DNA मराठी

MiM

asaduddin owais

Bihar Election Result: सीमांचलमध्ये ‘ओवैसी फॅक्टर’ सुपरहिट; RJD ला मोठा धक्का

Bihar Election Result: बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी अंतिम टप्प्यात असून पुन्हा एकदा एनडीए बिहारमध्ये सरकार स्थापन करणार आहे. या विधानसभा निवडणुकीत जेडीयू आणि भाजपने शानदार कामगिरी करत काँग्रेस आणि आरजेडीला मोठा धक्का दिला आहे. तर दुसरीकडे सीमांचलमध्ये ओवैसी फॅक्टर पुन्हा एकदा दिसून आला आहे. 2020 मध्ये सीमांचलमध्ये ओवैसी यांच्या एमआयएम पक्षाने 5 जागांवर बाजी मारली होती. तर आता या निवडणुकीत पुन्हा एकदा एमआयएमने 5 जागा जिंकले असून एका जागेवर सध्या आघाडी घेतली आहे. निवडणुका जाहीर होण्यापूर्वी एमआयएमकडून आरजेडीकडे 6 जागांची मागणी करण्यात आली होती मात्र आरजेडी एमआयएमला स्पष्ट नकार दिला होता. यानंतर एमआयएमकडून 24 जागांवर उमेदवार देण्यात आले होते तर या 24 पैकी 5 जागांवर विजय मिळवला आहे तर एका जागेवर आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाने या निवडणुकी 60 पेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढवली होती मात्र पक्षाला काही खास करता आले नाही. काँग्रेस ताज्या अपडेटनुसार 5 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे फक्त सीमांचलमधेच नाहीतर संपूर्ण बिहारमध्ये आरजेडीला मोठा फटका बसला आहे.

Bihar Election Result: सीमांचलमध्ये ‘ओवैसी फॅक्टर’ सुपरहिट; RJD ला मोठा धक्का Read More »

asaduddin owais

Asaduddin Owais: फक्त मलाच लव्ह लेटर का? खासदार ओवेसी भडकले

Asaduddin Owais: अहिल्यानगर शहरात एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांची जाहीर सभा पार पडली. मात्र या सभेपूर्वी पोलिसांनी खासदार ओवैसी यांना सभेसाठी काही अटी आणि शर्ती घातल्याने सभेत बोलताना ओवैसी यांनी फक्त मलाच लव्ह लेटर का? असा प्रश्न विचारत पोलिसांचा भरपूर समाचार घेतला. या सभेत बोलताना खासदार असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेता येतो, जेव्हा ठाकरे गटाचा नेता येतो, जेव्हा आरएसएसची सभा असते आणि जेव्हा भाजपचा नेता येतो तेव्हा पोलीस त्यांना लव्ह लेटर देत नाही. फक्त आम्हालाच लव्ह लेटर मिळतो कारण पोलिसांना देखील माहिती मर्द फक्त एकच आहे. अश्या शब्दात खासदार ओवैसी यांनी पोलिसांचा समाचार घेतला. पुढे बोलताना असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरमध्ये मी भारताचा नेतृत्व दुसऱ्या देशामध्ये केलं. कतरचे एक शेख पॅलेस्टाईन संबंधी भारताविषयी बोलत होते तेव्हा माझ्या डेलिगेशनने माझ्याकडे पाहिलं आणि मी त्या शेख ला उत्तर दिलं की भारतापेक्षा तर तुमचा हा कतर पॅलेस्टाईनच्या अगदी जवळ आहे मग तुम्ही का नाही पहिले मदत पोहोचवत आणि भारत याने आपला एक हिस्सा हा पॅलेस्टाईन साठी ठेवलेला आहे. असं मी कतर मध्ये भारताची साईट घेऊन सांगितलं आज मी भारतासाठी दुसऱ्या देशांशी लढत आहे तरी देखील जिथे मी जातो तिथे मला लव्ह लेटर दिला जातो आणि त्यात सांगितलं जातं की मी काय बोलावं आणि काय नाही ? बीजेपी पार्टीचे नेते येतात, शिंदे पार्टीचे नेते येतात, अजित पवार पार्टीचे नेते येतात तेव्हा त्यांना का हा लव्हलेटर दिला जात नाही. मी एकटाच मर्द पोलिसांना दिसतो का? आणि ज्या कलमान्वये मला हा लेटर देण्यात आला तो कलमला रद्द करण्यासाठी मीच 35 मिनिट सादनात भाषण केलं आहे. कदाचित पोलीस हे विसरले. पोलिसांनी दिलेला हा लव्ह लेटर मी रिजेक्ट करतो असं असदुद्दीन ओवेसी म्हणाले.

