DNA मराठी

मनोरंजन

ek naata asahi

Ek Naata Asahi : पनवेल मध्ये रंगणार “एक नातं असंही” नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोग

Ek Naata Asahi : सद्यस्थितीवर भाष्य, नात्यातली गुंतागुंत, थोडसं हशा पिकवणार, सामाजिक गांभीर्य असणारा विषय, नात्यात होणारे गैरसमज, व्यक्ती व्यक्तीतला फरक, समाजात असणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्तींचे वेगवेगळे स्वभाव गुणधर्म, थोडीशी कॉमेडी थोडं सिरीयस असा सगळा मालमसाला असलेलं एक नाटक सध्या व्यावसायिक रंगभूमीवर आहे. ज्याचं नाव आहे “एक नातं असंही” आहे. हे दोन अंकी नाटक प्रत्येकाच्या आयुष्यावर किंबहुना नात्यावर प्रकाश टाकणार असे असून या नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोग येत्या 31 जानेवारीला वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे संपन्न होणार आहे. “एक नातं असंही” या नाटकाची निर्मिती शिवाय मेघा या निर्मिती संस्थेने केली असून अभिजीत भालेराव हे या नाटकाचे निर्माते आहेत. नाटकाचे लेखन विस्मय दिपक कासार यांनी केलेले असून दिग्दर्शन दर्शन सिद्धार्थ घोलप यांचे आहे. या नाटकात अभिनेत्री मृण्मयी सुपल, विस्मय कासार, मोहिनी, प्रवीण भाबल, राजस वैद्य, तन्वी महाडिक, सुजल दळवी या कलाकारांच्या भूमिका आहेत. नाटकाचे संगीत रुपेश मोहन जाधव यांचे तर प्रकाश योजना निखिल मारणे यांची आहे. या नाटकात काव्याच्या भूमिका अभिनेत्री मृण्मयी सुपलने साकारली असून आजवर अनके मालिका आणि चित्रपटातून तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. या नाटकाच्या निमित्ताने मृण्मयीने पहिल्यांदाच व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले आहे. नाटकाच्या शीर्षकावरूनच हे नाटक एका नात्याची गोष्ट सांगणार असल्याचा अंदाज आपल्याला बांधता येतो. मुंबईच्या एका कॉलनीत एखाद्या सामान्य कुटुंबाप्रमाणेच “देशमुख कुटुंब” राहत असतं. आई, वडील, भाऊ, बहीण या सर्वजणांनी भरलेलं असं एक सुखी कुटुंब. कार्तिक आणि काव्या या भावा बहिणीच्या नात्यावर या नाटकाची कथा आधारित आहे. अचानक एक दिवशी देशमुख कुटुंबावर खूप मोठ संकट कोसळतं. कोरोनामुळे आई-वडिलांचं छत्र हरपत. कार्तिक मोठा असल्याने घरची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर येते, त्याला गायक व्हायचं असतं पण एकंदरीत परिस्थिती पाहता गायक होण्याचे स्वप्न तो सोडून देतो आणि बहिणीचं शिक्षण पूर्ण व्हावं म्हणून एका कंपनीत नोकरी करतो. आपल्याला सांभाळणार या जगात एकमेकांशिवाय कोणीच नाही याची त्या दोघांनाही जाणीव असल्यामुळे ते दोघे एकमेकाची काळजी घेतात. दोघेही आता दुःखातून सावरून एकमेकाला सांभाळत असतात. पुढे काव्याच्या आयुष्यात एक मुलगा येतो त्याच्या येण्याने कार्तिक आणि काव्याच्या नात्यात दुरावा निर्माण होतो की संबंध चांगले राहतात? एका भावाने बहिणीसाठी आपल्या गायक होण्याच्या स्वप्नाला बाजूला ठेवून केलेल्या त्याग्याची जाणीव बहिणीला राहते का? याची रंजक गोष्ट या नाटकातून आपल्याला पहायला मिळणार आहे. आजच्या पिढीसाठी नाती जपणं म्हणजे फक्त स्टेटस, रील्स किंवा मेसेजपुरतं मर्यादित न राहता, भावनिक समज, आपुलकी, संयम आणि जबाबदारी यांचा अर्थ काय असतो, ते “एक नातं असंही” या नाटकातून प्रभावीपणे अनुभवता येतं. हे नाटक नात्यांच्या मुळाशी जाऊन आपल्याला आरसा दाखवतं आपण कुठे आहोत आणि कुठे जायला हवं, याची जाणीव करून देतं. आजच्या धावपळीच्या आणि डिजिटल जगात नाती आणि संस्कार यांचं खरं मोल समजून घ्यायचं असेल, तर “एक नातं असंही” हे नाटक प्रेक्षकांनी नक्की पाहावं असे अभिनेत्री मृण्मयी सुपलने सांगितले . आजच्या जगात जपण्यासारख्या खूप कमी गोष्टी उरल्या आहेत, आपण नेहेमी फक्त त्याच गोष्टी जपतो ज्या आपल्या साठी खास असतात, “एक नातं असंही” हे नाटक सुद्धा तसंच आहे एका सामान्य नात्याची असामान्य गोष्ट म्हणजे हे नाटक आहे, त्याच बरोबर आपल्याला विचार करायला भाग पाडणार आहे, कसं ते जाणून घेण्यासाठी हे नाटक तुम्ही नक्की पाहा असे या नाटकाचा लेखक आणि अभिनेता विस्मय कासार याने आवर्जून नमूद केले.

