DNA मराठी

शेती

Onions Price In Maharashtra : कांद्याच्या भावात मोठी घसरण: शेतकऱ्यांची चिंता वाढली

Onions Price In Maharashtra : लोकसभा निवडणुकीनंतर वाढलेले कांद्याचे दर विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा मोठ्या प्रमाणात घसरत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे भाव फक्त १० दिवसांत ३६ रुपये प्रति किलोवरून १७ रुपये २५ पैशांवर आले आहेत. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. काय आहे कारण?निर्यात शुल्क: केंद्र सरकारने कांद्यावर लावलेले २०% निर्यात शुल्क हे या भावात मोठी घसरणीचे प्रमुख कारण आहे. यामुळे कांद्याची निर्यात कमी झाली आहे आणि देशांतर्गत बाजारात आवक वाढल्याने भाव कोसळले आहेत. निवडणुका: लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या काळात राजकीय कारणांसाठी कांद्याचे भाव वाढवण्यात आले होते. मात्र, निवडणुका संपल्यानंतर हे कृत्रिम वाढीव भाव टिकू शकले नाहीत. शेतकऱ्यांची स्थिती:नुकसान: शेतकऱ्यांना कांदा पिकवण्यासाठी खूप खर्च येतो. मात्र, सध्या मिळत असलेले भाव या खर्चाच्याही खाली आहेत. यामुळे शेतकरी मोठे आर्थिक नुकसान सोसत आहेत. चिंता: भाव कमी झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. त्यांना पुढील पिकासाठी कर्ज काढण्याची वेळ येऊ शकते. सरकारकडे मागणी: शेतकरी सरकारकडे या परिस्थितीवर उपाययोजना करण्याची मागणी करत आहेत. सरकार काय करू शकते?निर्यात शुल्क हटवा: सरकारने कांद्यावर लावलेले निर्यात शुल्क हटवले तर कांद्याची निर्यात वाढेल आणि देशांतर्गत बाजारात भाव स्थिर राहू शकतात. खरेदी: सरकारने शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करून त्यांना आधार देऊ शकते. प्रोत्साहन: सरकारने कांद्याच्या नवीन उत्पादनांना प्रोत्साहन देऊन बाजारपेठेतील विविधता वाढवू शकते.काय करावे? एकत्र येऊन लढा: शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सरकारकडे आपली मागणी ठामपणे मांडावी. बदलाव: शेतकरी पिकांची विविधता आणण्याचा प्रयत्न करावा. संगठन: शेतकरी संघटनांमध्ये जाऊन आपल्या हक्कांसाठी लढा द्यावा. कांद्याच्या भावात मोठी घसरण ही शेतकऱ्यांसाठी मोठी समस्या आहे. सरकारने या समस्येवर त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनीही एकत्र येऊन आपल्या हक्कांसाठी लढा द्यावा.

Onions Price In Maharashtra : कांद्याच्या भावात मोठी घसरण: शेतकऱ्यांची चिंता वाढली Read More »

Satyajeet Tambe : कापूस खरेदीसाठी सरकारने अटी शिथील कराव्यात, सभागृहात आमदार सत्यजीत तांबेंची मागणी

