DNA मराठी

मनोरंजन

salim khan

Salim Khan Hospitalized : सलीम खान यांची प्रकृती बिघडली रुग्णालयात दाखल; कारण काय?

Salim Khan Hospitalized : अभिनेता सलमान खान याचे वडील आणि ज्येष्ठ लेखक सलीम खान यांची प्रकृती बिघडली असून त्यांना उपचारासाठी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी सकाळी सलीम यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांच्या प्रकृतीमुळे त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. वृद्धापकाळाशी संबंधित आरोग्य समस्यांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. 90 वर्षीय सलीम खान यांनी बॉलीवूडमध्ये शोले आणि जंजीर सारख्या अनेक प्रतिष्ठित चित्रपटांच्या कथा लिहिल्या आहेत.  तर दुसरीकडे एका अहवालानुसार अभिनेता सलमान खानने सर्व कार्यक्रम रद्द केले असून तो वडिलांना भेटण्यासाठी तातडीने रुग्णालयात दाखल झाला आहे. खान कुटुंबाकडून अद्याप या प्रकरणाबाबत कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही. सलीम खान यांची प्रकृती बिघडणे ही चाहत्यांसाठी चिंतेचा विषय बनली आहे. सोशल मीडियावरील अनेक चाहते त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.  सलमान खान रुग्णालयात दाखल सलमान खानचा हॉस्पिटलमधून बाहेर पडतानाचा व्हिडिओ काल रात्री उशिरा समोर आला. वडिलांच्या प्रकृतीबद्दल कळताच सलमान रुग्णालयात पोहोचला. तेव्हापासून तो रुग्णालयातच आहे. कुटुंबातील इतर सदस्यही नियमितपणे हॉस्पिटलमध्ये येत आहेत. यामध्ये अरबाज खान, शौरा खान, हेलेन आणि सलमा खान तसेच त्यांच्या मुली अलविरा, अर्पिता आणि तिचा पती अतुल अग्निहोत्री आणि आयुष शर्मा यांचा समावेश आहे. या ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या कथा लिहिल्या पटकथा लेखक म्हणून, सलीम खानच्या लेखणीने हिंदी चित्रपटसृष्टीत असंख्य ब्लॉकबस्टर कथा निर्माण केल्या आहेत. जावेद अख्तर यांच्यासोबत त्यांनी जवळजवळ दोन डझन चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या. त्यांच्या लोकप्रिय चित्रपटांची नावे अशी आहेत: सीता और गीता, शोले, डॉन, दीवार, जंजीर, हाथ मेरे साथी, मिस्टर इंडियाचा समावेश आहे.

Salim Khan Hospitalized : सलीम खान यांची प्रकृती बिघडली रुग्णालयात दाखल; कारण काय? Read More »

ranpati shivray swari agra

Ranpati Shivray Swari Agra : प्रतीक्षा संपली! ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ ‘या’ दिवशी चित्रपटगृहात येणार

