DNA मराठी

राजकीय

Nilesh Lanke: होय, मी गुंडच आहे पण … लंके यांनी दिला विखेंना उत्तर

Nilesh Lanke: होय, मी गुंडच आहे कारण जेव्हा गोर-गरीबावरती अन्याय होतो आणि ज्या वेळेस दहशतीचे, दादागिरीचे वातावरण निर्माण केले जाते त्यावेळेस आम्ही गुंड होण्याचा देखील पवित्रा घेतो असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी केले.  अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे निलेश लंके यांच्या प्रचाराची रणधुमाळी उमेदवारी अर्ज भरण्याआधीच मोठ्या प्रमाणात चालू असून निलेश लंके यांनी मोहटा देवी गडावरून जनसंवाद यात्रेचा नारळ फोडून स्वाभिमानी जनसंवाद यात्रेचा शुभारंभ शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते करून गावागावात जाऊन जनसामान्यांचे प्रश्न जाणून घेत आहेत.  महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी नगर शहरामध्ये कार्यकर्ता मेळाव्यात लंके यांना एक आव्हान केले आहे.  निलेश लंके यांनी एक महिन्याभरात इंग्रजीत भाषण पाठ करून दाखवावे मी उमेदवारी अर्ज सुद्धा भरणार नाही अशा प्रकारचे वक्तव्य केल्याने आमदार निलेश लंके यांनी देखील त्यांना पत्रकार परिषदेत सडेतोड उत्तर दिले आहे.   संसदेत कुठल्या भाषेमध्ये प्रश्न मांडायचा यापेक्षा संसदेत तुम्ही किती प्रभावीपणे प्रश्न मांडू शकतात हे महत्त्वाचे असून चौका चौकात इंग्रजीत भाषण मी जर करत बसलो तर त्याचा फायदा काय आहे. सर्वसामान्यांना काम पाहिजे भाषण नाही असे निलेश लंके म्हणाले.

Nilesh Lanke: होय, मी गुंडच आहे पण … लंके यांनी दिला विखेंना उत्तर Read More »

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा मेळावा, मंत्री हसन मुश्रीफ राहणार उपस्थित

NCP News :  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा गट)च्या वतीने जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन येत्या गुरवार दि.४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले आहे. महायुतीचे उमेदवार खा.डॉ.सुजय विखे यांच्या प्रचारार्थ होणाऱ्या या मेळाव्यास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत होणारा हा मेळावा नगर शहरातील केडगाव येथील निशा लॉन्स येथे होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष व राज्य बाजार समिती अध्यक्ष बाळासाहेब उर्फ प्रवीणकुमार नाहाटा यांनी दिली.   लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या वतीने विद्यमान खासदार सुजय विखे यांच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनेही कंबर कसली असून प्रचारास सुरवातही केली आहे. त्यासाठीच दि.४ एप्रिल रोजी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे, प्रदेश युवा अध्यक्ष सुरज चव्हाण, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे नूतन राज्य अध्यक्ष दत्तात्रय पानसरे, प्रदेश सचिव राजेंद्र गुंड, ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष चंद्रशेखर घुले, माजी आमदार अरुण जगताप, आ.संग्राम जगताप, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, युवा जिल्हाध्यक्ष नंदकुमार मुंडे आदींच्या उपस्थितीत होणार आहे.  या मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्यने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा मेळावा, मंत्री हसन मुश्रीफ राहणार उपस्थित Read More »