Asaduddin Owais: फक्त मलाच लव्ह लेटर का? खासदार ओवेसी भडकले Read More »

imtiaz jaleel

Imtiaz Jaleel On Sangram Jagtap: नगर शहरात चिकनी चमेली; इम्तियाज जलील यांचा आमदार जगतापांना प्रत्युत्तर

Imtiaz Jaleel On Sangram Jagtap : अहिल्यानगर येथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. नगर शहरात चिकनी चमेली राहत असून काम न करता फक्त हिंदू मुस्लिम करत असल्याची टीका त्यांनी नाव न घेता आमदार जगताप यांच्यावर केली आहे. या सभेत बोलताना आम्ही पंतप्रधान मोदींना उत्तर देतो तर तू कोण? तू तर चिल्लर आहे असा टोला देखील माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आमदार संग्राम जगताप यांना लावला. तर दुसरीकडे त्यांनी नगर – औरंगाबाद रस्त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील आव्हान करत मी 20 हजार रुपये देतो तुम्ही एकदा नगर – औरंगाबाद रस्त्यावर प्रवास करा असं म्हटले आहे. तसेच आमच्या पक्षावर भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला जातो मात्र मी जेव्हा आमदार आणि नंतर खासदार झालो तेव्हा मी भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला होता अशी आठवण देखील जलील यांनी विरोधकांना करून दिली. तर दुसरीकडे नगर शहरात एक विषारी साप असून तो दोन समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे मात्र त्याच्या विष मध्ये दम नाही अशी टीका फारुख शाब्दी यांनी आमदार जगताप यांच्यावर केली.

Imtiaz Jaleel On Sangram Jagtap: नगर शहरात चिकनी चमेली; इम्तियाज जलील यांचा आमदार जगतापांना प्रत्युत्तर Read More »

asaduddin owais

Asaduddin Owais: मोठी बातमी, खासदार ओवैसी नगर शहरात दाखल

Asaduddin Owais: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन ( AIMIM) चे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांचे अहमदनगर शहरात आगमन झाले असून आज संध्याकाळी 7 वाजता मुकुंदनगरमधील सीआयव्ही ग्राउंड येथे ओवैसी जाहीर सभा घेणार आहे. या सभेत ओवैसी यांच्याकडून कोणते मुद्दे उपस्थित करण्यात येणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. खासदार ओवैसी यांच्यासोबत नगर शहरात एमआयएम प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यासह मुंबई प्रदेशाध्यक्ष फारुक शाब्दी, माजी आमदार वारीस पठाण आज नगर शहरात येणार आहे. खासदार ओवैसी पहिल्यांदाच नगर शहरात जाहीर सभा घेत असल्याने सभेच्या ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. तसेच पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा सभेच्या ठिकाणी दाखल झाला आहे.

Asaduddin Owais: मोठी बातमी, खासदार ओवैसी नगर शहरात दाखल Read More »

asaduddin owais

Asaduddin Owais: ठरलं! 09 ऑक्टोबरला नगर शहरात खासदार ओवैसी घेणार जाहीर सभा; MIM कडून तयारी सुरू

Asaduddin Owais: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन ( AIMIM) चे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी 9 ऑक्टोबर रोजी नगर शहरात जाहीर सभा घेणार असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. खासदार ओवैसी यांची ही सभा मुकुंदनगर मधील सीआयव्ही ग्राउंड येथे संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. यापूर्वी खासदार असदुद्दीन ओवैसी 30 सप्टेंबर रोजी नगर शहरात जाहीर सभा घेणार होते मात्र 29 सप्टेंबर रोजी शहरात दोन गटात वाद निर्माण झाल्याने पोलीस प्रशासनाने केलेल्या विनंतीनंतर खासदार ओवैसी यांनी सभा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. तर आता ही सभा 09 ऑक्टोबर रोजी होणार असल्याची माहिती अहमदनगर एमआयएमकडून देण्यात आली आहे. तर दुसरीकडे खासदार असदुद्दीन ओवैसी यांची नगर शहरात पहिल्यांदाच होणाऱ्या या सभेत एमआयएम कडून आगामी पालिका निवडणुकीसाठी कोणती घोषणा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यासह एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील देखील नगर शहरात 09 ऑक्टोबर रोजी येणार आहे.

