DNA मराठी

राजकीय

Manoj Jarange Patil: 12 ऑगस्तला जरांगे पाटील अहमदनगर शहरात! ‘या’ मार्गाने निघणार शांतता रॅली

Manoj Jarange Patil: मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील 12 ऑगस्ट रोजी अहमदनगर शहरात दाखल होणार आहे.  अहमदनगर शहरात 12 ऑगस्ट रोजी जरांगे पाटील यांचे नेतृत्वाखाली मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.  यासाठी अखंड मराठा समाज अहमदनगर यांच्या वतीने साईमुरली लॉन येथे जिल्हास्तरीय बैठक आयोजन करण्यात आली होती.  सत्ताधारी आणि विरोधक गेंड्याच्या कातडीचे झाले आहे. त्यांना लोकांचे भावना समजत नाही. समाजाला हे वारंवार आश्वासन देत आहे मात्र ते पाडले जात नाही. ज्यामुळे पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीचे आयोजन केले आहे.  या रॅलीला मराठवाड्यात मोठा समर्थन मिळाला आहे तर आता आपल्या भागात या रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. नगर शहरात होणाऱ्या या रॅलीत दहा लाख लोक येणार आहे. सध्या लोकांमध्ये सरकार आणि विरोधकांबद्दल मोठा रोष निर्माण झाला आहे. 12 तारखेला लोकं घराला कुलूप लावून रस्त्यावर उतरणार आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी आम्ही आरक्षण मिळवून राहणार. अशी प्रतिक्रिया डीएनए मराठीशी बोलताना गजेंद्र दांगट यांनी दिली. असा असणार रॅलीचा मार्ग  12 ऑगस्त रोजी मनोज जरांगे पाटील यांची रॅली दिल्लीगेट, कापड बाजारहून शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ संपणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

Manoj Jarange Patil: 12 ऑगस्तला जरांगे पाटील अहमदनगर शहरात! ‘या’ मार्गाने निघणार शांतता रॅली Read More »

पूजा खेडकर प्रकरण अन् UPSC ने घेतला मोठा निर्णय,परीक्षेचा पॅटर्न बदलला

UPSC Exam :  वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर हिला अपंगत्व कोट्यातून UPSC मध्ये स्थान मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता केंद्रीय लोकसेवा आयोगाने एक मोठे पाऊल उचलले आहे.  UPSC आपल्या परीक्षा पद्धतीत बदल करणार आहे. आता परीक्षेतील हेराफेरी आणि फसवणूक रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. यामध्ये आधार फिंगरप्रिंट प्रमाणीकरण, उमेदवारांच्या चेहऱ्याची ओळख आणि थेट एआय आधारित सीसीटीव्ही मॉनिटरिंग इत्यादींचा समावेश आहे. एआय तंत्रज्ञानाने UPSC परीक्षा मॉनिटरिंग केले जाईल मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेदरम्यान तंत्रज्ञान सेवांसाठी PSUs च्या संपर्कात आहे. नोटीसनुसार, नमूद केलेल्या गोष्टींमध्ये आधार आधारित बोट प्रमाणीकरण, ई-ॲडमिट कार्डचे क्यूआर कोड स्कॅनिंग आणि थेट एआय आधारित सीसीटीव्ही स्क्रीनिंग यांचा समावेश आहे. यूपीएससीच्या नोटीसमध्ये काय आहे? “मुख्य परीक्षा/मुलाखत/पडताळणी प्रक्रियेच्या वेळी, सेवा प्रदात्याला परीक्षेच्या प्राथमिक टप्प्यात मिळालेल्या डेटावरून उमेदवारांची ओळख व्हेरिफाय करावी लागेल,” UPSC नोटिसमध्ये म्हटले आहे. तसेच, परीक्षार्थी आणि इतर व्यक्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक परीक्षा हॉलमध्ये सीसीटीव्ही लावले जातील, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे. अशी असेल तयारी  या सूचनेनुसार, परीक्षेचे वेळापत्रक, परीक्षेच्या ठिकाणांची तपशीलवार यादी आणि प्रत्येक ठिकाणासाठी उमेदवारांची संख्या परीक्षेच्या दोन ते तीन आठवड्यांपूर्वी तांत्रिकदृष्ट्या तयार केली जाईल. फिंगरप्रिंट आणि चेहर्यावरील ओळखीसाठी उमेदवाराचे तपशील (नाव, रोल नंबर, फोटो इ.) परीक्षेच्या सात दिवस आधी देखील प्रदान केले जातील. NEET, CUET सारख्या अनेक परीक्षांवर प्रश्न उपस्थित   UPSC चा हा निर्णय अशा वेळी आला आहे जेव्हा NEET UG, CUET UG यासह अनेक परीक्षा वादांनी घेरल्या आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने NEET UG फेरपरीक्षेबाबत आपला निर्णय दिला आहे. पण लाखो लोकांच्या मनात अजूनही अनेक प्रश्न आहेत.  दुसरीकडे, तथाकथित बनावट कागदपत्रे सादर करून अपंग कोट्यातून यूपीएससीमध्ये प्रवेश घेतलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकरला यूपीएससीच्या चौकशीला सामोरे जावे लागत आहे.

