DNA मराठी

स्पोर्ट्स

IND vs PAK: Champions Trophy 2025 साठी भारतीय संघ पाकिस्तानला जाणार? आयसीसीने घेतला मोठा निर्णय

 IND vs PAK: आयसीसीकडून 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. मात्र या स्पर्धेत भारतीय संघ पाकिस्तानला जाणार की नाही याबाबत अद्याप बीसीसीआयकडून निर्णय झालेला नाही. त्यामुळे आता पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आशिया चषक 2023 प्रमाणे हायब्रीड मॉडेल अंतर्गत चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करू शकते असे वृत्त समोर येत आहे. अशा स्थितीत भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी श्रीलंका किंवा आशिया चषकाप्रमाणे इतर कोणत्याही देशाचा दौरा करावा लागणार आहे. यासाठी इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (ICC) देखील तयार असून त्यासाठी बजेटही तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. स्पर्धा 19 फेब्रुवारीपासून सुरू होणार चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान होणार आहे. त्याची तयारी पाकिस्तानात सुरू आहे. सर्व अंदाज लक्षात घेऊन आयसीसीने 544 कोटी रुपयांचा प्लॅन बी तयार केला आहे. मात्र, आयसीसीने याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही. एका अहवालानुसार, ICC ने कोलंबो येथील वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) $65 दशलक्ष (म्हणजे 544 कोटी रुपये) पेक्षा जास्त बजेट मंजूर केले आहे. हायब्रीड मॉडेलची शक्यता वाढली वृत्तानुसार, या स्पर्धेसाठी पीसीबीला मिळालेल्या रकमेमध्ये भारताने या स्पर्धेसाठी पाकिस्तानला न गेल्यास होणारा खर्च देखील समाविष्ट आहे. याचा अर्थ, पीसीबीला इतका पैसा मिळाला आहे की ते भारताचे सामने पाकिस्तानबाहेर वेगळ्या ठिकाणी आयोजित करू शकतात. अशा स्थितीत ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर होण्याची शक्यता बळावली आहे. लाहोरमध्ये सामने होणार आहेत वेळापत्रकानुसार, भारताचे सामने लाहोरमध्ये होणार आहेत, ज्यामध्ये भारत-पाकिस्तान सामना शनिवार, 1 मार्च रोजी होणार आहे. भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त बांगलादेश आणि न्यूझीलंड अ गटात आहेत. ब गटात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश असणार असल्याची माहिती समोर आली आहे.

IND vs PAK: Champions Trophy 2025 साठी भारतीय संघ पाकिस्तानला जाणार? आयसीसीने घेतला मोठा निर्णय Read More »

IND vs SL Live Streaming :  Hotstar-Jio Cinema वर दिसणार नाही IND vs SL सामना, ‘येथे’ येणार पाहता

IND vs SL Live Streaming : झिम्बाब्वे दौऱ्यानंतर आजपासून (27 जुलै) भारतीय संघाचा श्रीलंका दौरा सुरू होणार आहे.   सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया श्रीलंकेसोबत 3 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. गौतम गंभीर प्रशिक्षक म्हणून पहिली मालिका खेळणार आहे. भारत-श्रीलंका मालिका खूपच रोमांचक होणार आहे.  त्यामुळे T20 मालिकेचे लाइव्ह स्ट्रिमिंग कधी आणि कुठे होईल आणि तुम्ही ते टीव्हीवर कुठे पाहू शकता ते जाणुन घ्या  भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिला T20 सामना कधी होणार? भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला T20 सामना 27 जुलै रोजी होणार आहे. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिला T20 सामना कुठे खेळला जाईल? भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला T20 सामना श्रीलंकेतील पल्लेकेले येथे खेळवला जाणार आहे. भारत विरुद्ध श्रीलंका सामना तुम्ही टीव्हीवर कुठे पाहू शकता? भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिका सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर पाहता येईल. भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेचे लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे होणार? भारत आणि श्रीलंका यांच्यातील T20 मालिकेचे थेट प्रसारण सोनी लिव्हवर होणार आहे. दोन्ही संघ भारत- सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, रायन पराग, अक्षर पटेल, संजू सॅमसन, ऋषभ पंत, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग आणि खलील अहमद. श्रीलंका- चरिथ असलंका (कर्णधार), पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, चामिंडू विक्रमसिंघे, कामिंदू मेंडिस, दासुन शनाका, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेलागे, कुसल परेरा, कुसल मेंडिस, दिनेश चंडीमल, महेश थेकशाना फर्नांडो, महेश थेकशाना फेरनांदो, आणि दिलशान मधुशंका.

