DNA मराठी

राजकीय

Ahmednagar News:  प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांच्या इमारत बांधकामास भरीव निधी मंजूर: खा. डॉ. सुजय विखे पाटील

Ahmednagar News: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कर्जत तालुक्यातील ३ गावांमध्ये तसेच राहुरी, श्रीगोंदा आणि जामखेड तालुक्यातील प्रत्येकी एका गावी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या नवीन मुख्य इमारतीच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.  कर्जत तालुक्यातील मौजे बहिरोबावाडी, मौजे सितपूर आणि मौजे म्हाळंगी येथे तसेच राहुरी तालुक्यातील मौजे चेडगाव, श्रीगोंदा तालुक्यातील मौजे मुगुंसगाव आणि जामखेड तालुक्यातील मौजे जवळके येथे नवीन उपकेंद्र इमारतीचे बांधकाम करण्याच्या कामासाठी प्रत्येकी ५५.५० लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. सदरील विविध प्राथमिक आरोग्य उपकेंद्र निर्माणासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्याकडे नागरिकांनी मागणी केली असता त्यांनी शासन स्तरावर याबाबतीत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे या नवीन उपकेंद्रांच्या इमारत बांधकामासाठी शासनाकडून भरीव निधी उपलब्ध झाला आहे. याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आणि नागरिकांना मोठा दिलासा यामुळे मिळणार असल्याचे स्पष्ट केले.  आरोग्याच्या बाबतीत संपूर्ण जिल्ह्यात विविध सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मत सुजय विखेंनी मांडले. आरोग्य क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याकडे अहमदनगर जिल्ह्याची वाटचाल सुरू झाली असून येणाऱ्या काळात सर्वांनाच आपल्या जवळील उपकेंद्रात उपचार घेणे शक्य होईल असे मत खासदार विखे पाटील यांनी मांडले.  तसेच त्यांनी सदरील निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्दिले, आमदार राम शिंदे व आमदार बबनदादा पाचपुते, यांचे मनःपूर्वक आभार मानले.

Ahmednagar News:  प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांच्या इमारत बांधकामास भरीव निधी मंजूर: खा. डॉ. सुजय विखे पाटील Read More »

Ahmednagar News : लोकांची कामे करण्‍यात तालुक्‍याच्‍या नेत्‍यांना कोणतेही स्‍वारस्‍य नाही, विखेंची नाव न घेता बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका

Ahmednagar News: मंत्रीपद असूनही तालुक्‍यात रोजगाराची कोणतीही साधनं निर्माण करता आली नाहीत, लोकांची कामे करण्‍यात तालुक्‍याच्‍या नेत्‍यांना कोणतेही स्‍वारस्‍य नाही, हेलपाटे मारायला लावण्‍यातच त्‍यांना स्‍वारस्‍य  वाटते. तालुक्‍यातील जनतेने आता पर्याय शोधला पाहीजे. गावगुंडाच्‍या  राजकारणापेक्षा विकासाचा मंत्र घेवून येणा-यांना पाठबळ द्या असे आवाहन महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले.  तालुक्‍यातील खांबा येथे ना.विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत सुमारे २५ कोटी रुपयांच्‍या विविध विकास कामांचा शुभारंभ करण्‍यात आला. खांबा ग्रामपंचायतीचे सरपंच रविंद्र दातिर यांच्‍यासह सर्व सदस्‍य आणि गावातील युवक कार्यकर्त्‍यांनी भाजपामध्‍ये प्रवेश केला. याप्रसंगी भाजपाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.  मंत्री विखे पाटील आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, संगमनेर तालुक्‍याला १४५ कोटी रुपयांचा निधी उपलब्‍ध करुन दिला आहे. महायुती सरकारमुळे मिळालेल्‍या निधीचे श्रेय कोणी घेत असले तरी जनता जागरुक आहेत. कारण वर्षानुवर्षे या भागाला रस्‍ते मिळाले नाहीत, पाण्‍याचा प्रश्‍न सुटला नाही. अनेक वर्षे मंत्रीपद मिळूनही रोजगारची कुठलीही साधनं तुम्‍हाला निर्माण करता आली नाहीत. मग तुमचा तालुका नेमका कशात पुढे आहे असा सवाल त्‍यांनी उपस्थित केला.  दुष्‍काळी भागाला वरदान ठरणा-या निळवंडे धरणाचे कामही महायुती सरकारमुळे मार्गी लागले असून, भोजापूर चारीचा प्रश्‍नही लवकरच मार्गी लागेल. पठार भागातील पाणी प्रश्‍नाबाबतही आपण गांभिर्याने सरकारच्‍या माध्‍यमातून प्रयत्‍न करु अशी ग्‍वाही देतानाच युवकांच्‍या रोजगारासाठी आता जिल्‍ह्यात तीन औद्योगिक वसाहती विकसीत होत आहेत. यापुर्वी असे निर्णय होवू शकले नव्‍हते. अनेक उद्योजक आता जिल्‍ह्यात येण्‍यास तयार झाले आहेत.  जिल्ह्यातील युवकांना जिल्‍ह्यातच रोजगार उप‍लब्‍ध करुन देण्‍याचे उदिष्‍ठ आपण ठेवले असून, जिल्‍ह्यामध्‍ये संत गाडगे बाबा कौशल्‍य प्रशिक्षण प्रबोधि‍नी स्‍थापन करण्‍याचा निर्णय केला आहे. संगमनेर तालुक्‍यातही ही कौशल्‍य प्रबोधिनी स्‍थापन करण्‍यास आपण प्राधान्‍य देणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.   पशुसंवर्धन विभागाच्‍या माध्‍यमातून धनगर समाजाकरीता मेंढी व शेळी सहकार विकास महासंघाची स्‍थापना करण्‍यात आली असून, या माध्‍यमातून रोजगार निर्मिती करण्‍याचा निर्णय राज्‍य सरकारने घेतला आहे. दूध उत्‍पादक शेतक-यांना दिलासा देण्‍यासाठी ५ रुपये अनुदानाची योजना सुरु केली मात्र अनेक दूध संघानी शेतक-यांची माहीती उपलब्‍ध न करुन दिल्‍यामुळेच शेतकरी अनुदानापासून वंचित राहत आहेत. अनुदान मिळत नाही म्‍हणून सरकारच्‍या विरोधात ओरडणा-यांनीच अनुदान मिळण्‍यापासून शेतक-यांना वंचित ठेवल्‍याचा आरोप विखे पाटील यांनी केला.   मंत्री विखे पाटील यांची भव्‍य मिरवणूक काढण्‍यात आली. रणखांब आणि परिसरातील गावांमध्‍ये भव्‍य स्‍वागत करण्‍यात आले. श्रीक्षेत्र बाळेश्‍वर येथेही विकास कामांचा भूमीपुजन समारंभ संपन्‍न झाला. श्रीक्षेत्र बाळेश्‍वर येथे पर्यटन विकास योजनेच्‍या माध्‍यमातून अधिक निधी उपलब्‍ध करुन देण्‍याचे त्‍यांनी सांगितले. याबाबत महसूल व वन विभागाच्‍या आधिका-यांना त्‍यांनी पर्यटन विकासाचा प्रकल्‍प आराखडा तयार करण्‍याच्‍या सुचना त्‍यांनी दिल्‍या. खांबा येथील पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर यांचे स्‍मारक हे एक प्रेरणास्‍थान आहे. जिल्‍ह्याला त्‍यांचे नाव द्यावे ही अनेक वर्षांची मागणी महायुती सरकारने पुर्ण केल्‍याचे मंत्री विखे पाटील म्‍हणाले. खांबा येथील जोगींदरा तलाव, जवळटेक तलाव दुरुस्‍तीसाठी निधी देण्‍याचे आश्‍वासन देतानाच आता संपूर्ण गाव आणि ग्रामपंचायतच भाजपमय झाल्‍यामुळे या गावाच्‍या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्‍याचे आश्‍वासनही त्‍यांनी दिले.