Ek Naata Asahi : पनवेल मध्ये रंगणार “एक नातं असंही” नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोग Read More »

seema anand

Who is Seema Anand : सीमा आनंद Google वर सर्वाधिक सर्च होणारी भारतीय महिला; नेमकं कारण काय?

Who is Seema Anand  : गेल्या काही दिवसांपासून भारतात सोशल मीडियावर सर्वात जास्त चर्चेत असलेला नाव म्हणजे सीमा आनंद. सीमा आनंद काहींना काही कारणाने सोशल मीडियावर चर्चेत आहे. तर ती आता गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या भारतीय महिलांपैकी एक बनली आहे. काही दिवसांपुर्वी तिचे काही एआय-जनरेटेड, आक्षेपार्ह फोटो व्हायरल झाले होते, त्यानंतर तिने या प्रकरणात एफआयआर दाखल केला आणि डिजिटल छळाच्या सामान्यीकरणाविरुद्ध बोलले. जर तुम्हाला तिच्याबद्दल माहिती नसेल तर जाणून घ्या सीमा आनंद कोण आहे? सीमा आनंद कोण आहे? सीमा आनंद एक लेखिका, व्यावसायिक कथाकार आणि पौराणिक कथा तज्ञ आहे. ती मानसशास्त्र आणि कामसूत्र सारख्या प्राचीन भारतीय ग्रंथांवर आधारित नातेसंबंध आणि लैंगिक आरोग्यावर चर्चा करते. सीमा आनंद अलिकडच्या काळात, विशेषतः तरुण पिढीमध्ये वाढत्या प्रमाणात लोकप्रिय झाली आहे. ती सोशल मीडियावर नातेसंबंध, जवळीक आणि स्वतःवर प्रेम यासारख्या विषयांवर उघडपणे सल्ला देते. तिच्याविरुद्ध डिजिटल छळाचा एक खटला उघडकीस आल्यानंतर तिला आणखी लक्ष वेधले गेले. तिने या छळाविरुद्ध कडक भूमिका घेतली आणि पोलिस तक्रार दाखल केली. या वयात तिच्या धाडसी कृतीने आणि आत्मविश्वासाने लाखो लोकांची मने जिंकली. ती अनेकदा तिच्या व्हिडिओंमध्ये म्हणते की वय हे फक्त एक संख्या आहे आणि ती स्वतःच्या मुळांशी आणि संस्कृतीशी जोडून आधुनिक समस्यांवर उपाय शोधण्यावर विश्वास ठेवते.  सीमा आनंद पुस्तके सीमा आनंद यांनी “द आर्ट्स ऑफ सेडक्शन” आणि अलिकडेच “स्पीक इझी” सारखी लोकप्रिय पुस्तके लिहिली आहेत. या पुस्तकांमध्ये, ती प्राचीन भारतीय ज्ञानाचा वापर करून नातेसंबंधांमध्ये संवाद आणि आदराचे महत्त्व स्पष्ट करते. “द आर्ट ऑफ सेडक्शन” वरील तिचा टेड टॉक लाखो वेळा पाहिला गेला आहे. 

Who is Seema Anand : सीमा आनंद Google वर सर्वाधिक सर्च होणारी भारतीय महिला; नेमकं कारण काय? Read More »

img 20260115 wa0012

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांकडून सर्वोत्तम अभिनेते म्हणून रणवीर सिंग आणि रणबीर कपूर यांची निवड

Devendra Fadnavis: समकालीन हिंदी चित्रपटसृष्टीची नाडी ओळखणाऱ्या एका स्पष्ट आणि मनमोकळ्या संवादात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बॉलीवूडमधील आपल्या सध्याच्या आवडत्या अभिनेत्यांची नावे सांगितली. आजच्या काळात कोणते अभिनेते पाहायला आवडतात, असे विचारले असता फडणवीस म्हणाले, “सध्याच्या अभिनेत्यांमध्ये मला रणबीर कपूर आवडतो, रणवीर सिंगही आवडतो. मात्र माझ्या ऑल टाइम फेव्हरेटमध्ये आजही अमिताभ बच्चन जी आणि विनोद खन्ना जीच आहेत.” रणवीर सिंग आणि रणबीर कपूर यांचा उल्लेख सध्या विशेष महत्त्वाचा ठरतो. रणवीर सिंग सध्या धुरंधर या चित्रपटासाठी प्रचंड प्रशंसा मिळवत आहे. प्रेक्षक आणि समीक्षक दोघेही त्याच्या प्रभावी स्क्रीन प्रेझेन्स आणि रूपांतरकारी अभिनयाचे भरभरून कौतुक करत आहेत. “हमझा फिव्हर” सध्या चर्चेत असून, त्यामुळे धुरंधर 2 बद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. एका भाषेत—हिंदीत—८५० कोटी रुपयांहून अधिक कमाई करणारा तो एकमेव अभिनेता ठरला असून, या पिढीतील सर्वोत्तम आणि श्रेष्ठ अभिनेता म्हणून त्याने आपले स्थान अधिक भक्कम केले आहे. दुसरीकडे, रणबीर कपूरने काही वर्षांपूर्वी अ‍ॅनिमल चित्रपटातील आपल्या स्फोटक अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती आणि त्याला प्रचंड प्रेम व प्रशंसा मिळाली होती. आता चाहते अ‍ॅनिमल पार्कच्या माध्यमातून त्या सिनेमॅटिक विश्वाचा आणखी विस्तार पाहण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. अमिताभ बच्चन आणि विनोद खन्ना यांसारख्या दिग्गज कलाकारांची नावे घेत फडणवीस यांनी पिढ्यांमधील एक सुंदर दुवा निर्माण केला आहे—एकीकडे कालातीत महान कलाकारांचा सन्मान करत, तर दुसरीकडे हिंदी चित्रपटसृष्टीचे भविष्य घडवणाऱ्या समकालीन कलाकारांचेही त्यांनी कौतुक केले आहे.