Satyajeet Tambe : केंद्र सरकारने कापूस खरेदीला प्रती क्विंटल ७ हजार ५२१ रुपयाचा हमी भाव दिला आहे. परंतू भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) जाचक अटींमुळे कापूस उत्पादक त्याचा लाभ मिळत नाही. सीसीआय १२% पेक्षा जास्त ओलावा असलेला कापूस खरेदी करत नाही. त्यामुळे ही अट शिथील करून १८% करण्यात यावी आणि कापूस उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आ. सत्यजीत तांबे यांनी सभागृहात केली. यंदा प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे कापसाचे प्रती हेक्टरी उत्पन्न एक ते दोन क्विंटलच झाले असून त्याच कापूस खरेदी केंद्र देखील उशिरा सुरू झाले आहे. त्यातदेखील आर्हता पाहूनच कापसाला भाव देत असल्याने शेतकऱ्यांना खासगी बाजारपेठांमध्ये जाण्याशिवाय पर्याय राहत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असल्याच्या भावना आमदार सत्यजीत तांबे यांनी सभागृहात व्यक्त केल्या. यंदा कापसाला खासगी बाजारात चांगला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अनेक दिवसांपासून सीसीआयकडून कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. अखेर सीसीआयकडून कापूस खरेदीला सुरुवात झाली असून, सीसीआयच्या केंद्रावर माल विक्रीसाठी आणताना हमीभावासाठी काही निकष निश्चित करुन देण्यात आले आहेत. आर्द्रतेचे प्रमाण जर ८ टक्क्यांपेक्षा कमी असेल तर त्या शेतकऱ्यांना ७ हजार ५२१ रुपयांचा हमीभाव देण्यात येणार आहे, तर १२ टक्क्यांपर्यंतची आर्द्रता राहिल्यास त्या शेतकऱ्यांना ७ हजार १२१ रुपयांची रक्कम दिली जाणार आहे. १२ टक्क्यांपेक्षा जास्तीची आर्द्रता राहिल्यास त्यात अजून दर कमी होण्याची शक्यता आहे. भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) खुल्या बाजारातील कापूस खरेदीला सुरुवात करून खासगी व्यापाऱ्यांची स्पर्धा सुरू केली होती. परंतु, शेतकऱ्यांनी सीसीआय कडेही पाठ फिरवली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सीसीआयच्या खरेदीला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. शेतकऱ्यांना कापसाला प्रति क्विंटल दहा हजारांच्यापेक्षा अधिक दर मिळावा, अशी अपेक्षा आहे.

Satyajeet Tambe : कापूस खरेदीसाठी सरकारने अटी शिथील कराव्यात, सभागृहात आमदार सत्यजीत तांबेंची मागणी Read More »

Maharashtra News: जलसंधारण कामांमुळे करंजीतील फळबागा बहरल्या

Maharashtra News: पाथर्डी तालुक्यातील करंजी गावात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत जलसंधारणाची विविध कामे केल्याने शाश्वत जलसाठा उपलब्ध झाला असून फळबागांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले आहे. करंजी हे बाजारपेठेचे गाव म्हणून ओळखले जाते. दिवसभरात दहा ते पंधरा हजार प्रवासी गावात ये-जा करतात. त्यामुळे गावकऱ्यांसोबत या प्रवाशांसाठीदेखील पिण्याचे पाणी आवश्यक असते. गावात फळबागांचे प्रमाणही अधिक अर्थात एकूण पिकांच्या 75 टक्के आहे. या फळबागांसाठीदेखील मुबलक प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. पाण्याचे योग्य नियोजन करण्यासोबत पाणीसाठ्यात वाढ करण्याची आवश्यकता लक्षात घेवून गावाने प्रधानमंत्री कृषी सिंचन योनजेअंतर्गत जलसंवर्धनाची विविध कामे हाती घेतली. जलस्रोतांमधील गाळ मोठ्या प्रमाणात काढण्यात आला आणि आवश्यक तिथे दुरूस्तीची कामे करण्यात आली. गाळ काढून परिसरातील शेतात टाकण्यात आल्याने शेतीसाठी त्याचा फायदा झाला. गावात पाणलोट विकास समितीमार्फत 4 ठिकाणी सिमेंट नाला बांध दुरुस्ती आणि 19 सामुहीक शेततलावाची कामे घेण्यात आली. याशिवाय 3 मातीनाला बांध, 8 चेक डॅम, समतल चर, संयुक्त गॅबियन, सलग समतल चर अशी 39 कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या कामांवर 1 कोटी 34 लाख रुपये खर्च करण्यात आले. या सर्व कामांमुळे गावातील पाणीसाठा वाढण्यास मदत झाली. गावाला आता पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही. पिण्यासाठी आणि सिंचनासाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाले आहे. एवढ्यावर समाधान न मानता जलसंधारणाची आणखी कामे घेण्याचा ग्रामस्थांचा निर्धार आहे. एकूणच गावात जलसंवर्धनाचे नवे पर्व सुरू झाले आहे. रफिक शेख, सरपंच-एरवी पावसाळ्यानंतर दोन ते तीन महिन्यात विहिरींचे पाणी अटत असे. यावर्षी मात्र विहिरींना चांगल्या प्रमाणात पाणी असल्याने फळबागांना पुरेसे पाणी मिळते आहे. पाण्यामुळे इतरही परिसर बहरला आहे. गावात असणाऱ्या प्रत्येक बंधाऱ्यातील गाळ काढण्यासोबत जलयुक्त शिवार आणि गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत विविध कामे घ्यायची आहेत.