Ahmednagar News : लोकांची कामे करण्‍यात तालुक्‍याच्‍या नेत्‍यांना कोणतेही स्‍वारस्‍य नाही, विखेंची नाव न घेता बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका Read More »

Nilesh Lanke : “साहेबांचा आदेश मी सदैव मानेन” अजित पवारांना धक्का देत निलेश लंके शरद पवार गटात  

Nilesh Lanke : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना धक्का देत गुरुवारी शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला आहे. यानंतर लंके म्हणाले, आता आपण साहेबांच्या (शरद पवार) आदेशाचे पालन करणार आहोत.   नीलेश लंके म्हणाले, “मी नेहमीच शरद पवारांच्या विचारसरणीचे पालन केले आहे. 2019 मध्ये माझा निवडणूक प्रचार त्यांनीच सुरू केला होता. त्यांची विचारधारा आणि पक्ष मी कधीही सोडला नाही.” राष्ट्रवादी काँग्रेस (पुणे) शहर कार्यालयात शरद पवार यांच्या उपस्थितीत लंके म्हणाले, लोकसभा निवडणुकीबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. मात्र, मी साहेबांच्या (शरद पवार) आदेशाचे पालन करेन, असे ते म्हणाले.   शरद पवार म्हणाले, “लंके हे कष्टाळू आहेत आणि त्यामुळेच 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पक्षाची पसंती होती. त्यांनी अलीकडेच काही निर्णय घेतले असतील, पण ते त्यांच्या मतदारांप्रती प्रामाणिक आहेत आणि पुढेही राहतील. जनतेसाठी काम करण्यासाठी. त्यांना काही मदत लागली तर आम्ही त्यांना जनहितासाठी मार्गदर्शन करू.” आदल्या दिवशी अजित पवार म्हणाले होते की, लंके यांनी पक्ष सोडण्यापूर्वी आपल्या निर्णयाचा विचार करावा. लंके यांनी पक्ष सोडल्यास त्यांना अपात्रतेला सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांच्या विरोधात लंके निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. लंके हे राष्ट्रवादीचे (एसपी) लोकसभेचे उमेदवार असतील, असे संकेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले. ते म्हणाले, “लंके हे अहमदनगरमधील लोकप्रिय नेते आहेत. कोविड महामारीच्या काळात केलेल्या कामामुळे ते शेजारच्या जिल्ह्यातही प्रसिद्ध आहेत.  शरद पवार यांच्या विचारधारेवर त्यांचा नेहमीच विश्वास होता आणि त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी मागील विधानसभा निवडणूकही लढवली होती. ते शरद पवार साहेबांचा फोटो  वापरत राहतील आणि आता औपचारिकपणे NCP (SP) चा भाग आहेत.

Nilesh Lanke : “साहेबांचा आदेश मी सदैव मानेन” अजित पवारांना धक्का देत निलेश लंके शरद पवार गटात   Read More »

B.S.Yadurappa : मोठी बातमी! माजी मुख्यमंत्र्यांवर लैंगिक शोषणाचा आरोप, गुन्हा दाखल

B.S.Yadurappa : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बीएस येडियुरप्पा  यांच्यावर 17 वर्षीय तरुणीने लैंगिक छळाचा आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे.  त्यांच्यावर लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण, 2012 (POCSO) या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी रात्री उशिरा बेंगळुरू येथील पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यदियुरप्पा यांच्या विरोधात नोंदवलेल्या एफआयआरनुसार, पॉक्सो कायद्याच्या कलम 8 आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 354 अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, 17 वर्षीय तक्रारदार तिच्या आईसोबत सदाशिवनगर पोलीस ठाण्यात गेली होती, जिथे एफआयआर दाखल करण्यात आला होता. सूत्रांनी सांगितले की, लैंगिक छळाची कथित घटना 2 फेब्रुवारी 2024 रोजी घडली, जेव्हा आई आणि तक्रारदार लैंगिक छळाच्या दुसऱ्या प्रकरणात मदत मागण्यासाठी येडियुरप्पा यांच्याकडे गेले होते. यदुरप्पा यांनी प्रतिक्रिया दिली नाही येडियुरप्पा यांनी अद्याप तक्रारीवर प्रतिक्रिया दिलेली नाही. POCSO कायदा 2012 अंतर्गत किमान शिक्षा 3 वर्षे आहे. तथापि, हा गुन्हा कोणत्या कलमाखाली येतो. उदाहरणार्थ, कलम 4 अन्वये, 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाच्या लैंगिक अत्याचारासाठी न्यायालयाने निश्चित केलेली किमान शिक्षा 20 वर्षांची शिक्षा आणि दंड आहे.

