DNA मराठी

BCCI

wcl

WCL मध्ये पुन्हा ट्विस्ट; भारताचा पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार; सेमीफायनल होणार ?

WCL IND vs PAK : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स स्पर्धा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. इंडियन चॅम्पियन संघाने सेमीफायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला असल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिल्याने या स्पर्धेचा पहिला सेमीफायनल सामना 31 जुलै रोजी एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे होणार आहे. मात्र भारतीय संघाने खेळण्यास नकार दिल्याने आता आयोजक काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. भारतीय संघाने वेस्ट इंडिज चॅम्पियन्सचा पराभव करत या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये एन्ट्री केली आहे. स्पर्धेच्या वेळापत्रकानुसार, इंडियन चॅम्पियन्स आणि पाकिस्तान चॅम्पियन्स यांच्यामध्ये सेमी फायनलचा सामना 31 जुलै रोजी होणार आहे. मात्र भारतीय संघ या सामन्यात खेळणार की नाही याबाबत कोणताही निर्णय झालेला अशी माहिती समोर आली आहे. या स्पर्धेचे लीग सामन्यात देखील भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला होता. यावेळी युसुफ पठाण, इरफान पठाण, युवराज सिंग, हरभजन सिंग आणि शिखर धवन या खेळाडूंनी पाकिस्तानसोबत खेळण्यास नकार दिल्यानंतर सामना रद्द करण्यात आला होता. नेमकं प्रकरण काय? जम्मू आणि कश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला होता या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता तर अनेक जण जखमी झाले होते. या दहशतवादी हल्ल्यापाठीमागे पाकिस्तान असल्याने पाकिस्तानसोबत कोणताही सामना खेळणार नसल्याची घोषणा अनेक खेळाडूंनी केली होती.

WCL मध्ये पुन्हा ट्विस्ट; भारताचा पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार; सेमीफायनल होणार ? Read More »

क्रिकेटमध्ये होणार बदल, आयसीसीचा नवीन नियम जाणून घ्या

Cricket New Rules: सीमारेषेवरील ‘बनी हॉप्स’ झेलबाबत एमसीसीने नवीन नियम केले आहेत.  हा नवीन नियम नेमका आहे तरी काय, हे जाणून घ्या. नवीन नियम काय? कायदा 19.5.2 चे बदल करण्यात येणार आहे.नवीन नियमानुसार असा झेल क्षेत्ररक्षकाने घेतला, तर त्या फलंदाजाला नाबाद ठरविले जाईल. नवीन नियमानुसार झेलसाठी सीमारेषेबाहेर गेलेल्या कोणत्याही क्षेत्ररक्षकाला हवेत असताना चेंडूला फक्त एकदाच स्पर्श करण्याची परवानगी असणार आहे. हा नियम रिले (दोन क्षेत्ररक्षकांनी मिळून घेतलेल्या) झेललाही लागू होईल. 17 जूनपासून लागू होणार नवीन नियम हा नियम 17 जून 2025 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी लागू होईल आणि ऑक्टोबर 2026 पासून अधिकृतपणे एमसीसीच्या कायद्यांमध्ये समाविष्ट केला जाईल. बनी हॉप्स म्हणजे काय? सीमारेषेवरील क्षेत्ररक्षक झेल टिपतो आणि त्याचा तोल जाऊन तो सीमारेषेबाहेर जात असेल, असे त्याला वाटते, तेव्हा तो चेंडू हवेत उडवितो. पुन्हा उंच उडी मारून (जमिनीला पायाचा स्पर्श होऊ न देता) तो झेल टिपतो आणि पुन्हा चेंडू सीमारेषेबाहेर फेकून पुन्हा झेल टिपतो. या वेगळ्या झेलने ‘बनी हॉप्स’ असे म्हटले जाते.