IND vs SL Live Streaming :  Hotstar-Jio Cinema वर दिसणार नाही IND vs SL सामना, ‘येथे’ येणार पाहता Read More »

Gautam Gambhir टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक, जय शाहने केली घोषणा

Gautam Gambhir :  BCCI ने मोठा निर्णय घेत गौतम गंभीरची भारतीय क्रिकेट संघाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्तीची घोषणा केली. जय शाहा यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे आता गंभीर भारतीय संघाचा 25 वा मुख्य प्रशिक्षक बनणार आहे. T20 विश्वचषक 2024 नंतर राहुल द्रविडचा कार्यकाळ संपला होता.  आता गंभीर जुलैच्या अखेरीस सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघाचा नवा प्रशिक्षक म्हणून संघात सामील होणार आहे. सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (NCA) संचालक व्हीव्हीएस लक्ष्मण झिम्बाब्वे दौऱ्यावर अंतरिम मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावत आहेत. सन्मान वाटत आहे… गौतम गंभीरनेही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर तिरंग्याचा फोटो पोस्ट करून आपल्या नियुक्तीवर प्रतिक्रिया दिली आणि लिहिले, “भारत माझी ओळख आहे आणि माझ्या देशाची सेवा करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा विशेषाधिकार आहे. मला परत येण्याचा सन्मान वाटतो, यावेळी माझी टोपी वेगळी आहे. पण, प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा, हे माझे ध्येय नेहमीच एकच राहिले आहे. ‘मेन इन ब्लू’ 1.4 अब्ज भारतीयांची स्वप्ने त्यांच्या खांद्यावर घेत आहेत आणि ही स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी मी माझ्या सामर्थ्याने सर्वकाही करेन.” राहुल द्रविडचा कार्यकाळ संपल्याची बातमी येताच गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक होणार असल्याची चर्चा होती. त्यावर आता जय शहा यांनी अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे. सध्या भारतीय संघ शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे आणि त्यानंतर तो श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे, जिथे गंभीर त्याची नवीन भूमिका साकारणार आहे. IPL 2024 पूर्वी गंभीर कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) मार्गदर्शक बनला आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली KKR ने चॅम्पियनशिप जिंकली. मुख्य प्रशिक्षकपदासाठी गंभीर हा एकमेव उमेदवार होता. प्रशिक्षकपदासाठी मुलाखत देण्यापूर्वी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. गौतम गंभीरसमोर आव्हान T20 विश्वचषक 2024 जिंकून भारतीय संघाने 11 वर्षांचा ICC ट्रॉफीचा दुष्काळ संपवला. आता त्याचे पुढील लक्ष्य पुढील एका वर्षात दोन आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचे आहे. नवे मुख्य प्रशिक्षक या नात्याने गंभीरसाठी ही जबाबदारी मोठी असेल. टीम इंडियाला 2025 च्या सुरुवातीला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भाग घ्यायचा आहे आणि जर भारतीय संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यात यशस्वी ठरला तर ते देखील जिंकण्याचे लक्ष्य असेल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना जून 2025 मध्ये खेळवला जाईल. गौतम गंभीरची क्रिकेट कारकीर्द टीम इंडियाच्या नवीन प्रशिक्षकाच्या क्रिकेट प्रवासाबद्दल बोलताना, त्याने खेळाच्या सर्वात लांब फॉरमॅटमध्ये, कसोटीमध्ये 58 सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 104 डावांमध्ये 41.96 च्या सरासरीने 4154 धावा केल्या. 147 एकदिवसीय सामन्यांमध्ये, गंभीरने सुमारे 40 च्या सरासरीने 6144 धावा केल्या आणि श्रीलंकेविरुद्ध त्याची सर्वोच्च धावसंख्या 150 धावा होती. टी-20 बद्दल बोलायचे तर गौतमने या फॉरमॅटमध्ये 37 सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 36 डावांमध्ये 27.41 च्या सरासरीने आणि 119.03 च्या स्ट्राइक रेटने 932 धावा केल्या. गौतम गंभीरनेही आपल्या कारकिर्दीत 154 आयपीएल सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 31.04 च्या सरासरीने 4,218 धावा केल्या आहेत.

