DNA मराठी

राजकीय

Nitin Gadkari: पंतप्रधानपदाची वापर कोणी दिली, शरद पवार की सोनिया गांधी? नितीन गडकरींनी दिले ‘हे’ उत्तर

Nitin Gadkari :  लोकसभेपुर्वी आणि निकालानंतर मला विरोधकांनी पंतप्रधान पदाची वापर दिली होती असा धक्कादायक खुलासा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईत आयोजित एका कार्यक्रमांमध्ये बोलताना केला.  या कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, त्यांना एकदा नव्हे तर अनेक वेळा पंतप्रधान होण्याची ऑफर आली होती. मात्र, त्यांना कोणत्या विरोधी पक्षनेत्याकडून ही ऑफर देण्यात आली हे गडकरींनी सांगितले नाही. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात गडकरींनी लोकसभा निवडणुकीनंतर विरोधकांकडून पंतप्रधानपदाची ऑफर आल्याचे सांगितले होते. आता गडकरींनी म्हटले आहे की, लोकसभा निवडणुकीपूर्वी आणि नंतरही अनेकवेळा आपल्याला पंतप्रधानपदाची ऑफर देण्यात आली होती. जेव्हा गडकरींना विचारण्यात आले की, त्यांना ही ऑफर सोनिया गांधी किंवा शरद पवार यांच्याकडून मिळाली होती का? त्यामुळे त्यांनी हा प्रश्न टाळला आणि त्याचा अर्थ काढण्यासाठी ते मीडियावाल्यांना सोडत असल्याचे सांगितले. ‘पंतप्रधान बनणे हे माझे ध्येय नाही’ नितीन गडकरी म्हणाले, मी माझ्या विचारधारेशी तडजोड करणार नाही. विरोधकांनी मला पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देण्याचे बोलले होते, मात्र पंतप्रधान होणे हे माझे ध्येय नसल्याने हा प्रस्ताव मान्य करण्याचा प्रश्नच नव्हता. मी माझ्या विचारधारेबरोबरच माझ्या श्रद्धांनुसार जगत आहे. नितीन गडकरी यांनी याआधीच विरोधकांच्या या ऑफरचा उल्लेख केला आहे. नागपुरातील एका कार्यक्रमादरम्यान गडकरी म्हणाले होते की, मला कोणाचेही नाव घ्यायचे नाही, मात्र एका व्यक्तीने मला सांगितले की, तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. मी म्हणालो तुम्ही मला का साथ देणार आणि मी तुम्हाला का साथ देऊ?. पंतप्रधान होणे हे माझ्या आयुष्याचे ध्येय नाही. मी माझ्या विश्वासावर आणि संघटनेशी एकनिष्ठ आहे आणि मी कोणत्याही पदासाठी तडजोड करणार नाही, कारण माझा विश्वास माझ्यासाठी सर्वात महत्वाचा आहे. हा विश्वास भारतीय लोकशाहीची सर्वात मोठी ताकद आहे असे मला वाटते.

Nitin Gadkari: पंतप्रधानपदाची वापर कोणी दिली, शरद पवार की सोनिया गांधी? नितीन गडकरींनी दिले ‘हे’ उत्तर Read More »

Israel Attack On Lebanon : मोठी बातमी, इस्रायल लेबनॉनवर जमिनी हल्ला करणार, बिडेनने दिला इशारा

