DNA मराठी

Road Accident

pankaj ashiya

Pankaj Ashiya : अपघातप्रवण ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करा; जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे आदेश

Pankaj Ashiya : जिल्ह्यातील अपघातप्रवण ठिकाणी संबंधित विभागांनी समन्वय साधून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, विनापरवानगी उभारलेले गतीरोधक तत्काळ काढावेत आणि अधिकृत थांब्यांवरच वाहने थांबवण्याची व्यवस्था करावी, अशा ठोस सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा रस्ते सुरक्षा समितीच्या आढावा बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव, एस. आर. वर्पे, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी पवन टेंभुर्णे, पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, वसंत पंदरकर, अभिजित पोटे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, ‘‘वारंवार अपघात होणाऱ्या ठिकाणी विशेष लक्ष देऊन ड्रंक अँड ड्राईव्ह, रिफ्लेक्टर, हेल्मेट आदींची तपासणी करावी. अपघातस्थळी पोलीस, सार्वजनिक बांधकाम व परिवहन विभाग यांनी संयुक्तपणे पाहणी करून अपघातांचे विश्लेषण करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. ब्लॅकस्पॉटवरील अपघातांची माहिती घेऊन तेथे सुधारणा कराव्यात.’’ ‘‘अनेकदा अनधिकृत थांब्यावर बस थांबवल्या जातात, परिणामी अपघात होतात. यासाठी अधिकृत थांब्यांवरच बस थांबतील, याची दक्षता घ्यावी. प्रत्येक बसमध्ये तक्रार क्रमांक प्रदर्शित करावा,’’ अशाही सूचना त्यांनी दिल्या. ‘‘जिल्ह्यात अनेक ठिकाणी विनापरवानगी गतीरोधक उभारण्यात आले आहेत. या गतीरोधकांमुळे अनेकदा अपघात होतात. त्यामुळे ते काढून टाकावेत व आवश्यकतेनुसारच गतीरोधक ठेवावेत. गतीरोधकांच्या ठिकाणी रिफ्लेक्टर व सूचना फलक बसवावेत. बीओटी तत्त्वावरील रस्त्यांच्या दुरुस्त्यांची जबाबदारी संबंधित कंत्राटदारांची आहे. आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्त्या करण्याच्या सूचना संबंधित कंत्राटदारांना द्याव्यात,’’ असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

Pankaj Ashiya : अपघातप्रवण ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करा; जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे आदेश Read More »

Road Accident: बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 6 जणांचा जागीच मृत्यू, 32 जखमी

Road Accident: हैदराबाद-विजयवाडा महामार्गावर आज पहाटे एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.  आंध्र प्रदेशातील बापटला जिल्ह्यात हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. बापटलाहून हैदराबादकडे जाणाऱ्या बसची ट्रकला धडक बसली. या अपघातात 32 जण जखमी झाले असून, जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.   या धडकेमुळे लागलेली आग इतकी भीषण होती की बस आणि ट्रक पूर्णपणे जळून खाक झाले.    बसमध्ये 42 जण होते बापटला जिल्ह्यातील चिन्नागंजम येथून एक खासगी बस हैदराबादकडे जात होती. त्यानंतर हैदराबाद-विजयवाडा महामार्गावरील चिलकलुरीपेट मंडळाजवळ बस ट्रकला धडकली. अपघातानंतर दोन्ही वाहनांनी लगेच पेट घेतला. महामार्गावर झालेल्या या भीषण अपघातात ट्रक आणि बस चालकाचा मृत्यू झाला. बसमध्ये प्रवास करणाऱ्या अन्य चार जणांनाही आपला जीव गमवावा लागला. अपघाताच्या वेळी बसमध्ये 42 जण प्रवास करत असल्याचे जखमींनी सांगितले. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये एका 8 वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. मृतांची ओळख ठार झालेले लोक बापटला जिल्ह्यातील रहिवासी आहेत. मृतांमध्ये 35 वर्षीय बस चालक अंजी, 65 वर्षीय उपपगुंडूर काशी, 55 वर्षीय उपपगुंडूर लक्ष्मी आणि मुप्पाराजू ख्याती सासरी नावाच्या 8 वर्षीय मुलीचा समावेश आहे. उर्वरित दोन जणांची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या अपघातात 32 जण जखमी झाले आहेत. जखमींवर चिलकलुरीपेठ शहरातील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले.

Road Accident: बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 6 जणांचा जागीच मृत्यू, 32 जखमी Read More »