DNA मराठी

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics: जिल्ह्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी स्व. बाळासाहेब विखे पाटील यांनी सातत्याने संघर्ष केला

Ahmednagar Politics: जिल्ह्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी स्व. बाळासाहेब विखे पाटील यांनी सातत्याने संघर्ष केला. महाराष्ट्र पाणी परिषेदेच्या माध्यमातून त्यांनी पाणी प्रश्नाबाबत केलेल्या सुचनांचे शासनाकडून धोरणात रुपांतर होणे, हेच त्यांच्या प्रयत्नांचे यश ठरले असे प्रतिपादन महसूल, पशुसंवर्धन मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.  शेती, सहकार, शिक्षण, पाणी आणि ग्रामीण विकासाचे प्रनेते लोकनेते पद्मभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या यांच्या ९२ व्या जयंती दिनाचे ओचित्य साधुन प्रवरा परिवाच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी खा. डॉ, सुजय विखे पाटील,जेष्ठ नेते वंसतराव कापरे, भाजपा नेते विनायकराव देशमुख, यांच्यासह विविध संस्थाने पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते.  मंत्री विखे पाटील म्हणाले की, बाळासाहेब विखे पाटील यांनी ग्रामीण विकासाचे धोरण ठेवण्यासाठी प्रत्येक सरकारमध्ये अभ्यास मंडळाच्या माध्यमातून सुचना केल्या. पाणी प्रश्नासाठी ते नेहमीच संवेदनशील राहीले. जिल्ह्याच्या हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष करताना नवीन पाणी योजना निर्माण करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र पाणी परिषेदेच्या माध्यमातून तयार केलेले प्रयत्न शासनाने स्विकारले. पश्चिम वाहीनी नद्यांचे पाणी तुटीच्या खोऱ्यात वळवून जिल्हा दुष्काळमुक्त  करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश येत असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.  शैक्षणिक क्षेत्रात कौशल्य शिक्षणाला प्राधान्य हवे हा विचार त्यांनी प्रथम मांडला. काळाच्या ओघात आज कौशल्य शिक्षणाला आलेले महत्व पाहता बाळासाहेब विखे पाटील यांचा विचार किती दुरदृष्टाचा होता हे दिसून येते. आज जिल्ह्यात औद्योगिक वातावरण निर्माण करताना उद्योग क्षेत्राला आवश्यक मनुष्‍यबळ निर्माण करण्यासाठी नगर येथे कौशल्य प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून जिल्ह्यातील युवकांना निश्चित लाभ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Ahmednagar Politics: जिल्ह्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी स्व. बाळासाहेब विखे पाटील यांनी सातत्याने संघर्ष केला Read More »

Ahmednagar Politics: बाळासाहेब तुम्ही आता विधानसभा लढा; कार्यकर्त्यांचा सुर

Ahmednagar Politics : अहमदनगर शहरात लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली असल्याचे दिसून येत आहे.  महानगरपालिकेमध्ये गेले 35 वर्ष नगरसेवक राहिलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या समर्थकांनी नुकतीच एक बैठक घेऊन यामध्ये विधानसभेची आता तुम्ही तयारी करा व निवडणूक लढवा असा सूर कार्यकर्त्यांनी बैठकीमध्ये जाहीरपणे मांडला. बाळासाहेब बोराटे हे गेले 35 वर्ष नगरपालिकेचे उपाध्यक्ष त्यानंतर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक, विरोधी पक्ष नेते, नियोजन समितीचे सभापती यांसह विविध पदांवर आपल्या कार्याची छाप पाडली आहे.   नुकत्याच त्यांच्या समर्थकांनी तीन दिवसापूर्वी एक बैठक नगर येथे घेतली. या बैठकीमध्ये अनेक कार्यकर्ते पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते आणि त्यांनी आपापली भूमिका मांडली. बाळासाहेब बोराटे यांनी नगर शहरांमध्ये विविध सामाजिक, धार्मिक उपक्रमाच्या माध्यमातून एक नावलौकीक मिळविलेला आहे.  त्यामुळे त्यांनी आता मागे न हटता आगामी काळामध्ये नगर शहरांमध्ये विधानसभेसाठी निवडणूक लढवावी अशी भूमिका या बैठकीमध्ये अनेक जणांनी मांडली व त्याला सर्वांनी पाठिंबा सुद्धा दिला.  या बैठकीमध्ये बोराटे यांचा गेल्या 35 वर्षांमध्ये केलेल्या कामाचा आढावा सुद्धा यावेळी मांडला. श्री. बोराटे यांनी सामाजिक, धार्मिक, राजकीय, कला, क्रीडा या सर्व क्षेत्रांमध्ये योग्य तो समतोल राखलेला असल्याने आज सर्वच क्षेत्रातील व्यक्ती त्यांच्याशी आपुलकीचे नाते तयार झाले आहे.  महानगरपालिकेच्या माध्यमातून असो अथवा कुठल्याही क्षेत्रामध्ये असो नागरिकांना जिथे जिथे अडचण होत आहे. तिथे सोडवण्यासाठी ते अग्रेसर राहिलेले आहेत अशी एक ना अनेक उदाहरणे देता येतील नगर शहराच्या प्रत्येक भागांमध्ये त्यांच्या दांडगा संपर्क आहे.  त्यामुळे त्यांनी आता महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आयोजित विधानसभेची निवडणूक लढवावी असे अनेकांचे मत आहे त्या दृष्टिकोनातून सुद्धा या बैठकीमध्ये सविस्तर अशी चर्चा पदाधिकाऱ्यांमध्ये झाली पदाधिकाऱ्यांनी आम्ही बोराटे यांच्या पाठीशी ठामपणे आहोत व राहणार आहोत पण यंदा मागचा सर्व अनुभव पाहता त्यांना सुद्धा पक्षाने उमेदवारी द्यावी अशी सुद्धा अनेकांनी भूमिका मांडलेली आहे.  पण दुसरीकडे यांनी निवडणूक लढवताना विधानसभा हेच ध्येय समोर ठेवावे अशावर सर्वांचे एकमत झालेले आहे.

