DNA मराठी

राजकीय

Ajit Pawar News: …तर मंदिरात घंटा वाजवत बसला असता; अजित पवारांचा लंकेना टोला

Ajit Pawar News : स्थानिक प्रश्नांची जाण नसतानाही त्याला देशाचा नेता बनण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. विकासाची कोणतेही कामे केली नसून मी जर निधी दिला नसता तर मंदिरात घंटा वाजवत बसला असता असा टोला उपुख्यमंत्रीपद अजित पवार यांनी निलेश लंके यांना लावला.   जिल्‍ह्यातील मोठ्या प्रकल्‍पांच्‍या  निधीसाठी खा.डॉ.सुजय विखे पाटील यांना विजयी करण्‍याचे आवाहनही त्‍यांनी केले.  कर्जत तालूक्यात महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍या निवडणूक प्रचारार्थ आयोजित करण्‍यात आलेल्‍या जाहिर सभेत उपमुख्‍यमंत्री पवार बोलत होते. याप्रसंगी आमदार राम शिंदे, बाळासाहेब नाहटा, उमेश पाटील, राजेंद्र नागवडे, प्रविण घुले पाटील, मंगलदास बांगल, बाळासाहेब शिंदे याच्यासह महायुती आणि घटक पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.  यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, केंद्रातून जास्तीत जास्त निधी आणून राज्याचा विकास करण्याचा निर्धार आम्ही केला आहे. त्यासाठी महायुतीचे जास्तीत जास्त खासदार निवडून आणायचे आहेत. यामुळे आपण जिल्ह्याच्या विकासासाठी महायुतीच्या उमेदवाराला मतदान करा असे आवाहन करताना नगर माझे आजोळ असून येथील शेतकऱ्यांच्या विकासासाठी मी प्रयत्न केले आहेत.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र यांच्यासोबत चांगले सुर जुळले असून सध्याचे महायुती सरकार हे गोरगरिबांचे सरकार असून सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे. देशात पंतप्रप्रधान मोदींनी मागील १० वर्षात केलेल्या कामाच्या जोरावर देशात पुन्हा एनडीए आणि राज्यात महायुती सरकार येणार आहे. यामुळे इतरांनी कितीही प्रतत्न केले तरी त्यांना यश मिळणार नाही असे त्यांनी सांगितले.  महायुती सरकार आणि जलसंपदा विभागाच्या मार्फत नगर जिल्ह्या दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगत त्यांनी शरद पवारांवर नाव न घेता  निशाणा साधला. ते म्हणाले ८० वर्षाच्या पुढे इतरांना संधी दिली पाहिजे, पण  आमचे जेष्ठ रिटायर होतच नाही.  यामुळे आम्ही काय करायचे असे सांगत आपली खंत व्यक्त केली. त्यावेळी त्यांनी विरोधी उमेदवार यांना धारेवर धरले, आधी बायकोसाठी उमेदवारी मागण्यासाठी आला नंतर लोकांनी हवा दिली आणि स्वतः खासदारकीच्या मैदानात आला अशा शब्‍दात त्‍यांनी महाविकास आघाडीच्‍या उमेदवाराचा समाचार घेतला.  राज्यात सुजय विखे यांच्या पंजोबांनी सहकाराची मुहूर्तमेढ रोवली आणि अख्या महाराष्ट्राला याचा फायदा झाला आहे. त्यांचा नातू तरूण, तडफदार नेता डॉ. सुजय विखे पाटील हे लोकांचे प्रश्न संसदेत प्रभावीपणे मांडतील यामुळे त्यांना येत्या १३ मे रोजी अनु. क्र. ३ चे कमळाच्या समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी निवडून देवून मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी सहायता करा असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.

Ajit Pawar News: …तर मंदिरात घंटा वाजवत बसला असता; अजित पवारांचा लंकेना टोला Read More »

Ahmednagar News: ‘तो’ वक्‍तव्‍य शरद पवार आणि उध्‍दव ठाकरेंना मान्‍य आहे का? चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल

Ahmednagar News: विराधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबईवर झालेल्‍या हल्‍ल्याबाबत केलेले वक्‍तव्‍य शरद पवार आणि उध्‍दव ठाकरे यांना मान्‍य आहे का असा सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्‍यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. कसाब च्‍या कुटूंबाच्‍या पालन पोषणाची जबाबदारी वडेट्टीवारांनी घ्‍यावी असा टोलाही त्‍यांनी लगावला.  अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेवार डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍या निवडणूकीच्‍या निमित्‍ताने प्रदेशाध्‍यक्ष बावनकुळे यांनी भारतीय जनता पार्टीच्‍या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्‍यांची बैठक घेवून पुढील चार दिवस जागृकतेने काम करण्‍याचे आवाहन केले. तसेच मतदाना पर्यंतच्‍या नियोजनाच्‍या सुचनाही त्‍यांनी दिल्‍या. याप्रसंगी खा.संजय काका पाटील, मा.आ.आशिष देशमुख, मा.खा.विकास महात्‍मे, आ.मोनीका राजळे, जिल्‍हाध्‍यक्ष दिलीप भालसिंग, शहर अध्‍यक्ष अभय अगरकर यांच्‍यासह पदाधिकारी उपस्थित होते.  आपल्‍या भाषण आ.बावनकुळे म्‍हणाले की, यंदाची लोकसभेची निवडणूक ही २०४७ पर्यंतच्‍या विकसीत भारतासाठीची निवडणूक आहे. आपले प्रत्‍येक मत हे देशामध्‍ये तीन कोटी लखपती दीदी बनविणार आहे. चार लोकांना घर देणार आहे, सुर्य घर निर्माण करणार आहे. आणि १३ तारखेची निवडणूक वन नेशन वन इलेक्‍शन आणि समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करण्‍यासाठी सुध्‍दा खुप महत्‍वपूर्ण आहे. त्‍यामुळे या निवडाणूकीत देशातील पुर्ण जनता ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्‍या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. नगर येथे येवून प्रधानमंत्र्यांनी आपल्‍याला नमस्‍कार केला असल्‍याने विकसीत भारताच्‍या मतदानाची अहुती शंभर टक्‍के मतदान घडवून आपण द्यावी असे आवाहन त्‍यांनी केले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली भाजपाचे संकल्‍प पत्र प्रत्‍येक घरी जावून द्यावे असे सुचित करुन, प्रधानमंत्री समर्पित भावनेने देशासाठी काम करीत आहेत. मागील दहा वर्षे दिवाळीचा सण सुध्‍दा सैनिकांसोबत जावून ते साजरा करतात. कोव्‍हीड सं‍कटातही देशातील नागरीकांची त्‍यांनी सेवा केली. मात्र दुसरीकडे देशावर संकट आणि  आपत्ती आली की, राहुल गांधी परदेशात पळून जातात. अशी टिका करुन, कॉंग्रेसचे नेते आता अफजल कसाबची बाजू घेवून बोलू लागले आहेत. वडेट्टीवर यांनी केलेले वक्‍तव्‍य हा शहीद झालेल्‍या जवानांचा अपमान आहे.  एवढेच जर वडेट्टीवारांना पाकीस्‍तानचे  प्रेम असेल तर त्‍यांनी कसाबच्‍या  कुटूंबियांचे पालन पोषण करण्‍याची जबाबदारी घ्‍यावी असा टोला लगावून त्‍यांच्‍या वक्‍तव्‍याबाबत शरद पवार आणि उध्‍दव ठाकरे अद्यापही बोलायला तयार नाहीत उध्‍दव ठाकरे मुख्‍यमंत्री असताना केवळ दोन दिवस विधीमंडळात आले. त्‍यांनी हातात कधी पेन घेतल्‍याचा आपण पाहीले नाही. कोव्‍हीड संकटातही फेसबुकवर दिसणारे उध्‍दव ठाकरे गरम पाणी पेऊन झोपून घ्‍या असा सल्‍ला जनतेला देत होते. दुसरीकडे मात्र मोदीजींनी केलेल्‍या आवाहानाला प्रतिसाद देवून खा.सुजय विखे पाटील आणि आपल्‍या सारखे कार्यकर्ते लोकांसाठी सेवा करीत होते. परंतू त्‍याचे प्रदर्शन आम्‍ही कधी केले नाही.  डॉ.सुजय विखे पाटील यांचा विजय हा मोदीजींचा विजय आहे. देशाच्‍या  विकास प्रक्रीयेला साथ देण्‍यासाठीच अजीत पवारही आता या महायुतीत सहभागी झाले आहेत. विकसीत भारताच्‍या सं‍कल्‍पनेला प्रत्‍येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्‍याने पुढील चार दिवस मोदीजींचा पाठबळ देण्‍यासाठी द्यावे असे आवाहन तयांनी शेवटी केले. याप्रसंगी दिलीप भालसिंग, अभय आगरकर यांची भाषण झाली.