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांकडून सर्वोत्तम अभिनेते म्हणून रणवीर सिंग आणि रणबीर कपूर यांची निवड Read More »

akshay kumar

Akshay Kumar चाहत्यांना देणार धक्का; ‘या’ दिवशी रिलीज होणार हॉरर कॉमेडी ‘भूत बंगला’

Akshay Kumar : ‘भूत बंगला’ ही या वर्षातील सर्वाधिक प्रतीक्षित हॉरर-कॉमेडी चित्रपटांपैकी एक आहे, ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. तब्बल 14 वर्षांनंतर हॉरर-कॉमेडीचे बादशाह दिग्दर्शक प्रियदर्शन आणि सुपरस्टार अक्षय कुमार पुन्हा एकत्र येत आहेत . पहिल्या पोस्टरच्या लाँचपासूनच उत्सुकता प्रचंड वाढली होती, त्यातच आलेल्या इंटरेस्टिंग मोशन पोस्टरमुळे चित्रपटाविषयीचा बज आणखी वाढला. आता अखेर चित्रपटाची रिलीज डेट जाहीर झाली असून ही मच-अवेटेड हॉरर-कॉमेडी 15 मे 2026 रोजी थिएटर्समध्ये रिलीज होणार आहे. आज झालेल्या या मोठ्या घोषणेमुळे उत्साह आणखी वाढला आहे ‘भूत बंगला’ अधिकृतरीत्या 15 मे 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. रिलीज डेट जाहीर होताच प्रेक्षकांची उत्सुकता द्विगुणित झाली आहे. हॉरर आणि कॉमेडीचा परफेक्ट मिलाप तोही या जॉनरमधील उस्ताद प्रियदर्शन आणि अक्षय कुमार यांच्या जोडीसोबत म्हणजे प्रेक्षकांना हव्या असलेल्या सिनेमॅटिक जादूची पुनरावृत्ती पाहायला मिळणार आहे. रिलीज डेटची घोषणा करताना मेकर्सनी सोशल मीडियावर पोस्टर शेअर करत कॅप्शन दिले— “बंगल्या मधून एक बातमी आली आहे! 15 मे 2026 ला उघडेल दरवाजा थिएटर्समध्ये भेटूया #BhoothBangla” ‘भूत बंगला’ला एक कंप्लीट एंटरटेनर बनवणारा सर्वात मोठा आधार म्हणजे त्याची दमदार स्टारकास्ट. यात अक्षय कुमार, तब्बू, परेश रावल, राजपाल यादव, जिशु सेनगुप्ता, असरानी आणि वामिका गब्बी यांसारखे दिग्गज कलाकार झळकणार आहेत. चित्रपटाचे काही भाग राजस्थान, जयपूर आणि हैदराबाद येथे शूट करण्यात आले आहेत, ज्यामुळे कथेला एक जबरदस्त व्हिज्युअल टच मिळतो. अनेक वर्षांनंतर प्रियदर्शन यांच्या चित्रपटात ही पॉवरहाऊस टीम एकत्र दिसणार असल्याने मनोरंजनाचा डोस प्रचंड असणार यात शंका नाही. याआधीही या टीमने अनेक क्लासिक कॉमेडी चित्रपट दिले आहेत. प्रियदर्शन दिग्दर्शित ‘भूत बंगला’चे निर्मितीकार्य शोभा कपूर, एकता आर. कपूर आणि अक्षय कुमार यांच्या ‘केप ऑफ गुड फिल्म्स’ या बॅनरखाली झाले आहे. फारा शेख आणि वेदांत बाली सहनिर्माते आहेत. कथा आकाश ए. कौशिक यांनी लिहिली असून स्क्रीनप्ले रोहन शंकर, अभिलाष नायर आणि प्रियदर्शन यांनी तयार केला आहे. डायलॉग्स रोहन शंकर यांनी लिहिले आहेत. चित्रपटाची निर्मिती एकता कपूर यांच्या ‘बालाजी टेलिफिल्म्स’च्या बॅनरखाली करण्यात आली आहे.

