DNA मराठी

latest news

UPI Update: मोठी बातमी! UPI व्यवहार मर्यादा बदलणार, जाणून घ्या नवीन बदल

UPI Update:  जर तुम्ही देखील दररोज UPI च्या मदतीने आर्थिक व्यवहार करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. माहितीनुसार आता UPI द्वारे कर भरण्याची मर्यादा 5 लाख रुपये करण्यात आली आहे. ही नवीन मर्यादा नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने लागू केली आहे. NPCI ने परिपत्रकात काय म्हटले? NPCI ने 24 ऑगस्ट 2024 रोजी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की UPI ही एक प्रमुख पेमेंट प्रणाली म्हणून ओळखली जाते आणि कर पेमेंटसाठी प्रति व्यवहार मर्यादा 5 लाख रुपये करण्यात आली आहे. प्रभावी तारीख आणि अनुपालन नवीन मर्यादा 16 सप्टेंबरपासून लागू होणार आहे. NPCI ने बँका, पेमेंट सेवा प्रदाते आणि UPI ॲप्सना 15 सप्टेंबरपर्यंत नवीन मर्यादेचे पालन सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय, हा नियम रुग्णालये, शिक्षण केंद्रे, IPO आणि RBI च्या किरकोळ थेट योजनांना देखील लागू होईल. व्यापारी पडताळणी हे व्यवहार पूर्ण करण्यासाठी व्यापाऱ्यांची पडताळणी आवश्यक असेल. कर भरणा आणि इतर व्यवहार सोपे आणि सुरक्षित करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. UPI पेमेंट पद्धत UPI, किंवा युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) द्वारे भारतात विकसित केलेली डिजिटल पेमेंट प्रणाली आहे. ही प्रणाली सोप्या, सुरक्षित आणि जलद पद्धतीने आर्थिक व्यवहार करण्यास सक्षम करते. UPI च्या माध्यमातून तुम्ही मोबाईल फोन वापरून विविध प्रकारचे व्यवहार करू शकता. UPI ची वैशिष्ट्ये एकाधिक बँक खाती एकाच UPI ॲपद्वारे तुम्ही वेगवेगळ्या बँक खाती लिंक करू शकता आणि एकाच प्लॅटफॉर्मवर व्यवहार करू शकता. सिंगल क्लिक पेमेंट पेमेंट प्रक्रिया जलद आणि सोपी बनवून फक्त एका क्लिकवर UPI व्यवहार पूर्ण केले जाऊ शकतात. 24×7 उपलब्धता UPI प्रणाली सर्व वेळ (24 तास, 7 दिवस) उपलब्ध असते, त्यामुळे तुम्ही कधीही व्यवहार करू शकता. सुरक्षा UPI व्यवहारांसाठी सुरक्षित पिन (UPI पिन) आवश्यक असतो, जो तुमच्या आर्थिक माहितीची सुरक्षितता सुनिश्चित करतो. QR कोड QR कोड UPI पेमेंटसाठी वापरले जाऊ शकतात, ज्यामुळे पेमेंट प्रक्रिया आणखी सोपी होते. वैयक्तिक देयके आणि बिले UPI चा वापर व्यक्ती-टू-व्यक्ती व्यवहार, बिल भरणे, टॅक्सी भाडे, रेस्टॉरंट बिले, ऑनलाइन शॉपिंग आणि सरकारी सेवांसाठी पेमेंटसाठी केला जाऊ शकतो.