क्रिकेटमध्ये होणार बदल, आयसीसीचा नवीन नियम जाणून घ्या Read More »

IPL 2025 पुन्हा सुरू होणार, संघाना मान्य करावी लागणार बीसीसीआयची ‘ही’ अट

IPL 2025 : ऑपरेशन सिंदूरनंतर बीसीसीआयने एका आठवड्यासाठी आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावा कमी होत असल्याने बीसीसीआयने आयपीएल 2025 पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी बीसीसीआयने 12 मे रोजी नवीन वेळापत्रक देखील जाहीर केले आहे. 17 मे पासून सुरू होणाऱ्या आयपीएलसाठी बीसीसीआयने एक तात्पुरता नियम लागू केला आहे, ज्यामुळे सर्व संघांना दिलासा मिळाला आहे. परंतु या नियमानुसार, संघांना एका अटीवर सहमती द्यावी लागेल. बीसीसीआयने नवीन नियम लागू केला उर्वरित 17 सामन्यांसाठी बीसीसीआयने एक नवीन नियम लागू केला आहे. बीसीसीआयने सर्व संघांना बदली खेळाडूंना करारबद्ध करण्याची परवानगी दिली आहे. अहवालानुसार, यापूर्वी, लीग टप्प्यातील 12 सामन्यांनंतर, खेळाडू दुखापती, आजार किंवा इतर कोणत्याही कारणामुळे बाहेर असल्यास संघांना बदली खेळाडूंवर स्वाक्षरी करता येत नव्हती. या हंगामात आतापर्यंत अनेक संघांनी 12 सामने खेळले आहेत. परंतु सध्याची परिस्थिती लक्षात घेता, बोर्डाने उर्वरित सामन्यांसाठी यावर सूट दिली आहे. याचा अर्थ असा की संघ आता नवीन खेळाडूला करारबद्ध करू शकतात. ही स्थिती संघांसमोर असेल या नियमासोबतच बीसीसीआयने संघांसमोर एक अटही ठेवली आहे. बोर्डाने आधीच सांगितले आहे की हे नियम फक्त तात्पुरते मानले पाहिजेत. याचा अर्थ असा की जर एखाद्या संघाने एखाद्या खेळाडूला करारबद्ध केले तर ते फक्त या हंगामासाठी असेल. तसेच संघ त्याला पुढील हंगामासाठी राखू शकत नाहीत. जर एखाद्या खेळाडूने चांगली कामगिरी केली तर संघ त्याला थांबवू शकत नाही आणि पुढच्या हंगामातच त्याला खरेदी करावे लागेल, जिथे तो खेळाडू पुन्हा त्याच संघासोबत खेळू शकेल अशी आशा फारच कमी असेल. हा नियम सर्व 10 संघांसाठी आहे. पण याचा फायदा फक्त 7 संघांनाच होईल. कारण तीन संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स बाहेर पडले आहेत. या हंगामात बाहेर पडणारा पहिला संघ सीएसके आहे.

IPL 2025 पुन्हा सुरू होणार, संघाना मान्य करावी लागणार बीसीसीआयची ‘ही’ अट Read More »

इंग्लंड दौऱ्यापूर्वी भारताला धक्का, रोहित शर्मानंतर विराट कोहलीही करणार कसोटी क्रिकेटला टाटा- बाय?