Gautam Gambhir टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक, जय शाहने केली घोषणा Read More »

USA vs IND 2024: न्यूयॉर्कमध्ये सूर्या चमकला, भारताची सुपर 8 मध्ये एंट्री!

USA vs IND 2024: T20 विश्वचषक 2024 मध्ये काल झालेल्या सामन्यात भारताने अमेरिकाला 7 गडी राखून पराभव सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. या स्पर्धेत भारताचा हा सलग तिसरा विजय होता.  सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अमेरिकेने 20 षटकांत 110 धावा केल्या. 111 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने सूर्यकुमार यादवचे शानदार अर्धशतक आणि शिवम दुबेच्या धडाकेबाज खेळीमुळे 3 विकेट गमावून लक्ष्य गाठले. या सामन्यात गोलंदाजी करताना अर्शदीप सिंगने 9 धावांत 4 बळी घेतले. अर्शदीप सिंगने स्फोटक सुरुवात केली टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अर्शदीप सिंगने प्रथम चेंडूने कहर केला आणि अमेरिकेचा सलामीवीर शायन जहांगीरला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. या षटकातील शेवटच्या चेंडूवर त्याने अँड्रियास गॉसला बाद केले. स्टीव्हन टेलरसह ॲरॉन जोन्सने भारतीय गोलंदाजांचा थोडा वेळ सामना केला आणि पॉवरप्लेपर्यंत आणखी नुकसान होऊ दिले नाही. अक्षर पटेलने ही भागीदारी षटकात मोडून काढली आणि आजच्या सामन्यात मोनांक पटेलच्या जागी कर्णधार असलेल्या ॲरॉन जोन्सला बाद केले. हार्दिक पांड्यालाही 2 बळी मिळाले 12व्या षटकात स्टीव्हन टेलरनेही शरणागती पत्करली आणि तो अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला. नितीशकुमारने कोरी अँडरसनसोबत चांगली भागीदारी करत भारतीय गोलंदाजांचा धैर्याने सामना केला. नितीशला 15व्या षटकात अर्शदीप सिंगने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर सातत्याने विकेट पडत राहिल्या आणि 20 षटकात 8 गडी गमावून संपूर्ण संघ केवळ 110 धावा करू शकला. अर्शदीप सिंगने 4 षटकात 9 धावा देऊन 4 बळी घेतले तर हार्दिक पांड्याने 2 बळी घेतले. अक्षर पटेलने 3 षटकात 25 धावा दिल्या आणि एक विकेट घेण्यात यश मिळविले. सूर्याने न्यूयॉर्कमध्ये शानदार अर्धशतक झळकावले 111 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली आणि विराट कोहली सलग तिसऱ्यांदा फ्लॉप झाला आणि पहिल्याच चेंडूवर बाद झाला. रोहित शर्माही विशेष काही करू शकला नाही आणि सोनव नेत्रावलकरच्या चेंडूवर हरमीत सिंगकडे झेलबाद झाला. 10 धावांवर 2 विकेट पडल्यानंतर, सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत यांनी विकेट पडण्याच्या मालिकेला ब्रेक लावला. पॉवरप्लेनंतर, 8व्या षटकात 18 धावा काढून पंत बाद झाला तेव्हा शिवम दुबे क्रीजवर आला. सूर्यासोबत मिळून त्याने पहिला डाव सांभाळला आणि नंतर उत्कृष्ट फटके मारून मनोबल परत मिळवले. सूर्याने आपले अर्धशतक पूर्ण केले, तर दुबे 31 धावांवर नाबाद राहिला. भारताने पहिल्या 10 चेंडूत 7 गडी राखून सामना जिंकला.