B.S.Yadurappa : मोठी बातमी! माजी मुख्यमंत्र्यांवर लैंगिक शोषणाचा आरोप, गुन्हा दाखल Read More »

Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला पुन्हा धक्का! माजी केंद्रीय मंत्री भाजपमध्ये दाखल

Loksabha Election 2024 : पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.   पटियाला काँग्रेस लोकसभा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री प्रनीत कौर यांनी गुरुवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयात पक्षाचे सरचिटणीस तरुण चुघ, विनोद तावडे आणि अरुण सिंग, पंजाब भाजपचे प्रभारी विजय भाई रुपाणी आणि पंजाब प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांच्या उपस्थितीत काँग्रेस खासदार प्रनीत कौर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी प्रनीत कौर यांचे भाजपमध्ये स्वागत करताना सांगितले की, त्यांना प्रदीर्घ राजकीय अनुभव आहे, त्या परराष्ट्र राज्यमंत्रीही राहिल्या असून त्यांच्या येण्याने निश्चितपणे पंजाबमध्ये भाजप मजबूत होईल आणि पंजाबच्या जनतेलाही फायदा होईल.  भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रनीत कौर म्हणाल्या की आज मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे याचा मला आनंद आहे. ते म्हणाले की, गेल्या 25 वर्षांत त्यांनी लोकसभा आणि विधानसभेत काम केले, पंजाबसाठी काम केले आणि लोकशाहीसाठी काम केले. आता वेळ आली आहे जेव्हा आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्या देशाला पुढे नेऊ शकतील, जगात भारताची प्रतिष्ठा वाढवू शकतील. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचा विकास करण्यासाठी आणि देशाला पुढे नेण्यासाठी करत असलेले काम आणि धोरणे पाहून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पक्षात समाविष्ट केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. प्रनीत कौर या कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी आहेत प्रनीत कौर या पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंगसह आधीच त्यांचा मुलगा आणि मुलगी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.  प्रनीत कौर यांनी पंजाबच्या पटियाला मतदारसंघातून चार वेळा लोकसभा निवडणूक जिंकली आहे. मात्र, काँग्रेसने त्यांच्यावर पक्षविरोधी कारवायांचा आरोप करत गेल्या वर्षीच त्यांना निलंबित केले होते. पंजाबमध्ये आपला जनाधार वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत असलेली भाजप प्रनीत कौर यांना लोकसभेची उमेदवार बनवू शकते, असे सांगण्यात येत आहे.

Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला पुन्हा धक्का! माजी केंद्रीय मंत्री भाजपमध्ये दाखल Read More »

Maharashtra News: ​​अजित पवारांना सर्वोच्च न्यायालयाचा धक्का! ‘त्या’ प्रकरणात मोठा निर्णय