Ranpati Shivray Swari Agra : शौर्य, जिद्द आणि चातुर्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी असंख्य समस्यांवर मात करत स्वराज्याची स्थापना केली. असामान्य नियोजन कौशल्याच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मोठमोठ्या शत्रूंना धूळ चारली. औरंगजेबासारख्या शत्रूला छत्रपती शिवाजी महाराज पुरून उरले. आग्रा भेट ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वगुणांचा, स्वाभिमानाचा आणि राष्ट्रनिष्ठेचा जाज्वल्य इतिहास ठरली. हाच प्रेरणादायी इतिहास ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या भव्य चित्रपटाच्या रूपाने मराठी रुपेरी पडद्यावर येतो आहे. पॅनोरमा स्टुडिओज, मुगाफी निर्मित आणि दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ ६ फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. महाराजांना स्वराज्य निर्मितीच्या कामात अनेकदा जीवावर बेतेल, अशा अनेक संकटांचा सामना करावा लागला. पण, अखंड सावध राहून महाराजांनी त्यावर मात केली. ‘आग्रा स्वारी’ नेमकी कशी झाली, शिवरायांनी त्याचे नियोजन नेमके कसे केले हे दाखवतानाच औरंगजेबासारखा अत्यंत दगाबाज, कपटी बादशहाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले आव्हान याचा रोमांचकारी थरार या चित्रपटात पहायला मिळणार आहे. या आग्रा भेटीतून छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिले की केवळ बळावर नव्हे, तर बुद्धी आणि नियोजनावर विजय अवलंबून असतो. ‘पॅनोरमा स्टुडिओज आणि मुगाफी निर्मित ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या भव्य चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांचे आहे.  कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक (पॅनोरमा स्टुडिओज), विपुल अग्रवाल, जेनील परमार (मुगाफी), मुरलीधर छतवानी (पॅनोरमा स्टुडिओज) चित्रपटाचे निर्माते आहेत. सहनिर्माते रवींद्र औटी (पॅनोरमा स्टुडिओज), तान्शा बत्रा, आलोक शर्मा (मुगाफी) आहेत. चित्रपटाच्या संगीत वितरणाची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे. मृणाल कुलकर्णी, अभिजीत श्वेतचंद्र, समीर धर्माधिकारी, अजय पूरकर, दिग्पाल लांजेकर, स्मिता शेवाळे, पुनीत इस्सार, विराजस कुलकर्णी, प्रसन्न केतकर, निखिल राऊत, योगेश सोमण, अक्षय वाघमारे, बिपीन सुर्वे, ऋषी सक्सेना, नुपूर दैठणकर, सचिन देशपांडे, अमिषा ठाकूर, अभिलाष चौधरी, अयन कर्णे, अमित देशमुख, अभ्यंग कुवळेकर, ज्ञानेश वाडेकर, आशुतोष वाडेकर, भूषण शिवतारे, संकेत ओक कलाकारांच्या भूमिका चित्रपटात आहेत. चित्रपटाचे कलादिग्दर्शन प्रतीक रेडीज, संजय करोले यांचे आहे. पटकथा आणि संवाद दिग्पाल लांजेकर यांचे आहेत. छायांकन संदीप शिंदे तर संकलन सागर शिंदे, विनय शिंदे यांचे आहे. गीते जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज, दिग्पाल लांजेकर यांची असून संगीताची जबाबदारी अवधूत गांधी, मयूर राऊत यांनी सांभाळली आहे. पार्श्वसंगीत  मयूर राऊत यांचे आहे. ध्वनी संयोजन निखिल लांजेकर, हिमांशू आंबेकर (नॉइज स्टोरीज) यांनी केले आहे.  रंगभूषा अतुल मस्के तर वेशभूषा रोहिणी सालेकर यांची आहे. कार्यकारी निर्माती केतकी पार्थ अभ्यंकर आहेत. क्रिएटिव्ह प्रोड्युसर अर्जुन मोगरे  आहेत. साहसदृश्ये बब्बू खन्ना यांची आहेत. नृत्यदिग्दर्शनाची  जबाबदारी  समित साळुंखे, अनुराधा गव्हाणे साळुंखे  यांनी सांभाळली आहे. पॅनोरमा स्टुडिओज ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाचे जगभरात (वर्ल्ड वाईड) वितरण करणार आहे.

Ranpati Shivray Swari Agra : प्रतीक्षा संपली! ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ ‘या’ दिवशी चित्रपटगृहात येणार Read More »

