DNA मराठी

#SanjayShirsat

eknath shinde political strategy

रोकडबॅग, बार परवाना प्रकरणावर पडदा; मंत्रिपद अबाधित

मुंबई | प्रतिनिधी Maharashtra Politics – राज्य मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप झाल्यानंतरही त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवण्यात आल्याने सत्ताधाऱ्यांच्या नैतिक भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या दोघा मंत्र्यांना दिलेल्या थेट व अप्रत्यक्ष समर्थनामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. राज्यातील दोन मंत्र्यांवर सध्या वादंग निर्माण झाला आहे. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ (Sanjay Shirsath) यांचा रोकड भरलेली बॅग असलेला व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला असून, त्यांच्या खाजगी बेडरूममधील दृश्यावरून विरोधकांनी तीव्र आक्षेप नोंदवत तातडीने राजीनाम्याची मागणी केली. दुसरीकडे, गृह राज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्या मातोश्रींच्या नावावर वादग्रस्त डान्स बारचे परवाने असल्याची माहिती समोर आल्यानंतरही सरकारने या दोन्ही प्रकरणांवर केवळ तोंडी समज देऊन विषय मिटवण्याचा प्रयत्न केला. यामुळे सत्ताधाऱ्यांच्या नैतिकतेच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. रोकडबॅग प्रकरणातील शिरसाठ सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ (Sanjay Shirsath) यांचा रोकड भरलेली बॅग असलेला व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल झाला होता. बेडरूममधील दृश्यावरून विरोधकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आणि मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. परंतु  सरकारने या प्रकरणाला “खाजगी स्वरूपाचं” ठरवत केवळ तोंडी समज देऊन विषय संपवला. बार परवाना प्रकरणातील कदम दुसरीकडे, गृह राज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्या मातोश्रींच्या नावावर कांडिवली परिसरातील एका वादग्रस्त डान्स बारचा परवाना असल्याची बाब उघडकीस आली. पोलिसांच्या कारवाईनंतर परवाने परत घेण्यात आले असले, तरी या प्रकरणाने नैतिकतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला. यावरही विरोधक आक्रमक झाले होते, दिल्ली दौऱ्यानंतर निर्णय या दोन्ही प्रकरणांमुळे सत्ताधाऱ्यांवर दबाव वाढत असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ दिल्ली गाठून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली. शहा यांच्याशी झालेल्या चर्चेनंतरच संबंधित मंत्र्यांवर कोणतीही कारवाई न करण्याचा निर्णय झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे या भेटीचा व या प्रकरणांच्या हाताळणीचा संबंध असल्याचा संशय अधिकच बळावला आहे. पक्षांतर्गत समज आणि इशारा संपूर्ण गदारोळानंतर शिंदे यांनी आपल्या गटातील मंत्र्यांना आणि आमदारांना बंद दरवाजामागील बैठकीत सुनावलं. “तुमचं वर्तन जनतेच्या अपेक्षांना धरून नसेल, तर बोट माझ्यावर येतं. जबाबदारीने वागा,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिल्याचं सांगितलं जात आहे. विरोधकांचा सवाल या प्रकारानंतर विरोधी पक्षनेते आणि इतर नेत्यांनी सरकारच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत टीकास्त्र सोडलं आहे. “सत्ताधाऱ्यांच्या रक्षणासाठी केंद्राचा वापर होत असल्याचं हे स्पष्ट उदाहरण,” अशी प्रतिक्रिया विरोधी नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. सत्ताधाऱ्यांच्या संरक्षणामुळे हे दोघेही मंत्री सध्या तरी मंत्रिपदावर कायम आहेत. मात्र, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणांचा जनतेच्या मनावर काय परिणाम होतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

रोकडबॅग, बार परवाना प्रकरणावर पडदा; मंत्रिपद अबाधित Read More »