Israel Attack On Lebanon :  गेल्या काही दिवसांपासून इस्रायलकडून लेबनॉनवर हवाई हल्ले करण्यात येत आहे. तर बुधवारी या हल्ल्यांना प्रतिउत्तर म्हणून हिजबुल्लाकडून इस्रायलवर हवाई हल्ला करण्यात आला आहे. तर आता एक मोठी बातमी समोर आली आहे.इस्रायल लेबनॉनमध्ये जमिनीवर हल्ला करण्याची तयारी करत आहे.  इस्रायलच्या लष्करी प्रमुखांनी सैन्यांना लेबनॉनमध्ये हिजबुल्लासोबतच्या वाढत्या संघर्षाच्या दरम्यान जमिनीवर आक्रमणासाठी तयार राहण्यास सांगितले आहे. इस्रायलचा हल्ला असाच सुरू राहिल्यास हिजबुल्लाला पूर्ण पाठिंबा देऊ, असे इराणने म्हटले आहे. त्याचवेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी लेबनॉनमध्ये जर जमिनीवर हल्ला केला तर ते ‘ऑल आऊट वॉर’ असेल, असे म्हटले आहे. बुधवारी इस्त्रायली हल्ल्यात किमान 72 लोक ठार आणि 233 जखमी झाल्याची माहिती लेबनीज आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. “तुम्ही ओव्हरहेड जेट्सचा आवाज ऐकत आहात. आम्ही दिवसभर हल्ला करत आहोत. हे तुमच्या संभाव्य प्रवेशासाठी आणि हिजबुल्लाला कमकुवत करण्यासाठी मैदान तयार करण्यासाठी आहे,” इस्रायली सैन्याचे प्रमुख लेफ्टनंट जनरल हर्झी हॅलेवी यांनी इस्रायली सैन्याला सांगितले आहे. इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले – लेबनॉनमध्ये युद्ध होऊ नये फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी यूएन जनरल असेंब्लीला सांगितले की, “लेबनॉनमध्ये युद्ध होऊ नये. आम्ही इस्रायलला लेबनॉनमधील हल्ले थांबवण्याची आणि हिजबुल्लाला इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले थांबवण्याची विनंती करतो.” इस्त्रायलने हिजबुल्लाहविरोधात सोमवारी सुरू केलेल्या मोहिमेपासून लेबनॉनमध्ये 600 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. UN च्या आकडेवारीनुसार लेबनॉनमध्ये सुमारे 90,000 लोक विस्थापित झाले आहेत. हे 110,000 लोकांव्यतिरिक्त आहेत ज्यांनी तणाव वाढण्यापूर्वी घरे सोडून पळ काढला.

Israel Attack On Lebanon : मोठी बातमी, इस्रायल लेबनॉनवर जमिनी हल्ला करणार, बिडेनने दिला इशारा Read More »

Akshay Shinde Encounter Case : … म्हणून अक्षय शिंदेचा मृत्यू, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा

Akshay Shinde Encounter Case :  पोलीस एन्काऊंटरमध्ये बदलापूर घटनेचा मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला आहे. तर आता त्याची पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये समोर आली आहे.  रिपोर्टनुसार, अक्षय शिंदे याच्या डोक्यात गोळी लागल्याचे आणि जास्त रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. अक्षय शिंदेच्या मृत्यूचे मुख्य कारण जास्त रक्तस्त्राव झाल्याचे रुग्णालयातील सूत्रांचे म्हणणे आहे.   रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक   अहवाल मुंब्रा पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे. मंगळवारी अक्षय शिंदेचे पोस्टमॉर्टम झाला, जे सुमारे सात तास चालले आणि त्याची व्हिडिओग्राफीही करण्यात आली, असे डॉक्टरांनी सांगितले.  5 डॉक्टरांच्या समितीने अक्षय शिंदेचे शवविच्छेदन केले. मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा मृतदेह अद्याप ताब्यात घेण्यात आलेला नाही. अक्षय शिंदे यांचा मृतदेह कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील शवागारात ठेवण्यात येणार आहे. विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले अक्षय शिंदेच्या पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूबाबत महाराष्ट्र सरकारच्या विधानात विसंगती असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या (एसपी) खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. ते म्हणाल्या की, ज्याचा चेहरा काळ्या कपड्याने झाकलेला आणि हातात हातकड्या असलेला आरोपी चालत्या वाहनात पोलीस कर्मचाऱ्याकडून पिस्तुल कसा हिसकावू शकतो. बारामतीत पत्रकारांशी बोलताना सुळे म्हणाल्या, खटला संपल्यानंतर आरोपींना जाहीर फाशी द्यावी, जेणेकरून समाजात मजबूत संदेश जाईल, अशी मी मागणी केली होती.  दुसरीकडे, बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांच्या गाडीतून पिस्तूल हिसकावून घेतल्यानंतर कोणालाही सोडणार नसल्याचे सांगितले होते, असा दावा एका पोलिस अधिकाऱ्याने केला. आरोपीवर गोळीबार करणारे पोलीस निरीक्षक संजय शिंदे म्हणाले की, अक्षयच्या वागण्यावरून तो सगळ्यांना मारेल असे वाटत होते, त्यामुळे त्याने स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला.

Akshay Shinde Encounter Case : … म्हणून अक्षय शिंदेचा मृत्यू, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा Read More »

Ahmednagar News: लेखी आश्वासनामुळे ग्रामपंचायत समोरील वंचित आघाडीचे बोंबाबोंब आंदोलन मागे….!

