DNA मराठी

latest news

Rain Alert : महाराष्ट्रासह ‘या’ भागात मुसळधार पावसाचा इशारा, अलर्ट जारी

Rain Alert: गुजरात, गोवा आणि महाराष्ट्राच्या काही भागात येत्या दोन ते तीन दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.  हवामान खात्याने म्हटले आहे की नवीन तीव्र दाबामुळे उत्तर-पश्चिम मध्य प्रदेश आणि लगतच्या पूर्व राजस्थानमध्ये पाऊस पडू शकतो. हवामान खात्याने सल्लागारात म्हटले आहे की पाऊस पश्चिम आणि नैऋत्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे, ज्याचा परिणाम दक्षिण राजस्थान आणि गुजरातवर होईल आणि नंतर 29 ऑगस्टपर्यंत सौराष्ट्र आणि कच्छपर्यंत पोहोचेल, त्यानुसार येथे हवामान खराब होण्याची शक्यता आहे. हवामान अद्यतनांनुसार, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, ओडिशा, गंगेच्या पश्चिम बंगाल आणि झारखंडसह इतर भागात मुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुसळधार पावसाचा इशारा व्यतिरिक्त, IMD ने जोरदार वाऱ्याचा इशारा देखील दिला आहे. मध्य प्रदेशात ताशी 50 किमी आणि दक्षिण राजस्थानमध्ये 60 किमी प्रतितास वेगाने वाऱ्याचा वेग वाहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मच्छिमारांसाठी IMD चा सल्ला भारतीय हवामान खात्याने मच्छिमारांना 30 ऑगस्टपर्यंत अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात, विशेषत: गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या आसपास जाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. गुजरातमध्ये पावसाचा रेड अलर्ट कोलकात्यात गेल्या 5-6 दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. पावसामुळे गुजरातमधील सखल भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शुक्रवारपर्यंत (29 ऑगस्ट) पावसामुळे 28 जणांना जीव गमवावा लागला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) गुजरातमध्ये पावसाबाबत रेड अलर्ट जारी केला आहे.

Rain Alert : महाराष्ट्रासह ‘या’ भागात मुसळधार पावसाचा इशारा, अलर्ट जारी Read More »

Laxman Hake : निवडणुकीत ओबीसी उमेदवारांनाच मतदान करा- लक्ष्मण हाके

Laxman Hake : ओबीसी आंदोलक  लक्ष्मण हाके यांचे नांदेडच्या लोहा येथे जंगी स्वागत करण्यात आले.ओबीसी जनजागृती साठी प्राध्यापक लक्ष्मण हाके हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. अनेक ठिकाणी ते ओबीसींचे मेळावे घेत आहेत.लोहा येथे देखील ओबीसी बांधवाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यासाठी ओबीसी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाजाने ओबीसींच्याच उमेदवारांना मतदान करावे.जर ओबीसी उमेदवार नसेल तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,अल्पसंख्याक उमेदवारांना ओबीसींनी मतदान करावे असे आवाहन प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी ओबीसी बांधवांनी केले आहे.  गेल्या काही दिवसांपूर्वी लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी उपोषण केला होता.

Laxman Hake : निवडणुकीत ओबीसी उमेदवारांनाच मतदान करा- लक्ष्मण हाके Read More »

Ahmednagar News: नितेश राणेंच्या अडचणीत वाढ, अहमदनगर अखंड मराठा समाजाकडून पोलीस अधीक्षकांना निवेदन

Ahmednagar News: अहमदनगर शहरात 01 सप्टेंबर रोजी रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ भाजप आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वात रॅली आणि सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र या सभेच्या माध्यमातून शहरातील सामाजिक सलोखा खराब होऊ नये यासाठी अहमदनगर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे अहमदनगर अखंड मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.  मालवण येथील राजकोट किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याविषयी घडलेल्या घटनेने शिवप्रेमी व अखंड मराठा समाजाच्या त्रीव भावन लक्षात घेवून या सभेच्या माध्यमातून सामाजिक सलोखा खराब होऊ नये याची खबरदारी घेण्यात आला अशी विनंती या निवेदनाद्वारे अहमदनगर अखंड मराठा समाजाकडून करण्यात आली.