Ahmednagar News: ‘तो’ वक्‍तव्‍य शरद पवार आणि उध्‍दव ठाकरेंना मान्‍य आहे का? चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल Read More »

Ahmednagar News:  ॲड. अशोक कोल्हे यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा खा. सुजय विखेंकडून निषेध

Ahmednagar News: न्यायालयाच्या आवारातच ॲड अशोक कोल्हे यांच्यावर अज्ञात इसमांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा खा. सुजय विखे पाटील यांनी जाहीर निषेध व्यक्त करत या प्रकरणी सखोल चौकशी करून आरोपिंना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. ॲड. अशोक कोल्हे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना खा. डॉ. सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या आरोग्यासाठी प्राथना केली.    नगर मधील प्रसिद्ध विधिज्ञ यांच्यावर काही अज्ञात इसमांनी हल्ला केला होता. त्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी देखील अशाच प्रकारे राहुरी येथील ॲड राजाराम आढाव व त्यांच्या वकील पत्नी यांची हत्या करण्यात आल्याचे प्रकरण घडले होते. यामुळे या हल्ल्याचे गांभीर्य पोलिसांनी लक्षात घ्यावे, कायद्याचे रक्षण करणारे आणि ज्याच्या खांद्यावर जनतेला न्याय देण्याची जबाबदारी  असणाऱ्यांवर अशा प्रकारे होणारे हल्ले हे चिंताजनक असून सदर घटनेचा जाहिरपणे निषेध करत असल्याचे खा. सुजय विखे यांनी सांगितले.  तसेच पोलिसांनी या प्रकरणी तपास करत दोषीवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.अॅड अशोक कोल्हे यांची तब्येत आता सामान्य असून ते लवकरच बरे होऊन आपले काम नियमित करतील असा विश्वास   खा. सुजय विखे  यांनी व्यक्त केला.

Ahmednagar News:  ॲड. अशोक कोल्हे यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा खा. सुजय विखेंकडून निषेध Read More »

Narendra Modi: संविधान बदलण्‍याचा महाविकास आघाडीचा दावा म्‍हणजे केवळ जनतेची दिशाभूल

Narendra Modi: संविधान बदलण्‍याचा महाविकास आघाडीचा दावा म्‍हणजे केवळ जनतेची दिशाभूल करण्‍याचा प्रयत्‍न असून, कॉंग्रेस पक्षाकडून जाणीवपुर्वक खोडसाळपणाची वक्‍तव्‍य केली जात असल्‍याचा आरोप  दलित महासंघ आणि बहुजन महासंघाचे संस्‍थापक अध्‍यक्ष प्रा.डॉ.मच्छिंद्र सक्‍टे यांनी केला.  अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍या प्रचारार्थ प्रा.मच्छिंद्र सक्‍टे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्‍यांची बैठक घेवून महायुतीच्‍या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्‍याचे आवाहन केले. त्‍यानंतर माध्‍यमांशी त्‍यांनी संवाद साधला.  आपली भूमीका विषद करताना प्रा.मच्छिंद्र सक्‍टे म्‍हणाले की, राज्‍यातील महायुती सरकारने आमच्‍या मागणी प्रमाणे आण्‍णाभाऊ साठे यांचे स्‍मारक उभे करण्‍यासाठी २५ कोटी रुपयांचा निधी उपलब्‍ध करुन दिला आहे. तसेच घाटकोपर येथील त्‍यांचे निवास्‍थान राष्‍ट्रीय स्‍मारक करण्‍यासाठी सुध्‍दा ३०५ कोटी रुपयांचा निधी उपलब्‍ध करुन देण्‍याचा शासन आदेश जारी केला  आहे. लहुजी वस्‍ताद साळवे यांच्‍या स्‍मारकाची तसेच समाजाच्‍या मुलांच्‍या शिक्षणासाठी बार्टीच्‍या धर्तीवर आर्टीची स्‍थापना करण्‍याची मागणीही महायुती सरकारनेच पुर्ण केल्‍यामुळे लोकसभा निवडणूकीत महायुतीला पाठींबा देण्‍याचा निर्णय घेतला असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.   विकासाच्‍या मुद्यावरुन लक्ष विचलित करण्‍यासाठी महाविकास आघाडीने संविधान बदलाचा विषय खोडसाळपणे पुढे आणला आहे असा आरोप करुन, प्रा.सक्‍टे यांनी सांगितले की, संविधानात बदल करता येईल परंतू ते रद्द करता येणार नाही. घटनेचा गाभा कोणालाही बदलता येणार नाही ही भूमिका स्‍पष्‍ट असताना सुध्‍दा केवळ समाजाची दिशाभूल करण्‍याचे काम विरोधकांकडून होत आहे. यावर सामान्‍य जनता विश्‍वास ठेवणार नाही. कारण सर्व दलित नेते महायुती सोबत आहेत. पवार आणि ठाकरेंवर आता विश्‍वास राहीलेला नाही. त्‍यामुळेच दलित महासंघ आणि मातंग समाजाचे सर्व कार्यकर्ते महायुतीच्‍या उमेदवारांच्‍या पाठीशी खंबरीपणे उभे असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. याप्रसंगी संजय चांदणे, अरुणा कांबळे यांच्‍यासह जिल्‍ह्यातील अन्‍य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Narendra Modi: संविधान बदलण्‍याचा महाविकास आघाडीचा दावा म्‍हणजे केवळ जनतेची दिशाभूल Read More »