पूजा खेडकर प्रकरण अन् UPSC ने घेतला मोठा निर्णय,परीक्षेचा पॅटर्न बदलला Read More »

Nilesh Lanke: मोठी बातमी! खासदार लंके यांच्या मागण्या मान्य, उपोषण सोडला

Nilesh Lanke: एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार गेल्या चार दिवसांपासून पोलीस खात्यात होत  असलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात अहमदनगरचे खासदार नीलेश लंके अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालया बाहेर उपोषणाल बसले होते. आज निलेश लंके यांच्या मागण्या मान्य झाले असून नाशिक ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिलखेरकर यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याने लंके यांनी उपोषण मागे घेतले आहे. नाशिक ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिलखेरकर यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आणि ही चौकशी इन्कॅमेरा होणार असल्याचे लेखी आश्वासन नाशिक विभागीय पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिले आहे.बाळासाहेब थोरात यांची यशस्वी मध्यस्थीमुळे उपोषण सुटला आहे.

Nilesh Lanke: मोठी बातमी! खासदार लंके यांच्या मागण्या मान्य, उपोषण सोडला Read More »

Kangana Ranaut: कंगना राणौतची खासदारकी रद्द होणार? हायकोर्टाने ‘त्या’ प्रकरणात बजावली नोटीस

Kangana Ranaut:  बॉलीवूडची क्वीन आणि भाजप खासदार कंगना रणौतच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून कंगनाला कायदेशीर आव्हान देण्यात आले आहे. सिमला उच्च न्यायालयाने त्यांची निवडणूक रद्द करण्याच्या याचिकेवर नोटीस बजावली. याचिकाकर्ते लायक राम नेगी यांनी आरोप केला आहे की मंडीतून निवडणूक लढवण्यासाठी त्यांचा उमेदवारी अर्ज रिटर्निंग ऑफिसरने चुकीच्या पद्धतीने नाकारला. नोटीस जारी करत न्यायमूर्ती ज्योत्स्ना रेवाल यांनी कंगना राणौतकडून 21 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितले आहे. जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण? माजी सरकारी कर्मचारी आणि किन्नौरचे रहिवासी असलेले लायक राम नेगी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. नेगी म्हणाले की त्यांनी 14 मे रोजी निवडणूक अर्ज दाखल केला आणि 15 मे रोजी इतर सर्व आवश्यक कागदपत्रे सादर केली. मात्र, इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, रिटर्निंग ऑफिसरने त्यांना स्वीकारले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, न्यायमूर्ती ज्योत्स्ना रेवाल यांनी नोटीस बजावली आणि रणौत यांना 21 ऑगस्टपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले. कंगना रणौतच्या निवडीला लायक राम नेगी यांनी आव्हान दिले आहे, ज्यांनी म्हटले आहे की त्यांचा उमेदवारी अर्ज मंडीच्या उपायुक्तांनी रिटर्निंग ऑफिसर म्हणून चुकीच्या पद्धतीने नाकारला होता. वनविभागातील निवृत्त कर्मचारी नेगी यांनी उपायुक्तांनाही या प्रकरणात पक्षकार बनवले आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत मंडी लोकसभा मतदारसंघातून विजयी झाली होती. हिमाचलच्या सुखू सरकारमधील कॅबिनेट मंत्री विक्रमादित्य सिंह यांचा त्यांनी पराभव केला होता. या दोघांची ही पहिलीच लोकसभा निवडणूक होती. कंगनाने विक्रमादित्य सिंगचा सुमारे 74 हजार मतांनी पराभव केला. सध्या या प्रकरणाची सुनावणी आता 21 ऑगस्टला होणार आहे.