Maharashtra News: जलसंधारण कामांमुळे करंजीतील फळबागा बहरल्या Read More »

Maharashtra News: केदारेश्वरला ऊस घातलेल्या सर्व शेतकऱ्यांचे उसाचे पैसे बँक खात्यावर वर्ग…..!

Maharashtra News: सन २०२३/२४ म्हणजे मागच्या गळीत हंगामात मार्च २०२४ मध्ये ऊस घातलेल्या शेवटच्या पंधरवाड्यातील ज्या शेतकऱ्यांनी शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील संघर्षयोद्धा श्री. बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याला ऊस घातला होता. ज्यांचे पैसे देणे बाकी होते त्या सर्व शेतकऱ्यांचे ऊसाचे संपूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आज शनिवार दिनांक १६ नोव्हेंबर रोजी वर्ग केल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक रमेश गर्जे यांनी दिली आहे. याबाबत अधिक माहिती देतांना ते म्हणाले की, या आगोदर दिवाळीपुर्वी ५० टक्के रक्कम दिली होती. राहिलेले सर्व पैसे आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली आहेत. आज रोजी ऊस बिलापोटी एक रुपया सुद्धा कारखान्याकडे देणे बाकी नाही याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी काही अडचण आल्यास संघर्षयोद्धा श्री. बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालकाशी मो.बा. ८२७५४३८५७७ या नंबर वर संपर्क साधावा.

Maharashtra News: केदारेश्वरला ऊस घातलेल्या सर्व शेतकऱ्यांचे उसाचे पैसे बँक खात्यावर वर्ग…..! Read More »

PM Modi : शेतकऱ्यांना 15 हजार रुपये मिळणार, नाशिकमधून नरेंद्र मोदींची मोठी घोषणा

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराला सुरुवात केली आहे. नाशिक येथे आयोजित एका जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. या सभेत बोलताना त्यांनी वीर सावरकर यांना काँग्रेसचे युवराज संपूर्ण देशात फिरून शिव्या देतात मात्र सावरकर यांचा वारसा जपण्याचा दावा करणारे आज काँग्रेससोबत आहे. असं देखील नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच आमची सरकार आली तर राज्यातील शेतकऱ्यांना 12 ऐवजी 15 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार असल्याची घोषणा देखील मोदींनी नाशिकमधून केली. तर राज्यातील अनेक विकास कामे थांबवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा महायुतीची सरकार आणा असा आवाहन देखील त्यांनी केला. पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, जर राज्यात महाविकास आघाडीची सरकार आली तर राज्यात सुरु असणारी लाडकी बहिण योजना बंद होणार असा दावा देखील त्यांनी केला. राज्यात विधानसभेसाठी एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मत मोजणी होणार आहे.

PM Modi : शेतकऱ्यांना 15 हजार रुपये मिळणार, नाशिकमधून नरेंद्र मोदींची मोठी घोषणा Read More »

