DNA मराठी

IPL 2025 Update

IPL 2025 : एमएस धोनी निवृती घेणार? स्वतः केली मोठी घोषणा

IPL 2025: महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जसाठी आयपीएल 2025 खूप खराब केला असून या स्पर्धेच्या अंतिम चारमध्ये संघाला पोहचता आलेला नाही. मात्र संघाने या स्पर्धेचा शेवट विजयाने केला आहे. डेव्हॉन कॉनवे आणि डेवाल्ड ब्रेव्हिस यांच्या अर्धशतकांनंतरच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर धोनीच्या संघाने रविवारी त्यांच्या शेवटच्या लीग सामन्यात गुजरात टायटन्सचा 83 धावांनी पराभव केला. चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2025 मध्ये 14 पैकी फक्त चार सामने जिंकले आणि 10 सामने गमावले. संघ आठ गुणांसह पॉइंट टेबलमध्ये सर्वात खाली 10 व्या स्थानावर राहिला. आयपीएल 2025 मधून बाहेर पडल्यानंतर आता धोनीच्या भविष्याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. चाहत्यांना वाटले की हा धोनीचा शेवटचा हंगाम आहे आणि तो या हंगामानंतर निवृत्त होईल. पण हंगाम संपल्यानंतर, 43 वर्षीय धोनीने त्याचे पत्ते उघड केले आहेत. सीएसकेच्या कर्णधाराने पुढील हंगामात खेळणार की नाही हे सांगितले आहे. सामन्यानंतर धोनी म्हणाला, “आमचा हंगाम चांगला नव्हता, पण हा एक उत्तम कामगिरी होता. या हंगामात आमचे क्षेत्ररक्षण चांगले नव्हते, पण आज आम्ही अनेक चांगले झेल घेतले. निर्णय घेण्यासाठी माझ्याकडे 4-5 महिने आहेत, घाई नाही.” तो म्हणाला, “शरीर तंदुरुस्त ठेवणे महत्वाचे आहे. आता मी रांचीला जाईन, काही बाईक राईड्सचा आनंद घेईन. मी असे म्हणत नाही की मी आता निवृत्त होत आहे, आणि मी असे देखील म्हणत नाही की मी परत येत आहे. माझ्याकडे खूप वेळ आहे. मी विचार करेन आणि नंतर निर्णय घेईन.” आयपीएल 2025 मध्ये धोनीची कामगिरी कशी होती? आयपीएल 2025 मध्ये गुजरातविरुद्ध संघाच्या शेवटच्या लीग सामन्यात धोनीला फलंदाजीची संधी मिळाली नाही. धोनीने आयपीएल 2025 मध्ये 13 डावांमध्ये 135.17 च्या स्ट्राईक रेटने 196 धावा केल्या. त्याने या हंगामात 12 चौकार आणि 12 षटकार मारले. आयपीएल 2025 च्या काही सामन्यांनंतर धोनी सीएसकेचा कर्णधार बनला, परंतु त्याच्या नेतृत्वाखालीही संघाची कामगिरी निराशाजनक राहिली.

IPL 2025 : एमएस धोनी निवृती घेणार? स्वतः केली मोठी घोषणा Read More »