Kangana Ranaut: कंगना राणौतची खासदारकी रद्द होणार? हायकोर्टाने ‘त्या’ प्रकरणात बजावली नोटीस Read More »

Manoj Jarange Patil : सरकारला 13 ऑगस्टपर्यंत वेळ, मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण अचानक स्थगित

Manoj Jarange Patil : मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांनी 20 जुलैपासून पाचव्यांदा उपोषणाची सुरुवात केली होती मात्र आता एक मोठी बातमी समोर आली आहे.  या बातमीनुसार मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा विचार करण्यासाठी राज्य सरकारला 13 ऑगस्टपर्यंतचा वेळ दिला आहे. याच बरोबर त्यांनी 20 जुलैपासून सुरू असणारा उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.  आज (24जुलै) माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, आता सलाईन लावून उपोषण करण्याला काहीही अर्थ नाही. मी येत्या 13 ऑगस्टपर्यंत सरकारला वेळ देतो, तो पर्यंत सरकारने आमच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात. असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Manoj Jarange Patil : सरकारला 13 ऑगस्टपर्यंत वेळ, मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण अचानक स्थगित Read More »

Sharad Pawar: अजित – शरद पवार पुन्हा एकत्र येणार? पवारांनी दिला उत्तर, म्हणाले, मी…

Sharad Pawar: ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा अजित पवार यांना पक्षात घेणार का? यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.  जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट निर्माण झाले होते. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार गटातील अनेक नेते आणि आमदार शरद पवार गटात येणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र आज याबाबत स्वतः शरद पवारांनी भाष्य केले आहे.  माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, त्यांच्या पक्षातील कोणत्याही नेत्याच्या संभाव्य प्रवेशाचा निर्णय सामूहिक असेल. मात्र, अजित पवार यांना पुन्हा यायचे असेल तर त्यांना पक्षात सामावून घेणार का, याची पुष्टी करण्यास त्यांनी नकार दिला. वैयक्तिक पातळीवर निर्णय घेता येत नाही पुण्यात पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. राष्ट्रवादी-सपामध्ये अजित पवारांना स्थान आहे का, असा सवाल पत्रकारांनी केला असता शरद पवार म्हणाले, वैयक्तिक पातळीवर असे निर्णय घेता येत नाहीत. संकटकाळात माझ्या पाठीशी उभे राहिलेल्या माझ्या सहकाऱ्यांना आधी विचारले जाईल. अजित पवार यांनी अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेसपासून फारकत घेतली आणि जुलै 2023 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारमध्ये सामील झाले. त्यांनी पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हही घेतले होते.  लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने चारपैकी तीन जागा गमावल्यानंतर अजित पवारांच्या गटात खळबळ माजली आहे. शरद पवारांचा सरकारवर टीकास्त्र त्याचवेळी शरद पवार म्हणाले की, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झालेल्या दणक्यानंतर महायुती सरकारला नवनवीन योजना सुरू करून ‘भाई-भगिनी’च्या हिताचा विचार करणे भाग पडले.  पत्रकारांशी बोलताना पवारांनी राज्याच्या आर्थिक स्थितीवर चिंता व्यक्त करत राज्यावर कर्जाचा बोजा वाढला आहे. शिवसेनेच्या नेतृत्वाखालील युती सरकारने राज्यात ‘माझी लाडकी बहिन योजना’ सुरू केली आहे, ज्यात पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले आहे आणि ‘लाडका भाऊ’ या योजनेअंतर्गत रोजगार प्रशिक्षण आणि मानधन देण्याची तयारी आहे. आता बंधुभगिनींच्या हिताकडे लक्ष द्या पवार म्हणाले की, जयंत पाटील आणि अजित पवार यांना राज्याचा अर्थसंकल्प मांडण्याची संधी अनेकवेळा मिळाली, पण त्यांच्या अर्थसंकल्पात बहीण-भावांसाठीच्या अशा योजना कधीच दिसल्या नाहीत. बंधू-भगिनींच्या हिताकडे लक्ष दिले जात आहे ही कौतुकास्पद बाब आहे, मात्र ही जादू केवळ लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांमुळे आहे,  मतदारांनी हुशारीने मतदान केल्यास बहीण, भाऊ आणि इतर सर्वांच्या लक्षात राहील.असा टोला देखील त्यांनी यावेळी लावला.

