DNA मराठी

ताज्या बातम्या

Ambadas Danve : खरपुडी प्रकल्प व्यावसायिक, दलालांशी आर्थिक हितसंबंध जपण्यासाठ; विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आरोप

Ambadas Danve : जालना जिल्ह्यात खरपुडी येथे राबविण्यात येणाऱ्या नवीन प्रकल्पाला स्थानिक जनतेचा तीव्र विरोध असतानाही संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांचे काही व्यावसायिक व दलालांशी आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी हा प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न सुरु केला असल्याचा, गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. महाराष्ट्र शासनाने जालना जिल्ह्यात खरपुडी येथे नवीन प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात मागील काही वर्षांत विविध प्रशासकीय आणि आर्थिक टप्प्यांवर निर्णय घेतले गेले. तथापि, या प्रकल्पाच्या व्यवहार्यतेबाबत अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. सदर प्रकल्पाची संकल्पना 2018 साली सिडकोने मांडली होती. त्यानंतर प्रकल्पाची व्यवहार्यता तपासण्यासाठी Ernst & Young या आंतरराष्ट्रीय संस्थेची नियुक्ती करण्यात आली होती. त्या संस्थेने दिनांक 10 जानेवारी 2020 रोजी सादर केलेल्या अहवालात हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नाही, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे शासनाने दिनांक 9 जुलै 2020 रोजी हा प्रकल्प निरधिसूचित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सन 2022 आणि सन 2023 मध्ये सिडको व शासनाकडून या प्रकल्पाच्या पुनरावलोकनास सुरुवात झाली. सन 2023 मध्ये KPMG या संस्थेच्या नव्या अहवालाच्या आधारे सन 2024 मध्ये प्रकल्पास अंतिम मान्यता देण्यात आली. ही बाब लक्षात घेता एखादा प्रकल्प पूर्वी व्यवहार्य नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर काही वर्षांत तो अचानक व्यवहार्य कसा ठरतो ? असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला आहे. नवीन अहवाल आणि पूर्वीच्या अहवालातील तफावत काय आहे, हे शासनाने पारदर्शकपणे स्पष्ट करणे गरजेचे असताना त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. तसेच हा प्रकल्प सुरु होण्याच्या आधीच काही व्यवसायकांचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी आर्थिक हितसंबंध असल्यामुळे सदरहू प्रकल्पाचा आराखडा त्यांना उपलब्ध करुन दिला. त्यामुळे त्या व्यावसायिकांनी या प्रकल्पासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनी स्थानिकांकडून कमी दराने विकत घेतलेल्या आहेत. त्याच जमिनींना आता मोठ्याप्रमाणात दर मिळत आहेत. परिणामी, दलाल आणि मोठ्या हितसंबंधी गटांना आर्थिक फायदा होणार आहे, त्यामुळे मूळ भूधारक आणि शेतकरी वर्ग आर्थिक लाभापासून वंचित राहणार आहेत. ज्या पद्धतीने हा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे, ती प्रक्रियाही संशयास्पद असल्याचे दानवे यांनी म्हटले. आधीच अव्यवहार्य ठरलेल्या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर सरकारी निधी खर्च करणे योग्य नाही. त्यामुळे सदर निधी अन्य पायाभूत सुविधांसाठी वापरणे अधिक हिताचे ठरेल. सदर प्रकल्प राबविण्यासाठी अवलंबिण्यात आलेल्या प्रक्रियेची उच्च स्तरीय समिती कडून चौकशी करुन अपारदर्शक प्रक्रिया टाळण्यासाठी सदरहू प्रकल्प तात्काळ रद्द करावा. हा प्रकल्प राबविण्यासाठी शासनाची दिशाभूल करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना तात्काळ निलंबित करण्याबाबत निर्देश द्यावेत, अशी मागणी लेखी पत्राद्‍वारे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

Ambadas Danve : खरपुडी प्रकल्प व्यावसायिक, दलालांशी आर्थिक हितसंबंध जपण्यासाठ; विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आरोप Read More »