Ahmednagar News : आमचा वाद कौटुंबिक.. आमच्यातील भाऊबंदकी मिटली आहे- सुजय विखे

Ahmednagar News: आज मंगळवारी खा.सुजय विखे आणि आ.राम शिंदे यांच्या उपस्थितीत  जामखेड तालुका भाजप पदाधिकर्यांची प्रचार नियोजन बैठक पार पडली.  या बैठकीनंतर राम शिंदे यांनी आज झालेल्या प्रचार नियोजन बैठकीचा आढावा सांगितला. नियोजन बैठकीला जामखेड तालुक्यातील पदाधिकारी,प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  शिंदे म्हणाले की, यावेळी कार्यकर्त्यांनी आपापली मते मांडली तसेच निवडणुकीच्या दृष्टीने कशी व्युव्ह रचना हवी याबद्दल सांगितले. गेल्या पाच वर्षातील एकूण आलेल्या अनुभवांचा उहापोह करण्यात आला. या बद्दल उमेदवार सुजय विखे यांनी सर्वांचे समाधान होईल अशी भूमिका मांडली.  यावर उपस्थितीत पदाधिकारी यांचे पूर्ण समाधान झाले असून यापूर्वी जामखेड तालुक्यातून मिळालेल्या मताधिक्यपेक्षा अधिकचे मताधिक्य जामखेड तालुक्यातून दिले जाईल अशी ग्वाही सर्वांनी दिली.  पक्षाने 13 मार्च रोजी सुजय विखे यांना उमेदवारी घोषित केल्यानंतर आता कसलेही मतभेद उरलेले नाहीत, केंद्रीय नेतृत्वाने अब की बार चारसौ पार चा नारा दिला आहे. त्यामुळे सुजय विखे यांना विजयी करणे हे सर्वांचे लक्ष आहे.  नगर दक्षिणेतील सहाही विधानसभा मतदारसंघात आपण विखे यांना जास्तीतजास्त मताधिक्य मिळेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. उद्या बुधवारी कर्जत तालुका भाजप पदाधिकारी यांची प्रचार नियोजनाची बैठक होणार आहे. आमच्यातील वाद हा कौटुंबिक विषय होता,याची जाहीर वाच्यता होत नसते. आमच्या कुटुंबातील जी काही भाऊबंदकी होती ती मिटली आहे, असे उत्तर खा.सुजय विखे यांनी शिंदे नाराज असल्याच्या चर्चेवर विचारलेल्या प्रश्नावर दिली. मधल्या काळात कार्यकर्त्यांत जी भावना होती ती बैठकीत मांडली गेली. त्यावर सर्वांचे समाधान करून सकारात्मक चर्चा झाली आहे.  आता एकजुटीने जेष्ठनेते राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात प्रचार केला जाऊन महायुतीचे उमेदवार म्हणून सर्वांनी जामखेड तालुक्यातून मताधिक्य देण्याची ग्वाही दिली असल्याची माहिती विखे यांनी दिली. यावेळी जामखेड तालुका भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

Ahmednagar News : आमचा वाद कौटुंबिक.. आमच्यातील भाऊबंदकी मिटली आहे- सुजय विखे Read More »

Nilesh Lanke: मुकुंदनगर येथे आमदार निलेश लंके यांची इफ्तार पार्टीला हजेरी

Nilesh Lanke :  गेल्या 20 दिवसांपासून मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिना आहे.  याच पार्श्वभूमीवर रविवारी आमदार निलेश लंके यांनी मुस्लिम बांधवांसमवेत इफ्तार केला.  रविवार सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मुस्लिम बांधवांसमवेत पवित्र रमजानचा उपास सोडविण्यात आमदार लंकेंनी हजेरी लावली. यावेळी मज्जू भाई फ्रेंड सर्कल व उम्मीद फाउंडेशनच्या वतीने  इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. आमदार निलेश लंके यांचा या इफ्तार पार्टी दरम्यान सत्कार देखील करण्यात आला तर अनेक मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली.  यावेळी माजी महापौर अभिषेक कळमकर, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोटे, अलफेज खान, रियाज शेख, शाहरुख  शेख, मुजाहिद बंदेअली, सलमान मणियार, वाहिद सय्यद, फैजअली शेख, संदेश पाटोळे, अरबाज शेख, अमन शेख, मोहिद खान आदी उपस्थित होते.