img 20260126 wa0005

Lagnacha Short : ‘लग्नाचा शॉट’ रिलीजसाठी सज्ज! ‘रेशमी बंध’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Lagnacha Short : मराठी चित्रपटसृष्टीत लव्हस्टोरीचा नवा रंग भरण्यासाठी आगामी चित्रपट ‘लग्नाचा शॉट’ सज्ज झाला असून चित्रपटातील अभिजीत आमकर व प्रियदर्शिनी इंदलकर या नव्या जोडीची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. आता या चित्रपटातील ‘रेशमी बंध’ हे रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यात या फ्रेश जोडीची केमिस्ट्री पाहायला मिळते. प्रदर्शित होताच या गाण्याने आपल्या हळव्या सुरांमुळे आणि मनाला भिडणाऱ्या दृश्यांमुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ‘रेशमी बंध’ या गाण्यात अभि आणि कृतिका यांच्या प्रेमकथेची सुरुवात उलगडताना पाहायला मिळते. निसर्गरम्य वातावरणात उमलणारं त्यांचं नातं, नजरेतून व्यक्त होणारी ओढ आणि एकमेकांच्या सहवासात वाढणारी जवळीक या गाण्यात अत्यंत सौम्य आणि भावस्पर्शी पद्धतीने मांडण्यात आली आहे. निसर्गसौंदर्यात या गाण्याचे चित्रीकरण करण्यात आल्यामुळे हे गाणं अधिकच लक्षवेधी ठरत आहे. या गाण्याचं संगीत आणि गीतलेखन प्रविण कोळी आणि योगिता कोळी यांनी केलं असून, केवल वाळंज आणि स्नेहा महाडिक यांच्या मधुर स्वरांनी गाण्यात अधिकच रंगत आणली आहे. दिग्दर्शक अक्षय गोरे म्हणतात, “ ‘रेशमी बंध’ हे गाणं अभि आणि कृतिकाच्या नात्याची पहिली ओळख आहे. ज्यात त्यांच्या खुलणाऱ्या प्रेमाची झलक पाहायला मिळते. अभि-कृतिकाची केमिस्ट्री, आजूबाजूचे निसर्गसौंदर्य व गाण्याचे सुमधूर संगीत यामुळे प्रेक्षकांना हे गाणे नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे.” महापर्व फिल्म्स निर्मित आणि जिजा फिल्म कंपनी यांच्या सहयोगाने साकारलेल्या ‘लग्नाचा शॉट’ या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन अक्षय गोरे यांनी केले आहे. गीत-संगीताची धुरा प्रवीण कोळी आणि योगिता कोळी यांनी सांभाळली असून अक्षय महादेव गोरे, विजय महादेव गोरे, अभिषेक उत्कर्ष कोळी आणि सुरेश मगनलाल प्रजापती हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. ६ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात प्रियदर्शिनी इंदलकर, अभिजीत आमकार, प्रभाकर मोरे, अभिजीत चव्हाण, राजन ताम्हाणे, लीना पंडित, संजय कुलकर्णी, विजय पवार, मनोहर जाधव, संजीवनी पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Lagnacha Short : ‘लग्नाचा शॉट’ रिलीजसाठी सज्ज! ‘रेशमी बंध’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला Read More »

ek naata asahi

Ek Naata Asahi : पनवेल मध्ये रंगणार “एक नातं असंही” नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोग

Ek Naata Asahi : सद्यस्थितीवर भाष्य, नात्यातली गुंतागुंत, थोडसं हशा पिकवणार, सामाजिक गांभीर्य असणारा विषय, नात्यात होणारे गैरसमज, व्यक्ती व्यक्तीतला फरक, समाजात असणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्तींचे वेगवेगळे स्वभाव गुणधर्म, थोडीशी कॉमेडी थोडं सिरीयस असा सगळा मालमसाला असलेलं एक नाटक सध्या व्यावसायिक रंगभूमीवर आहे. ज्याचं नाव आहे “एक नातं असंही” आहे. हे दोन अंकी नाटक प्रत्येकाच्या आयुष्यावर किंबहुना नात्यावर प्रकाश टाकणार असे असून या नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोग येत्या 31 जानेवारीला वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे संपन्न होणार आहे. “एक नातं असंही” या नाटकाची निर्मिती शिवाय मेघा या निर्मिती संस्थेने केली असून अभिजीत भालेराव हे या नाटकाचे निर्माते आहेत. नाटकाचे लेखन विस्मय दिपक कासार यांनी केलेले असून दिग्दर्शन दर्शन सिद्धार्थ घोलप यांचे आहे. या नाटकात अभिनेत्री मृण्मयी सुपल, विस्मय कासार, मोहिनी, प्रवीण भाबल, राजस वैद्य, तन्वी महाडिक, सुजल दळवी या कलाकारांच्या भूमिका आहेत. नाटकाचे संगीत रुपेश मोहन जाधव यांचे तर प्रकाश योजना निखिल मारणे यांची आहे. या नाटकात काव्याच्या भूमिका अभिनेत्री मृण्मयी सुपलने साकारली असून आजवर अनके मालिका आणि चित्रपटातून तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. या नाटकाच्या निमित्ताने मृण्मयीने पहिल्यांदाच व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले आहे. नाटकाच्या शीर्षकावरूनच हे नाटक एका नात्याची गोष्ट सांगणार असल्याचा अंदाज आपल्याला बांधता येतो. मुंबईच्या एका कॉलनीत एखाद्या सामान्य कुटुंबाप्रमाणेच “देशमुख कुटुंब” राहत असतं. आई, वडील, भाऊ, बहीण या सर्वजणांनी भरलेलं असं एक सुखी कुटुंब. कार्तिक आणि काव्या या भावा बहिणीच्या नात्यावर या नाटकाची कथा आधारित आहे. अचानक एक दिवशी देशमुख कुटुंबावर खूप मोठ संकट कोसळतं. कोरोनामुळे आई-वडिलांचं छत्र हरपत. कार्तिक मोठा असल्याने घरची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर येते, त्याला गायक व्हायचं असतं पण एकंदरीत परिस्थिती पाहता गायक होण्याचे स्वप्न तो सोडून देतो आणि बहिणीचं शिक्षण पूर्ण व्हावं म्हणून एका कंपनीत नोकरी करतो. आपल्याला सांभाळणार या जगात एकमेकांशिवाय कोणीच नाही याची त्या दोघांनाही जाणीव असल्यामुळे ते दोघे एकमेकाची काळजी घेतात. दोघेही आता दुःखातून सावरून एकमेकाला सांभाळत असतात. पुढे काव्याच्या आयुष्यात एक मुलगा येतो त्याच्या येण्याने कार्तिक आणि काव्याच्या नात्यात दुरावा निर्माण होतो की संबंध चांगले राहतात? एका भावाने बहिणीसाठी आपल्या गायक होण्याच्या स्वप्नाला बाजूला ठेवून केलेल्या त्याग्याची जाणीव बहिणीला राहते का? याची रंजक गोष्ट या नाटकातून आपल्याला पहायला मिळणार आहे. आजच्या पिढीसाठी नाती जपणं म्हणजे फक्त स्टेटस, रील्स किंवा मेसेजपुरतं मर्यादित न राहता, भावनिक समज, आपुलकी, संयम आणि जबाबदारी यांचा अर्थ काय असतो, ते “एक नातं असंही” या नाटकातून प्रभावीपणे अनुभवता येतं. हे नाटक नात्यांच्या मुळाशी जाऊन आपल्याला आरसा दाखवतं आपण कुठे आहोत आणि कुठे जायला हवं, याची जाणीव करून देतं. आजच्या धावपळीच्या आणि डिजिटल जगात नाती आणि संस्कार यांचं खरं मोल समजून घ्यायचं असेल, तर “एक नातं असंही” हे नाटक प्रेक्षकांनी नक्की पाहावं असे अभिनेत्री मृण्मयी सुपलने सांगितले . आजच्या जगात जपण्यासारख्या खूप कमी गोष्टी उरल्या आहेत, आपण नेहेमी फक्त त्याच गोष्टी जपतो ज्या आपल्या साठी खास असतात, “एक नातं असंही” हे नाटक सुद्धा तसंच आहे एका सामान्य नात्याची असामान्य गोष्ट म्हणजे हे नाटक आहे, त्याच बरोबर आपल्याला विचार करायला भाग पाडणार आहे, कसं ते जाणून घेण्यासाठी हे नाटक तुम्ही नक्की पाहा असे या नाटकाचा लेखक आणि अभिनेता विस्मय कासार याने आवर्जून नमूद केले.

Ek Naata Asahi : पनवेल मध्ये रंगणार “एक नातं असंही” नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोग Read More »

seema anand

Who is Seema Anand : सीमा आनंद Google वर सर्वाधिक सर्च होणारी भारतीय महिला; नेमकं कारण काय?