Akshay Kumar चाहत्यांना देणार धक्का; ‘या’ दिवशी रिलीज होणार हॉरर कॉमेडी ‘भूत बंगला’ Read More »

gotya gangster

Gotya Gangster : धमाल मनोरंजक ‘गोट्या गँगस्टर’चा ट्रेलर लाँच; ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार चित्रपट

Gotya Gangster : राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक दिवंगत राजेश पिंजानी यांचा अखेरचा चित्रपट ‘गोट्या गँगस्टर’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. मुंबईतल्या चाळीत राहणाऱ्या गोट्या नावाचा तरूण आणि त्याचे मित्र गँग तयार करण्याचा प्रयत्न करतात, त्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय धमाल होते याची रंजक गोष्ट या चित्रपटात पहायला मिळणार असून, 26 डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अन्नपूर्णा प्रॉडक्शन्स निर्मित ‘गोट्या गँगस्टर’ या चित्रपटाची निर्मिती अन्नपूर्णा बिरादार, राजेश्री बिरादार, संदीप बिरादार आहेत, तर चित्रपटाची प्रस्तुती ऋतुजा पाटील व शिव लोखंडे यांनी केली आहे. राजेश पिंजानी यांनी लेखन दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटात उत्तम स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. प्रवीण तरडे, प्रथमेश परब, डॉ. मोहन आगाशे, श्रीकांत यादव, अश्विनी गिरी, भूषण मंजुळे, विनोद वणवे, ऐश्वर्या शिंदे, मुकूंद वसुले यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. मायानगरी मुंबईतील एका चाळीत राहणाऱ्या तीन मित्रांची गोष्ट गोट्या गँगस्टर या चित्रपटांतून उलगडणार आहे. आयुष्यात घडणाऱ्या काही घटनांमुळे त्या तिघांवर किडनॅपिंग करण्याची वेळ येते. त्या दरम्यान, काही वर्षांपूर्वी मुंबई सोडून थेट दुबईला पळून गेलेला डॉन चिमण भाई अचानक मुंबईत परततो. त्यानंतर विनोदी प्रसंग, भन्नाट संवाद आणि न संपणारी धमाल या चित्रपटात पहायला मिळणार आहे. अत्यंत खुसखुशीत गोष्ट, उत्तम अभिनेत्यांची फौज या चित्रपटात आहे. या कथानकाविषयीची उत्सुकता ट्रेलरमधून वाढली आहे. ‘बाबू बँड बाजा’ या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटाचं दिग्दर्शन राजेश पिंजानी यांनी केलं होतं. पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवल्यानंतर त्यांच्याकडून आणखी उत्तमोत्तम चित्रपटांची अपेक्षा होती. त्यानंतर त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘गोट्या गँगस्टर’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यांचं अकाली निधन झालं. त्यामुळे आता राजेश पिंजानी यांचा हा शेवटचाच चित्रपट ठरला. आता गोट्या गँगस्टर आता 26 डिसेंबरला प्रदर्शित करून राजेश पिंजानी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

Gotya Gangster : धमाल मनोरंजक ‘गोट्या गँगस्टर’चा ट्रेलर लाँच; ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार चित्रपट Read More »

homebound

Oscar 2026 साठी Homebound शॉर्टलिस्टेड; करण जोहर भावूक

Oscar 2026 : नीरज घायवान यांचा “होमबाउंड” हा चित्रपट 98 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म पुरस्कारासाठी निवडला गेला आहे. याबाबत माहिती देताना चित्रपटाचे निर्माते करण जोहर भावूक झाला. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लिहिले की, “‘होमबाउंड’च्या प्रवासाबद्दल मी किती अभिमानी, उत्साहित आणि आनंदी आहे हे शब्दात कसे व्यक्त करावे हे मला कळत नाही. आमच्या चित्रपटांमध्ये हा चित्रपट आल्याचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे. नीरज, आमची सर्व स्वप्ने सत्यात उतरवल्याबद्दल धन्यवाद. कान्सपासून ऑस्करसाठी निवड होण्यापर्यंतचा हा एक अद्भुत प्रवास होता. संपूर्ण कलाकारांना प्रेम. “होमबाउंड” चित्रपटाची स्टोरी काय? “होमबाउंड” ही बालपणीचे मित्र शोएब (ईशान) आणि चंदन (विशाल) यांची कथा आहे, ज्यांची पोलिस दलात सामील होण्याची इच्छा त्यांच्या जीवनाला आणि निर्णयांना आकार देते. हा चित्रपट मैत्री, कर्तव्य आणि तरुण भारतीयांना तोंड द्यावे लागणारे सामाजिक दबाव या विषयांवर प्रकाश टाकतो आणि जान्हवी कपूर देखील एका महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. कोणते चित्रपट नामांकित झाले ? 98 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीसाठी पुढील फेरीच्या मतदानासाठी पंधरा चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. या यादीत अर्जेंटिनाचा “बेलेन”, ब्राझीलचा “द सीक्रेट एजंट”, फ्रान्सचा “इट वॉज जस्ट एन अॅक्सिडेंट”, जर्मनीचा “साउंड ऑफ फॉलिंग”, इराकचा “द प्रेसिडेंट्स केक”, जपानचा “कोकुहो”, जॉर्डनचा “ऑल दॅट्स लेफ्ट ऑफ यू”, नॉर्वेचा “सेंटिमेंटल व्हॅल्यूज”, पॅलेस्टाईनचा “पॅलेस्टाईन 36”, दक्षिण कोरियाचा “नो अदर चॉइस”, स्पेनचा “सिरात”, स्वित्झर्लंडचा “लेट शिफ्ट”, तैवानचा “लेफ्ट-हँडेड गर्ल” आणि ट्युनिशियाचा “द व्हॉइस ऑफ हिंद रजब” यांचा समावेश आहे.

