DNA मराठी

ताज्या बातम्या

Ahmednagar News: प्रश्न लागणार का मार्गी? ‘त्या’ प्रकरणात खा. सुजय विखेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट

Ahmednagar News: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिल्ली येथे भेट घेऊन कांदा निर्यात बंदी उठवण्यासंदर्भात आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मक चर्चा केली.  कांदा प्रश्नावर अमित शाह यांना राज्यातील शेतकऱ्यांसमोर येत असलेल्या अडचणी, कांदा खरेदी आणि योग्य भाव आदी विषयाची माहिती खा.विखे पाटील यांनी करून दिली असून शाह यांनीही याबाबत लवकरच कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय केंद्र सरकार घेईल असे आश्वासन दिले असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान याबाबत खासदार सुजय विखे पाटील यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, सध्या कांद्याचे भाव गडगडले असून शेतकऱ्यांच्या दृष्टीने आणि त्यांना कांदा पिकविण्यासाठी लागणाऱ्या एकूण खर्चाचा जर विचार केला तर सध्या कांद्याला बाजारपेठेत मिळणारा भाव हा कमी आहे.  नगर, नाशिक,पुणे या कांदा पट्यात कांदा पीक घेणारा शेतकरी वर्ग मोठा असून निर्यात बंदीचा मोठा आर्थिक फटका बसत असल्याची वस्तुस्थिती खा.विखेंनी शाह यांच्या समोर मांडली आणि हा मुद्दा गृहमंत्री अमित शाह यांच्या लक्षात आणून दिला. निर्यातबंदीचा परिणाम म्हणून कांदा खरेदी केंद्रावर येणाऱ्या कांद्याला पाहिजे तसा भाव मिळत नाही.  कांद्याला एकरी येणारा खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यावर शेतकरी वर्गातून केंद्र सरकार कडून मार्ग निघण्याची आशा आहे. कांद्याच्या प्रती क्विंटल मागे असलेले दर हे वाढले पाहिजे.  या अनुषंगाने केंद्र सरकारकडून सकारात्मक विचार व्हावा आणि या दृष्टिकोनातून निर्यातबंदी उठवणे किंवा नाफेड मार्फत कांदा खरेदी करण्याच्या दृष्टीकोनातून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा अशी विनंती केंद्रीय मंत्र्यांना खा.विखे पाटील यांनी शाह यांची भेट घेऊन केली आहे.  यावेळी खा.सुजय विखेंना आश्वस्त करताना अमित शाह यांनी केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या नेहमीच पाठीशी असून अनेक शेतकरी हिताच्या योजना हाती घेतलेल्या आहेत. सरकार शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही.  या दृष्टिकोनातून लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे असे आश्वासन गृहमंत्र्यांनी दिले असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

Ahmednagar News: प्रश्न लागणार का मार्गी? ‘त्या’ प्रकरणात खा. सुजय विखेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट Read More »

Ahmednagar News: निळवंडे उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय ऐतिहासिक – धनश्री विखे पाटील