Sharad Pawar: अजित – शरद पवार पुन्हा एकत्र येणार? पवारांनी दिला उत्तर, म्हणाले, मी… Read More »

Ahmednagar News: ते मार्गदर्शक होते, जयंत पाटलांचा पराभव मनाला वेदना देणारा…, सत्यजित तांबे

Ahmednagar News: विधान परिषदेचे निकाल जाहीर झाले असून यामध्ये 11 जागांसाठी महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 3 असे 12 उमेदवार मैदानात होते. यापैकी महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार विजयी झाले. मात्र यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा विधानपरिषद निवडणुकीत पराभव झाला.  शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांचा   विधानपरिषदेच्या निवडणूकीतील पराभव हा मनाला वेदना देणारा आहे. पाटील हे विधानपरिषदेच्या सभागृहातील एक ज्येष्ठ व अनुभवी सदस्य होते. आमच्या सारख्या नव्या व तरुण सदस्यांचे ते मार्गदर्शक होते. सभागृहातील त्यांची अनुपस्थिती सर्वांना नक्कीच जाणवेल अशी प्रतिक्रिया आमदार सत्यजित तांबे यांनी दिली आहे.  लोकसभा निवडणुका झाल्यानंतर विधानपरिषदेच्या निवडणुकीवर राज्याचे लक्ष लागून होते, लोकसभेत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले तर महायुतीला धक्का बसला होता. यामुळे विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये काय होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. मात्र या निवडणुकीचा निकाल आता समोर आला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. तर महायुतीचे सर्व 9 उमेदवार जिंकून आले आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.  तांबे नेमकं काय म्हणाले? शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील साहेब यांचा आजच्या विधानपरिषदेच्या निवडणूकीतील पराभव हा मनाला वेदना देणारा आहे. भाई जयंत पाटील हे विधानपरिषदेच्या सभागृहातील एक ज्येष्ठ व अनुभवी सदस्य होते. आमच्या सारख्या नव्या व तरुण सदस्यांचे ते मार्गदर्शक होते. सभागृहातील त्यांची अनुपस्थिती सर्वांना नक्कीच जाणवेल. पाटलांचा पराभव हा शरद पवारांना धक्का जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून समर्थन पुरस्कृत उमेदवार होते. मात्र निवडणुकीच्या निकालात ते सुरुवातीपासूनच पिछाडीवर होते. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये जयंत पाटील यांना दुहेरी आकडाही ओलांडता आला नव्हता. विजयासाठी जयंत पाटील यांना 23 संख्यापर्यंत पोहचायचं होतं. पण जयंत पाटील यांना फक्त 12 मते मिळाली.

Ahmednagar News: ते मार्गदर्शक होते, जयंत पाटलांचा पराभव मनाला वेदना देणारा…, सत्यजित तांबे Read More »

Maharashtra Vidhan Parishad Election: महायुतीचा मोठा विजय, क्रॉस व्होटिंगने केला विरोधकांचा गेम?

