DNA मराठी

Manoj Jarange health update

manoj jarange

Manoj Jarang – मी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार अन् आरक्षण मिळवून देणार; मनोज जरांगे पाटील

मुंबई | प्रतिनिधी – Manoj Jarang – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी लढ्याची हाक दिली आहे. येत्या २९ ऑगस्टपासून मुंबईत आंदोलन उभारले जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी जरांगे राज्यभर दौरे करून बैठकांचे आयोजन करत आहेत. मात्र काल नांदेडमध्ये दौऱ्यादरम्यान त्यांची अचानक प्रकृती बिघडल्याने क्षणभर गोंधळ उडाला होता. माध्यमांशी बोलताना जरांगे म्हणाले, “सकाळपासून सलग बैठका सुरू होत्या. घाम आला, चक्कर आली. सतत उपोषण आणि उपाशी राहिल्यामुळे अशक्तपणा वाढला आहे. शरीर झिजले, यात वेदना आहेत. तरीही मी हटणार नाही. समाजाच्या भवितव्यासाठी हा लढा आहे. माझ्या वेदना मी समाजापुढे मांडत नाही.” आपल्या निर्धाराबद्दल बोलताना ते म्हणाले, “मला समाजाची लेकरं मोठी करायची आहेत. शेवटच्या श्वासापर्यंत मी लढणार. काहीही झालं तरी २९ तारखेची लढाई मी लढणार आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार. थकलो तरी जाणार, माझ्या शरीराला किंमत नाही. मेलो तरी चालेल, पण मागे हटणार नाही.” २९ ऑगस्टच्या आंदोलनाबाबत ते पुढे म्हणाले, “मी निघालो की सर्व मराठा समाज रस्त्यावर उतरेल. त्या दिवशी कुणीही घरात राहणार नाही. मोठ्या प्रमाणावर गर्दी होईल, आतापर्यंतच्या आंदोलनांपेक्षा पाचपट जास्त. कोणीही आडवा आला तरी मराठ्यांच्या ताकदीसमोर टिकू शकणार नाही.” मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नसतानाच जरांगे यांच्या या भूमिकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत. २९ ऑगस्टच्या आंदोलनाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Manoj Jarang – मी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार अन् आरक्षण मिळवून देणार; मनोज जरांगे पाटील Read More »

Manoj Jarange

Manoj Jarange :  मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा 5 वा दिवस, तब्येत बिघडली; नाकातून रक्तस्त्राव, कलम 144 लागू

Manoj Jarange : मराठा आरक्षण लागू करण्याच्या मागणीवरून अंतरवली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांनी 10 फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाचा आज पाचवा दिवस असून पाटील यांची प्रकृती बिघडली.  नाकातून रक्तस्त्राव गेल्या पाच दिवसांपासून अन्न सोडून दिल्याने त्यांची प्रकृती अधिकच बिघडली आहे. मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या जरांगे यांच्या नाकातून रक्त येत असल्याची बातमी आहे. असे असूनही ते पाणीही पीत नाही. पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांना पाणी पिण्याची विनंतीही केली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही.  मंगळवारी मनोज जरांगे यांचे हात थरथरत होते आणि त्यांना बोलण्यासही त्रास होत होता. त्यांची प्रकृती सातत्याने खालावत असल्याने प्रशासन चिंतेत आहे. मराठा संघटनांनी बंद पुकारला मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ मराठा संघटनांनी बंद पुकारला आहे. आज अहमदनगर, जालना, बीड, सोलापूर, बारामती, मनमाड, नाशिक येथील अनेक गावांमध्ये कामे ठप्प झाली आहेत. मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ आज उत्तर सोलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. सकाळपासून गावातील सर्व दुकाने बंद असून केवळ दूध व अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. कलम 144 लागू मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. अन्न व पाण्याअभावी त्यांची तबीयत खराब होत आहे. यामुळे ग्रामस्थ व इतर सहकारी त्यांना पाणी पिऊन उपचार करण्याची वारंवार विनंती करत आहेत.  तर दुसरीकडे खबरदारीचा उपाय म्हणून बीडमध्ये जिल्हा प्रशासनाकडून कलम 144 लागू करण्यात आले आहे. सोमवारी रात्री जालन्याचे जिल्हाधिकारी श्री कृष्णनाथ पांचाळ व पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी मनोज जरांगे  यांना पाणी पिण्याची विनंती केली. मात्र, जोपर्यंत सरकार अध्यादेश लागू करत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे मराठा कार्यकर्त्याने स्पष्टपणे सांगितले.   या प्रमुख मागण्या आहेत मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी करून अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी मनोज जरांगे  यांनी केली आहे. याच बरोबर राज्यभरातील मराठा आंदोलकांवर दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

Manoj Jarange :  मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा 5 वा दिवस, तब्येत बिघडली; नाकातून रक्तस्त्राव, कलम 144 लागू Read More »