Who is Seema Anand  : गेल्या काही दिवसांपासून भारतात सोशल मीडियावर सर्वात जास्त चर्चेत असलेला नाव म्हणजे सीमा आनंद. सीमा आनंद काहींना काही कारणाने सोशल मीडियावर चर्चेत आहे. तर ती आता गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या भारतीय महिलांपैकी एक बनली आहे. काही दिवसांपुर्वी तिचे काही एआय-जनरेटेड, आक्षेपार्ह फोटो व्हायरल झाले होते, त्यानंतर तिने या प्रकरणात एफआयआर दाखल केला आणि डिजिटल छळाच्या सामान्यीकरणाविरुद्ध बोलले. जर तुम्हाला तिच्याबद्दल माहिती नसेल तर जाणून घ्या सीमा आनंद कोण आहे? सीमा आनंद कोण आहे? सीमा आनंद एक लेखिका, व्यावसायिक कथाकार आणि पौराणिक कथा तज्ञ आहे. ती मानसशास्त्र आणि कामसूत्र सारख्या प्राचीन भारतीय ग्रंथांवर आधारित नातेसंबंध आणि लैंगिक आरोग्यावर चर्चा करते. सीमा आनंद अलिकडच्या काळात, विशेषतः तरुण पिढीमध्ये वाढत्या प्रमाणात लोकप्रिय झाली आहे. ती सोशल मीडियावर नातेसंबंध, जवळीक आणि स्वतःवर प्रेम यासारख्या विषयांवर उघडपणे सल्ला देते. तिच्याविरुद्ध डिजिटल छळाचा एक खटला उघडकीस आल्यानंतर तिला आणखी लक्ष वेधले गेले. तिने या छळाविरुद्ध कडक भूमिका घेतली आणि पोलिस तक्रार दाखल केली. या वयात तिच्या धाडसी कृतीने आणि आत्मविश्वासाने लाखो लोकांची मने जिंकली. ती अनेकदा तिच्या व्हिडिओंमध्ये म्हणते की वय हे फक्त एक संख्या आहे आणि ती स्वतःच्या मुळांशी आणि संस्कृतीशी जोडून आधुनिक समस्यांवर उपाय शोधण्यावर विश्वास ठेवते.  सीमा आनंद पुस्तके सीमा आनंद यांनी “द आर्ट्स ऑफ सेडक्शन” आणि अलिकडेच “स्पीक इझी” सारखी लोकप्रिय पुस्तके लिहिली आहेत. या पुस्तकांमध्ये, ती प्राचीन भारतीय ज्ञानाचा वापर करून नातेसंबंधांमध्ये संवाद आणि आदराचे महत्त्व स्पष्ट करते. “द आर्ट ऑफ सेडक्शन” वरील तिचा टेड टॉक लाखो वेळा पाहिला गेला आहे. 

Who is Seema Anand : सीमा आनंद Google वर सर्वाधिक सर्च होणारी भारतीय महिला; नेमकं कारण काय? Read More »

img 20260115 wa0012

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांकडून सर्वोत्तम अभिनेते म्हणून रणवीर सिंग आणि रणबीर कपूर यांची निवड

Devendra Fadnavis: समकालीन हिंदी चित्रपटसृष्टीची नाडी ओळखणाऱ्या एका स्पष्ट आणि मनमोकळ्या संवादात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बॉलीवूडमधील आपल्या सध्याच्या आवडत्या अभिनेत्यांची नावे सांगितली. आजच्या काळात कोणते अभिनेते पाहायला आवडतात, असे विचारले असता फडणवीस म्हणाले, “सध्याच्या अभिनेत्यांमध्ये मला रणबीर कपूर आवडतो, रणवीर सिंगही आवडतो. मात्र माझ्या ऑल टाइम फेव्हरेटमध्ये आजही अमिताभ बच्चन जी आणि विनोद खन्ना जीच आहेत.” रणवीर सिंग आणि रणबीर कपूर यांचा उल्लेख सध्या विशेष महत्त्वाचा ठरतो. रणवीर सिंग सध्या धुरंधर या चित्रपटासाठी प्रचंड प्रशंसा मिळवत आहे. प्रेक्षक आणि समीक्षक दोघेही त्याच्या प्रभावी स्क्रीन प्रेझेन्स आणि रूपांतरकारी अभिनयाचे भरभरून कौतुक करत आहेत. “हमझा फिव्हर” सध्या चर्चेत असून, त्यामुळे धुरंधर 2 बद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. एका भाषेत—हिंदीत—८५० कोटी रुपयांहून अधिक कमाई करणारा तो एकमेव अभिनेता ठरला असून, या पिढीतील सर्वोत्तम आणि श्रेष्ठ अभिनेता म्हणून त्याने आपले स्थान अधिक भक्कम केले आहे. दुसरीकडे, रणबीर कपूरने काही वर्षांपूर्वी अ‍ॅनिमल चित्रपटातील आपल्या स्फोटक अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती आणि त्याला प्रचंड प्रेम व प्रशंसा मिळाली होती. आता चाहते अ‍ॅनिमल पार्कच्या माध्यमातून त्या सिनेमॅटिक विश्वाचा आणखी विस्तार पाहण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. अमिताभ बच्चन आणि विनोद खन्ना यांसारख्या दिग्गज कलाकारांची नावे घेत फडणवीस यांनी पिढ्यांमधील एक सुंदर दुवा निर्माण केला आहे—एकीकडे कालातीत महान कलाकारांचा सन्मान करत, तर दुसरीकडे हिंदी चित्रपटसृष्टीचे भविष्य घडवणाऱ्या समकालीन कलाकारांचेही त्यांनी कौतुक केले आहे.

