DNA मराठी

Maharashtra Politics

Sujay Vikhe News : मोदींनी 10 वर्षात जो विकास करून दाखवला तो इतरांना जमला नाही : खा. सुजय विखे

Sujay Vikhe News:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील १० वर्षात जो विकास करून दाखवला इतका विकास देशात आजपर्यंत कधीही झाला नव्हता.  यामुळे देशात केवळ मोदी हमीचा विश्वास दिसून येत आहे. मोदींच्या शिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. लोकसभा निवडणुकीच्या निमित्याने पुन्हा भाजपाचे सरकार आणण्याचा निर्धार देशातील जनतेने केला असल्याचा विश्वास महायुतीचे उमेदवार खा. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला. पेडगाव येथील आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. यावेळी प्रताप पाचपुते, अण्णासाहेब शेलार यांच्यासह स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशात अनेक वर्षे सत्ता भोगूनही जे इतरांना करता आले नाही, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील १० वर्षात करून दाखविले. जगाच्या कानाकोपऱ्यात देशाचे नावलौकिक निर्माण करण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. देशाने मागील १० वर्षात विविध क्षेत्रात आपली योग्यता सिद्ध करत प्रगती साधली आहे. त्याच बरोबर सर्वाधिक सरकारी योजना निर्माण करून त्या शेवटच्या लाभार्थांपर्यंत पोहचवून त्यांचे जिवनमान उंचावले आहे. शेतकरी, महिला, व्यापारी, तरुणांसाठी मोदी सरकारने भरीव काम केले आहे. यामुळे ३० कोटीहून अधील लोक गरिबीमुक्त झाले आहेत. यामुळे देशाने मोदींनाच प्रंसती देत दोन वेळा देशाची सेवा करण्याची संधी दिली आहे. आणि आता तिसऱ्यांदा सुद्धा त्यांचीच निवड होणार आहे. असा विश्वास खा. विखे पाटील यांनी सांगितले.  सुजय विखे पाटील यांनी देशाच्या योग्य नेतृत्वासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे योग्य पर्याय आहेत. सध्या देशात त्यांच्या इतका प्रभावी आणि दुरदुष्टी असलेला एकही नेता नाही. २०४७ पर्यंत भारत महासत्ता बनविण्याचे व्हिजन त्यांच्याकडे आहे. मागील १० वर्षात त्यांनी केवळ विकास कामांचे ट्रेलर दाखविले, अजून पुर्ण पिच्चर बाकी आहे. यामुळे मोदींचे हात बळकट करण्यासाठी लोकांनी मतदान करावे असे आवाहन सुद्धा त्यांनी यावेळी केले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक जिल्ह्याचा विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. नगर जिल्ह्यातही त्याच्या मार्फत मोठा निधी आला असून अनेक विकास कामे मार्गी लागली. यामुळे जिल्ह्यात पुन्हा विकासाचे पर्व महायुतीचा उमेदवारच सुरू ठेऊ शकतो. त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.

Sujay Vikhe News : मोदींनी 10 वर्षात जो विकास करून दाखवला तो इतरांना जमला नाही : खा. सुजय विखे Read More »