Ahmednagar News: नितेश राणेंच्या अडचणीत वाढ, अहमदनगर अखंड मराठा समाजाकडून पोलीस अधीक्षकांना निवेदन Read More »

Ahmednagar News: जिल्हा परिषदेवर धडकला पोषण आहार कर्मचाऱ्यांचा संघर्ष मोर्चा

Ahmednagar News: श्रमिक मजदूर संघ शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्या वतीने शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेवर संघर्ष मोर्चा काढण्यात आला. पोषण आहार कर्मचाऱ्यांनी विविध प्रश्‍न व समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात जोरदार निदर्शने करून ठिय्या आंदोलन केले.  या मोर्चात जिल्ह्यातील पोषण आहार कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनात संस्थापक अध्यक्ष महेंद्र विधाते, राज्य उपाध्यक्ष कविता धिवारे, राज्य समन्वयक सविता विधाते, सुभाष सोनवणे, शितल दळवी, कावेरी साबळे, उत्तम गायकवाड, कैलास पवार, विद्या अभंग, मेजबीन सय्यद, अश्‍विनी दळवी, छाया भूमकर, बाबासाहेब गोर्डे आदींसह सर्व तालुकाध्यक्ष, पदाधिकारी व महिला कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.  मार्केटयार्ड चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मोर्चाची सुरुवात करण्यात आली. जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मोर्चा जिल्हा परिषदेवर धडकला. पोषण आहार कर्मचाऱ्यांनी केलेल्या जोदरार घोषणाबाजी जिल्हा परिषदेचा संपूर्ण परिसर दणाणून निघाला.  जोपर्यंत विद्यार्थी आहे, तोपर्यंत शालेय पोषण आहार सुरु राहणार असल्याने सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, शासकीय सेवेत सामावून घेत नाही तोपर्यंत किमान वेतन कायद्याप्रमाणे 15 हजार रुपये मानधन द्यावे, इतर केडर प्रमाणे शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना गणवेश मिळावा, गॅस सारख्या ज्वलनशील पदार्थ सोबत काम करायचे असल्याने दुर्दैवाने एखादी दुर्घटना घडल्यास त्या कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून किमान कर्मचाऱ्यांचा 20 लाखाचा विमा उतरवावा, कर्मचाऱ्यांना औषधोपचारासाठी किमान 50 हजार रुपयाची मदत मिळावी, दरवर्षीच्या करार ऐवजी किमान तीन वर्षातून एकदा करार करावा, शालेय परिसर, वर्ग स्वच्छता, स्वच्छतागृह इत्यादींची साफसफाई करण्यासाठी संबंधित शालेय यंत्रणेकडून कर्मचाऱ्यांवर दबाव आनला जात असून, शासन निर्णयानुसार ही कामे करण्यास दबाव आणू नये, गरोदर महिला कर्मचारी यांना बालसंगोपणासाठी सहा महिन्याची पगारी रजा मिळावी, विनाकारण कुणाला कामावरून कमी न करता त्या कर्मचाऱ्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी द्यावी, प्रशिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांना नियुक्ती द्यावी, ज्याच्या नावावर करार त्यांचीच प्रत्यक्ष नेमणूक करावी, सेंट्रल किचन पद्धती तात्काळ बंद करून पूर्वीप्रमाणे जे कर्मचारी काम करत होते त्यांना तात्काळ कामावर घेण्याची मागणी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली आहे.  या मागणीचे निवेदन जिल्हा शालेय पोषण आहारचे लेखा अधिकारी रुपेश भालेराव यांना देण्यात आले.

Ahmednagar News: जिल्हा परिषदेवर धडकला पोषण आहार कर्मचाऱ्यांचा संघर्ष मोर्चा Read More »

Maharashtra Election: भाजपाचे विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना डावलुन शेवगांवांत भाजपाचा भव्य मेळावा….!

