DNA मराठी

राजकीय

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमबीएमसीच्या सेंट्रल स्कूल कमांड सेंटरची शहरांमध्ये पुनरावृत्ती करण्याचे आवाहन केले

Eknath Shinde : मिरा-भाईंदर महानगरपालिका (MBMC), जी मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) एक महत्त्वाची नागरी स्थानिक संस्था (ULB) आहे, आपल्या नागरिकांच्या, विशेषतः विद्यार्थ्यांच्या, सुरक्षेसाठी व कल्याणासाठी प्रबळ वचनबद्ध आहे.  १२ लाख लोकसंख्येसाठी ३६६ शाळांचे व्यवस्थापन करणारी एमबीएमसी सुमारे १,३७,००० विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सतर्क राहिली आहे. महाराष्ट्र शासनाने २४ ऑगस्ट २०२४ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयाच्या (GR) अनुषंगाने, एमबीएमसीने विद्यार्थ्यांच्या केवळ सुरक्षेसाठीच नव्हे तर सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, एमबीएमसीने ३६ शाळांमध्ये २०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून, सुमारे १०,००० विद्यार्थ्यांचे निरीक्षण केले जात आहे. सततच्या देखरेखीमुळे कोणत्याही घटनेवर त्वरित कारवाई करता येते. तसेच, एमबीएमसी विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या व्यक्तिमत्त्व व कौशल्य चाचण्या देखील घेत आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आयोजित कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या  सुविधेचे उद्घाटन भारतरत्न गानसम्राद्नी लता मंगेशकर नाट्यगृहात  करण्यात आले. एमबीएमसी आयुक्त संजय काटकर, पोलीस आयुक्त मधुकर पांडे आणि आमदार प्रताप सरनाईक व गीता जैन हे देखील उपस्थित होते. माननीय मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचा संदेश दिला की, केवळ सुरक्षा सुनिश्चित करणेच नव्हे, तर ती खरी वाटली पाहिजे. त्यांनी असे स्पष्ट केले की संपूर्ण सरकारची जबाबदारी आहे की स्थानिक संस्थांचा समावेश करून, सुरक्षेची भावना निर्माण करणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवणे.  मुख्यमंत्र्यांचे उद्दिष्ट केवळ संरक्षण नव्हे तर प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांना एक सुरक्षित वातावरण अनुभवायला मिळावे, अशी भावना निर्माण करणे आहे. महापालिका आयुक्त श्री संजय श्रीपतराव काटकर यांनी विद्यार्थी कल्याणासाठी ही समग्र दृष्टीकोन पूर्ण करण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. घटनांच्या प्रतीक्षेत न राहता, एमबीएमसीच्या शाळा सुरक्षेसाठी प्रतिबंधात्मक दृष्टिकोन अवलंबला आहे. पालिका शाळांमध्ये २०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, १०,००० विद्यार्थ्यांचे रिअल-टाइम मॉनिटरिंग, आणि नियमित तपासणी करणे यासारख्या उपाययोजना केल्या आहेत. याशिवाय, एमबीएमसीने शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या व्यक्तिमत्त्व आणि कौशल्य चाचण्या सादर करून, १,३७,००० विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार केला आहे. एमबीएमसीच्या या सुरक्षितता उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील रिअल-टाइम मॉनिटरिंगवर दिलेला भर आहे, ज्यामुळे नव्याने स्थापन केलेल्या सेंट्रल स्कूल कमांड सेंटर (CSCC) मुळे १००० कॅमेऱ्यांचे एकाचवेळी निरीक्षण करता येते. ही सुविधा दररोज सकाळी ७ ते संध्याकाळी ५ या वेळेत कार्यरत असते, ज्यामुळे अखंड देखरेख केली जाते. एमबीएमसीने हे मॉडेल इतर शहरांमध्ये आणि खासगी शाळांमध्ये देखील वाढवण्याचे नियोजन केले आहे. भारतरत्न गानसम्राद्नी लता मंगेशकर नाट्यगृह, मिरा रोड (पूर्व) येथे आयोजित या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, तसेच खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, आमदार जनेश्वर म्हात्रे, आमदार प्रताप सरनाईक आणि आमदार गीता जैन यांनी ऑनलाइन माध्यमातून हजेरी लावली. एमबीएमसीचा हा उपक्रम केवळ सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठीच नव्हे तर ती विद्यार्थ्यांना आणि पालकांना खरोखर जाणवावी यासाठी केलेला प्रयत्न आहे, आणि भविष्यात जबाबदार व सशक्त नागरिक घडवण्यासाठी त्याची वचनबद्धता दर्शवतो.

