DNA मराठी

Sanjay Raut

raj – uddhav

मोठी बातमी! हिंदी सक्तीविरोधात राज-उद्धव एकत्र?

Raj Thackeray: राज्यातील राजकारणातील एक सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रतील शाळांत हिंदी सक्ती विरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत माहिती दिली आहे. खासदार संजय राऊत ट्विट करत ही माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रतील शाळांत हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघणार आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा फोटो शेअर केल्याने हिंदी सक्ती विरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यातील शाळांत हिंदी सक्ती विरोधात मनसेकडून 5 जुलै रोजी भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चात सर्व राजकीय पक्ष सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे देखील या मोर्चात राज ठाकरे यांच्यासोबत सहभागी होणार असल्याचे संकेत खासदार संजय राऊत यांनी दिले आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून हिंदी सक्ती वरून राजकारण तापले असून मनसेसोबत इतर विरोधी पक्ष महायुती सरकारवर जोरदार टीका करत निर्णय मागे घेण्याची मागणी करत आहे. विद्यार्थ्यांना पहिलीपासून हिंदी भाषा शिकण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला असून या निर्णयावरून विरोधक सरकारवर निशाणा साधत आहे.

मोठी बातमी! हिंदी सक्तीविरोधात राज-उद्धव एकत्र? Read More »

Girish Mahajan

उद्धव ठाकरेंचा पक्ष जमीन दोस्त होण्याच्या मार्गावर; मंत्री गिरीश महाजन भडकले

Girish Mahajan on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा पक्ष जमीन दोस्त होण्याच्या मार्गावर असल्याची अशी टीका जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. ते आज नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. माध्यमांशी बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचा पक्ष जमीन दोस्त होण्याच्या मार्गावर आहे. संजय राऊत संघटनात्मक बैठक घेऊन गेले. पुढच्या आठ दिवसात बघा, त्यांच्याकडे कोण राहणार कोण राहणार नाही. संजय राऊत यांच्या बोलण्यामुळे स्वतः उद्धव ठाकरे देखील परेशान असतील. पण आता तो विषय आऊट ऑफ कंट्रोल झाला आहे. त्यांच्या बडबडीमुळे हा पक्ष आता मी सांगू शकत नाही, पक्ष संपवण्यासाठी संजय राऊत पुरेसे आहेत. संजय राऊत यांच्या बद्दल उत्तर देण्यासाठी काही पुरेसे नाही. अशी टीका मंत्री गिरीश महाजन यांनी ठाकरेंवर केली. माध्यमांशी पुढे बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, संजय राऊत यांना तुम्ही देखील जास्त प्रसिद्धी देऊ नये आणि त्यांना जास्त मनावर घेऊ नका. कोण अनाथ झाले कोणी दत्तक घेतले, लोक मतदान करतील. तुमची बडबड तुमचे विचार काय हे बघू .निवडणुकीला सामोरे या त्यानंतर आपण भेटू असं देखील यावेळी मंत्री गिरीश महाजन म्हणाले. तर यावेळी त्यांनी नाशिक पालकमंत्री पदाच्या वादावर देखील भाष्य केले आहे. यावेळी गिरीश महाजन म्हणाले की, पालकमंत्री पदावर मुख्यमंत्री महोदयांनी तुम्हाला उत्तर दिले आहे. मी त्यावर काही वेगळं बोलू शकत नाही. मी कुंभमेळा मंत्री आहे, मोठी जबाबदारी आहे त्या संदर्भात काम सुरू आहे.

उद्धव ठाकरेंचा पक्ष जमीन दोस्त होण्याच्या मार्गावर; मंत्री गिरीश महाजन भडकले Read More »

Anand Paranjape

… तर भांडूपच्या भोंग्यासाठी मेंटल हॉस्पिटलमध्ये एक ‘बेड’ बुक करु; आनंद परांजपे यांचा राऊतांवर हल्लाबोल

