DNA मराठी

राजकीय

Amit Shah : ‘या’ दिवशी देशात लागू होणार CAA, अमित शाह यांची मोठी घोषणा!

Amit Shah : केंद्रीय निवडणूक आयोग येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुका जाहीर करणार आहे मात्र त्यापूर्वीच सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे.  आगामी निवडणुका लक्षात घेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सर्व विरोधी पक्षांना आणि विशेषतः काँग्रेसला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.   आगामी लोकसभा निवडणुकीत एकट्या भाजपाने 370 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा दावा केला आहे यासाठी आता पक्षातील दिग्गज नेत्यांकडून  वातावरण निर्मितीसाठी सर्व बाजूंनी प्रयत्न सुरू आहेत.  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक मोठी घोषणा केली आहे. शाह म्हणाले की, निवडणुकीपूर्वी नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) देशभरात लागू केला जाईल. काय म्हणाले अमित शहा? केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एका टीव्ही चॅनलच्या समिटमध्ये ही माहिती दिली. येत्या दोन ते तीन महिन्यांत म्हणजेच एप्रिल-मे महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या काही दिवस आधी शाह यांनी दिलेल्या या वक्तव्यावरून अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. अमित शाह म्हणाले, “मी हे स्पष्ट करू इच्छितो की नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) कोणत्याही व्यक्तीचे नागरिकत्व हिरावून घेणार नाही. धार्मिक छळाचा सामना करत असलेल्या पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधील अल्पसंख्याकांनाच नागरिकत्व देणे हा त्याचा उद्देश आहे. मुळात काँग्रेसने त्यांना हे वचन दिले होते. विरोधकांवर टीका विरोधक देशातील मुस्लिमांची दिशाभूल करत असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. ते म्हणाले, “या कायद्याबाबत आमच्या मुस्लिम बांधवांची दिशाभूल केली जात आहे. त्यांना चिथावणी दिली जात आहे. हा कायदा पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील धार्मिक अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्यासाठी आहे.

Amit Shah : ‘या’ दिवशी देशात लागू होणार CAA, अमित शाह यांची मोठी घोषणा! Read More »

Ajit Pawar : मोठी बातमी! ‘या’ दिवशी राष्ट्रवादीत प्रवेश करणार बाबा सिद्दीकी

Ajit Pawar :  महाराष्ट्र काँग्रेसला मोठा झटका देत गुरुवारी काँग्रेसचे दिग्गज नेते बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला.  तर आता समोर आलेल्या माहितीनुसार अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बाबा सिद्दीकी प्रवेश करणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी बाबा सिद्दीकी यांच्या पक्षप्रवेशाची माहिती दिली आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “बाबा सिद्दीकी 10 फेब्रुवारीला संध्याकाळी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.” 11 फेब्रुवारीला आणखी काही लोक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचेही पवार म्हणाले. मुंबईत काँग्रेसला दुहेरी झटका! माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर महिनाभरातच मुंबईतील आणखी एक मोठे नेते सिद्दीकी यांनी काँग्रेसला झटका दिला.  वांद्रे येथे 10 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ‘सरकार आपल्या दारी’ कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कोण आहेत बाबा सिद्दीकी? सिद्दीकी हे मुंबईतील वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. 1999 मध्ये ते पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले. यानंतर 2004 आणि 2009 च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी विजय मिळवला. 2004 ते 2008 या काळात त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्रीपद भूषवले.  आमदार होण्यापूर्वी ते दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. बाबा सिद्दीकी हे 1992 मध्ये पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेचे (BMC) नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 1997 च्या बीएमसी निवडणुकीतही त्यांना यश मिळाले. राष्ट्रवादीला कसा फायदा होईल? सिद्दीकी हा मुंबईतील काँग्रेसचा प्रमुख अल्पसंख्याक चेहरा होता. वांद्रे, मुंबई आणि आजूबाजूला अल्पसंख्याक समाजातील लोक मोठ्या संख्येने राहतात, ज्यांमध्ये सिद्दीकी यांचा खोलवर प्रभाव आहे. त्यामुळे आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झीशान सिद्दीकी सध्या मुंबईतील वांद्रे (पूर्व) येथून काँग्रेसचा आमदार आहे. 66 वर्षीय सिद्दिकी म्हणाले की, जीशान स्वतःची राजकीय वाटचाल ठरवतील. सिद्दीकी म्हणाले की, आपण शनिवारी रॅली काढणार असून त्यात नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य सहभागी होणार आहेत.

