DNA मराठी

Sangram Jagtap

कबर नसलीच पाहिजे…, संग्राम जगतापांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

Sangram Jagtap on Raj Thackeray: गुढीपाडव्याच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या भाषणानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. “कबर ठेवली पाहिजे” असे विधान करत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. मात्र, त्यांच्या या वक्तव्यावर आता विरोधी नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. संग्राम जगताप यांची परखड प्रतिक्रिया – अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी या मुद्द्यावर थेट प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “कबर ही नसलीच पाहिजे, असे तमाम हिंदूंचे मत आहे. त्यामुळे कोण काय सांगत आहे, त्यापेक्षा सत्य परिस्थिती काय आहे हे महत्त्वाचे आहे.” त्यांनी असा दावाही केला की, “या संदर्भात अपूर्ण माहिती दिली जात असून, आम्ही येणाऱ्या काळात थडगे ठेवणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली आहे.” त्यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वातावरण अधिक तापले आहे. शिवसेनेवर हल्लाबोल – संग्राम जगताप यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. “जोपर्यंत बाळासाहेब ठाकरे जिवंत होते, तोपर्यंत हिंदुत्व हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे होते. मात्र, शिवसेनेने काँग्रेससोबत हातमिळवणी केल्यानंतर आता त्यांना हिंदुत्व महत्त्वाचे वाटेनासे झाले आहे,” असा आरोप त्यांनी केला. “त्यामुळे संजय राऊत यांच्या वक्तव्याला फारसे महत्त्व देण्याची गरज नाही,” असेही ते म्हणाले. राजकीय वातावरणात तणाव राज ठाकरे यांच्या भाषणानंतर राज्यात हिंदुत्व आणि धार्मिक विषयांवर नवी चर्चा सुरू झाली आहे. विरोधी पक्षांचे नेते यावर तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी हे वक्तव्य राजकीय फायद्यासाठी असल्याचा आरोप केला आहे, तर काहींनी याला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे आगामी काळात या मुद्द्यावर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. पुढील राजकीय घडामोडींची शक्यता राज ठाकरे यांच्या भूमिकेवरून मनसे अधिक आक्रमक होत असल्याचे स्पष्ट होते. दुसरीकडे, भाजप आणि मनसे यांच्यातील वाढते संबंधही यामुळे चर्चेत आले आहेत. संग्राम जगताप यांची भूमिका ही हिंदुत्ववादी राजकारणाला पूरक असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे या वक्तव्यांमुळे आगामी निवडणुकांवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः, शिवसेनेला या टीकेला कसे प्रत्युत्तर देता येईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. शिवसेनेच्या गटातील नेते आणि कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या समर्थनार्थ भूमिका मांडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसही या वादात भूमिका घेत विरोधी गटाच्या रणनीतीवर टीका करू शकतात. निष्कर्ष राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याच्या भाषणानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन वादंग निर्माण झाला आहे. संग्राम जगताप यांच्या प्रतिक्रियेमुळे हा वाद अधिकच पेटण्याची शक्यता असून, आगामी काळात याचा परिणाम निवडणूक रणनीतींवर होऊ शकतो. हिंदुत्वाचा मुद्दा आगामी राजकीय समीकरणांसाठी कसा महत्त्वाचा ठरतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

कबर नसलीच पाहिजे…, संग्राम जगतापांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल Read More »

Sangram Jagtap: महापुरुषांच्या विरोधात बोलणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी कायदा करण्याची गरज; आमदार संग्राम जगताप

