DNA मराठी

राजकीय

PM Modi Live: पंतप्रधान मोदींचा पुण्यातून काँग्रेसवर हल्लाबोल पण शरद पवारांवर शब्द ही नाही

PM Modi Live: महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात जाहीर सभा घेत पुन्हा एकदा काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला मात्र या सभेत देखील त्यांनी शरद पवार यांच्यावर एकही शब्द बोलला नाही. आपल्या भाषणाची सुरुवात मराठीमध्ये करत मोदींनी पुण्यात सुरू असणाऱ्या विकासकमाबद्दल माहिती दिली. तसेच पुण्यात गुंतवणूक, इन्फ्रास्ट्रक्चर याची गरज आहे. ती आम्ही वाढवू. महायुतीची नवीन सरकार पुणे आणि महाराष्ट्राच्या विकासाठी आणखी जोराने काम करणार अशी ग्वाही त्यांनी दिली. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारचे अडीच वर्ष फक्त महायुतीचे प्रोजेक्ट रद्द करण्यात संपले. काँग्रेस आणि महाविकास आघाडीची हीच संस्कृती आहे. अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलीतर काँग्रेसच्या काळात अनेक वर्ष देशात दोन संविधान होते मात्र आम्ही कलम 370 रद्द करून जम्मू काश्मीरमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधान लागू केला आणि लाल चौकमध्ये तिरंगा फडकावला. मात्र पुन्हा एकदा काँग्रेस आणि त्यांचे लोक जम्मू काश्मीरमध्ये   370 कलम लागू करण्याचे प्रयत्न करत आहे. असेही मोदी म्हणाले. मात्र यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर एकही शब्द बोलला नाही. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी शरद पवार यांच्यावर मोदींनी जोरदार टीका केली होती मात्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मोदींकडून शरद पवार यांचा उल्लेख टाळण्यात येत आहे.

PM Modi Live: पंतप्रधान मोदींचा पुण्यातून काँग्रेसवर हल्लाबोल पण शरद पवारांवर शब्द ही नाही Read More »

Sharad Pawar: जनतेची माफी अन् छगन भुजबळांवर हल्लाबोल, येवल्यात शरद पवारांनी सभा गाजवली

Sharad Pawar: राज्यात विधानसभेसाठी बिगुल वाजले असून आता प्रत्येक पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार प्रचार करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) देखील जोरदार प्रचार करत आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी येवला विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव शिंदे यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेत मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत छगन भुजबळ यांचा पराभव करण्याचे आवाहन नागरिकांना केले. या सभेत बोलताना शरद पवार यांनी 2019 च्या निवडणुकीत “चुकीचा उमेदवार” दिल्याबद्दल जनतेची माफी मागितली. तसेच भुजबळांचा पराभव करा असा भावनिक आवाहन देखील यावेळी त्यांनी केला. या सभेत बोलताना शरद पवार यांनी मोठा खुलासा करत म्हणाले की, जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हा भुजबळ यांनी अजित पवारांशी चर्चा करतो असं सागितलं होत मात्र त्यानंतर भुजबळच त्या गटात गेले असं शरद पवार म्हणाले. तसेच आम्ही त्यांना विरोधी पक्षनेते, उपमुख्यमंत्री अशी अनेक महत्त्वाची पदे दिली. मात्र तरीही देखील त्यांनी सर्व मर्यादा ओलांडून विश्वासघात केला. असं देखील शरद पवार म्हणाले. पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, भुजबळ विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले तेव्हा त्यांना विधान परिषदेवर पाठवले आणि विरोधी पक्षनेतेही केले. ते म्हणाले की, मी राष्ट्रवादीची स्थापना केली तेव्हा भुजबळांना पक्षाचे पहिले प्रदेशाध्यक्ष केले. येवल्यातून त्यांना रिंगणात उतरवून सरकारमधील दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे मंत्रीपद देण्याची चूक मी केली. शरद पवार म्हणाले की, भुजबळांनी काही चुका केल्या आणि त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला, मात्र स्वत: सुधारण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांना पुन्हा सरकारमध्ये घेण्यात आले. “जेव्हा भुजबळांवर काही आरोप झाल्यानंतर त्यांना तुरुंगात जावे लागले तेव्हा मी त्यांच्या पाठीशी उभा राहिलो आणि त्यांना महाविकास आघाडी (एमव्हीए) सरकारमध्ये पदही दिले,” असेही शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar: जनतेची माफी अन् छगन भुजबळांवर हल्लाबोल, येवल्यात शरद पवारांनी सभा गाजवली Read More »