UPI Update: मोठी बातमी! UPI व्यवहार मर्यादा बदलणार, जाणून घ्या नवीन बदल Read More »

Navra Maja Navsacha 2 : “नवरा माझा नवसाचा 2” झळकतोय पॅकेज्ड मिनरल वॉटरच्या बॉटलवर

Navra Maja Navsacha 2 : “नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. चित्रपटाची गाणी, टीजर, ट्रेलरला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यात आता या चित्रपटाला अनोखा मान मिळाला आहे. हा चित्रपट आता  सुप्रसिद्ध अशा पॅकेज्ड मिनरल वॉटरच्या बॉटलवर झळकत असून याची चर्चा चांगलीच रंगली आहे. “नवरा माझा नवसाचा 2” हा चित्रपट येत्या 20 सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे.  सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या ‘नवरा माझा नवसाचा 2’ या चित्रपटाची निर्मिती,  कथा – पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केले असून संवाद संतोष पवार यांचे आहेत. अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले आणि सिद्धार्थ जाधव अशी दमदार स्टारकास्ट आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून भेटीस येणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनेक नवनव्या क्लृप्त्या लढवल्या जातात. त्यात आता पॅकेज्ड मिनरल  वॉटरच्या पॅकेजिंगवर झळकणं हा नवाच प्रकार आहे. मराठी चित्रपटाच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले असून तो मान “नवरा माझा नवसाचा 2” या चित्रपटाला मिळाला आहे आणि ही नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे.

Navra Maja Navsacha 2 : “नवरा माझा नवसाचा 2” झळकतोय पॅकेज्ड मिनरल वॉटरच्या बॉटलवर Read More »

Marathi Movie: नचिकेत पूर्णपात्रे पुन्हा एकदा ‘या’ कारणासाठी आला चर्चेत !

Marathi Movie: नचिकेत पूर्णपात्रे हे नाव मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीला नवीन नसलं तरी तो कायम वैविध्यपूर्ण भूमिका करून चर्चेत असणारा अभिनेता आहे. आता पुन्हा एकदा नव्याने तो  चर्चेत आला आहे ते म्हणजे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या “विस्फोट” ह्या चित्रपटाच्या निमित्ताने.  रितेश देशमुख, फरदीन खान, सीमा बिस्वास ह्या बहुचर्चित नावांच्या यादीत आपल्या ह्या मराठमोळ्या अभिनेत्याचं ही नाव आता कौतुकाने आणि बरोबरीने घेतलं जातंय. मराठी प्रेक्षकांना याचा नक्कीच अभिमान आहे ही कौतुकाची बाब आहे.दिग्दर्शक कुकी गुलाटी ह्याच्या मार्गदर्शनाखाली त्याने ह्या चित्रपटात केलेल्या अभिनयाची विशेष चर्चा होत आहे.  मुळात आपल्या कामाच्या निवडी बाबत काटेकोर असल्यामुळे नचिकेत कायमच अत्यंत महत्त्वाच्या आणि आशयघन चित्रपट आणि नाटकांचा भाग असतो.  “तू” “रामप्रहर” “सिंधू सुधाकर रम आणि इतर” अश्या प्रायोगिक नाटकांच्या सोबत “दिल दोस्ती दुनियादारी” “पिंजरा” “लक्ष्मणरेषा” ह्या सारख्या मालिकांच्या आणि “अस्तू” “मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर” इत्यादी कलात्मक चित्रपटांच्या बरोबरीनेच मुख्य प्रवाहातील “फोर्स 2” “रॉकी हँडसम” “दगडी चाळ – 2” अश्या अनेक दर्जेदार कलाकृींमध्ये त्यानी ह्या पूर्वी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.  आता पुन्हा एकदा अनेक नवनवीन आणि उत्तमोत्तम कलाकृतींच्या माध्यमातून तो प्रेक्षकांसमोर येत आहे. नचिकेत भविष्यात अनेक उत्तम प्रोजेक्ट्स मधून दिसणार आहे यात शंका नाही.

