DNA मराठी

Maharashtra election 2024

Maharashtra Election: महायुती – मविआमध्ये ‘काटे की टक्कर’, जाणून घ्या एक्झिट पोलचा अंदाज

Maharashtra Election: राज्यात विधानसभेसाठी मतदाप्रक्रिया पूर्ण झाली असून आता यावेळी राज्यात कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे मात्र त्यापूर्वी काही एक्झिट पोल समोर आले आहे. या एक्झिट पोल नुसार राज्यात पुन्हा महायुतीची सरकार येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तर काही एक्झिट पोलमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये ‘काटे की टक्कर’ असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे 23 नोव्हेंबर रोजी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत 65.11 टक्के मतदान पूर्ण झाले होते मात्र बहुतांश ठिकाणी 6 नंतर ही मतदाप्रक्रिया सुरू असल्याने या आकडेवारीमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे वाढलेला मतदानाचा फायदा कोणाला होणार हे देखील पहावे लागणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान गडचिरोली जिल्ह्यात तर सर्वात कमी मतदान मुंबई शहरमध्ये झाला आहे. गडचिरोलीमध्ये 73.68 तर मुबई शहरमध्ये 52.07 टक्के मतदान झाला आहे. Maharashtra Exit Polls 2024 :इलेकोट्ल एज : महायुती – 121, मविआ- 150, अपक्ष – 20 पोल डायरी : महायुती- 122-176, मविआ – 69-121, इतर 12-19 चाणक्य स्ट्रॅटजीस : महायुती -152-160, मविआ – 130-138, इतर- 6-8 मॅट्रिझ : महायुती 150-170, मविआ -110-130, अन्य 8-10 पीपल्स पल्स : महायुती 175-195, मविआ-85-12, अपक्ष-7-12

Maharashtra Election: महायुती – मविआमध्ये ‘काटे की टक्कर’, जाणून घ्या एक्झिट पोलचा अंदाज Read More »

Uddhav Thackeray: … तर मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

Uddhav Thackeray : राज्यातील विधानसभेसाठी प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला. आज संध्याकाळी 6 ला प्रचाराच्या तोफा थंड देखील होणार आहे. तर दुसरीकडे रविवारी मुंबई आयोजित एका जाहीर सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगर प्रदेशाच्या (एमएमआर) विकासासाठी नीती आयोगाची ब्ल्यू प्रिंट म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (बीएमसी) महत्त्व कमी करून मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा डाव असल्याचा दावा केला. यावेळी उद्धव म्हणाले की, सत्तेत आल्यास महाविकास आघाडी (MVA) वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) आणि MMRDA यांच्यात झालेला सामंजस्य करार रद्द करेल, कारण BMC चे महत्त्व कमी करण्याचा त्यांचा उद्देश आहे. मुंबईतील बीकेसी मैदानावरील सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, जर एमएमआरडीए (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) बीएमसीच्या अधिकारक्षेत्रात अतिक्रमण करत असेल तर ते एमएमआरडीए विसर्जित करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. ते म्हणाले, “मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचे षडयंत्र केवळ चर्चा नाही तर एक गंभीर संकट आहे. हे षडयंत्र खरे आहे, परंतु आम्ही हे कधीही होऊ देणार नाही. ते म्हणाले की एमएमआरडीए आणि डब्ल्यूईएफ यांनी सप्टेंबरमध्ये एमएमआरला जागतिक आर्थिक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी करार केला होता. एमएमआर विकासावरील NITI आयोगाच्या अहवालानंतर करारावर स्वाक्षरी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईतील जमीन अदानी समुहाच्या ताब्यात देणाऱ्या महायुती सरकारची धोरणे संपुष्टात आणण्याचा एमव्हीएच्या नेतृत्वाखालील सरकारचा पहिला निर्णय असेल, असे ठाकरे म्हणाले. माजी मुख्यमंत्री म्हणाले की, ते ‘विकासविरोधी नसून विनाशविरोधी’ आहेत. त्यांनी दावा केला की त्यांच्या नेतृत्वाखालील एमव्हीए सरकार पाडले गेले (जून 2022 मध्ये) आणि शिवसेनेत फूट पडली कारण त्यांनी महाराष्ट्राची लूट होऊ दिली नाही. असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray: … तर मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल Read More »

Asaduddin Owaisi : सोलापुरात ओवेसींचा भाषण अन् भर मंचावर पोलिसांनी बजावली नोटीस, जाणून घ्या नेमकं घडलं तरी काय?