Prajakta Tanpure : निवडणूक भयमुक्त होऊ द्या, अन्यथा मस्ती जिरवण्याचे काम करू…, तनपुरेंचा इशारा

Prajakta Tanpure : माझ्या विरोधी उमेदवारच्या गावात बुर्‍हाणनगर येथे आज आलो. देवीच्या मंदिरात नम्रपणे माथे टेकवून नतमस्तक झालो. परंतु राहुरी येथे माझ्या गावात शनी मंदिरासमोर ज्युनियर कर्डिले यांनी काय अविर्भाव केले. हे सगळ्यांनी पाहिले. मी देवासमोर नतमस्तक होतो, ते दंड-मांड्या ठोकतात. हाच आमच्यातील फरक आहे. असे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले. नगर तालुक्यात आमदार तनपुरे यांनी दरेवाडी, सैनिक नगर, बाराबाभळी, आलमगीर, वारूळवाडी, कापूरवाडी, गजराज नगर, बुऱ्हाणनगर, वडारवाडी नागरदेवळे येथे झंझावाती प्रचार दौरा केला. यावेळी बुऱ्हाणनगर येथे तनपुरे बोलत होते. अभिषेक भगत, अमोल जाधव, गोविंद मोकाटे, रामेश्वर निमसे, झोडगे, राहुल ढोरे, उद्धव दुसिंगे, विलास काळे, रामदास ससे, अजय गुंड, कुणाल भगत आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार तनपुरे म्हणाले की, “बुऱ्हाणनगर येथे ग्रामस्थ श्वास कोंडल्यासारखे राहतात. कुणालाही मोकळेपणाने बोलण्याचे स्वातंत्र्य नाही. त्याला अपवाद अभिषेक भगत, अमोल जाधव आहेत. मतदार संघाचा आमदार असताना येथील ग्रामस्थ माझ्याकडे यायला घाबरतात. येत्या दहा दिवसात सर्व ग्रामस्थांवरील दबाव संपवण्याचे काम तुम्हालाच करायचे आहे. बुर्‍हाणनगर गावाला पिण्याचे पाणी देण्याचे ज्यांचे काम आहे. तेच आपल्या शेतातील विहिरीत पाणी योजनेची जलवाहिनी फोडून शुद्ध पाणी वापरत होते. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. गावाच्या वाट्याचे पाणी स्वतःसाठी वापरणारे असे कसे नेतृत्व आहे. जलजीवन मिशनच्या माध्यमातून मुळा धरणातून बुऱ्हाणनगर पाणी योजनेत आपण काही बदल केले आहेत. योजनेतील घाटाखालील राहुरी व नगर तालुक्यातील खडांबे, धामोरी, देहरे, विळद गावांसाठी वेगळी योजना केली आहे. घाटावरील ग्रामीण भागातील गावांसाठी स्वतंत्र जलवाहिनी व बुर्‍हाणनगर, नागरदेवळे साठी स्वतंत्र जलवाहिनी केली आहे. भविष्यात बुऱ्हाणनगर पाणी पुरवठा योजनेतील सर्व गावांना योग्य प्रमाणात पाणी देण्यासाठी कटिबद्ध आहे. आमदार म्हणून पाच वर्षे काम करताना मतदार संघातील सर्व गावांना मूलभूत सोई-सुविधा कशा मिळतील. यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. या भागातही अनेक ठिकाणी रोहित्र दिले. पाच वर्षात फक्त विकास कामांवर फोकस केला. कोणत्याही विरोधकाला कोणत्याही प्रकारे त्रास देण्याचा कधीही विचार केला नाही. परंतु काही चांडाळ चौकडींना इशारा देतो. निवडणूक लोकशाही मार्गाने होऊ द्या. निवडणुकीचे दहा दिवस निघून जातील. निवडणूक भयमुक्त होऊ द्या. अन्यथा मस्ती जिरवण्याचे काम करू. भविष्यात तुमचे नेते आमच्या पक्षात येतील, त्यावेळी तुम्हाला पश्चाताप करावा लागेल.” महाविकास आघाडीचे सरकार असताना कर्डिले वारंवार राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते शरद पवार, अजित पवार यांना भेटून मला तुमच्या पक्षात घ्या. अशी विनंती करायचे. त्यांनी एकदा शरद पवार यांना असे सांगितले की, मला विधान परिषदेचे तिकीट द्या. प्राजक्त तनपुरे यांना विधानसभेला निवडून आणण्याची जबाबदारी मी घेतो. त्यावर, त्यांनी तुम्हाला पाडले, तुम्ही काय जबाबदारी घेणार? असे शरद पवार म्हणाले.” असागौप्यस्फोट आमदार तनपुरे यांनी केला. राहुरी व पाथर्डी तालुक्यासह नगर तालुक्यातही तुतारी चिन्ह जोमात आहे. कर्डिलेंना पराभव दिसू लागला आहे. कितीही आवाज दाबला तरी तुतारी वाजणारच आहे. आपला विजय निश्चित आहे. राज्यातही महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येणार आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.” असेही तनपुरे यांनी सांगितले.