Marathi Movie: नचिकेत पूर्णपात्रे पुन्हा एकदा ‘या’ कारणासाठी आला चर्चेत ! Read More »

Weather Update Today: ‘या’ भागात आज धो धो पाऊस, जाणून घ्या ताजे अपडेट

Weather Update Today: भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी म्हणजेच आज किनारपट्टी कर्नाटक, केरळ आणि माहे, लक्षद्वीपमध्ये पावसाची शक्यता आहे. देशातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे  अनेक राज्यांमध्ये पुराने कहर केला आहे.   तर आज दिल्ली-एनसीआर, पूर्व मध्य प्रदेश आणि पश्चिम मध्य प्रदेशात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. गुजरात, छत्तीसगडमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. या आठवड्यात अरुणाचल प्रदेश, बिहार, ओडिशा येथेही पावसाची शक्यता आहे. या राज्यांमध्ये पावसाची शक्यता याशिवाय कोस्टल आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकलमध्ये पावसाची शक्यता आहे. या आठवड्यात नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा, आसाम आणि मेघालय, अंदमान आणि निकोबार बेटे, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम, झारखंडमध्ये हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता आहे. हिमाचलमधील 6 जिल्ह्यांमध्ये अलर्ट उत्तराखंड, पूर्व राजस्थान, उत्तर प्रदेशमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यातील किन्नौर, कुल्लू, मंडी, शिमला, सोलन आणि सिरमौर या सहा जिल्ह्यांमध्ये पूरस्थितीचा इशारा देण्यात आला आहे. राज्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्राने सांगितले की, हिमाचल प्रदेशमधील राष्ट्रीय महामार्ग 5 (हिंदुस्थान-तिबेट रोड) सह एकूण 76 रस्ते वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद आहेत. शिमल्यात 34, मंडीत 26, कांगडामध्ये 10, कुल्लूमध्ये दोन आणि किन्नौर, उना, सिरमौर आणि लाहौल आणि स्पिती जिल्ह्यात प्रत्येकी एक रस्ते बंद आहेत.

Weather Update Today: ‘या’ भागात आज धो धो पाऊस, जाणून घ्या ताजे अपडेट Read More »

Ajit Pawar : मला मुख्यमंत्री करा, महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवावा, अजित पवारांची अमित शहा यांच्याकडे मागणी

Ajit Pawar: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीनंतर मला मुख्यमंत्री करा आणि राज्यात बिहार पॅटर्न राबवा अशी मागणी केली असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात आणि चर्चांना उधाण आले आहे.   द हिंदू वृत्तपत्राने सूत्रांच्या हवाल्यातून दिलेल्या बातमीमुळे राज्याच्या राजकारणाला नवी दिशा मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे पुढच्या आठवड्यात दिल्लीत महायुतीतील प्रमुख नेत्यांची बैठक होण्याची शक्यता आहे.  माहितीनुसार, राज्यातील किमान 25 जागेवर मैत्रीपूर्ण लढत करावी अशी मागणी भाजपच्या नेत्यांनी अमित शहांकडे  केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मागील पंधरा-वीस दिवसापासून अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जागा वाटपा संदर्भात चर्चा सुरू आहे. या चर्चेत जवळपास 40 जागांसाठी चर्चा झाल्याची माहिती आहे.  त्यात राष्ट्रवादी काँग्रेस निवडून येणाऱ्या जागा सोडण्यास तयार नसून तीन ते चार जागा संदर्भात अदलाबदल करण्यास तयार आहे. त्याचबरोबर काँग्रेस जिथं लढत आहे अशा दहा ते बारा जागा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसने मागितल्याची माहिती आहे.  त्याचबरोबर महायुतीमध्ये आता महामंडळ वाटपासंदर्भात सुद्धा एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मागच्या दोन दिवसात नक्की कुणाला कोणत महामंडळ देणार यासंदर्भात एकमत झाल्याची माहिती आहे. त्यामुळे महायुती मधील नाराज नेत्यांचा सुर नरमण्याची शक्यता आहे.  राज्यपाल नियुक्त 12 जागा संदर्भात देखील निर्णय झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये भाजप 6, शिवसेना 3, आणि राष्ट्रवादी 3 असं सूत्र ठरलं आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापर्यंत हे नाव जाहीर होणार असल्याची माहिती आहे.