sanjay shirsat vs rohit pawar

“सरकारी पैसा कुणाच्याही बॅग भरण्यासाठी नाही” – रोहित पवार

तो निधी हा ‘मायबाप जनतेचा’ असतो. त्यामुळे सार्वजनिक तिजोरीतील पैशाचा विनियोग करताना जबाबदारीने आणि अत्यंत सजगतेने वर्तन करणं हे प्रत्येक मंत्र्याचं नैतिक कर्तव्य आहे,” अहिल्यानगर  : राज्याचे मंत्री संजय शिरसाठ यांच्या एका कार्यक्रमातील विधानावरून नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. त्यांचं विधान असं सुचवणारे आहे की जणू सार्वजनिक निधीचा वाटप वैयक्तिक अधिकारासारखा केला जातो, अशा पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी अत्यंत परखड शब्दांत प्रतिक्रिया देत शिरसाठांवर हल्लाबोल केला आहे. राज्यातील महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. अलीकडेच सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा वाद उफाळून आला आहे. यापूर्वीही अनेक मंत्री त्यांच्या बेजबाबदार वक्तव्यांमुळे चर्चेत आले असून, आता त्यात शिरसाट यांची भर पडली आहे. शनिवारी अकोल्यात आयोजित सामाजिक न्याय भवनाच्या उद्घाटन सोहळ्यात बोलताना मंत्री शिरसाट म्हणाले, “वसतिगृहासाठी पाच, दहा, पंधरा कोटींचा निधी मागा. नाही दिला तर नाव सांगणार नाही. सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?“ त्यांच्या या विधानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, त्यावरून टीकेची झोड उठली आहे. त्यावर रोहित पवार यांनी जोरदार टीका केली आहे. “मंत्री काही काळासाठी त्या पदावर असतात. ते विसरतात की ते ज्या निधीचा वापर करत आहेत तो त्यांच्या खाजगी घरून आलेला नसतो. तो निधी हा ‘मायबाप जनतेचा’ असतो. त्यामुळे सार्वजनिक तिजोरीतील पैशाचा विनियोग करताना जबाबदारीने आणि अत्यंत सजगतेने वर्तन करणं हे प्रत्येक मंत्र्याचं नैतिक कर्तव्य आहे,” असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. ते पुढे म्हणाले की, “हा पैसा कुणाच्या ‘बॅग भरण्यासाठी’ नाही. हा पैसा लोकांचे कररूपाने सरकारकडे जमा होतो, आणि त्याचा वापर लोकांच्या भल्यासाठीच व्हायला हवा. मंत्रिपद ही हुकूमशाही करण्याची जागा नाही. ते एक जबाबदारीचं पद आहे, आणि त्यावर असलेल्या व्यक्तींनी विनम्रता, पारदर्शकता आणि शिस्तबद्धता पाळावी, ही अपेक्षा जनतेला असते.” राजकीय प्रतिक्रिया आणि वातावरण या वक्तव्यानंतर सत्ताधाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली असून, मंत्री संजय शिरसाठ यांच्या विधानाचे स्पष्टीकरण अद्याप अधिकृतपणे समोर आलेले नाही. मात्र रोहित पवारांच्या परखड आणि थेट शब्दांनी सत्ताधाऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील विरोधकांनी देखील शिरसाठ यांच्या विधानावरून टीकेची झोड उठवली आहे. अनेकांनी सोशल मीडियावर सरकारकडून जनतेच्या पैशाचा वापर कशा पद्धतीने होत आहे, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. रोहित पवारांच्या वक्तव्याने सरकारच्या धोरणांवर आणि मंत्र्यांच्या वागणुकीवर गंभीर चर्चा सुरु झाल्या आहेत.

“सरकारी पैसा कुणाच्याही बॅग भरण्यासाठी नाही” – रोहित पवार Read More »

saturn's support to quell the political sade sati of ministers

मंत्र्यांची राजकीय साडेसाती शमवण्यासाठी शनि पूजनाचा आधार

मुंबई / नंदुरबार / शनिशिंगणापूर – राज्यातील दोन मंत्र्यांनी, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) – शनिदेवाच्या चरणी नतमस्तक होत.  राजकीय वाद, आरोप आणि संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर शांतीसाठी शनिपुढे शरणागती पत्करली आहे. यामुळे ‘राजकीय साडेसाती’ टाळण्याचा अध्यात्मिक मार्ग शोधला जात असल्याची जोरदार चर्चा सुरू झाल्या आहे. माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) रमी प्रकरण, ‘शासन भिकारी’ विधान, आणि आता शनी पूजन, जोरात माणिकराव कोकाटे यांनी नंदुरबार येथील शनि मंदिरात विशेष पूजा केली. विधानसभेत अधिवेशन चालू असताना मोबाईलवर ऑनलाईन रमी खेळल्याचा व्हिडीओ राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार व्हिडिओ x वर   व्हायरल केला होता. त्यामुळे राज्याच्या राजकारणात वादळ उठले होते. त्यावर काँग्रेस, शिवसेना (उद्धव गट) आणि इतरांनी त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी थेट  साडेसातीमुक्तीसाठी शनिदेवाला साकडं घातलं. त्यातच कोकाटे यांनी केलेलं वादग्रस्त विधान – “शासनच भिकारी आहे” – यामुळे त्यांच्यावर अधिक टीका झाली होती. सुप्रिया सुळे व शेतकरी संघटनांनी निषेध व्यक्त केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही यावर “योग्य ती कारवाई होईल,” असा सूचक इशारा दिला आहे. मंत्री संजय शिरसाट – शनिशिंगणापूरच्या देवळात भावनिक दर्शन, पण राजकीय सावट कायम तर दुसरीकडे, शिंदे गटातील मंत्री संजय शिरसाट यांनी कौटुंबिक संकटांबरोबरच त्यांची पैसेची बंग असलेला एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यावरूनही राजकरण चांगलेच तापले होते, त्यामुळे जकीय अडथळ्यांपासून सुटका मिळावी या हेतूने शनिशिंगणापूर येथे दर्शन घेतले. तेल अभिषेक, कुटुंबासह विधी, आणि आत्मिक शांतीसाठी प्रार्थना करताना त्यांची भावनिक स्थिती स्पष्ट जाणवत होती. मात्र, राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी कोकाटे व शिरसाट यांच्यावर टिकेचा बाण सोडला. “नेते संकटात आले की देवाची आठवण होते, पण जनतेसाठी कधी शरण जातात का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. राजकीय पार्श्वभूमी आणि विश्लेषण राज्यात मंत्रिमंडळ फेरबदलाची कुजबूज सुरू असताना, कोकाटे व शिरसाट यांचे शनिदर्शन ही केवळ श्रद्धा नसून राजकीय संकेतांची भाषा आहे, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. एका बाजूला अध्यात्मिक आसरा, तर दुसरीकडे विरोधकांचा रोष – हे समीकरण आगामी राजकीय घडामोडींचा प्रारंभ ठरू शकते

मंत्र्यांची राजकीय साडेसाती शमवण्यासाठी शनि पूजनाचा आधार Read More »