USA vs IND 2024: न्यूयॉर्कमध्ये सूर्या चमकला, भारताची सुपर 8 मध्ये एंट्री! Read More »

T20 World Cup नंतर टीम इंडियाचा कर्णधार बदलणार? ‘या’ नावांची चर्चा

T20 World Cup : पुढील महिन्यापासून T20 विश्वचषक स्पर्धा सूरू होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून संघाची पहिली तुकडी देखील अमेरिकेला रवाना झाली आहे. पहिल्या बॅचमध्ये रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांच्यासह 10 खेळाडूंनी विमानतळावरून उड्डाण केले. ही स्पर्धा भारतीय संघासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे, कारण यानंतर काही खेळाडू T20 फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा करू शकतात. निवृत्त होणाऱ्या खेळाडूंमध्ये पहिले नाव रोहित शर्माचे आणि दुसरे नाव विराट कोहलीचे आहे. रोहित शर्मा निवृत्त झाला तर टीम इंडियाचा कर्णधार कोण असेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. असे काही खेळाडू आहेत जे कर्णधार म्हणून मोठे दावे करत आहेत, ज्यांच्याबद्दल विविध प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, अद्याप कोणीही अधिकृतपणे काहीही बोललेले नाही. रोहित शर्मा करणार निवृत्तीची घोषणा? अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये आयोजित करण्यात येणारा ICC T20 विश्वचषक अनेक अर्थाने खूप महत्त्वाचा ठरणार आहे, कारण यानंतर रोहित शर्मासारखा खेळाडू निवृत्तीची घोषणा करू शकतो. रोहित शर्मा निवृत्त झाला तर टी-20चा कर्णधार कोण असेल हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. सध्या ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांचा कर्णधार म्हणून विचार केला जात आहे. ऋषभ पंतने आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करताना चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे रोहित शर्मानंतर निवड समिती त्याला कर्णधार बनवू शकतात, असे मानले जात आहे. या मालिकेतील दुसरे नाव हार्दिक पांड्याचे आहे. आयपीएलच्या या मोसमात त्याने मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद भूषवले असले तरी त्याच्या कामगिरीने त्याने बरीच निराशा केली. पण याआधी त्याने गुजरात टायटन्ससाठी दोन मोसमात चमकदार कर्णधारपद भूषवले होते. त्याची आयसीसी टी-20 वर्ल्डसाठी उपकर्णधारपदीही नियुक्ती करण्यात आली आहे, ज्यामुळे त्याला संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले जाऊ शकते असे दिसते. मात्र, अद्याप कोणीही अधिकृतपणे काहीही बोललेले नाही. रोहित शर्माची T-20 मधील कामगिरी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने 2007 साली T-20 फॉरमॅटला सुरुवात केली. आतापर्यंत त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर 151 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 31.8 च्या सरासरीने 3974 धावा केल्या आहेत. त्याने आपल्या बॅटने 5 शतके आणि 29 अर्धशतके झळकावली आहेत. तो T20 च्या शेवटच्या टप्प्यात आहे आणि लवकरच निवृत्त होण्याची शक्यता आहे.

T20 World Cup नंतर टीम इंडियाचा कर्णधार बदलणार? ‘या’ नावांची चर्चा Read More »

IPL 2024 : हार्दिक पांड्याचे लग्न मोडणार, नतासा स्टॅनकोविक देणार घटस्फोट?

