DNA मराठी

Milind Deora

milind deora

Milind Deora : दक्षिण मुंबईत आंदोलनांवर बंदी घालण्याच्या मिलिंद देवरा यांच्या पत्रावरून संताप; मराठी एकीकरण समितीची तीव्र प्रतिक्रिया

Milind Deora : राज्यसभेतील खासदार आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आझाद मैदानासह दक्षिण मुंबईतील ठिकाणी वारंवार होणाऱ्या आंदोलनांवर निर्बंध आणण्याची मागणी केली आहे. या पत्रात त्यांनी आंदोलनांचे ठिकाण दक्षिण मुंबईऐवजी इतरत्र हलवण्याची सूचना केली आहे. देवरांनी म्हटले आहे की, दक्षिण मुंबई हे राज्याच्या शासन, सुरक्षा आणि अर्थकारणाचे केंद्र असून, येथे मुख्यमंत्री सचिवालय (मंत्रालय), विधीमंडळ, मुंबई महानगरपालिका मुख्यालय, पोलिस दलाची कार्यालये तसेच वेस्टर्न नेव्हल कमांड यांसारख्या महत्वाच्या संस्था आहेत. त्यामुळे येथे होणाऱ्या मोठ्या आंदोलनांमुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनात व्यत्यय येतो आणि शासन, सुरक्षा तसेच खासगी क्षेत्राच्या कामकाजावर परिणाम होतो. म्हणूनच अशा आंदोलनांना इतर ठिकाणी हलवण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी पत्रातून स्पष्ट केले आहे. तथापि, या पत्रावरून मराठी भाषा एकीकरण समितीचे प्रमुख दीपक पवार यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे. त्यांनी म्हटले आहे, “बाप बदलला की विचार बदलतात असं नाही. हा आणि याचा सख्खा बाप यांचे विचार इतकेच मराठीद्वेष्टे होते. मिलिंद देवरा यांच्या पत्राची दक्षिण मुंबईतच होळी झाली पाहिजे.” देवरांच्या पत्रामुळे मराठी समाजात संतापाची लाट उसळली असून, आंदोलने हा लोकशाही हक्क असून त्यावर कुठल्याही प्रकारचे निर्बंध घालणे योग्य ठरणार नाही, असे मराठी संघटनांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस काय निर्णय घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Milind Deora : दक्षिण मुंबईत आंदोलनांवर बंदी घालण्याच्या मिलिंद देवरा यांच्या पत्रावरून संताप; मराठी एकीकरण समितीची तीव्र प्रतिक्रिया Read More »

पहलगाम हल्ल्यानंतरही ठाकरे कुटुंब परदेशात पर्यटनात मग्न, खासदार मिलिंद देवरांची सडकून टीका

Milind Deora : काश्मीरमधील पहलगामध्ये भारतीय पर्यटकांवर दहशतवादी हल्ल्यावर सहानुभूती न दाखवणाऱ्या ठाकरे परिवाराची प्रतिमा भूमीपूत्र ते भारताची पर्यटक अशी तयार झाली असल्याची सडकून टीका शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी केली. दिल्लीत ते पत्रकारांशी बोलत होते. पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी राजनैतिक दौरा सोडून तातडीने मायदेशी परतले मात्र उबाठा कुटुंब परदेशा सहलीचा आनंद घेण्यात मग्न आहे. पार्टटाइम राजकारणाला महाराष्ट्रात यापुढे थारा नाही, अशी टीका खासदार देवरा यांनी केली. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर काश्मीरात अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित परत आणण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगरला तातडीने गेले. त्यांनी पर्यटकांशी संवाद साधला आश्वस्त केले. महाराष्ट्रातील 500 हून अधिक पर्यटकांना शिंदे यांच्या तत्परतेने राज्यात सुखरुप आणण्यात आले. मात्र त्यावेळी ठाकरे कुटुंब युरोपात सुट्ट्यांचा आनंद घेत होते. पहलगाम हल्ल्यानंतर उबाठा परिवाराच्या सदस्यांनी सोशल मिडिया हॅंडलवरुन मेसेज केले, मात्र त्यांना मृतांच्या कुटुंबियांबाबत सहानुभूती व्यक्त करण्यास वेळ मिळाला नाही, असा टोला खासदार देवरा यांनी यावेळी लगावला. दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश शोकसागरात बुडाला असताना स्वत:ला भूमीपूत्रांचे कैवारी समजणारे उबाठा मागील दोन आठवड्यांपासून परदेशात आहेत, असे खासदार देवरा म्हणाले. केंद्र सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला देखील उबाठा गटाचा एकही खासदार उपस्थित राहिला नाही. नुकताच 1 मे रोजी महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या 106 हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठीही उबाठा कुटुंबाला वेळ मिळाला नाही. त्यांनी यासंदर्भात साधे ट्विट देखील केले नाही. त्यामुळे हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाण्याचे काम केवळ शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच करत आहेत, अशी खात्री महाराष्ट्रातील जनतेला झाली आहे. पर्यटकांप्रमाणे येऊन भारतात राजकारण करणे आणि इतर वेळ परदेशात राहणे, अशा प्रकारचे पार्टटाइम राजकारण यापुढे महाराष्ट्रात चालणार नाही, असे खासदार देवरा म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पार्टटाइम राजकारणाला दिल्लीतून हद्दपार केले आता महाराष्ट्रात पार्टटाइम राजकारणाला थारा नाही, असे खासदार देवरा म्हणाले.

पहलगाम हल्ल्यानंतरही ठाकरे कुटुंब परदेशात पर्यटनात मग्न, खासदार मिलिंद देवरांची सडकून टीका Read More »