Ahmednagar News:  सुजय विखे यांचा विरोधकांवर घणाघात, म्हणाले माझ्याकडे…

Ahmednagar News: राहुरी येथिल एका सभेत बोलताना महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार सुजय विखे यांनी विरोधकांवर टीका करत माझ्याकडे विकासाची ब्लू प्रिंट आहे तुमच्याकडे काय आहे? तुम्ही केलेले काम दाखवा अशा परखड शब्दांत टिका केली आहे.  नगर जिल्ह्याच्या लोकसभेच्या निवडणुका ह्या दुसऱ्या टप्प्यात आल्या असून जिल्ह्यातील रणधुमाळीला चांगलीच रंगत चढली आहे. प्रचारात आघाडीवर असेलेले महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या समर्थात ठिक ठिकाणी रॅली, सभा भरविल्या जात आहेत. त्यांच्या सभांना वाढत्या गर्दीने विरोधकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. अशाच पार्श्वभूमीवर राहुरी शहर येथे त्यांच्या समर्थासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.  सुजय विखे पाटील म्हणाले की, मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या प्रचारात केवळ विकास कामांवर आपण चर्चा केली असून विरोधात कोण आहे? याचा विचार केला नसून कोणावरही टिका टिप्पणी केली नाही. केवळ मागील पाच वर्षात केलेल्या विकास कामाच्या जोरावर आपण मैदानात असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्याचा विकास हे एकमेव ध्येय ठेवून आपण राजकारणात आले असून, जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावणे, रोजगार निर्मिती करणे, महिलांचे सक्षिमिकरण करणे, जिल्ह्यात विकासाच्या पायाभूत सेवा सुविधा निर्माण करणे, सक्षम जिल्हा तयार करण्यासाठी माझ्याकडे विकासाचा अजेंडा असून येणाऱ्या पाच वर्षात नगरकरांना त्याचा अनुभव येईल. विरोधकांकडे विकासाचे कोणतेही व्हिजन नाही, त्यांचे हात भष्ट्राचाराने बरबटले आहेत. त्यांच्या दहशतीने व्यापारी हैराण झाले आहेत. सामान्य जतना  वैतागली असताना केवळ आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण करू शकतात. त्यामुळे त्यांना आपण कोणतेही महत्व देत नसून विकास कामांवर चर्चा करण्याचे खुले आवाहन त्यांनी विरोधकांना दिले.  मतदार संघात सुजय विखे यांच्या प्रचार सभां लोकांची गर्दी खेचत आहेत. केवळ विकास कामांचे मुद्दे घेऊन रिंगणात आलेले सुजय विखे पाटील यांना तरुणांची चांगली पसंती मिळत आहे. तरूण त्यांना विळखा घालून सेल्फी काढण्यासाठी गर्दी करत आहेत.

Ahmednagar News:  सुजय विखे यांचा विरोधकांवर घणाघात, म्हणाले माझ्याकडे… Read More »

Sujay Vikhe : जो रामाचा नाही तो कोणाच्‍याही कामाचा नाही: सुजय विखे

Sujay Vikhe :  जो रामाचा नाही तो कोणाच्‍याही कामाचा नाही. असा संदेश देत आयोध्‍येमध्‍ये राम मंदिराचे निर्माण करुन कोट्यावधी भारतीयांच्‍या  अपेक्षा पुर्ण करणा-या नरेंद्र मोदींनाच पुन्‍हा जनता जनार्दन तिस-यांदा पंतप्रधान करेल असा विश्‍वास महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला.   पारनेर येथे आयोजित केलेल्‍या कार्यक्रमात खा.डॉ.विखे पाटील पाटील यांनी उपस्थित नागरीकांशी संवाद साधला. या निमित्‍ताने त्‍यांनी देशामध्‍ये पुन्‍हा एकदा भाजपाची सत्‍ता येणार आहे. ज्‍यांनी राम मंदिराचे दिलेले आश्‍वासन पुर्ण केले त्‍यांनाच सत्‍तेवर बसविण्‍याचा निर्धार देशातील नागरीकांनी केला असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.  पारनेर तालुक्‍यातील राजकारण वेगळ्या दिशेला नेण्‍याचा प्रयत्न झाला. मागील साडेचार वर्षात ज्‍या गोष्‍टी तालुक्‍यात घडल्‍या त्‍यातून युवकांची हेळसांडच झाली. सर्वसामान्‍य लोकांमध्‍ये निर्माण झाली. खदखद आणि झालेला त्रास बाहेर येवू लागला आहे. विजय औटींसारखा कार्यकर्ता जनतेचे अश्रू पुसण्‍यासाठी पुढे आला, याचा मोठा आधार पारनेरच्‍या जनतेला मिळाला असल्‍याचे खा.विखे पाटील म्‍हणाले.    तालुक्‍यात काय चालले आहे हे सर्वांना माहीती आहे, अन्‍याय करणा-या घटना सातत्‍याने घडत आहेत. पण एक गोष्‍ट लक्षात ठेवा या शहराच्‍या पाणी योजनेसाठी येणा-या काळात आपल्‍याला काम करायचे आहे. शहराची पाणी योजना पुर्ण करण्‍याचा शब्‍द मी देत असून, मी जो शब्‍द देतो तो पुर्णच करतो अशी ग्‍वाही त्‍यांनी देतानाच, सर्व युवकांनी संयमाने राजकारण करावे, युवकांचे भविष्‍य खुप महत्‍वाचे आहे. त्‍यांच्‍यासाठी आपल्‍याला आपल्‍याला काम करायचे आहे.   रोजगाराची संधी निर्माण करणे हेच आपले उदिष्‍ट असून, जिल्‍ह्याच्‍या औद्योगिक आणि पर्यटन विकासातून रोजगारची निर्मिती करण्‍याचा आराखडा तयार करण्‍यात आला असून, व्‍यक्तिगत टिका करण्‍यापेक्षा विकासाच्‍या बाबींवर निवडणूकीत चर्चा होण्‍याची आवश्‍यकता आहे. मतदार संघातील जनता सुज्ञ असून, विकासाच्‍या  आणि विचारांच्‍या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्‍याची परंपरा या निवडणूकीतही कायम राहील अशी अपेक्षा त्‍यांनी व्‍यकत केली.