Pratap Sarnaik : व्यापार आणि प्रवासी दळणवळण यांचा सुंदर मिलाफ म्हणजे गुजरात बसपोर्ट; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Pratap Sarnaik : बसस्थानक हे त्या शहराचे मध्यवर्ती ठिकाण असते. किंबहुना, ते अशा मोक्याच्या ठिकाणी असते की जिथे व्यापार- उदीम विकसित होत असतो, हे ओळखून गुजरात राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बसस्थानक परिसरामध्ये व्यावसायिक वापरासाठी ” व्यापारी संकुल ” आणि त्यामधून येणाऱ्या महसूलाद्वारे प्रवाशांसाठी अत्याधुनिक सोयी – सुविधा युक्त असलेले ” बसपोर्ट ” निर्माण करून एक प्रकारे व्यापार आणि प्रवासी दळणवळणचा सुंदर मिलाफ असल्याचे मत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले. ते गुजरात राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसपोर्ट प्रकल्पाची माहिती घेताना बोलत होते. त्यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे प्रभारी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार, नितीन मैद (महाव्यवस्थापक वाहतूक) व नंदकुमार कोलारकर (महाव्यवस्थापक यंत्र ) दिनेश महाजन (महाव्यवस्थापक बांधकाम) हे अधिकारी देखील दौऱ्यात सहभागी होत आहेत. या दौऱ्याच्या दरम्यान गुजरात राज्याचे परिवहन मंत्री हर्ष संघवी यांच्यासोबत देखील मंत्री सरनाईक यांची बैठक झाली . या बैठकीत दोन्ही राज्यांच्या परिवहन सेवेसंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी गुजरात राज्य मार्ग परिवहन महामंडळचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एम. नागार्जन यांनी शिष्टमंडळाला त्यांच्या परिवहन सेवेची माहिती दिली. त्यामध्ये गुजरात परिवहन महामंडळ मार्फत चालवण्यात येणारी एकात्मिक नियंत्रण प्रणाली अत्यंत चांगली असुन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये देखील अशा प्रकारची सुविधा असणे गरजेचे आहे. असे मत मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केले. यावेळी गुजरात मधील अहमदाबाद व वडोदरा येथील बसपोर्टची पाहणी मंत्री सरनाईक व त्यांच्या शिष्ठमंडाळाने केली. यावेळी बसस्थानकावरील वेगवेगळ्या सोयी-सुविधा कशाप्रकारे प्रवाशांना दिल्या जातात, याबद्दलची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळात दिली. विशेष करून तेथील प्रशासनाने बसस्थानकावर थोडेशा विश्रांतीसाठी थांबणाऱ्या प्रवाशांना ” प्रवासी विश्रांतीगृह ” कमी किंमतीमध्ये बस स्थानकावर उपलब्ध करून दिले आहेत, त्याचे कौतुक मंत्री सरनाईक यांनी केले .तसेच गुजरात परिवहन महामंडळाच्या अत्याधुनिक बसेसची पाहणी देखील त्यांनी यावेळी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करताना सांगितले होते की, इतर राज्यात ज्या चांगल्या गोष्टी घडत आहेत, त्यांना भेट देऊन त्या आपल्या राज्यात कशा अमलात आणता येतील याचा अभ्यास करावा, जेणेकरून विविध ठिकाणच्या नाविन्यपूर्ण योजना आपल्या राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध होतील. याचाच एक भाग म्हणून गुजरात राज्य मार्ग परिवहन सेवेमार्फत चालवल्या जाणाऱ्या बसपोर्ट प्रकल्पाची माहिती घेणे, तसेच त्यांच्या प्रादेशिक परिवहन व्यवस्थापनाचा अभ्यास करणे, त्याबरोबर त्यांनी कर्मचाऱ्यांसाठी राबवत असलेल्या प्रोत्साहन योजना जाणून घेण्यासाठी या दौऱ्याची आखणी केली होती. इतर राज्यातील परिवहन सेवांचा अभ्यास करून त्यांच्या चांगल्या कल्पना आपल्या एसटी महामंडळामध्ये राबवणे शक्य आहे का? याची देखील चाचपणी या दौऱ्याच्या निमित्ताने केली आहे.