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमबीएमसीच्या सेंट्रल स्कूल कमांड सेंटरची शहरांमध्ये पुनरावृत्ती करण्याचे आवाहन केले Read More »

Chhatrapati Shivaji Maharaj :  छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी फरार शिल्पकार जयदीप आपटेला अटक

Chhatrapati Shivaji Maharaj : मालवणमधील राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी फरार असलेला शिल्पकार जयदीप आपटे याला ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथून बुधवारी रात्री अटक करण्यात आली. जयदीप आपटेने तयार केलेला पुतळा उद्घाटनानंतर आठ महिन्यांपेक्षा कमी कालावधीनंतर 26 ऑगस्ट रोजी कोसळला, त्यानंतर सिंधुदुर्ग पोलिस त्याचा शोध घेत होते. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी सात पथके तयार केली होती. या प्रकरणात मालवण पोलिसांनी आपटे आणि स्ट्रक्चर कन्सल्टंट चेतन पाटील यांच्यावर निष्काळजीपणा आणि इतर गुन्ह्यांप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. पाटील यांना गेल्या आठवड्यात कोल्हापुरातून अटक करण्यात आली होती. या घटनेतील आरोपींच्या अटकेवर प्रतिक्रिया देताना भाजप नेते प्रवीण देरकर म्हणाले, आमच्या सरकारवर टीका करणाऱ्यांनी आता तोंड बंद करावे. जयदीप आपटेला अटक करण्यासाठी पोलिसांना थोडा वेळ लागला हे खरे आहे. अटकेचे श्रेय आम्ही घेत नसून पोलिसांनी त्यांचे काम केले आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj :  छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी फरार शिल्पकार जयदीप आपटेला अटक Read More »

Ahmednagar News : ‘त्या’ पोलीस उपनिरीक्षकाच्या निलंबनाची मागणी; पत्रकारांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन

Ahmednagar News: रात्री मद्यधुंद अवस्थेत वृत्तपत्र छायाचित्रकार तथा स्थानिक वृत्त वाहिनीचे प्रतिनिधी अजहर सय्यद यांना मारहाण केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी शहरातील पत्रकारांच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व वृत्तपत्रांचे पत्रकार, वृत्त वाहिन्यांचे प्रतिनिधी व वृत्त छायाचित्रकार यांनी या घटनेचा निषेध नोंदविला. अजहर सय्यद हे वृत्त छायाचित्रकार व एका स्थानिक वृत्त वाहिनीचे प्रतिनिधी म्हणून शहरात काम करत आहे. मंगळवारी (दि.3 सप्टेंबर) रात्री 12 वाजल्याच्या दरम्यान सय्यद हे जुने बस स्थानक येथे उभे असताना, पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे पोलीस वाहनात चालकासह आले होते. वाहनातून उतरल्यानंतर त्यांनी तेथे असलेल्या इतर व्यक्तींना शिवीगाळ करुन धिंगाणा घालण्यास सुरुवात केली. सय्यद यांच्याकडे येऊन त्यांनाही शिवीगाळ केल्यानंतर त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात काम करत असल्याची ओळख सांगितली. मात्र महेश शिंदे मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्यांनी काहीही ऐकून न घेता अरेरावीची भाषा करत मारहाण करण्यास सुरुवात केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या शिंदे यांना काय करतोय व काय बोलतोय? याचे देखील भान नव्हते. जे दिसेल त्यांना मारण्याचा सपाटा त्यांनी सुरु केल्याने संपूर्ण बसस्थानक परिसरात त्यांच्या हैदोसामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अशा काही पोलीसांमुळे संपूर्ण पोलीस दलाची बदनामी होत आहे. दारु पिऊन ड्युटीवर येणे व सर्वसामान्य नागरिकांमध्ये दशहत पसरविणे हे पोलीस खात्याला बदनामीकारक व निषेधार्ह बाब असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. मद्यधुंद पोलीस अधिकारीचे तात्काळ निलंबन करुन त्यांची बदली करण्याची मागणी पत्रकारांच्या शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.

