DNA मराठी

Maharashtra Politics

Maharashtra Election Result : मतमोजणीसाठी जिल्ह्यात 1 हजार 259 कर्मचाऱ्यांची नियुक्ती, सकाळी 8 वाजता होणार सुरुवात

Maharashtra Election Result : जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात शनिवार २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता सुरूवात होणार असून मतमोजणीसाठी १ हजार २५९ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळी टपाली मतदानाची मतमोजणी सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासाने ईव्हीएम यंत्राची मतमोजणी सुरू होईल, अशी माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. मतमोजणीसाठी एकूण उपलब्ध १ हजार ३८५ मनुष्यबळापैकी १ हजार २५९ अधिकारी-कर्मचारी प्रत्यक्षात मतमोजणी कामासाठी नियुक्त असणार आहेत. या मनुष्यबळाची पहिली सरमिसळ १६ नोव्हेंबर, दुसरी २१ नोव्हेंबर रोजी झाली असून तिसरी सरमिसळ मतमोजणीच्या दिवशी पहाटे ५ वाजता करण्यात येईल. अकोले विधानसभा मतदार संघासाठी मिटींग हॉल तहसील कार्यालय नवीन इमारत ता. अकोले, संगमनेर – सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात क्रीडा संकुल बॅडमिंटन हॉल, ता. संगमनेर, शिर्डी – प्रशासकीय इमारत, तळमजला, तहसील कार्यालय राहाता, कोपरगाव – सेवा निकेतन कॉन्व्हेंट स्कूल, तळमजला, ता. कोपरगाव, श्रीरामपूर – मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय, पहिला मजला, ता. श्रीरामपूर येथे मतमोजणी होईल. नेवासा मतदारसंघासाठी न्यू गव्हर्नमेंट ग्रेन गोडाऊन, उत्तर बाजू खोली क्र.२ संथ मेरीस् स्कुल रोड, मुंकुदपुरा नेवासा फाटा, ता.नेवासा, शेवगाव – शासकीय इमारत तळमजला तहसील कार्यालय शेवगाव, राहुरी – लोकनेते रामदास पाटील धुमाळ न्यु आर्टस सायन्स ॲण्ड कॉमर्स कॉलेज राहुरी इनडोअर स्पोर्ट्स हॉल राहुरी, पारनेर – औद्यागिक प्रशिक्षण संस्था वर्कशॉप पारनेर, अहमदनगर शहर – महाराष्ट्र स्टेट वेअर हाऊस कॉर्पोरेशन गोडाऊन नं.६ एम.आय. डी.सी. नागापूर अहिल्यानगर, श्रीगोंदा – गव्हर्नमेंट ग्रेन गोडाऊन नं.३, पेडगाव रोड श्रीगोंदा आणि कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघासाठी बॅडमिंटन हॉल, दादा पाटील महाविद्यालय, कर्जत येथे मतमोजणी होईल. अकोले मतदारसंघातील ३०७ मतदान केंद्रांसाठी मतमोजणीच्या २२ फेऱ्या होतील. संगमनेर २८८ आणि २१ , शिर्डी २७१ आणि २०, कोपरगाव २७२ आणि २०, श्रीरामपूर ३११ आणि २३, नेवासा २७६ आणि २०, शेवगाव ३६८ आणि २७, राहुरी ३०८ आणि २२, पारनेर ३६६ आणि २७, अहमदनगर शहर २९७ आणि २२, श्रीगोंदा ३४५ आणि २५, तर कर्जत जामखेड मतदारसंघातील ३५६ मतदान केंद्रांसाठी मतमोजणीच्या २६ फेऱ्या होतील. प्रत्येक मतदारसंघात ईव्हीएम मतमोजणीसाठी १४ टेबल लावण्यात येणार असून प्रत्येक टेबलसाठी त्यासाठी प्रत्येकी १ पर्यवेक्षक, सहाय्यक आणि सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात येईल. टपाली मतदानासाठी अकोले मतदारसंघात ७ टेबल, संगमनेर आणि कर्जत जामखेड ९, शिर्डी आणि कोपरगाव ४, नेवासा आणि अहमदनगर शहर ६, श्रीरामपूर ५, शेवगाव १०, पारनेर १२, श्रीगोंदा मतदारसंघात ११ टेबलवर मतमोजणी होईल. प्रत्येक टेबलवर १ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, १ पर्यवेक्षक, २ सहाय्यक आणि १ सूक्ष्म निरीक्षक असतील. ईटीपीबीएस स्कॅनिंगसाठी अकोले, शिर्डी, कोपरगाव आणि श्रीरामपूर मतदारसंघात २ टेबल, संगमनेर, पारनेर अणि श्रीगोंदा मतदारसंघात प्रत्येकी ५, नेवासा, अहमदनगर शहर आणि कर्जत जामखेड मतदरसंघात प्रत्येकी ३, शेवगाव ४ आणि राहुरी मतदारसंघात ६ टेबलवर व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक टेबलवर १ पर्यवेक्षक आणि १ सहाय्यकांची नियुक्ती करण्यात येईल. याशिवाय मतमोजणीच्या वेळी प्रत्येक निवडणूक मतमोजणी निरीक्षकांच्या मदतील दोन सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणीची आकडेवारी तपासण्यासाठी हे सूक्ष्म निरीक्षक सहकार्य करतील.