Maharashtra News : राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये काय होणार आहे? याची कोणालाच कल्पना नाही.  तर दुसरीकडे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांना शरद पवार यांचे फोटो निवडणूक प्रचारामध्ये वापरल्यामुळे मोठा धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात ताशेरे ओढले आहेत.   शरद पवार यांच्या नावाचा आणि फोटोचा गैरवापर केल्याचा आरोप करणाऱ्या अर्जावर आज  सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टाने विचारले की, वेगळे झाल्यानंतरही अजित पवार गट शरद पवारांचे फोटो का वापरत आहे? निवडणूक प्रचारासाठी शरद पवार यांच्या फोटोचा वापर का? करत आहे, असा सवाल सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला केला.  न्यायालयाने अजित पवार गटाला सांगितले की, आता तुम्ही वेगळा राजकीय पक्ष आहात. तुम्ही त्यांच्यासोबत (शरद पवार) न राहण्याचा निर्णय घेतला आहे. मग तुम्ही त्यांचे (शरद पवार) फोटो का वापरता… आता तुमची ओळख घेऊन निवडणुकीत जा…”   उपमुख्यमंत्री अजित पवार लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले असताना सर्वोच्च न्यायालयाची ही टिप्पणी आली आहे. अजित पवार गट मतदारांना आकर्षित करण्यासाठी शरद पवारांच्या नावाचा, फोटोचा गैरवापर करत असल्याचा आरोप शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाने करून याबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.  त्यावर आज सुनावणी करताना न्यायालयाने अजित पवार गटाला शनिवारपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.  जुलै 2023 मध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचा एक गट सत्ताधारी भाजप-शिवसेना सरकारमध्ये सामील झाला तेव्हा राष्ट्रवादीचे दोन गट झाले. यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हावर दावा केला.  अनेक महिन्यांच्या सुनावणीनंतर निवडणूक आयोगाने 23 फेब्रुवारीला अजित पवार गटाला  राष्ट्रवादीचा दर्जा देत घड्याळाचे चिन्ह दिले.  तर पक्षाचे संस्थापक शरद पवार यांना ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ आणि निवडणूक चिन्ह ‘तुतारी’ असे नाव देण्यात आले.

Maharashtra News: ​​अजित पवारांना सर्वोच्च न्यायालयाचा धक्का! ‘त्या’ प्रकरणात मोठा निर्णय Read More »

Ahmednagar News: मुळा, जायकवाडी प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी लागणार मार्गी!

Ahmednagar News:  अहमदनगर जिल्ह्यातील मुळा  व जायकवाडी प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे विविध प्रश्न प्रलंबित असल्याने खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पुढाकार घेत पालकमंत्री तथा राज्याचे महसूलमंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील व मदत व पुनर्वसन विभागाचे मंत्री मा. अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन बुधवारी मंत्रालयातील दालनात केले होते.  यावेळी महसूलमंत्री आणि मदत व पुनर्वसन मंत्री यांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या आणि अडचणी जाणून घेत त्या तातडीने सोडविण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले. यामुळे या प्रकल्पग्रस्तांना दिलासा मिळणार आहे.  अहमदनगर जिल्ह्यातील मुळा, जायकवाडी प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तानां शासनाने जमिनी देण्याचे सोपास्कार केले मात्र अद्यापही अनेक जमिनी या भोगवाटा २ मध्ये असून त्यात वन विभागांच्या जमिनींचा सुद्धा समावेश आहे.   यामुळे त्यांना घरकुल योजना आणि इतर शासकीय योजना राबविताना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. या जमिनी ह्या १९७३ पुर्वीच्या दिल्या गेल्याने त्यातील अनामत रकमा रखडल्यामुळे या जमीन शासन जमा केल्या जाणार आहेत. यामुळे प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा यासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी महसूल मंत्री तथा मदत व पुनर्वसन मंत्री यांच्याकडे प्रस्ताव पाठऊन अशा जमिनीवरील तत्कालीन धोरणातील १०० टक्के, ७५ टक्के अनामत रक्कम भरण्याची अट शिथिल करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांना दाखले देण्यासंदर्भातील प्रश्न मार्गी लावण्याची मागणी खासदारांनी केली.  वन अधिनियम १९८० अस्तितवात येण्यापुर्वी वाटप केलेल्या जमिनी भोगवाटा २ वर्गातील जमिनी सरकट वर्ग १ मध्ये करण्यात याव्यात. तसेच रहिवाशी प्रयोजनातील वाटप करण्यात आलेले भुखंड आणि पुनर्वसन गावठाणातील जमिनी नियमाकुल करण्याबाबत धोरण निश्चित करण्याची मागणी यावेळी खासदार डॉ. विखे पाटील यांनी केली. या सर्व मागण्याच्या बाबतीत सखोल चर्चा होऊन दोन्ही मंत्र्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी सोडविण्यासाठी महसलू, मदत व पुनर्वसन आणि वन विभागाला निर्देश दिले.  या बैठकीला मंत्रालयातील दालनात महसूल व मदत व पुनर्वसन विभागांच्या मंत्र्यांसह आमदार श्रीमती मोनिका राजळे आणि महसूल, मदत पुनर्वसन व वन विभागाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.  तर दृकश्राव्य माध्यमातून खासदार डॉ. सुजय विखे पाटील,अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिध्दिराम सालीमठ आणि प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Ahmednagar News: मुळा, जायकवाडी प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी लागणार मार्गी! Read More »