IPL 2025 पुन्हा सुरू होणार, संघाना मान्य करावी लागणार बीसीसीआयची ‘ही’ अट

IPL 2025 : ऑपरेशन सिंदूरनंतर बीसीसीआयने एका आठवड्यासाठी आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावा कमी होत असल्याने बीसीसीआयने आयपीएल 2025 पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी बीसीसीआयने 12 मे रोजी नवीन वेळापत्रक देखील जाहीर केले आहे. 17 मे पासून सुरू होणाऱ्या आयपीएलसाठी बीसीसीआयने एक तात्पुरता नियम लागू केला आहे, ज्यामुळे सर्व संघांना दिलासा मिळाला आहे. परंतु या नियमानुसार, संघांना एका अटीवर सहमती द्यावी लागेल. बीसीसीआयने नवीन नियम लागू केला उर्वरित 17 सामन्यांसाठी बीसीसीआयने एक नवीन नियम लागू केला आहे. बीसीसीआयने सर्व संघांना बदली खेळाडूंना करारबद्ध करण्याची परवानगी दिली आहे. अहवालानुसार, यापूर्वी, लीग टप्प्यातील 12 सामन्यांनंतर, खेळाडू दुखापती, आजार किंवा इतर कोणत्याही कारणामुळे बाहेर असल्यास संघांना बदली खेळाडूंवर स्वाक्षरी करता येत नव्हती. या हंगामात आतापर्यंत अनेक संघांनी 12 सामने खेळले आहेत. परंतु सध्याची परिस्थिती लक्षात घेता, बोर्डाने उर्वरित सामन्यांसाठी यावर सूट दिली आहे. याचा अर्थ असा की संघ आता नवीन खेळाडूला करारबद्ध करू शकतात. ही स्थिती संघांसमोर असेल या नियमासोबतच बीसीसीआयने संघांसमोर एक अटही ठेवली आहे. बोर्डाने आधीच सांगितले आहे की हे नियम फक्त तात्पुरते मानले पाहिजेत. याचा अर्थ असा की जर एखाद्या संघाने एखाद्या खेळाडूला करारबद्ध केले तर ते फक्त या हंगामासाठी असेल. तसेच संघ त्याला पुढील हंगामासाठी राखू शकत नाहीत. जर एखाद्या खेळाडूने चांगली कामगिरी केली तर संघ त्याला थांबवू शकत नाही आणि पुढच्या हंगामातच त्याला खरेदी करावे लागेल, जिथे तो खेळाडू पुन्हा त्याच संघासोबत खेळू शकेल अशी आशा फारच कमी असेल. हा नियम सर्व 10 संघांसाठी आहे. पण याचा फायदा फक्त 7 संघांनाच होईल. कारण तीन संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स बाहेर पडले आहेत. या हंगामात बाहेर पडणारा पहिला संघ सीएसके आहे.

IPL 2025 पुन्हा सुरू होणार, संघाना मान्य करावी लागणार बीसीसीआयची ‘ही’ अट Read More »

RCB vs PBKS : सुरुवातीला पाऊस अन् नंतर घरच्या मैदानावर पुन्हा आरसीबी पराभूत

RCB vs PBKS: आयपीएल 2025 मध्ये बंगळुरू च्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पुन्हा एकदा पराभव स्वीकारावा लागला आहे. पावसामुळे हा सामना 14 – 14 ओव्हर्सचा करण्यात आला होता. प्रथम गोलंदाजी करताना या सामन्यात पंजाब किंग्जने शानदार गोलंदाजी करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पाच विकेट्सने पराभव केला. बंगळुरूचा संघ फक्त 95 धावांवर बाद झाला. टिम डेव्हिडने 26 चेंडूत नाबाद 50 धावा केल्या. आयपीएल 2025 मध्ये आरसीबीने आतापर्यंत बाहेर खेळलेल्या चारही सामन्यात विजय मिळवला आहे, तर घरच्या मैदानावर खेळलेल्या तिन्ही सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर पंजाब किंग्जने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीने पहिल्या चेंडूवर फिल साल्ट, रजत पाटीदार आणि टिम डेव्हिड यांनी चौकार मारून चांगली सुरुवात केली, परंतु तरीही फक्त दोन फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. आरसीबीच्या डावातील सर्वात मोठी भागीदारी शेवटच्या विकेटसाठी 32 धावांची होती. विशेष म्हणजे संघातील पहिल्या सहा फलंदाजांपैकी पाच खेळाडू पाचपेक्षा कमी धावा काढून बाद झाले. पावसामुळे बराच काळ झाकलेल्या खेळपट्टीच्या संथ आउटफिल्डसह उसळीमुळे फलंदाजांना त्रास झाला. पंजाबच्या गोलंदाजांची उत्कृष्ट कामगिरी श्रेयस अय्यरने पाच गोलंदाजांचा वापर केला आणि सर्वांनी विकेट घेतल्या. अर्शदीप सिंगने फिल साल्ट आणि कोहलीला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. युझवेंद्र चहलने रजत पाटीदार आणि जितेश शर्माला बाद केले, तर मार्को जॅनसेनने क्रुणाल पांड्या आणि प्रभावशाली खेळाडू मनोज बंडाजे यांना बाद केले. हरप्रीत ब्रारने भुवनेश्वर कुमार आणि यश दयाल यांचे बळी घेतले आणि आरसीबीला 95/9 पर्यंत रोखले. पंजाबची सावध सुरुवात पंजाब किंग्जचे सलामीवीर प्रियांश आर्य (16) आणि प्रभसिमरन सिंग (13) यांनी मोठी धावसंख्या उभारली नसली तरी त्यांच्या जलद सुरुवातीमुळे संघावरील दबाव कमी झाला. आरसीबीकडून जोश हेझलवूडने 14 धावा देत तीन विकेट घेतले. नेहल वधेराने 19 चेंडूत नाबाद 33 धावा करत पंजाबला पाच विकेट्सनी विजय मिळवून दिला. या विजयासह, पंजाब किंग्ज पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