Ahmednagar News:  उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या निळवंडे उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकरीता निश्चितच ऐतिहासिक आणि आनंदाचा क्षण असल्याचे  प्रतिपादन रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा धनश्री सुजय विखे पाटील यांनी केले. निळवंडे उजव्या कालव्यामुळे शेतकरी नक्कीच सुखावेल असा विश्वास व्यक्त करून  राज्यातील महायुती सरकारमुळे धरणाच्या दोन्ही कालव्याच्या कामाला गती मिळून पाणी सोडण्याच्या निर्णय शेतकऱ्यांच्या उज्वल भविष्यासाठी महत्वपूर्ण ठरणारा असल्याचे त्यांनी सांगितले. उत्तर नगर जिल्ह्यासह राहुरी तालुक्यासाठी वरदान असणारे निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्याचे तांभेरे,कानडगाव, निंभेरे, तुळापूर, तांदूळनेर,वडनेर,कनगर,चिंचविहरे ,गुहायेथे  जलपूजन रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा धनश्रीताई विखे पाटील व जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी राव कर्डीले यांच्या हस्ते करण्यात आले. धनश्री विखे यांनी सांगितले की जिल्ह्याच्या विकासासाठी महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि खा.डॉ सुजय विखे पाटील  सदैव प्रयत्नशील आहेत त्यांनी केलेल्या विकास कामामुळे जिल्ह्याचा विकास होत असल्याचे स्पष्ट करून, निळवंडे कालवा व्हावा ना. विखे पाटील यांचा पाठपुरवा महत्वपूर्ण ठरला असल्याचे सौ.विखे म्हणाल्या. यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष सुरेश बानकर, जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे,रवींद्र म्हसे, भिमराज हारदे, नानासाहेब गागरे,डॉ बापूसाहेब मुसमाडे, सरपंच निशा गागरे,उत्तम राव मुसमाडे,संदीप गीते,मारुती नालकर,सर्जेराव गाडगे, संदिप गाडगे ,आणा पाटील बलमे, बबनराव कोळसे,विजय बलमे, यांच्या सह सर्व व पदाधिकारी ,अधिकारी व ग्रामस्थ उपस्तीत होते.

Ahmednagar News: निळवंडे उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय ऐतिहासिक – धनश्री विखे पाटील Read More »

Ahmednagar News: मिळणार रोजगार! बेलवंडी 618 एकरमध्ये उभारली जाणार उद्योग नगरी

Ahmednagar News:  आज मुंबई येथे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षेखाली व उद्योगमंत्री उदय सांमत यांच्या प्रमुख उपस्थितीत अहमदनगर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाची बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्ह्यातील बेलवंडी ता. श्रीगोंदा येथील शेती महामंडळाच्या 618 एकर जमिनीवर एमआयडीसी उभारण्याला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. सदर एमआयडीसीच्या आराखड्यासंदर्भात पाहणी व सर्वेक्षण लवकरात लवकर पूर्ण करून त्या संबंधित सर्व कामे काल मर्यादेत करण्यात यावीत असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी अधिकारांना दिले. एमआयडीसी सुरू करण्यासंदर्भात मोजणीचा अहवाल मागविण्यात आला आहे. पुढील प्रकियेस गती देण्यात येणार असून, तात्काळ हे काम पुर्ण करण्यात येणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच, जिल्हाधिकारी यांनी आजच उद्योग विभागाकडे विनंती प्रस्ताव सादर करावा असेही त्यांनी यावेळी सांगितले. श्रीगोंदा तालूक्यातील बेलवंडी फार्म येथे शेती महामंडळाची मौजे पर्वतवाडी आणि महादेववाडी येथील 618 एकर जमीन उद्योग विभागला देण्याची तत्वत: मान्यता यावेळी देण्यात आली. या एमआयडीसी करिता खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांनी पाठपुरावा केला होता.  उद्योगनगरीसाठी जमीन दिल्याने खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी राज्याचे महसूल मंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील आणि उद्योगमंत्री श्री. उदय सांमत यांचे आभार व्यक्त केले.  खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले की बेलवंडी मध्ये रस्ते वाहतूक, पाणी तसेच रेल्वे वाहतुक सुविधा उपलब्ध तर आहेच शिवाय शिर्डी, पुणे आणि नाशिक एमआयडीसी केंद्र नजीक असल्याने येणाऱ्या काळात बेलवंडी उद्योजकांना मोठी पर्वणीच ठरणार आहे. या एमआयडीसी मुळे जिल्ह्यात उद्योगाला चालना मिळून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध  होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, श्रीरामपूर तालुका व राहता तालुक्यातील शेती महामंडळाकडे असलेल्या जमिनीच्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. खंडकरी शेतकऱ्यांना वाटप केलेल्या जमिनींचा भोगवटादार वर्ग / मधुन भोगवटादार वर्ग 1 करणे तसेच सार्वजनिक प्रयोजनार्थ शेती महामंडळाची जमीन वाटप करणे संदर्भातील कामांचा आढावा मंत्री विखे पाटील यांनी घेतला. सदर बैठकीत खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी मंत्री आमदार श्री.बबनराव पाचपुते, महसूल विभागाचे अप्पर सचिव श्री. राजगोपाल देवरा, अहमदनगरचे जिल्हाधिकारी श्री.सिद्धराम सालीमठ, शेती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. विश्वजित माने यांच्यासह महसूल आणि शेती महामंडळ पुणे यांचे अधिकारी उपस्थित होते.