Prajakta Tanpure : निवडणूक भयमुक्त होऊ द्या, अन्यथा मस्ती जिरवण्याचे काम करू…, तनपुरेंचा इशारा Read More »

Maharashtra Election: मुद्रीत माध्यमात प्रसिद्ध होणाऱ्या राजकीय जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण बंधनकारक – निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकुमार चिंचकर

Maharashtra Election: विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या एक दिवस आधी म्हणजेच 19 नोव्हेंबर आणि 20 नोव्हेंबर या मतदानाच्या दिवशी, मुद्रीत माध्यमांमधून प्रकाशित होणाऱ्या सर्व राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण बंधनकारक असल्याचे पारनेर निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी कळविले आहे. यासाठी जाहिरात प्रकाशनाच्या प्रस्तावित तारखेच्या किमान दोन दिवस अगोदर जिल्हास्तरीय माध्यम सनियंत्रण व प्रमाणन समितीकडे अर्ज करणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील माध्यम कक्षात अर्ज सादर करावा. मतदानाच्या दिवशी किंवा त्याच्या आधी कोणत्याही प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या किंवा द्वेषपूर्ण जाहिरातींमुळे निवडणूक प्रक्रिया बाधित होवू नये यासाठी पूर्व प्रमाणीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने या निर्देशाचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.

Maharashtra Election: मुद्रीत माध्यमात प्रसिद्ध होणाऱ्या राजकीय जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण बंधनकारक – निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकुमार चिंचकर Read More »

Supriya Sule On Ajit Pawar: ‘यहा से भी करारा जबाब मिलेगा’, सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना थेट इशारा