Anand Paranjape : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार प्रफुल पटेल यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर आता संजय राऊत यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी प्रत्युत्तर दिला आहे. भांडुपचा भोंगा दिल्लीवरून कर्णकर्कश आवाजात एखाद्या मानसिक रोग्यासारखा वाजला मात्र पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्याबद्दल त्याने तारतम्य बाळगून बोलावे नाहीतर ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये एक बेड भविष्यात बुक करु अशी टीका त्यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी गुरुवारी वक्फ बोर्डाच्या विधेयकावर भाषण करताना शिवसेनेचे जाज्वल्य हिंदूत्व जे शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात होते याची आठवण करून दिली आणि त्या भाषणाच्या मिरच्या इतक्या झोंबल्या की, हा भोंगा दिल्लीवरून कर्कश आणि खालच्या पातळीवर येऊन वाजला असेही आनंद परांजपे म्हणाले. शिवसेनेचे हिंदूत्व हे ‘गर्व से कहो हम हिंदू है…’ आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी मशीद पाडण्यात आली त्यावेळी माझ्या शिवसैनिकांनी मशीद पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे असे वक्तव्य केले होते आणि ज्यावेळी 92 – 93 मध्ये दंगली झाल्या त्यावेळी शिवसेनेच्या असलेल्या सहभागाबद्दल आठवण करून दिल्यानंतर केवळ आताची शिवसेना जी संजय राऊत यांनी कॉंग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या चरणी अर्पण केली आहे. ज्या प्रकारच्या शब्दांचा त्यांनी प्रयोग केला ते शब्द आम्ही बोलू शकतो मग संजय राऊत यांना कॉंग्रेसचे सर्टीफाईड ‘डॅशडॅशडॅश’ किंवा सिल्व्हर ओकचे सर्टीफाईड ‘डॅशडॅशडॅश’ हे आम्ही देखील बोलू शकतो. परंतु आमच्यावर ते संस्कार नाहीत. लोकसभा असेल किंवा राज्यसभा असेल ज्या गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये दोन्ही सभागृहात शिवसेनेची भाषणे झाली परंतु ही निराशेच्या व पराभवाच्या वैफल्यातून झाल्याचे सांगतानाच रोज पक्ष सोडून जे शिवसैनिक जात आहेत त्यांचा उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास कमी होतो आहे तो अधिक बळकट कसा होईल याचा संजय राऊत यांनी विचार केला तर ते अधिक योग्य राहील असा टोलाही आनंद परांजपे यांनी लगावला. पत्राचाळीची लॉटरी निघत आहे आणि ज्यांना या आरोपात ईडीची 8-9 महिने जेलवारी झाली आहे त्या संजय राऊत यांनी बोलताना तारतम्य बाळगावे. आरोप करणे खूप सोपे आहे. खासदार प्रफुल पटेल यांची साधी चौकशीही कधी लागली नाही. स्वतः संजय राऊत हे ईडीच्या जेलची वारी करुन आले आहेत. सध्या ते जामीनावर आहेत. त्यांनी उगाच वायफळ आरोप करु नये असा इशाराही आनंद परांजपे यांनी दिला.

… तर भांडूपच्या भोंग्यासाठी मेंटल हॉस्पिटलमध्ये एक ‘बेड’ बुक करु; आनंद परांजपे यांचा राऊतांवर हल्लाबोल Read More »

Sanjay Raut

आडवाणींना सत्तेपासून दूर ठेवले अन्…, राऊतांचा PM मोदींवर गंभीर आरोप

Sanjay Raut on PM Modi: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी लालकृष्ण आडवाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी आडवाणी यांची तुलना मुघल सम्राट शहाजहान यांच्याशी केली असून, त्यांना जिवंत असताना सत्तेपासून दूर ठेवण्यात आल्याचा आरोप केला. यासोबतच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीच्या मुद्द्यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आडवाणींना सत्तेपासून दूर ठेवले – राऊतांचा आरोपसंजय राऊत म्हणाले, “लालकृष्ण आडवाणी जिवंत असताना त्यांना शहाजहानाप्रमाणे कोंडून ठेवण्यात आले आणि नरेंद्र मोदी दोन वेळा पंतप्रधान झाले. मुघली संस्कृतीप्रमाणे त्यांना सत्तेपासून बेदखल करण्यात आले. तेव्हा आम्ही विचारले होते की, मुघली संस्कृतीप्रमाणे का वागले? आडवाणी यांचा पंतप्रधान आणि राष्ट्रपती पदावर हक्क होता. तो त्यांना का दिला नाही?” राऊत यांनी हा सवाल उपस्थित करत भाजपच्या अंतर्गत धोरणांवर टीका केली. मोदींची निवृत्ती आणि फडणवीसांचे मतराऊत यांनी पुढे नरेंद्र मोदी यांच्या वयाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, “17 सप्टेंबर 2025 रोजी नरेंद्र मोदी वयाची 75 वर्षे पूर्ण करणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कितीही वाटत असले तरी त्यांना निवृत्त व्हावे लागेल.” राऊत यांचे हे वक्तव्य फडणवीस यांच्या त्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर आले आहे, ज्यात त्यांनी मोदी 2029 पर्यंत पंतप्रधान राहतील, असे म्हटले होते. राऊत यांनी यावरून भाजपच्या नेत्यांमध्ये एकवाक्यता नसल्याचा दावा केला. भाजप-संघ संबंधांवर मौनभाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) यांच्यातील संबंधांबाबत राऊत यांनी भाष्य करण्याचे टाळले. ते म्हणाले, “भाजप आणि संघ यांच्यातील संबंध कसे असावे, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यावर माझ्यासारख्या बाहेरच्या माणसाने बोलण्याची गरज नाही.” राऊत यांनी यावर तटस्थ भूमिका घेतली असली तरी त्यांच्या इतर वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळात चर्चा तापली आहे. राजकीय वादाला तोंडराऊत यांच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा भाजप आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक सुरू होण्याची शक्यता आहे. आडवाणी यांना सत्तेपासून दूर ठेवण्याचा मुद्दा आणि मोदी यांच्या निवृत्तीचा प्रश्न यावर भाजप नेते काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. दरम्यान, या विधानांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा गरम झाले आहे.