Lok Sabha Election: जगात पत आणि प्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत देशाला मिळवून दिली

Lok Sabha Election:  जगात पत आणि प्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत देशाला मिळवून दिली आहे देशाचा अभिमान ज्याला असेल त्याने येत्या १३ तारखेला देशाचे पंतप्रधान पुन्हा नरेंद्र मोदी व्हावेत आणि खासदार डॉ.सुजय विखे व्हावेत यासाठी राष्ट्र अभिमान मनात ठेवून मतदान करावे असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.  अहमदनगर लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ राहुरी शहरातून प्रचार रॅली आणि त्‍यानंतर आयोजित केलेल्‍या जाहीर सभेत कृषिमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी मार्गदर्शन केले.  याप्रसंगी माजीमंत्री शिवाजी कर्डिले, डॉ.सुजय विखे पाटील, रावसाहेब चाचा तनपुरे, उत्तमराव म्हसे, नामदेव ढोकणे तालुकाध्यक्ष सुरेश बानकर, उदयसिंह पाटील, विक्रम तांबे, आर आर तनपुरे, तानाजी धसाळ, सुनील भट्टड, सुरेश बानकर, शामराव निमसे, किशोर वने, विक्रम तांबे, प्रफुल्ल शेळके, देवेंद्र लांबे यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी म्‍हणाले की, सत्तर वर्षे ज्यांना देशाचा विकास करता आला नाही ते आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करत आहेत. सामान्य जनता व शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत त्या माध्यमातून प्रधानमंत्र्यांनी देशाला पत आणि प्रतिष्ठा मिळून दिल्‍यामुळेच भारत आज जगाच्या पाठीवर विश्वगुरू म्हणून नेतृत्व करत असून, याचे सर्व श्रेय पंतप्रधान मोदी यांना आहे.  खासदार डॉ.सुजय विखे यांनी देखील अहमदनगरचा विकास गतिमान केला असून, त्याचे अनेक उदाहरणे देता येतील. ज्याला राष्ट्र अभिमान आहे त्यांनी पंतप्रधान मोदी व डॉ.सुजय विखे पाटील यांना मतदान करून देशाला पुढे नेण्याचे काम करावे. समोरचा उमेदवार हा बहुरूपी उमेदवार आहे त्याच्यावर विश्वास ठेवू नका अन्यथा रडत पस्‍तावा करण्‍याची वेळ तुमच्‍यावर येईल असे ते म्‍हणाले. खासदार डॉ.सुजय विखे पाटील म्‍हणाले की, पाच वर्ष आमदार असताना त्यांना पारनेरचा विकास साधता आला नाही, ते आता जिल्ह्याच्या विकासाची भाषा करत आहेत. मात्र आम्ही गेली सहा वर्ष जनतेच्या बरोबर राहून जिल्ह्याचा विकास साधला आहे. राहुरी तालुक्याने विखे पाटील कुटूंबावर नितांत प्रेम केले आहे. याही निवडणुकीमध्ये हे प्रेम तसेच राहणार आहे. समोरच्या उमेदवाराला पराभूत करण्‍याचे काम राहुरीची जनता करणार आहे. खासदार असताना मला विरोधी पक्षाच्या उमेदवाराच्या कार्यकर्त्यांकडून धमकी दिली जाते तर सर्वसामान्यांचे काय असा प्रश्न देखील विखे पाटील यांनी यावेळी उपस्थित केला. पद्मश्री डॉ.विखे पाटील यांच्‍या नंतर आम्ही काय काम केले असा प्रश्न विचारणाऱ्या नेत्यांनी आमच्याबरोबर जिल्ह्यात फिरावे आम्ही काय कामे केली आहेत ते त्‍यांना दाखवून देऊ. राहुरी तालुक्यातील अनेक प्रश्न आम्ही मिटवले, प्रशासकीय इमारत, ग्रामीण रुग्णालय हे प्रश्न नेहमीच ऐरणीवर राहिले ते मिटवण्याचे काम आम्ही केले. पारनेरची जनता दहशतीखाली आहे मात्र आम्ही जिल्ह्यात असे होऊ देणार नाही. टक्केवारी खाणारे कोण हे जनता जाणून आहे. नगर-मनमाड रोडमध्ये टक्केवारी खाऊन कामं कोणी बंद पाडले हे जनता जाणून आह.  मंत्री असताना देखील ग्रामीण रुग्णालय देखील उभारता आले नाही, त्यांना आमच्यावर आरोप करण्याचा अधिकार काय असा प्रश्न उपस्थित करुन, ही निवडणूक देश हिताची आहे त्यामुळे जनता कोणत्याही गुंडाला राजकारणात थारा देणार नाही, कारखाना बंद पाडण्याचे पाप करणारे आमच्यावर आरोप करतात हे दुर्दैव असल्‍याचे ते म्‍हणाले.  यावेळी बोलताना माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितले की, राहुरी तालुका एक नंबरचे लीड देईल यात शंका नाही. भाजपाच्या माध्यमातून मोठा विकास तालुक्‍यात झाला आहे. नरेंद्र मोदीच तिस-यांना पंतप्रधान होतील व खासदार सुजय विखे हेच होतील यात शंका बाळगण्याचे कारण नाही. संसद बंद पाडण्याची भाषा करणारे लंके यांनी पात्रता तपासावी. मिरची, भाकरी खाताना फोटोसेशन समोरचा उमेदवार करीत आहे.  राहुरी शहराचे अनेक कामे खा.सुजय विखे पाटील, ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी मार्गी लावले आहे. भुयारी गटार योजना, प्रशासकीय इमारत त्यांनीच केली. कारखान्याबाबत आरोप होत आहेत मात्र तो चालू करण्यासाठी खा.विखे व मी प्रयत्न केले. चालू केला मात्र त्याचे वाटोळे करण्याचा प्रयत्न कोणी केला, कोणाच्या काळात हे घडले हे राहुरीची जनता जाणून आहे. महावितरणच्या माध्यमातून राहुरीच्या मंत्र्याने वसुलीचे काम केले असून, डॉ.सुजय विखे पाटील तालुक्‍यातून पाच लाखाचा लिड मिळणार असल्‍याचे ते शेवटी म्‍हणाले.