Ahmednagar News: मिळणार रोजगार! बेलवंडी 618 एकरमध्ये उभारली जाणार उद्योग नगरी Read More »

Titanic Photo: टायटॅनिक जहाज 112 वर्षानंतरही समुद्रातून बाहेर का आलं नाही? ‘हे’ आहे कारण

Titanic Photo: 15 एप्रिल 1912 रोजी समुद्रात टायटॅनिक जहाज बुडाला होता. जेव्हा टायटॅनिक हे जहाज तयार करण्यात आला होता तेव्हा हा जहाज पाण्यात कधीच बुडू शकत नाही असा दावा करण्यात आला होता. पण टायटॅनिक पाण्यात शिरल्यानंतर काही वेळातच बुडाले. टायटॅनिकचे अवशेष शोधायला बरीच वर्षे लागली. तब्बल 73 वर्षांनंतर 1985 मध्ये टायटॅनिकचा अवशेष सापडला. 112 वर्षांनंतरही टायटॅनिकचा माल पाण्याबाहेर काढता आला नाही. चला तर मग जाणून घेऊया यामागचे कारण काय आहे. टायटॅनिक का बाहेर काढता आले नाही? टायटॅनिक बुडून इतकी वर्षे झाली तरी अजूनही समुद्राच्या खोल खोलवर आहे. तो अद्याप काढण्यात आलेला नाही. यामागील कारण म्हणजे टायटॅनिक इतके खोल बुडाले आहे की इतक्या खोलवर जाऊन त्याला परत आणणे आता शक्य नाही. इतकं जड जहाज बाहेर काढू शकणारी हायटेक पाणबुडी तयार करण्यात शास्त्रज्ञांनाही अद्याप यश आलेलं नाही. याचे आणखी एक कारण म्हणजे पाण्याचा दाब. पाण्याच्या दाबामुळे जहाजाचे वजन इतके वाढले आहे की ते बाहेर पडणे शक्य नाही आणि यामुळेच टायटॅनिकला आजतागायत पाण्यातून बाहेर काढता आलेले नाही.

Titanic Photo: टायटॅनिक जहाज 112 वर्षानंतरही समुद्रातून बाहेर का आलं नाही? ‘हे’ आहे कारण Read More »

Nashik IT Raid : मोठी बातमी! ‘या’ भागात आयटीचा छापा, 8 कोटींची रोकड, तीन कोटींचे सोने जप्त

