DNA मराठी

राजकीय

lakshman hake

Lakshman Hake : ओबीसी आरक्षणासाठी नेमकं काय केलं? लक्ष्मण हाकेंची CM फडणवीसांसह अजित पवारांवर टीका

Lakshman Hake : ऊर्जा स्थळावर येऊन कोट्यवधी रुपयांचा निधी दिला म्हणजे काही वेगळे किंवा मोठे काम केल्याचा आव आणू नये, असा टोला ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकारला लावला आहे. तर महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. यावेळी ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले की, ऊर्जा स्थळावर येऊन सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासाठी निधी दिला म्हणजे सरकारने उपकार केले, असे होत नाही. नेमके ओबीसींसाठी आणि दीन-दुबळ्यांसाठी राज्य सरकारने काय केले, हा खरा प्रश्न आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राज्य सरकारकडून निधी दिल्याचा डांगोरा पिटला जात असला, तरी त्यातून ओबीसी समाजाचे मूलभूत प्रश्न सुटत नाहीत. केवळ निधी जाहीर केल्याने खूप काही केले, असे मानता येणार नाही, अशी जहरी टीका लक्ष्मण हाके यांनी केली. लक्ष्मण हाके साताऱ्यातील नायगाव येथे सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केल्यानंतर सरकारवर निशाणा साधला. तर दुसरीकडे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील उपोषणानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी जीआर जारी केला आहे. यानंतर मराठा आरक्षणासाठी काढण्यात आलेला जीआर रद्द करण्यात यावा अशी मागणी देखील लक्ष्मण हाके करत आहे.

Lakshman Hake : ओबीसी आरक्षणासाठी नेमकं काय केलं? लक्ष्मण हाकेंची CM फडणवीसांसह अजित पवारांवर टीका Read More »

oplus 16908288

Pimpri-Chinchwad Municipal Corporation Elections : भाजपसाठी आनंदाची बातमी; पिंपरी-चिंचवडमध्ये दुसरा नगरसेवक बिनविरोध

Pimpri-Chinchwad Municipal Corporation Elections : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये वार्ड 10 मधील भाजपाच्या उमेदवार सुप्रिया चांदगुडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्षा भालेराव होत्या त्यांनी माघार घेतल्यामुळे चांदगुडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या आधी भोसरीतील धावडेवस्ती प्रभाग क्रमांक 6 मध्ये भाजपने माजी नगरसेवक रवी लांडगे बिनविरोध झाले आहे. प्रभाग 6 मध्ये अपक्ष उमेदवार प्रसाद काटे यांचा अर्ज छाननीदरम्यान बाद ठरवण्यात आला. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार निलेश सूर्यवंशी यांचा अर्ज जात प्रमाणपत्र सादर न केल्याने नामंजूर करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने संतोष काळुराम लांडगे यांना उमेदवारी जाहीर केली होती, मात्र त्यांचा अर्जच दाखल न झाल्याने ते निवडणूक रिंगणाबाहेर राहिले होते. यामुळे प्रभाग क्रमांक 6 मध्ये रवी लांडगे बिनविरोध झाले. विशेष म्हणजे, 2017 च्या महापालिका निवडणुकीतही रवी लांडगे यांची बिनविरोध निवड झाली होती.

Pimpri-Chinchwad Municipal Corporation Elections : भाजपसाठी आनंदाची बातमी; पिंपरी-चिंचवडमध्ये दुसरा नगरसेवक बिनविरोध Read More »

Harshwardhan Sapkal: राहुल नार्वेकरांच्या नातेवाईकांच्या प्रचारात सक्रिय असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करा