Ahmednagar News: शेवगाव तालुक्यातील शेकटे बुद्रुक येथील दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत खोदण्यात आलेल्या विहिरीवर खाजगी व्यक्ती दावा करत असल्यामुळे सदर विहिरीचे पाणी हे गावासाठी खुले करण्यात यावे तसेच या विहिरीवर तार कंपाऊंड बांधण्यात यावे. या प्रमुख मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण तसेच तालुका अध्यक्ष प्यारेलालभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली शेकटे बुद्रुक येथील वंचितचे शाखा अध्यक्ष गणेश बोरुडे यांच्यासह ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन केले होते. वंचित बहुजन आघाडीच्या महिला तालुका अध्यक्षा संगीताताई ढवळे तसेच सामाजिक कार्यकर्ते हरीभाऊ फाटे यांनी मध्यस्थी करून सदर विहीर ही गावाला पाण्यासाठी खुली करून देण्याचे लेखी आश्वासन दिल्याने वंचित बहुजन आघाडीचे ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू असलेले बोंबाबोब आंदोलन हे मागे घेण्यात आले.  यावेळी सरपंच ज्योती हरिभाऊ फाटे, ग्रामसेवक रामेश्वर जाधव, शाखा उपाध्यक्ष राजू बोरुडे, लक्ष्मण बोरुडे, प्रकाश बोरुडे, राणी बोरुडे, वर्षा बोरुडे, वंदना बोरुडे, छाया बोरुडे, शांताबाई बोरुडे यांच्यासह असंख्य आंदोलक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ahmednagar News: लेखी आश्वासनामुळे ग्रामपंचायत समोरील वंचित आघाडीचे बोंबाबोंब आंदोलन मागे….! Read More »

Maratha Reservation: मराठा आंदोलकांकडून अहमदनगर शहरात गांधीगिरी! दुकान मालकांना दिले गुलाबाचे फुल अन्…

Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणुन मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणला बसले आहेत. त्यांची तबीयत खराब होत असल्याने त्याच्या समर्थनार्थ अहमदनगर शहरात मराठा समाज्याच्या कार्यत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळाला हार घालुन शहरात उघडलेली दुकान बंद करण्यासाठी गांधीगिरी करत गुलाबाचे फुल देऊन दुकान बंद करण्याचे आव्हान करत शहरात रॅली काढण्यात आली होती. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.  मराठा समाज्याला आरक्षण ओबीसी कोट्यातुन आरक्षण मिळावे या मागणीसाठी पुन्हा एकदा त्यांनी उपोषणला सुरूवात केली.   गेल्या सहा दिवसापासुन सुरू असलेल्या उपोषणावर राज्य सरकारकडून दखल घेतली जात नसल्याने राज्यभर   बंदची हाक देण्यात आली होती. अहमदनगर शहरात बंदला संमिश्र पाठिंबा मिळत असल्याने मराठा समाज्याच्या कार्यकर्त्यानी गांधीगिरी करत सुरू असलेल्या  दुकान मालकांना गुलाबाचे फुल देत दुकान बंद ठेवण्याचे आव्हान करण्यात आले.

Maratha Reservation: मराठा आंदोलकांकडून अहमदनगर शहरात गांधीगिरी! दुकान मालकांना दिले गुलाबाचे फुल अन्… Read More »

Akshay Shinde : अक्षय शिंदेचे एन्काउंटर कसे झाले? एका क्लिकवर जाणून घ्या सर्व काही…

Akshay Shinde :  बदलापूरच्या एका नामांकित शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झालाय. हा एन्काउंटर कसा झाला याचा माहिती आता समोर येत आहे.  सोमवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास पोलीस अक्षय शिंदेला ट्रान्सिट रिमांडसाठी नेते होते. त्याचे पत्नीने केलेल्या लैंगिक अत्याचाराप्रकरणात हे रिमांड होते. याप्रकरणात चौकशीसाठी नेण्यात येत होते. तळोजा जेलमधून त्याला बदलापूरकडे नेण्यात येत होते. साधारण साडेसहाच्या सुमारास पोलिसांची गाडी मुंब्रा बायपास जवळ आली. तेव्हा आरोपीने एका कॉन्स्टेबलच्या हातातून बंदूक हिसकावून गोळीबार सुरू केला. त्यातील एक गोळी एपीआय निलेश मोरे यांच्या पायाला लागली. त्यानंतर निलेश मोरे यांनी स्वसंरक्षणासाठी तीन गोळ्या झाडल्या. यामध्ये शिंदे हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी कळवा रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरनी शिंद याला मृत घोषित केलंय. तर जखमी एपीआय निलेश मोरेंवर सध्या उपचार सुरू आहेत. या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तर या प्रकरणावरून आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले असून, थेट देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे हे प्रकरणावरून राजकारण तापणार हे नक्की.