Maharashtra Election Result : मतमोजणीसाठी जिल्ह्यात 1 हजार 259 कर्मचाऱ्यांची नियुक्ती, सकाळी 8 वाजता होणार सुरुवात Read More »

Prakash Ambedkar : महायुती की मविआ, वंचित कोणाबरोबर जाणार? प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलं

Prakash Ambedkar : राज्यात विधानसभेसाठी मतदाप्रक्रिया पार पडली असून 23 नोव्हेंबर रोजी मत मोजणी होणार आहे. मात्र त्यापूर्वी समोर आलेल्या अनेक एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती मध्ये ‘काटे की टक्कर’ असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे सस्ता स्थापन करण्यासाठी इतर पक्षांची भूमिका महत्वाची ठरणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे. यातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत आम्ही आम्हाला जर युतीला पाठिंबा देण्यासाठी संख्याबळ मिळाले, तर आम्ही सरकार स्थापन करू शकणाऱ्याच्या सोबत राहणे पसंद करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी महायुती की महाविकास आघाडी कोणाला समर्थन देण्यात याकडे आता सर्वांचे लक्ष लागू नये. विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने भाजप विरोधात प्रचार केला होता त्यामुळे निकालानंतर वंचित बहुजन आघाडी महायुतीमध्ये प्रवेश करणार का? याची देखील चर्चा आता सुरू झाली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, जर उद्या वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाला किंवा युतीला पाठिंबा देण्यासाठी संख्याबळ मिळाले, तर आम्ही सरकार स्थापन करू शकणाऱ्याच्या सोबत राहणे पसंद करणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत म्हटले आहे.

Prakash Ambedkar : महायुती की मविआ, वंचित कोणाबरोबर जाणार? प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलं Read More »

Monika Rajale : विरोधकांच्या खोट्या प्रचाराला नागरिक थारा देणार नाही – मोनिका राजळे 