Nilesh Lanke: मुकुंदनगर येथे आमदार निलेश लंके यांची इफ्तार पार्टीला हजेरी Read More »

Uddhav Thackeray On Modi : अन् उद्धव ठाकरे यांनी दिला भाजपला आव्हान, म्हणाले- ‘हिंमत असेल तर…’

Uddhav Thackeray On Modi : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपवर टीका करत भाजपला खुला आव्हान दिला आहे.  दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात इंडिया अलायन्सने दिल्लीच्या रामलीला मैदानावर मेगा रॅलीचे  आयोजन केले होते.  या रॅलीमध्ये शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केला.  यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, तुम्ही (कल्पना सोरेन आणि सुनीता केजरीवाल) काळजी करू नका, फक्त आम्हीच नाही तर संपूर्ण देश तुमच्या पाठीशी आहे… काही दिवस पूर्वी भीती होती की आपला देश हुकूमशाहीकडे वाटचाल करतोय का? पण आता ही भीती नसून वास्तव आहे… अरविंद केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांना अटक करून लोक घाबरतील असे भाजपला वाटत असावे, पण त्यांनी आपल्या देशवासीयांना कधीच ओळखले नाही.” भाजपवर निशाणा साधत ठाकरे म्हणाले, निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन यांना अटक करून भाजपमध्ये दाखल झालेल्या गुंडांवरील खटले मागे घेण्यात आले, ते भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये स्वच्छ धुतले गेले. उद्धव ठाकरे यांनी भाजपला खुले आव्हान दिले असून तुमच्यात (भाजप) हिंमत असेल तर तुमच्या बॅनरवर लिहा आणि ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स हे भाजपचे तीन मित्र पक्ष असल्याचे दाखवा. अरविंद केजरीवाल यांना आरोपी करून तुरुंगात टाकले, हेमंत सोरेन यांना आरोपी करून तुरुंगात टाकले. हा कोणता कायदा आहे? रामलीला मैदानावरील मेगा सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “आता त्यांचे (भाजपचे) स्वप्न 400 (जागा) पार करण्याचे आहे… आता वेळ आली आहे की एका पक्षाचे आणि एका व्यक्तीचे सरकार उखडून टाकावे लागेल. आम्ही इथे निवडणूक प्रचारासाठी आलो नाही, लोकशाहीच्या रक्षणासाठी आलो आहोत…ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांना सोबत घेतले…भ्रष्टाचाऱ्यांनी भरलेला पक्ष सरकार कसे चालवू शकतो?…

Uddhav Thackeray On Modi : अन् उद्धव ठाकरे यांनी दिला भाजपला आव्हान, म्हणाले- ‘हिंमत असेल तर…’ Read More »

Lok Sabha Election 2024  : महायुतीत जागावाटपाचा तिढा सुटेना, ‘या’ 2 जागा भाजपसाठी ठरल्या डोकेदुखी ?

Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सत्ताधारी महायुतीमध्ये अद्याप देखील जागा वाटपाचा प्रश्न सुटलेला नाही.  यामुळे राज्यात 48 लोकसभा जागांपैकी कोण किती जागावर निवडणूक लढवणार याची अपचारीक घोषणा झालेली नाही.  तर दुसरीकडे मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीतील जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे वृत्त आहे. महायुतीच्या 48 पैकी 46 जागांचा फॉर्म्युला निश्चित झाला असून, 2 जागांसाठी अजूनही लढत सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.  भाजपने राज्यात आतापर्यंत 23 उमेदवार जाहीर केले आहेत. तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही.मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक आणि ठाण्याच्या जागांबाबत सत्ताधारी महायुतीमध्ये अद्यापही चुरस सुरू आहे. ठाणे लोकसभा जागा मिळविण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. ठाण्यात आपली ताकद शिवसेनेपेक्षा जास्त असल्याचा भाजपचा तर्क आहे. त्याचवेळी ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असल्यानं शिंदे सेना ठाण्याची जागा सोडायला तयार नाहीत. त्यामुळे ही जागा त्यांच्या प्रतिष्ठेची आहे. ठाण्याव्यतिरिक्त नाशिकच्या जागेवरही तिन्ही पक्षांनी दावा केला आहे. या जागांवर शिंदे यांची शिवसेना निवडणूक लढवू शकते कल्याण, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, पालघर, मावळ, रामटेक, कोल्हापूर, हातकणंगले, बुलढाणा, शिर्डी, हिंगोली, यवतमाळ-वाशीम. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला या जागा मिळतील बारामती, शिरूर, रायगड, परभणी (महादेव जाणणे). याशिवाय राज्यातील उर्वरित जागा भाजपच्या खात्यात जाऊ शकतात. ठाण्याला महत्त्व का?  सध्या ठाण्याचे विद्यमान खासदार राजन विचारे आहेत. ते उद्धव ठाकरेंच्या गटात आहेत. या लोकसभा मतदारसंघात भाजपचे 4 आणि शिवसेनेचे 2 आमदार आहेत. याशिवाय हा मतदारसंघ मुख्यमंत्री शिंदे यांचाही मतदारसंघ आहे. नाशिकमध्येही अडचणी? नाशिकच्या जागेवर तिन्ही पक्षांना निवडणूक लढवायची आहे. सध्या नाशिकमधून शिंदे गटाचे हेमंत गोडसे खासदार आहेत. मात्र, राष्ट्रवादीचे दिग्गज अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना नाशिकची जागा हवी आहे. याशिवाय ठाण्यात ताकद दाखवून हेमंत गोडसे यांनी आपले इरादे व्यक्त केले आहेत. रविवारी रात्री शिवसेनेचे नाशिकचे सर्व आमदार, अधिकारी आणि खुद्द खासदार गोडसे हे मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर जमले होते. नाशिक लोकसभा मतदारसंघात भाजपचे तीन आमदार आहेत. त्यामुळे ही जागा काबीज करण्यासाठी भाजप पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करत आहे. तर नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे 2 आणि काँग्रेसचा 1 आमदार आहे. त्यामुळे संख्याबळाचा विचार करता येथे शिवसेनेची ताकद कमी लेखली जात असल्याने राष्ट्रवादी आणि भाजपला ही जागा मिळवायची आहे.  तर मुख्यमंत्री शिंदे यांनी हेमंत गोडसे यांना नाशिकची जागा जाऊ देणार नाही, असे आश्वासन दिले आहे.

Lok Sabha Election 2024  : महायुतीत जागावाटपाचा तिढा सुटेना, ‘या’ 2 जागा भाजपसाठी ठरल्या डोकेदुखी ? Read More »

Uddhav Thackeray : मोठी बातमी! उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांना ईडीचा समन्स ; अनेक चर्चांना उधाण