IPL 2024 : नेहमी सोशल मीडियावर चर्चित राहणारा भारतीय संघाच्या स्टार खेळाडू हार्दिक पंड्या गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. तो यावेळी IPL 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करत होता मात्र यावेळी आयपीएलमधून बाहेर पडणारा मुंबईचा संघ पहिला संघ ठरला होता. तर आता हार्दिक वैयक्तिक आयुष्याबाबत काही धक्कादायक बातम्या समोर येत आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, हार्दिक आणि नताशा स्टॅनकोविक एकमेकांपासून घटस्फोट घेणार आहेत, ज्याचे संकेत नताशानेच दिले आहेत.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, हार्दिक पांड्या आणि पत्नी नताशा स्टॅनकोविक यांच्यातील संबंध चांगले चालले नाहीत आणि हे दोघेही एकमेकांपासून वेगळे होऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे. Reddit वर मंगळवारी कोणीतरी एक पोस्ट टाकली होती, ज्यामध्ये असे लिहिले होते की, हार्दिक आणि नताशा एकमेकांपासून वेगळे होत आहेत असा अंदाज बांधला जात आहे. मात्र, हार्दिक आणि नताशाच्या वेगळ्या होण्याची बातमी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. नताशाने असे संकेत दिले सर्बियन मॉडेल आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकने सोशल मीडिया इंस्टाग्रामवरून हार्दिक पांड्याचे आडनाव हटवले आहे. नताशा आधी पांड्या हे आडनाव वापरायची, पण तिने आता ते काढून टाकले आहे. याशिवाय तिने हार्दिकसोबतचे अनेक फोटोही डिलीट केले असून अनेक दिवसांपासून तिने एकमेकांसोबतचे फोटोही पोस्ट केलेले नाहीत. एवढेच नाही तर हार्दिकने नताशाला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या नाहीत. 4 मार्च रोजी नताशाचा वाढदिवस आहे चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांनी 31 मे 2020 रोजी एकमेकांशी लग्न केले. दोघांनी कोर्ट मॅरेज केले असले तरी. वास्तविक, लग्नाच्या काही महिन्यांनंतर 31 जुलै रोजी नताशा आणि हार्दिक आई-वडील झाले. नताशा लग्नाआधीच प्रेग्नंट होती. हार्दिक आणि नताशाच्या मुलाचे नाव अगस्त्य आहे.

IPL 2024 : हार्दिक पांड्याचे लग्न मोडणार, नतासा स्टॅनकोविक देणार घटस्फोट? Read More »

KKR vs SRH Match Highlights: केकेआर अंतिम फेरीत! हैदराबादचा 8 गडी राखून पराभव

KKR vs SRH Match Highlights : बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानची कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2024 च्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे.  अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर IPL 2024 चा पहिला क्वालिफायर सामन्यात केकेआरने सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. या सामन्यात प्रथम खेळणाऱ्या हैदराबादचा संघ 19.3 षटकात 159 धावा करत सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात केकेआरने केवळ 13.4 षटकांत लक्ष्य गाठले आणि सामना 8 विकेटने जिंकला. कोलकाताने आयपीएल 2024 फायनलसाठी तिकीटही बुक केले आहेत. तर हैदराबादला पराभवानंतरही अंतिम फेरी गाठण्याची आणखी एक संधी आहे.  कोलकाताने 160 धावांचे लक्ष्य गाठले  कोलकाता नाईट रायडर्ससमोर 160 धावांचे लक्ष्य होते. प्रत्युत्तरात केकेआरने अवघ्या 13.4 षटकांत लक्ष्याचा पाठलाग करत सामना 8 गडी राखून जिंकला. संघासाठी कर्णधार श्रेयस अय्यरने 24 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 58 धावांची खेळी केली. याशिवाय व्यंकटेश अय्यरने 28 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 51 धावांची खेळी केली. या दोघांमध्ये 97 धावांची नाबाद भागीदारीही झाली.  रहमानउल्ला गुरबाज 23 तर सुनील नारायणला 21 धावा करता आल्या. दोघांनीही डावाची सुरुवात वेगवान केली होती, जी व्यंकटेश आणि श्रेयसने पूर्ण केली. या विजयासह कोलकाता संघाने पुन्हा एकदा अंतिम फेरी गाठली. आता अंतिम फेरीत केकेआरचा सामना कोणत्या संघाशी होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. कारण हैदराबाद अजूनही फायनलमध्ये येऊ शकते, तर राजस्थान आणि बेंगळुरूही या शर्यतीत आहेत.  KKR विरुद्ध SRH यांच्यातील पहिल्या क्वालिफायर सामन्यात मिचेल स्टार्कने सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. त्याने एकूण 3 विकेट्स आपल्या नावावर केल्या. याशिवाय वरुण चक्रवर्तीने 2, वैभव अरोरा, हर्षित राणा, सुनील नारायण आणि आंद्रे रसेलने प्रत्येकी 1 बळी घेतला. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार आणि पॅट कमिन्सने 1-1 विकेट घेतली.  सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण त्याचा फारसा फायदा संघाला घेता आला नाही. संघ 19.3 षटकात केवळ 159 धावांवर ऑलआऊट झाला. संघाकडून राहुल त्रिपाठीने 35 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 55 धावा केल्या. याशिवाय ट्रॅव्हिस हेड 0, अभिषेक शर्मा 3, नितीश रेड्डी 9, शाहबाज अहमद 0, हेनरिक क्लासेन 32, अब्दुल समद 16, सनवीर सिंग 0, पॅट कमिन्स 30, भुवनेश्वर कुमार 0 आणि विजयकांत व्यासकांतने नाबाद 7 धावा केल्या.