Ajit Pawar : मला मुख्यमंत्री करा, महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवावा, अजित पवारांची अमित शहा यांच्याकडे मागणी Read More »

Israel Strikes : मोठी बातमी! इस्रायलकडून गाझावर पुन्हा हल्ला, 40 लोकांचा मृत्यू

Israel Strikes : गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असणाऱ्या इस्रायल आणि हमास युद्धात आतापर्यंत हजारो नागरिकांचा मृत्यू झालाय. यातच आता पुन्हा एकदा इस्लायने गाझापट्टीवर मोठा हल्ला केला आहे.   माहितीनुसार इस्रायलच्या या हवाई हल्ल्यात 40 जणांचा मृत्यू झाला आहे तर 60 जण जखमी झाले आहेत. गाझाच्या नागरी संरक्षण संस्थेने ही माहिती दिली.  मंगळवारी इस्रायलने पॅलेस्टाईनच्या दक्षिणेकडील भूभागावर हल्ला केला. इस्त्रायली सैन्याने म्हटले आहे की त्यांनी या भागातील हमास कमांड सेंटरला टार्गेट केले आहे. गाझामधील खान युनिस शहरातील अल-मवासी भागात इस्रायली लष्कराने हा हल्ला केला. हा असा भाग आहे की इस्त्रायली सैन्याने युद्ध सुरू झाल्यावर सुरक्षित क्षेत्र घोषित केले होते. हजारो पॅलेस्टिनींनी येथे आश्रय घेतला आहे. स्थानिक आणि डॉक्टरांनी सांगितले की, खान युनिस जवळील अल-मवासी येथील तंबूच्या छावणीला चार क्षेपणास्त्रांनी मारले. हा छावणी विस्थापित पॅलेस्टिनींनी भरलेला आहे. गाझा सिव्हिल इमर्जन्सी सर्व्हिसच्या म्हणण्यानुसार, 20 तंबूंना आग लागली. इस्रायली क्षेपणास्त्रांनी 30 फूट खोल खड्डे तयार केले आहेत. 60 जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. 40900 हून अधिक पॅलेस्टिनींना आपला जीव गमवावा लागला आहे खान युनिसमधील कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या हमासच्या दहशतवाद्यांवर हल्ला केल्याचे इस्रायली लष्कराने म्हटले आहे. हमासने इस्रायलचे आरोप फेटाळले आहेत. हे खोटे असल्याचे हमासने एका निवेदनात म्हटले आहे.   7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर मोठा हल्ला केला. यामध्ये 1200 इस्रायली मारले गेले आणि 250 लोकांना ओलिस बनवण्यात आले. त्यानंतर इस्रायलने हमासविरुद्ध युद्धाची घोषणा केली होती. गाझावरील इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत 40,900 हून अधिक पॅलेस्टिनींना आपला जीव गमवावा लागला आहे.

Israel Strikes : मोठी बातमी! इस्रायलकडून गाझावर पुन्हा हल्ला, 40 लोकांचा मृत्यू Read More »