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांकडून सर्वोत्तम अभिनेते म्हणून रणवीर सिंग आणि रणबीर कपूर यांची निवड Read More »

akshay kumar

Akshay Kumar चाहत्यांना देणार धक्का; ‘या’ दिवशी रिलीज होणार हॉरर कॉमेडी ‘भूत बंगला’

Akshay Kumar : ‘भूत बंगला’ ही या वर्षातील सर्वाधिक प्रतीक्षित हॉरर-कॉमेडी चित्रपटांपैकी एक आहे, ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. तब्बल 14 वर्षांनंतर हॉरर-कॉमेडीचे बादशाह दिग्दर्शक प्रियदर्शन आणि सुपरस्टार अक्षय कुमार पुन्हा एकत्र येत आहेत . पहिल्या पोस्टरच्या लाँचपासूनच उत्सुकता प्रचंड वाढली होती, त्यातच आलेल्या इंटरेस्टिंग मोशन पोस्टरमुळे चित्रपटाविषयीचा बज आणखी वाढला. आता अखेर चित्रपटाची रिलीज डेट जाहीर झाली असून ही मच-अवेटेड हॉरर-कॉमेडी 15 मे 2026 रोजी थिएटर्समध्ये रिलीज होणार आहे. आज झालेल्या या मोठ्या घोषणेमुळे उत्साह आणखी वाढला आहे ‘भूत बंगला’ अधिकृतरीत्या 15 मे 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. रिलीज डेट जाहीर होताच प्रेक्षकांची उत्सुकता द्विगुणित झाली आहे. हॉरर आणि कॉमेडीचा परफेक्ट मिलाप तोही या जॉनरमधील उस्ताद प्रियदर्शन आणि अक्षय कुमार यांच्या जोडीसोबत म्हणजे प्रेक्षकांना हव्या असलेल्या सिनेमॅटिक जादूची पुनरावृत्ती पाहायला मिळणार आहे. रिलीज डेटची घोषणा करताना मेकर्सनी सोशल मीडियावर पोस्टर शेअर करत कॅप्शन दिले— “बंगल्या मधून एक बातमी आली आहे! 15 मे 2026 ला उघडेल दरवाजा थिएटर्समध्ये भेटूया #BhoothBangla” ‘भूत बंगला’ला एक कंप्लीट एंटरटेनर बनवणारा सर्वात मोठा आधार म्हणजे त्याची दमदार स्टारकास्ट. यात अक्षय कुमार, तब्बू, परेश रावल, राजपाल यादव, जिशु सेनगुप्ता, असरानी आणि वामिका गब्बी यांसारखे दिग्गज कलाकार झळकणार आहेत. चित्रपटाचे काही भाग राजस्थान, जयपूर आणि हैदराबाद येथे शूट करण्यात आले आहेत, ज्यामुळे कथेला एक जबरदस्त व्हिज्युअल टच मिळतो. अनेक वर्षांनंतर प्रियदर्शन यांच्या चित्रपटात ही पॉवरहाऊस टीम एकत्र दिसणार असल्याने मनोरंजनाचा डोस प्रचंड असणार यात शंका नाही. याआधीही या टीमने अनेक क्लासिक कॉमेडी चित्रपट दिले आहेत. प्रियदर्शन दिग्दर्शित ‘भूत बंगला’चे निर्मितीकार्य शोभा कपूर, एकता आर. कपूर आणि अक्षय कुमार यांच्या ‘केप ऑफ गुड फिल्म्स’ या बॅनरखाली झाले आहे. फारा शेख आणि वेदांत बाली सहनिर्माते आहेत. कथा आकाश ए. कौशिक यांनी लिहिली असून स्क्रीनप्ले रोहन शंकर, अभिलाष नायर आणि प्रियदर्शन यांनी तयार केला आहे. डायलॉग्स रोहन शंकर यांनी लिहिले आहेत. चित्रपटाची निर्मिती एकता कपूर यांच्या ‘बालाजी टेलिफिल्म्स’च्या बॅनरखाली करण्यात आली आहे.