आडवाणींना सत्तेपासून दूर ठेवले अन्…, राऊतांचा PM मोदींवर गंभीर आरोप Read More »

Sanjay Raut

Sanjay Raut: अनिल देशमुख सारख्या ज्येष्ठ नेत्यांवर हल्ला, याला जवाबदार सरकार आणि देवेंद्र फडणवीस, संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक करण्यात आली आहे. या हल्ल्यात माजी गृहमंत्री अनिल देशमुख गंभीर जखमी झाले आहे. तर आता या प्रकरणावरून खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाराष्ट्रातल्या राजकारणातले ज्येष्ठ नेते, अनेक वर्ष आमदार आणि मंत्री राहिलेले शरद पवारांचे खंदे समर्थक अनिल देशमुख यांच्यावर काल नागपूर मध्ये हल्ला झालाअत्यंत निर्गुण हल्ला झाला. आपण एक चित्र पाहिला असेल त्यांच्या डोक्यावर इतर भागात दगडफेकीमुळे ते रक्त बंबाळ झालेले आहे. काल ते अत्यावस्थत होते. असं संजय राऊत म्हणाले. पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, हल्ला करताना भारतीय जनता पक्षा कडून जिंदाबादच्या घोषणा दिल्या जात होत्या. राज्याच्या माजी गृहमंत्री त्याच्यावर ठार मारण्याचा हल्ला होतो. मुंबईमध्ये माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची हत्या होते आणि अनिल देशमुख सारख्या ज्येष्ठ नेत्यांवर माजी गृहमंत्री यांना ठार मारण्याचा प्रयत्न स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असलेल्या नागपुरात या राज्यातल्या कायदा सुव्यवस्था काढणारे हे ढिंडोरे आहे. त्याला जबाबदार शिंदे सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडवणीस आहे. आता निवडणूक काळामध्ये राज्याच्या प्रशासनाची सर्व सूत्र ही निवडणूक आयोगाकडे असतात. जर ही गृहमंत्र्यांचा हुकूम चालतो सध्या हे भाजपच्या काळामध्ये. निवडणूक आयोग त्यांच्याच हातामध्ये असतं आणि ते त्यांचीच माणसं असतात आणि काम करतात. देवेंद्र फडवणीस यांनी जवाबदारी स्वीकारली पाहिजे.असेही संजय राऊत म्हणाले. तर राज ठाकरे यांच्यावर टीका करत संजय राऊत म्हणाले की, राज ठाकरे हे किती वेळा बोलणार. राज ठाकरे हे गेले 25 वर्ष भारतीय जनता पक्षाने दिलेल्या स्क्रिप्ट वाचतात. कधी नारायण राणे, एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या स्क्रिप्ट वाचतात. शिवसेनेच्या बाबतीत गांभिर्याने घ्यायची गरज नाही. त्यांनी स्वतः पक्ष शिवसेना पक्ष सोडलेला आहे. आणि स्वतःचा पक्ष स्थापन केलेला आहे. ते नरेंद्र मोदी, अमित शहा आणि फडणवीस या महाराष्ट्रातल्या दुश्मनांना मदत होईल पूर्णपणे अशी भूमिका घेतल्यामुळे महाराष्ट्र त्यांना गांभीर्याने घेणार असं वाटत नाही. असं संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut: अनिल देशमुख सारख्या ज्येष्ठ नेत्यांवर हल्ला, याला जवाबदार सरकार आणि देवेंद्र फडणवीस, संजय राऊतांचा हल्लाबोल Read More »