Harshwardhan Sapkal: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षांच्या उमेदवारांना अर्ज दाखल करताना धमकावल्याचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. नार्वेकर यांचे वर्तन आक्षेपार्ह व आदर्श आचारसंहितेचा भंग करणारे असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत तसेच त्यांच्या कार्यालयातील तब्बल ७० अधिकारी व कर्मचारी नार्वेकर यांचे नातेवाईक असलेल्या उमेदवारांच्या निवडणूक प्रचारात सक्रीय भाग घेत आहेत, या सर्वांवरही आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांना पत्र पाठवले असून या पत्रात सपकाळ म्हणाले की, मुंबईतील कुलाबा मतदार संघातील प्रभाग क्रमांक २२५, २२६ व २२७ मधून राहुल नार्वेकर यांचे भाऊ मकरंद नार्वेकर, बहिण गौरवी शिवलकर व वहिनी हर्षदा नार्वेकर या तिघांनी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, अर्ज दाखल करताना राहुल नार्वेकर हे स्वतः उपस्थित होते. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असताना राहुल नार्वेकर यांनी पोलिसांच्या माध्यमातून भाजपा उमेदवारांच्या विरोधात अर्ज दाखल करणा-या विरोधी पक्षांच्या उमेदवारांना धमकावले तसेच अर्ज भरण्यापासून रोखण्यात आले, अशा प्रकारे एका महत्वाच्या व संवैधानिक पदावरील व्यक्तीने लोकशाहीचे धिंडवडे काढून निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणला आहे. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. सपकाळ पुढे म्हणाले की, लोकशाहीमध्ये निवडणूका निष्पक्ष, पारदर्शक आणि निर्भिड वातावरणात पार पाडणे हे आपल्या आयोगाचे कर्तव्यच आहे परंतु या निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांच्या उमेदवारांवर हरप्रकारे दबाव आणून अर्ज मागे घेण्यास भाग पाडले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. यात सर्वात महत्वाचे म्हणजे विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करुन घेऊ नये यासाठी प्रशासनावर दबाव आणला, विरोधी पक्षांच्या उमेदवारांना धमकावले हे अत्यंत गंभीर आहे. राहुल नार्वेकर हे संवैधानिक पदावर आहेत, त्यांच्याकडून अशापद्धतीने कायदा धाब्यावर बसून दडपशाहीचा मार्ग अवलंबणे लोकशाहीचा खून करण्यासारखे कृत्य आहे. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे, आणि निवडणूक आयोगाच्या पाठीचा कणा मजबूत आहे हे आपण दाखवून द्यावे असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Harshwardhan Sapkal: राहुल नार्वेकरांच्या नातेवाईकांच्या प्रचारात सक्रिय असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करा Read More »

mns

Ahilyanagar Politics : अहिल्यानगरच्या राजकारणात खळबळ; मनसेचे दोन उमेदवार अचानक गायब

Ahilyanagar Politics : अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. या निवडणुकीसाठी भाजप 32 तर राष्ट्रवादी काँग्रेस 34 जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर शिवसेना शिंदे गट स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. तर महाविकास आघाडी म्हणून शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार दिले आहे. त्यामुळे तिरंगी झालेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे आता अहिल्यानगर शहरातील राजकारणातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार प्रभाग क्रमांक 17 मधील मनसेचे दोन उमेदवार अचानक गायब झाले आहे. राहुल जाधव आणि अंबरनाथ भालसिंग असे गायब झालेल्या उमेदवारांची नावे आहे.केडगाव परिसरातील प्रभाग क्रमांक सतरा मधील राहुल जाधव आणि अंबरनाथ भालसिंग मनसेकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. दोन्ही उमेदवारांचा गेल्या चोवीस तासांपासून कुटुंबाशी संपर्क नसल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ आणि सुमित वर्मा यांनी माहिती दिली आहे. दोन उमेदवारांपैकी एक उमेदवार भाजप आणि दुसरा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांसमोर निवडणुकीला उभा होता. तसेच निवडणूक बिनविरोध होण्यासाठी दोन उमेदवारांचे अपहरण केले असल्याचा विद्यार्थी सेनेच्या जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी संशय व्यक्त केला आहे. अहिल्यानगर महापालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

Ahilyanagar Politics : अहिल्यानगरच्या राजकारणात खळबळ; मनसेचे दोन उमेदवार अचानक गायब Read More »

dhananjay munde

Dhananjay Munde : आणखी एका न्यायालयीन लढ्यात धनंजय मुंडेंचा विजय; करुणा मुंडेंना धक्का