Ajit Pawar : मोठी बातमी! ‘या’ दिवशी राष्ट्रवादीत प्रवेश करणार बाबा सिद्दीकी Read More »

Sangram Jagtap : अट्टल गुन्हेगारांवर धाडसी कारवाईची गरज – आमदार संग्राम जगताप

Sangram Jagtap :  अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यामध्ये काही दिवसापूर्वी वकील दांपत्याचे अपहरण करून निर्गुण हत्या करण्यात आली होती.  यानंतर या घटनेच्या निषेधार्थ जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा  काढण्यात आला होता, यात अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप सहभागी झाले होते.  त्यांनी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांची भेट घेत जिल्ह्यातील अट्टल गुन्हेगारांवर पोलिसांनी धाडसी कारवाईची करण्याची खरी गरज आहे तसेच वकील दांपत्याच्या हत्येचा खटला फास्ट ट्रक कोर्टात चालवावा आणि सरकारी वकील म्हणून ऍड. उज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी केली.  तसेच लवकरच वकिलांचा प्रलंबित असलेला वकील संरक्षण कायदा मंजूर करण्यासाठी अधिवेशनात लेखी स्वरूपाचा प्रश्न उपस्थित करणार असल्याची माहिती दिली.  सराईत गुन्हेगारांवर यापूर्वीच पोलिसांनी कारवाया केल्या असत्या तर अशा स्वरूपाच्या घटना घडल्या नसत्या, समाजविघातक लोकांना कायद्याचा धाक दाखवणे गरजेचे आहे, या घटनेचा निषेध करत वकिलांच्या तीव्र भावना शासन दरबारी मांडणार असून तुम्ही जिल्ह्याचे प्रमुख असून या घटनेचा अहवाल शासनाकडे पाठवावा अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली.

Sangram Jagtap : अट्टल गुन्हेगारांवर धाडसी कारवाईची गरज – आमदार संग्राम जगताप Read More »

Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात 2 जण ताब्यात; पोलिसांनी केला मोठा खुलासा