Sujay Vikhe : जो रामाचा नाही तो कोणाच्‍याही कामाचा नाही: सुजय विखे Read More »

Sujay Vikhe News: जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : डॉ. विखे पाटील

Sujay Vikhe News:  मागील पाच वर्षात केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून भरपुर निधी मिळाला असून जिल्ह्याच्या विकासासाठी कधीही निधी कमी पडू देणार नाही. अशी ग्वाही महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. नगर येथील देहरे गावातील प्रचारसभेत ते बोलत होते.  सुजय विखे पाटील आणि जिल्ह्यात आणलेला निधी आमि त्यातून झालेल्या यांनी विकास कामांच्या जोरावर मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. डॉ. विखे पाटील यांच्यासह या बैठकीला जिल्हाबॅंकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले, देहरे गावच्या सरपंच नंदाताई भगत, ऱभाजी सुळ, अंबादास काळे, रमेश काळे, केशवराव अडसुरे,सुनिल जाधव, संजय बाचकर व इतर प्रमुख स्थानिक नेते उपस्थित होते.    सुजय विखे पाटील म्हणाले की, विकास हाच माझा अजेंडा असून त्यासाठी मी सदैव कटीबद्ध आहे. मागील पाच वर्षात मी केलेल्या कामांचा आढावा घ्या, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची जिल्ह्यात झालेली प्रभावी अंमलबजावणी ही आपल्या जमेची बाजू असून शेवटच्या लाभार्थांपर्यंत योजनेचा लाभ पोहचला आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. जिल्ह्यात लवकरच तीन नव्या एमआयडीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. मोठ मोठे उद्योग जिल्ह्यात येणार आहे. त्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी माझ्याकडे ध्येय आणि धोरणे आहेत. यामुळे येणाऱ्या काळात जिल्ह्यातील प्रमुख प्रश्नांची यादी तयार असून त्यांना मार्गी लावण्यासाठी आपण अविरत प्रतत्न करू असे विखे पाटील यांनी सांगितले.  आपल्या विकास कामांची माहिती देत असताना त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वनेता म्हणुन गौरव करत. मागील दोन दशकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सर्वाधिक कल्याणकारी योजना राबविल्या. देशाच्या आर्थिक धोरणाला चालना दिली, आंतरराष्ट्रीय संबंध निर्माण करत देशाला जगात किर्ती मिळवून दिली. त्यामुळे देशात केवळ मोदीपर्वाचीच हवा असून पुन्हा एकदा त्यांच्या रुपाने एक मजबूत नेतृत्व देशाला मिळणार आहे. यामुळे विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी पंतप्रधान मोदींना साथ द्या असे आवाहन सुद्धा त्यांनी मतदारांना केले आहे.  सुजय विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की, निवडणुकीला कमी दिवस राहिले असल्याने विरोधक खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करणार आहेत. बिनबुडाचे आणि खोटे आरोप करतील. त्यांनी तुम्ही कोणतेही प्रतिउत्तर न देता केवळ आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्या विकास कामांची माहिती लोकांपर्यंत पोहचवा. विजय केवळ आपलाच आहे. त्यात फक्त आपले मताधिक्य कसे वाढेल यावर भर द्या असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना देत त्यांच्यात उर्जा भरली.