Virat Kohli: काही दिवसांपूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तर आता आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली देखील कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार करत आहे. माहितीनुसार, विराट कोहली इंग्लंड दौऱ्यापूर्वी कसोटीमधून निवृत्ती जाहीर करणार आहे. त्याने याबाबत बीसीसीआयला देखील माहिती दिली आहे. भारताचा इंग्लड दौरा 20 जूनपासून सुरू होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. कोहलीने काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयला त्याच्या निर्णयाची माहिती दिली आहे आणि आता इंग्लंड दौऱ्यात खेळण्याची त्याची शक्यता खूप कमी आहे. कोहलीच्या या निर्णयावरून बीसीसीआयमध्ये बराच गोंधळ सुरू आहे. बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या विषयावर विराट कोहलीशी बोलले आहे आणि त्याला त्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. मात्र कोहलीने आपले हेतू स्पष्ट केले आहेत आणि इंग्लंड दौऱ्यापासून स्वतःला दूर ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून अचानक निवृत्ती घेतल्यानंतर, विराट कोहलीनेही या फॉरमॅटमधून निवृत्तीची बातमी भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी धक्कादायक आहे. यापूर्वी, दोन्ही दिग्गज फलंदाजांनी टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, जी भारताच्या विश्वचषक विजयानंतर झाली. जर कोहलीनेही कसोटीतून निवृत्ती घेतली तर भारतीय कसोटी संघाला फलंदाजीच्या क्रमात अनुभवाची मोठी कमतरता भासेल. त्यामुळे यशस्वी जयस्वाल, केएल राहुल आणि शुभमन गिल सारख्या तरुण खेळाडूंवर मोठी जबाबदारी येईल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कोहली अपयशी ठरला 2024-25 च्या कसोटी मालिकेत कोहलीची कामगिरी निराशाजनक होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेत त्याने फक्त 190 धावा केल्या. पर्थ कसोटीत शानदार शतक केल्यानंतर, उर्वरित चार सामन्यांमध्ये तो फक्त 85 धावा करू शकला. हा दौरा त्याच्यासाठी खूप आव्हानात्मक होता. कोहलीची कसोटी कारकीर्द विराट कोहलीने आतापर्यंत 123 कसोटी सामने खेळले आहेत आणि एकूण 9,230 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याच्या नावावर 30 शतके आहेत.

इंग्लंड दौऱ्यापूर्वी भारताला धक्का, रोहित शर्मानंतर विराट कोहलीही करणार कसोटी क्रिकेटला टाटा- बाय? Read More »

भारताचा ‘शानदार’ विजय, न्यूझीलंडला धक्का देत पटकावले चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे विजेतेपद

Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे विजेतेपद पटकावले आहे. या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 4 विकेट्सने पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 251 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 6 विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. कर्णधार रोहित शर्माने 76 धावा केल्या, तर श्रेयस अय्यरने 48 धावांचे योगदान दिले. पहिल्या विकेटसाठी 105 धावांची भागीदारी252 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली. रोहितने डावाच्या पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर षटकार मारून न्यूझीलंडला बॅकफूटवर नेले. पहिल्या विकेटसाठी दोघांमध्ये 105 धावांची भागीदारी झाली, पण त्यानंतर ग्लेन फिलिप्सने गिलचा एक शानदार झेल घेतला. 50 चेंडूत 31 धावा काढून गिल बाद झाला. यानंतर, विराट कोहलीने फलंदाजीला आला पण तो फक्त 1 धाव करून बाद झाला. त्यानंतर रोहित शर्माने श्रेयस अय्यरसह डावाला पुढे नेले मात्र मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात तो यष्ट्यांच्या मागे बाद झाला. रोहित शर्माने 83 चेंडूत 7 चौकार आणि 8 षटकारांसह 76 धावांची खेळी केली. श्रेयस अय्यरने 62 चेंडूत 48 धावा केल्या, पण रचिन रवींद्रने एक शानदार झेल घेतला. यानंतर अक्षर पटेलने 20 चेंडूत 29 धावा केल्या, पण तोही बाद झाला. हार्दिक पांड्या 18 चेंडूत 18 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. शेवटी केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांनी टीम इंडियाला विजय मिळवून दिला. राहुलने 33 चेंडूत 34 धावा केल्या, तर जडेजा 6 चेंडूत 9 धावा केल्या.

भारताचा ‘शानदार’ विजय, न्यूझीलंडला धक्का देत पटकावले चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे विजेतेपद Read More »