Sangram Jagtap: 19 फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या पवित्र सोहळ्याचा एक भाग म्हणून अहिल्यानगरमध्ये पारंपारिक पद्धतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये ढोल-ताशाच्या गजरात मिरवणुका, शिवजन्म सोहळा आणि महाराजांना मानवंदना देण्याचे कार्यक्रम समाविष्ट होते. अहिल्यानगरमधील शिवजयंती उत्सवात मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते. यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी महापुरुषांच्या विरोधात बोलणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी कायदा करण्याची गरज अधोरेखित केली. त्यांनी या संदर्भात बोलताना असे म्हटले, “छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आणि देशाचे महापुरुष आहेत. त्यांच्या विरोधात बोलणे हे निश्चितपणे अनुचित आहे. अशा व्यक्तींवर कडक कारवाई करण्यासाठी कायदा असणे आवश्यक आहे जेणेकरून भविष्यात असे प्रकार टाळता येतील.” या कार्यक्रमादरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनीही उपस्थिती लावली आणि तलवारबाजीचे प्रात्यक्षिक दाखवले. यावेळी “जय भवानी, जय शिवाजी… हर हर महादेव” अशा घोषांनी वातावरण गुंजून गेले. वाहतूक व्यवस्था आणि सुविधाशिवनेरी किल्ल्यावर होणार्‍या शिवजयंती उत्सवासाठी पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी विशेष वाहतूक व्यवस्था करण्याचे आदेश जारी केले होते. नारायणगावहून जुन्नरकडे येणारी वाहतूक घोडेगाव फाटा-खानापूर कॉलेज-धामणखेल मार्गे ताठेड पार्किंग लॉटकडून शिवनेरी किल्ल्यावर जाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. गणेशखिंड-बंकाफाटा-ओतूर मार्गे येणारी वाहने मुंढे माध्यमिक शाळा आणि आजूबाजूच्या परिसरात असलेल्या पार्किंगमध्ये पार्क करतील, असे निर्देश होते. सांस्कृतिक कार्यक्रम आणि सुविधाशिवजयंती निमित्त विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. रायगडावरही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी या कार्यक्रमांमध्ये उपस्थिती लावली होती. निर्मिती आणि स्वच्छतासोलापूरच्या कलाकारांनी 21000 बटनांपासून छत्रपती शिवाजी महाराजांची अनोखी प्रतिमा साकारली होती. याव्यतिरिक्त, जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी शिवनेरी, राजगड आणि पुरंदर सारख्या किल्ल्यांची स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी आणि मोठ्या संख्येने येणाऱ्या अनुयायांसाठी योग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते.

Sangram Jagtap: महापुरुषांच्या विरोधात बोलणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी कायदा करण्याची गरज; आमदार संग्राम जगताप Read More »

Ahmednagar News: सीना नदी, भिंगार नाल्याचे भाग्य उजाळणार, खोलीकरण व रुंदीकरणासाठी 20 कोटी मंजूर