KKR vs SRH Match Highlights: केकेआर अंतिम फेरीत! हैदराबादचा 8 गडी राखून पराभव Read More »

RCB vs CSK : बेंगळुरूमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट, सामना रद्द झाला तर RCB चं काय होणार?

RCB vs CSK : आज IPL 2024 RCB आणि CSK दरम्यान भिंडत होणार आहे. या हाय व्होल्टेज सामन्या अगोदर बेंगळुरूमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.    प्लेऑफच्या दृष्टिकोनातून हा सामना खूप महत्त्वाचा आहे, कारण आयपीएल 2024 च्या प्लेऑफचा चौथा संघ या सामन्याद्वारे निश्चित होणार आहे. सध्या सनरायझर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्ससह प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. आज चौथ्या क्रमांकाच्या हाय व्होल्टेज सामन्यापूर्वी हवामानाबाबत एक मोठे अपडेट समोर येत आहे, त्यामुळे हा सामना पावसामुळे वाहून जाऊ शकतो. असे झाल्यास, कोणता संघ प्लेऑफमध्ये पोहोचेल ते जाणुन घ्या. IMD ने 18 ते 20 मे दरम्यान बेंगळुरूमध्ये पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. अशा परिस्थितीत आज पावसामुळे सामना अनेक वेळा खंडित होऊ शकतो. बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमची ड्रेनेज व्यवस्था इतर सर्व स्टेडियमपेक्षा चांगली असली, तरी मुसळधार पाऊस पडल्यास सामन्याची मजाच विस्कळीत होईल. आता प्रश्न असा आहे की रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना पावसामुळे वाहून गेला तर चेन्नई सुपर किंग्ज सहज प्लेऑफसाठी पात्र ठरेल. कारण IPL 2024 च्या गुणतालिकेत, CSK 13 पैकी 7 सामने जिंकून आणि +0.528 च्या रननेटने 14 गुणांसह अजूनही चौथ्या स्थानावर आहे. आरसीबीला मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल जर आपण RCB बद्दल बोललो तर 13 सामन्यांमध्ये त्याचे 12 गुण आहेत, त्यामुळे आज RCB विरुद्ध CSK सामना त्यांच्यासाठी नॉकआउट सामना असेल. या शेवटच्या सामन्यात, जर आरसीबी 18 पेक्षा जास्त धावांच्या फरकाने जिंकला किंवा 18.1 षटकात धावांचा पाठलाग करण्यात यशस्वी झाला तर त्याला प्लेऑफचे तिकीट मिळेल.