Monika Rajale : ताजनापुर योजनेवर चर्चा सुरु केली की समजून जायचे निवडणूक आली आहे. निवडणूक प्रचारात गावासाठी काय दिले, काय करणार हे न सांगता, जातीपातीचे राजकारण सुरु करायचे. त्यांच्याकडे विकासकामांचे मुद्दे नसल्याने, विकासाच्या मुद्द्याला बगल द्यायची, दहा वर्षात तालुका मागे पडला म्हणायचा, जर तुम्ही दहा वर्षात मतदारसंघात फिरले असते तर विकास कामे दिसली असती. तुमच्या खोट्या प्रचाराला नागरिक थारा देणार नाही असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले आहे.    आमदार राजळे यांनी तालुक्यातील ठाकूर निमगाव, कुरुडगाव रावतळे, वरुर, भगुर, आव्हाणे, दिंडेवाडी, बऱ्हाणपुर, मळेगाव, भातकुडगाव, आखतवाडे, आपेगाव, गरडवाडी, ढोर जळगाव, सामानगाव, लोळेगाव आदी गावातील नागरिकांशी संवाद साधला. वरुर येथे झालेल्या कार्यक्रमात दिनकर अंचवले महाराज, भिमराव फुंदे, सचिन म्हस्के, भानुदास सोनटक्के, मारुती लव्हाट, विठ्ठल झिरपे, केशव म्हस्के, गणपत शिंदे, संजय देवडकर, संजय मोरे, बाबासाहेब धायतडक, प्रकाश म्हस्के, भागवत झिरपे, भाऊसाहेब वावरे, किसन म्हस्के, संजय मोरे, दीपक भुसारी, बापुनाना पिसोटे, रवींद्र वायकर, आशाताई गरड, मारुती खांबट, गणेश म्हस्के, अंबिका लव्हाट, अजिंक्य लव्हाट, आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे बोलतांना राजळे म्हणाल्या, कारखान्याला मदत हवी होती, त्यावेळी अजितदादांच्या गटात आले. दिडशे कोटी रुपये निधी मिळाला, लगेच पलटी मारली. त्यांनी देखील यापूर्वी तालुक्याचे प्रतिनिधित्व केले, त्यांच्या कार्यकाळात बसस्थानक, शहर पाणी योजना, ताजनापुर योजना, रस्ते, आदी प्रश्न होते. इतक्या वर्षापासून महिलांचे पाण्यासाठीचे सुरु असलेले हाल त्यांना दिसले नाहीत. मी महिला असल्याने त्यांचे दुःख वेदना मला जाणवल्या त्यामुळे प्राधान्याने पाणी प्रश्नावर पाठपुरावा करुन पाणी प्रश्न मार्गी लावला. बसस्थानक, विविध रस्त्यांचे कामे मार्गी लावली. त्यावेळी त्यांना हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कोणीही अडवले नव्हते. प्रत्येक गावात किमान एक कोटी निधी देऊन विविध प्रश्न मार्गी लावले. क्वचित एखाद्या गावाला कोटी पेक्षा कमी निधी मिळाला असेल. पण भेदभाव न करता जनतेचे हित लक्षात घेऊन कामे केल्याचे आमदार मोनिका राजळे म्हणाल्या.

Monika Rajale : विरोधकांच्या खोट्या प्रचाराला नागरिक थारा देणार नाही – मोनिका राजळे  Read More »

Ahmednagar Election: नगरकरांनो, मतदानाचा टक्का वाढवा, सार्वजनिक सुट्टी जाहीर

Ahmednagar Election: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी जिल्ह्यात सर्व विधानसभा मतदारसंघात बुधवार २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. त्या दिवशी मतदारांना मतदान करता यावे यासाठी राज्य शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. विधानसभा निवडणुकीत कामगारांना मतदान करता यावे यासाठी निवडणूक क्षेत्रातील मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी. ही सुट्टी राज्य शासन, केंद्र शासन व खाजगी कंपन्या या मधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इ. आस्थापनांना लागू राहील. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी-कर्मचारी इत्यादीना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसल्यास मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत कामगारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील. सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींच्या मालकांनी किंवा व्यवस्थापनाने वरील आदेशाचे अनुपालन होईल याची खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, त्यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल. याबाबत तक्रार असल्यास सहायक कामगार आयुक्त कार्यालय, मुलजी निवास, डॉ. चोंभे हॉस्पिटल, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर (दूरध्वनी क्र. ०२४१-२४५१८५२) येथे करावी, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त रे.मु.भिसले यांनी केले आहे.

Ahmednagar Election: नगरकरांनो, मतदानाचा टक्का वाढवा, सार्वजनिक सुट्टी जाहीर Read More »

Congress First Candidate List : काँग्रेसकडून पहिली यादी जाहीर, थोरात संगमनेर तर पृथ्वीराज चव्हाण कराडमधून निवडणुकीच्या रिंगणात