Nashik IT Raid: एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार आयकर विभागाने मोठी कारवाई करत नाशिकमध्ये अनेक सरकारी कंत्राटदारांवर छापे टाकून त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जप्त केली आहे. माहितीनुसार गेल्या चार दिवसांपासून हा छापा सुरू आहे. सुमारे 200 अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक या छाप्यात सहभागी आहे. पैशांनी भरलेल्या पुठ्ठ्याचे बॉक्स सापडले आयकर विभागाला 850 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची बेहिशेबी मालमत्ता आणि व्यवहार झाल्याचा संशय आहे. कंत्राटदारांच्या आठहून अधिक ठिकाणी आयटीचे छापे टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या छाप्यात विविध ठिकाणांहून आठ कोटी रुपयांची रोकड, सोन्याचे दागिने आणि तीन कोटी रुपयांची सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली आहेत. आयकर विभागाच्या पथकाने नाशिकमध्ये एकाच वेळी डझनहून अधिक ठिकाणी छापे टाकले. शहरातील बड्या सरकारी कंत्राटदारांची निवासस्थाने, कार्यालये आणि इतर परिसरांची झडती घेण्यात आली. त्यांच्याशी संबंधित बँक खाती, संगणक आणि व्यवहार यांची चौकशी सुरू आहे.  छाप्यादरम्यान आयकर विभागाने तपासासाठी कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे, पेन ड्राइव्ह आणि हार्ड डिस्क जप्त केल्या आहेत. छाप्यात अनेक ‘धनकुबेर’ पकडले नाशिकमध्ये आयकर विभागाने सरकारी कंत्राटदारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. महापालिकेच्या 8 कंत्राटदारांवर गेल्या चार-पाच दिवसांपासून ही कारवाई सुरू आहे. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने ही कारवाई सुरू आहे. आयकर अधिकाऱ्यांना पाहिल्यानंतर काहींनी त्यांची रोकड त्यांच्या कारमध्ये आणि झुडपात लपवून ठेवली, तर काहींनी अधिकाऱ्यांपासून त्यांची बेहिशेबी संपत्ती लपवण्यासाठी छतावर आणि पंख्यांमध्ये व्यवहाराची कागदपत्रे आणि पेनड्राइव्ह लपवून ठेवल्या. काही कंत्राटदारांनी घराच्या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या मालमत्तेची माहिती असलेली पेन ड्राइव्ह आणि हार्डडिस्क लपवून ठेवली होती. त्यातील एकाने घरातील पंख्यामध्ये बेहिशेबी व्यवहारांची माहिती असलेला 2 जीबीचा पेन ड्राईव्ह लपवून ठेवला होता.  त्याचवेळी गाडीत रोकड ठेवून झुडपात लपवून ठेवली होती. आयकर विभागाची कारवाई अजूनही सुरूच आहे. येत्या काही दिवसांत मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

Nashik IT Raid : मोठी बातमी! ‘या’ भागात आयटीचा छापा, 8 कोटींची रोकड, तीन कोटींचे सोने जप्त Read More »

Asaduddin Owaisi : राज्यात ओवेसी करणार गेम! ‘इतक्या’ जागांवर लढवणार लोकसभा निवडणूक

Asaduddin Owaisi: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सध्या प्रत्येक राजकीय पक्षाने तयारी पूर्ण केली आहे. सर्व पक्ष आपल्या ताकदीनुसार लोकसभा निवडणुक लढवण्याची तयारी करताना दिसत आहे.  समोर आलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोग पुढील महिन्यात लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकतो. देशात सध्या ‘एनडीए’ आणि ‘इंडिया’ युतीमध्ये थेट लढत होणार असून राज्यात सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे.  राज्यातील 48 पैकी 45 जागांवर झेंडा फडकवण्यासाठी महायुतीने मेगा प्लान तयार केला आहे तर MVA ने देखील जवळपास जागा वाटपाचा फॉर्मुला तयार केला आहे.   तर दुसरीकडे आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM) देखील निवडणूक लढवणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार एआयएमआयएम राज्यातील पाच लोकसभा जागांवर निवडणूक लढवणार आहे.  भिवंडीत पत्रकारांशी बोलताना एआयएमआयएम महाराष्ट्र युनिटचे कार्याध्यक्ष डॉ अब्दुल गफार कादरी म्हणाले की, राज्यातील उत्तर मुंबई, धुळे, नांदेड, भिवंडी आणि छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) या जागांवर पक्ष आपले उमेदवार उभे करण्याचा विचार करत आहे. कादरी म्हणाले की, एआयएमआयएम निवडणुकीची प्रभावी रणनीती बनवण्यासाठी या जागांवर सर्वेक्षण करत आहे.   महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 25 जागा आणि अविभाजित शिवसेनेने 23 जागा लढवल्या. यामध्ये भाजपला 23 तर शिवसेनेला 18 जागांवर यश मिळाले. काँग्रेसला एक तर राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या. AIMIM चे एकमेव औरंगाबादचे उमेदवार इम्तियाज जलील सय्यद विजयी झाले होते.