Sanjay Raut

Sanjay Raut On PM Modi : ‘आम्ही आमचा रिमोट कंट्रोल दिला नाही, म्हणून…’ PM मोदींना संजय राऊतांचे प्रत्युत्तर

Sanjay Raut On PM Modi : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी प्रंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या शेवटच्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. तर आता या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत (ठाकरे गट) यांनी प्रत्युत्तर दिला आहे. माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की,महाराष्ट्रातील जनतेचा पंतप्रधानांच्या वक्तव्यावर विश्वास नाही. ही महाविकास आघाडी आहे. महाराष्ट्रात आम्ही तिघे एकत्र आहोत आणि तुमच्यापेक्षा सुरक्षित आहोत. पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या टिप्पणीवर त्यांनी पलटवार केला आणि रिमोट कंट्रोल कोणाच्या हातात आहे हे जनता ठरवेल असे म्हटले. मुंबईतील एका सभेला संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले होते की, महाविकास आघाडीच्या एका पक्षाने आपला रिमोट कंट्रोल काँग्रेसकडे सोपवला आहे. त्याचा संदर्भ उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे होता. त्यावर संजय राऊत म्हणाले की, शिवसेना फोडून तुम्ही जो वेगळा गट स्थापन केला आहे, त्याचे नियंत्रण तुमच्या हातात असेल, मात्र आम्ही आमचा रिमोट कंट्रोल भाजपकडे सोपवला नाही, त्यामुळे पंतप्रधान मोदी संतापले आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीतसंजय राऊत म्हणाले, जोपर्यंत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रश्न आहे, मी यापूर्वीही म्हटले आहे की 23 नोव्हेंबरनंतर कोणतीही महाआघाडी होणार नाही कारण मुख्यमंत्री नसतील. ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करणार नाही. त्यांना विरोधी पक्षनेतेपदही दिले जाणार नाही, कारण भाजपने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत केले आहे. राऊत म्हणाले, निवडणुकीनंतर आम्ही सरकार स्थापन करत आहोत. महायुतीला बहुमत मिळणार नाही. काय म्हणाले पीएम मोदी?गुरुवारी जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, मुंबई हे स्वाभिमानी शहर आहे, मात्र महाविकास आघाडीत समाविष्ट असलेल्या एका पक्षाने आपला रिमोट कंट्रोल बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करणाऱ्यांच्या हाती दिला आहे. मोदी म्हणाले, म्हणून मी त्यांना आव्हान दिले की, त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे गुणगान काँग्रेसला करावे. आजपर्यंत या लोकांना बाळासाहेबांची स्तुती करायला काँग्रेस आणि त्यांचे राजपुत्र जमले नाही. काँग्रेस सत्तेसाठी हतबल असून हा पक्ष पाण्याविना माशासारखा आहे, असे ते म्हणाले.

Sanjay Raut On PM Modi : ‘आम्ही आमचा रिमोट कंट्रोल दिला नाही, म्हणून…’ PM मोदींना संजय राऊतांचे प्रत्युत्तर Read More »

1000012656

MVA Seat Sharing : फॉर्मुला ठरला, मविआमध्ये काँग्रेसचं मोठा भाऊ, आज होणार घोषणा?

MVA Seat Shearing : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा फॉर्मुला ठरला असल्याची माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची मंगळवारी रात्री उशिरा बैठक झाली आणि विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप निश्चित झाले असल्याची माहिती मिळाली आहे. बुधवारी पत्रकार परिषद घेऊन घोषणा करणार असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले. महाराष्ट्रात उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, त्याची अंतिम तारीख 29 ऑक्टोबर आहे. जाणून घ्या सीट शेअरिंग फॉर्म्युलाकाँग्रेस 105 जागा, शिवसेना (UBT) 95 आणि NCP (शरदचंद्र पवार) 84 जागांवर निवडणूक लढवणार आहे. मात्र आतापर्यंत या वृत्ताला कोणत्याही महाविकास आघाडीच्या नेत्याने दुजोरा दिला नाही. उर्वरित जागा महायुतीत समाविष्ट असलेल्या छोट्या पक्षांना दिल्या जातील. शिवसेना (यूबीटी) आणि काँग्रेस यांच्यातील चर्चेला भिडल्यानंतर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रथम राष्ट्रवादीचे (शारदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार आणि नंतर शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. थोरात आणि इतर एमव्हीए नेत्यांनी नंतर पुन्हा भेट घेतली. थोरात म्हणाले की, एआयसीसीचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी पवार आणि ठाकरे यांची भेट घेण्यास सांगितले होते.