RCB vs PBKS : सुरुवातीला पाऊस अन् नंतर घरच्या मैदानावर पुन्हा आरसीबी पराभूत Read More »

चॅम्पियन्स ट्रॉफीमधून परतताच केएल राहुलने घेतला मोठा निर्णय, नाकारली चक्क कर्णधारपदाची ऑफर

IPL 2025 : भारतीय संघाने शानदार कामगिरी करत आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये न्यूझीलंडचा 4 विकेट्सने पराभव करत स्पर्धा जिंकली आहे. या संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघासाठी केएल राहुलने जबरदस्त कामगिरी केली आहे. नुकतंच तो भारतात परतला असून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. माहितीनुसार, त्याने आयपीएल 2025 मध्ये कर्णधारपदाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुलने आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद स्वीकारण्याची ऑफर नाकारली आहे. माहितीनुसार दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीने राहुलला कर्णधारपदाची ऑफर दिली होती, मात्र त्याने ऑफर स्वीकारण्यास नकार दिला. अक्षर पटेल कर्णधार होणार?तर दुसरीकडे केएल राहुलने कर्णधारपदाची ऑफर नाकारल्यामुळे अक्षर पटेल दिल्ली फ्रँचायझीची कमान सांभाळू शकतो अशी अटकळ बांधली जात आहे. आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्सने केएल राहुलला 14 कोटी रुपयांची बोली लावून खरेदी केले. कारण राहुलला याआधी आयपीएलमध्ये कर्णधारपद भूषवण्याचा अनुभव आहे. 2020-21 मध्ये तो पंजाब किंग्जचा कर्णधार होता आणि 2022 -2024 पर्यंत तो लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार होता. त्यामुळे तो दिल्लीची कमान सांभाळणार याबाबत चर्चा सुरू झाली होती. मात्र आता मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की तो फक्त एक खेळाडू म्हणून खेळू इच्छितो, त्यामुळे राहुलचा हा निर्णय दिल्लीसाठीही किती फायदेशीर ठरणार हे पाहावे लागेल.

चॅम्पियन्स ट्रॉफीमधून परतताच केएल राहुलने घेतला मोठा निर्णय, नाकारली चक्क कर्णधारपदाची ऑफर Read More »