Uddhav Thackeray : राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक मोठ मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे.  यातच आता उद्धव ठाकरे गटाला एक मोठा धक्का लागला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना नेते अनिल देसाई यांच्या निकटवर्तीयांना ईडीने समन्स बजावले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश बोभाटे यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी समन्स बजावण्यात आले आहे. सीबीआयने गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता.  सीबीआयने बेहिशोबी मालमत्तेबाबत गुन्हा दाखल केला होता. बोभटे यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी या आठवड्यात हजर राहून तपासात सहभागी होण्यास सांगितले आहे. एजन्सीच्या एका सूत्राने सोमवारी संध्याकाळी याची पुष्टी केली. बोभाटे यांच्याशिवाय त्यांच्या पत्नीच्या नावावरही सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयचे म्हणणे आहे की या जोडप्याने 2.58 कोटी रुपयांची संपत्ती जमा केली, जी त्यांच्या उत्पन्नाच्या उघड स्त्रोतांपेक्षा 36 टक्क्यांनी जास्त आहे. बोभटे यांनी यापूर्वी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीत वरिष्ठ सहाय्यक पदावर काम केले आहे. सीबीआय प्रकरणानुसार, बोभटे यांनी 2014 ते 2023 या कालावधीत विमा कंपनीत काम केले. या काळात त्यांनी निर्माण केलेली संपत्ती त्यांच्या घोषित उत्पन्नापेक्षा कितीतरी जास्त आहे.  बोभटे यांची संपत्ती मुदत ठेवी, म्युच्युअल फंड आणि जंगम आणि जंगम मालमत्तांच्या स्वरूपात आहे. या प्रकरणी दिनेश बोभाटे यांना समोरासमोर विचारणा केली असता ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत, असे एजन्सीचे म्हणणे आहे. आज उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकीसाठी सुमारे 15 उमेदवारांची यादी जाहीर करणार आहेत. त्याआधी ज्येष्ठ नेते अनिल देसाई यांच्या सहकाऱ्याला समन्स बजावल्याने चिंता वाढली आहे. बोभटे यांच्या बँक खात्यातही अनियमितता झाल्याचे सीबीआयच्या तपासात उघड झाले आहे.  सीबीआयच्या म्हणण्यानुसार, ‘आतापर्यंत मिळालेल्या पुराव्यांवरून प्रथमदर्शनी असे दिसते की दिनेश बोभटे यांनी कर्मचारी म्हणून आपल्या पदाचा गैरवापर केला आणि त्यातून संपत्ती कमावली. त्याची संपत्ती दाखवलेल्या उत्पन्नाच्या स्त्रोतांपेक्षा कितीतरी जास्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोभटे यांना अनेक मुदत ठेवी, म्युच्युअल फंड गुंतवणूक आणि निधी मिळाला होता. मित्र आणि मुलाकडून आर्थिक मदतीच्या नावावर त्यांनी ही रक्कम घेतली होती. यानंतर त्यांना बाहेर काढण्यात आले. याशिवाय त्यांच्या खात्यात अनेक प्रकारची रक्कम जमा करण्यात आली होती, ज्याबद्दल दाम्पत्य स्पष्टीकरण देऊ शकत नाही.  सीबीआयच्या तपासादरम्यान, ईडीने फेब्रुवारी 2024 मध्ये या प्रकरणी गुन्हाही नोंदवला होता. ईडी या प्रकरणाचा मनी लाँड्रिंगच्या कोनातून तपास करत आहे.

Uddhav Thackeray : मोठी बातमी! उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांना ईडीचा समन्स ; अनेक चर्चांना उधाण Read More »

Maharashtra News :  आज होणार निर्णय ? जागावाटपाबाबत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात महत्त्वाची बैठक

Maharashtra News : राज्याच्या राजकारणाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. आज शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्रीवर सायंकाळी 5 वाजता जागावाटपाबाबत महत्त्वाची बैठक होणार आहे.  मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीला संजय राऊत आणि जयंत पाटील उपस्थित राहणार आहेत. तर उद्या (26 मार्च) उद्धव गटाच्या 15 किंवा 16 उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. त्याआधी या बैठकीत ज्या जागांवर दोन गटात वाद आहे, त्यावर चर्चा होणार आहे.  तर दुसरीकडे 2014 आणि 2019 ची परिस्थिती आता राहिलेली नाही, असे स्पष्ट शब्दांत ठाकरे गटाला काँग्रेसकडून सांगण्यात आले. काँग्रेस पूर्वीपेक्षा मजबूत झाली आहे. अशा स्थितीत ठाकरे सेनेने जास्त जागांची अपेक्षा करू नये. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाकरे सेना अतिआत्मविश्वासात आहे. ठाकरे आणि पवार यांनी युतीकडे अधिक जागांची मागणी केली असली तरी बुलढाणा आणि वर्धासारख्या जागांसाठी त्यांच्याकडे उमेदवारही नाहीत. शिवसेनेची कट्टर हिंदू व्होट बँक (यूबीटी) त्यांच्याकडे जाईल की नाही, अशी काँग्रेसला चिंता आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका कधी होणार? लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करताना निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात निवडणुका होणार असल्याचे सांगितले होते. यामध्ये पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला 5 जागांवर, दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला 8 जागांवर, तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी 11 जागांवर, चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी 11 जागांवर आणि पाचव्या टप्प्यात 13 जागांवर मतदान होणार आहे. 20 मे रोजी टप्प्यात 13 जागांसाठी निवडणूक होणार आहे.