Abhishek Ghosalkar: गुरुवारी रात्री शिवसेना (उद्धव ठाकरे गट ) च्या माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली आहे.  माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गुरुवारी रात्री फेसबुक लाईव्हदरम्यान 4 गोळ्या झाडण्यात आल्या. धक्कादायक बाब म्हणजे अभिषेकसोबत फेसबुक लाईव्ह करणाऱ्या मॉरिस नोरोन्हाने गोळीबार केला.  मॉरिसने नंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. दरम्यान, याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक घोसाळकर खून प्रकरणात मेहुल पारीख आणि रोहित साहू यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे. गोळीबार झाला तेव्हा मेहुलही घटनास्थळी उपस्थित असल्याचे सांगण्यात येत आहे. याचा उल्लेख घोसाळकर यांची हत्या करणाऱ्या मॉरिसने फेसबुक लाईव्हदरम्यान केला होता. मॉरिसकडे परवाना नव्हता – पोलीस मुंबईच्या MHB पोलिसांनी घटनास्थळाची सुमारे 7 तास चौकशी केल्यानंतर एक पिस्तूल, एक जिवंत काडतूस आणि सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहे. घटनास्थळावरून सापडलेले पिस्तूल हे विदेशी पिस्तूल असल्याचे पोलिसांनी सांगितले. मॉरिसकडे पिस्तूलचा परवाना नाही. दोघांमध्ये काहीशी वैमनस्य होती आणि त्यामुळेच ही घटना घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. अभिषेकवर 4 वेळा गोळ्या झाडल्या अभिषेक घोसाळकर हे उद्धव गटाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आहेत. फेसबुक लाईव्ह संपताच मॉरिसने अभिषेकवर 5 गोळ्या झाडल्या, त्यापैकी चार गोळ्या त्याला लागल्या. अभिषेकला रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी मृत आरोपी मॉरिसविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पीएसह 2 कोठडीत दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी आरोपी शूटर मॉरिसचा पीए मेहुल पारीख याला रात्री ताब्यात घेतले आहे. यासोबतच रोहित साहू नावाच्या आणखी एका व्यक्तीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  मॉरिसने अभिषेकवर गोळी झाडून आत्महत्या का केली, याचा तपास गुन्हे शाखा करत आहे. या हत्याकांडाचे कारण काय होते? या प्रकरणाची प्रत्येक बाजूने चौकशी केली जात आहे. मॉरिसचा पीए मेहुलच्या चौकशीत मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे. दोन गुन्हे दाखल याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. एक एफआयआर शिवसेना (यूबीटी) नेते अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी आणि दुसरा एडीआर (अपघाती मृत्यू अहवाल) मॉरिसच्या आत्महत्येप्रकरणी नोंदवण्यात आला आहे.  मॉरिस यांच्याविरुद्ध आयपीसी कलम ३०२, शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम ३ आणि २५ आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ३७ (१) (ए) आणि १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात 2 जण ताब्यात; पोलिसांनी केला मोठा खुलासा Read More »

Ahmednagar News: प्रश्न लागणार का मार्गी? ‘त्या’ प्रकरणात खा. सुजय विखेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट

Ahmednagar News: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिल्ली येथे भेट घेऊन कांदा निर्यात बंदी उठवण्यासंदर्भात आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मक चर्चा केली.  कांदा प्रश्नावर अमित शाह यांना राज्यातील शेतकऱ्यांसमोर येत असलेल्या अडचणी, कांदा खरेदी आणि योग्य भाव आदी विषयाची माहिती खा.विखे पाटील यांनी करून दिली असून शाह यांनीही याबाबत लवकरच कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय केंद्र सरकार घेईल असे आश्वासन दिले असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान याबाबत खासदार सुजय विखे पाटील यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, सध्या कांद्याचे भाव गडगडले असून शेतकऱ्यांच्या दृष्टीने आणि त्यांना कांदा पिकविण्यासाठी लागणाऱ्या एकूण खर्चाचा जर विचार केला तर सध्या कांद्याला बाजारपेठेत मिळणारा भाव हा कमी आहे.  नगर, नाशिक,पुणे या कांदा पट्यात कांदा पीक घेणारा शेतकरी वर्ग मोठा असून निर्यात बंदीचा मोठा आर्थिक फटका बसत असल्याची वस्तुस्थिती खा.विखेंनी शाह यांच्या समोर मांडली आणि हा मुद्दा गृहमंत्री अमित शाह यांच्या लक्षात आणून दिला. निर्यातबंदीचा परिणाम म्हणून कांदा खरेदी केंद्रावर येणाऱ्या कांद्याला पाहिजे तसा भाव मिळत नाही.  कांद्याला एकरी येणारा खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यावर शेतकरी वर्गातून केंद्र सरकार कडून मार्ग निघण्याची आशा आहे. कांद्याच्या प्रती क्विंटल मागे असलेले दर हे वाढले पाहिजे.  या अनुषंगाने केंद्र सरकारकडून सकारात्मक विचार व्हावा आणि या दृष्टिकोनातून निर्यातबंदी उठवणे किंवा नाफेड मार्फत कांदा खरेदी करण्याच्या दृष्टीकोनातून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा अशी विनंती केंद्रीय मंत्र्यांना खा.विखे पाटील यांनी शाह यांची भेट घेऊन केली आहे.  यावेळी खा.सुजय विखेंना आश्वस्त करताना अमित शाह यांनी केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या नेहमीच पाठीशी असून अनेक शेतकरी हिताच्या योजना हाती घेतलेल्या आहेत. सरकार शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही.  या दृष्टिकोनातून लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे असे आश्वासन गृहमंत्र्यांनी दिले असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