IPL 2025 चे वेळापत्रक जाहीर, ‘या’ दिवशी होणार सुरुवात

IPL 2025 : बीसीसीआयने IPL 2025 चे वेळापत्रक जाहीर केले. 22 मार्चपासून या स्पर्धेची सुरुवात होणार आहे. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात आयपीएल 2024 विजेत्या कोलकाता नाईट रायडर्सचा संघ त्यांच्या घरच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध खेळणार आहे. यावेळी हंगामात एकूण 74 सामने खेळवले जातील, जे देशातील 13 वेगवेगळ्या शहरांमध्ये होणार आहेत. यावेळी 12 डबल हेडर सामने आयोजित केले जातील. स्पर्धेचा अंतिम सामना 25 मे 2025 रोजी होईल. कोलकाताने शेवटच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद (SRH) ला हरवून विजेतेपद जिंकले होते. यावेळी संघ 23 मार्च रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. तर 5 वेळा विजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) 23 मार्च रोजी दिवसाच्या दुसऱ्या सामन्यात एकमेकांविरुद्ध खेळतील. नेहमीप्रमाणे, लीगचे संध्याकाळचे सामने संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होतील, तर डबल-हेडरच्या दिवशी, दिवसाचा पहिला सामना दुपारी 3. 30 वाजता सुरू होईल. स्पर्धेत 70 लीग सामन्यांनंतर एक दिवस विश्रांती असेल आणि त्यानंतर प्लेऑफमध्ये पोहोचलेले 4 संघ क्वालिफायर 1, एलिमिनेटर आणि क्वालिफायर 2 सामने खेळतील आणि दोन संघ अंतिम फेरीत पोहोचतील. 22 मार्च ते 25 मे दरम्यान फक्त 3 दिवस असे असतील जेव्हा स्पर्धेचा कोणताही सामना खेळवला जाणार नाही. तीन दिवसांच्या लीग टप्प्यानंतरचा हा दिवस आहे. त्यानंतर एलिमिनेटर नंतर, क्वालिफायर 2 च्या आधीचा दिवस आणि शेवटी अंतिम सामन्याच्या आधीचा दिवस असा असेल जेव्हा खेळ होणार नाही. https://twitter.com/IPL/status/1891108307756015779?t=sP7AKzjjV1gsvJY0NoZV8A&s=19 लीगच्या इतिहासात 10 वर्षांनंतर पहिल्यांदाच लीगचा अंतिम सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्स मैदानावर होणार आहे. येथे शेवटचा अंतिम सामना 2015 मध्ये खेळला गेला होता, जेव्हा मुंबईने चेन्नईचा पराभव करून दुसऱ्यांदा विजेतेपद जिंकले होते.

IPL 2025 चे वेळापत्रक जाहीर, ‘या’ दिवशी होणार सुरुवात Read More »

Champions Trophy 2025: भारतीय संघाला मोठा धक्का, चॅम्पियन्स ट्रॉफीत दिसणार नाही जसप्रीत बुमराह

Champions Trophy 2025: बीसीसीआयने मोठा निर्णय घेत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघातून जसप्रीत बुमराह आणि यशस्वी जयस्वाल वगळण्यात आले आहे. तर तर वरुण चक्रवर्तीला आणि हर्षित राणाला संघात स्थान देण्यात आले आहे. बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी युवा गोलंदाज हर्षित राणाला संघात स्थान मिळाले आहे. याशिवाय यशस्वी जयस्वालच्या जागी फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीचा समावेश करण्यात आला आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम संघबीसीसीआयने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारताच्या संघात रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती यांचा समावेश केला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे, ज्यामध्ये जगातील अव्वल आठ एकदिवसीय संघ सहभागी होतील. भारताने पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्याने, आयसीसीने हायब्रिड मॉडेलला मान्यता दिल्यामुळे, भारत आपले सर्व सामने दुबईमध्ये खेळेल. भारताच्या गट-टप्प्यात बांगलादेश (20 फेब्रुवारी), पाकिस्तान (23 फेब्रुवारी) आणि न्यूझीलंड (2 मार्च) विरुद्धचे सामने आहेत. जर भारताने आगेकूच केली तर उपांत्य फेरीचे सामने 4 आणि 5 मार्च रोजी होतील, तर अंतिम सामना 9 मार्च रोजी होईल.

Champions Trophy 2025: भारतीय संघाला मोठा धक्का, चॅम्पियन्स ट्रॉफीत दिसणार नाही जसप्रीत बुमराह Read More »

ICC Champions Trophy 2025 : BCCI घेणार मोठा निर्णय, मोहम्मद सिराजला मिळणार संधी?