Rohit Pawar: आंदोलनाचा सातवा दिवस, आ. रोहित पवार व तीन विद्यापीठ समितीसमोर पाच तासांच्या चर्चेनंतर विद्यार्थी उपोषणावर ठाम

आ. रोहित पवार व तीन विद्यापीठ समितीसमोर पाच तासांच्या चर्चेनंतर विद्यार्थी उपोषणावर ठाम Rohit Pawar : जामखेड येथील रत्नदीप वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची आंदोलनस्थळी जाऊन आमदार रोहित पवार यांनी कैफियत ऐकून घेतली. यावेळी विद्यार्थ्यांना रडू कोसळले. आंदोलनस्थळी पाच तास बसून त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. दरम्यान, रत्नदीपबाबत विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.   रत्नदीप फौंडेशनच्या अध्यक्षाच्या शैक्षणिक, आर्थिक, माणसिक, शाररीक पिळवणूकमुळे त्रस्त विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या सोमवारी सातव्या दिवशी आ. रोहीत पवार, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, लोणारे विद्यापीठ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्यासमवेत विद्यार्थ्यांनी खुली चर्चा सुमारे साडेचार तास केली.  चार मुद्दयावर विद्यापीठ प्रतिनिधीनी कुलगुरू समवेत होणाऱ्या मिटींग नंतर निर्णय घेतले जातील असे अश्वासन दिले परंतु विद्यार्थ्यांनी निर्णय होईपर्यंत आंदोलन चालू ठेवण्याचा निर्णय घेतला डॉ. भास्कर मोरे याला 24 तासात अटक करण्याची मुदत संपली 100 घंटे झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे सांगितले.   महिला आयोगाकडून दखल रत्नदीप संस्थेच्या अध्यक्षाकडून मुलींचे माणसिक, अर्थिक शाररीक, अत्याचारामुळे सुरू असलेल्या  अंदोलनाची राज्य महिला आयोगाने स्वता:हून दखल घेतली आहे.  आयोगाने अहमदनगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक यांना जामखेडमध्ये सुरु असलेल्या या प्रकरणाबाबत पत्र लिहीले आहे. या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालय अधिनियम, 1993 अंतर्गत कलम 10(1) (फ) (एक) व (2) नुसार महाराष्ट्र राज्य महिला आयोगास स्त्रियांच्या तक्रारी विचारार्थ स्विकारणे आणि त्या बाबींची स्वाधिकारे दखल घेणे व माहीती कळवण्यास सांगितले आहे.

Rohit Pawar: आंदोलनाचा सातवा दिवस, आ. रोहित पवार व तीन विद्यापीठ समितीसमोर पाच तासांच्या चर्चेनंतर विद्यार्थी उपोषणावर ठाम Read More »

Rajshritai Ghule Patil : स्त्री ही तिच्या कुटुंब व्यवस्थेचा कणा आहे :- सौ. राजश्रीताई घुले पाटील