Ahmednagar News: प्रश्न लागणार का मार्गी? ‘त्या’ प्रकरणात खा. सुजय विखेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट Read More »

Ahmednagar News: निळवंडे उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय ऐतिहासिक – धनश्री विखे पाटील

Ahmednagar News:  उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या निळवंडे उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकरीता निश्चितच ऐतिहासिक आणि आनंदाचा क्षण असल्याचे  प्रतिपादन रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा धनश्री सुजय विखे पाटील यांनी केले. निळवंडे उजव्या कालव्यामुळे शेतकरी नक्कीच सुखावेल असा विश्वास व्यक्त करून  राज्यातील महायुती सरकारमुळे धरणाच्या दोन्ही कालव्याच्या कामाला गती मिळून पाणी सोडण्याच्या निर्णय शेतकऱ्यांच्या उज्वल भविष्यासाठी महत्वपूर्ण ठरणारा असल्याचे त्यांनी सांगितले. उत्तर नगर जिल्ह्यासह राहुरी तालुक्यासाठी वरदान असणारे निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्याचे तांभेरे,कानडगाव, निंभेरे, तुळापूर, तांदूळनेर,वडनेर,कनगर,चिंचविहरे ,गुहायेथे  जलपूजन रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा धनश्रीताई विखे पाटील व जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी राव कर्डीले यांच्या हस्ते करण्यात आले. धनश्री विखे यांनी सांगितले की जिल्ह्याच्या विकासासाठी महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि खा.डॉ सुजय विखे पाटील  सदैव प्रयत्नशील आहेत त्यांनी केलेल्या विकास कामामुळे जिल्ह्याचा विकास होत असल्याचे स्पष्ट करून, निळवंडे कालवा व्हावा ना. विखे पाटील यांचा पाठपुरवा महत्वपूर्ण ठरला असल्याचे सौ.विखे म्हणाल्या. यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष सुरेश बानकर, जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे,रवींद्र म्हसे, भिमराज हारदे, नानासाहेब गागरे,डॉ बापूसाहेब मुसमाडे, सरपंच निशा गागरे,उत्तम राव मुसमाडे,संदीप गीते,मारुती नालकर,सर्जेराव गाडगे, संदिप गाडगे ,आणा पाटील बलमे, बबनराव कोळसे,विजय बलमे, यांच्या सह सर्व व पदाधिकारी ,अधिकारी व ग्रामस्थ उपस्तीत होते.

Ahmednagar News: निळवंडे उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय ऐतिहासिक – धनश्री विखे पाटील Read More »