ICC Champions Trophy 2025 : क्रिकेटच्या चाहतांचे लक्ष लागून असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. आज म्हणजेच 11 फेब्रुवारी रोजी आयसीसीने अंतिम संघ सादर करण्याची अंतिम तारीख निश्चित केली होती. तथापि, भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या तंदुरुस्तीबद्दल सस्पेन्स कायम आहे. अशा परिस्थितीत, बीसीसीआयला आजच त्यांचा अंतिम संघ सादर करावा लागेल. पण आतापर्यंत बुमराहच्या तंदुरुस्तीबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. जर बुमराह स्पर्धेतून बाहेर पडला तर त्याच्या जागी मोहम्मद सिराज टीम इंडियामध्ये सामील होऊ शकतो. या स्पर्धेसाठी सिराजची निवड झाली नाही. त्यामुळे आता तो संघात येऊ शकतो. ESPNcricinfo च्या वृत्तानुसार, जसप्रीत बुमराहने नुकतेच बेंगळुरूमधील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये त्याच्या कंबरचे स्कॅनिंग केले. बुमराहबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी वैद्यकीय कर्मचारी निवडकर्त्यांना आणि संघ व्यवस्थापनाला भेटतील. बीसीसीआय आज म्हणजेच 11 फेब्रुवारी रोजी बुमराहबाबत निर्णय घेईल. आता बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त आहे की नाही हे पाहणे मनोरंजक ठरेल. जर तो तंदुरुस्त नसेल तर टीम इंडियाला त्याची उणीव नक्कीच जाणवेल. बुमराहबाबतचा निर्णय आज येईल. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी सर्व संघांनी त्यांचे संघ जाहीर केले होते. परंतु आयसीसीने सर्व संघांना अंतिम संघ सादर करण्यासाठी 11 फेब्रुवारीची अंतिम मुदत दिली होती. आज, सर्व संघ त्यांच्या जखमी खेळाडूंच्या बदलीची घोषणा करणार आहेत. बीसीसीआय आज जसप्रीत बुमराहबाबतचा निर्णय जाहीर करेल. बुमराहबाबत लवकरात लवकर निर्णय होण्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. मोहम्मद सिराजला संधी मिळणार?जेव्हा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी टीम इंडियाची घोषणा केली तेव्हा मोहम्मद सिराज त्या संघात नव्हते. जेव्हा कर्णधाराला विचारण्यात आले की सिराज तिथे का नाही, तेव्हा त्याने सांगितले की सिराज नवीन चेंडूने चांगली गोलंदाजी करतो. पण जुन्या चेंडूवर तो कमी प्रभावी आहे. या कारणास्तव, त्याला घेतले गेले नाही. पण जर बुमराह तंदुरुस्त नसेल तर मोहम्मद सिराजचा टीम इंडियामध्ये समावेश निश्चित मानला जात आहे. कारण सिराजने बुमराह आणि शमीच्या उपस्थितीत अनेकदा गोलंदाजीची जबाबदारी घेतली आहे.

ICC Champions Trophy 2025 : BCCI घेणार मोठा निर्णय, मोहम्मद सिराजला मिळणार संधी? Read More »

Champions Trophy साठी पाकिस्तानात जाणार नाही Rohit Sharma ? बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