Oscar 2026 साठी Homebound शॉर्टलिस्टेड; करण जोहर भावूक Read More »

big boss 19 winner

Bigg Boss 19 Winner : टीव्ही सुपरस्टार गौरव खन्ना बिग बॉस 19 चा विजेता; ‘प्राईस मनी’ जाणून व्हाल धक्का

Bigg Boss 19 Winner : भारतीय टेलिव्हिजन इतिहासातील लोकप्रिय बिग बॉसच्या 19 व्या हंगामाचा विजेता समोर आला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असणारा बिग बॉस 19 चा रविवारी 7 डिसेंबर रोजी फिनाले होता. हा शो जसजसा शेवट जवळ येत गेला तसतसे स्पर्धकांचे कठोर परिश्रम आणि त्यांनी बनवलेले नाते प्रेक्षकांमध्ये आवडते बनले. फरहाना भट्ट, गौरव खन्ना, तान्या मित्तल, प्रणित मोरे आणि अमाल मलिक हे फिनालेमधील टॉप पाचमध्ये होते. कालांतराने, स्पर्धकांना एक एक करून बाहेर काढण्यात आले, शेवटी फक्त गौरव खन्ना आणि फरहाना भट्ट राहिले होते. सलमान खानने विजेत्याची घोषणा केली फिनाले दरम्यान, सलमान खानने विजेत्याची घोषणा केली आणि गौरव खन्नाने बिग बॉस 19 चा किताब जिंकला. या विजयासह, त्याला शोची ट्रॉफी आणि 50 लाख बक्षीस रक्कम मिळाली. गौरव खन्नाचा विजय प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणारा होता, कारण त्याने संपूर्ण सीझनमध्ये संयम राखला आणि कधीही अपशब्द वापरले नाहीत. या शोमध्ये गौरवने दोन मजबूत आणि खरे नातेसंबंध निर्माण केले. त्याने माजी स्पर्धक मृदुल तिवारी आणि अंतिम फेरीतील स्पर्धक प्रणित मोरे यांच्याशी खोल, बंधुभावाचे नाते निर्माण केले. गौरव बाहेर पडल्यानंतरही मृदुलने त्याच्यासाठी मतांची मागणी करणे सुरू ठेवले, ज्यामुळे त्याची लोकप्रियता आणखी वाढली. फरहाना भट्ट दुसऱ्या क्रमांकावर आली आणि तिने तिच्या वर्तनाने आणि क्रीडा कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकली. प्रणित मोरे, तान्या मित्तल आणि अमाल मलिक अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर होत्या. सर्व स्पर्धकांनी त्यांच्या स्वतःच्या अनोख्या पद्धतीने शोमध्ये योगदान दिले, प्रेक्षकांसाठी मनोरंजक आणि भावनिक क्षण निर्माण केले. गौरव खन्नाच्या विजयाने हे सिद्ध केले की कोणत्याही रियालिटी शोमध्ये संयम, सकारात्मक दृष्टिकोन आणि मजबूत सामाजिक संबंध अत्यंत महत्त्वाचे असतात. बिग बॉस 19 चा हा सीझन प्रेक्षकांसाठी रोमांचक, भावनिक आणि मनोरंजक होता.

Bigg Boss 19 Winner : टीव्ही सुपरस्टार गौरव खन्ना बिग बॉस 19 चा विजेता; ‘प्राईस मनी’ जाणून व्हाल धक्का Read More »

ashish shelar

Ashish Shelar : राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर, आशिष शेलार यांच्याकडून पुरस्कार प्राप्त कलाकरांचे अभिनंदन