Congress First Candidate List : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसने आपले सर्व ज्येष्ठ नेत्यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघातून बाळासाहेब थोरात यांना तर कराड दक्षिणमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आणि साकोली विधानसभा मतदारसंघातून प्रदेशाध्यक्ष नाना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातून विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याच बरोबर नागपूर पश्चिम मधून विकास ठाकरे काँग्रेस पक्षाचे उमेदवार असणार आहे. तर धीरज देशमुख लातूर ग्रामीणमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. राज्यात 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार असून 23 नोव्हेंबर रोजी मत मोजणी होणार आहे. काँग्रेसकडून पुढील एक-दोन दिवसात आपली दुसरी यादी जाहिर करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Congress First Candidate List : काँग्रेसकडून पहिली यादी जाहीर, थोरात संगमनेर तर पृथ्वीराज चव्हाण कराडमधून निवडणुकीच्या रिंगणात Read More »

Pune News : पुण्यात धक्कादायक घटना, पाण्याची टाकी कोसळूली, 4 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू

Pune News : पिंपरी चिंचवडमधील भोसरी परिसरात पाण्याची टाकी कोसळून 4 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. भोसरीतील सदगुरुनगर या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे. सध्या या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आले असून अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या ठिकाणी लेबर कॅम्पमधील काही कामगार राहत होते. बिल्डरने तकलादू पद्धतीने ही पाण्याची टाकी उभारली होती, असा आरोपही नागरिकांनी केला आहे. आज सकाळी सुमारे 7 च्या दरम्यान ही दुर्घटना घडली आहे. टाकीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आतापर्यंत चार कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर काही कामगार जखमी झाले. या दुर्घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवडमधील अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या हा ढिगारा हटवून जखमींना बाहेर काढले जात आहे. तसेच सध्या जखमींना रुग्णालयात दाखल केले जात आहे.मात्र या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांचे मृतदेह काढण्यास नातेवाईकांडून विरोध दर्शवला जात आहे.

Pune News : पुण्यात धक्कादायक घटना, पाण्याची टाकी कोसळूली, 4 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू Read More »

Ahmednagar Election: जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडून नेवासा स्ट्राँगरूमची पाहणी

Ahmednagar Election: जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ व जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी रविवारी नेवासा येथील स्ट्राँगरूमला भेट देऊन तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला. ईव्हीएम यंत्राचे वाटप व मतमोजणीच्या दिवशी  स्ट्राँगरूममधील जागेचे नियोजन याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. ईव्हीएम सुरक्षेच्यादृष्टीने स्ट्राँगरूमचे ठिकाण व परिसराची पोलीस अधीक्षकांनी पाहणी केली. नेवासा तहसील कार्यालयात उभारण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील विविध कक्षांनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी भेट देऊन आढावा घेतला. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी सुरक्षेच्या आढावा घेऊन कामकाजाची पाहणी केली तसेच निवडणूक आचारसंहितेच्या अंमलबजावणीच्यादृष्टीने सूचना दिल्या. सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. याप्रसंगी नेवासा विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी अरूण उंडे, तहसीलदार डॉ.संजय बिरादार, नेवासा पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, अपर तहसीलदार पाटील, नगरपंचायत मुख्याधिकारी सोनाली ‌म्हात्रे आदी उपस्थित होते.

Ahmednagar Election: जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडून नेवासा स्ट्राँगरूमची पाहणी Read More »

Maharashtra Election: बिगुल वाजणार, आज विधानसभेसाठी जाहीर होणार निवडणुकीच्या तारखा