Lok Sabha Election: जगात पत आणि प्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत देशाला मिळवून दिली Read More »

Maharashtra News: आदिवासी समाजाप्रमाणेच धनगर समाजालाही सर्व सवलती देण्याचा महत्वपूर्ण निर्णय: माजी खा. विकास महात्मे

Maharashtra News: धनगर समाजामध्ये आर्थिक सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी राज्य सरकारने महत्वपुर्ण निर्णय घेतले आहेत. जिल्ह्यातील ढवळपूरी येते सुरू होणारे लोकर प्रक्रिया केंद्र हे रोजगारासाठीचे मुख्य केंद्र ठरेल असा विश्वास माजी खा. विकास महात्मे यांनी व्यक्त केला. अहिल्यानगर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या निवडणूक प्रचाराच्या निमित्याने डॉ. महात्मे यांनी धनगर समाजातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि मतदारांशी संवाद साधत  मार्गदर्शन केले.  माध्यमांशी बोलताना डॉ. महात्मे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने आदिवासी समाजाप्रमाणेच धनगर समाजालाही सर्व सवलती देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतल. या पुर्वी केवळ आश्वासनाची खैरात धनगर समजाचाला वाटत त्यांची फसवणूक केली.   डॉ. महात्मे म्हाडा लोकसभा मतदार संघातून शरद पवार यांनी निवडणूक लढवली त्या वेळेसही धनगर समाजाला मोठ मोठी आश्वासने दिली होती.  राज्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी लेखी आश्वासन देवूनही समाजाच्या कोणत्याही मागण्या मान्य केल्या नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीने समाजासाठी काय केले हा प्रश्न कायम आहे.  याउलट राज्यातील महायुती सरकारने नगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यानगर असा नामविस्तार केला, सोलापूर विद्यापिठालाही अहिल्यादेवींचे नाव दिले. धनगर समाजातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देताना स्वयंयोजनेचा लाभ मिळवून देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. अहिल्यानगर जिल्ह्यातील ढवळपूरी येथे लोकर प्रक्रिया उद्योग उभारण्याचा निर्णय हा समाजातील युवकांसाठी महत्वपुर्ण ठरणार आहे. यामुळे या जिल्ह्यातून महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना विजयी करण्यासाठी पदाधिकारी कार्यकर्ते सक्रियपणे त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे डॉ. महात्मे यांनी सांगितले.  डॉ. सुजय विखे पाटील यांच्या निवडणूक प्रचारार्थ आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले याच्या जाहीर सभेचे आयोजन नगर शहरातील मंगलगेट येथे शुक्रवार 10 मे रोजी करण्यात आल्याची माहिती आरपीआयचे नेते सुनील साळवी यांनी दिली.