Pratap Sarnaik : व्यापार आणि प्रवासी दळणवळण यांचा सुंदर मिलाफ म्हणजे गुजरात बसपोर्ट; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक Read More »

Delta Plane Crash : कॅनडामध्ये विमान अपघात, 80 प्रवाशांसह विमान लँडिंग दरम्यान उलटले

Delta Plane Crash : कॅनडामध्ये मंगळवारी सकाळी एक मोठा विमान अपघात झाला. माहितीनुसार, टोरंटो विमानतळावर डेल्टा विमान कोसळले आणि पलटी झाले. 19 जणांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. हे विमान अमेरिकेतील मिनियापोलिसहून टोरंटोला जात होते. विमानामध्ये 80 लोक होते. यूएस सननुसार, 19 जणांवर जखमींवर उपचार करण्यात आले, त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. तो ट्रॉमा सेंटरमध्ये आहे. आपत्कालीन पथके त्यांचे काम करत आहेत. सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्सचा शोध घेण्यात आला आहे. अपघातानंतर एका मुलाला बाल रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेत कोणीही मृत्युमुखी पडलेले नाही. सध्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका भयानक व्हिडिओमध्ये, विमान बर्फाळ धावपट्टीवर पूर्णपणे उलटे पडलेले दिसत आहे. या भयानक दृश्यानंतर, विमानात धुराचे लोट पसरले. जॉन नेल्सन नावाच्या एका प्रवाशाने फेसबुकवर या भयानक दृश्याचा व्हिडिओ शेअर केला. आम्ही नुकतेच उतरलो, असे त्यांनी विमान उलटे दाखवणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगितले. आमचे विमान कोसळले, ते उलटे आहे. अग्निशमन विभाग घटनास्थळी आहे. बहुतेक लोक ठीक वाटतात. आपण सर्वजण खाली उतरत आहोत, धूर निघत आहे. विमानात 76 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते असं त्याने सांगितले.

Delta Plane Crash : कॅनडामध्ये विमान अपघात, 80 प्रवाशांसह विमान लँडिंग दरम्यान उलटले Read More »

Gyanesh Kumar : मोठी बातमी, ज्ञानेश कुमार होणार नवे मुख्य निवडणूक आयुक्त, ‘या’ दिवशी पदभार स्वीकारणार

Gyanesh Kumar : देशाचे पुढील मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) म्हणून निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते राजीव कुमार यांची जागा घेणार आहे. मात्र त्यांच्या नियुक्तीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी असहमती व्यक्त केली आहे आणि यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीचा हवाला दिला आहे. त्याचबरोबर या निर्णयानंतर विरोधकांनी सरकारवर घाईघाईने निर्णय घेतल्याचा आरोप केला आहे. ते 19 फेब्रुवारीपासून पदभार स्वीकारणार आहे. सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ज्ञानेश कुमार यांचा कार्यकाळ 26 जानेवारी 2029 पर्यंत असेल. त्यांच्या जागी डॉ. विवेक जोशी यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत निवड समितीच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. ज्ञानेश कुमार कोण आहेत?ज्ञानेश कुमार हे केरळ कॅडरचे 1988 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या वर्षी मार्चमध्ये त्यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती झाली. याआधी त्यांनी गृह मंत्रालयात सचिव म्हणूनही काम केले आहे. त्यांची गणना एक अनुभवी आणि कार्यक्षम प्रशासकीय अधिकारी म्हणून केली जाते. राहुल गांधींनी व्यक्त केली असहमतीराहुल गांधी यांनी या नियुक्तीबाबत असहमती व्यक्त करत सरकारवर घाईघाईने निर्णय घेतल्याचा आरोप केला. सर्वोच्च न्यायालय 19 फेब्रुवारी रोजी या प्रकरणाची सुनावणी करणार आहे, त्यामुळे सरकारने ही बैठक पुढे ढकलायला हवी होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहण्याची गरज पडू नये म्हणून सरकारने जाणीवपूर्वक ही प्रक्रिया लवकर पूर्ण केली असे काँग्रेसचे म्हणणे आहे. काँग्रेस नेते अजय माकन, अभिषेक मनु सिंघवी आणि गुरदीप सप्पल यांनी सांगितले की, मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त (नियुक्ती, सेवाशर्ती आणि कार्यकाळ) कायदा, 2023 ला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन?काँग्रेसचा आरोप आहे की सर्वोच्च न्यायालयाने 2 मार्च 2023 रोजी दिलेल्या आदेशात म्हटले होते की मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठी पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीश यांचा समावेश असलेली समिती असावी. परंतु, नवीन कायद्यात सरन्यायाधीशांना या प्रक्रियेतून वगळण्यात आले, ज्यामुळे सरकारला बहुमत मिळाले. अभिषेक मनु सिंघवी म्हणाले, “जर नियुक्तीची प्रक्रिया केवळ कार्यकारी मंडळ (सरकार) द्वारे असेल, तर त्यामुळे आयोग पक्षपाती होईल आणि निवडणूक व्यवस्थेच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होईल.” निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य धोक्यात ?विरोधकांचा दावा आहे की सरकारने असा निवडणूक आयुक्त नियुक्त केला आहे जो कधीही सरकारच्या विरोधात जाणार नाही. ते म्हणतात की जर ही निवड प्रक्रिया अशीच सुरू राहिली तर त्याचा निवडणूक आयोगाच्या स्वातंत्र्यावर आणि निष्पक्षतेवर दीर्घकालीन परिणाम होईल.

