DNA मराठी

Jalna News

img 20250814 wa0010

धक्कादायक, तरुणीचा रात्री अडीच वाजता मृत्यू अन् सकाळी 4 ला अंत्यविधी; गुन्हा दाखल

Jalna Crime : जालना तालुक्यातील वंजार उम्रद येथील एका तरुणीचा रात्री अडीच वाजता मृत्यू झाल्याचा दावा करत कुटुंबीयांनी सकाळी चार वाजता अंत्यविधी उरकून घेतला. त्यानंतर पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी तरुणीच्या वडिलांसह दोन भावांना चौकशीसाठी ताब्यात घेतल. या प्रकरणात तालुका जालना पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून परस्पर अंत्यविधी केल्याबाबत वेगळा गुन्हा दाखल करण्यात येत आहे. जालना तालुक्यातील वंजार उम्रद येथील तरुणी अर्पिता रावसाहेब वाघ हिचा मध्यरात्री अडीच वाजता मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी भल्या पहाटे चार वाजता तिचा अंत्यविधी उरकून घेतला. मात्र या गोष्टीची खबर पोलिसांना मिळताच तालुका जालना पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी सकाळी स्मशान भूमीत धाव घेतली तेव्हा मृतदेह जळत होता. पोलिसांनी चौकशी केली असता अर्पिताने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. मात्र आत्महत्या झाल्यानंतर पोलिसांना कोणतीही माहिती न देता परस्पर मृतदेह जाळल्या प्रकरणी चौकशीसाठी मयत तरुणीचे वडील आणि तिच्या दोन भावांना पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. तर या प्रकरणात तालुका जालना पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून परस्पर मृतदेहाची विल्हेवाट लावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी दिली.

धक्कादायक, तरुणीचा रात्री अडीच वाजता मृत्यू अन् सकाळी 4 ला अंत्यविधी; गुन्हा दाखल Read More »

Jalna News : जालना येथे भीषण अपघात,कार कंटेनरला धडकली, 3 जणांचा मृत्यू

Jalna News : मागच्या काही दिवसांपासून राज्यात रोड   अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. काही दिवसापूर्वी अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यात भीषण रस्ता अपघात झाला होता. या अपघातामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला होता.  तर आता जालना जिल्ह्यात एक भीषण रस्ता अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला.   जिल्ह्यातील अंबड तालुक्यात धुळे-सोलापूर महामार्गावर हा भीषण अपघात झाला. पुलावर उभ्या असलेल्या कंटेनरला भरधाव वेगाने येणाऱ्या कारने मागून धडक दिली. यामध्ये कारमधून प्रवास करणाऱ्या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन पुरुष आणि एका 10 वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी अंबड तालुक्यातील अंकुश नगर येथील धुळे-सोलापूर महामार्गावर अंकुश नगर सहकारी साखर कारखान्यासमोर उभ्या असलेल्या कंटेनरला कारने मागून धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला.  तसेच कारमध्ये प्रवास करणाऱ्या तिघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. अपघाताच्या वेळी अल्टो कारचा वेग जास्त असल्याने तिचा पुढील भाग कंटेनरमध्ये घुसल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. त्यामुळे कारमधील कोणालाही वाचवता आले नाही.  कार संभाजीनगरहून बीडच्या दिशेने जात होती. मृताची ओळख अद्याप पटलेली नसून पोलीस तपास करत आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की, डब्याखालून खराब झालेली कार काढण्यासाठी जेसीबीची मदत घ्यावी लागली. तर मृतदेहांची विटंबना करण्यात आली होती. अपघातानंतर रस्त्यावर मोठी जाम झाली होती. मात्र, पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून हटवून रस्ता खुला केला.

Jalna News : जालना येथे भीषण अपघात,कार कंटेनरला धडकली, 3 जणांचा मृत्यू Read More »