Rain Alert : सावध रहा.. ‘या’ भागात पुन्हा कोसळणार मुसळधार पाऊस

Rain Alert:  गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याने अनेकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. मंगळवारी रात्रभर झालेल्या पावसानंतर बुधवारीही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चेन्नई आणि तामिळनाडूच्या इतर भागात मंगळवारी अधूनमधून पाऊस झाला. हवामान विभागाने सांगितले की, बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र स्पष्ट, कमी दाबाच्या क्षेत्रात बदलले असून त्याचे नैराश्यात रुपांतर होण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. देखभालीमुळे चेन्नईतील भुयारी मार्गांमध्ये पाणी साचले नसून पडलेली झाडे तातडीने हटवण्यात आल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आंध्रमध्ये मुसळधार पाऊस, चक्रीवादळाची भीती दुसरीकडे, आंध्र प्रदेशसह अनेक दक्षिणेकडील राज्यांमध्ये चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले की दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरातील दबाव चक्री वादळात बदलला आहे, जो 10 किमी / तासाच्या वेगाने उत्तर-पश्चिम दिशेने सरकत आहे. हे चेन्नईपासून 440 किमी, पुडुचेरीपासून 460 किमी आणि नेल्लोरपासून 530 किमी अंतरावर आहे. उद्या सकाळपर्यंत हे वादळ पुद्दुचेरी आणि नेल्लोरच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. दक्षिण किनाऱ्यावर अनेक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि रायलसीमा येथे काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. किनारपट्टीवर 40-60 किमी/ताशी वाऱ्याचा वेग अपेक्षित आहे. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. लोकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी. कर्नाटकात मुसळधार पाऊस, बचाव पथके सज्ज त्याचवेळी, मुसळधार पावसाच्या अंदाजानंतर, बेंगळुरूमध्ये आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. बुधवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत गेल्या 24 तासात बेंगळुरू शहरात 66.1 मिमी पाऊस झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मंगळवारी झालेल्या संततधार पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. बंगळुरू शहरी जिल्ह्यातील शाळा बुधवारी बंद राहतील, तर अनेक माहिती तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान आणि खाजगी कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी दिली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. कर्नाटकचे महसूल मंत्री कृष्णा बायरे गौडा यांनी सांगितले की, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि कर्नाटक राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे सुमारे 60 कर्मचारी शहरात तैनात करण्यात आले आहेत. “कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहण्यासाठी आम्ही आणखी 40 कर्मचारी पुन्हा तैनात करत आहोत,” असं ते म्हणाले. 

Rain Alert : सावध रहा.. ‘या’ भागात पुन्हा कोसळणार मुसळधार पाऊस Read More »

IMD Alert Maharashtra: सावधान, पावसाचा रेड अलर्ट, वीज पडून 3 जणांचा मृत्यू

IMD Alert Maharashtra: पुन्हा एकदा मुंबईसह राज्यातील इतर भागात मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे. यातच आता भारतीय हवामानशास्त्र विभागाने  मुंबई आणि त्याच्या आसपासच्या ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी गुरुवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत रेड अलर्ट जारी केला आहे. पावसामुळे आज मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार आहेत. पोलिसांनी सर्व नागरिकांना अत्यावश्यकतेशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. सर्वांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सततच्या पावसामुळे ठाण्यातील मुंब्रा बायपासवर 25 सप्टेंबर रोजी रात्री 9:30 वाजता दरड कोसळल्याने परिसरात 3 तासांहून अधिक काळ वाहतूक कोंडी झाली होती. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे काही विमानांना उतरण्याची परवानगी देण्यात आली नाही. पावसामुळे अनेक गाड्याही थांबवाव्या लागल्याने मोठा विस्कळीत झाला. मुंबईच्या ठाणे जिल्ह्यात गेल्या 24 तासांत वीज पडून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे नोकरदारांचे हाल होत आहेत. पावसामुळे रुळावरून घसरलेल्या ट्रॅफिकमध्ये घरी परतणारे लोक अडकले.

IMD Alert Maharashtra: सावधान, पावसाचा रेड अलर्ट, वीज पडून 3 जणांचा मृत्यू Read More »

Ahmednagar Rain Alert: सावधान, जिल्ह्यात पुढील 2 दिवस कोसळणार धो धो पाऊस, अलर्ट जारी