Gyanesh Kumar : मोठी बातमी, ज्ञानेश कुमार होणार नवे मुख्य निवडणूक आयुक्त, ‘या’ दिवशी पदभार स्वीकारणार Read More »

IPL 2025 चे वेळापत्रक जाहीर, ‘या’ दिवशी होणार सुरुवात

IPL 2025 : बीसीसीआयने IPL 2025 चे वेळापत्रक जाहीर केले. 22 मार्चपासून या स्पर्धेची सुरुवात होणार आहे. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात आयपीएल 2024 विजेत्या कोलकाता नाईट रायडर्सचा संघ त्यांच्या घरच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध खेळणार आहे. यावेळी हंगामात एकूण 74 सामने खेळवले जातील, जे देशातील 13 वेगवेगळ्या शहरांमध्ये होणार आहेत. यावेळी 12 डबल हेडर सामने आयोजित केले जातील. स्पर्धेचा अंतिम सामना 25 मे 2025 रोजी होईल. कोलकाताने शेवटच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद (SRH) ला हरवून विजेतेपद जिंकले होते. यावेळी संघ 23 मार्च रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. तर 5 वेळा विजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) 23 मार्च रोजी दिवसाच्या दुसऱ्या सामन्यात एकमेकांविरुद्ध खेळतील. नेहमीप्रमाणे, लीगचे संध्याकाळचे सामने संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होतील, तर डबल-हेडरच्या दिवशी, दिवसाचा पहिला सामना दुपारी 3. 30 वाजता सुरू होईल. स्पर्धेत 70 लीग सामन्यांनंतर एक दिवस विश्रांती असेल आणि त्यानंतर प्लेऑफमध्ये पोहोचलेले 4 संघ क्वालिफायर 1, एलिमिनेटर आणि क्वालिफायर 2 सामने खेळतील आणि दोन संघ अंतिम फेरीत पोहोचतील. 22 मार्च ते 25 मे दरम्यान फक्त 3 दिवस असे असतील जेव्हा स्पर्धेचा कोणताही सामना खेळवला जाणार नाही. तीन दिवसांच्या लीग टप्प्यानंतरचा हा दिवस आहे. त्यानंतर एलिमिनेटर नंतर, क्वालिफायर 2 च्या आधीचा दिवस आणि शेवटी अंतिम सामन्याच्या आधीचा दिवस असा असेल जेव्हा खेळ होणार नाही. https://twitter.com/IPL/status/1891108307756015779?t=sP7AKzjjV1gsvJY0NoZV8A&s=19 लीगच्या इतिहासात 10 वर्षांनंतर पहिल्यांदाच लीगचा अंतिम सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्स मैदानावर होणार आहे. येथे शेवटचा अंतिम सामना 2015 मध्ये खेळला गेला होता, जेव्हा मुंबईने चेन्नईचा पराभव करून दुसऱ्यांदा विजेतेपद जिंकले होते.