Dhananjay Munde : माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांचा आणखी एका न्यायालयीन लढ्यात विजय झाला आहे. विधानसभा निवडणूक 2024 मधील त्यांच्या उमेदवारी अर्ज सोबत जोडलेल्या शपथपत्रामध्ये उल्लेख केलेल्या माहितीवर आक्षेप घेत लोकप्रतिनिधी अधिनियम कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याबाबत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी परळी वैद्यनाथ यांच्या न्यायालयात करुणा शर्मा यांनी फौजदारी कारवाई करण्याबाबत फिर्याद प्रकरण दाखल केले होते. याबाबत आज परळी न्यायालयाने निकाल दिला असून सदर प्रकरणातील सर्व आरोप तथ्यहीन असल्याने ते फेटाळून लावले आहेत. धनंजय मुंडे यांच्या नामनिर्देशन पत्रामध्ये नमूद माहितीवरून करुणा शर्मा यांनी वेगवेगळे आरोप करत शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप करत लोकप्रतिनिधी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. याप्रकरणी परळीच्या प्रथमवर्ग न्यायालयात सुनावणी पार पडली, करुणा शर्मा यांनी नोंदवलेला जबाब, वकिलांचा युक्तिवाद यांसह वस्तुस्थिती लक्षात घेत न्यायालयाने करुणा शर्मा यांनी दाखल केलेली फिर्याद फेटाळून लावली आहे. धनंजय मुंडे यांच्या वतीने ॲड. अशोक कवडे यांच्या सह ॲड. हरिभाऊ गुट्टे यांनी काम पाहिले. दरम्यान धनंजय मुंडे यांच्या बाजूने न्यायालयाने आणखी निकाल दिला आहे. याआधी देखील कृषी विभागाच्या खरेदी वरून निरनिराळे आरोप करत धनंजय मुंडे यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये देखील कोणतेही तथ्य आढळले नाही आणि ते प्रकरण देखील मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावत तक्रारदाराला उलट दंड लावला होता. नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी परळीत एकहाती सत्ता कायम राखली, तेव्हा देखील न्यायालयाच्या निकालात आणि जनतेच्या निकालात आपला विजय झाल्याची भावनिक प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

Dhananjay Munde : आणखी एका न्यायालयीन लढ्यात धनंजय मुंडेंचा विजय; करुणा मुंडेंना धक्का Read More »

maharashtra government

Maharashtra Cabinet Decisions: अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास मिळणार महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची तीन एकर जमीन

Maharashtra Cabinet Decisions: अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री. अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची ३ एकर ८ आर जमीन देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. चिखलदरा येथील सुमारे साडे सात एकर जमीन १९७५ मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला पर्यटकांसाठी मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी देण्यात आली होती. पण ही जमीन वापराविना पडून होती. दरम्यान, अमरावतीच्या श्री अंबादेवी संस्थान यांनी चिखलदरा येथील देवी पॉईंट आणि विराट देवी देवस्थान यांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. या संस्थानाने या दोन्ही देवस्थानच्या विकासासाठी शासनाकडे जमिनीची मागणी केली आहे. त्यानुसार पर्यटन विकास महामंडळाकडील सुमारे तीन एकर ८ आर जमीन शासन जमा करून घेऊन, ती श्री. अंबादेवी संस्थानास विनामुल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही जमीन मंदिर संस्थानाला भोगवटादार वर्ग – २ म्हणून मिळणार असून, जमीन केवळ धार्मिक प्रयोजनासाठी वापरता येणार आहे.

Maharashtra Cabinet Decisions: अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास मिळणार महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची तीन एकर जमीन Read More »

election

Ahilyanagar Politics : पक्ष बदलले, चेहरे तेच; पण जनता कुठे हरवली?