Ahmednagar Rain Alert: देशात मान्सून परतीच्या पावसाची सुरुवात झाली असून अहमदनगर जिल्ह्यासाठी हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यातील काही भागात 23 ते 25 सप्टेंबर जोरदार पावसाचा हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत वीजांच्‍या कडकडाटांसह वादळी वारा व जोरदार पाऊस, तसेच 26 सप्टेंबर रोजी  वीजांच्‍या कडकडाटांसह हलक्‍या ते मध्‍यम स्‍वरुपाचा पाऊस होण्‍याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.  जिल्‍ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्‍यात आलेला आहे.   पुणे, नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात अतिवृष्‍टी झाल्‍यास जिल्‍ह्यातील भिमा व घोड नदी, गोदावरी नदी तसेच प्रवरा व मुळा या नद्यांवरील धरणातून सोडलेल्‍या विसर्गामुळे नद्यांच्‍या पाणीपातळीत वाढ होऊ शकते. त्यामुळे  जिल्‍ह्यातील भिमा, घोड, गोदावरी, प्रवरा व मुळा या नदीकाठावरील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन  जिल्हा प्रशासनाने केले आहे.   मेघगर्जनेच्‍या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्‍यावा. धोकादायक ठिकाणी सेल्‍फी काढू नये. गडगडाटीच्‍या वादळादरम्‍यान व वीजा चमकतांना कोणत्‍याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्‍या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्‍टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल यांचेपासून दूर रहावे. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्‍वजांचे खांब, विद्युत, दिव्‍यांचे खांब, धातुचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉंन्‍सफॉर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्‍या अधांतरी लटकणाऱ्या लोंबणाऱ्या केबल्‍सपासून दूर रहावे. जाहिरात फलक (होर्डिंग्‍ज्) कोसळून होणाऱ्या दूर्घटना टाळण्‍यासाठी दक्षतेची बाब म्‍हणून जाहिरात फलकांच्‍या (होर्डिंग्‍ज्) आजूबाजूला थांबू नये व योग्‍य ती दक्षता घ्‍यावी. वीजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्‍यास सुरक्षेसाठी गुडघ्‍यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्‍ही गुडघ्‍यांच्‍यामध्‍ये झाकावे. जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा. स्‍थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्‍या सुचनांचे पालन करावे. सखल भागात राहणाऱ्या नागरीकांना तातडीने सुरक्षितस्‍थळी स्‍थलांतर करावे. नदी, ओढे व नाल्‍याकाठच्‍या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणीपातळीत वाढ होत असल्‍यास नागरिकांनी नदीपात्रातुन तसेच ओढे व नाले यापासून दूर रहावे व सुरक्षित स्‍थळी स्‍थलांतर करावे. नदी अथवा ओढे नाल्‍यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्‍यास पुल ओलांडू नये. पूर पाहण्‍यासाठी गर्दी करू नये. अतिवृष्‍टीमुळे भूस्‍खलन होण्‍याची व दरडी कोसळण्‍याची शक्‍यता असते. त्‍यादृष्‍टीने डोंगराच्‍या पायथ्‍याशी राहणाऱ्या लोकांनी दक्षता घ्‍यावी. वेळीच सुरक्षित स्‍थळी स्‍थलांतर करावे. घाट रस्‍त्‍याने प्रवास करणे शक्‍यतो टाळावे.  धरण व नदीक्षेत्रामध्‍ये पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्‍यावी. नदीच्‍या पाण्‍याच्‍या प्रवाहामध्‍ये चढू अथवा उतरू नये, धोकादायक ठिकाणी सेल्‍फी  काढू नये.                   वादळी वारे, वीज, पाऊस आणि गारपीट यांपासून स्‍वत:सह जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्‍य ती दक्षता घ्‍यावी. आपत्‍कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्‍टेशन किंवा जिल्‍हा नियंत्रण कक्ष, जिल्‍हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील दूरध्‍वनी क्र. 1077 (टोल फ्री), 0241- 2323844  अथवा 2356940  या क्रमांकावर  संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Ahmednagar Rain Alert: सावधान, जिल्ह्यात पुढील 2 दिवस कोसळणार धो धो पाऊस, अलर्ट जारी Read More »