Asaduddin Owais: ठरलं! 09 ऑक्टोबरला नगर शहरात खासदार ओवैसी घेणार जाहीर सभा; MIM कडून तयारी सुरू Read More »

asaduddin owais

Asaduddin Owais: खासदार ओवैसी अहिल्यानगर शहरात घेणार सभा; पोलिसांकडून ग्रीन सिग्नल

Asaduddin Owais: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन ( AIMIM) चे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांना अहिल्यानगर शहरात सभेसाठी पोलीस प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. खासदार असदुद्दीन ओवैसी यांची जाहीर सभा नगर शहरातील मुकुंदनगर भागातील सीआयव्ही कॉलनी ग्राउंड येथे संध्याकाळी 7.00 वाजता होणार आहे. यासाठी अहिल्यानगर पोलिसांनी काही अटी व शर्ती ठेवून ओवैसी यांना सभेसाठी परवानगी दिली आहे. सभेसाठीच्या अटी व शर्थी १) जाहिर सभा घेण्याकरीता आवश्यक लागणा-या परवानगी स्थानिक स्वाराज्य संस्था यांचेकडुन घेवुनच सभा घ्यावी. [स्टेज, मंडप उभारणी, एम एस ई बी, पार्कीग व्यवस्था, आरोग्य विभाग, अग्निशमक विभाग इत्यादी। त्याबाबचे मंजुरी पत्र सादर करावे. २) जाहिर सभा घेत असताना फायर ब्रिगेड, ॲम्बुलन्स, अती महत्वाचे वाहने, अत्यावश्यक वस्तु वाहतुक करणारे वाहने येण्या जाणेसाठी अडथळा होणार नाही याची दक्षता घेऊन पार्किंग व्यवस्था करावी. सदर पार्किंग ठिकाणी आपले स्वयंसेवक नेमावेत. वाहतुक पोलीसांच्या सुचनांचे पालन करावे. ३] आपले पक्षाचे खासदार बें अससुददीन ओवेसी यांना झेड वर्गवारीची सुरक्षा आहे. त्यामुळे सभेच्या ठिकाणी ४५ बाय ६० फुट लांबी रुंदीचे डी झोन तयार करुन स्टेजची व्यवस्था करावी. तसेच स्टेजवर बसणा-या प्रमुखांची नावांची यादी आगाऊ उपलब्ध करुन देवुन त्यांचे पास आमचेकडुन घ्यावेत. स्टेज सुरक्षामध्ये कोणताही निष्काळी पणा होणार नाही याची दक्षता घ्यावी. ४) सभेच्या ठिकाणी सुरक्षाच्या अनुषंगाने सभेचे ठिकाण चारही बाजुने सुरक्षीत करुन समक्ष दिलेल्या सुचनेप्रमाणे स्वतंत्र प्रवेश व्दाराची व्यवस्था करावी जेणेकरुन सुरक्षा अनुषंगाने सोयीचे होईल याबाबत काटेकोरपणे पालन करावे. ५) जाहिर सभेच्या अनुषंगाने लावण्यात येणारे झेंडे, पोस्टर्स व बॅनर्स याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थेची स्वतंत्र पारवानगी घेवुन सादर करावी. ६) आपण लावण्यात आलेल्या झेंडे व पोस्टर्स व बॅनर्स व इतर जाहिरातीमुळे कोणत्याही धर्माच्या/जातीच्या भावना दुखवतील असे वक्तव्य अथवा देखावे अथवा विभिस्त किंवा मना दुखवतील असे गाणी पोस्टर्स लावू नयेत. ७] जाहिर सभा अयोजित करताना असताना कोणावरही आपले कार्यकर्ते जबरदस्तीने सहभागी करणार नाही याची दक्षता घ्यावी. जाहिर सभा ही शांततेने व सुरळीत पार पाडणेसाठी पोलीस ज्या ज्या वेळी मिटिंगसाठी बोलविले जाईल त्यावेळेस हजर राहुन त्यावेळी देणेत आलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे. ८) जाहिर सभा मध्ये महिला व मुली सहभागी असतील तर त्यांची गैर सोय होणार नाही याची दक्षता घ्यावी. शक्यतो महिला व पुरुष असे दोन वेगवेगळे भाग करावेत. ९] जाहिर सभा असताना प्रशासनाने ठरवून दिलेल्या जागेचा/मार्गाचा वापर करावा. जाहिर सभा घेण्यापुर्वी अथवा नंतर कोणतीही रॅली काढता येणार नाही. सभेकरीता येणारे वक्ते यांना झेड सुरक्षा असलेने त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव कोठेही पोलीसांच्या परवानगी शिवाय दौ-यात बदल करता येणार नाही. १०) जाहिर सभा च्या वेळी अत्यावश्यक सेवा चालु राहितील तसेच आपले समर्थकाकडुन त्यास कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. ११] जाहिर सभेच्या दरम्यान अथवा नंतर आपले कार्येकर्ते यांचेकडुन कोणत्याही शासकीय अथवा खाजगी मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी. १२] सभेच्या ठिकाणी लाईट, स्वच्छता, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, पार्किंग याची सभेला येणा-या नागरिकांचे प्रमाणात पुरेशी सोय करण्यात यावी. वरील नियम व अटीचे पालन करुन याबाबतचे नाहरकत प्रमाणपत्र व सबंधिकत विभागाचे परवानगी पत्र असे संपुर्ण बाबीची पुर्तता करुन याबाबतचा पुर्तता आहवाल दि. २८/०९/२०२५ रोजी सकाळी ११.०० वा शिवाजीनगर पोलीस ठाणेस सादर करावेत. आपण वरील बाबीची पुर्तता न केल्यास आपला परवानगी अर्ज नामंजूर करुन मा. वरिष्ठ कार्यालयात अहवाल सादर करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