Ashish Shelar : कलेच्या विविध क्षेत्रात प्रतिवर्षी नाटक, कंठसंगीत, उपशास्त्रीय संगीत, वाद्यसंगीत, मराठी चित्रपट, कीर्तन/समाजप्रबोधन, तमाशा, शाहिरी, नृत्य, लोककला, आदिवासी गिरीजन, कलादान, प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील अभ्यासक, लोकनृत्य, लावणी/संगीतबारी,भारुड/विधीनाटय, वाद्यनिर्मिती, झाडीपटटी, खडीगंमत, दशावतार, नमन खेळे, वहीगायन, दुर्मिळ प्रयोगात्मक कला, प्रयोगात्मक कलेशी संबधित संस्था, ध्वनीतंत्रज्ञ, संगीत संयोजन, व्हाईस ओव्हर या क्षेत्रांमध्ये ज्या कलाकारांनी प्रदीर्घ काळ सेवा केलेली आहे, अशा कलावंताना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी सांगितले. ज्येष्ठ पुरस्कार तीन लाख रुपये, युवा पुरस्कार एक लाख रुपये, मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे. हे सर्व पुरस्कार लवकरच मुंबई येथे सर्व कलाकारांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत. पुरस्कारर्थींची नावे पुढील प्रमाणे. ज्येष्ठ पुरस्कार नाटक – अरुण कदम (2025), कंठसंगीत – धनंजय जोशी (2025), वाद्यसंगीत – विजय चव्हाण (2025), मराठी चित्रपट – शिवाजी लोटन पाटील (2025), उपशास्त्रीय संगीत- उदय भवाळकर (2025), किर्तन/समाजप्रबोधन- गहिनीनाथ ज्ञानेश्वर औसेकर महाराज (2025), तमाशा- कोंडीराम आवळे (2025), शाहिरी- शाहिर मधुकर मोरे (2025), नृत्य- श्रीमती रंजना फडके (2025), लोककला- हरिभाऊ वेरुळकर (2025), आदिवासी गिरीजन – रायसिंग हिरा पाडवी (2025), कलादान- चंद्रकांत घरोटे (2025), प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील अभ्यासक व पत्रकार- प्रा. आनंद गिरी (2024), संजीव भागवत (2025), लोकनृत्य- सुभाष नकाशे (2024), अरविंद राजपूत (2025), लावणी संगीतबारी- श्रीमती शकुंतला नगरकर (2024), श्रीमती कल्पना जावळीकर ( 2025), भारुड/विधीनाट्य/गौळण- श्रीमती पदमजा कुलकर्णी (2024), श्रीमती गोदावरी मुंडे (2025), वाद्यनिर्मिती करणारे कलाकार- युसुफ घडूलाल मुल्ला (2024), भालेराव नागोराव दडांजे (2025), झाडीपट्टी/दंडार/खडीगंमत- रामदास चौधरी (2024), बुधा भलावी (2025), दशावतार/नमन खेळ/वहीगायन- ओमप्रकाश यशवंत चव्हाण (2024), भानुदास शंभा सावंत (2025), दुर्मिळ प्रयोगात्मक कला व मौखिक परंपरा जपणारे व त्यांचे जतन, संवर्धन करणाऱ्या व्यक्ती/संस्था- धर्मा कांबळे (2024), श्रीमती साखराबाई टेकाळे (2025), प्रयोगात्मक कलेशी संबंधित संग्रहालय/संस्था- विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण चॅरीटेबल ट्रस्ट (2025), तांबवेश्वर शाहिरी कलापथक (तुकाराम ठोंबरे), बीड (2024), ध्वनीतंत्रज्ञ संकलक/पुरस्कार- अविनाश ओक (2024), महेश अंबेरकर (2025), संगीत संयोजन- अमर हळदीपूर (2024), कमलेश भडकमकर (2025), व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट/निवेदन- अंबरीश मिश्र (2024), उदय सबनीस (2025) युवा पुरस्कार नाटक – तेजश्री प्रधान (2024), भूषण कडू (2025), कंठसंगीत- धनंजय म्हसकर (2024), मयुर सुकाळे (2025), वाद्यसंगीत- ऋषिकेश जगताप (2024), वरद कठापूरकर (2025), मराठी चित्रपट- मधुरा वेलणकर (2024), शंतनु रोडे (2025), उपशास्त्रीय संगीत- राहुल देशपांडे (2024), भाग्येश मराठे (2025), किर्तन/समाजप्रबोधन- जयवंत बोधले (2024), ज्ञानेश्वर माऊली कदम ( 2025), तमाशा- नितीन बनसोडे (2024), अमृता थोरात (2025) शाहिरी- शाहिर आझाद नाईकवडी (2024) शाहिरा अनिता खरात (2025), नृत्य- वृषाली दाबके (2024), संतोष भांगरे (2025), लोककला- संदिप पाल महाराज (2024), चेतन बेले (2025), आदिवासी गिरीजन- साबूलाल बाबूलाल दहिकर (2024), गंगुबाई चांगो भगत (2025) कलादान- श्रीमती कस्तुरी देशपांडे (2024), सिध्देश कलिंगण (2025), प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील अभ्यासक व पत्रकार- खंडुराज गायकवाड (2024), तेजस्विनी आचरेकर (2025), लोकनृत्य- दिपक बीडकर (2024), गणेश कांबळे (2025), लावणी संगीतबारी- प्रमिला लोदगेकर ( 2024), वैशाली वाफळेकर (2025), भारुड/विधीनाट्य/गौळण- हमीद सय्यद (2024), रामानंद उगले (2025), वाद्यनिर्मिती करणारे कलाकार- उमा शंकर दाते (2024), सर्वजीत विष्णू पोळ (2025), झाडीपट्टी/दंडार/खडीगंमत- मुकेश देशमुख (2024), दुधराम परसराम कावळे (2025), दशावतार/नमन खेळ/वहीगायन- लक्ष्मीकांत नाईक (2024), रामकृष्ण कैलास घुळे (2025), दुर्मिल प्रयोगात्मक कला व मौखिक परंपरा जपणारे व त्यांचे जतन, संवर्धन करणाऱ्या व्यक्ती/संस्था- रेणुका शेंडगे जेजूरीकर (2024), प्रसाद गरुड (2025), प्रयोगात्मक कलेशी संबंधित संग्रहालय/संस्था- सव्यसाची गुरुकुलम लखन जाधव (2024), इतिहासाचे अबोल साक्षिदार बहुउद्देशिय ट्रस्ट (निलेश सकट) (2025), ध्वनीतंत्रज्ञ संकलक/पुरस्कार- प्रणाम पानसरे (2024), विराज भोसले (2025), संगीत संयोजन- अनुराग गोडबोले (2024), अमित पाध्ये (2025), व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट/निवेदन- मेघना एरंडे (2024), समिरा गुजर(2025). सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी तसेच सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी अभिनंदन केले आहे.