Ahmednagar News : ‘त्या’ पोलीस उपनिरीक्षकाच्या निलंबनाची मागणी; पत्रकारांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन Read More »

Ahmednagar News: मोठी बातमी, अहमदनगरच्या नामांतरासाठी रेल्‍वे मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल

Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्याचे नामांतरण करण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने ग्रीन सिग्नल दिला असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील दिली.  अहिल्‍यानगर हे नाव देण्‍यास विभागाची कोणतीही हरकत नसल्‍याचे पत्र दिल्‍याने जिल्‍ह्याच्‍या नामांतराचा मार्ग सुकर झाला असल्‍याचे महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी सांगितले.  जिल्‍ह्याला पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवींचे नाव देण्‍याची मागणी झाल्‍यानंतर राज्‍यातील महायुती सरकारने अहिल्‍यानगर असे नाव देण्‍याचा महत्‍वपूर्ण निर्णय घेतला. नामांतराच्‍या बाबतीतील सर्व प्रक्रीया ही केंद्र सरकारच्‍या अखत्‍यारीत पुर्ण होत असल्‍याने प्रत्‍येक विभागाची ना हरकत आवश्‍यक असते.  केंद्रीय रेल्‍वे मंत्रालयाने नामांतराच्‍या बाबतीत हरकत नसल्‍याचे पत्र जारी करुन, अहिल्‍यानगर नावास मान्‍यता दिली आहे. या नावाचे कोणतेही रेल्‍वेस्‍थानक देशात नसल्‍याचेही त्‍यांनी आपल्‍या पत्रात नमुद केल्‍याने जिल्‍ह्याला अहिल्‍यानगर नाव देण्‍यातील पहिला टप्‍पा पुर्ण होत असल्‍याचे मंत्री विखे पाटील म्‍हणाले.

Ahmednagar News: मोठी बातमी, अहमदनगरच्या नामांतरासाठी रेल्‍वे मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल Read More »