Asaduddin Owais: खासदार ओवैसी अहिल्यानगर शहरात घेणार सभा; पोलिसांकडून ग्रीन सिग्नल Read More »

asaduddin owais

Asaduddin Owais: नगर शहरात 30 सप्टेंबरला ओवैसींची जाहीर सभा; करणार मोठी घोषणा?

Asaduddin Owais: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन ( AIMIM) चे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांची 30 सप्टेंबर रोजी अहमदनगर शहरात जाहीर सभा होणार असल्याची माहिती एआयएमआयएमचे जिल्हाध्यक्ष परवेज अशरफी आणि महाराष्ट्र युवक अध्यक्ष अंजर खान यांनी माध्यमांशी बोलताना दिली. खासदार असदुद्दीन ओवैसी यांची जाहीर सभा नगर शहरातील मुकुंदनगर भागातील सीआयव्ही कॉलनी ग्राउंड येथे संध्याकाळी 7.00 वाजता होणार असून या सभेतून खासदार ओवैसी आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी मोठी घोषणा करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यासह 30 सप्टेंबर रोजी शहरात एआयएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील देखील उपस्थित राहणार आहे. त्यामुळे या सभेतून अहमदनगर शहरासाठी एमआयएमकडून कोणती मोठी घोषणा करण्यात येणार याबाबत जिल्ह्याच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

Asaduddin Owais: नगर शहरात 30 सप्टेंबरला ओवैसींची जाहीर सभा; करणार मोठी घोषणा? Read More »