Akshay Kumar चाहत्यांना देणार धक्का; ‘या’ दिवशी रिलीज होणार हॉरर कॉमेडी ‘भूत बंगला’ Read More »

gotya gangster

Gotya Gangster : धमाल मनोरंजक ‘गोट्या गँगस्टर’चा ट्रेलर लाँच; ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार चित्रपट

Gotya Gangster : राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक दिवंगत राजेश पिंजानी यांचा अखेरचा चित्रपट ‘गोट्या गँगस्टर’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. मुंबईतल्या चाळीत राहणाऱ्या गोट्या नावाचा तरूण आणि त्याचे मित्र गँग तयार करण्याचा प्रयत्न करतात, त्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय धमाल होते याची रंजक गोष्ट या चित्रपटात पहायला मिळणार असून, 26 डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अन्नपूर्णा प्रॉडक्शन्स निर्मित ‘गोट्या गँगस्टर’ या चित्रपटाची निर्मिती अन्नपूर्णा बिरादार, राजेश्री बिरादार, संदीप बिरादार आहेत, तर चित्रपटाची प्रस्तुती ऋतुजा पाटील व शिव लोखंडे यांनी केली आहे. राजेश पिंजानी यांनी लेखन दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटात उत्तम स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. प्रवीण तरडे, प्रथमेश परब, डॉ. मोहन आगाशे, श्रीकांत यादव, अश्विनी गिरी, भूषण मंजुळे, विनोद वणवे, ऐश्वर्या शिंदे, मुकूंद वसुले यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. मायानगरी मुंबईतील एका चाळीत राहणाऱ्या तीन मित्रांची गोष्ट गोट्या गँगस्टर या चित्रपटांतून उलगडणार आहे. आयुष्यात घडणाऱ्या काही घटनांमुळे त्या तिघांवर किडनॅपिंग करण्याची वेळ येते. त्या दरम्यान, काही वर्षांपूर्वी मुंबई सोडून थेट दुबईला पळून गेलेला डॉन चिमण भाई अचानक मुंबईत परततो. त्यानंतर विनोदी प्रसंग, भन्नाट संवाद आणि न संपणारी धमाल या चित्रपटात पहायला मिळणार आहे. अत्यंत खुसखुशीत गोष्ट, उत्तम अभिनेत्यांची फौज या चित्रपटात आहे. या कथानकाविषयीची उत्सुकता ट्रेलरमधून वाढली आहे. ‘बाबू बँड बाजा’ या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटाचं दिग्दर्शन राजेश पिंजानी यांनी केलं होतं. पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवल्यानंतर त्यांच्याकडून आणखी उत्तमोत्तम चित्रपटांची अपेक्षा होती. त्यानंतर त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘गोट्या गँगस्टर’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यांचं अकाली निधन झालं. त्यामुळे आता राजेश पिंजानी यांचा हा शेवटचाच चित्रपट ठरला. आता गोट्या गँगस्टर आता 26 डिसेंबरला प्रदर्शित करून राजेश पिंजानी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

Gotya Gangster : धमाल मनोरंजक ‘गोट्या गँगस्टर’चा ट्रेलर लाँच; ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार चित्रपट Read More »

homebound

Oscar 2026 साठी Homebound शॉर्टलिस्टेड; करण जोहर भावूक

Oscar 2026 : नीरज घायवान यांचा “होमबाउंड” हा चित्रपट 98 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म पुरस्कारासाठी निवडला गेला आहे. याबाबत माहिती देताना चित्रपटाचे निर्माते करण जोहर भावूक झाला. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लिहिले की, “‘होमबाउंड’च्या प्रवासाबद्दल मी किती अभिमानी, उत्साहित आणि आनंदी आहे हे शब्दात कसे व्यक्त करावे हे मला कळत नाही. आमच्या चित्रपटांमध्ये हा चित्रपट आल्याचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे. नीरज, आमची सर्व स्वप्ने सत्यात उतरवल्याबद्दल धन्यवाद. कान्सपासून ऑस्करसाठी निवड होण्यापर्यंतचा हा एक अद्भुत प्रवास होता. संपूर्ण कलाकारांना प्रेम. “होमबाउंड” चित्रपटाची स्टोरी काय? “होमबाउंड” ही बालपणीचे मित्र शोएब (ईशान) आणि चंदन (विशाल) यांची कथा आहे, ज्यांची पोलिस दलात सामील होण्याची इच्छा त्यांच्या जीवनाला आणि निर्णयांना आकार देते. हा चित्रपट मैत्री, कर्तव्य आणि तरुण भारतीयांना तोंड द्यावे लागणारे सामाजिक दबाव या विषयांवर प्रकाश टाकतो आणि जान्हवी कपूर देखील एका महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. कोणते चित्रपट नामांकित झाले ? 98 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीसाठी पुढील फेरीच्या मतदानासाठी पंधरा चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. या यादीत अर्जेंटिनाचा “बेलेन”, ब्राझीलचा “द सीक्रेट एजंट”, फ्रान्सचा “इट वॉज जस्ट एन अॅक्सिडेंट”, जर्मनीचा “साउंड ऑफ फॉलिंग”, इराकचा “द प्रेसिडेंट्स केक”, जपानचा “कोकुहो”, जॉर्डनचा “ऑल दॅट्स लेफ्ट ऑफ यू”, नॉर्वेचा “सेंटिमेंटल व्हॅल्यूज”, पॅलेस्टाईनचा “पॅलेस्टाईन 36”, दक्षिण कोरियाचा “नो अदर चॉइस”, स्पेनचा “सिरात”, स्वित्झर्लंडचा “लेट शिफ्ट”, तैवानचा “लेफ्ट-हँडेड गर्ल” आणि ट्युनिशियाचा “द व्हॉइस ऑफ हिंद रजब” यांचा समावेश आहे.