IPL 2025 ‘या’ तारखेपासून सुरू होणार, BCCI ने केली घोषणा

IPL 2025 : बीसीसीआयने क्रिकेटच्या चाहत्यांना आनंदाची बातमी देत. IPL 2025 च्या तारखा जाहीर केल्या आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, आयपीएल 2025 मार्चमध्ये सुरू होणार आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आयपीएल 2025 च्या सुरुवातीच्या तारखांची माहिती दिली. त्यांनी माहिती दिली की आयपीएल 2025 23 मार्चपासून आयोजित केली जाईल. बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर माध्यमांशी बोलताना शुक्ला यांनी रविवारी स्पर्धेच्या सुरुवातीची तारीख जाहीर केली. 12 जानेवारी रोजी झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीत आयपीएल सुरू होण्याच्या तारखेच्या घोषणेव्यतिरिक्त, भारतीय क्रिकेटच्या प्रशासनाबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. शुक्ला म्हणाले की, देवजीत सैकिया हे जय शाह यांची जागा घेतील आणि प्रभतेज सिंग भाटिया यांची बीसीसीआयचे कोषाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. त्यांनी पुढे सांगितले की, चॅम्पियन्स ट्रॉफी भारतीय संघाची घोषणा 18-19 जानेवारी दरम्यान होणार आणि 2025 च्या महिला प्रीमियर लीग (WPL) च्या ठिकाणांचीही लवकरच घोषणा केली जाईल. काही काळापूर्वी आयपीएल 2025 साठी मेगा लिलाव आयोजित करण्यात आला होता. मेगा लिलावात 182 खेळाडू खरेदी करण्यात आले. ज्यावर 639.15 कोटी रुपये खर्च झाले. आयपीएलच्या मेगा लिलावानंतर सर्व संघांमध्ये खूप बदल झाले आहेत. मेगा लिलावात ऋषभ पंतवर भरपूर पैशांचा वर्षाव झाला. लिलावात पंतला सर्वाधिक 27 कोटी रुपयांना विकण्यात आले. पंतला लखनौ सुपर जायंट्सने खरेदी केले.

IPL 2025 ‘या’ तारखेपासून सुरू होणार, BCCI ने केली घोषणा Read More »

IPL 2025 मध्ये होणार 94 सामने? जाणून घ्या बीसीसीआयचा निर्णय

IPL 2025 :  येत्या काही दिवसात IPL 2025 साठी मेगा लिलाव होणार आहे. मात्र त्यापूर्वी IPL 2025 मध्ये 94 सामने होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.  IPL 2022,  IPL 2023 आणि IPL 2024 मध्ये 74 सामने झाले होते यंदा देखील 74 सामने होणार असल्याची माहिती समोर आली आहे.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयने सामन्यांच्या संख्येत कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे.  2022 मध्ये नवीन मीडिया अधिकारांच्या लिलावादरम्यान, बीसीसीआयने 2023 आणि 2024 मध्ये 74 सामने, 2025 आणि 2026 मध्ये 84 सामने आणि 2027 मध्ये जास्तीत जास्त 94 सामन्यांबद्दल बोलले होते. पण सलग सामन्यांसाठी भारतीय स्टार खेळाडूंचा दबाव कमी करण्यासाठी बीसीसीआयने आयपीएलच्या पुढील आवृत्तीत केवळ 74 सामने आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय 2025 मध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारताची पोहोचण्याची शक्यता खूप जास्त आहे. 11 जूनपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. आयपीएल दीर्घकाळ सुरू राहिल्यास खेळाडूंना पुरेशी विश्रांती घेता येणार नाही, त्यामुळे सामन्यांची संख्या न वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मानले जात आहे. आयपीएल फ्रँचायझींना लिलावापूर्वी पाच खेळाडूंना कायम ठेवण्याची संधी? मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुढील आयपीएल लिलावापूर्वी बीसीसीआय फ्रँचायझीला प्रत्येकी पाच खेळाडूंना संघात ठेवण्याची परवानगी देऊ शकते. याबाबत बीसीसीआयने फ्रँचायझीशी चर्चा केली आहे. काही फ्रँचायझींनी 5 ते 6 खेळाडूंना कायम ठेवण्याची मागणी केली होती.  सध्या बीसीसीआय जास्तीत जास्त पाच खेळाडूंना कायम ठेवण्याची परवानगी देणार असल्याची बातमी आहे. मात्र, त्यात किती परदेशी खेळाडू आहेत, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही. त्याचवेळी, लिलावात राईट टू मॅच (RTM) पर्याय नसल्याचं सांगण्यात येत आहे.

IPL 2025 मध्ये होणार 94 सामने? जाणून घ्या बीसीसीआयचा निर्णय Read More »