Ahilyanagar Politics : महानगरपालिकेच्या 2025 च्या निवडणुकांची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस म्हणजे राजकारणाच्या आरशात पाहण्याचा योगच जणू. दिवसभर शहरातील प्रभागांमधून फिरताना परिचित चेहरेच अधिक दिसत होते. ओळखीची माणसे, ओळखीचे चेहरे, काहींची पक्षनिष्ठाही माहीत होती. मात्र, संध्याकाळपर्यंत एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवली, कोण कुठल्या पक्षाचा आहे, हेच समजत नव्हते. चहाच्या टपरीवर बसलेला एकजण आत्मविश्वासाने सांगत होता, मी अमुक पक्षाचा आहे. तेवढ्यात त्याला फोन आला, तो उठून गेला. चहा संपवून आम्ही निवडणूक कार्यालयाकडे येताना पुन्हा तोच भेटला आणि सहजपणे म्हणाला, “मी दुसऱ्याच पक्षातून फॉर्म भरला आहे.” ही एखादी अपवादात्मक घटना नव्हती. मागील पाच-सहा दिवसांत अशा अनेक कथा ऐकायला मिळाल्या. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी—महायुती असो वा महाविकास आघाडी—सर्वच ठिकाणी चेहरे तेच, फक्त झेंडे बदललेले. या पक्षांतरांच्या खेळात एक वाक्य मात्र सर्वत्र समानपणे ऐकू येत होते… “जनतेच्या कल्याणासाठी, प्रभागाच्या आणि शहराच्या विकासासाठी मी पक्ष बदलत आहे…. विरोधक असो वा सत्ताधारी, मोठा नेता असो वा स्थानिक इच्छुक हे वाक्य इतक्या गोडपणे, इतक्या सहजपणे उच्चारले जात होते की तेच जणू निवडणूक घोषवाक्य बनले होते. मात्र या घोषणांच्या आड एक कटू सत्य दडलेले होते….. जनतेच्या प्रश्नांचा उल्लेख कुठेच नव्हता. रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठ्याची समस्या, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सुविधा, शिक्षण—अहिल्यानगरच्या नागरिकांना रोज भेडसावणाऱ्या प्रश्नांवर एकही ठोस चर्चा ऐकू आली नाही. सत्तेत असलेले अचानक विरोधक झाले, विरोधक सत्तेच्या जवळ गेले. निवडून आल्यावर आपण कोणत्या पक्षात असू, हे सांगण्याचीही तयारी अनेकांची नव्हती. आजचा विरोध उद्याचा सत्ताधारी होऊ शकतो, हीच जणू राजकीय हमी बनली आहे. या सगळ्या धावपळीत एक गोष्ट ठळकपणे दिसली निवडणूक म्हणजे सार्वजनिक सेवेचा नव्हे, तर वैयक्तिक आणि कौटुंबिक व्यवस्थापनाचा प्रकल्प बनला आहे. कधी स्वतःसाठी, कधी पत्नीकरिता, कधी मुला-मुलीसाठी, कधी सुनेसाठी, तर कधी नातवासाठी जागा सुरक्षित करण्याची धडपड सुरू आहे. राजकारणाचा वारसा जपताना शहराचा वारसा मात्र दुर्लक्षित राहतो आहे. लोकशाहीत निवडणूक ही जनतेसाठी असते, हे तत्वज्ञान कागदावरच उरले आहे का, असा प्रश्न पडतो. ज्यांच्या नावाने उमेदवारी मागितली जाते, ती जनता या सगळ्या प्रक्रियेत अदृश्य आहे. राजकीय गणिते जुळवताना सामाजिक वास्तव विसरले गेले आहे. अहिल्यानगरच्या या निवडणुकीत पक्षांतरांचा गोंधळ जितका वाढतो आहे, तितकीच जनतेची विश्वासार्हता कमी होत आहे. शेवटी प्रश्न एवढाच उरतो. या निवडणुकीत जिंकणार कोण? पक्ष, उमेदवार की राजकीय घराणी? आणि हरलेली कोण? तर ती जनता, जिने पुन्हा एकदा विकासाच्या नावावर आश्वासनांची पिशवी खांद्यावर घेतली आहे. लोकसत्तेच्या परंपरेतून पाहिले तर ही निवडणूक केवळ सत्तेची नाही, तर लोकशाहीच्या आत्म्याची कसोटी आहे.