Asaduddin Owaisi : राज्यात ओवेसी करणार गेम! ‘इतक्या’ जागांवर लढवणार लोकसभा निवडणूक Read More »

Surya Grahan 2024 :  वर्षातील पहिले सूर्यग्रहण 8 एप्रिलला, ‘या’ गोष्टी चुकूनही करू नका

Surya Grahan 2024 : 2024 मधील पहिले सूर्यग्रहण 08 एप्रिल 2024 दिसणार आहे. हे जाणून घ्या कि, हा सूर्यग्रहण संपूर्ण सूर्यग्रहण होणार आहे. सुतक कालावधी ग्रहणाच्या 12 तास आधी सुरू होतो. मात्र हे ग्रहण भारतात दिसणार नाही. तर मेक्सिको, कॅनडा आणि अमेरिकेच्या काही भागात हे ग्रहण पाहता येणार आहे. तुम्हाला हा अनोखा क्षण यूट्यूबवर लाईव्ह स्ट्रीमद्वारेही पाहता येणार आहे. खगोलशास्त्रज्ञांच्या मते, जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा त्याला सूर्यग्रहण म्हणतात.   सूर्यग्रहणाची वेळ सूर्यग्रहण 08 एप्रिल 2024 रोजी रात्री 9.12 पासून सुरू होईल आणि दुपारी 1.25 पर्यंत चालेल.  ग्रहण 8 एप्रिल आणि 9 एप्रिल या दोन्ही दिवशी होईल. 8 एप्रिल 2024 रोजी वर्षातील संपूर्ण सूर्यग्रहण मीन आणि रेवती नक्षत्रात चैत्र महिन्यात होणार आहे. पूर्ण सूर्यग्रहण 8 एप्रिल 2024 रोजी रात्री 9:12 वाजता सुरू होईल आणि 9 एप्रिल 2024 रोजी पहाटे 2:22 वाजता समाप्त होईल. 8 एप्रिल 2024 रोजी होणारे संपूर्ण सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. तसेच, त्या दिवशी भारतात सुतक नसेल, कारण देशात सूर्यग्रहण दिसणार नाही. ग्रहण काळात या गोष्टी करू नका हिंदू धर्मग्रंथानुसार सूर्यग्रहणाच्या काळात आपण कोणत्याही प्रकारचे अन्न सेवन करू नये. असे म्हटले जाते की सूर्यग्रहण दरम्यान काहीही खाल्ल्याने आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होतो. सूर्यग्रहण काळात फळे आणि भाज्या तोडणे टाळावे.  ग्रहणकाळात गरोदर महिलांनी घराबाहेर पडू नये, असा समज आहे.

Surya Grahan 2024 :  वर्षातील पहिले सूर्यग्रहण 8 एप्रिलला, ‘या’ गोष्टी चुकूनही करू नका Read More »

Ahmednagar News: स्थानिक गुन्हेची मोठी कारवाई, 2 गावठी कट्टे व 04 जिवंत काडतुसासह 2 आरोपींना अटक