Ahmednagar Crime : अभिजीत सांबरेची हत्याच! 14 महिन्यानंतर धक्कादायक खुलासा

Ahmednagar Crime : 14 महिन्यांपूर्वी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अभिजीत राजेंद्र सांबरे (रा. राजरत्ननगर, सिडको, नाशिक) यांच्या मृत्यूची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती मात्र त्यांच्या मृत्यु संशयास्पद झाला असल्याचा दावा नातेवाईकांकडून करण्यात येत होता.   सदर संशयास्प्द मुत्यू त्याचे सोबत असणारा मित्र प्रमोद जालींदर रणमाळे याने घडवुन आणला असा आरोप देखील त्यांच्याकडून करण्यात येत होता.   या प्रकरणाचा तपास करत असताना गुन्हेशाखा, युनिट क. 2 कडिल पोहवा/मनोहर शिंदे यांना खात्रीशीर बातमी मिळाल्याने  आरोपी प्रमोद जालींदर रणमाळे यास पोलीस अंमलदार विशाल कुंवर, सोमनाथ वाजे, तेजस मते, महेश खांडबहाले, यांनी शिताफिने ताब्यात घेतले.  आरोपीची वरीष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि समाधान हिरे यांनी तपास कौशल्य, अ.मू.चे पेपर अवलोकन, तांत्रीक विश्लेषण वापरून विचारपुस केली असता आर्थिक व्यवहारातून हत्या केल्याची कबुली दिली.  मयत अभिजीत सांबरे हा आरोपीचा मित्र होता. त्यांचे यापुर्वीपासुन पैश्यांचे व्यवहार होते व त्यातुन त्यांचा वाद विकोपास गेला होता. त्यामुळे संशयित प्रमोद रणमाळे याने मयत इसम अभिजीत सांबरे यास मारण्याबाबत डाव आखलेला होता.  27 जुन 2023 रोजी आर्थीक व्यवहाराकरीता यातील मयत हा येवला जि, नाशिक येथे जाणार होता. त्याने संशयित इसम प्रमोद रणमाळे यास देखील सदर ठिकाणी येण्याबाबत कळविले होते. संशयित प्रमोद रणमाळे याने यातील मयत अभिजीत सांबरे याच्या दारू पिण्याच्या सवयीचा फायदा घेवुन रात्री 9.00 वाचे सुमारास त्यास दारूमधुन ब्लड प्रेशर व झोपेच्या अतिरीक्त मात्रेमध्ये गोळया मिसळुन त्यास दारू पाजली. त्यातुन मयत अभिजीत सांबरे याची शारीरिक परिस्थिती गंभीर होत असतांना त्यास त्याचे बुलेट गाडीवर मागे बसुन येवला येथुन संभाजीनगर कडे जाणा-या रस्त्याने वैजापुर गावाजवळुन कोपरगाव रस्त्याने घेवुन गेला.  मयत इसम अभिजीत सांबरे याची शुध्द हरपल्याचा अंदाज घेवुन गाडी थांबवुन त्यास कोपरगाव रस्त्याचे कडेला फेकुन देवुन पोबारा केला होता.  या प्रकरणात कोपरगाव तालुका पोलीस ठाणे येथे भादंविक 302 प्रमाणे दाखल झाला असुन त्यास पुढील तपासकामी कोपरगाव तालुका पोलीस ठाणे येथे ताब्यात देण्यात आले आहे.

Ahmednagar Crime : अभिजीत सांबरेची हत्याच! 14 महिन्यानंतर धक्कादायक खुलासा Read More »

Ganesh Chaturthi 2024 : गणेश उत्सवादरम्यान दररोज ‘या’ 5 मंत्रांचा जप करा, समस्यांपासून मिळणार सुटका