Rohit Sharma: 19 फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उद्घाटन समारंभाला भारतीय कर्णधार रोहित शर्मा जाणार नसल्याची बातमी समोर येत आहे. रोहीत शर्माला पाकिस्तानमध्ये पाठवण्यास बीसीसीआय तयार नसल्याचं सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे बीसीसीआयच्या या निर्णयामुळे पीसीबी देखील नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे यापूर्वी ही संपूर्ण स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार होती, परंतु बीसीसीआयने नकार दिल्यानंतर ती हायब्रिड मॉडेलवर आयोजित केली जात आहे. रोहित शर्मा पाकिस्तानमध्ये कर्णधारांच्या पारंपारिक फोटोशूट आणि कार्यक्रमापूर्वीच्या पत्रकार परिषदेत सहभागी होण्याची अपेक्षा होती. भारत चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व सामने दुबईमध्ये खेळेल, ज्यामध्ये 23 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानविरुद्ध सामना खेळणार आहे. बीसीसीआयने रोहितला पाकिस्तानला पाठवण्याच्या वृत्ताला दुजोरा किंवा नकार दिलेला नाही. पण भारतीय संघ जर्सीवर पाकिस्तानचे नाव न छापण्याचा विचार करत असल्याबद्दल पीसीबीच्या अधिकाऱ्याने नाराजी व्यक्त केली आहे. पीसीबीच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर आयएएनएसला सांगितले की, ‘बीसीसीआय क्रिकेटमध्ये राजकारण आणत आहे, जे खेळासाठी अजिबात चांगले नाही. आधी त्याने पाकिस्तान दौऱ्याला नकार दिला, नंतर आता तो कर्णधाराला उद्घाटन समारंभाला पाठवत नाही. आणि आता बातम्या येत आहेत की त्यांना जर्सीवर यजमान देशाचे (पाकिस्तान) नाव नको आहे. आम्हाला आशा आहे की आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) हे होऊ देणार नाही आणि पाकिस्तानला पाठिंबा देईल. या स्पर्धेसाठी भारताने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. रोहित शर्माला कर्णधार आणि शुभमन गिलला उपकर्णधार बनवण्यात आले आहे, तर मोहम्मद शमी, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव आणि यशस्वी जयस्वाल यांचाही संघात समावेश आहे. भारत आपला पहिला सामना 20 फेब्रुवारी रोजी दुबईमध्ये बांगलादेशविरुद्ध खेळेल आणि 23 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरेल. भारताचा गटातील शेवटचा सामना 2 मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध असेल.

Champions Trophy साठी पाकिस्तानात जाणार नाही Rohit Sharma ? बीसीसीआय घेणार मोठा निर्णय Read More »

IPL 2025 ‘या’ तारखेपासून सुरू होणार, BCCI ने केली घोषणा

IPL 2025 : बीसीसीआयने क्रिकेटच्या चाहत्यांना आनंदाची बातमी देत. IPL 2025 च्या तारखा जाहीर केल्या आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, आयपीएल 2025 मार्चमध्ये सुरू होणार आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आयपीएल 2025 च्या सुरुवातीच्या तारखांची माहिती दिली. त्यांनी माहिती दिली की आयपीएल 2025 23 मार्चपासून आयोजित केली जाईल. बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर माध्यमांशी बोलताना शुक्ला यांनी रविवारी स्पर्धेच्या सुरुवातीची तारीख जाहीर केली. 12 जानेवारी रोजी झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीत आयपीएल सुरू होण्याच्या तारखेच्या घोषणेव्यतिरिक्त, भारतीय क्रिकेटच्या प्रशासनाबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. शुक्ला म्हणाले की, देवजीत सैकिया हे जय शाह यांची जागा घेतील आणि प्रभतेज सिंग भाटिया यांची बीसीसीआयचे कोषाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. त्यांनी पुढे सांगितले की, चॅम्पियन्स ट्रॉफी भारतीय संघाची घोषणा 18-19 जानेवारी दरम्यान होणार आणि 2025 च्या महिला प्रीमियर लीग (WPL) च्या ठिकाणांचीही लवकरच घोषणा केली जाईल. काही काळापूर्वी आयपीएल 2025 साठी मेगा लिलाव आयोजित करण्यात आला होता. मेगा लिलावात 182 खेळाडू खरेदी करण्यात आले. ज्यावर 639.15 कोटी रुपये खर्च झाले. आयपीएलच्या मेगा लिलावानंतर सर्व संघांमध्ये खूप बदल झाले आहेत. मेगा लिलावात ऋषभ पंतवर भरपूर पैशांचा वर्षाव झाला. लिलावात पंतला सर्वाधिक 27 कोटी रुपयांना विकण्यात आले. पंतला लखनौ सुपर जायंट्सने खरेदी केले.

IPL 2025 ‘या’ तारखेपासून सुरू होणार, BCCI ने केली घोषणा Read More »