Sujay Vikhe News: जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : डॉ. विखे पाटील Read More »

Ahmednagar News: विकासासाठी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या सोबत या : अॅड अभय आगरकर

Ahmednagar News: जिल्ह्याच्या विकासासाठी लोकांनी डॉ. सुजय विखे पाटील यांच्या सोबत यावे असे आवाहन अहिल्यानगरचे भाजप शहर जिल्हा अध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांनी केले आहे. ते नगर येथील प्रचार सभेत बोलत होते. नगर जिल्ह्यात मागील १५ वर्षापासून प्रलंबित असेलेला उड्डाणपुलाचा विषय खासदार सुजय विखे पाटील यांनी मार्गी लावला. त्यामुळे त्यांच्याकडे जिल्ह्याच्या विकासाचे उद्दिष्ट स्पष्ट असून त्यांच्या माध्यमातूनच जिल्हा विकसित होऊ शकतो असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.  लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली असून त्यांनी लोकांच्या गाठीभेटी वाढविल्या आहेत. नगर मध्ये प्रचारासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार सुजय विखे यांचासह अनिल शिंदे, सचिन जाधव, दिलीप सातपूते, भैया गंधे, बाळासाहेब वाकडे, सचिन पारखी, प्रशांत मुथा, महेश नामदे, उदय कारळे, करण कराळे, मा. नगरसेविका शिंदे, संपत नलावडे, बाळासाबेह गायकवाड, नितीन शेलार, अशोक गायकवाड, प्रिया जानवे, सविता कोटा व इतर महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.  यावेळी नागरिकांना संबोधित करताना आगरकर म्हणाले की, विखे पाटील कुटुंबांची नाळ जिल्ह्याशी जोडली आहे. मागील ५० वर्षाच्या काळात विखे पाटील कुटुंबांनी जिल्ह्याच्या विकासात भरीव योगदान दिले आहे. यामुळे त्यांच्या चौथ्या पिढीला लोकांनी साथ मिळत आहे. डॉ. सुजय विखे पाटील हे तरूण असून उच्च शिक्षित आहेत. त्याच्याकडे जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा तयार आहे. मागील पाच वर्षात त्यांच्या मार्फत जिल्ह्यात रस्त्यांचे जाळे उभे राहिले, तरूणांना रोजगार मिळावा म्हणुन तीन एमआयडीसीची मुहुर्तमेढ रोवली आहे. बचत गटांच्या मार्फत महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. तर राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या मार्फत जेष्ठ नागरिकांना सहकार्य केले आहे. तसेच जिल्ह्यात सर्वाधिक दुध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळवुन देण्याचे काम त्यांनी केले आहे. यामुळे जिल्ह्यात विकास हवा असेल तर खा. सुजय विखे पाटील हे सर्वोत्तम प्रर्याय आहेत. असे आगरकर म्हणाले. लोकांनी मतदान करताना आपला नेता कसा असावा याचा विचार करावा, जिल्ह्यातील सुसंस्कृत राजकारणासाठी विखे परिवार ओळखला जातो. आणि सुजय विखे हे केवळ आपल्या विकास कामाच्या जोरावर मतदान मागत आहेत.   देशामध्ये गेल्या १० वर्षामध्ये देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी दाखविलेले विकसित भारताचे स्वप्न पुर्ण करायचे असेल तर खा. सुयज विखे पाटील यांना मतदान केले पाहिजेत. आपल्याला जो मताचा संविधानिक अधिकार मिळाला आहे  त्याचा योग्य वापर करा.  आणि राष्ट्रहीताचा वापर करणाऱ्या सरकारच्या मागे उभे रहा असे आवाहन अॅड. अभय आगरकर यांनी केले आहे.

Ahmednagar News: विकासासाठी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या सोबत या : अॅड अभय आगरकर Read More »

Maharashtra News: पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्माण करणार : खा. सुजय विखे