img 20250823 wa0002

Maharashtra Politics: येणाऱ्या निवडणुकीसाठी MIM ची मोठी खेळी ; डॉ. परवेज अशरफी

Maharashtra Politics : महाराष्ट्रात सर्वत्र जातीय तणाव निर्माण करून दंगल घडवण्याचा प्रयत्न होत आहे. धार्मिक कार्यक्रमा मध्ये धर्म प्रसारण बाजूला ठेऊन राजकारण आणि मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचे काम काही दंगलखोर संघटना आणि सत्ताधारी पक्षाचे लोक प्रतिनिधी करत आहे. यांना कोणीही जाब विचारायला तयार नाही. प्रशासनाच्या भूमिकेवर नागरिक प्रश्न करत आहे.  मुस्लिम समाजाचे दर्गा मशीद मदरसावर हल्ले होत आहे. काही जातीवादी संघटन लोकांना आव्हान करत आहे. प्रशासनाला याची माहिती दिली तरी प्रशासन काही करत नाही. न्यायालयाचे मनाई आदेश प्रशासनाला दिल्यानंतर ही प्रशासन कोणतीच प्रतिबंधात्मक कारवाई करत नाही. दर्ग्यात दरोडे घातल्याची फिर्याद घेत नाही. तक्रार करायला गेल्यावर फिर्यादीलाच दम देऊन हाकलून देतात. असे अनेक बेकायदेशीर प्रकार घडत असताना मुस्लिम समाजाने ज्यांना लोकसभेत आणि विधानसभेत मतदान केले किंवा ज्या पक्षासाठी खुलेआम प्रचार केला, त्याचे आज आवाज बसले आहे. दररोज जिल्ह्यात मुस्लिम समाजावर अत्याचार होत आहे. अल्पसंख्याक समाज सुरक्षित नाही. मागास्वर्गीय समाजावर शुल्लक कारणाने घरात घुसून सर्व कुटुंबाला जीव जाऊ पर्यंत मारतात. तसेच गऊ रक्षकांच्या नावाखाली हल्ले करतात, जनावरे चोरून दुसरीकडे विकतात. असे अनेक समस्यांच्या चर्चा करण्यासाठी आणि आगामी काळात येणाऱ्या निवडणुकी संदर्भात चर्चा करण्याचे उद्देशाने व एम आय एम जिल्हाध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांच्या नेतृत्वात अहमदनगर महानगर पालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगरसेवक समद खान आणि सामाजिक कार्यकर्ते खालिद शेख हे आपल्या असंख्य मान्यवर कार्यकर्तयां सोबत एम आय एम मध्ये प्रवेश करण्याच्या उद्देशाने प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील, प्रदेश महा सचिव समीर साजिद बिल्डर,प्रदेश सहसचिव शफीउल्लाह काझी यांची मुलाखत औरंगाबाद येथील पक्ष कार्यालय दारुसलाम येथे घेतली. इम्तियाज जलील यांनी पक्षात येणाऱ्यांचे स्वागत केले.आणि आपल्या सारखे ज्येष्ठ नगरसेवक पक्षात आल्याने पक्षाला ताकद मिळेल आणि आगामी निवडणुकीत महानगर पालिकेत पक्षाची महत्त्वाची भूमिका राहील असे सांगितले. समद खान यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की आपल्या शहरात अल्पसंख्याक समाजावर खालची पातळीवर टीका होत असताना एम आय एम व्यतिरिक्त कोण्ही बोलायला तयार नाही.जर पक्ष यांना बोलायची किंवा विरोध करायची परवानगी देत नसेल तर मी त्या पक्षात राहुन काय करू. म्हणून इम्तियाज जलील यांच्याशी चर्चा केल्यानंतर आमचा समाधान झाल्याने आम्ही निर्णय घेतला आहे. एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी सांगितले की लवकरच राष्ट्रीय अध्यक्ष असादुद्दीन ओवेसी आणि प्रदेश अध्यक्ष  इम्तियाज जलील यांची सभा अहमदनगर मध्ये होणार असून विरोधकांना ज्या भाषेत पाहिजे त्या भाषेत उत्तर देऊ. यावेळी एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी, नगरसेवक समद खान, अंजर खान, सामाजिक कार्यकर्ते खालिद शेख, यूथ अध्यक्ष अमीर खान, आवेज काझी,जावेद शेख,नवीद शेख सनाउल्लाह खान, समीर खान, वाहिद हुंडेकरी, सज्जाद शेख, अजीम राजे, मोसिन शेख, मतीन खान आदी उपस्थिती होते. येणाऱ्या काळात जिल्ह्यात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता असल्याचे संकेत जिल्हाध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी दिले.