Maharashtra Election: शेवगांव व पाथर्डी तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचा निर्धार मेळावा शेवगांव येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अरुण मुंढे तसेच ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष गोकुळ दौंड यांच्या नेतत्वाखाली मेळावा पार पडला. शेवगांव-पाथर्डी विधानसभेच्या भाजपाच्या आमदार मोनिका राजळे यांना डावलुन हा निर्धार मेळावा भाजपाचे राज्य सरचिटणीस अरुण मुंढे आणी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड यांनी निर्धार मेळाव्याचे भव्य आयोजन करून अरुण मुंडे व गोकुळ दौंड यांनी आमदार मोनिका राजळे यांच्या विरोधात शेवगांव-पाथर्डी विधानसभेसाठी दंड थोपटले आहे.  मेळाव्यात अरुण मुंढे किंवा गोकुळ दौंड या दोघांपैकी कोणी एकाला पक्षाने विधानसभेची उमेदवारी द्यावी अशा मागणीने जोर धरला असुन विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना पक्षश्रेष्ठींनी पुन्हा उमेदवारी देऊ नये अन्यथा शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे पदाधिकारी सामुहिक राजीनामे देणार असल्याचे वक्तव्य यांनी केले.  यावेळी भाजपचे शेवगांव तालुकाध्यक्ष तुषार वैद्य, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड, जय शिवसंग्राम पक्षाचे जिल्हाध्यक्ष नवनाथराव ईसारवाडे, बाळासाहेब सोनवने, आत्माराम कुंडकर, बाळासाहेब कोळगे, संजय मरकड सह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Maharashtra Election: भाजपाचे विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना डावलुन शेवगांवांत भाजपाचा भव्य मेळावा….! Read More »

Nanded News : विविध मागण्यांसाठी आदिवासी समाज बांधवांचा मोर्चा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला

Nanded News : विविध मागण्यांसाठी आदिवासी समाज बांधवांचा मोर्चा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. नांदेड शहरातील महात्मा फुले पुतळा पासून या मोर्चाला सुरुवात झाली. महात्मा फुले पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. आदिवासी समाजातील नरहरी झिरवळ,किरण लमहाटे,डॉ राजेंद्र भारुड यांच्या प्रतिमेचे काही समाज कंटकांनी जागतिक आदिवासी दिनी  दहन केले,त्या समाज कंटकांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत,12 हजार 500 जागांवर भरती प्रक्रिया राबविण्यात यावी,पेसा अंतर्गत भरती प्रक्रिया तात्काळ घेण्यात यावी,यासह इतर मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  शासनाने तात्काळ आमच्या मागण्याची दखल घेऊन मागण्या मान्य कराव्यात अन्यथा या मागण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आदिवासी समाज बांधव रस्त्यावर उतरले असा इशारा माजी आमदार संतोष टारफे यांनी दिलाय.

Nanded News : विविध मागण्यांसाठी आदिवासी समाज बांधवांचा मोर्चा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला Read More »

Ahmednagar News: धक्कादायक, स्वस्तिक बस स्थानकात वृद्ध व्यक्ती बसच्या टायर खाली आल्याने गंभीर जखमी

Ahmednagar News:  अहमदनगर शहरातील गजबजलेल्या स्वस्तिक बस स्थानकात एक वृद्ध व्यक्ती बसच्या टायर खाली आल्याने गंभीर जखमी झाला आहे. बस चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी सांगितले. वृद्ध व्यक्ती बसटायर खाली आल्याने अक्षरशः त्याचा पाय पूर्ण पणे टायर खाली आल्याने रिकामी झाला असून  व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे.  अंकुश आबा शिंदे ही व्यक्ती गंभीर झाल्यानंतर तेथील उपस्थित प्रवाशांनी तात्काळ त्या व्यक्तीला बसच्या बाजूला करून बस स्थानकात आणले त्यानंतर बराच वेळ एसटीच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्या अंगावरती चादर देखील टाकली नव्हती किंवा रुग्णवाहिकेला देखील फोन केला नव्हता.  प्रत्यक्षदर्शी पाहणाऱ्या प्रवाशांनी सांगितलं की पूर्णपणे बस चालकाची चुकी असून बस चालकाने कोणताही मागचा पुढचा विचार न करता त्या व्यक्तीच्या अंगावर ती गाडी घातली. त्यामुळे प्रवाशांनी रोष व्यक्त केला असून ड्रायव्हर वरती कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी प्रवाशांची मागणी आहे.  एसटी बस चालकाला कोणी अरेरावी किंवा धक्काबुक्की केली तर प्रशासन किंवा एसटी कर्मचारी हे आंदोलन करतात परंतु आज एका एसटी चालकाच्या चुकीमुळे एका प्रवाशाला गंभीर इजा झाली आहे याकडे प्रशासन कधी लक्ष देणार असं देखील यावेळी प्रत्यक्ष दर्शनी सांगितलं. सदर बस ही शिर्डी ते रोहा अशी अहमदनगर मार्गे जात होती बस चालक आशिक मुबारक शेख याच्यावरती गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी प्रत्यक्षदर्शींची आहे. गाडी क्रमांक mh14kq3970 हिरकणी गाडी होती. अर्ध्या तासाच्या प्रतीक्षेनंतर त्या नागरिकाला रुग्णवाहिकेतून एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असून पोलीस प्रशासन पुढील कारवाई करत आहे.