Maharashtra News:  अहमदनगर  जिल्हा  ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा आहे.  ऐतिहासिक, सांस्कृतिक,  आणि धार्मिक स्थळांची परंपरा पर्यटन विकासाच्या माध्यमातून विकसित करून रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी आपण निश्चित पाठपुरावा करू आशी ग्वाही महायुतीचे उमेदवार खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी दिली. डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. गावोगावी कार्यकर्त्याच्या मेळाव्यातून त्यांनी मतदार संघातील विकासाच्या संकल्पना मांडून देशात भारतीय जनता पक्षाचे सरकार येणार असल्याने जिल्ह्याच्या विकासाला मोठे पाठबळ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी सुजय विखे पाटील यांनी सांगितले की, जिल्ह्यात भव्य किल्ल्यांपासून ते ऐतिहासिक वारसा असलेली तिर्थक्षेत्र आहेत. प्रत्येक तालुका एका तिर्थक्षेत्राची ओळख म्हणून नावलौकीक मिळून आहे. जिल्ह्याचे धार्मिक महत्त्व अधोरेखित होते. जिल्ह्यातील साहसी पर्यटनाला असलेल्या संधी विचारात घेवून जिल्ह्याचा पर्यटन विकासाला गती देण्यासाठी पाठपुरवा करणार असल्याचे डाॅ. विखे म्हणाले.   रेहेकुरी येथेही अभयारण्य घोषित करण्यात आले असून ते काळविटांसाठी राखीव आहे. अशी अनेक स्थळे आहेत जी पर्यटकांना आकर्षित करू शकतात. यामुळे पर्यटन विकास झाल्यास त्याच्या माध्यमातून स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न सुटणार आहे. यामुळे प्रामुख्याने पर्यटन विकास हा आपल्या अजेंड्यावरील प्रमुख विषय राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.  निवडणुकांचा प्रचार दुसऱ्या टप्प्यात असून सुजय विखे पाटील हे आपण केलेल्या विकास कामांच्या जोरावर मतदारांना साथ देण्याचे आवाहन करत आहेत. त्याच बरोबर ही देशाचे नेतृत्व ठरविणारी निवडणुक असून देशात पंतप्रधान नरेंद्र  मोदी याच्या शिवाय पर्याय नसल्याचे सुद्धा त्यांनी यावेळी सांगितले. मागील पाच वर्षात मतदारसंघाच्या विकसासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून विकास काम मार्गी लावण्याचा यशस्वी प्रयत्न केला.युवकांच्या रोजगारा करीता श्रीगोंदा वडगाव गुप्ता येथील जमीन औद्योगिक वसाहती करता देण्याचा निर्णय झाल्याने मोठे उद्योग  मतदार संघात येण्यास तयार झाले असल्याचे खा.विखे यांनी सांगितले.

Maharashtra News: पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्माण करणार : खा. सुजय विखे Read More »

Maharashtra News: चारशे जागांच्या यशात खा. सुजय विखे विखेंच्या नगरचा वाटा – भालसिंग

Maharashtra News:  सरकारच्या योजनांची  गॅरेंटी  देशातील जनतेला आली आहे. देशाने पंतप्रधान मोदींचे नेतृत्व स्विकारले आहे. भाजपाच्या नेतृत्वाखाली पुन्हा तिसऱ्यांदा सत्ता येणार असून अहिल्यानगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचाही समावेश चारशे जागांच्या ऐतिहासिक  विजयात राहील असा विश्वास नगर भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी व्यक्त केला आहे.  नगर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महायुती कडून सुरू असलेल्या प्रचाराची माहीती जिल्हाध्यक्ष भालसिंग यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.  भालसिंग म्हणाले की, मागील १० वर्षाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला जगाच्या केंद्रस्थानी पोहचविले आहे. मोदींच्या नेतृत्वात येणाऱ्या काळात भारत आर्थिक महासत्ता म्हणुन उदयास येईल यात कोणतीही शंका नाही. मोदी सरकारच्या काळात सर्वाधिक लोक कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या यामुळेच देशातील ३० कोटीहून अधिक लोक गरिबीतून बाहेर आले. महिलांना अनेक योजनांच्या मार्फत बळकटी देण्याचे काम मोदी सरकारच्या काळात झाले. त्याच बरोबर आंतरराष्ट्रीय संबंधात सुधारणा झाली. यामुळे मोदींच्या नेतृत्वात भारताची विकसित देशाकडे वाटचाल होत असताना देशाने मोदींवर विश्वास ठेवला आहे लोकसभा निवडणुकीच्या निमिताने मोदीच्या नेतृत्वाखाली झालेले निर्णय मतदारपर्यत पोहचविण्याचे काम प्रचाराच्या माध्यमातून पदाधिकारी कार्यकर्ते करीत असल्याचे सांगितले. खा. डॉ. सुजय विखे यांनी आपल्या खासदारकीच्या कारकिर्दीत केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्फत मोठ्या प्रमाणात निधी आणुन जिल्ह्यात विविध विकासकामे पुर्ण केली आहेत. त्याच  प्रमाणे शासनाच्या विविध योजना शेवटच्या लाभार्थ्यां पर्यंत त्यांनी पोहचविल्या आहेत. केंद्र  आणि राज्य सरकारच्या योजनांची अंमलबजावणी प्रभावी करणारा जिल्हा म्हणून अहील्यानगर प्रथम क्रमांकावर असल्याकडे भालसिंग यांनी माध्यमांचे लक्ष वेधले. राजकारणा पलिकडे जावून आरोग्य शिबीर कोव्हीड संकटात केलेले काम नगर जिल्ह्यातील जनतेते अनुभवले आहे. त्यामुळेच  डॉ. सुजय विखे पाटील लोकप्रिय ठरले  निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने खा.विखे पाटील यांना मिळणारा प्रतिसाद पाहाता पुन्हा एखादा खासदार म्हणुन मोदींच्या टीम मध्ये असणार आहेत. नगरच्या जनतेने विखे यांना निवडून देण्याचा  निर्णय घेतला असल्याचे भालसिंग म्हणाले.