Maharashtra Vidhan Parishad MLC Election Result: काल झालेल्या विधान परिषदेतील 11 जागांसाठी निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले आहे. त्यांनी निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का देत महायुतीने आपले सर्व उमेदवारांना विजय केला आहे. या निवडणुकीत महायुतीचे 9 तर महविकास आघाडीचे 2 उमेदवार विजय झाले आहे. वृत्तानुसार, एमएलसी निवडणुकीत 6 विरोधी आमदारांनी क्रॉस व्होट केले आहे. त्यामुळे निकाल सत्ताधारी महायुतीच्या बाजूने लागला आहे. विरोधी मतांमुळे त्यांचे सर्व नऊ उमेदवार विजयी झाल्याचा दावाही भाजप नेत्यांनी केला. महाविकास आघाडीने तीन उमेदवार उभे केले होते, त्यापैकी केवळ दोन उमेदवार विजयी झाले आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी एकूण 12 उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे ही स्पर्धा खूपच रंजक झाली. मतांचे विभाजन होऊ नये म्हणून बड्या पक्षांनी आपल्या आमदारांना शहरातील विविध हॉटेल्समध्ये बसवले होते. असे असतानाही क्रॉस व्होटिंग झाले आणि आकड्यांचा खेळ बदलला. महाराष्ट्र विधानसभेत एकूण 288 आमदार आहेत. मात्र 14 जागा रिक्त असल्याने 274 आमदारांनी मतदान केले. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 23 नोव्हेंबरला संपत आहे. कोणत्या पक्षातून कोण जिंकले? महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत भाजपने आपल्या पाच नेत्यांना उमेदवारी दिली होती आणि ते सर्व विजयी झाले. भाजपचे पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित गोरखे, योगेश टिळेकर, सदाभाऊ खोत हे विजयी होऊन आता आमदार झाले आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने माजी खासदार भावना गवळी, कृपाल तुमाने यांना संधी दिली. दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. तर राष्ट्रवादीचे अजित पवार गटाकडून राजेश विटेकर आणि शिवाजी गर्जे हे रिंगणात होते आणि ते विजयी झाले आहेत.  काँग्रेसच्या प्रज्ञा सातव आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर विजयी झाले आहेत. तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने शेकापचे जयंत पाटील यांना पाठिंबा दिला. मात्र क्रॉस व्होटिंगमुळे त्यांचा पराभव झाला. आकड्यांचा खेळ कसा बदलला? MLC निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवारांना 23 प्रथम पसंतीची मते मिळणे आवश्यक होते. भाजपचे सर्वाधिक 5 उमेदवार रिंगणात होते. ते जिंकण्यासाठी भाजपला एकूण 115 मतांची गरज होती. भाजपची संख्यात्मक ताकद लक्षात घेता ती तीन मतांनी कमी पडत होती.   तर शिंदे सेनेचे दोन उमेदवार रिंगणात होते. शिवसेनेला त्यांच्या 39 आमदारांचा आणि 10 अपक्ष आमदारांचा पाठिंबा होता. त्यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांचा विजय निश्चित होता. तर अजित पवार गटाकडे राष्ट्रवादीचे 39 आमदार आहेत. त्यांचे दोन्ही उमेदवार विजयापासून 7 मतांनी कमी होते. मात्र अजितदादांच्या उमेदवारांचा काही अपक्ष, छोटे पक्ष आणि विरोधकांच्या क्रॉस मतांनी पराभव झाला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे (UBT) स्वतःचे 15 आमदार होते. याशिवाय त्यांना एका अपक्ष आमदाराचाही पाठिंबा होता. त्यामुळे त्यांना आणखी 7 मतांची गरज होती. निवडणुकीचे निकाल आल्यानंतर त्यांना ही मते मिळाल्याचे स्पष्ट झाले. तर शेकापचे जयंत पाटील हे शरद पवार गटाच्या पाठिंब्यावर एमएलसी निवडणूक लढवत होते. ज्येष्ठ पवार यांचे 15 आमदार आहेत. तर जयंत पाटील यांच्या पक्षाच्या एका आमदाराचाही पाठिंबा मिळाला. या स्थितीत त्यांच्याकडे 16 मते होती आणि विजयासाठी आणखी 7 मतांची आवश्यकता होती. जे पूर्ण झाले नाही. काँग्रेसमध्ये फूट? महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसची मते सर्वात महत्त्वाची आणि निर्णायक ठरली. काँग्रेसकडे 37 मते आहेत. पक्षाच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांना विजयासाठी 23 प्रथम पसंतीच्या मतांची आवश्यकता होती. यानंतर पक्षाकडे 14 मते शिल्लक होती.  एमएलसी निवडणुकीचा अंतिम निकाल काँग्रेसच्या मतांवरच ठरल्याचे मानले जात आहे. शेकापचे नेते आणि उमेदवार जयंत पाटील यांनी यापूर्वीच काँग्रेसचे चार आमदार क्रॉस व्होट करतील असा दावा केला होता.