Ahmednagar News: जास्त पाऊस पडला की पूर येऊन नगर शहरातील नदीच्या आजूबाजूच्या सखल वस्त्यांमध्ये पाणी शिरणे हे दरवषच्या पावसाळ्यात नियम झालेल्या सीना नदीला आता पाणी पोटात साठवून ठेवण्याचे भाग्य लाभणार आहे. तसेच भिंगार नाल्याचाही चेहरा उजाळणार आहे.  सीना नदीच्या पूररेषेची फेरआखणी करण्याची आमदार संग्राम जगताप यांची मागणी रुंदीकरण व खोलीकरण केल्याशिवाय करता येत नव्हती. तेव्हा आमदार जगताप यांनी त्यासाठी लागणाऱ्या निधीकरिता पाठपुरावा केला व त्या पाठपुराव्याला यश येऊन राज्या शासनाच्या 15 व्या वित्त आयोगातून आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन योजनेअंतर्गत 20 कोटी 66 रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसे पत्र अहमदनगर महापालिकेला ऐन नवरात्रीच्या प्रारंभीच प्राप्त झाले आहे. नगर शहराच्या सीमेला लागून सीना नदी वाहते. नगर शहराभोवती तिची लांबी सुमारे 14 किलोमीटर आहे. परंतु सीना नदीच्या काठाने मानवी वस्त्या वाढत गेल्या तसेच नदीकाठच्या जमीनधारकांनी अतिक्रमणही केले आणि नदीचे पात्र आकसत गेले. त्यातून नदीला एखाद्या ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले. सीना नदीला पूर येणे हे तशी औत्सुक्याची बाब. एक तर नगर जिल्ह्यात एखाद्या वषच पावसाची कृपा असते. नेहमी अवर्षणच असते. कधी तरी सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडला की सीना नदीला पूर येतो.  पाऊस जास्त झाला की आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरते व तेथील रहिवाशांची त्रेधातिरपीट उडते. यंदाच्या पावसाळ्यातही तशी परिस्थिती उद्भवली होती. वारंवार होणारी ही स्थिती व नागरिकांचे हाल टाळण्यासाठी सीना नदीची पूररेषा आखून नियोजन करणे आवश्यक होते. त्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी नगर महापालिका व जिल्हाधिकारी यांच्यासह 2023 मध्ये संयुक्त बैठक घेतली होती. त्या बैठकीत सांगोपांग चर्चाही झाली.  आमदार जगताप यांनी महसूल व वनविभागाच्या अंतर्गत आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडे याबाब कैफीयत मांडली. या विभागाने राज्याच्या जलसंपदा विभागाकडे याबाबत मत मागविले होते. जलसंपदा विभागाने पूररेषेची फेरआखणी करण्यासाठी काय करावे लागणार याबाबत सूचना केल्या. सीना नदीचे रुंदीकरण व खोलीकरण अगोदर करायला हवे तरच पूररेषेची आखणी करता येईल असे या विभागाने सांगितले. या नदीवर शहर व शहराजवळ असलेल्या पुलांच्या लांबीरुंदीचे गणितही पाहणे गरजेचे आहे. सीना नदीची मूळ वहनक्षमता पुनर्स्थापित करावयाची असल्यास नदीपात्रात साचलेला गाळ काढणे, अतिक्रमण काढणे, गरजेचे आहे. काढलेला गाळ नदीकिनारी टाकून नगर शहराचे सुशोभिकरण करता येईल असे महापालिकेने म्हटले होते. त्यावरून किनारी रस्ता (कोस्टल रोड) तयार करता येऊ शकतो. त्यातून नदीचे मूळ पात्र पुनर्स्थापित होऊन त्या पात्रात पाऊस व अन्य पाण्याचा विसर्ग किती बसू शकतो ही लक्षात येईल. त्यासाठी महापालिकेच्या हद्दीतील 10 किलोमीटर लांब नदीचे खोलीकरण व रुंदीकरण होणे अत्यंत गरजेचे असल्याचे महापालिकेने म्हटले होते.  तशी शहराभोवतालची नदीची लांबी 14 किलोमीटर आहे. या भागात तिची प्रस्तावित रुंदी 20 ते 30 मीटर व प्रस्तावित खोली चार मीटर आहे. पूव 09.70 किलोमीटर लांबीचे काम झाले असले तरी उर्वरीत पुरे करावयाचे आहे. नदीचे रुंदीकरण व खोलीकरणासंदर्भात प्रकल्प मूल्यमापन समिती, राज्य कार्यकारी समिती, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, तांत्रिक मूल्यमापन समिती यांच्या बैठका झाल्या. दिल्लीतील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचना आदींचा विचार करून 15व्या वित्त आयोगामार्फ आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन योजनेअंतर्गत सीना नदीचे खोलीकरण व रुंदीकरण तसेच भिंगार नाल्याचेही खोलीकरण व रुंदीकरण या कामांसाठी 20 कोटी 66 रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आमदार संग्राम जगताप यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून सीना नदी व भिंगार नाल्याचे भाग्य त्यामुळे उजाळणार आहे. नगरमध्ये विकास कामांचा महासंग्राम कोरोना काळात नगर शहरातील विकास कामे काही प्रमाणात थांबली होती. परंतु, त्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून नगर शहरात विविध कामांसाठी भरीव निधी आणला. या निधीतून वाडिया पार्क, शहरातील अंतर्गत रस्ते, उपनगरातील रस्त्यांची कामे सुरु झाली आहेत. उद्यानांसाठी सहा कोटींचा निधी मिळाल्यामुुळे शहराच्या विकासात मोठी भर पडणार आहे. तसेच सीना नदी, भिंगारनाला सुशोभिकरणासाठी 20 कोटींचा निधी मिळाल्याने नगर शहराचे रुपडे बदलणार असल्याचे दिसून येत आहे. सीना नदी अतिक्रमणमुक्त होणार सीना नदी पात्रातील अतिक्रमण व गाळामुळे पावसाळ्यात पुराचे पाणी नागरी वसाहतींमध्ये शिरते. यंदाही पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरलेे. पुराच्या पाण्याची आमदार संग्राम जगताप यांनी पाहणीही केली होती. पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याची आ. जगताप यांनी गांभीर्याने दखल घेत सीना नदी सुशोभिकरण व अतिक्रमण मुक्त, रुंदीकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मदत पुर्नवसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला. याबाबत आ. जगताप तीन वर्षांपासून प्रयत्नशील होते. सीना नदीतील गाळ व अतिक्रमणे काढल्यास पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरणार नाही. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पूर नियंत्रण निळ्या व लाल रेषेचा विषय मार्गी नागपूर, बोल्हेगाव, सावेडी, बालिकाश्रम रोड, नालेगाव, ठागणे मळा, काटवण खंडोबा रोड, स्टेशन भाग, पुणे महामार्ग, फुलसौंदर मळा, बाबर मळा या भागात पूर नियंत्रण रेषेचा विषय माग लागत नव्हता. परंतु, आमदार संग्राम जगताप यांच्या अथक प्रयत्नानंतर सीना नदी लगत असलेल्या पूर नियंत्रण निळ्या व लाल रेषेचा विषय माग लागला आहे. त्यामुळे जागा मालकांना आता जागा डेव्हलप करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Ahmednagar News: सीना नदी, भिंगार नाल्याचे भाग्य उजाळणार, खोलीकरण व रुंदीकरणासाठी 20 कोटी मंजूर Read More »