Weather Update Today: ‘या’ भागात आज धो धो पाऊस, जाणून घ्या ताजे अपडेट

Weather Update Today: भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी म्हणजेच आज किनारपट्टी कर्नाटक, केरळ आणि माहे, लक्षद्वीपमध्ये पावसाची शक्यता आहे. देशातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे  अनेक राज्यांमध्ये पुराने कहर केला आहे.   तर आज दिल्ली-एनसीआर, पूर्व मध्य प्रदेश आणि पश्चिम मध्य प्रदेशात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. गुजरात, छत्तीसगडमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. या आठवड्यात अरुणाचल प्रदेश, बिहार, ओडिशा येथेही पावसाची शक्यता आहे. या राज्यांमध्ये पावसाची शक्यता याशिवाय कोस्टल आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकलमध्ये पावसाची शक्यता आहे. या आठवड्यात नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा, आसाम आणि मेघालय, अंदमान आणि निकोबार बेटे, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम, झारखंडमध्ये हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता आहे. हिमाचलमधील 6 जिल्ह्यांमध्ये अलर्ट उत्तराखंड, पूर्व राजस्थान, उत्तर प्रदेशमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यातील किन्नौर, कुल्लू, मंडी, शिमला, सोलन आणि सिरमौर या सहा जिल्ह्यांमध्ये पूरस्थितीचा इशारा देण्यात आला आहे. राज्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्राने सांगितले की, हिमाचल प्रदेशमधील राष्ट्रीय महामार्ग 5 (हिंदुस्थान-तिबेट रोड) सह एकूण 76 रस्ते वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद आहेत. शिमल्यात 34, मंडीत 26, कांगडामध्ये 10, कुल्लूमध्ये दोन आणि किन्नौर, उना, सिरमौर आणि लाहौल आणि स्पिती जिल्ह्यात प्रत्येकी एक रस्ते बंद आहेत.

Weather Update Today: ‘या’ भागात आज धो धो पाऊस, जाणून घ्या ताजे अपडेट Read More »

Ahmednagar News: शेतकऱ्यांच्या जमीनीला भाव न मिळावा या गैरहेतूने प्रशासनाची दिशाभूल

Ahmednagar News:  शेतकऱ्यांच्या जमीनीला भाव न मिळावा या गैरहेतूने प्रशासनाची दिशाभूल केली जात असताना राष्ट्रीय महामार्ग 222 व सुरत चेन्नई राष्ट्रीय महामार्ग मध्ये बाधित झालेल्या मौजे केडगाव, निंबळक, बोल्हेगाव, नालेगाव, नेप्ती, सोनेवाडी, पिंपळगाव माळवी, धनगरवाडी, मांजरसुंबा व कापूरवाडी येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी सर्व गावातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगर तालुक्यातील मौजे केडगाव, निंबळक, बोल्हेगाव, नालेगाव, नेप्ती, सोनेवाडी, पिंपळगाव माळवी, धनगरवाडी, मांजरसुंबा व कापूरवाडी येथील शेतकऱ्यांचे राष्ट्रीय महामार्ग 222 व सुरत चेन्नई राष्ट्रीय महामार्ग मध्ये जमिनी गेल्या आहेत. शेतकऱ्यांनी जमिनीचे वाढीव नुकसान भरपाईचे दावे दाखल करून 6 वर्षे झाली असून, अद्याप शेतकऱ्यांना त्याचा निकाल देऊन लाभ मिळालेला नाही. सदर दावे शेतकऱ्यांनी एएमएस कन्सलटन्स यांच्याकडे दिले असून, शेतकऱ्यांची त्यांच्या बाबत कुठलीही शंका नाही. कन्सलटन्स कडून कशाचीही मागणी करण्यात आलेली नसून, शेतकऱ्यांनी देखील त्यांना काही दिलेले नाही. सदर प्रकरणी काही विघ्नसंतोषी प्रवृत्तीच्या लोकांनी शेतकरी वर्गाला मदत करणाऱ्या एएमएस कन्सलटन्स यांची बदनामी करण्याचे षडयंत्र बनवले असून, ते त्यांना टारगेट करत आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्यांची बदनामी केली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व रोष पसरला असल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे. सर्व गावच्या बाधित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी सालीमठ यांना निवेदन देऊन शेतकरी विरोधी निर्णय झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. जे व्यक्ती शेतकऱ्यांचा कळवळा करण्याचा आव आणत आहे. सर्व शेतकरी गेली 5 ते 6 वर्षा पासून नुकसान भरपाई मिळण्यासाठी लढत आहेत, मग हे मंडळी काय करत होती? असा प्रश्‍न उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

Ahmednagar News: शेतकऱ्यांच्या जमीनीला भाव न मिळावा या गैरहेतूने प्रशासनाची दिशाभूल Read More »