Maharashtra Vidhan Parishad Election: महायुतीचा मोठा विजय, क्रॉस व्होटिंगने केला विरोधकांचा गेम? Read More »

Maharashtra News : मुस्लिम कुटुंबाच्या घरी पंढरीच्या वारकऱ्यांचा मुक्काम, दिंडीचे स्वागत व वारकऱ्यांची सेवा

Maharashtra News: तीर्थक्षेत्र नाशिक राजापूर ते श्रीक्षेत्र पंढरपूर पायी दिंडी गेल्या सात वर्षापासून सोलापूर रोडवरील वाकोडी फाटा येथील वास्तव्यास असलेले माजी सैनिक युनूस टेंगे या मुस्लिम कुटुंबाकडे मुक्कामी असते. हे मुस्लिम कुटुंब वारकऱ्यांची मनोभावे सेवा करत आलेले आहेत. पंढरीच्या वारकऱ्यांना त्यांच्याकडून पंगत दिली जाते.  कुटुंब प्रमुख माजी सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे आरोग्य विभागाचे अध्यक्ष युनूस टेंगे हे एक माजी सैनिक आहेत. त्यांनी हिंदू मुस्लिम शीख ईसाई हम सब भाई भाई हीच एक सैनिकाची शिकवण असते, भारत माता ही एकच जात आणि एकच धर्म आहे. याचा आदर्श एका माजी सैनिकांनी समाजाला या माध्यमातून दिला आहे.  माजी सैनिक युनिस टेंगे मुस्लिम समाजाचे आहेत त्यांच्या घरी गेल्या सात वर्षापासून ही दिंडी मुक्कामी असते त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य दिंडीतील वारकऱ्यांची मनोभावे सेवा करतात. पूजा अर्चा करून त्यांच्या समवेत हरिनामाच्या गजरात विलीन होतात यापेक्षा दुसरी देशसेवा कोणतीच नसल्याचे ते म्हणाले.

Maharashtra News : मुस्लिम कुटुंबाच्या घरी पंढरीच्या वारकऱ्यांचा मुक्काम, दिंडीचे स्वागत व वारकऱ्यांची सेवा Read More »

Ahmednagar News: आयक्त पंकज जावळेंच्या अडचणीत वाढ…कोर्टाने जामीन फेटाळला

Ahmednagar News: लाच मागितल्याच्या गुन्ह्यात अहमदनगर महापालिकेचे माजी आयुक्त डॉ. पंकज जावळे यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने पंकज जावळे फेटाळला. अटकपूर्व अर्जावर न्यायालयात पाच दिवस सुनावणी झाली. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश निरंजन नाईकवाडी यांनी अटकपूर्व जामीन फेटाळून आहे.  अहमदनगर शहरातील बांधकाम व्यवसायाकडे आठ लाखांची लाच मागितल्या प्रकरणी महानगरपालिकेच्या आयुक्त पंकज जावळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता.  या प्रकरणांमध्ये जामिनसाठी जावळे यांनी अहमदनगरच्या न्यायालयामध्ये अर्ज केला होता न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकल्यानंतर आयुक्त पंकज जावळे यांचा जामीन नाकारला आहे.  दरम्यान जावळे हे अद्याप फरार असून त्यांचा शोध घेण्याच काम सुरू आहे.

Ahmednagar News: आयक्त पंकज जावळेंच्या अडचणीत वाढ…कोर्टाने जामीन फेटाळला Read More »