Maharashtra Politics: येणाऱ्या निवडणुकीसाठी MIM ची मोठी खेळी ; डॉ. परवेज अशरफी Read More »

imtiaz jaleel

Imtiaz jaleel : नगरचं राजकारण बदलणार, MIM करणार मोठा धमाका; अनेक कार्यकर्ते सोडणार राष्ट्रवादी काँग्रेसची साथ

Imtiaz jaleel : राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा अहिल्यानगर जिल्हा चर्चेत आला आहे. याचा मुख्य कारण म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. अहिल्यानगर महानगर पालिकेतील माजी नगरसेवकासह अनेक कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ची साथ सोडत ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षात दाखल होणार आहे.  माजी नगरसेवक समद खान, सामाजिक कार्यकर्ते खालिद शेख यांच्यासह अनेक कार्यकर्ते एआयएमआयएममध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी नगरसेवक समद खान यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी एआयएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांची भेट घेत एमआयएममध्ये प्रवेश करण्याची तयारी दर्शवली आहे. पुढील महिन्यात प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्ववादी भूमिका घेत एका विशेष समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत असल्याने अनेक कार्यकर्ते नाराज असून एआयएमआयएममध्ये प्रवेश करत असल्याची चर्चा आता नगरच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. तर दुसरीकडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी एआयएमआयएमला नगर शहरात मोठी ताकद मिळत असून पुढील काही दिवसात आणखी काही नेते एआयएमआयएममध्ये प्रवेश करणार असल्याचा विश्वास एआयएमआयएमचे जिल्हाध्यक्ष परवेज अशरफी यांनी व्यक्त केला आहे.

Imtiaz jaleel : नगरचं राजकारण बदलणार, MIM करणार मोठा धमाका; अनेक कार्यकर्ते सोडणार राष्ट्रवादी काँग्रेसची साथ Read More »

imtiaz jaleel

दिवस तुझा, वेळही तुझी, पण उत्तर आमचंच…, Imtiaz Jaleel यांचा संजय गायकवाडांना प्रत्युत्तर

Imtiaz Jaleel : शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करत “मारण्याची भाषा” केली होती. त्यावर आता इम्तियाज जलील यांनी बुलढाणा दौऱ्यात प्रतिक्रिया दिली आहे. बुलढाण्यात एमआयएमचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आले असताना जलील यांनी संजय गायकवाड यांचा चांगलाच समाचार घेतला. त्यांनी म्हटलं की, “गरीबांवर हात उचलणं मर्दानगी नसते. पुण्यात एक गँग ऑपरेट करत होते, रात्रीच्या अंधारात चड्डी-बनियान घालून फिरायची, चेहऱ्यावर कपडा, हातात शस्त्र घेऊन लोकांना लुटायची. आता काय झालंय, कपडे राहिले आहेत पण चेहऱ्यावर कपडा नाही. हेच लोक आता विधानसभेत दिवसाढवळ्या गुंडागिरी करतायत.” अशी टीका जलील यांनी केली. जलील पुढे म्हणाले,”जिथे कायदे बनवले जातात, त्या पवित्र सभागृहात आता शिव्या दिल्या जात आहेत. केवळ शिव्या नाही तर आता मारहाणीपर्यंत मजल गेली आहे. एखाद्या गरीबावर हात उचलून तुम्ही समजता की तुम्ही बलवान झालात? तर त्याचं उत्तर मी आधीच दिलं आहे.” “मी बुलढाण्याच्या मातीत उभा राहून मायेबहिणींच्या, बुजुर्गांच्या, नवयुवकांच्या आशीर्वादाने हे सांगतो, सरकारमधील कोणताही नेता आमचं काहीही वाकडं करू शकत नाही. जर तुमच्या मनात जराही विचार असेल की इम्तियाज जलीलवर हात उचलता येईल, तर लक्षात ठेवा, उत्तर दिलं जाईल जागा तुझी, दिवस तुझा, वेळही तुझी, तरीसुद्धा उत्तर आमचंच असेल!” असं देखील इम्तियाज जलील म्हणाले. या भाषणातून इम्तियाज जलील यांनी संजय गायकवाड यांना परखड शब्दांत सुनावले असून राजकीय वर्तुळात याची तीव्र चर्चा रंगली आहे.

दिवस तुझा, वेळही तुझी, पण उत्तर आमचंच…, Imtiaz Jaleel यांचा संजय गायकवाडांना प्रत्युत्तर Read More »