Asaduddin Owaisi : विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार प्रचार सुरू आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM) ने देखील 16 जागांवर उमेदवार दिले आहे. 13 नोव्हेंबर रोजी AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी सोलापूरमध्ये फारुख शा यांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत बोलत असताना सोलापूर पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली. नोटीसमध्ये काय होते?नोटीसमध्ये पोलिसांनी ओवेसी यांना कोणत्याही समाजाच्या भावना दुखावू नयेत आणि त्यांच्या भाषणात भडकाऊ शब्द वापरू नयेत असे निर्देश दिले आहेत. ओवेसींनी नोटीस स्वीकारून आपल्या भाषणात याचा उल्लेख करत पोलिसांकडून देण्यात आलेल्या नोटीस मध्ये स्पेलिंग मिस्टेक असल्याचं सांगितलं. तसेच पोलिसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना किती नोटीस बजावले असं सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच महाविकास आघाडी आणि महायुतीवर जोरदार निशाणा साधला. याच बरोबर त्यांनी 20 नोव्हेंबर रोजी फारुख शाब्दी यांच्यासाठी मतदान करण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केला.

Asaduddin Owaisi : सोलापुरात ओवेसींचा भाषण अन् भर मंचावर पोलिसांनी बजावली नोटीस, जाणून घ्या नेमकं घडलं तरी काय? Read More »

PM Modi Live: पंतप्रधान मोदींचा पुण्यातून काँग्रेसवर हल्लाबोल पण शरद पवारांवर शब्द ही नाही

PM Modi Live: महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात जाहीर सभा घेत पुन्हा एकदा काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला मात्र या सभेत देखील त्यांनी शरद पवार यांच्यावर एकही शब्द बोलला नाही. आपल्या भाषणाची सुरुवात मराठीमध्ये करत मोदींनी पुण्यात सुरू असणाऱ्या विकासकमाबद्दल माहिती दिली. तसेच पुण्यात गुंतवणूक, इन्फ्रास्ट्रक्चर याची गरज आहे. ती आम्ही वाढवू. महायुतीची नवीन सरकार पुणे आणि महाराष्ट्राच्या विकासाठी आणखी जोराने काम करणार अशी ग्वाही त्यांनी दिली. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारचे अडीच वर्ष फक्त महायुतीचे प्रोजेक्ट रद्द करण्यात संपले. काँग्रेस आणि महाविकास आघाडीची हीच संस्कृती आहे. अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलीतर काँग्रेसच्या काळात अनेक वर्ष देशात दोन संविधान होते मात्र आम्ही कलम 370 रद्द करून जम्मू काश्मीरमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधान लागू केला आणि लाल चौकमध्ये तिरंगा फडकावला. मात्र पुन्हा एकदा काँग्रेस आणि त्यांचे लोक जम्मू काश्मीरमध्ये   370 कलम लागू करण्याचे प्रयत्न करत आहे. असेही मोदी म्हणाले. मात्र यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर एकही शब्द बोलला नाही. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी शरद पवार यांच्यावर मोदींनी जोरदार टीका केली होती मात्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मोदींकडून शरद पवार यांचा उल्लेख टाळण्यात येत आहे.

PM Modi Live: पंतप्रधान मोदींचा पुण्यातून काँग्रेसवर हल्लाबोल पण शरद पवारांवर शब्द ही नाही Read More »

Sharad Pawar: जनतेची माफी अन् छगन भुजबळांवर हल्लाबोल, येवल्यात शरद पवारांनी सभा गाजवली

Sharad Pawar: राज्यात विधानसभेसाठी बिगुल वाजले असून आता प्रत्येक पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार प्रचार करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) देखील जोरदार प्रचार करत आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी येवला विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव शिंदे यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेत मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत छगन भुजबळ यांचा पराभव करण्याचे आवाहन नागरिकांना केले. या सभेत बोलताना शरद पवार यांनी 2019 च्या निवडणुकीत “चुकीचा उमेदवार” दिल्याबद्दल जनतेची माफी मागितली. तसेच भुजबळांचा पराभव करा असा भावनिक आवाहन देखील यावेळी त्यांनी केला. या सभेत बोलताना शरद पवार यांनी मोठा खुलासा करत म्हणाले की, जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हा भुजबळ यांनी अजित पवारांशी चर्चा करतो असं सागितलं होत मात्र त्यानंतर भुजबळच त्या गटात गेले असं शरद पवार म्हणाले. तसेच आम्ही त्यांना विरोधी पक्षनेते, उपमुख्यमंत्री अशी अनेक महत्त्वाची पदे दिली. मात्र तरीही देखील त्यांनी सर्व मर्यादा ओलांडून विश्वासघात केला. असं देखील शरद पवार म्हणाले. पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, भुजबळ विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले तेव्हा त्यांना विधान परिषदेवर पाठवले आणि विरोधी पक्षनेतेही केले. ते म्हणाले की, मी राष्ट्रवादीची स्थापना केली तेव्हा भुजबळांना पक्षाचे पहिले प्रदेशाध्यक्ष केले. येवल्यातून त्यांना रिंगणात उतरवून सरकारमधील दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे मंत्रीपद देण्याची चूक मी केली. शरद पवार म्हणाले की, भुजबळांनी काही चुका केल्या आणि त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला, मात्र स्वत: सुधारण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांना पुन्हा सरकारमध्ये घेण्यात आले. “जेव्हा भुजबळांवर काही आरोप झाल्यानंतर त्यांना तुरुंगात जावे लागले तेव्हा मी त्यांच्या पाठीशी उभा राहिलो आणि त्यांना महाविकास आघाडी (एमव्हीए) सरकारमध्ये पदही दिले,” असेही शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar: जनतेची माफी अन् छगन भुजबळांवर हल्लाबोल, येवल्यात शरद पवारांनी सभा गाजवली Read More »