Supriya Sule On Ajit Pawar: वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांनी दमदार भाषण करत अजित पवारांना इशारा दिला आहे. या वेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा वेगळ्या व्यक्तीसाठी आम्ही तिकीट मागितली होती असं काय होईल असं कधीच वाटलं नव्हतं. मागच्या वेळेस ज्या व्यक्तीला तिकीट दिलं त्याच्या एबी फॉर्मवर शरद पवार यांची सही आहे. म्हणजे त्या व्यक्तीला तिकीट शरद पवार यांनी दिल. त्यानंतर त्या व्यक्तीने काय केलं हे तुम्हा सगळ्यांना माहित आहे. पोर्षे कार दुर्घटनात ज्या आई-वडिलांचे एक मुलगा आणि एक मुलगी गेली त्यांचे अश्रू आजही थांबलेले नाहीत.इथल्या स्थानिक नेत्यानी पोर्श कार ज्याची होती त्या आरोपीला बिर्याणी आणि पिझ्झा खायला घातला हे वास्तव आहे. ज्यांनी पोर्षे कार दुर्घटनेमधील आरोपींना मदत केली त्याच नेत्यानी शरद पवार यांना नोटीस पाठवली आहे की तुम्ही या दुर्घटनेच्या केसमध्ये माझी बदनामी केली तर मी तुम्हाला कोर्टात खेचेल. मी त्या नेत्याला आव्हान देते मी एकदा नाही तर शंभर वेळा ज्यांनी त्या दोन युवकांची हत्या केली त्यांची मदत करणाऱ्या नेत्यांच्या विरोधात बोलणार तुमच्यात हिम्मत असेल तर सुप्रिया सुळे, सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकर यांना देखील नोटीस पाठवाच. रक्ताचे सॅम्पल बदलायचं पाप हे तुमच्या सरकारने केला आहे. अरे शरद पवार दिल्लीच्या तक्ताच्या ईडीच्या नोटीसला घाबरत नाही या तुझ्या नोटीसला काय घाबरणार? माझी त्या व्यक्तीसोबत वैयक्तिक दुश्मनी नाही. पोर्स दुर्घटनेमध्ये सहभाग नसता तर मी त्याच्यावर एक शब्द देखील बोलले नसते. काही वेळापूर्वी इथे येऊन एका नेत्यांनी भाषण केलं की अनेक लोकांना मी संधी दिली, पक्षाने नाही मी… आता मी जे बोलते ती भाषणाची स्टाईल माझी नाही माझं हे भाषण ऐकून माझी आई मला खूप ओरडणार आहे. इथे येऊन ते म्हणाले कुणाची अंडी पिल्ली माहित आहेत जशी तुम्हाला इथली माहित आहे तशी आम्हाला…. त्यामुळे जुनं काही बोलू नका आणि जर काढलंच तर ‘यहा से भी करारा जबाब मिलेगा’. बापू मला तुमच्याकडून आज एक शब्द हवाय तुम्ही आमदार झाल्यानंतर तुमच्या मतदारसंघात एकही एक्सीडेंट झाला तर तुम्ही पोलीस स्टेशनला जाणार नाही तुम्ही सरळ हॉस्पिटलमध्ये जाल.

Supriya Sule On Ajit Pawar: ‘यहा से भी करारा जबाब मिलेगा’, सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना थेट इशारा Read More »

PM Modi : शेतकऱ्यांना 15 हजार रुपये मिळणार, नाशिकमधून नरेंद्र मोदींची मोठी घोषणा

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराला सुरुवात केली आहे. नाशिक येथे आयोजित एका जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. या सभेत बोलताना त्यांनी वीर सावरकर यांना काँग्रेसचे युवराज संपूर्ण देशात फिरून शिव्या देतात मात्र सावरकर यांचा वारसा जपण्याचा दावा करणारे आज काँग्रेससोबत आहे. असं देखील नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच आमची सरकार आली तर राज्यातील शेतकऱ्यांना 12 ऐवजी 15 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार असल्याची घोषणा देखील मोदींनी नाशिकमधून केली. तर राज्यातील अनेक विकास कामे थांबवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा महायुतीची सरकार आणा असा आवाहन देखील त्यांनी केला. पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, जर राज्यात महाविकास आघाडीची सरकार आली तर राज्यात सुरु असणारी लाडकी बहिण योजना बंद होणार असा दावा देखील त्यांनी केला. राज्यात विधानसभेसाठी एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मत मोजणी होणार आहे.