Ashish Shelar : राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर, आशिष शेलार यांच्याकडून पुरस्कार प्राप्त कलाकरांचे अभिनंदन Read More »

img 20251125 wa0001

प्रतीक्षा संपणार, Bigg Boss Marathi 6 लवकरच कलर्स मराठीवर आणि JioHotstar वर!

Bigg Boss Marathi : मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय शो  बिग बॉस मराठीचा सहावा सीझन  लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आता बिग बॉसच्या घराचा दरवाजा पुन्हा उघडणार आणि एंटरटेनमेंटचा बार पुन्हा उडणार. प्रत्येक वर्षीप्रमाणे प्रेक्षकांच्या मनात हजारो प्रश्न घोळू लागले आहेत. यंदाचा USP काय असेल? थीम काय असेल? सदस्य कोण असतील? घर कसे असेल? यंदाचा गेम प्लॅन काय असणार? आणि बरंच काही. तसेच यावेळेस सूत्रसंचालन महाराष्ट्राचा लाडका भाऊ म्हणजे रितेश देशमुख करणार का? भाऊचा कट्टा पुन्हाएकदा घराघरात पाहायला मिळणार का ? या सर्व प्रश्नांमुळे बिग बॉसच्या पुनरागमनाची वारे सगळीकडे वाहू लागले आहेत. कलर्स मराठीकडून सादर करण्यात आलेल्या खास टीझरमध्ये प्रेक्षकांना यंदाच्या सीझनच्या थीमचा सर्वात महत्त्वाचा संकेत मिळाला तो म्हणजे दरवाजा. या वेळी एक नाही तर अनेक दरवाजे असणार आहेत. यावेळेसचा खेळ अजूनच धमाकेदार होणार आहे. या वर्षीच्या बिग बॉस मराठी सिझन 6 च्या टीझरमध्ये एकाच दाराऐवजी अनेक दरवाजे दिसतात, आणि याच क्षणी प्रेक्षकांची उत्सुकता क्षणात वाढते. खरं काहीच उघड न करता टीझर प्रेक्षकांना थेट गुंतवून ठेवतो. दारांमधून येणारा प्रकाश, त्यांची अनोखी रचना आणि रहस्यमय वातावरण हे फक्त एकच सांगतं या सीझनमध्ये काहीतरी खूप वेगळं घडणार आहे. सध्या या सिझनबद्दलची सर्व माहिती गुलदस्त्यात ठेवण्यात आली असून ती लवकरच उलगडणार आहे. सदस्यांची नावे, घराची पहिली झलक, थीमची अधिकृत घोषणा आणि या वर्षीचे मोठे ट्विस्ट हे सर्व लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहेत. महाराष्ट्रभर पुन्हा एकदा “Bigg Boss आदेश देत आहेत!” हा आवाज घुमण्याच्या तयारीत आहे आणि मनोरंजनाचा बाप बिग बॉस मराठी सिझन 6 लवकरच परततोय फक्त कलर्स मराठीवर आणि JioHotstar वर!

प्रतीक्षा संपणार, Bigg Boss Marathi 6 लवकरच कलर्स मराठीवर आणि JioHotstar वर! Read More »

dharmendra

Dharmendra Passed Away : धर्मेंद्र यांची 51 रुपये मानधन घेऊन इंडस्ट्रीत प्रवेश अन् राजेश खन्ना, अमिताभ बच्चनच्या युगातही सुपरहिट