Ahilyanagar Politics : पक्ष बदलले, चेहरे तेच; पण जनता कुठे हरवली? Read More »

ahilyanagar municipal corporation election

Ahilyanagar Municipal Corporation Elections: अहिल्यानगर महापालिकेत महापौर कुणाचा; भाजप – राष्ट्रवादी युती तर शिवसेना स्वबळावर

Ahilyanagar Municipal Corporation Elections: अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असून राष्ट्रवादी शरद पवार गट 32, शिवसेना ठाकरे गट 24 आणि काँग्रेस 12 जागांवर निवडणूक लढवणार आहे. तिन्ही पक्ष एकत्र येत महाविकास आघाडी म्हणून लढणार असून ज्या ठिकाणी डबल एबी फॉर्म दिले गेले ते विथड्रवाल करणार येणार असल्याची माहिती महाविकास आघाडीकडून देण्यात आली आहे. तर दुसरीकडे भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये युतीची घोषणा झाली असून भाजप 32 तर राष्ट्रवादी काँग्रेस 34 जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने महायुतीमधून बाहेर होण्याची घोषणा केली आहे. शिवसेना शिंदे गटाला समाधानकारक जागा न मिळाल्याने शिवसेना शिंदे गट स्वबळावर अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे आता अहिल्यानगर महापालिकेसाठी महायुती विरुद्ध महाविकास विरुद्ध शिवसेना शिंदे गट असा सामना पाहायला मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुतीसाठी शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपमध्ये युतीसाठी चर्चा सुरू होती मात्र जागावाटपावरून मतभेद झाल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे एमआयएम आणि मनसे देखील अहिल्यानगर महापालिकेत स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे आता अहिल्यानगर महापालिकेत महापौर कुणाचा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. अहिल्यानगर महापालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

Ahilyanagar Municipal Corporation Elections: अहिल्यानगर महापालिकेत महापौर कुणाचा; भाजप – राष्ट्रवादी युती तर शिवसेना स्वबळावर Read More »

Ahilyanagar Municipal Corporation Election: अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर

Ahilyanagar Municipal Corporation Election: अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये युती असून राष्ट्रवादी काँग्रेस 34 तर भाजप 32 जागांवर निवडणूक लढवणार आहे. अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपची पहिली यादी प्रभाग क्रमांक 1 (ब )शारदा दिगंबर ढवन प्रभाग क्रमांक 2 (अ) रोशनी प्रवीण भोसले उर्फ त्र्यंबके ( ड ) निखील बाबासाहेब वारे प्रभाग क्रमांक 3 (अ )उषा शिवाजीराव नलावडे (ड ) ऋग्वेद महेंद्र गंधे प्रभाग क्रमांक 5 ( ब ) धनंजय कृष्णा जाधव प्रभाग क्रमांक 6 (अ) मनोज लक्ष्मण दुल्लाम ( ब) सोन्याबाई तयागा शिंदे (क )सुनिता श्रीकृष्ण कुलकणी ( ड) करण उदय कराळ प्रभाग क्रमांक 7 (अ) वषां रोहन सानप (ब )पुष्पाताई अनिल बोरुडे ( क )वंदना विलास ताठे (ड ) बाबासाहेब सोन्याबापू वाकळे प्रभाग क्रमांक 8 ( ब )आशाबाई लोभाजी कातोरे प्रभाग क्रमांक 9 (ब )पद्माताई विजयकु‌मार बोरुडं ( ड )महेश राम लोंढे प्रभाग क्रमांक 10 (अ) महेंद्र दत्तात्रय बिज्जा (ब ) शितल अजय ढोण (क )मयुरी सुशांत जाधव (ड) सागर राजू मुतोडकर प्रभाग क्रमांक 11 ( अ) विकास (विकी) किशोर वाघ ( ब ) दीप्ती सुवेंद्र गांधी (ड ) सुभाष सोपानराव लोंढे प्रभाग क्रमांक 12 (क )अमोल सुरेश निस्ताने ( ड ) शुभ्रा पुष्कर तांबोळी प्रभाग क्रमांक 15 ( ब )दत्तात्रय सोमनाथ गाडळकर ( ड )सुजय अनिल मोहिते प्रभाग क्रमांक 16 ( क )विजय मोहन पठारे ( ड )ज्ञानेश्वर शिवाजी येवले प्रभाग क्रमांक 17 (क) कमल जालिंदर कातकर ( ड )मनोज शंकर कोतकर