Nitesh Rane: नितेश राणेंवर पुन्हा गुन्हा दाखल, ‘त्या’ प्रकरणात अडचणीत होणार वाढ

Nitesh Rane :  गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्यकरून चर्चेत असणारे भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अहमदनगर शहरात भाजप आमदार नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुस्लिम समाजाला जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी  नितेश राणे यांच्या विरोधात शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  नितेश राणे यांच्या नेतृत्वात 1 सप्टेंबर रोजी शहरात महंत रामगिरी महाराज यांचे समर्थन करण्यासाठी रॅली काढून सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बोलताना राणे यांनी आक्रमक भूमिका घेत रामगिरी महाराज यांच्या विरोधात जर कोणी चुकीचं बोललं तर त्यांना सोडणार नाही असं वक्तव्य केलं होतं. या प्रकरणात मुस्लिम बांधवांनी रविवारी रात्री पोलिसांना निवेदन देऊन नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर तोफखाना पोलिसांनी नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.  काय म्हणाले होते नितेश राणे  रामगिरी महाराज काही चुकीचं बोलले नाही, त्यांच्या विरोधात कोणी बोलले तर मस्जिदमध्ये घुसून मारू, तुमची जीभ जाग्यावर ठेवणार नाही, आम्ही 90% आहोत तुम्ही दहा टक्के आत तुमची बांगलादेशासारखी अवस्था करू, तुम्ही जर जास्त वळवळ केली तर तेवढ्या संख्येने बाहेर पडून तुम्हाला किड्या मकोड्यासारखे तुम्ही मराल , आपण दोन किलोमीटर चालत आलो, तुम्ही बाजूला बघितलं का कसे हातभर फाटून आत बसले होते,  या वक्तव्यावर आक्षेप घेत त्यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  प्रकरण काय महंत रामगिरी महाराज यांनी गेल्या काही दिवसापूर्वी मुस्लिम समाजाचे पैगंबरबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मुस्लिम समाजाच्या वतीने अहमदनगरमध्ये आंदोलन करण्यात आले होते, राज्यामध्ये ठिकठिकाणी रामगिरी महाराजांना विरोध आंदोलने झाले होती. तर 1 सप्टेंबर रोजी रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ हिंदू समाजाच्या वतीने आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला, शहर परिसरातून काढण्यात आलेल्या मोर्चा नंतर आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले व जीवे मारण्याची धमकी दिली असा आरोप मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आला असून संतप्त मुस्लिम समाजाच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. या निवेदनाप्रसंगी शहरातील मुस्लिम समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Nitesh Rane: नितेश राणेंवर पुन्हा गुन्हा दाखल, ‘त्या’ प्रकरणात अडचणीत होणार वाढ Read More »

Kalicharan Maharaj : ‘ती’ घटना म्हणजे महाराजांचा अपमान…, कालिचरण महाराज संतापले

Kalicharan Maharaj : मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळ्याची घटना घडल्याननंतर राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. या घटनेत इंजिनिअर तसेच मूर्ती बनविणाऱ्यांची चूक आहे. या सर्वांची योग्य ती चौकशी होऊन यामधील दोषीवर कठोर कारवाई झाली पाहिजे. कारण महाराजांच्या पुतळ्याचे कामामध्ये एवढा हलगर्जीपणा हा खपवून घेतला जाणार नाही अशा शब्दात कालिचरण महाराज यांनी आपला राग व्यक्त केला. निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दहीहंडी कार्यक्रमाला कालिचरण महाराज यांनी उपस्थिती लावली होती. कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमाशी संवाद साधताना मालवण येथील घटनेवरूण संताप व्यक्त केला. तसेच अशा घटनामधील दोशीवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली.  यावेळी बोलताना ते म्हणाले, या घटनेत इंजिनिअर तसेच मूर्ती बनविणाऱ्यांची चूक आहे या सर्वांची योग्य ती चौकशी होऊन यामधील जो कोणी दोषी आढळून येईल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. महाराजांच्या पुतळ्याच्या कामाबाबत झालेला हा हलगर्जीपणा हा महाराजांचा अवमान आहे.  यामध्ये वरिष्ठ नेत्यांचा काही दोष नाही कारण ते स्वतः मूर्तिकार नाही त्यांनी खाली कामे दिले मात्र संबंधितन्नी त्यांचे काम व्यवस्थित केले नाही. यामुळे मूर्तिकारसह जे इंजिनिअर या मध्ये दोषी आहे अशी प्रतिक्रिया कालिचरण महाराज यांनी दिली.

Kalicharan Maharaj : ‘ती’ घटना म्हणजे महाराजांचा अपमान…, कालिचरण महाराज संतापले Read More »

AIMIM News : … तर नाक रगडून माफी मागा आणि राजीनामा द्या, परवेज अशरफींचा मुख्यमंत्र्यांना पत्र