Maharashtra News: चारशे जागांच्या यशात खा. सुजय विखे विखेंच्या नगरचा वाटा – भालसिंग Read More »

Modi Government : डॉ. सुजय विखे पाटील यांनी मोदीपर्वातील कामांची मांडली जंत्री

Modi Government: देशात मोदींची गॅरेंटी सुरू असून पुन्हा एकादा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच होणार आहेत यात आता कोणतीही शंका राहिली नसून तरी कुणाला वाटत असेल मोदीच का? तर मोदीपर्वात झालेल्या कामांची माहिती घ्या, आणि देश कुणाच्या हाती द्यायचा याचा निर्णय करा. असे आवाहन महायुतीचे उमेदवार खा. सुजय विखे पाटील यांनी केले.   लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर माणिकदौंडी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खासदार सुजय विखे पाटील बोलत होते. आमदार मोनिका राजळे, जिल्हाबॅंकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले तालुका अध्यक्ष मृत्यूंजय गर्जे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, संजय बडे, अशोक चोरमले,भिमराव फुंदे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. मेळाव्यापुर्वी खासदार विखे पाटील यांची बैलगाडीतून मिरवणूक काढून कार्यकर्त्यांनी उत्फुर्त स्वागत केले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी खासदार सुजय विखे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला.   सुजय विखे पाटील यांनी सांगितले की, मोदी सरकारचा काळ खुप  प्रभावी आणि आव्हानात्मक होता. तरी  कारभाराचा वेग, सरकारी योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणे, मजबूत पायाभूत सुविधा आणि अनेक दशकांपासून प्रलंबित समस्यांचे निराकरण यांना उच्च प्राधान्य दिले. आज देशात निर्णय घेणारे आणि जबाबदार सरकार आहे. या देशातील सामान्य माणुस, शेतकरी, कामगार, महिला आणि युवा वर्गाला पाठबळ देण्याऱ्या योजनांची अंमलबजावणी यशस्वी झाल्यामुळे देशातील जनतेचा विश्वास हा मोदींजींवर असल्याचे त्यांनी सांगितले.  ही निवडणूक लोकसभेची आहे. त्यामुळे देश कुणाच्या ताब्यात द्यायचा हे ठरविण्यासाठीची ही निवडणूक आहे. भविष्य घडविण्यासाठी मोदींशिवाय पर्याय नाही, ही भाावना देशातील जनतेची झाली आहे. त्यामुळेच ४०० जागा जिंकुण भाजप आणि मित्र पक्षाचे सरकार सत्तेवर येणार असल्याने जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न या सरकार मधुनच सुटू शकतात. यापुर्वीही केंद्र सरकारच्या माध्यमातून जिल्ह्याच्या रस्ते विकासाला मोठा निधी उपलब्ध झाला. भविष्यातही विकासाचे प्रकल्प आपल्याला मार्गी लावायचे आहेत. युवकांच्या रोजगारासाठी काम करायचे आहे. यासाठीच सत्ताधारी पक्षाचा खासदार होणे महत्वाचे आहे. ज्यांची सत्ता येणार नाही. त्यांच्या खोट्या आश्वासनांना भुलू नका असे आवाहन डॉ. विखे पाटील यांनी यावेळी केले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशवासियांची काळजी आहे. ज्याच्याकडे दूरदृष्टी आहे, जी देशाला या आव्हानात्मक काळातून बाहेर काढण्यास सक्षम आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे सुरक्षा कवच आणि आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेनंतर भारत बलवान बनत आहे. आगामी काळात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हा देश स्वावलंबन आणि आर्थिक विकासाच्या नवीन उंची गाठण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. मोदी सरकारच्या काळात देशात ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले. त्यात अनुच्छेद ३७० हटविण्यात आले. नागरिकता संशोधन विधेयक आणण्यात आले. राम मंदिर पुर्ण करण्यात आले. तीन तलाकच्या मुद्यावर धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. देशातील सैन्याला बळ देण्यात आले वायुसेनेत आठ अपाचे लढावू हेलिकॉप्टर सामील झाले. ३६ राफेल विमाने भारतीय सैन्यात दाखल झाली. आयुष्यमान भारत ३ कोटी हून अधीक लोकांना आरोग्य कवच मिळाले. अटल पेंशन २ कोटी हुन अधीक लाभार्थी. प्रधानमंत्री किसान योजना, जनधन योजना,प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, श्रमिक कल्याण योजना, आत्मनिर्भर भारत, स्टार्टअप इंडिया अशा अनेक योजनांमुळे भारत विकसीत देशाकडे वाटचाल करत आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली २०४७ पर्यंत जगात भारत महासत्ता म्हणुन उदयास येईल. यामुळे मोदीशिवाय देशात कोणताही पर्याय नाही.  हे आता माध्यमांच्या सर्वेक्षणातून सिद्ध झाल्याचे खा. विखे पाटील यांनी सांगितले.