Ahmednagar News: धक्कादायक, स्वस्तिक बस स्थानकात वृद्ध व्यक्ती बसच्या टायर खाली आल्याने गंभीर जखमी Read More »

Pune Crime News: पुण्यात धक्कादायक प्रकरण, इंस्टाग्रामवर मैत्री अन् अल्पवयीन मुलीवर अत्याचार

 Pune Crime News:  गेल्या काही दिवसांपासून राज्यात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत आहे त्यामुळे महिलांचे सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. यातच आता आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आला आहे.  माहितीनुसार, पुण्यातील हिंजवडी परिसरात अल्पवयीन मुलीला धमकावून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी एका 23 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. आरोपीचे नाव कार्तिक कांबळे असे असून, त्याच्यावर आयपीसी कलम अ अंतर्गत कलम 376, 376 (2) आणि 506 तसेच POCSO कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडितेला इंस्टाग्रामवर भेटले आणि तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना या वर्षाच्या सुरुवातीला एप्रिल ते जून दरम्यान घडली होती. रीतसर तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून गुरुवारी आरोपीला अटक केली. आरोपीने पीडितेचा लैंगिक छळही केला सहाय्यक पोलिस आयुक्त सुरेश कुराडे यांनी एएनआयला सांगितले की, आरोपीने पीडितेवरही लैंगिक अत्याचार केले असून त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीला अटक करण्यात आली  पीडित मुलगी तिच्या कुटुंबासोबत आली आणि घटनेची माहिती दिली. आरोपीला अटक करण्यात आली आहे. पीडित मुलगी आणि आरोपी इंस्टाग्रामच्या माध्यमातून संपर्कात आले. त्यानंतर आरोपीने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. तसेच याबाबत घरच्यांना सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला 4 दिवसांची कोठडी सुनावली आहे. पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

Pune Crime News: पुण्यात धक्कादायक प्रकरण, इंस्टाग्रामवर मैत्री अन् अल्पवयीन मुलीवर अत्याचार Read More »

Ravindra Jadeja : रवींद्र जडेजा इतिहास रचण्यापासून अवघ्या 6 विकेट्स दूर, महान खेळाडूंच्या क्लबमध्ये करणार प्रवेश