AIMIM News :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने राज्यात राजकारण चांगलंच तापला आहे.  सध्या या प्रकरणावरून विरोधी पक्षांनी महायुतीच्या नेत्यांवर जोरदार टीका करत मुख्यमंत्र्यांकडे राजीनाम्याची मागणी केली. यातच अहमदनगर एआयएमआयएम जिल्हाप्रमुख  डॉ. परवेज अशरफी यांनी देखील मुख्यमंत्र्यांना राजीनामा देण्याची मागणी केली आहे. आपल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा महायुती सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचे हस्ते डिसेंबर २०२३   राजकोट, मालवण येथे उभारला आणि त्याचे श्रेय लाटले. परंतु सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा एक वर्ष ही टिकला नाही.  महाराष्ट्रातील रयतेचे राजे ज्यांनी १८ पगड जाती आणि १२  बलुतेदार यांना एकत्र घेऊन रयतेचे राज्य स्थापन केले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा आठ महिन्यातच पाडला. यावरून स्पष्ट दिसते की महायुती सरकार आणि त्यांनी दिलेला ठेकेदार हे सर्वांनी भ्रष्टाचार करण्यात महाराजांनाही सोडलं नाही. पुतळा उभारण्यात ज्या ज्या बाबींची दक्षता घेणे आवशक होते त्या बाबींचा सरकारने विचार केलेला दिसत नाही. अवघ्या दोन महिन्यात सरकारने महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी मंजुरी देऊन इतका मोठा पुतळा उभारण्याचा ज्याला काहीही अनुभव नाही अश्या व्यक्तीची शिफारस करून काम दिले.   मागील १० वर्षात मोदी सरकार यांनी बांधलेले पूल पैकी बहुतांश कोसळले, भव्य प्रभू रामाचे मंदिर सुधा गळायला लागले, नवीन संसद गळायला लागले, प्रभू राम मंदिर जवळील नवीन झालेले रस्त्यात मोठ मोठे खड्डे झाले,  ज्यावेळेस पुतळा उभारण्यात आला होता. तेव्हा काही शिवप्रेमींनी शंका व्यक्त केली होती की सदर महाराजांचा पुतळा याचा दर्जा टिकण्या सारखे नसून चहेऱ्यावरचे  हावभाव महाराजांचे नाही परंतु त्या विषयाला महायुती सरकारने दुर्लक्ष केले.  महाराजांचे नावाने  राजकारण करतात त्याच महाराजांचे पुतळ्यात महायुती सरकारात भ्रष्टाचार केल्याचे दिसत आहे. पुतळा कोसळल्यावर मुख्यमंत्री यांनी पत्रकारांना सांगितले की वारे जोराने वाहत होते त्यामुळे पुतळा कोसडला. यावरून असे दिसते की मुख्यमंत्री यांना घटनेचा कोणताही गांभीर्य नव्हता किंवा त्यांनी हा प्रकार गांभीर्याने घेतलेला नाही. प्रधानमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी जनतेची माफी मागितली. परंतु सदर माफी ही फक्त ढोंग  किंवा राजकीय नुकसान वाचवण्याचे हेतूने मागितली आहे. म्हणजेच  मागितलेली माफी ही फक्त जनतेची दिशाभूल करणारी असल्याचा टोला डॉ परवेज अशरफी यांनी लावला. खरंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर आणि सन्मान असेल तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म स्थळी जाऊन नाक रगडून माफी मागावी आणि कोणताही विलंब न करता आपले पदाचे राजीनामे द्यावे असा सल्ला डॉ परवेज अशरफी यांनी दिला. महाराजांचा पुतळा उभारण्यात जी सरकार भ्रष्टाचार करत असेल तर महाराजांच्या जनतेला न्याय कुठून देणार? असेही त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

AIMIM News : … तर नाक रगडून माफी मागा आणि राजीनामा द्या, परवेज अशरफींचा मुख्यमंत्र्यांना पत्र Read More »