Ganesh Chaturthi 2024 : आजपासून गणेश चतुर्थीचा उत्सव सूरु होत आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थीचा उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव 10 दिवस साजरा केला जातो. या 10 दिवसात काही खास गणेश मंत्रांचा नियमित जप केल्यास सर्व प्रकारच्या समस्या टाळता येतात.   मंत्र 1 वक्रतुंडा महाकाया सूर्यकोटी समप्रभा । कुरुमध्ये कोणत्याही अडथळ्याविना देव नेहमी कार्यरत असतो. मंत्र 2 विघ्नेश्वराय वरदया सुरप्रियाया लंबोदयाय सकलय जगद्धितायम् । नागनाथ श्रुतियज्ञविभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते मंत्र 3 अमेय च हेरंब परशुधरके ते । मूषक वाहनायव विश्वेशाय नमो नमः । मंत्र 4 एकादंतय शुद्धाय सुमुखाय नमो नमः । प्रापण जनपालय प्रणतर्ती विनाशिने । मंत्र 5 एकदंताय विद्महे । वक्रतुंडय धीमा । तन्नो दंति प्रचोदयात् । इतर मंत्र – ओम गं गणपते नमः – ओम वक्रतुंडया हम – गं क्षिप्राप्रसादाय नमः मंत्र कसा जपायचा? वर नमूद केलेल्या कोणत्याही मंत्राचा जप सुरू करण्यापूर्वी, स्नान करून शुद्ध व्हा आणि स्वच्छ कपडे घाला. शक्य असल्यास हिरवे धोतर परिधान करून मंत्राचा जप करावा. श्री गणेशाच्या मूर्तीसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि रुद्राक्ष जपमाळेने कोणत्याही एका मंत्राचा जप सुरू करा. कमीत कमी 5 फेऱ्या जप करा. एक जपमाळ म्हणजे 108 वेळा. मंत्रजप करताना बसण्यासाठी कुश मुद्रा वापरल्यास चांगले होईल. मंत्राचा जप केल्यानंतर तुमची काही इच्छा असेल तर श्री गणेशासमोर बोला. अशाप्रकारे गणेशोत्सवाचे 10 दिवस अखंडपणे मंत्र जपल्यास श्रीगणेश सहज प्रसन्न होऊ शकतात. हा उपाय खूप सोपा आहे जो प्रत्येकजण करू शकतो.

Ganesh Chaturthi 2024 : गणेश उत्सवादरम्यान दररोज ‘या’ 5 मंत्रांचा जप करा, समस्यांपासून मिळणार सुटका Read More »

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमबीएमसीच्या सेंट्रल स्कूल कमांड सेंटरची शहरांमध्ये पुनरावृत्ती करण्याचे आवाहन केले

Eknath Shinde : मिरा-भाईंदर महानगरपालिका (MBMC), जी मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) एक महत्त्वाची नागरी स्थानिक संस्था (ULB) आहे, आपल्या नागरिकांच्या, विशेषतः विद्यार्थ्यांच्या, सुरक्षेसाठी व कल्याणासाठी प्रबळ वचनबद्ध आहे.  १२ लाख लोकसंख्येसाठी ३६६ शाळांचे व्यवस्थापन करणारी एमबीएमसी सुमारे १,३७,००० विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सतर्क राहिली आहे. महाराष्ट्र शासनाने २४ ऑगस्ट २०२४ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयाच्या (GR) अनुषंगाने, एमबीएमसीने विद्यार्थ्यांच्या केवळ सुरक्षेसाठीच नव्हे तर सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, एमबीएमसीने ३६ शाळांमध्ये २०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून, सुमारे १०,००० विद्यार्थ्यांचे निरीक्षण केले जात आहे. सततच्या देखरेखीमुळे कोणत्याही घटनेवर त्वरित कारवाई करता येते. तसेच, एमबीएमसी विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या व्यक्तिमत्त्व व कौशल्य चाचण्या देखील घेत आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आयोजित कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या  सुविधेचे उद्घाटन भारतरत्न गानसम्राद्नी लता मंगेशकर नाट्यगृहात  करण्यात आले. एमबीएमसी आयुक्त संजय काटकर, पोलीस आयुक्त मधुकर पांडे आणि आमदार प्रताप सरनाईक व गीता जैन हे देखील उपस्थित होते. माननीय मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचा संदेश दिला की, केवळ सुरक्षा सुनिश्चित करणेच नव्हे, तर ती खरी वाटली पाहिजे. त्यांनी असे स्पष्ट केले की संपूर्ण सरकारची जबाबदारी आहे की स्थानिक संस्थांचा समावेश करून, सुरक्षेची भावना निर्माण करणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवणे.  मुख्यमंत्र्यांचे उद्दिष्ट केवळ संरक्षण नव्हे तर प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांना एक सुरक्षित वातावरण अनुभवायला मिळावे, अशी भावना निर्माण करणे आहे. महापालिका आयुक्त श्री संजय श्रीपतराव काटकर यांनी विद्यार्थी कल्याणासाठी ही समग्र दृष्टीकोन पूर्ण करण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. घटनांच्या प्रतीक्षेत न राहता, एमबीएमसीच्या शाळा सुरक्षेसाठी प्रतिबंधात्मक दृष्टिकोन अवलंबला आहे. पालिका शाळांमध्ये २०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, १०,००० विद्यार्थ्यांचे रिअल-टाइम मॉनिटरिंग, आणि नियमित तपासणी करणे यासारख्या उपाययोजना केल्या आहेत. याशिवाय, एमबीएमसीने शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या व्यक्तिमत्त्व आणि कौशल्य चाचण्या सादर करून, १,३७,००० विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार केला आहे. एमबीएमसीच्या या सुरक्षितता उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील रिअल-टाइम मॉनिटरिंगवर दिलेला भर आहे, ज्यामुळे नव्याने स्थापन केलेल्या सेंट्रल स्कूल कमांड सेंटर (CSCC) मुळे १००० कॅमेऱ्यांचे एकाचवेळी निरीक्षण करता येते. ही सुविधा दररोज सकाळी ७ ते संध्याकाळी ५ या वेळेत कार्यरत असते, ज्यामुळे अखंड देखरेख केली जाते. एमबीएमसीने हे मॉडेल इतर शहरांमध्ये आणि खासगी शाळांमध्ये देखील वाढवण्याचे नियोजन केले आहे. भारतरत्न गानसम्राद्नी लता मंगेशकर नाट्यगृह, मिरा रोड (पूर्व) येथे आयोजित या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, तसेच खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, आमदार जनेश्वर म्हात्रे, आमदार प्रताप सरनाईक आणि आमदार गीता जैन यांनी ऑनलाइन माध्यमातून हजेरी लावली. एमबीएमसीचा हा उपक्रम केवळ सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठीच नव्हे तर ती विद्यार्थ्यांना आणि पालकांना खरोखर जाणवावी यासाठी केलेला प्रयत्न आहे, आणि भविष्यात जबाबदार व सशक्त नागरिक घडवण्यासाठी त्याची वचनबद्धता दर्शवतो.