Ravindra Jadeja : भारतीय संघासाठी रवींद्र जडेजा हा केवळ गोलंदाज नाही तर प्रत्येक विभागात एक संपूर्ण पॅकेज आहे. क्षेत्ररक्षण असो, गोलंदाजी असो की फलंदाजी, प्रत्येक क्षेत्रात त्याची पकड मजबूत आहे. त्याच्या फिरकी बॉल्समध्ये इतकी विविधता आहे की, कोणत्या प्रकारचा चेंडू येत आहे हे फलंदाजांना समजत नाही.  जडेजाची आणखी एक खासियत म्हणजे त्याचे क्षेत्ररक्षण. तो एक हुशार क्षेत्ररक्षक आहे आणि त्याने आपल्या क्षेत्ररक्षणादरम्यान अचूक लक्ष्ये मारून अनेक वेळा सामन्यांचा रंग बदलला आहे. जडेजाने केवळ गोलंदाजीतच नव्हे तर फलंदाजीतही अनेक संस्मरणीय खेळी खेळल्या आहेत. खालच्या क्रमाने येत त्याने अनेक वेळा अत्यंत कठीण परिस्थितीतही संघाला विजय मिळवून दिला आहे. 300 विकेट्सचे महत्त्व कसोटी क्रिकेटमध्ये 300 बळींचा टप्पा ओलांडणे ही एक मोठी उपलब्धी आहे आणि कोणत्याही गोलंदाजाचे स्वप्न पूर्ण होते. यावरून गोलंदाज किती अनुभवी आहे आणि त्याच्याकडे किती क्षमता आहे हे लक्षात येते. हा आकडा जडेजासाठी आणखी खास आहे कारण तो अष्टपैलू खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडूसाठी इतक्या विकेट घेणे सोपे नाही. जडेजाने 300 विकेट्स पूर्ण केल्याने भारतीय फिरकी आक्रमणाचे भवितव्यही उज्ज्वल दिसत आहे. जडेजासोबतच रविचंद्रन अश्विनही भारतीय संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या दोन गोलंदाजांच्या जोडीने भारतीय संघाला मोठ्या सामन्यांमध्ये अनेक मोठे विजय मिळवून दिले आहेत. रवींद्र जडेजा अजूनही त्याच्या कारकिर्दीच्या शिखरावर असून आगामी काळात तो आणखी अनेक विक्रम मोडू शकतो. जडेजाचे आता 400 बळींचा टप्पा ओलांडण्याचे लक्ष्य असेल.

Ravindra Jadeja : रवींद्र जडेजा इतिहास रचण्यापासून अवघ्या 6 विकेट्स दूर, महान खेळाडूंच्या क्लबमध्ये करणार प्रवेश Read More »

Rohit Pawar: ग्रामीण भागातील मुला मुलींच्या शिक्षणासाठी रोहित पवारांकडून 14000 सायकलींचा वाटप

Rohit Pawar :  ग्रामीण भागामध्ये शाळेपासून पाच किलोमीटर पेक्षा जास्त अंतर असलेल्या मुला-मुलींना शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा जाण्यामध्ये त्यांचा वेळ जाऊ नये आणि त्यांच्या अभ्यासावर कुठलाही परिणाम होऊ नये म्हणून कर्जत जामखेड मतदार संघातील मुला मुलींना सायकल वाटप करण्यात आले आहे.  हे वाटप करताना कुठलाही भेदभाव केला गेला नाही तो कुठल्या समाजाचा आहे त्यांनी मतदान केलं आहे का? असं न पाहता मुला मुलींचा अभ्यासावरती परिणाम होऊ नये म्हणून विविध संघटनाच्या माध्यमातून आम्ही मुलांसाठी 14000 सायकलीचा वाटप करण्यात आले अशी प्रतिक्रिया आमदार रोहीत पवार यांनी दिली. अजून दोन टप्प्यात हे सायकल वाटप केली जाणार असल्याची माहिती देखील यावेळी रोहित पवार यांनी दिली.  रोहित पवार यांच्या मतदार संघात धाराशिवचे खासदार ओम राजे निंबाळकर आणि अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांच्या हस्ते मुलांना सायकल वाटप करण्यात आले.  सर्व संतांनी आपल्याला माणुसकी जपली पाहिजे  कुणी काय बोलावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे माझ्यावरही धार्मिकतेचा प्रभाव आहे सर्व संतांनी आपल्याला माणुसकी जपली पाहिजे अशी शिकवण दिली आहे.  दुसऱ्या समाजाबद्दल आणि धर्माबद्दल अपप्रचार करू नये अशी संतांची शिकवण आहे कुठलाही भेदभाव न करता सर्वांना मदत केली पाहिजे अशी संतांची शिकवण आहे अशा प्रकारचा कोणी वक्तव्य करत असेल तर ते बरोबर नसल्याचे मत रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.

Rohit Pawar: ग्रामीण भागातील मुला मुलींच्या शिक्षणासाठी रोहित पवारांकडून 14000 सायकलींचा वाटप Read More »