Ahmednagar News: मिळणार रोजगार! बेलवंडी 618 एकरमध्ये उभारली जाणार उद्योग नगरी

Ahmednagar News:  आज मुंबई येथे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षेखाली व उद्योगमंत्री उदय सांमत यांच्या प्रमुख उपस्थितीत अहमदनगर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाची बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्ह्यातील बेलवंडी ता. श्रीगोंदा येथील शेती महामंडळाच्या 618 एकर जमिनीवर एमआयडीसी उभारण्याला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. सदर एमआयडीसीच्या आराखड्यासंदर्भात पाहणी व सर्वेक्षण लवकरात लवकर पूर्ण करून त्या संबंधित सर्व कामे काल मर्यादेत करण्यात यावीत असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी अधिकारांना दिले. एमआयडीसी सुरू करण्यासंदर्भात मोजणीचा अहवाल मागविण्यात आला आहे. पुढील प्रकियेस गती देण्यात येणार असून, तात्काळ हे काम पुर्ण करण्यात येणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच, जिल्हाधिकारी यांनी आजच उद्योग विभागाकडे विनंती प्रस्ताव सादर करावा असेही त्यांनी यावेळी सांगितले. श्रीगोंदा तालूक्यातील बेलवंडी फार्म येथे शेती महामंडळाची मौजे पर्वतवाडी आणि महादेववाडी येथील 618 एकर जमीन उद्योग विभागला देण्याची तत्वत: मान्यता यावेळी देण्यात आली. या एमआयडीसी करिता खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांनी पाठपुरावा केला होता.  उद्योगनगरीसाठी जमीन दिल्याने खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी राज्याचे महसूल मंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील आणि उद्योगमंत्री श्री. उदय सांमत यांचे आभार व्यक्त केले.  खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले की बेलवंडी मध्ये रस्ते वाहतूक, पाणी तसेच रेल्वे वाहतुक सुविधा उपलब्ध तर आहेच शिवाय शिर्डी, पुणे आणि नाशिक एमआयडीसी केंद्र नजीक असल्याने येणाऱ्या काळात बेलवंडी उद्योजकांना मोठी पर्वणीच ठरणार आहे. या एमआयडीसी मुळे जिल्ह्यात उद्योगाला चालना मिळून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध  होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, श्रीरामपूर तालुका व राहता तालुक्यातील शेती महामंडळाकडे असलेल्या जमिनीच्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. खंडकरी शेतकऱ्यांना वाटप केलेल्या जमिनींचा भोगवटादार वर्ग / मधुन भोगवटादार वर्ग 1 करणे तसेच सार्वजनिक प्रयोजनार्थ शेती महामंडळाची जमीन वाटप करणे संदर्भातील कामांचा आढावा मंत्री विखे पाटील यांनी घेतला. सदर बैठकीत खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी मंत्री आमदार श्री.बबनराव पाचपुते, महसूल विभागाचे अप्पर सचिव श्री. राजगोपाल देवरा, अहमदनगरचे जिल्हाधिकारी श्री.सिद्धराम सालीमठ, शेती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. विश्वजित माने यांच्यासह महसूल आणि शेती महामंडळ पुणे यांचे अधिकारी उपस्थित होते.

Ahmednagar News: मिळणार रोजगार! बेलवंडी 618 एकरमध्ये उभारली जाणार उद्योग नगरी Read More »

Asaduddin Owaisi : राज्यात ओवेसी करणार गेम! ‘इतक्या’ जागांवर लढवणार लोकसभा निवडणूक

Asaduddin Owaisi: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सध्या प्रत्येक राजकीय पक्षाने तयारी पूर्ण केली आहे. सर्व पक्ष आपल्या ताकदीनुसार लोकसभा निवडणुक लढवण्याची तयारी करताना दिसत आहे.  समोर आलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोग पुढील महिन्यात लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकतो. देशात सध्या ‘एनडीए’ आणि ‘इंडिया’ युतीमध्ये थेट लढत होणार असून राज्यात सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे.  राज्यातील 48 पैकी 45 जागांवर झेंडा फडकवण्यासाठी महायुतीने मेगा प्लान तयार केला आहे तर MVA ने देखील जवळपास जागा वाटपाचा फॉर्मुला तयार केला आहे.   तर दुसरीकडे आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM) देखील निवडणूक लढवणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार एआयएमआयएम राज्यातील पाच लोकसभा जागांवर निवडणूक लढवणार आहे.  भिवंडीत पत्रकारांशी बोलताना एआयएमआयएम महाराष्ट्र युनिटचे कार्याध्यक्ष डॉ अब्दुल गफार कादरी म्हणाले की, राज्यातील उत्तर मुंबई, धुळे, नांदेड, भिवंडी आणि छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) या जागांवर पक्ष आपले उमेदवार उभे करण्याचा विचार करत आहे. कादरी म्हणाले की, एआयएमआयएम निवडणुकीची प्रभावी रणनीती बनवण्यासाठी या जागांवर सर्वेक्षण करत आहे.   महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 25 जागा आणि अविभाजित शिवसेनेने 23 जागा लढवल्या. यामध्ये भाजपला 23 तर शिवसेनेला 18 जागांवर यश मिळाले. काँग्रेसला एक तर राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या. AIMIM चे एकमेव औरंगाबादचे उमेदवार इम्तियाज जलील सय्यद विजयी झाले होते.

