DNA मराठी

Disha Salian

Sanjay Nirupam On Disha Salian

दिशा सालियन प्रकरण, आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल होणार? संजय निरुपमांचा मोठा दावा

Sanjay Nirupam On Disha Salian: दिशा सालियन हत्येमागे मुंबईतील सेलिब्रेटिंगचे ड्रग्ज रॅकेट आहे. असा धक्कादायक दावा शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी केला आहे. तसेच सतीश सालियन यांनी नव्याने केलेले आरोप गंभीर असून त्यांच्या तक्रारीवर लवकरच मालवणी पोलीस ठाण्यात ‘एफआयआर’ नोंदवला जाईल, असा गौप्यस्फोट देखील त्यांनी केला. शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम माध्यमांशी बोलताना म्हणाले की, दिशा सालियन हत्याकांडात उबाठा आमदार आदित्य ठाकरे यांची मोठी भूमिका असल्याचे पुरावे आहेत, लवकरच आदित्य ठाकरेवर गुन्हा दाखल होईल आणि ते हत्यादी ठाकरे बनतील, अशी घणाघाती टीका निरुपम यांनी केली. निरुपम म्हणाले की, नुकताच वडील सतीश सालियन यांनी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे दिशा सालियन प्रकरणात तक्रार केली आहे. या तक्रारीत उबाठाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ही तक्रार मालवणी पोलीस स्टेशनमध्ये एफ.आय.आर करण्यासाठी पुढे पाठवण्यात आल्याची माहिती निरुपम यांनी दिली दिशा सालियनची ८ जून २०२० मध्ये हत्या झाली. अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची दिशा सालियन मॅनेजर होती. दिशा सालियनची हत्या संशयास्पद झाली होती. या दिवशी दिशा सालियनच्या घरी झालेल्या पार्टीमध्ये सर्वजण उपस्थित होते, अशी चर्चा त्या दिवशी झाली होती, असे निरुपम म्हणाले. राज्य सरकारने या प्रकरणी एसआयटीची स्थापना केली असून त्याकडून चौकशी सुरु आहे. दिशावर सामूहिक अत्याचार करुन हत्या केल्याचा आरोप सतीश सालियन यांनी केला आहे. दिशा सालियनचा शवविच्छेदन अहवाल तीन दिवस उशीराने प्राप्त झाला. तिचा मृतदेह हा इमारतीपासून २५ फूट लांब आढळून आली. तिच्या शरिरावर कोणत्याही जखमा नव्हत्या आणि नग्नावस्थेत तिचा मृतदेह आढळून आला होता. या सगळ्या गोष्टी संशयास्पद असून त्याची नव्याने सखोल चौकशी होणे आवश्यक आहे, असे निरुपम म्हणाले. सरकार विरोधी पक्षांचा बदला घेण्यासाठी दिशा सालियन प्रकरणाचे राजकारण करत आहेत, असा आदित्य ठाकरे यांचा आरोप खोटा आहे, असे निरुपम म्हणाले. ते पुढे म्हणाले की, आदित्य ठाकरेने सुप्रीम कोर्टात सीबीआयने क्लिन चीट दिल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले. मात्र सीबीआयने दिशा सालियन प्रकरणाचा नाही तर सुशांत सिंग हत्येचा तपास केला होता. आदित्य यांच्या खोट्या प्रतिज्ञापत्रावर देखील कारवाई होईल, असे निरुपम म्हणाले. या प्रकरणी आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, डी नो मोरिया आणि इतरांवर संशय आहे. हे सर्व ड्रग्ज रॅकेटशी संबधित असून त्यांना ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या समीर खान याने नार्कोटिस ब्युरोकडे कबुली दिली होती. आदित्य ठाकरे ड्रग्ज घेतो, असे समीर खानने चौकशीत म्हटले होते. त्यामुळे दिशा सालियनच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी राज्य सरकार, मुंबई पोलीस कटिबद्ध असल्याचे निरुपम म्हणाले. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चर्चा वाढल्यानंतर उबाठा गटाने कुणाल कामराचे वादग्रस्त गाणे जाणुनबुजून व्हायरल करण्यात आले. शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील टीकेवर कुणाल कामरावर निश्चित कारवाई होईल, असे निरुपम म्हणाले.

दिशा सालियन प्रकरण, आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल होणार? संजय निरुपमांचा मोठा दावा Read More »

Nitesh Rane

दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना अटक करा, मंत्री नितेश राणेंची मागणी