Akshay Shinde : अक्षय शिंदेचे एन्काउंटर कसे झाले? एका क्लिकवर जाणून घ्या सर्व काही… Read More »

Bangladesh Crisis: बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचारच्या निषेधार्थ 72 समाज आले एकत्र

Bangladesh Crisis: बांगलादेशात झालेल्या हिंदू अत्याचाराच्या विरोधात  गोंदियामध्ये 72 समजातील हजारोच्या संख्येने महिला पुरुष रस्त्यावर उतरले व झालेल्या घटनेच्या निषेधार्थ जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या जन आक्रोश मोर्चामध्ये 72 समाजांनी सहभाग घेतला त्याचप्रमाणे शहरातील मुख्य बाजारात हा मोर्चा भ्रमण करत बांगलादेशा विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तर आंबेडकर चौक या ठिकाणी राष्ट्रगीताने रॅलीचे समापन करण्यात आले.   काही दिवसा अगोदर  बांगलादेशामध्ये हिंदू समाजावर हल्ले करीत अत्याचार केले तर हिंदू देवी दैवतांची मंदिरे तोडली यात काही लोकांचें दुर्दैवी मृत्यू झाले. याचे पाडसाद संपूर्ण भारतात व हिंदू समुदाय मध्ये उमटू लागले.  अनेक हिंदू संघटना देशातील राज्य पातळीवर आंदोलने केली. तरी देखील केंद्र सरकारने बांगलादेशात हिंदू बांधवांर झालेल्या हल्ल्या करणाऱ्या संघटनेच्या विरोधात हवे तसे पाऊल न उचलल्याने देशात हिंदू समाजात आक्रोश निर्माण झाले.  याच घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी गोंदियात सकल हिंदू समाजाच्या वतीने जण आक्रोश रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅली मध्ये गोंदिया जिल्यातील हजारो हिंदू बांधवानी सहभाग घेत सामील झाले. ही रॅली गोंदिया शहरातील मुख्य मार्गाने भ्रमण भ्रमण करत बांगलादेशा विरोधात नारेबाजी करण्यात आली.

Bangladesh Crisis: बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचारच्या निषेधार्थ 72 समाज आले एकत्र Read More »

Ahmednagar News: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणा समर्थनार्थ ‘या’ दिवशी अहमदनगर जिल्हा बंद

Ahmednagar News: मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा अंतरवली सराटी येथे 17 सप्टेंबरपासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत. तर दुसरीकडे अहमदनगर अखंड मराठा समाजाकडून देखील त्यांच्या समर्थनार्थ 23 सप्टेंबर रोजी अहमदनगर जिल्हा बंद पुकारण्यात आला आहे. याबाबत अखंड मराठा समाजाने अहमदनगर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना निवेदन दिले आहे. सगे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करणे. शिंदे समितीस मुदतवाढ देवून त्याचे कामकाज जोमाने सुरु ठेवावे. मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट तत्काळ मागे घ्यावेत आणि हैदराबाद, मुंबई, सातारा, गॅझेट लागू करावे या मागणीसाठी 23 सप्टेंबर रोजी अहमदनगर जिल्हा बंद पुकारण्यात आला असल्याची माहिती अहमदनगर अखंड मराठा समाजाकडून देण्यात आली आहे.

Ahmednagar News: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणा समर्थनार्थ ‘या’ दिवशी अहमदनगर जिल्हा बंद Read More »

One Nation One Election : वन नेशन, वन इलेक्शनला मंजुरी पण सरकार पडल्यास काय होईल? जाणून घ्या