Oscar 2026 साठी Homebound शॉर्टलिस्टेड; करण जोहर भावूक Read More »

big boss 19 winner

Bigg Boss 19 Winner : टीव्ही सुपरस्टार गौरव खन्ना बिग बॉस 19 चा विजेता; ‘प्राईस मनी’ जाणून व्हाल धक्का

Bigg Boss 19 Winner : भारतीय टेलिव्हिजन इतिहासातील लोकप्रिय बिग बॉसच्या 19 व्या हंगामाचा विजेता समोर आला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असणारा बिग बॉस 19 चा रविवारी 7 डिसेंबर रोजी फिनाले होता. हा शो जसजसा शेवट जवळ येत गेला तसतसे स्पर्धकांचे कठोर परिश्रम आणि त्यांनी बनवलेले नाते प्रेक्षकांमध्ये आवडते बनले. फरहाना भट्ट, गौरव खन्ना, तान्या मित्तल, प्रणित मोरे आणि अमाल मलिक हे फिनालेमधील टॉप पाचमध्ये होते. कालांतराने, स्पर्धकांना एक एक करून बाहेर काढण्यात आले, शेवटी फक्त गौरव खन्ना आणि फरहाना भट्ट राहिले होते. सलमान खानने विजेत्याची घोषणा केली फिनाले दरम्यान, सलमान खानने विजेत्याची घोषणा केली आणि गौरव खन्नाने बिग बॉस 19 चा किताब जिंकला. या विजयासह, त्याला शोची ट्रॉफी आणि 50 लाख बक्षीस रक्कम मिळाली. गौरव खन्नाचा विजय प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणारा होता, कारण त्याने संपूर्ण सीझनमध्ये संयम राखला आणि कधीही अपशब्द वापरले नाहीत. या शोमध्ये गौरवने दोन मजबूत आणि खरे नातेसंबंध निर्माण केले. त्याने माजी स्पर्धक मृदुल तिवारी आणि अंतिम फेरीतील स्पर्धक प्रणित मोरे यांच्याशी खोल, बंधुभावाचे नाते निर्माण केले. गौरव बाहेर पडल्यानंतरही मृदुलने त्याच्यासाठी मतांची मागणी करणे सुरू ठेवले, ज्यामुळे त्याची लोकप्रियता आणखी वाढली. फरहाना भट्ट दुसऱ्या क्रमांकावर आली आणि तिने तिच्या वर्तनाने आणि क्रीडा कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकली. प्रणित मोरे, तान्या मित्तल आणि अमाल मलिक अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर होत्या. सर्व स्पर्धकांनी त्यांच्या स्वतःच्या अनोख्या पद्धतीने शोमध्ये योगदान दिले, प्रेक्षकांसाठी मनोरंजक आणि भावनिक क्षण निर्माण केले. गौरव खन्नाच्या विजयाने हे सिद्ध केले की कोणत्याही रियालिटी शोमध्ये संयम, सकारात्मक दृष्टिकोन आणि मजबूत सामाजिक संबंध अत्यंत महत्त्वाचे असतात. बिग बॉस 19 चा हा सीझन प्रेक्षकांसाठी रोमांचक, भावनिक आणि मनोरंजक होता.

Bigg Boss 19 Winner : टीव्ही सुपरस्टार गौरव खन्ना बिग बॉस 19 चा विजेता; ‘प्राईस मनी’ जाणून व्हाल धक्का Read More »