Ahilyanagar Municipal Corporation Election: अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर Read More »

ahilyanagar municipal corporation election

Ahilyanagar Municipal Corporation Election: मोठी बातमी; अहिल्यानगर महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर

Ahilyanagar Municipal Corporation Election: अहिल्यानगर महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये युती असून राष्ट्रवादी काँग्रेस 34 तर भाजप 32 जागांवर निवडणूक लढवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची पहिली यादी प्रभाग क्रमांक १ (अ )डॉ. सागर अर्जुन बोरुडे राष्ट्रवादी (ब) ज्योती सतीश ढवण राष्ट्रवादी (क) दिपाली नितीन बारस्कर राष्ट्रवादी (ड )संपत विजय बारस्कर राष्ट्रवादी प्रभाग क्रमांक २ ( ब )महेश रघुनाथ तवले राष्ट्रवादी ( क) संध्या बाळासाहब पवार राष्ट्रवादी प्रभाग क्रमांक ३ ( ब) गौरी अजिक्य बोरकर राष्ट्रवादी ( क ) ज्योती अमोल गाडे राष्ट्रवादी प्रभाग क्रमांक ५ ( अ )काजल गोरख भोसले राष्ट्रवादी (क )हरप्रीतकौर जगजीतसिंग गंभीर राष्ट्रवादी ( ड )मोहित प्रदीप पंजाबो राष्ट्रवादी प्रभाग क्रमांक ८ (अ )सुनिता किसन भिंगारदिवे राष्ट्रवादी ( क )कुमार बबनराव वाकळे राष्ट्रवादी (ड) बाबासाहेब संतराम नागरगोजे राष्ट्रवादी प्रभाग क्रमांक ९ ( अ )किरण रमेश दाभाडे राष्ट्रवादी (क )सीमा युवराज शिंदे राष्ट्रवादी प्रभाग क्रमांक ११ (अ) सागर किरण शिंदे राष्ट्रवादी ( क )आशा किशोर डागवाले राष्ट्रवादी प्रभाग क्रमांक १२ ( अ) आरती संग्राम रासकर राष्ट्रवादी ( ब ) संध्या रमेश घोलप राष्ट्रवादी प्रभाग क्रमांक १३ (अ )सुरेश लक्ष्मण बनसोडे राष्ट्रवादी ( ब) सुजाता महेंद्र पडोळे राष्ट्रवादो ( क )अनिता विपुल शेटीया राष्ट्रवादी ( ड )अविनाथ हरिभाऊ घुले राष्ट्रवादी प्रभाग क्रमांक १४ ( अ )प्रकाश बाबुराव भागानगरे राष्ट्रवादी (ब )सुनिता भगवान फुलसौंदर राष्ट्रवादी ( क )माना संजय चोपडा राष्ट्रवादी ( ड )गणेश पुंडलिक भोसले राष्ट्रवादी प्रभाग क्रमांक १५ ( अ )पोर्णिमा विजय गव्हाळे राष्ट्रवादी (क )गीतांजली सुनील काळे राष्ट्रवादी प्रभाग क्रमांक १६ (अ )सुनिता महेंद्र कांबळे राष्ट्रवादी ( ब )वर्षा सुजित काकडे राष्ट्रवादी प्रभाग १७ (अ) मयूर कनैय्यालाल बांगरे राष्ट्रवादी ( ब )अश्विनी सुमित लोंढे राष्ट्रवादी

Ahilyanagar Municipal Corporation Election: मोठी बातमी; अहिल्यानगर महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर Read More »