Nitesh Rane : दिशा सालियन मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात तापले असून, यावरून भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेनंतर हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. या याचिकेत दिशावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, यात आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावरही आरोपांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेत आदित्य ठाकरेंच्या अटकेची आणि चौकशीची मागणी केली आहे. नितेश राणेंचा सवाल: लपवालपवी का?नितेश राणे यांनी या प्रकरणावरून ठाकरे गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, “ही फार सोपी आणि सरळ केस आहे. जर ही आत्महत्येचीच घटना होती, तर मग ८ जून २०२० पासून आतापर्यंत इतकी पळापळ का सुरू आहे? लपवालपवी का चालली आहे? आदित्य ठाकरेंना यातून का वाचवावे लागते आहे? जर त्यांचा काहीच संबंध नसेल, तर मग त्यांची एवढी धडपड का दिसते?” त्यांनी पुढे सुप्रीम कोर्टाच्या एका निकालाचा हवाला देत म्हटले, “सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितले आहे की, बलात्काराचा आरोप असेल, तर सर्वप्रथम त्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करावी. त्याच नियमानुसार, आदित्य ठाकरेंवर केस दाखल करून त्यांना अटक करावी आणि चौकशी करावी. ज्या न्यायाची अपेक्षा इतरांना असते, तोच न्याय ठाकरेंनाही लागू करावा.” याचिकेतील गंभीर आरोपदिशा सालियनच्या वडिलांनी, सतीश सालियन यांनी, मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत आदित्य ठाकरे, किशोरी पेडणेकर यांच्यासह इतरांवर सामूहिक बलात्कार आणि हत्येचा आरोप केला आहे. याचिकेत असा दावा करण्यात आला आहे की, दिशा सालियनच्या मृत्यूनंतर मालवणी पोलिसांनी चुकीचे अहवाल तयार करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, ज्यामागे ठाकरे गटाचा दबाव होता. या याचिकेत केंद्रीय तपास यंत्रणेकडे (सीबीआय) स्वतंत्र तपासाची मागणीही करण्यात आली आहे. या आरोपांमुळे ठाकरे गटावर प्रचंड दबाव आला असून, भाजपने हा मुद्दा पकडून राजकीय हल्ला तीव्र केला आहे. नितेश राणेंचा ठाकरे गटावर पलटवारशिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत या प्रकरणावरून भाजपवर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला उत्तर देताना नितेश राणे म्हणाले, “संजय राऊत आणि ठाकरे गटाला सत्य समोर येण्याची भीती वाटते. त्यामुळे ते असली आक्षेप घेत आहेत. पण आता कायदा आपले काम करेल. ज्यांच्यावर आरोप आहेत, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. कोणालाही विशेष सवलत मिळता कामा नये.” राणे यांनी या प्रकरणाला निवडणूक काळातील राजकारणाशी जोडले जाण्याच्या शक्यतेलाही फेटाळून लावले आणि हे प्रकरण “निव्वळ सत्य आणि न्यायासाठी” असल्याचा दावा केला. राजकीय घडामोडींना वेगया प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. एकीकडे महायुती सरकारमधील भाजप आणि शिंदे गट यांना ठाकरे गटाला कोंडीत पकडण्याची संधी मिळाली आहे, तर दुसरीकडे ठाकरे गटावर या आरोपांचे खंडन करण्याचे आणि आपली प्रतिमा सांभाळण्याचे आव्हान आहे. नितेश राणे यांनी यापूर्वीही दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंवर अनेकदा आरोप केले आहेत आणि आता या याचिकेमुळे त्यांचा हल्ला आणखी तीव्र झाला आहे. त्यांनी या प्रकरणात ठाकरे गटाच्या तत्कालीन सरकारवरही पुरावे दडपण्याचा आरोप केला आहे. न्यायालयाचा निर्णय आणि पुढील दिशामुंबई उच्च न्यायालयात दिशा सालियन यांच्या वडिलांनी दाखल केलेली याचिका आज (२० मार्च) सुनावणीसाठी येण्याची शक्यता आहे. या याचिकेतून ठाकरे गटाच्या नेत्यांवर गंभीर आरोप करण्यात आल्याने न्यायालय काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नितेश राणे यांनी या प्रकरणात तातडीने कारवाईची मागणी केली असून, “आदित्य ठाकरेंना वाचवण्याचा प्रयत्न का होतो आहे, हे जनतेला कळले पाहिजे,” असेही ते म्हणाले. दिशा सालियन प्रकरणाने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणला आहे. नितेश राणे यांच्या आक्रमक मागणीमुळे आणि याचिकेतील गंभीर आरोपांमुळे हे प्रकरण आता न्यायालयीन आणि राजकीय लढाईचे नवे केंद्र बनले आहे. ठाकरे गट या आरोपांचे खंडन कसे करणार आणि भाजप याचा राजकीय लाभ कसा उठवणार, हे पुढील काळात स्पष्ट होईल. दरम्यान, या प्रकरणाने राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, जनतेच्या नजरा आता न्यायालयाच्या निर्णयावर खिळल्या आहेत.

दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना अटक करा, मंत्री नितेश राणेंची मागणी Read More »

IMG 20250320 WA0005 1024x576

मग ते पत्र कुणाचे? दिशा सालियन प्रकरणात, सतीश सालियन यांचा धक्कादायक दावा

Disha Salian Death Case : दिशा सालियन, जी सुशांत सिंह राजपूतची माजी व्यवस्थापक होती, तिच्या मृत्यू प्रकरणात गेल्या काही दिवसांत गंभीर आरोप-प्रत्यारोपांचा फेरा सुरू झाल्या आहेत. 8 जून 2020 रोजी मुंबईतील मालाड येथे तिचा मृत्यू झाला होता, ज्याला पोलिसांनी आत्महत्या म्हटले होते. मात्र, आता तिच्या वडिलांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा आरोप केला आहे. दिशा सालियनच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांनी पोलिसांना लिहिलेल्या पत्रात या सर्व आरोपांना अफवा म्हटले होते. मात्र, आता त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून त्यांच्या मुलीच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी आदित्य ठाकरे, सूरज पंचोली आणि डिनो मोरिया यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचीही मागणी केली आहे. तर दुसरीकडे भाजप नेते नितेश राणे यांनीही दिशा सालियनवर सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा आरोप केला होता. त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. नितेश राणे म्हणाले की, “आदित्य ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी”. पोलिसांची भूमिकामुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास पुराव्यांच्या अभावामुळे बंद केला होता. मात्र, आता दिशाच्या वडिलांनी पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, “पोलिसांनी आणि तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्यावर दबाव आणला आणि त्यांची दिशाभूल केली”. दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा फेरा सुरू झाला आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी वाढत आहे. सोशल मीडियावरही या प्रकरणाची चर्चा सुरू आहे.

मग ते पत्र कुणाचे? दिशा सालियन प्रकरणात, सतीश सालियन यांचा धक्कादायक दावा Read More »