Rajshritai Ghule Patil : स्त्री ही तिच्या कुटुंबाचा कणा असुन तिच्या अस्तित्वावर कुटुंबाचे भवितव्य अवलंबून असते. त्यामुळे तिने कोणत्याही परिस्थितीत धैर्याने उभे राहणे गरजेचे आहे.  आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषाच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करत असून आपल्या कुटुंबाची जबाबदारी देखील तितक्याच काळजीने पार पडत आहे.  महिलांच्या अतुलनीय योगदानामुळे समाजाची व राष्ट्राची चौफेर प्रगती होईल असे मत माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. राजश्रीताई चंद्रशेखर घुले पाटील यांनी व्यक्त केले असून अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्याच्या लाडजळगाव येथील उत्कर्ष फाउंडेशनचे संस्थापक, अध्यक्ष ज्ञानेश्वर तहकिक, अमोल तहकिक, चंद्रकांत खरात, भाऊसाहेब क्षीरसागर, जगदीश जंगम यांच्या वतीने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.  प्राध्यापिका संजीवनी नवल यांचे व्याख्यानाला महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असून शोभा तहकिक, मोनिका छाजेड, मनीषा कळसाई, मयुरी परदेशी, अस्मिता मराठे, पूजा मुळे, रेखा परदेशी, सुमनबाई कुलकर्णी, कांताबाई राठोड, रुख्मिणी कुलकर्णी आदींसह  महिलांचा सन्मान करण्यात आला होता. यावेळी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Rajshritai Ghule Patil : स्त्री ही तिच्या कुटुंब व्यवस्थेचा कणा आहे :- सौ. राजश्रीताई घुले पाटील Read More »

Uddhav Thackeray : शिंदे गटाला धक्का! ‘त्या’ प्रकरणात होळीनंतर होणार निर्णय

Uddhav Thackeray: राज्यात पुन्हा एकदा खरी शिवसेना कोणाची या प्रश्नावर चर्चा सूरु झाली आहे. काही दिवसापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मोठा निर्णय देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली होती.  मात्र राहुल नार्वेकर यांच्या या निर्णयाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिला होता. या याचिकेवर आता एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. या नोटिशीला 01 एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सभापती राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या शिवसेनेच्या (यूबीटी) गटाने दाखल केलेल्या याचिकेवर   सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. दरम्यान, उद्धव गटाची याचिका मुंबई उच्च न्यायालयात पाठवण्याची मुख्यमंत्री शिंदे यांची विनंती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. तसेच होळीनंतर या प्रकरणाची सुनावणी होऊन निर्णय घेतला जाईल, असेही सांगितले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट हाच ‘खरा’ शिवसेना पक्ष असल्याच्या सभापतींच्या निर्णयावर उद्धव ठाकरे गटाने नुकतीच याचिका दाखल केली होती. यापूर्वी, CJI DY चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने CM शिंदे आणि इतर 38 शिवसेना आमदारांना नोटीस बजावली होती आणि शिवसेनेच्या UBT च्या याचिकेवर त्यांचे उत्तर मागितले होते. मात्र अद्याप उत्तर दाखल झालेले नाही. या खंडपीठात CJI चंद्रचूड व्यतिरिक्त न्यायमूर्ती जेबी परडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांचाही समावेश आहे. याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे उद्धव गटाचा  म्हणणे आहे. कारण सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये संपणार आहे. त्यामुळे या प्रकरणावर लवकर निर्णय न घेतल्यास संपूर्ण प्रकरण निरर्थक ठरणार आहे. सर्व पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर खंडपीठाने सांगितले की, “आम्ही होळीच्या सुट्टीनंतर सुनावणीसाठी या प्रकरणाची  सुनावणी करून प्रकरण निकाली काढू.”  अपात्रतेच्या याचिकेवर सुनावणी करणाऱ्या न्यायाधिकरणाच्या (स्पीकर) कार्यालयातून मूळ रेकॉर्ड मागवण्यात येईल. या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात होईल, असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. . काय आहे उद्धव गटाच्या याचिकेत? माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, विधानसभा अध्यक्षांच्या 10 जानेवारीच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गट हीच खरी शिवसेना आहे, कारण विधानसभेत आणि पक्षाची सत्ता त्यांच्याकडे आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीत बहुमत आहे. याशिवाय शिंदे आणि त्यांच्या गटातील शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या याचिका फेटाळण्यालाही याचिकेत आव्हान देण्यात आले आहे.

Uddhav Thackeray : शिंदे गटाला धक्का! ‘त्या’ प्रकरणात होळीनंतर होणार निर्णय Read More »