Maharashtra News :  आज होणार निर्णय ? जागावाटपाबाबत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात महत्त्वाची बैठक Read More »

BJP Raj Thackeray MNS Alliance : राज ठाकरे एकत्र आल्यास यूपी, बिहारमध्ये टेन्शन वाढणार? भाजपने उचलले ‘हे’ पाऊल

BJP Raj Thackeray MNS Alliance : राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजपमध्ये युती होणार असल्याची चर्चा होत आहे.  आगामी काळात राज्यातील राजकीय समीकरण पाहता भाजपला राज ठाकरेंची गरज असल्याने ही युती होणार असल्याची चर्चा आहे.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरे महायुतीमध्ये सामील होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. महायुतीतील भाजपचे मित्रपक्ष असलेल्या शिंदे आणि पवार यांनीही याला सहमती दर्शवली आहे.  गेल्या आठवड्यातच राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांमध्ये युतीबाबत चर्चा झाली. त्यांच्यात लोकसभा जागावाटप आणि युतीबाबत 40 मिनिटे चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. राज ठाकरेंनी दोन जागांची मागणी केली आहे. मात्र भाजप त्यांना मुंबईत जागा देण्याच्या विचारात आहे. मात्र, मनसे आणि भाजप एकत्र येण्याच्या मार्गात येणारा सर्वात मोठा अडथळा म्हणजे राज ठाकरे यांची ‘ट्रान्स-प्रांतीय’बाबतची कठोर भूमिका.  मनसेच्या स्थापनेनंतर राज ठाकरे यांनी मुंबई आणि महाराष्ट्रात अमराठी लोकांविरोधात प्रचार केला. ठाकरे यांनी महाराष्ट्रात विशेषतः उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये राहणाऱ्या लोकांविरोधात अनेकदा आक्रमक वक्तव्ये केली आहेत. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांविरोधात वारंवार आक्रमक भूमिका घेतल्याने उत्तर भारतीयांमध्ये संतापाची भावना आहे. राज ठाकरेंच्या महायुतीतील संभाव्य प्रवेशामुळे मुंबईतील भाजपचे उत्तर भारतीय कार्यकर्ते आणि अधिकारी खूश नाहीत. उत्तर भारतीय मजूर, छठपूजा आदींबाबत राज यांची भूमिका सर्वश्रुत आहे. त्यामुळे राज ठाकरे यांची उत्तर भारतीयांमध्ये नकारात्मक प्रतिमा आहे. राज यांना सोबत घेतल्यास उत्तर प्रदेश आणि बिहारवरही परिणाम होईल, असा मतप्रवाह भाजपमध्ये आहे. त्यामुळे आता मनसेच्या महायुतीमध्ये प्रवेशाची राष्ट्रीय पातळीवर चर्चा होणार नाही. कारण लोकसभा निवडणुकीत ‘चारशे पार’चा नारा देणाऱ्या हिंदी पट्ट्यातील भाजपच्या प्रतिमेवर याचा परिणाम होणार आहे. तिसऱ्यांदा पंतप्रधान मोदींच्या राज्याभिषेकात उत्तर भारतातील मतदारांची भूमिका महत्त्वाची असेल आणि त्यामुळे कोणताही धोका पत्करता येणार नाही, असा विश्वास भाजपला आहे. मनसेबाबतचा निर्णय राज्यस्तरावर घेतला जाईल, असा पवित्रा भाजपने घेतला आहे. महाराष्ट्रात उत्तर भारतीयांविरोधात आक्रमक भूमिका न घेण्याचा सल्ला भाजपने मनसेला दिला आहे. शिंदे सेनेचा विरोध? राज ठाकरे यांनी भाजपकडे लोकसभेच्या दोन जागांची मागणी केली आहे. यामध्ये दक्षिण मुंबई तसेच नाशिक किंवा शिर्डी येथील जागांचा समावेश आहे. मात्र, शिवसेनेने (शिंदे गट) त्याला विरोध केला. गेल्या निवडणुकीत दक्षिण मुंबई, नाशिक आणि शिर्डी या तिन्ही जागा शिवसेनेने (अविभक्त) जिंकल्या होत्या. तीनपैकी दोन खासदार एकनाथ शिंदे यांच्याकडे तर एक खासदार उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. शिंदे यांना पुन्हा या तीन जागांवर उमेदवार उभे करायचे आहेत.