Maharashtra News: आदिवासी समाजाप्रमाणेच धनगर समाजालाही सर्व सवलती देण्याचा महत्वपूर्ण निर्णय: माजी खा. विकास महात्मे Read More »

Ahmednagar Politics: जिल्ह्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी स्व. बाळासाहेब विखे पाटील यांनी सातत्याने संघर्ष केला

Ahmednagar Politics: जिल्ह्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी स्व. बाळासाहेब विखे पाटील यांनी सातत्याने संघर्ष केला. महाराष्ट्र पाणी परिषेदेच्या माध्यमातून त्यांनी पाणी प्रश्नाबाबत केलेल्या सुचनांचे शासनाकडून धोरणात रुपांतर होणे, हेच त्यांच्या प्रयत्नांचे यश ठरले असे प्रतिपादन महसूल, पशुसंवर्धन मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.  शेती, सहकार, शिक्षण, पाणी आणि ग्रामीण विकासाचे प्रनेते लोकनेते पद्मभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या यांच्या ९२ व्या जयंती दिनाचे ओचित्य साधुन प्रवरा परिवाच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी खा. डॉ, सुजय विखे पाटील,जेष्ठ नेते वंसतराव कापरे, भाजपा नेते विनायकराव देशमुख, यांच्यासह विविध संस्थाने पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते.  मंत्री विखे पाटील म्हणाले की, बाळासाहेब विखे पाटील यांनी ग्रामीण विकासाचे धोरण ठेवण्यासाठी प्रत्येक सरकारमध्ये अभ्यास मंडळाच्या माध्यमातून सुचना केल्या. पाणी प्रश्नासाठी ते नेहमीच संवेदनशील राहीले. जिल्ह्याच्या हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष करताना नवीन पाणी योजना निर्माण करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र पाणी परिषेदेच्या माध्यमातून तयार केलेले प्रयत्न शासनाने स्विकारले. पश्चिम वाहीनी नद्यांचे पाणी तुटीच्या खोऱ्यात वळवून जिल्हा दुष्काळमुक्त  करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश येत असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.  शैक्षणिक क्षेत्रात कौशल्य शिक्षणाला प्राधान्य हवे हा विचार त्यांनी प्रथम मांडला. काळाच्या ओघात आज कौशल्य शिक्षणाला आलेले महत्व पाहता बाळासाहेब विखे पाटील यांचा विचार किती दुरदृष्टाचा होता हे दिसून येते. आज जिल्ह्यात औद्योगिक वातावरण निर्माण करताना उद्योग क्षेत्राला आवश्यक मनुष्‍यबळ निर्माण करण्यासाठी नगर येथे कौशल्य प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून जिल्ह्यातील युवकांना निश्चित लाभ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Ahmednagar Politics: जिल्ह्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी स्व. बाळासाहेब विखे पाटील यांनी सातत्याने संघर्ष केला Read More »

Lok Sabha Election 2024 : धाक, दडपशाहीने उद्योजकांना पळवून लावणारी संस्कृती निर्माण करायची नाही