MVA Seat Sharing : फॉर्मुला ठरला, मविआमध्ये काँग्रेसचं मोठा भाऊ, आज होणार घोषणा? Read More »

Sanjay Raut

Sanjay Raut: पुन्हा राजकीय भूकंप, शिंदे सरकार पडणार? संजय राऊत राऊतांचा दावा 

Sanjay Raut : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा करत राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप येणार असून लवकरच शिंदे सरकार पडणार असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. राऊत मुंबईत कार्यकर्त्यांच्या सभेला संबोधित करत होते. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्रातील सरकार 3 महिन्यात बदलणार आहे. यासोबतच नव्या सरकारचे शिल्पकार उद्धव ठाकरे असतील, असेही ते म्हणाले. यावेळी संजय राऊत यांनी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत पक्षाच्या नेत्यांशी विचारमंथन केले. तर दुसरीकडे विधान परिषदेच्या निवडणुकामुळे राज्यात राजकीय वातावरण तापला आहे. महाविकास आघाडीकडून तीन जागांवर ठाकरे गट तर एक जागेवर काँग्रेसने उमेदवार दिला आहे.  काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघातील आगामी एमएलसी निवडणुकीसाठी शिवसेनेने (यूबीटी) उमेदवारांच्या घोषणेवर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेसने उद्धव सेनेला आपल्या उमेदवारांची नावे मागे घेण्यास सांगितले होते. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले होते की, ‘महाविकास आघाडीच्या  साथीदारांशी चर्चा न करता उद्धव ठाकरे यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी आपला उमेदवार ठरवला.  घटक पक्षांशी चर्चा करूनच उमेदवार आणि जागा निश्चित होतील, अशी आम्हाला आशा होती. मात्र, नंतर परस्पर संमतीने दोघांमध्ये जागा वाटून घेण्यात आल्या. उद्धव यांचे उमेदवार तीन जागांवर तर काँग्रेस एका जागेवर आपले उमेदवार उभे करणार आहे.

Sanjay Raut: पुन्हा राजकीय भूकंप, शिंदे सरकार पडणार? संजय राऊत राऊतांचा दावा  Read More »

Prakash Ambedkar

Lok Sabha Election 2024 : निवडणुकीची घोषणा मात्र MVA मध्ये जागावाटपावरून रस्सीखेच! प्रकाश आंबेडकरांना अल्टिमेटम, आजच निर्णय घ्या नाहीतर….

Lok Sabha Election 2024 : निवडणूक आयोगाने लोकसभा 2024 च्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केले आहे. देशात यावेळी 7 टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुका पार पडणार आहे. यासाठी आतापर्यंत अनेक उमेदवारांच्या नावांची घोषणा देखील करण्यात आली आहे मात्र राज्यात अद्याप महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागा वाटपाबाबत  निर्णय झालेला नाही.   MVA ने वंचित बहुजन आघाडी प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना युतीमध्ये सामील होण्याची शेवटची संधी दिली आहे. विरोधी आघाडी MVA मध्ये काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना (UBT) आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील NCP यांचा समावेश आहे.  प्रकाश आंबेडकरांनी जास्त जागांच्या मागणीमुळे एमव्हीएमध्ये सहभागी असलेल्या पक्षांचे जागावाटपाचे गणित बिघडल्याची चर्चा आहे. दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून राजकीय तापमान आणखी वाढवले ​​आहे. संविधान निर्माता बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्यावर टीका करत काँग्रेसला 7 जागांवर उघड पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. आपला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्यावरील विश्वास उडाला आहे, असा आरोप आंबेडकरांनी आपल्या पत्रात केला आहे. वृत्तानुसार, MVA ने VBA ला आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आपला निर्णय कळवण्याचा अल्टिमेटम दिला आहे. MVA ने प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाला 4 जागा देऊ केल्या आहेत. त्या चार जागा स्वीकारार्ह आहेत की नवीन प्रस्ताव द्यायचा आहे का, हे आजच VBA ला स्पष्ट करण्यास सांगितले आहे.  MVA आज जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर करू शकते. शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत म्हणाले की, व्हीबीएने आम्हाला 27 जागांची यादी दिली होती, त्यापैकी आम्ही त्यांना चार जागा देऊ केल्या आहेत. त्यांना काय हवे आहे ते त्यांनी सांगावे… त्यांच्यासाठी महाविकास आघाडीचे दरवाजे खुले आहेत.

Lok Sabha Election 2024 : निवडणुकीची घोषणा मात्र MVA मध्ये जागावाटपावरून रस्सीखेच! प्रकाश आंबेडकरांना अल्टिमेटम, आजच निर्णय घ्या नाहीतर…. Read More »