Asaduddin Owaisi : राज्यात ओवेसी करणार गेम! ‘इतक्या’ जागांवर लढवणार लोकसभा निवडणूक Read More »

Devendra Fadnavis : छगन भुजबळ यांनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा! फडणवीस म्हणाले,  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच …..

Devendra Fadnavis : राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं आहे. सरकारने मराठा समाजाला आरक्षण जाहीर केल्यानंतर आता शिंदे सरकारला सर्व बाजूंनी घेरले जात आहे. यातच आता मराठा आरक्षणाच्या निषेधार्थ ओबीसी नेते आणि राज्य सरकारमध्ये मंत्री असणारे छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते भुजबळ यांनीच याचा खुलासा केला आहे. गेल्या वर्षी ओबीसींच्या पहिल्या मेळाव्याला संबोधित करण्याच्या एक दिवस आधी त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 16 नोव्हेंबर 2023 रोजी दोन महिने अगोदर शिंदे सरकारचा राजीनामा दिल्याचा खुलासा ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केला. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत मौन बाळगण्यास सांगितले होते, असा दावा भुजबळ यांनी केला. पण जेव्हा लोक मला बडतर्फ करण्याविषयी बोलत आहेत, तेव्हा मी त्यांना सांगू इच्छितो की, मी दोन महिन्यांपूर्वीच राजीनामा दिला आहे. त्यावर प्रथमच प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, भुजबळांच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच अधिक माहिती देऊ शकतात. जिल्हा पोलिस दलाच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला गडचिरोलीत आलेल्या फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भुजबळांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली. भुजबळांच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री शिंदेच सांगू शकतील, असं फडणवीस म्हणाले. आज मी एवढेच सांगेन की आम्ही त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही.  भुजबळ यांच्या राजीनाम्याच्या घोषणेने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.  भुजबळांनी मराठा आरक्षण सर्वेक्षणावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. भुजबळ म्हणाले, 360 कोटी रुपये देऊन खोटा रेकॉर्ड तयार केला जात आहे. डेटाशी छेडछाड केली जात आहे. बनावट प्रमाणपत्रे दिली जात आहेत. सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिल्यास ओबीसी आरक्षण संपेल. मागासवर्ग आयोगाकडून करण्यात आलेले सर्वेक्षण खोटे आहे. राजीनाम्याबाबत भुजबळ म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर बोलू नका असे सांगितले होते. यावर भुजबळ म्हणाले, “मी यावर गप्प राहिलो, मात्र ओबीसींच्या बाजूने बोलल्याबद्दल भुजबळांना मंत्रिमंडळातून हटवा, असे काही लोक म्हणत आहेत. मी शेवटच्या श्वासापर्यंत ओबीसींसाठी लढणार आहे.”

Devendra Fadnavis : छगन भुजबळ यांनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा! फडणवीस म्हणाले,  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच ….. Read More »

Ahmednagar News: डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनच्या परिचर्या महाविद्यालयचा अनोखा अभिनव उपक्रम