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमबीएमसीच्या सेंट्रल स्कूल कमांड सेंटरची शहरांमध्ये पुनरावृत्ती करण्याचे आवाहन केले Read More »

Chhatrapati Shivaji Maharaj :  छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी फरार शिल्पकार जयदीप आपटेला अटक

Chhatrapati Shivaji Maharaj : मालवणमधील राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी फरार असलेला शिल्पकार जयदीप आपटे याला ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथून बुधवारी रात्री अटक करण्यात आली. जयदीप आपटेने तयार केलेला पुतळा उद्घाटनानंतर आठ महिन्यांपेक्षा कमी कालावधीनंतर 26 ऑगस्ट रोजी कोसळला, त्यानंतर सिंधुदुर्ग पोलिस त्याचा शोध घेत होते. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी सात पथके तयार केली होती. या प्रकरणात मालवण पोलिसांनी आपटे आणि स्ट्रक्चर कन्सल्टंट चेतन पाटील यांच्यावर निष्काळजीपणा आणि इतर गुन्ह्यांप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. पाटील यांना गेल्या आठवड्यात कोल्हापुरातून अटक करण्यात आली होती. या घटनेतील आरोपींच्या अटकेवर प्रतिक्रिया देताना भाजप नेते प्रवीण देरकर म्हणाले, आमच्या सरकारवर टीका करणाऱ्यांनी आता तोंड बंद करावे. जयदीप आपटेला अटक करण्यासाठी पोलिसांना थोडा वेळ लागला हे खरे आहे. अटकेचे श्रेय आम्ही घेत नसून पोलिसांनी त्यांचे काम केले आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj :  छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी फरार शिल्पकार जयदीप आपटेला अटक Read More »