Lok Sabha Election 2024 :  तालूक्यात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी औद्योगिक वसाहतीला महायुती सरकरच्या माध्यमातून जागा उपलब्ध करून दिली आहे. लवकरच तालूक्यात उद्योजकांचे आगमन होऊन आपल्या मुलांच्या हाताला काम मिळणार आहे. असे होत असताना नव्याने निर्माण होणारे औद्योगिक क्षेत्र आपल्याला दहशदमुक्त ठेवायचे आहे. धाक, दडपशाहीने उद्योजकांना पळवून लावणारी संस्कृती आपल्याला निर्माण करायची नाही, असे भावनीक आवाहन राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.   श्रीगोंदा तालुक्यातील विविध गावात मंत्री विखे पाटील यांनी लोकसभा निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने मतदारांशी संवाद साधला. प्रचार फेरी, व्यक्तीगत गाठीभेटी, वाडीवस्त्यावर बैठका घेवून महायुतीच्या पदाधिकांऱ्यांनी तालुका पिंजून काढला. यावेळी मंत्री विखे पाटील यांच्यासह, विक्रमसिंह पाचपूते, राजेंद्र नागवडे, विनायक देशमुख यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.  मंत्री विखे पाटील यांनी आपल्या संपुर्ण दौऱ्यात केंद्र व राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती देतानाच, जिल्ह्याच्या विकासाचे नियोजन केले असल्याचे सांगितले. औद्योगिक आणि तिर्थक्षेत्र विकासातून रोजगार निर्मिती केली जाईल. त्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आल्याचे विखे पाटील म्हणाले.   जिल्ह्यात तीन औद्योगिक वसाहतीसाठी महायुती सरकारने जागांची उपलब्धता करून दिली असून उद्योजक आपल्या जिल्ह्यात येण्यास उत्सूक झाले आहेत. उद्योजक आणि कामगार यांना संरक्षणाची हमी दिल्याने औद्योगिक दृष्ट्या नगर जिल्हा मुख्य व्यापारी केंद्र होईल.  असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.  सुपा औद्योगिक वसाहतीबद्दल सांगताना ते म्हणाले, या वसाहतीतील उद्योजक धाक, दडपशाहीमुळे निघून गेले. औद्योगिक क्षेत्रात ठेकेदारीने हैदोस घातला होता. हे वातावरण आपल्याला श्रीगोंद्यात होऊ द्यायचे नसेल तर लोकसभा निवडणुकीत  मतदान करताना गांर्भीयाने विचार करण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्याच्या विकासात अडथळे निर्माण करणारे कोण आहेत? ही ओळखण्याची वेळ आता आली आहे. जिल्ह्याच्या हक्काच्या पाण्यासाठी आपला संघर्ष थांबलेला नाही. येणाऱ्या काळात हक्काचे पाणी आणि रोजगार निर्माण करण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी या प्रसंगी दिली.

Lok Sabha Election 2024 : धाक, दडपशाहीने उद्योजकांना पळवून लावणारी संस्कृती निर्माण करायची नाही Read More »

Ahmednagar News: कॉंग्रेस पक्षाने सर्वाधिक डॉ. बाबासाहेबांना अपमानित केले

Ahmednagar News:  कॉंग्रेस पक्षाने सर्वाधिक डॉ. बाबासाहेबांना अपमानित केले. या अपमानाचा बदला म्हणूनच आरपीआय कवाडे गटाने महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. संविधानाचे रक्षण फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातूनच होऊ शकेल हा संदेश कार्यकर्ते देत असून आंबेडकरी चळवळीची मत नगर दक्षिण मतदारसंघात महायुतीकरिता निर्णायक ठरतील असा विश्वास आरपीआय कवाडे गटाचे जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड यांनी व्यक्त केला.  पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषेदेत बोलताना गायकवाड म्हणाले की, राज्यात महायुतीचे सरकार आणण्यासाठी प्रा. कवाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाशी युती केली. राज्यात महायुतीचे उमेदवार निवडुण आणण्यासाठी सर्व कार्यकर्ते सक्रियेतेने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.  देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली. देशातील सर्व घटकांना विविध योजनांच्या माध्यामातून सामाजिक सुरक्षा देण्याचे काम झाले आहे. देशाची प्रगती संरक्षण आणि अधिक विकास मोदींच्या नेृत्वाखालीच होऊ शकतो हा विश्वास सर्व सामान्य मतदारांच्या मनामध्ये आहे.  नगरच्या विकासासाठी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी मागील पाच वर्षात मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली, भविष्यात हाच विकास पुढे घेवून जाण्यासाठी त्यांना निवडूण आणण्याची भूमिका प्रचाराच्या माध्यमातून मतदारांच्या पुढे मांडत आहोत. याला समाजातील सर्व घटकांचे समर्थन मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.  संविधान बचावाचा कॉंग्रेसचा केवळ कांगावा करत असून, याच कॉंग्रेसने डॉ. आंबेडकरांचा पराभव करून त्यांना अपमानीत केले होते. या अपमानाचा बदला आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते घेतल्या शिवाय स्वस्थ बसणार नाहीत. राज्यातील महायुती सरकारने लंडन येथील बाबासाहेबांचे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहिर केले.  इंदू मिल येथे स्मारक उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे महायुती सरकारच आंबेडकरी चळवळीला न्याय मिळऊन देऊ शकते, ही भूमिका पटल्यामुळेच महायुती बरोबर जाऊन काम करण्याचा निर्णय प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी घेतला असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.  या प्रसंगी संपर्क प्रमुख नितीन कसबेकर, जिल्हा सरचिटणीस महेश भोसले, जिल्हा उपाध्यक्ष नितीन साळवे, महिला जिल्हा अध्यक्षा गौतमी भिंगारदिवे, जेष्ठ नेते सुरेश भिगारदिवे, जिल्हा उपाध्यक्ष विशाल गायकवाड, सांरग पटेकर, शाहिद शेख, संजय साळवे, शहर अध्यक्ष किरण जाधव, महेंद्र साळवे, विलास गजभिव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Ahmednagar News: कॉंग्रेस पक्षाने सर्वाधिक डॉ. बाबासाहेबांना अपमानित केले Read More »