Maharashtra Election: केंद्रीय निवडणूक आयोग आज दुपारी 3.30 वाजता महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करणार आहे.  महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबरला तर झारखंड विधानसभेचा कार्यकाळ पुढील वर्षी 5 जानेवारीला संपणार आहे. नुकतेच जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत. आता निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुका घेण्याची तयारी सुरू केली आहे. दोन्ही राज्यात सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत. महाराष्ट्राच्या निवडणुका महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबरला संपत आहे. महाराष्ट्रातील शेवटच्या विधानसभा निवडणुका ऑक्टोबर 2019 मध्ये झाल्या होत्या. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने सरकार स्थापनेसाठी बहुमत मिळविले, मात्र अंतर्गत संघर्षामुळे शिवसेनेने युती सोडली. यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडीची नवी युती केली. शिवसेना नेते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यामुळे महाविकास आघाडीने राज्यात सरकार स्थापन केले होते. परंतु 2022 च्या महाराष्ट्रातील राजकीय संकटानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाच्या 40 आमदारांसह भाजपसोबत सरकार स्थापन केले आणि ते राज्याचे नवे मुख्यमंत्री बनले. 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजित पवार गटही सरकारमध्ये सामील झाला. झारखंड निवडणूक पाचव्या झारखंड विधानसभेचा कार्यकाळ 5 जानेवारी 2025 रोजी संपणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुका नोव्हेंबर-डिसेंबर 2019 मध्ये झाल्या होत्या. झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांच्या युतीने हेमंत सोरेन मुख्यमंत्री बनून राज्य सरकार स्थापन केले. यावेळीही ही युती एकत्र असून सर्व 81 जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखालील ECI शिष्टमंडळाने 24 सप्टेंबर रोजी रांची येथे झारखंडमधील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी निवडणूक तयारीचा सखोल आढावा घेतला, केंद्र आणि राज्य संस्थांना निधीचा वापर थांबविण्याचे निर्देश दिले. 2019 च्या निवडणुकीत झारखंडमध्ये पाच टप्प्यात मतदान झाले, तर महाराष्ट्रात फक्त एकाच टप्प्यात मतदान झाले.

Maharashtra Election: बिगुल वाजणार, आज विधानसभेसाठी जाहीर होणार निवडणुकीच्या तारखा Read More »

Maharashtra Election: भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा पाथर्डीत भव्य निर्धार मेळावा…!

Maharashtra Election:  शेवगांव व पाथर्डी तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचा निर्धार मेळावा  पाथर्डी येथील विजय लॉन्स मंगल कार्यालय या ठिकाणी पार पडला.  भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अरुण मुंढे तसेच ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष गोकुळ दौंड यांच्या नेतत्वाखाली आमदार मोनिका राजळे यांना डावलुन हा निर्धार मेळावा घेऊन अरुण मुंडे व गोकुळ दौंड यांनी आमदार मोनिका राजळे यांच्या विरोधात शेवगांव-पाथर्डी विधानसभेसाठी दंड थोपटले असुन मेळाव्यात अरुण मुंढे किंवा गोकुळ दौंड या दोघांपैकी कोणी एकाला पक्षाने विधानसभेची उमेदवारी द्यावी अशा मागणीने जोर धरला आहे. विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना पक्षश्रेष्ठींनी पुन्हा उमेदवारी देऊ नये अन्यथा शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे पदाधिकारी सामुहिक राजीनामे देणार असल्याचे वक्तव्य यावेळी अनेकांनी बोलताना केले. यावेळी भाजपचे शेवगांव तालुकाध्यक्ष तुषार वैद्य, जय शिवसंग्राम पक्षाचे जिल्हाध्यक्ष नवनाथराव इसारवाडे, सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर केदार, पंचायत समितीच्या सभापती सुनीता डौंड, भाजपाच्या महिला तालुकाध्यक्ष शितल केदार, आत्माराम कुंडकर, भाऊ वाघमारे, बाळासाहेब सोनवने, बाळासाहेब डोंगरे, आत्माराम कुंडकर, बाळासाहेब कोळगे सह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Maharashtra Election: भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा पाथर्डीत भव्य निर्धार मेळावा…! Read More »

Maharashtra Election : परवेज अशरफी निवडणुकीच्या रिंगणात, पक्षाकडे उमेदवारीची मागणी