‘मी 100 वेळा माफी मागायला तयार…’, एकनाथ शिंदे

Eknath Shinde: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने राज्य सरकारवर जोरदार टीका होताना दिसत आहे.  यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याबद्दल शंभर वेळा माफी मागू शकतो, असे म्हटले आहे. यात मागेपुढे पाहणार नाही. असेही शिंदे म्हणाले. शिंदे म्हणाले की, विरोधकांकडे राजकारण करण्यासाठी इतर मुद्दे आहेत, पण महाराष्ट्राचे थोर व्यक्तिमत्त्व शिवाजी महाराजांना त्यापासून दूर ठेवावे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात चार दिवसांपूर्वी पुतळा कोसळल्याने प्रकरण तापत आहे. राज्य सरकारने अपघाताचे कारण शोधण्यासाठी तांत्रिक समिती स्थापन केली, तर उपमुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी या घटनेबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात मूक निदर्शने केली. काय म्हणाले एकनाथ शिंदे? अशा स्थितीत आता शिंदे म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहेत. मी त्याच्या पायाला 100 वेळा हात लावून माफी मागायला तयार आहे. मी माफी मागण्यापासून मागे हटणार नाही. आमचे सरकार त्यांचे  आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करते. महाराजांचा 35 फूट उंचीचा पुतळा, राजकोट किल्ला संकुलात 26 ऑगस्ट रोजी कोसळला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे अनावरण केल्यानंतर सुमारे नऊ महिन्यांनी, राज्यात राजकीय वादळ निर्माण झाले. भारतीय नौदलाचे विधान हा प्रकल्प भारतीय नौदलाद्वारे चालवला जात असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. शिवरायांचा पुतळा बसवण्याचा प्रकल्प राज्य सरकारच्या समन्वयाने साकारला आणि त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला, असे नौदलाने गुरुवारी सांगितले. एका निवेदनात, नौदलाने पुतळ्याची दुरुस्ती आणि जीर्णोद्धार शक्य तितक्या लवकर सर्व उपायांमध्ये मदत करण्यास वचनबद्ध असल्याचे म्हटले आहे.

‘मी 100 वेळा माफी मागायला तयार…’, एकनाथ शिंदे Read More »

Laxman Hake : निवडणुकीत ओबीसी उमेदवारांनाच मतदान करा- लक्ष्मण हाके

Laxman Hake : ओबीसी आंदोलक  लक्ष्मण हाके यांचे नांदेडच्या लोहा येथे जंगी स्वागत करण्यात आले.ओबीसी जनजागृती साठी प्राध्यापक लक्ष्मण हाके हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. अनेक ठिकाणी ते ओबीसींचे मेळावे घेत आहेत.लोहा येथे देखील ओबीसी बांधवाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यासाठी ओबीसी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाजाने ओबीसींच्याच उमेदवारांना मतदान करावे.जर ओबीसी उमेदवार नसेल तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,अल्पसंख्याक उमेदवारांना ओबीसींनी मतदान करावे असे आवाहन प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी ओबीसी बांधवांनी केले आहे.  गेल्या काही दिवसांपूर्वी लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी उपोषण केला होता.

Laxman Hake : निवडणुकीत ओबीसी उमेदवारांनाच मतदान करा- लक्ष्मण हाके Read More »

Ahmednagar News: नितेश राणेंच्या अडचणीत वाढ, अहमदनगर अखंड मराठा समाजाकडून पोलीस अधीक्षकांना निवेदन

Ahmednagar News: अहमदनगर शहरात 01 सप्टेंबर रोजी रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ भाजप आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वात रॅली आणि सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र या सभेच्या माध्यमातून शहरातील सामाजिक सलोखा खराब होऊ नये यासाठी अहमदनगर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे अहमदनगर अखंड मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.  मालवण येथील राजकोट किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याविषयी घडलेल्या घटनेने शिवप्रेमी व अखंड मराठा समाजाच्या त्रीव भावन लक्षात घेवून या सभेच्या माध्यमातून सामाजिक सलोखा खराब होऊ नये याची खबरदारी घेण्यात आला अशी विनंती या निवेदनाद्वारे अहमदनगर अखंड मराठा समाजाकडून करण्यात आली.

Ahmednagar News: नितेश राणेंच्या अडचणीत वाढ, अहमदनगर अखंड मराठा समाजाकडून पोलीस अधीक्षकांना निवेदन Read More »