Ahmednagar Politics: बाळासाहेब तुम्ही आता विधानसभा लढा; कार्यकर्त्यांचा सुर Read More »

Maharashtra News: आम्ही लोकसभा लढवणारच.. राणी लंके

Maharashtra News: समोर कोणीही उमेदवार असला तरी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातुन  येणारी लोकसभा निवडणूक लढणारच असल्याचे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या राणी लंके यांनी स्पष्ट केले आहे.  शिवस्वराज्य यात्रेचा शुभारंभ मोहटादेवी गडावरून आज करण्यात आला. यानंतर पाथर्डी इथे पत्रकार परिषदेत बोलताना राणी लंके यांनी मला उमेदवारी करावी लागली तर मी लोकसभा निवडणुक नक्कीच लढवणार असे स्पष्टपणे सांगितले. लोकसभेला आ.निलेश लंके उमेदवार असणार का आपण, आपली तयारी आहे का? या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर राणी लंके यांनी येणारी लोकसभा निवडणूक लढवणार आहोत. मतदारसंघात अनेक प्रश्न प्रलंबित असून त्याची सोडवणूक करण्यासाठी आम्ही तयार आहोत हे सांगत नगर दक्षिणेतून आ.निलेश लंके अथवा आपण स्वतः निवडणूक लढवणारच असे सांगण्याचा प्रयत्न केला.  राणी लंके यांच्या वक्तव्यावरून समोर कोण उमेदवार असेल याची चिंता नसून कोणीही उमेदवार असला तरी लंके दांपत्यापैकी एकजण निवडणुकीच्या रिंगणात असेल असे आता स्पष्ट होत आहे.  शिवस्वराज्य यात्रा नगर दक्षिण मतदारसंघात असून सर्व सातही तालुक्यातील प्रत्येक गावात जाणार असून यासाठी पाच शिवस्वराज्य रथ तयार करण्यात आले आहेत. यात्रेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा आणि हिंदवी स्वराज्याचा इतिहास शिवअभ्यासक लोकांसमोर मांडणार आहेत.  पंधरा दिवस यात्रा चालणार असून समारोप नगर शहरात आ.निलेश लंके यांच्या उपस्थितीत होणार आहे. आमदार लोकनेते निलेश लंके यांच्या संकल्पनेतून शिवस्वराज्य यात्रा मराठी माणसांची अस्मिता आणि अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यास 350 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने शिवराय मनामनात.. शिवराय घराघरात ! पोहचविण्यासाठी आम्ही घेऊन येतोय नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात शिवस्वराज्य यात्रा या यात्रेचा प्रारंभ आज सौ. राणीताई लंके यांनी आई मोहटा देवीचे दर्शन घेऊन केला. यावेळी उपस्थित सर्व सहकारी होते.

Maharashtra News: आम्ही लोकसभा लढवणारच.. राणी लंके Read More »