IPL 2025 चे वेळापत्रक जाहीर, ‘या’ दिवशी होणार सुरुवात Read More »

Delhi NCR Earthquake: राजधानी दिल्ली हादरली, भूकंपाच्या जोरदार धक्क्यांमुळे लोकांमध्ये घबराट

Delhi NCR Earthquake: सोमवारी सकाळी दिल्लीत भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले, ज्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली. भूकंप इतका तीव्र होता की अनेक लोक भूकंपाच्या धक्क्याने जागे झाले. काही सेकंद पृथ्वी हादरत राहिली. लोक घाबरून घराबाहेर पडले. 4.0 रिश्टर स्केलच्या भूकंपाने दिल्ली-एनसीआर हादरले भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.0 इतकी होती आणि त्याचे केंद्र दिल्लीजवळ होते, त्यामुळे भूकंपाचे धक्के अधिक तीव्रतेने जाणवले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, भूकंपांसोबतच एक विचित्र आवाजही ऐकू आला, जणू काही काहीतरी तुटत आहे, ज्यामुळे त्यांच्यातील भीती आणखी वाढली. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या म्हणण्यानुसार, सोमवारी पहाटे 5.36 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.0 होती आणि त्याचा केंद्रबिंदू पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली 5 किलोमीटर खोलीवर होता. आतापर्यंत कोणतेही मोठे नुकसान झालेले नसले तरी, भूकंपामुळे लोक घाबरले आहेत. दिल्ली, नोएडा, गुडगाव, गाझियाबाद, फरीदाबाद येथे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.

Delhi NCR Earthquake: राजधानी दिल्ली हादरली, भूकंपाच्या जोरदार धक्क्यांमुळे लोकांमध्ये घबराट Read More »

Pradeep Kurulkar : डीआरडीओचे माजी संचालक प्रदीप कुरुलकर अडकले हनीट्रॅपमध्ये, पाकिस्तानला देत होते गोपनीय माहिती

Pradeep Kurulkar : डीआरडीओचे माजी संचालक प्रदीप कुरुलकर यांना हनीट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला माहिती देण्याचा आरोपात अटक करण्यात आली होती. तर आता या प्रकरणात एटीएसने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. एटीएसच्या तपासात प्रदीप कुरुलकर पाकिस्तानला माहिती देत होते हे उघड झाले आहे. त्यांच्या विरोधात एटीएसने न्यायालयात 2 हजार पानी आरोपपत्र दाखल केले आहे. काय आहे प्रकरण?डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्यावर पाकिस्तानी गुप्तहेर महिलेला देशाच्या सुरक्षेशी संबंधित संवेदनशील माहिती पुरवल्याचा आरोप आहे. ‘झारा दासगुप्ता’ नावाच्या पाकिस्तानी महिलेसोबत त्यांची सोशल मीडियावर ओळख झाली होती. दोघांमध्ये जवळीक वाढली आणि झाराने कुरुलकर यांना आपल्या जाळ्यात ओढले. कुरुलकर यांनी झाराला डीआरडीओमधील काही महत्त्वाची कागदपत्रे आणि गोपनीय माहिती पुरवल्याचा आरोप आहे. एटीएसच्या तपासात काय समोर आले?एटीएसच्या तपासात धक्कादायक खुलासे झाले आहेत.कुरुलकर आणि झारा यांच्यातील संवादामध्ये अनेक संवेदनशील गोष्टी उघड झाल्या आहेत. झाराने कुरुलकर यांना हनीट्रॅपमध्ये फसवून त्यांच्याकडून गोपनीय माहिती मिळवली, असा एटीएसचा दावा आहे. एटीएसने या प्रकरणी विशेष न्यायाधीश व्ही. आर. कछरे यांच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. यात कुरुलकर यांच्यावर शासकीय रहस्य कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी लवकरच सुरू होईल, असे म्हटले आहे. कुरुलकर यांनी उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. तसेच, विशेष न्यायालयात आरोपमुक्त करण्याची मागणी केली आहे. त्यांनी शेअर केलेली माहिती सार्वजनिक डोमेनमध्ये होती, असा युक्तिवाद त्यांचे वकील हृषिकेश गानू यांनी केला आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 28 फेब्रुवारीला होणार आहे. तोपर्यंत, कुरुलकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Pradeep Kurulkar : डीआरडीओचे माजी संचालक प्रदीप कुरुलकर अडकले हनीट्रॅपमध्ये, पाकिस्तानला देत होते गोपनीय माहिती Read More »