PM Modi : शेतकऱ्यांना 15 हजार रुपये मिळणार, नाशिकमधून नरेंद्र मोदींची मोठी घोषणा Read More »

Devendra Fadnavis: ही निवडणूक व्होट जिहाद विरुद्ध, देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

Devendra Fadnavis : राज्यात विधानसभेसाठी रणधुमाळी सुरु असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी धुळ्यात महायुतीच्या उमेदवारासाठी जाहीर सभा घेत आहे. या सभेत बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक जागे व्हायची निवडणुक आहे. ही निवडणूक व्होट जिहाद विरुद्ध आहे. असे वक्तव्य केले आहे. या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार धुळे जिल्ह्यातील पाच मतदारसंघात पुढे होता मात्र मालेगाव आणि धुळेमधील व्होट जिहादमुळे आमचा पराभव झाला. त्यामुळे ही निवडणूक जागे व्हायची निवडणुक आहे. ही निवडणूक व्होट जिहाद विरुद्ध आहे. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच विधानसभा निवडणुकीत धुळे जिल्ह्यात पाचही जागांवर महायुतीचे उमेदवार जिंकणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. राज्यात विधानसभेसाठी एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मत मोजणी होणार आहे. यावेळी राज्यात मुख्य लढत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये पाहायला मिळत आहे.

Devendra Fadnavis: ही निवडणूक व्होट जिहाद विरुद्ध, देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल Read More »

Maharashtra Election 2024 : पोलिसांची मोठी कारवाई, तब्बल 2.3 कोटी रुपये जप्त

Maharashtra Election 2024 : राज्यात विधानसभेसाठी निवडणुकांची घोषणा होताच आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. संपूर्ण राज्यात पोलिस देखील आचारसंहिताचे पालन करत मोठी कारवाई करत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. काळबादेवी येथे पोलिसांनी 12 जणांकडून 2.3 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत लोकमान्य टिळक मार्ग पोलिस स्टेशन आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या पथकाने गुरुवारी रात्री काही लोकांना अडवले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या लोकांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ 2.3 कोटी रुपयांची रोकड सापडली. पैसे घेऊन जाणारे हे लोक रोख रकमेशी संबंधित कोणतेही दस्तऐवज सादर करू शकले नाहीत किंवा एवढी मोठी रक्कम घेऊन जाण्याचे कारणही सांगू शकले नाहीत. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे, निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार तयार करण्यात आलेली पथक रोख रक्कम, दारू आणि इतर संभाव्य प्रलोभनांबाबत सतर्क आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, शुक्रवारी सकाळपर्यंत कागदपत्रे आणि चौकशीनंतर ही रक्कम जप्त करण्यात आली असून रोख घेऊन जाणाऱ्या 12 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यानंतर ही रोकड तपासासाठी आयकर विभागाकडे सुपूर्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Maharashtra Election 2024 : पोलिसांची मोठी कारवाई, तब्बल 2.3 कोटी रुपये जप्त Read More »

Rahul Gandhi: महिलांना 3000, फ्री प्रवास अन् शेतकऱ्यांना तीन लाखांची कर्जमाफी, राहुल गांधींकडून महाराष्ट्राला 5 गॅरंटी

Rahul Gandhi: राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू असून आता मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार प्रचार सुरू आहे. त्याच लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मुंबईतील बीकेसी मैदानात आयोजित सभेत बोलताना काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडून पाच गॅरंटी जाहीर केली आहे. यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी जर राज्यात महाविकास आघाडी सरकार आली तर महालक्ष्मी योजना लागू करणार असल्याची ग्वाही दिली. या योजनेअंतर्गत सरकार दर महिन्याला महिलांच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा करणार आणि संपूर्ण राज्यात महिलांना मोफत बस प्रवास मिळणार असल्याचे राहुल गांधी म्हणाले. तर सरकार आल्यावर शेतकऱ्यांना देखील तीन लाखांची कर्जमाफी देणार असल्याची गॅरंटी त्यांनी दिली. या वेळी बोलताना ते म्हणाले की राज्यात सरकार येताच जे शेतकरी नियमित कर्ज फेड करत आहे. त्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन म्हणून आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची देखील माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच मुलींप्रमाणे मुलांना देखील मोफत शिक्षण मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बेरोजगार तरुणांना दरमहा चार हजार रुपये सरकारकडून देण्यात येणार आहे. तर 25 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा आणि सर्वांना मोफत औषध वाटप करण्यात येणार असल्याची घोषणा देखील यावेळी करण्यात आली आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व नेते उपस्थित होते. 5 गॅरंटीमहिलांसाठी राज्यभरात मोफत बस प्रवासराज्यातील सर्व महिलांना 3000 रुपये मासिक मदतशेतकऱ्यांची तीन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी. कर्ज परतफेडीवर 50,000 रुपये प्रोत्साहन25 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा आणि सर्वांना मोफत औषध वाटपबेरोजगारांना सरकारकडून मासिक 4000 रुपयांची मदत.