Ahmednagar News: दिनांक ३१/०१/२०२४ रोजी  मकारसंक्रांती निमित्त डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनच्या परिचर्या महाविद्यालयातील सामाजिक आरोग्य विभाग परिचर्या विभाग  व  माहिला सेल ने वडगाव गुप्ता येथील महिलासाठी हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात पार पडला. या निमित्ताने गावातील १५० महिला करिता हळदी कुंकू व तिळगूळचा कार्यक्रम घेण्यात आला.  प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ग्रामपंचायत सरपंच सौ. सोनुबाई विजय शेवाळे तर प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. सोनाली वाहडणे (स्त्री. रोगतज्ञ) वाहाडणे  हॉस्पिटल, अहमदनगर ह्या होत्या तसेच सौ कविता बबन वाकळे (तलाठी), सौ. निता शिवराम गीरी (साहाय्यक कृषि अधिकारी) डॉ.सुवर्णा कांबळे (सामाजिक आरोग्य अधिकारी) व डॉ. प्रतिभा चांदेकर, प्राचार्या,  परिचर्या महाविद्यलयाच्या व डॉ. योगिता औताडे उप प्राचार्या व सामाजिक आरोग्य विभाग परिचर्या विभाग  प्रमुख उपस्थतीत होत्या.  या निम्मीताने महिल्यासाठी डॉ. सोनाली वाहडणे स्त्री रोग तज्ञ यांनी महिलांमध्ये योनि मुख मार्गाचा कर्करोग व स्तनाचा कर्करोग याविषयी सविस्तर मार्गदर्शन करून व चर्चा केली. या प्रसंगी त्या म्हणाल्या कि महिलांनी आपलया ९ ते १४ वर्ष वयोगटातील मुलींचे योनी मार्गाच्या कर्करोग होऊ नये यासाठी  लसीकरण करणे आवश्यक आहे तसेच, समतोल आहार रोज एक तास व्यायाम करणे गरजेचे आहे आणि प्रत्येक महिन्यात मासिक पाळी  नंतर स्व-स्तन परीक्षण करून जर त्यात काही बदल जाणवले तर  त्वरित  डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे, वयाच्या ४५ वर्षानंतर स्तनांची सोनोग्राफी (म्यॅमोग्राफी) करणे आवश्यक आहे.  म्हणून महिलांनी स्वतःच्या आरोग्य संदर्भात जागरूक असावे. लवकर निदान  व योग्य उपचारातून कर्करोग बारा होऊ  शकतो व आपले आयुष्य सुखकर होऊ शकते. तसेच परिचर्या महाविद्यालयातील स्त्री रोग विभाग  प्रमुख सौ. कविता भोकनळ व सहायक प्राध्यापक सौ मोहिनी सोनवणे यांनी स्व-स्तन परिक्षण कसे करावे या विषायी प्रात्यक्षिक  दाखवले .या निम्मीताने महिलाना सामाजिक आरोग्य विभागाने पॅम्फ्लेट देण्यात आले. या कार्यक्रमात महिलांनी स्वयंस्फूर्तिने सहभाग नोंदविला तसेच महिलांनी उखाणे घेऊन कार्यक्रमाला उत्सुफुर्त प्रतिसाद दिला.  डॉक्टर वहाडणे यांनी आरोग्य शिक्षणाचा देऊन, जनजागृती केली, आणि अमूल्य असा आरोग्याचा वाण आपल्या सर्वाना दिला असे प्राचार्य डॉ. प्रतिभा चांदेकर  म्हणालया. यावेळी त्यांनी सर्वांचे उपस्थिती बद्दल आभार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील उप प्राचार्या व सामाजिक आरोग्य परिचर्या विभाग प्रमुख डॉ. योगिता औताडे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला.  यासाठी त्यांना सौ. सलोमी तेलधुणे ,बाल आरोग्य विभाग व महिला सेल प्रमुख, सौ. कविता भोकनळ ,स्त्री रोग विभाग प्रमुख तसेच सहहायक प्राध्यापक सौ मोहिनी सोनवणे यांनी सहकार्य केले तसेच पुजा मोरे व सौ. आश्लेषा सुरासे यांनी सूत्र संचालन केले श्री. अमोल शेळके ,सौ रिबिका साळवे ,सौ सोनल बोरडे सौ. ऐश्वर्या पवार आणि श्री. प्रशांत अंबरीत ,यांचे मोलाचे सहकार्य मिळाले व प्रथम वर्ष एम एस्सी नर्सिंग व जीएनएम च्या विद्याथ्यांनी सहभाग घेतला.

Ahmednagar News: डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनच्या परिचर्या महाविद्यालयचा अनोखा अभिनव उपक्रम Read More »