Love Jihad Law : लव्ह जिहाद कायदा, राज्य सरकारचे अभिनंदन; माजी खासदार सुजय विखे

Love Jihad Law : महाराष्ट्र राज्यात लव्ह जिहादच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने लव्ह जिहाद, फसवणूक आणि बळाचा वापर करून केलेले धर्मांतरण रोखण्यासाठी कायदा आणण्याचा निर्णय घेतला आहे. या कायद्याच्या मसूद्यासाठी पोलिस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती गठीत करण्यात आली आहे. समितीची रचना आणि कार्यया समितीमध्ये महिला व बालकल्याण विभागाचे सचिव, अल्पसंख्यांक विकास विभागाचे सचिव, विधी व न्याय विभागाचे सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव, गृहविभागाचे सचिव तसेच गृह विभागाचे (विधी) सचिव हे सदस्य असतील. ही समिती राज्यातील सध्याच्या परिस्थितीचा अभ्यास करून लव्ह जिहाद, फसवणूक आणि बळाचा वापर करून केलेले धर्मांतरण यावर उपाययोजना सुचवून कायद्याचा मसूदा तयार करणार आहे. राजकीय प्रतिक्रियाभाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी अहिल्यानगर मध्ये बोलताना या कायद्याचे स्वागत केले. ते म्हणाले, “राज्यामध्ये लव्ह जिहाद च्या विरोधामध्ये सक्षम कायदा आणला जात आहे, राज्य सरकारचा हा पाऊल स्वागत आहे. मात्र, पूर्णपणे ड्राफ्ट तयार झाल्यावर आणि त्यामध्ये काय आहे हे पाहिल्यावरच मी त्यावर प्रतिक्रिया देईल. आता तरी हा कायदा येत असल्यामुळे मी सरकारचा अभिनंदन करतो आणि स्वागतही करतो.” इतर राज्यांचा अनुभवदेशात आतापर्यंत उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, गुजरात, झारखंड, मध्यप्रदेश, उत्तराखंड, ओडिसा आणि छत्तीसगड या नऊ राज्यांनी लव्ह जिहादविरोधी कायदा आणला आहे. जर महाराष्ट्रात हे कायदा लागू झाला तरमहाराष्ट्र हे दहावे राज्य असेल ज्या राज्यात असा कायदा असेल. विविध संघटनांची मागणीराज्यातील विविध हिंदू संघटनांनी आणि भाजपाचे नेते नितेश राणे यांनीही लव्ह जिहादविरोधी कायदा आणण्याची मागणी केली होती. या मागणीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. भविष्यातील दृष्टिकोनहा कायदा राज्यातील धर्मांतरणाच्या घटनांना आळा घालण्यात मदत करेल, असे आश्वासन राज्य सरकार तर्फे दिले जात आहे. समितीने कायद्याचा मसूदा तयार करण्यासाठी इतर राज्यातील कायद्याचा अभ्यास करण्यात येणार आहे, ज्यामुळे या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यास मदत होईल.

Love Jihad Law : लव्ह जिहाद कायदा, राज्य सरकारचे अभिनंदन; माजी खासदार सुजय विखे Read More »