Modi Government : डॉ. सुजय विखे पाटील यांनी मोदीपर्वातील कामांची मांडली जंत्री Read More »

Ramnavmi 2024 :  देशात मोदी नसते तर राम मंदीर झालेच नसते:  खा विखे पाटील

Ramnavmi 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात राम मंदिराची उभारणी झाली, त्यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमीपुजन झाले आणि प्राणप्रतिष्ठा सुद्धा त्यांच्याच हस्ते पार पडली. जर पंतप्रधान मोदी नसते तर देशाला राम मंदीराची अजूनही वाट पहावी लागली असती. मोदी नसते तर प्रभू रामचंद्राचे मंदिर झालेच नसते. असे मत नगरचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले. रामनवमी निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.  राम नवमीच्या निमित्ताने देशात प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. याच पार्श्वभुमीवर नगर जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गल्लोगल्लीत रामनामाचा जयकारा सुरू होता. खा. डॉ. सजय विखे पाटील हे कर्जत तालुक्यातील भांभोरा येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून त्यांनी प्रभू रामचंद्राचे दर्शन घेऊन त्यांचे आशिर्वाद घेतले. यावेळी त्यांच्या सोबत आमदार राम शिंदे आणि इतर प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.  या प्रसंगी रामभक्तांना संबोधित करताना खा. विखे म्हणाले की, देशात राममंदिरासाठी ५०० वर्षांचा संघर्ष झाला. या संघर्षात अनेकांचे जीव गेले. मात्र केंद्रात मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेत आल्यानंतर राममंदिर पुर्ण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला होता. यासाठी न्यायालयातील लढाई सरकारने यशस्वी केली. यामुळे अयोध्येत राम मंदिर उभे राहण्याचे स्वप्न पूर्णत्वास गेले.   लोकसभा मतदार संघात मागील पाच वर्षात केलेल्या विकासकामांवर आपण नागरिकांकडे समर्थन मागत आहोत. या भागातील प्रश्नांसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून निधीची उपलब्धता केली. आपल्याकडे केलेली विकासकामे सांगण्याचे काम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील १० वर्षात घेतलेल्या निर्णयांचे लोककल्याणकारी योजनांची माहिती आहे. बुथवरील प्रत्येक कार्यकर्त्याने लाभार्थी आणि मदतारांपर्यंत पोहचवायची आहे. नकारात्मक गोष्टीना थारा देऊ नका असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.   विरोधी उमेवाराकडे सांगण्यासाठी कोणतेही काम नाही, ते त्यांच्या तालूक्याचा विकास करू शकले नाहीत. लोकसभा मतदार संघाचा विकास कसा करणार? विश्वासघात करून त्यांचे राजकारण सुरू आहे. केवळ दहशत आणि दादागिरी करून सुरू असलेल्या राजकारणाला जनता कधीही स्विकारणार नाही. या भागातील जनता सुज्ञ आणि विचारी आहे. विकासाच्या कामावर शिक्कामोर्तब करून लोकसभा मतदार संघातील जनता महायुतीच्या पाठीशी खंभीर उभी राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Ramnavmi 2024 :  देशात मोदी नसते तर राम मंदीर झालेच नसते:  खा विखे पाटील Read More »

BJP Manifesto: भाजपाचे संकल्‍प पत्र देशातील सर्वसामान्‍य नागरीक, महिला, युवक आणि शेतकरी यांना समर्पित