One Nation One Election :  केंद्रीय मंत्रिमंडळाने वन नेशन, वन इलेक्शन या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.  केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर आता वन नेशन, वन इलेक्शनची प्रक्रिया पुढे नेली जाणार आहे. वन नेशन, वन इलेक्शन लागू झाल्यानंतर लोकसभा किंवा राज्यसभेत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही तर काय होईल हे तुम्हाला माहिती आहे का? वन नेशन, वन इलेक्शनला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असेल, पण प्रत्यक्षात येण्याआधी अजून बराच पल्ला गाठायचा आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने यामध्ये आपल्या शिफारशी दिल्या आहेत.   त्रिशंकू सभागृहाच्या बाबतीत काय? वन नेशन, वन इलेक्शन लागू केले तर त्यानंतरच्या निवडणुका घेतल्या जातात. अशा परिस्थितीत लोकसभा किंवा राज्यसभेत त्रिशंकू सभागृहाची स्थिती निर्माण झाली तर काय होईल? हा प्रश्न अतिशय समर्पक आहे आणि आपण अनेक राज्यांमध्ये आणि केंद्रात तो वारंवार पाहिला आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अशी शिफारस केली आहे की अशा परिस्थितीत त्या विधानसभा किंवा लोकसभेसाठी पुन्हा निवडणुका घेता येतील. मात्र लोकसभेचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत ही निवडणूक होणार आहे. अविश्वास प्रस्ताव  राज्य किंवा केंद्र सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला गेला किंवा सरकार पडले. इतर कोणताही पक्ष किंवा आघाडी सरकार स्थापन करू शकली नाही, तर तेथे पुन्हा निवडणुका घेता येतील, अशी शिफारस माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केली.  अशा परिस्थितीत, नवीन राज्य विधानसभा किंवा लोकसभेचा कार्यकाळ हा फक्त मागील लोकसभेच्या उर्वरित कालावधीसाठी असेल. उदाहरणार्थ, एखादे सरकार साडेतीन वर्षांत पडले आणि पुन्हा निवडणुकांची गरज भासली, तर पुन्हा निवडणुका नक्कीच होतील, पण नव्या सरकारचा कार्यकाळ केवळ दीड वर्षाचा असेल. पंचायत निवडणुकांचे काय? त्याच्या नावाप्रमाणेच, वन नेशन, वन इलेक्शन, संपूर्ण देशात एकाच वेळी निवडणुका होतील का? लोकसभा आणि विधानसभा व्यतिरिक्त यात नगरपालिका, पंचायत इत्यादींचाही समावेश असेल का? यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सुरुवातीला म्हणजेच पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घ्याव्यात, असा प्रस्ताव दिला आहे.  त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात नगरपालिका आणि पंचायतींच्या निवडणुका लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांशी अशा प्रकारे जोडल्या जाव्यात की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या 100 दिवसांत नगरपालिका आणि पंचायतींच्या निवडणुका पूर्ण होतील. मार्चमध्ये अहवाल सादर करण्यात आला होता माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने लोकसभा निवडणुकीच्या घोषणेच्या काही दिवस अगोदर या वर्षी मार्चमध्ये वन नेशन, वन इलेक्शनचा अहवाल सरकारला सादर केला होता.

One Nation One Election : वन नेशन, वन इलेक्शनला मंजुरी पण सरकार पडल्यास काय होईल? जाणून घ्या Read More »

Raj Thackeray: आधी महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका घ्या, ‘एक देश एक निवडणूक’ वरून राज ठाकरेंचा मोदींना टोला

Raj Thackeray : केंद्रीय मंत्रिमंडळाने एक मताने व नेशन व इलेक्शन प्रस्ताव पास केल्यानंतर काही जणांनी याला समर्थन तर काही जणांनी विरोध केला आहे. यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकरणावरून मोदी सरकारला टोला लावत राज्यात आधी महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका घ्या असा टोला लावला आहे.  राज ठाकरे म्हणाले की, ‘एक देश एक निवडणूक’ संकल्पनेला   केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. अर्थात ही फक्त केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता आहे आणि अजून याला संसदेची मान्यता लागेल. आणि अर्थात देशातील प्रत्येक राज्याचा कौल पण विचारात घ्यावाच लागेल. आणि कौलचा अर्थ वरवरची मान्यता नाही तर अशा प्रकारांनी राज्यांच्या अधिकारांना, स्वायत्ततेला धक्का पोहचणार नाही, याची खातरजमा पण व्हायलाच हवी.  बरं जर एखाद्या राज्यात सरकार कोसळलं किंवा किंवा तिथली विधानसभा बरखास्त झाली तर तिकडे आधी निवडणूक होणार का ? त्या राज्याने लोकसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत वाट पहायची? किंवा समजा काही कारणांनी लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका लागल्या तर देशातील सगळ्या निवडणुका परत होणार का? असा कुठलाच खुलासा झालेला नाही. तो कदाचित होईल. असो…  पण ‘एक देश एक निवडणूक’ हे सर्व ठीक आहे, आधी राज्यातल्या महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका घ्या. येत्या ऑक्टोबर २०२४ मध्ये कित्येक महापालिकांमध्ये, नगरपालिकांमध्ये प्रशासक येऊन ४ वर्ष होतील. इतका काळ नगरसेवक नाहीत म्हणजे लोकप्रतिनिधी नाहीत. ते जास्त महत्वाचं नाही का? स्थानिक स्वराज्य संस्थांचा थेट संबंध सामान्य माणसांच्या जगण्याशी, त्यांच्या प्रश्नांशी असतो. त्याच्याच निवडणुका होत नसतील तर सामान्य माणसाने जायचं कोणाकडे? निवडणुकांचं महत्व इतकंच वाटतंय तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्या. असं राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray: आधी महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका घ्या, ‘एक देश एक निवडणूक’ वरून राज ठाकरेंचा मोदींना टोला Read More »