Rahul Gandhi: महिलांना 3000, फ्री प्रवास अन् शेतकऱ्यांना तीन लाखांची कर्जमाफी, राहुल गांधींकडून महाराष्ट्राला 5 गॅरंटी Read More »

Parliament Winter Session 2024 : हिवाळी अधिवेशनाची तारीख ठरली, 25 नोव्हेंबरपासून सुरुवात, ‘या’ मुद्यावर विरोधक सरकारला देणार आव्हान

Parliament Winter Session 2024 : संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबर 2024 पासून सुरू होईल आणि 20 डिसेंबरपर्यंत चालणार असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. रिजिजू म्हणाले की, संविधान स्वीकारल्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त 26 नोव्हेंबर रोजी संविधान सदनाच्या सेंट्रल हॉलमध्ये एक विशेष सोहळा आयोजित केला जाईल, जो संविधान दिन म्हणून साजरा केला जाईल. रिजिजू म्हणाले, माननीय राष्ट्रपतींनी भारत सरकारच्या शिफारशीनुसार 25 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर 2024 या कालावधीत हिवाळी अधिवेशन, 2024 साठी संसदेच्या दोन्ही सभागृहांची बैठक बोलावण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. वक्फ दुरुस्ती विधेयकावरील संयुक्त समितीने शेवटच्या अधिवेशनात दिलेल्या मुदतीवर टिकून राहिल्यास 29 नोव्हेंबर रोजी संसदेत अहवाल सादर करणे अपेक्षित आहे. वन नेशन-वन इलेक्शन आणि वक्फ विधेयकावर लक्षसंसदेच्या हिवाळी अधिवेशनात सर्वांचे लक्ष वन नेशन-वन इलेक्शन आणि वक्फ विधेयकाकडे लागले आहे. या दोन मुद्द्यांवरून संसदेत बराच गदारोळ होण्याची शक्यता आहे. वन नेशन-वन इलेक्शनच्या अहवालाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर हिवाळी अधिवेशनात यासंबंधीचे विधेयक मांडले जाईल. विरोधी पक्ष याला विरोध करत आहेत आणि देशात एकाचवेळी निवडणुका घेण्याच्या बाजूने नाहीत. अशा स्थितीत हे विधेयक मंजूर करणं सरकारसाठी कठीण होणार आहे. वक्फ विधेयकावरही गदारोळ होण्याची शक्यतायाशिवाय वक्फ विधेयक 2024 वर सुरू असलेला गतिरोध देखील संसदेच्या अधिवेशनात मुद्दा बनू शकतो. खरे तर वक्फ विधेयकावर गठित जेपीसी आपला अहवाल संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मांडू शकते. यावरून विरोधी पक्ष सरकारला विरोध करत आहेत. जेपीसीच्या बैठकीत वक्फ विधेयकाबाबत अनेकदा गदारोळ झाला आहे.

Parliament Winter Session 2024 : हिवाळी अधिवेशनाची तारीख ठरली, 25 नोव्हेंबरपासून सुरुवात, ‘या’ मुद्यावर विरोधक सरकारला देणार आव्हान Read More »