MahaKumbh 2025 : महाकुंभाला जाणाऱ्या बोलेरोची बसशी धडक, 10 भाविकांचा मृत्यू

MahaKumbh 2025 : महाकुंभाला जाणाऱ्या भाविकांना घेऊन जाणारी बोलेरो कार एका बसला धडकली असल्याची माहिती समोर आली आहे. प्रयागराज येथे झालेल्या या अपघातात 10 भाविकांचा मृत्यू झाला आहे. माहितीनुसार, शुक्रवारी रात्री 2 वाजताच्या सुमारास प्रयागराज-मिर्झापूर महामार्गावर हा अपघात झाला. बोलेरो कार छत्तीसगडहून प्रयागराज येथे महाकुंभाला जात होती, तर बस महाकुंभावरून वाराणसीला परतत होती. टक्कर झाल्यानंतर घटनास्थळी गोंधळ उडाला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना रुग्णालयात पाठवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोलेरोमध्ये प्रवास करणारे सर्व 10 जण अपघाताचे बळी ठरले. त्याच वेळी, बसमधील 19 जण जखमी झाले आहेत. दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर टक्कर झाली. अपघात इतका भीषण होता की बोलेरोचे तुकडे झाले. गाडीतून मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना खूप मेहनत घ्यावी लागली. अपघाताची संपूर्ण माहितीछत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यातील भाविक संगमात स्नान करण्यासाठी बोलेरो गाडीने प्रयागराजला जात होते. रात्री 2 वाजताच्या सुमारास, जेव्हा त्यांची कार प्रयागराज-मिर्झापूर महामार्गावरील मेजा पोलिस स्टेशन परिसरातील मनु के पुरा गावाजवळ पोहोचली, तेव्हा समोरून येणाऱ्या बसशी तिची टक्कर झाली. ही टक्कर इतकी जोरदार होती की त्याचा आवाज दूरपर्यंत ऐकू आला. बोलेरो गाडीचे मोठे नुकसान झाले आणि घटनास्थळी गोंधळ उडाला. बस महाकुंभावरून वाराणसीला जात होतीअपघातानंतर पोलिसांना माहिती मिळाली आणि ते घटनास्थळी पोहोचले. बोलेरो गाडी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आणि लोक तिच्या आत अडकले. जखमींना बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी जेसीबी बोलावला, पण बोलेरोमधील सर्व 10 जणांचा मृत्यू झाला होता. बसमधील 19 जण जखमी झाले, ज्यांना उपचारासाठी रामनगर येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले. ही बस मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील भाविकांना घेऊन महाकुंभहून वाराणसीला जात होती. पोलीस अपघाताचा तपास करत आहेत.

MahaKumbh 2025 : महाकुंभाला जाणाऱ्या बोलेरोची बसशी धडक, 10 भाविकांचा मृत्यू Read More »

HSC Exam: कॉपीला प्रोत्साहन देणाऱ्यांवर होणार कारवाई ; जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ ॲक्शन मोडमध्ये

HSC Exam: जिल्ह्यात इयत्ता बारावीची परीक्षा शांततेत, सुरळीत व कॉपीमुक्त, भयमुक्त व निकोप वातावरणात व्हाव्यात यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या संकल्पनेतील ‘आनंददायी परीक्षा पॅटर्न’ अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात वॉररूम स्थापन करण्यात आली आहे. या वॉररुमच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: सुमारे एक हजारपेक्षा अधिक केंद्रांची पाहणी करत पर्यवेक्षणाबाबत विविध सूचना केल्या. नियमांचे पालन न करणाऱ्या शाळांवर कारवाईचे प्रस्ताव तयार करण्याबरोबरच परीक्षा केंद्राबाहेर गोंधळ करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले. संवेदनशील केंद्रांसह सर्वच केंद्रांच्या विविध ब्लॉक मधील थेट दृश्याद्वारे जिल्हाधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्रातील व्यवस्थेचा आढावा घेतला. इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे वॉररूमच्या माध्यमातून मॉनिटरिंग करण्यात येत आहे. जिल्ह्यातील १४ तालुके व अहिल्यानगर शहरातील १०९ पेक्षा अधिक परीक्षा केंद्रांच्या माध्यमातून सुमारे एक हजारपेक्षा अधिक ब्लॉकवर गुगलमीट, ड्रोन कॅमेरा, सीसीटीव्ही व केंद्र संचालकांना दूरध्वनीद्वारे तातडीने संपर्क साधला जात आहे. यामुळे कॉपीमुक्तीसाठी मोठ्या प्रमाणात यश लाभत आहे. जिल्हास्तरीय दक्षता समितीच्या माध्यमातून आनंददायी परीक्षा पॅटर्नअंतर्गत कॉपी मुक्तीसाठी अत्यंत जागरुकतेने काम करण्यात येत आहे. शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, बाळासाहेब बुगे, पोलिस निरीक्षक खेडकर, आकाश दरेकर, सुरेश ढवळे,श्रीराम थोरात,लहू गिरी,जितिन ओहोळ,भावेश परमार आदी समिती सदस्य तसेच तांत्रिक सहायक डॉ.अमोल बागूल जिल्ह्यातील विविध केंद्रांवरील हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.

HSC Exam: कॉपीला प्रोत्साहन देणाऱ्यांवर होणार कारवाई ; जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ ॲक्शन मोडमध्ये Read More »