Dharmendra Passed Away : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचा आज वयाचे 89 व्या वर्षीय निधन झाले आहे. बॉलिवूडमध्ये त्यांची ओळख हि मॅन म्हणून होती. त्यांनी कधीही स्टारडम डोक्यावर येऊ दिले नाही आणि कधीही सुपरस्टारशी कोणत्याही सन्मान किंवा स्पर्धेशी स्वतःला जोडले नाही. विनोद खन्ना आणि मिथुन यांच्याशी जवळचे नाते धर्मेंद्र नेहमीच तरुण कलाकारांना प्रोत्साहन देत असत. विनोद खन्ना यांच्या आजारपणामुळे आणि त्यानंतरच्या मृत्यूमुळे ते खूप दुःखी झाले. जेव्हा मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला तेव्हा त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या काळातील सुपरस्टारपद असूनही, धर्मेंद्र यांनी कधीही कोणाशीही स्पर्धा केली नाही. राजेश खन्ना यांचा सुपरस्टारपदाचा उदय आणि अमिताभ बच्चन यांचा अँग्री यंग मॅन दर्जाचा उदय यामुळेही त्यांचा आत्मविश्वास कधीही कमी झाला नाही. लुधियानाच्या देओल कुटुंबातील या जाट शीख कलाकाराने त्यांच्या स्वतःच्या शैलीत स्वतःची ओळख निर्माण केली. पहिल्या चित्रपटासाठी फक्त 51 रुपये मिळाले 1960 मध्ये धर्मेंद्र यांनी फिल्मफेअर टॅलेंट स्पर्धा जिंकून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यांचा पहिला चित्रपट ‘दिल भी तेरा, हम भी तेरे’ होता आणि त्यासाठी त्यांना फक्त 51 रुपये मिळाले. ही एक माफक रक्कम होती, पण ती त्यांच्या दीर्घ प्रवासाची सुरुवात होती. चित्रपट फ्लॉप झाला, संघर्ष सुरूच राहिला आणि त्यांना खाण्यासाठी किंवा राहण्यासाठी सुरक्षित जागाही मिळाली नाही, परंतु त्यांचे धाडस अबाधित राहिले. बाहेरील असूनही, त्यांनी हार मानण्यास नकार दिला. गावातील मातीतून उठून महानगरात स्वतःला स्थापित करणे सोपे नव्हते, परंतु त्यांनी स्वतःचा मार्ग तयार केला. मनोज कुमारने हात धरला सततच्या अपयशांमुळे धर्मेंद्र निराश झाले आणि त्यांनी जवळजवळ पंजाबला परतण्याचा निर्णय घेतला होता. त्याच क्षणी, त्यांचा जवळचा मित्र मनोज कुमार त्यांच्या मदतीला धावला. त्यावेळी ते दोघेही संघर्ष करत होते, परंतु मनोज कुमार म्हणाले, “जर आपण दोन भाकरी कमवल्या तर आपण त्या वाटून घेऊ.” हे शब्द धर्मेंद्रसाठी बळाचा स्रोत बनले. मनोज कुमारच्या मृत्यूनंतर धर्मेंद्रने अनेक वर्षांनी मौन बाळगल्याने त्यांच्या मैत्रीची खोली उघड झाली. संघर्षातून यशाकडे झेप 1963 मध्ये आलेल्या “बंदिनी” चित्रपटाने धर्मेंद्रच्या कारकिर्दीचा मार्ग बदलला. बिमल रॉय यांच्या दिग्दर्शनाखाली आणि अशोक कुमार आणि नूतन सारख्या दिग्गजांसोबत काम करण्याची संधी अमूल्य ठरली. या चित्रपटामुळे त्यांना त्यांचे पहिले चांगले मानधन, पाच हजार रुपये मिळाले, जे त्यांनी त्यांची पहिली कार खरेदी करण्यासाठी वापरले. त्यांनी विचार केला होता की जर त्यांना चित्रपटांमध्ये काम मिळाले नाही तर ते टॅक्सी चालवून उदरनिर्वाह करतील. पण नशिबाने त्यांना साथ दिली आणि “बंदिनी” सारख्या चित्रपटांनी आणि त्यानंतरच्या “मिलन की बेला” सारख्या चित्रपटांनी त्यांना एक मजबूत पाय रोवले. राजेश आणि अमिताभ युगात धर्मेंद्रची लोकप्रियता राजेश खन्नाच्या सुपरस्टारडमने भरारी घेतली आणि अमिताभ बच्चनच्या “अँग्री यंग मॅन” व्यक्तिरेखेने प्रेक्षकांना मोहित केले, तरीही धर्मेंद्र त्यांचे खरे व्यक्तिमत्व राहिले. “शोले” मधील पाण्याच्या टाकीचा सीन अजूनही क्लासिक मानला जातो. “चुपके चुपके” मधील त्यांच्या कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांना चकित केले. धर्मेंद्रची लोकप्रियता कमी झालेली काळ क्वचितच आला असेल. ‘अपने’ पासून ‘रॉकी और रानी…’ पर्यंत दीर्घ काळानंतर, धर्मेंद्र 2007 मध्ये ‘अपने’ चित्रपटाद्वारे पडद्यावर परतले आणि त्यांनी सनी आणि बॉबीसोबतही त्यांची वेगळी ओळख कायम ठेवली. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ आणि ‘तेरी बातें में ऐसा उलझा जिया’ यासारख्या अलीकडील चित्रपटांमध्ये त्यांच्या उपस्थितीमुळे प्रेक्षकांशी भावनिक आणि प्रेमळ नाते निर्माण झाले. आता, त्यांच्या आगामी ‘एकिस’ चित्रपटातून, प्रेक्षकांना पुन्हा एकदा त्यांचा जुना आकर्षण पाहण्याची आशा आहे.

Dharmendra Passed Away : धर्मेंद्र यांची 51 रुपये मानधन घेऊन इंडस्ट्रीत प्रवेश अन् राजेश खन्ना, अमिताभ बच्चनच्या युगातही सुपरहिट Read More »