Sangram Jagtap : अट्टल गुन्हेगारांवर धाडसी कारवाईची गरज – आमदार संग्राम जगताप

Sangram Jagtap :  अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यामध्ये काही दिवसापूर्वी वकील दांपत्याचे अपहरण करून निर्गुण हत्या करण्यात आली होती.  यानंतर या घटनेच्या निषेधार्थ जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा  काढण्यात आला होता, यात अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप सहभागी झाले होते.  त्यांनी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांची भेट घेत जिल्ह्यातील अट्टल गुन्हेगारांवर पोलिसांनी धाडसी कारवाईची करण्याची खरी गरज आहे तसेच वकील दांपत्याच्या हत्येचा खटला फास्ट ट्रक कोर्टात चालवावा आणि सरकारी वकील म्हणून ऍड. उज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी केली.  तसेच लवकरच वकिलांचा प्रलंबित असलेला वकील संरक्षण कायदा मंजूर करण्यासाठी अधिवेशनात लेखी स्वरूपाचा प्रश्न उपस्थित करणार असल्याची माहिती दिली.  सराईत गुन्हेगारांवर यापूर्वीच पोलिसांनी कारवाया केल्या असत्या तर अशा स्वरूपाच्या घटना घडल्या नसत्या, समाजविघातक लोकांना कायद्याचा धाक दाखवणे गरजेचे आहे, या घटनेचा निषेध करत वकिलांच्या तीव्र भावना शासन दरबारी मांडणार असून तुम्ही जिल्ह्याचे प्रमुख असून या घटनेचा अहवाल शासनाकडे पाठवावा अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली.

Sangram Jagtap : अट्टल गुन्हेगारांवर धाडसी कारवाईची गरज – आमदार संग्राम जगताप Read More »