Maharashtra News: महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम राखण्यासाठी महायुतीच्या सत्तेची गरज

Maharashtra News:  महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम राखण्यासाठी महाराष्ट्रात महायुतीच्या सत्तेची गरज असल्याचे प्रतिपादन महायुचीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. महायुतीच्या काळात सरकारने महाराष्ट्राच्या हिताचे वेगवान निर्णय घेतले आहेत. देशात महाराष्ट्रला विकासात पुढे ठेवण्याचे काम सुद्धा महायुती सरकार करत आले आहे असेही त्यांनी सांगितले. ते पाथर्डी येथील सभेत बोलत होते.  महायुतीचे उमेदवार खा. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या वतीने पाथर्डी तालुक्यात विविध ठिकाणी प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या सभांना त्यांच्यासोबत जिल्हा बॅंकचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले, आमदार मोनिकाताई राजळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.  पाथर्डी तालुक्यातील शिराळ येथे, कोल्हार, चिंचोडी, धारवाडी, गितेवाडी, डमाळवाडी, डोंगरवाडी, डमाळवाळी, डोंगरवाडी गावांसाठी आयोजित करण्यात आली होती यावेळी खासदार डॉ. विखे पाटील कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले की, महायुती सरकार मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदाद पवार या तीन खंद्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले. गतीमान सरकार म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या नेतृत्वाखाली राज्यात मोठ मोठे प्रकल्प आणून राज्यातील तरूणांना रोजगार दिले, अनेक भागातील पाण्याच्या योजना, लेक लाडकी योजना, माझी कन्या भाग्यश्री, महात्मा फुले आरोग्य योजना, स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात योजना, आपला दवाखाना योजना, रमाई आवास योजना अशा विविध योजना राज्यातील तळागळापर्यंत पोहचविल्या. राज्यात रस्त्यांचे जाळे निर्माण करून दळवणाच्या सोयी सुविधा निर्माण केल्या. शेतकऱ्यांसाठी दुष्काळी योजना आणि इतर योजना राबवून शेतकऱ्यांना बळकटी देण्याचे काम केले. यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी महायुती सरकार कटीबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.  देशात पुन्हा भाजप आणि महायुतीचे सरकार येणार आहे आणि नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतपप्रधान होणार असणार आहे. यामुळे देशात आणि राज्यात महायुतीचे सरकार आल्यास राज्याचा विकास अधीक जलद गतीने होणार यात कोणतीही शंका नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.  यावेळी शिवाजीराव कर्डीले यांनी सुद्धा मार्गदर्शन करताना सांगितले की, महायुती सरकार हे लोकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे. येणाऱ्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली राज्याची प्रगती अधिक गतीने होणार यात कोणतीही शंका नाही. त्यात महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्याकडे विकासाचे व्हीजन आहे. त्यांना संसदेचा चांगला अनुभव आहे. यामुळे स्थानिक प्रश्न सोडविताना त्यांचा जिल्ह्याला मोठा फायदा होणार आहे. यामुळे त्यांना प्रचंड मतांनी निवडून आणणे ही आपली जबाबदारी आहे असे ते म्हणाले.  तर आमदार मोनिका ताई यांनी खासदारांच्या माध्यमातून मागील पाच वर्षात केलेल्या कामांची आणि येणाऱ्या काळात जिल्ह्याचा विकास करण्यासाठी कशा पद्धतीने डॉ. विखे काम करतील या बाबत त्यांनी सविस्तर माहिती मतदारांना दिली.

Maharashtra News: महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम राखण्यासाठी महायुतीच्या सत्तेची गरज Read More »