Maharashtra Election: मुद्रीत माध्यमात प्रसिद्ध होणाऱ्या राजकीय जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण बंधनकारक – निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकुमार चिंचकर

Maharashtra Election: विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या एक दिवस आधी म्हणजेच 19 नोव्हेंबर आणि 20 नोव्हेंबर या मतदानाच्या दिवशी, मुद्रीत माध्यमांमधून प्रकाशित होणाऱ्या सर्व राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण बंधनकारक असल्याचे पारनेर निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी कळविले आहे. यासाठी जाहिरात प्रकाशनाच्या प्रस्तावित तारखेच्या किमान दोन दिवस अगोदर जिल्हास्तरीय माध्यम सनियंत्रण व प्रमाणन समितीकडे अर्ज करणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील माध्यम कक्षात अर्ज सादर करावा. मतदानाच्या दिवशी किंवा त्याच्या आधी कोणत्याही प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या किंवा द्वेषपूर्ण जाहिरातींमुळे निवडणूक प्रक्रिया बाधित होवू नये यासाठी पूर्व प्रमाणीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने या निर्देशाचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.

Maharashtra Election: मुद्रीत माध्यमात प्रसिद्ध होणाऱ्या राजकीय जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण बंधनकारक – निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकुमार चिंचकर Read More »

Supriya Sule On Ajit Pawar: ‘यहा से भी करारा जबाब मिलेगा’, सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना थेट इशारा

Supriya Sule On Ajit Pawar: वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांनी दमदार भाषण करत अजित पवारांना इशारा दिला आहे. या वेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा वेगळ्या व्यक्तीसाठी आम्ही तिकीट मागितली होती असं काय होईल असं कधीच वाटलं नव्हतं. मागच्या वेळेस ज्या व्यक्तीला तिकीट दिलं त्याच्या एबी फॉर्मवर शरद पवार यांची सही आहे. म्हणजे त्या व्यक्तीला तिकीट शरद पवार यांनी दिल. त्यानंतर त्या व्यक्तीने काय केलं हे तुम्हा सगळ्यांना माहित आहे. पोर्षे कार दुर्घटनात ज्या आई-वडिलांचे एक मुलगा आणि एक मुलगी गेली त्यांचे अश्रू आजही थांबलेले नाहीत.इथल्या स्थानिक नेत्यानी पोर्श कार ज्याची होती त्या आरोपीला बिर्याणी आणि पिझ्झा खायला घातला हे वास्तव आहे. ज्यांनी पोर्षे कार दुर्घटनेमधील आरोपींना मदत केली त्याच नेत्यानी शरद पवार यांना नोटीस पाठवली आहे की तुम्ही या दुर्घटनेच्या केसमध्ये माझी बदनामी केली तर मी तुम्हाला कोर्टात खेचेल. मी त्या नेत्याला आव्हान देते मी एकदा नाही तर शंभर वेळा ज्यांनी त्या दोन युवकांची हत्या केली त्यांची मदत करणाऱ्या नेत्यांच्या विरोधात बोलणार तुमच्यात हिम्मत असेल तर सुप्रिया सुळे, सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकर यांना देखील नोटीस पाठवाच. रक्ताचे सॅम्पल बदलायचं पाप हे तुमच्या सरकारने केला आहे. अरे शरद पवार दिल्लीच्या तक्ताच्या ईडीच्या नोटीसला घाबरत नाही या तुझ्या नोटीसला काय घाबरणार? माझी त्या व्यक्तीसोबत वैयक्तिक दुश्मनी नाही. पोर्स दुर्घटनेमध्ये सहभाग नसता तर मी त्याच्यावर एक शब्द देखील बोलले नसते. काही वेळापूर्वी इथे येऊन एका नेत्यांनी भाषण केलं की अनेक लोकांना मी संधी दिली, पक्षाने नाही मी… आता मी जे बोलते ती भाषणाची स्टाईल माझी नाही माझं हे भाषण ऐकून माझी आई मला खूप ओरडणार आहे. इथे येऊन ते म्हणाले कुणाची अंडी पिल्ली माहित आहेत जशी तुम्हाला इथली माहित आहे तशी आम्हाला…. त्यामुळे जुनं काही बोलू नका आणि जर काढलंच तर ‘यहा से भी करारा जबाब मिलेगा’. बापू मला तुमच्याकडून आज एक शब्द हवाय तुम्ही आमदार झाल्यानंतर तुमच्या मतदारसंघात एकही एक्सीडेंट झाला तर तुम्ही पोलीस स्टेशनला जाणार नाही तुम्ही सरळ हॉस्पिटलमध्ये जाल.