Ahmednagar News:  अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत गावठी कट्टे बाळगणाऱ्या 02 आरोपींना 2 गावठी कट्टे व 04 जिवंत काडतुसासह जेरबंद केले आहे. अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आगामी लोकसभा निवडणुकीचे अनुषंगाने जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे बाळगणारे इसमांचा शोध घेवुन कारवाई करणेबाबत दिनेश आहेर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना आदेश दिले होते.  या आदेशानुसार दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदाराकडून 03 फेब्रुवारी रोजी विकास सुधाकर सरोदे आणि त्याचा साथीदारासह शेंडी बायपास या ठिकाणी ठकन उर्फ नितीन भाऊसाहेब आल्हाट व त्याचा साथीदारासह नागरदेवळे गावचे शिवारात कापुरवाडी गावाकडे जाणारे रोडवर गावठी कट्टे (अग्निशस्त्र) विकण्यासाठी येणार असल्याची महिती मिळाली.   पोनि/दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार यांचे दोन स्वंतत्र पथके नेमुन मिळालेल्या बातमीनुसार खात्री करुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले.   स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहमदनगर ते छ. संभाजीनगर रोडवरील शेंडी बायपास या ठिकाणी सापळा लावुन आरोपी विकास सुधाकर सरोदे, (वय – 23 वर्षे, रा. गुंजाळे ता. राहुरी, जिल्हा अहमदनगर) यास ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेता त्याचे अंगझडतीमध्ये 01 गावठी बनावटीचा कट्टा (अग्निशस्त्र) व 02 जिवंत काडतुस मिळुन आले. तर त्याचा साथीदार  लखन सुधाकर सरोदे (रा. गुंजाळे ता. राहुरी, जि. अहमदनगर) हा सदर ठिकाणावरुन पळुन गेला आहे.   दरम्यान मिळालेल्या बातमीतील ठिकाणी नागरदेवळे गावाचे शिवारात वारुळवाडी गावाकडे जाणारे रोडवरुन आरोपी  ठकन उर्फ नितीन भाऊसाहेब आल्हाट, (वय – 33 वर्षे, रा. मोरे चिंचोरा, ता. नेवासा, जिल्हा अहमदनगर) यास ताब्यात घेवुन त्याचे अंगझडतीमध्ये 01 गावठी बनावटीचा कट्टा (अग्निशस्त्र) व 02 जिवंत काडतुस मिळुन आले असुन त्याचा साथीदार भैया शेख (रा. कुकाणा, ता. नेवासा, जि. अहमदनगर )हा सदर ठिकाणावरुन पळुन गेला आहे.   दोन्ही ठिकाणावरुन आरोपी विकास सुधाकर सरोदे व ठकन उर्फ नितीन भाऊसाहेब आल्हाट यांचे कब्जामध्ये 02 गावठी बनावटीचे कट्टे (अग्निशस्त्रे) 04 जिवंत काडतुस असा एकुण 62,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने त्यांचेविरुध्द एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात आर्म ऍ़क्ट कायदा कलम 3/25, 7 प्रमाणे आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आर्म ऍ़क्ट कायदा कलम 3/25, 7 प्रमाणे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Ahmednagar News: स्थानिक गुन्हेची मोठी कारवाई, 2 गावठी कट्टे व 04 जिवंत काडतुसासह 2 आरोपींना अटक Read More »

New Rules : सावधान, पान-मसाला आणि तंबाखूबाबत नियम बदलले! ‘त्या’ प्रकरणात होणार 1 लाख रुपये दंड

New Rules  : देशात लागु करण्यात आलेल्या नवीन जीएसटीमुळे प्रत्येक कंपनीवर परिणाम झाला आहे.  तर आता पान मसाला, तंबाखू आणि गुटखा उत्पादनांबाबतच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो, आज जीएसटी कौन्सिलकडून  एक नवीन ॲडव्हायजरी जारी करण्यात आली आहे, ज्यामध्ये या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. 1 एप्रिलपासून कोणत्याही तंबाखू उत्पादन कंपनीने जीएसटी अधिकाऱ्यांकडे पॅकिंग मशिनरी नोंदणी केली नाही तर तिला 1 लाख रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल.   दुरुस्तीनंतर घेतलेला निर्णय सरकारच्या या पावलाचा उद्देश तंबाखू उत्पादन क्षेत्रातील महसुलाची गळती थांबवणे हा आहे. फायनान्स बिल, 2024 मध्ये केंद्रीय GST कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की तेथे नोंदणी न केलेल्या प्रत्येक मशीनवर 1 लाख रुपये दंड आकारला जाईल. नोंदणी प्रक्रिया सुरू झाली होती जीएसटी कौन्सिलच्या शिफारशीच्या आधारे, कर अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षी तंबाखू उत्पादकांकडून मशीनच्या नोंदणीसाठी विशेष प्रक्रिया सुरू केली.  सध्याची पॅकिंग मशीन, नवीन स्थापित मशीन तसेच या मशीन्सची पॅकिंग क्षमता यांचा तपशील फॉर्म GST SRM-I मध्ये द्यावा लागेल. मात्र, गेल्या वर्षी यासाठी कोणत्या प्रकारचा दंड आकारण्यात आला, याची माहिती देण्यात आली नव्हती. नोंदणी का केली जात आहे? महसूल सचिव संजय मल्होत्रा ​​यांनी सांगितले की, जीएसटी कौन्सिलने गेल्या बैठकीत निर्णय घेतला होता की पान मसाला, गुटखा आणि तत्सम उत्पादने बनवणाऱ्या मशीनची नोंदणी केली जावी जेणेकरून आम्ही त्यांच्या उत्पादन क्षमतेवर लक्ष ठेवू शकू. यासाठी काही दंड आकारण्यात यावा, असा निर्णय यावेळी परिषदेने घेतला आहे.  अशा परिस्थितीत नोंदणी न करणाऱ्यांना एक लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो.

