इंजि.  सतीश देशमुख, जोतीराम जाधव, दादा गाढवे, दीपक वाळे, राजकुमार झोरी, श्रीकांत करे,  डॉ. अशोक ढगे, नंदू रोकडे,  सदाशिव साबळे, अमोल गोर्डे, धनंजय धोरडे, रामनाथ वदक, सुदेश जाधव, सुदेश इंगळे, रवी हासे, दीपक अण्णा काटे, सागर जाधव, अप्पा अनारसे, अरविंद कापसे.

Agriculture News : राज्यातील 72 टक्के दूध खाजगी संस्थांना ! अनुदान फक्त सहकारीला Read More »

Ahmednagar Shivaji Maharaj Statue: शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते करा : नगरसेविका शिला दीप चव्हाण यांची मागणी

Ahmednagar Shivaji Maharaj Statue : ऐतिहासिक अहमदनगर शहरातील महानगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात येणार आहे.   या पुतळ्याचे अनावरण मराठा समाजाच्या हक्कासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते करण्यात यावे अशी मागणी पालिका सभागृहात नगरसेविका शिला दीप चव्हाण यांनी केली आहे. तसेच मनपा आयुक्त व महापौर यांना देखील त्यांनी या मागणीचे पत्र दिले आहे. त्यांनी या निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजाला बरोबर घेऊन आदर्श राज्याची निर्मिती केली आहे. यामुळे त्यांचा महापालिकेत बसविण्यात आलेला पुतळा सर्वांना प्रेरणा व ऊर्जा देणारा आहे. अहमदनगर महापालिका प्रशासनाने गुरुवारी (दि.21 डिसेंबर) रोजी महानगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचे नियोजन केले आहे.  या पुतळ्याचे अनावरण मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते झाल्यास सर्व नगरकरांना आनंद होईल.मनोज जरांगे पाटील यांनी समाजाला आरक्षण मिळावा यासाठी स्वत:च्या मालकीची जमीन विकून संघर्ष करत आहे. यामुळे ते एक लढवय्ये कार्यकर्ते आहे. आज समाजासाठी सर्वस्वी त्याग करण्याची त्यांची भूमिका आहे.

Ahmednagar Shivaji Maharaj Statue: शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते करा : नगरसेविका शिला दीप चव्हाण यांची मागणी Read More »

Sujay Vikhe Patil : खा. डॉ. सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नांना मोठे यश; ‘त्या’ प्रकरणात मिळाली मंत्री मंडळाची मान्यता

Sujay Vikhe Patil : अहमदनगर मध्ये रोजगाराची उपलब्धता वाढवण्याकरिता मौजे वडगाव गुप्ता येथील जमीन औद्योगिक वसाहतीच्या विस्तारीकरणासाठी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकाने घेतला आहे. नगर जिल्ह्यातील औद्योगिक विकासाकरिता महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. त्याकरीता शिर्डी आणि वडगाव गुप्ता येथे जमीन उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी पाठपुरावा सुरू केला होता. शिर्डी येथील औद्योगिक वसाहती करिता शेती महामंडळाच्या जमिनी उपलब्ध करून देण्यास राज्य मंत्री मंडळाने यापूर्वीच निर्णय घेतला होता.  काल झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत नगर तालुक्यातील महाराष्ट्र शासनाची वडगाव गुप्ता येथील 600 एकर म्हणजेच सुमारे 225 हेक्टर आर जमीन फेज 2 साठी विनामूल्य वर्ग करण्याच्या प्रस्तावास राज्य शासनाने मान्यता दिली असल्याचे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.  विशेष म्हणजे राज्यात ही पहिलीच एमआयडीसी अशी आहे ज्या एमआयडीसीसाठी शेतकरी तसेच खाजगी जमीन मालकाची जमीन संपादित केली गेली नाही. अहमदनगर जिल्ह्यातील युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा असेल तर औद्योगिक वसाहतीचा विस्तार होणे आवश्यक होते. या विस्ताराकरिता जागा उपलब्ध होणे जरूरीचे होते. मात्र राज्यात महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर या सर्व निर्णयाला गती मिळाली आणि राज्य सरकारने औद्योगिक विकासाकरिता वडगाव गुप्ता येथे एमआयडीसीसाठी विनामूल्य जागा उपलब्ध करून देण्यास मंजुरी दिली. यामुळे मोठे उद्योग जिल्ह्यात येतील असा विश्वास खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला. औद्योगिक वसाहतीच्या विस्ताराकरिता खासदार डॉ. सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. दरम्यान जागा विनामूल्य उपलब्ध करून दिल्याबद्दल खा. सुजय विखेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांचे आभार मानले आहेत.

Sujay Vikhe Patil : खा. डॉ. सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नांना मोठे यश; ‘त्या’ प्रकरणात मिळाली मंत्री मंडळाची मान्यता Read More »

Navneet Rana : नवनीत राणा पुन्हा चर्चेत! ‘त्या’ प्रकरणात कोर्टाने फेटाळली याचिका

Navneet Rana : राज्याचे राजकारणात पुन्हा एकदा   अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा चर्चेत आले आहे.  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खासगी निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालीसा पठण केल्याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने निकाल दिला आहे. हा खटला रद्द करण्याची मागणी करणारी राणा दाम्पत्याची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसाचे पठण केल्याप्रकरणी अमरावतीचे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे आरोपी आहेत. त्याच्यावर खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. हे प्रकरण रद्द करण्यासाठी राणा दाम्पत्याने याचिका दाखल केली होती. ती याचिका न्यायालयाने फेटाळली. राणा दाम्पत्याने दावा केला होता की एफआयआर नोंदवण्यापूर्वीच अटक करण्यात आली होती, जी बेकायदेशीर होती. मात्र न्यायालयाने त्यांचा दावा फेटाळून लावला. या खटल्याची सुनावणी होऊन अतिरिक्त सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांनी निकाल राखून ठेवला होता, जो आज सुनावण्यात आला. तसेच खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना पुढील सुनावणीत हजर राहण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. मात्र, याचिका फेटाळल्यानंतर आता न्यायालयातून खटल्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याप्रकरणी आरोप निश्चित करण्याची प्रक्रिया पुढील वर्षी 5 जानेवारीला होणार आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या काळात अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा आणि त्यांच्या खासदार पत्नी नवनीत यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याची घोषणा केली होती. मात्र, बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत मुंबई पोलिसांनी त्यांना तसे न करण्याची नोटीस बजावली होती. मात्र, पोलिसांची नोटीस न जुमानता राणा दाम्पत्याने ठाकरे यांच्या विरोधात आंदोलनाचा गजर केला. त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी खार पोलिसांनी त्याला अटक केली. मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याविरुद्ध आयपीसी कलम 153अ, 34,37 आणि मुंबई पोलिस अधिनियम 135 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.  नंतर आयपीसीच्या कलम 124A अंतर्गत देशद्रोहाच्या गुन्ह्यातही वाढ करण्यात आली. वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. अनेक दिवस तुरुंगात घालवल्यानंतर नवनीत आणि रवी राणा यांना सशर्त जामीन मिळाला.

Navneet Rana : नवनीत राणा पुन्हा चर्चेत! ‘त्या’ प्रकरणात कोर्टाने फेटाळली याचिका Read More »