RCB vs CSK : बेंगळुरूमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट, सामना रद्द झाला तर RCB चं काय होणार? Read More »

MS Dhoni च्या नावावर आणखी एक विक्रम! क्रिकेट जगात धोनी पुन्हा चर्चेत

MS Dhoni : आयपीएल 2024 चा 13 वा सामना विशाखापट्टणम येथे खेळला गेला, या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्जला पराभव केला मात्र भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जचा  यष्टिरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनीने एक मोठी कामगिरी केली.  या सामन्यात पृथ्वी शॉचा झेल घेत त्याने टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील 300 बाद पूर्ण केले. या सामन्यात पृथ्वी शॉने 27 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 43 धावा केल्या. शॉचा चेंडू रवींद्र जडेजावर कट करण्याच्या प्रयत्नात असताना धोनीने विकेटच्या मागे झेल घेतला आणि धोनीने नवा विक्रम रचला.  चेन्नई सुपर किंग्जला त्याच्या नेतृत्वाखाली 5 वेळा चॅम्पियन बनवणारा धोनी यंदाच्या मोसमात फक्त यष्टिरक्षक फलंदाज म्हणून खेळत आहे. धोनीने आतापर्यंत 213 झेल आणि 87 स्टंपिंग केली आहे. धोनीने आज T20 मध्ये 300 बाद पूर्ण केले असतील पण तो दीर्घकाळ T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक बाद करणारा खेळाडू होता. धोनीच्या मागे पाकिस्तानचा माजी यष्टिरक्षक फलंदाज कामरान अकमल आहे, ज्याने 264 बाद घेतले आहेत.  भारताच्या दिनेश कार्तिकने 274 ची शिकार केली आहे. क्विंटन डी कॉकच्या नावावर 270 विकेट आहेत आणि जोस बटलरच्या नावावर 209 विकेट आहेत.

MS Dhoni च्या नावावर आणखी एक विक्रम! क्रिकेट जगात धोनी पुन्हा चर्चेत Read More »

Ranji Trophy Final: मुंबई पुन्हा चॅम्पियन! ‘हे’ खेळाडू ठरले गेम चेंजर

Ranji Trophy Final:  मुंबईने पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत विदर्भ विरोधात खेळण्यात आलेल्या रणजी ट्रॉफी 2023-24 च्या अंतिम सामन्यात विजेते पटकावले आहे.    मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईने विदर्भाचा 169 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव करत 42 व्यांदा विजेतेपद पटकावले.  मुंबईसाठी वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर आणि सरफराज खानचा भाऊ मुशीर खान यांनी पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली. या सामन्यात मुंबईने शार्दुल ठाकूरच्या 75 धावांच्या खेळीच्या जोरावर पहिल्या डावात 224 धावा केल्या. प्रत्युत्तरात विदर्भाचा संघ अवघ्या 105 धावांत आटोपला. दुसऱ्या डावात मुंबईने शानदार फलंदाजी करत मुशीर खानच्या 136 धावा, श्रेयस अय्यरच्या 95 धावा, कर्णधार रहाणेच्या 73 धावा आणि शम्स मुलानीच्या 50 धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर 418 धावा केल्या. मुंबईची एकूण आघाडी 537 धावांची असून विदर्भाला 538 धावांचे लक्ष्य देण्यात आले होते. प्रत्युत्तरात विदर्भाचा संघ दुसऱ्या डावात 368 धावांत सर्वबाद झाला. विदर्भाकडून कर्णधार अक्षय वाडकरने 103 धावांचे शतक झळकावले. त्यांच्याशिवाय करुण नायरने 74 आणि हर्ष दुबेने 65 धावा केल्या. करुण नायर आणि अक्षय वाडकर यांनी पाचव्या विकेटसाठी 173 चेंडूत 90 धावांची भागीदारी केली. मुंबईकडून दुसऱ्या डावात तनुष कोटियनने सर्वाधिक चार बळी घेतले. तर मुशीर खान आणि तुषार देशपांडे यांना प्रत्येकी दोन यश मिळाले. धवल कुलकर्णी आणि शम्स मुलाणी यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. यासह मुंबईने हा सामना 169 धावांनी जिंकला.

Ranji Trophy Final: मुंबई पुन्हा चॅम्पियन! ‘हे’ खेळाडू ठरले गेम चेंजर Read More »