New Rules : सावधान, पान-मसाला आणि तंबाखूबाबत नियम बदलले! ‘त्या’ प्रकरणात होणार 1 लाख रुपये दंड Read More »

Debit Card Insurance: बाबो, ATM कार्डवर मिळतो 3 कोटी रुपयांचा मोफत विमा; असा घ्या फायदा

Debit Card Insurance : अचानक झालेल्या अपघातामुळे कुटुंबाला कोणतेही आर्थिक अडचण येऊ नये याकरिता आज अनेकजण विमा पॉलिसी घेत आहे. विमा पॉलिसीमुळे आपल्याला आर्थिक सुरक्षा देतात.   पण तुम्हाला हे माहित आहे का की तुम्हाला करोडो रुपयांचे विमा कवच मोफत मिळते? नाही ना? आम्ही तुम्हाला सांगतो तुम्हाला सांगतो की तुम्हाला एटीएम कार्डद्वारे मोफत विमा दिला जातो. अशी काही डेबिट कार्डे आहेत ज्यात तुम्हाला 3 कोटी रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळते. तुम्हाला हे विमा कवच पूर्णपणे मोफत मिळते आणि यामध्ये डेबिट कार्ड धारकाला कोणताही प्रीमियम भरावा लागत नाही किंवा बँकांनी तुमच्याकडून इतर कोणतेही दस्तऐवज मागितले जात नाहीत. हे काम करावे लागेल पण डेबिट कार्डवर मोफत अपघात विमा मिळवण्यासाठी तुम्हाला काही अटी व शर्ती पूर्ण कराव्या लागतील. यातील सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे तुम्हाला तुमच्या डेबिट कार्डद्वारे ठराविक वेळेत काही व्यवहार करणे आवश्यक आहे. हा व्यवहार तुम्हाला डेबिट कार्डद्वारे ठराविक कालमर्यादेत करावा लागेल. वेगवेगळ्या बँकांचे वेगवेगळे निकष असतात विविध बँकांनी मोफत अपघाती विमा मिळविण्यासाठी वेगवेगळे निकष तयार केले आहेत. उदाहरणार्थ, एचडीएफसी बँक मिलेनिया क्रेडिट कार्ड देशांतर्गत प्रवासासाठी 5 लाख रुपये आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी 1 कोटी रुपयांचे मोफत विमा संरक्षण देते. तुम्हाला या कार्डवर विमा संरक्षण हवे असल्यास, तुम्हाला 30 दिवसांच्या आत किमान एक व्यवहार करावा लागेल. या डेबिट कार्डधारकांनी गेल्या 30 दिवसांत किमान 500 रुपयांचे किमान 2 व्यवहार पूर्ण करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, DCB बँक इन्फिनिटी डेबिट कार्ड धारकांना विमा संरक्षण सक्रिय करण्यासाठी 90 दिवसांत किमान एक व्यवहार करणे आवश्यक आहे. कोणता व्यवहार पात्र असेल DCB बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि ग्राहक बँकिंग गटाचे प्रमुख प्रशांत जोशी यांनी ETNow ला सांगितले की UPI व्यवहार साधारणपणे विमा संरक्षणासाठी पात्र नसतात. तथापि, पॉइंट ऑफ सेल (POS) व्यवहार किंवा ई-कॉमर्स ऑनलाइन व्यवहार विमा संरक्षणासाठी पात्र आहेत.

Debit Card Insurance: बाबो, ATM कार्डवर मिळतो 3 कोटी रुपयांचा मोफत विमा; असा घ्या फायदा Read More »