Supriya Sule On Ajit Pawar: ‘यहा से भी करारा जबाब मिलेगा’, सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना थेट इशारा Read More »

Devendra Fadnavis: ही निवडणूक व्होट जिहाद विरुद्ध, देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

Devendra Fadnavis : राज्यात विधानसभेसाठी रणधुमाळी सुरु असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी धुळ्यात महायुतीच्या उमेदवारासाठी जाहीर सभा घेत आहे. या सभेत बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक जागे व्हायची निवडणुक आहे. ही निवडणूक व्होट जिहाद विरुद्ध आहे. असे वक्तव्य केले आहे. या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार धुळे जिल्ह्यातील पाच मतदारसंघात पुढे होता मात्र मालेगाव आणि धुळेमधील व्होट जिहादमुळे आमचा पराभव झाला. त्यामुळे ही निवडणूक जागे व्हायची निवडणुक आहे. ही निवडणूक व्होट जिहाद विरुद्ध आहे. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच विधानसभा निवडणुकीत धुळे जिल्ह्यात पाचही जागांवर महायुतीचे उमेदवार जिंकणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. राज्यात विधानसभेसाठी एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मत मोजणी होणार आहे. यावेळी राज्यात मुख्य लढत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये पाहायला मिळत आहे.

Devendra Fadnavis: ही निवडणूक व्होट जिहाद विरुद्ध, देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल Read More »

Maharashtra Election 2024 : पोलिसांची मोठी कारवाई, तब्बल 2.3 कोटी रुपये जप्त

Maharashtra Election 2024 : राज्यात विधानसभेसाठी निवडणुकांची घोषणा होताच आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. संपूर्ण राज्यात पोलिस देखील आचारसंहिताचे पालन करत मोठी कारवाई करत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. काळबादेवी येथे पोलिसांनी 12 जणांकडून 2.3 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत लोकमान्य टिळक मार्ग पोलिस स्टेशन आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या पथकाने गुरुवारी रात्री काही लोकांना अडवले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या लोकांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ 2.3 कोटी रुपयांची रोकड सापडली. पैसे घेऊन जाणारे हे लोक रोख रकमेशी संबंधित कोणतेही दस्तऐवज सादर करू शकले नाहीत किंवा एवढी मोठी रक्कम घेऊन जाण्याचे कारणही सांगू शकले नाहीत. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे, निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार तयार करण्यात आलेली पथक रोख रक्कम, दारू आणि इतर संभाव्य प्रलोभनांबाबत सतर्क आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, शुक्रवारी सकाळपर्यंत कागदपत्रे आणि चौकशीनंतर ही रक्कम जप्त करण्यात आली असून रोख घेऊन जाणाऱ्या 12 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यानंतर ही रोकड तपासासाठी आयकर विभागाकडे सुपूर्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Maharashtra Election 2024 : पोलिसांची मोठी कारवाई, तब्बल 2.3 कोटी रुपये जप्त Read More »

Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांची मोठी घोषणा, सर्व उमेदवारांना अर्ज मागे घेण्याचे आदेश

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा करत विधानसभा निवडणुकीमध्ये आपले उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सर्व उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे आदेश देखील त्यांनी दिले आहे. काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणुकीत उमेदवार जाहीर करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र आज मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा करत विधानसभा निवडणुक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आज अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले की, फक्त मराठा समाजावर निवडून येणे शक्य नाही त्यामुळे रात्री 3 पर्यंत चर्चा करून निवडणुक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता आमच्या विरोधकातील लोक पाडायचे असा निर्णय घेतला असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. तर दुसरीकडे महायुती आणि महाविकास आघाडीचे अनेक नेत्यांनी बंडखोरी केल्याने ते देखील अर्ज माघारी घेणार का? याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे.

Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांची मोठी घोषणा, सर्व उमेदवारांना अर्ज मागे घेण्याचे आदेश Read More »