BJP Raj Thackeray MNS Alliance : राज ठाकरे एकत्र आल्यास यूपी, बिहारमध्ये टेन्शन वाढणार? भाजपने उचलले ‘हे’ पाऊल Read More »

Ahmednagar News:  सुजय विखे पाटील यांचा विजय निश्चित: लोकनेत्या पंकजा मुंडे

Ahmednagar News:  लोकनेत्या पंकजा मुंडे अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार मोनिका राजळे आणि शिवाजीराव कर्डिले यांनी त्यांचे यथोचित स्वागत केले.  लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सध्या सर्वत्र सुरू झाली आहे. या अनुषंगाने आज पंकजा मुंडे अहिल्यादेवीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी भाजपा तथा महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील हेच नगर दक्षिण मधून पुन्हा एकदा बाजी मारतील असे भाष्य केले.  पंकजा मुंडे यांचे काल रात्रीच आगमन झाले असून त्यांनी बुऱ्हानगर येथील शिवाजीराव कर्डिले यांच्या निवासस्थानी मुक्काम केला आणि सकाळी दौऱ्यास सुरुवात केली. यादरम्यान त्यांनी पाथर्डी येथील रॅलीत सहभाग दर्शवून नागरिकांनी केलेल्या जंगी स्वागताचा स्वीकार केला.  यावेळी जेसीबीच्या साहाय्याने पुष्पवृष्टी करून नागरिकांनी आपले समर्थन भाजपाच्या या दोन्ही उमेदवारांना दर्शविले. यावेळी त्यांच्यासहित डॉ. सुजय विखे पाटील, मोनिका राजळे आणि शिवाजीराव कर्डिले यांचा क्रेनच्या सहाय्याने मोठा फुलांचा हार घालून स्वागत करण्यात आले. यांनतर त्यांनी पाथर्डी तालुक्यातील विविध गावांमध्ये देखील भेटी दिल्या. तेथेही त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.  यावेळी पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले की, डॉ. सुजय विखे पाटील यांनी मागील पाच वर्षाचा कालावधी हा विविध विकास कामांमध्ये व्यस्त राहूनच घालवला आहे. निश्चितच त्यांची ही विकासक वाट त्यांना पुन्हा एकदा संसदेत पाठवेल हा मला विश्वास आहे. मागील निवडणूकीच्या काळातही डॉ. सुजय विखेंच्या प्रचारार्थ मी नगर जिल्ह्यात आले होते. यंदाही आले आणि सुजय विखे यांना शुभेच्छा दिल्या. डॉ. सुजय दादांचा विजय निश्चित असून लोकांचे त्यांच्यावरील प्रेम हे अतिशय कौतुकास्पद आहे असे स्पष्ट करून यावेळी मी स्वतः महायुतीच्या माध्यमातून उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवत आहे. निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटिबद्ध राहू असे मत पंकजा मुंडे यांनी बोलताना व्यक्त केले. तसेच त्यांनी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि विविध मान्यवरांच्या समवेत श्री क्षेत्र मोहोटादेवी येथे देखील श्री जगदंबा मातेचे मनोभावे दर्शन घेतले. तसेच उपस्थित सर्वांशी संवाद साधला. याप्रसंगी भाजपाचे समस्त पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ahmednagar News:  सुजय विखे पाटील यांचा विजय निश्चित: लोकनेत्या पंकजा मुंडे Read More »