BJP Manifesto: भाजपाचे संकल्‍प पत्र देशातील सर्वसामान्‍य नागरीक, महिला, युवक आणि शेतकरी यांना समर्पित झाले असून, संकल्‍प पत्रातून जाहीर करण्‍यात आलेल्‍या प्रत्‍येक योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची गॅरंटी आहे. ‘सबका साथ सबका विकास’ हा भाव भाजपाच्‍या संकल्‍प पत्राचा आत्‍मा असल्‍याचा विश्‍वास महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्‍यक्‍त केला. लोकसभा निवडणूकीच्‍या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्‍या  वतीने प्रकाशित करण्‍यात आलेल्‍या संकल्‍प पत्राची माहीती मंत्री विखे पाटील यांनी माध्‍यमांना दिली. भाजपाच्‍या संकल्‍प पत्रासाठी देशातील लोकांच्‍या काय अपेक्षा आहेत, यासाठी सुचना पाठविण्‍याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्‍यांच्‍या आवाहानाला प्रतिसाद देवून, संपुर्ण देशातून १६ लाख सुचना यासाठी प्राप्‍त झाल्‍या. नगर जिल्‍ह्यातूनही १० हजार सुचना संकल्‍प पत्रासाठी पाठविण्‍यात आल्‍याचे ना.विखे पाटील म्‍हणाले. नागरीकांच्‍या सुचनांमधून तयार झालेल्‍या या संकल्‍प पत्रात भारताच्‍या अंतरराष्‍ट्रीय संबधापासून ते देशाच्‍या सुरक्षा व्‍यवस्‍थेपर्यंत. समृध्‍द भारत, सुशासन, स्‍वस्‍थ भारत, शिक्षण, क्रिडा अशा सर्वच क्षेत्रांच्‍या विकासाबरोबरच इनोव्‍हेशन, टेक्‍नॉलॉजी आणि पर्यावरण यांना विशेष प्राधान्‍य देण्‍यात आल्‍याचे सांगून ना.विखे पाटील म्‍हणाले की, २०४७ सालापर्यंत विकसीत भारत निर्माण करण्‍याचे उदिष्‍ठ पुर्ण करण्‍यासाठी युवाशक्‍ती, नारीशक्‍ती, शेतकरी आणि गरीब यांना सशक्‍त करण्‍याचा संकल्‍प करण्‍यात आला असून, रोजगार निर्मितीवर लक्ष केंद्रीत करतानाच स्‍टार्टअप योजनेला प्रोत्‍साहन देण्‍याचा प्रयत्‍न  केला जाणार आहे. भारताला प्रक्रीया उद्योगाचे हब बनवून प्रक्रीया उद्योग ग्रामीण अर्थकारणाचे ग्रोथ इंजिन ठरेल असे उदिष्‍ठ या संकल्‍प पत्रातून ठेवण्‍यात आले असून, संस्‍कृती आणि परंपरेची जोपासणा करतनाच देशातील पर्यटन विकासाला गती देण्‍याचा मानस संकल्‍प पत्रातून व्‍यकत करतानाच मागील दहा वर्ष देशातील महिलांना संधीचे होते. आता भविष्‍यातील पाच वर्षे हे महिलांच्‍या भागीदारीचे असतील. याकरीता नारीशक्‍ती वंदना अधिनियम पंतप्रधान नरेंद्र मादी यांच्‍या  सरकारची मोठी उपलब्‍धी ठरली असल्‍याचे विखे पाटील म्‍हणाले .   भाजपाच्‍या संकल्‍प पत्राच्‍या अनुषंगानेच लोकसभा मतदार संघांचा वचननामाही लवकरच प्रकाशित करण्‍यात येणार असून,  जिल्‍ह्यात रोजगार निर्मिती, तिर्थक्षेत्र पर्यटन तसेच जिल्‍ह्यातील प्रलंबित  पाणी योजनांच्‍या सोडवणूकीसाठी प्राधान्‍य देण्‍यात येणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. याप्रसंगी भाजपाचे शहर जिल्‍हा ध्‍यक्ष अभय आगरकर, शिवसेनेचे जिल्‍हा प्रमुख बाबुशेठ टायरवाले, भाजपाचे सरचिटणीस नितीन दिनकर, धनंजय जाधव, निखील वारे आदि याप्रसंगी उपस्थित होते.

BJP Manifesto: भाजपाचे संकल्‍प पत्र देशातील सर्वसामान्‍य नागरीक, महिला, युवक आणि शेतकरी यांना समर्पित Read More »