Maharashtra Election :  राज्यात येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी तसेच पक्षांनी देखील जोरदार तयारी सुरू केली आहे.   तर दुसरीकडे एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी इच्छुक उमेदवार यांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून अर्ज भरण्यासाठी औरंगाबाद येथे इच्छुक उमेदवारांची गर्दी होत आहे.  अहमदनगर जिल्ह्यातून ही इच्छुक उमेदवारांनी आपले नामांकन पक्षाकडे सादर केले. त्यात अहमदनगर शहरातून एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी स्वतःचा उमेदवारी अर्ज पक्षाकडे दाखल केला आहे. तसेच नेवासा आणि राहुरी विधानसभा येथून ही पक्षाकडे अर्ज दाखल करण्यात आले आहे. परवेज अशरफी यांनी लोकसभेसाठी देखील अहमदनगर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र पक्षाने दिलेल्या आदेशानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. नुकतेच पैगंबर साहेब यांच्याविरोधात अपशब्द वापरणारे आणि भाजप नितेश राणे यांच्यावर कारवाईची मागणी साठी औरंगाबाद येथून मुंबई रॅली यशस्वी झाल्याने अहमदनगरच्या वतीने इम्तियाज जलील यांचा सत्कार करण्यात आले. यावेळी डॉ परवेज अशरफी, ताहर शेख, ऍड सलीम सय्यद, अमीर खान, इम्रान शेख, सफवान कुरेशी, बिलाल शेख, इस्माईल शेख आदी उपस्थित होते. अर्ज दाखल केल्यावर डॉ परवेज अशरफी यांनी पत्रकारांशी बोलतांना संगितले की अहमदनगर जिल्ह्यातून सर्वच 12 विधानसभेतील इच्छुक पक्षाकडे दावेदारी अर्ज दाखल करणार आहे. लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने महाविकस आघाडीला भरभरून मतदान केले. परंतु मविआ ने लोकसभेत एकही उमेदवार मुस्लिम समाजाचा दिलेला नाही.आणि औरंगाबाद मधून इम्तियाज जलील यांना पराभव करण्यासाठी दोन्ही गटबंधनने पूर्ण शक्ती लावली.  तसेच विधान परिषदेतही मुस्लिम समाजाला माविआ ने निराशा केले. एकही मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी दिली नाही. याचाच अर्थ माविआला मुस्लिम अल्संख्यांक समाजाचे मत पाहिजे परंतु मुस्लिम समाजाचा नेता नको. महायुती बद्दल बोलतांना डॉ परवेज अशरफी यांनी सांगितले की हे तर महाविकास आघाडी पेक्षा एक पाऊल पुढे आहे. यांना मुस्लिम अल्पसंख्यांक समाजच नको मुख्यमंत्री ज्या व्यक्तीने प्रेषित मुहम्मद यांच्याबद्दल अपशब्द वापरले त्यांचे सवरक्षण करतात.  तर गृहमंत्री त्यांची सुरक्षेत वाढ करून हे दाखवण्याचा प्रयत्न करतात की जो मुस्लिम समजविरोधत बोलेल त्यांना सरकार पूर्ण सुरक्षा देईल. यांचे आमदार मुस्लिम समजला घुसून मारण्याची धमकी देतात आणि गृहमंत्री त्यांची पाठ राखण करतात. यावरून स्पष्ट दिसते की ना महाविकास आघाडी ना महायुती यांना मुस्लिम समाजाची गरज आहे.  जर मुस्लिम समाज आपल्या सोबत इतर समाज घेऊन इतर समाजाचे लोकांना एकत्र घेऊन येणारे विधान सभा निवडणुकीच्या रिंगणात उतरत असेल तर चांगलेच आहे. प्रत्येक समाजाचा नेतृत्व विधानसभेत असणे गरजेचे असल्याने उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. सध्या अहमदनगर मध्ये सामान्य नागरिकांत चर्चा आहे की अहमदनगरचा भावी आमदार सामान्य जनतेला पाहिजे. वर्षानुवर्ष जी घराणेशाही चालली आहे त्याला कुठे तरी थांबवणे गरजेचे आहे. अहमदनगर शहराला असा आमदार पाहिजे जो प्रत्येक समाजाला एकत्र घेऊन चालेल. जाती जातीत तेढ निर्माण करून दंगल घडवणारा आणि स्वतःची राजकीय पोळी भाजवणार लोक प्रतिनिधी नको. यामुळे पक्षाकडे मी उमेदवारी मागितली आहे. मला आशा आहे की पक्ष अहमदनगर मधून उमेदवारी देताना माझा विचार करेल.

Maharashtra Election : परवेज अशरफी निवडणुकीच्या रिंगणात, पक्षाकडे उमेदवारीची मागणी Read More »