DNA मराठी

राजकीय

Ramnavmi 2024 :  देशात मोदी नसते तर राम मंदीर झालेच नसते:  खा विखे पाटील

Ramnavmi 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात राम मंदिराची उभारणी झाली, त्यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमीपुजन झाले आणि प्राणप्रतिष्ठा सुद्धा त्यांच्याच हस्ते पार पडली. जर पंतप्रधान मोदी नसते तर देशाला राम मंदीराची अजूनही वाट पहावी लागली असती. मोदी नसते तर प्रभू रामचंद्राचे मंदिर झालेच नसते. असे मत नगरचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले. रामनवमी निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.  राम नवमीच्या निमित्ताने देशात प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. याच पार्श्वभुमीवर नगर जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गल्लोगल्लीत रामनामाचा जयकारा सुरू होता. खा. डॉ. सजय विखे पाटील हे कर्जत तालुक्यातील भांभोरा येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून त्यांनी प्रभू रामचंद्राचे दर्शन घेऊन त्यांचे आशिर्वाद घेतले. यावेळी त्यांच्या सोबत आमदार राम शिंदे आणि इतर प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.  या प्रसंगी रामभक्तांना संबोधित करताना खा. विखे म्हणाले की, देशात राममंदिरासाठी ५०० वर्षांचा संघर्ष झाला. या संघर्षात अनेकांचे जीव गेले. मात्र केंद्रात मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेत आल्यानंतर राममंदिर पुर्ण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला होता. यासाठी न्यायालयातील लढाई सरकारने यशस्वी केली. यामुळे अयोध्येत राम मंदिर उभे राहण्याचे स्वप्न पूर्णत्वास गेले.   लोकसभा मतदार संघात मागील पाच वर्षात केलेल्या विकासकामांवर आपण नागरिकांकडे समर्थन मागत आहोत. या भागातील प्रश्नांसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून निधीची उपलब्धता केली. आपल्याकडे केलेली विकासकामे सांगण्याचे काम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील १० वर्षात घेतलेल्या निर्णयांचे लोककल्याणकारी योजनांची माहिती आहे. बुथवरील प्रत्येक कार्यकर्त्याने लाभार्थी आणि मदतारांपर्यंत पोहचवायची आहे. नकारात्मक गोष्टीना थारा देऊ नका असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.   विरोधी उमेवाराकडे सांगण्यासाठी कोणतेही काम नाही, ते त्यांच्या तालूक्याचा विकास करू शकले नाहीत. लोकसभा मतदार संघाचा विकास कसा करणार? विश्वासघात करून त्यांचे राजकारण सुरू आहे. केवळ दहशत आणि दादागिरी करून सुरू असलेल्या राजकारणाला जनता कधीही स्विकारणार नाही. या भागातील जनता सुज्ञ आणि विचारी आहे. विकासाच्या कामावर शिक्कामोर्तब करून लोकसभा मतदार संघातील जनता महायुतीच्या पाठीशी खंभीर उभी राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Ramnavmi 2024 :  देशात मोदी नसते तर राम मंदीर झालेच नसते:  खा विखे पाटील Read More »

BJP Manifesto: भाजपाचे संकल्‍प पत्र देशातील सर्वसामान्‍य नागरीक, महिला, युवक आणि शेतकरी यांना समर्पित

BJP Manifesto: भाजपाचे संकल्‍प पत्र देशातील सर्वसामान्‍य नागरीक, महिला, युवक आणि शेतकरी यांना समर्पित झाले असून, संकल्‍प पत्रातून जाहीर करण्‍यात आलेल्‍या प्रत्‍येक योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची गॅरंटी आहे. ‘सबका साथ सबका विकास’ हा भाव भाजपाच्‍या संकल्‍प पत्राचा आत्‍मा असल्‍याचा विश्‍वास महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्‍यक्‍त केला. लोकसभा निवडणूकीच्‍या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्‍या  वतीने प्रकाशित करण्‍यात आलेल्‍या संकल्‍प पत्राची माहीती मंत्री विखे पाटील यांनी माध्‍यमांना दिली. भाजपाच्‍या संकल्‍प पत्रासाठी देशातील लोकांच्‍या काय अपेक्षा आहेत, यासाठी सुचना पाठविण्‍याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्‍यांच्‍या आवाहानाला प्रतिसाद देवून, संपुर्ण देशातून १६ लाख सुचना यासाठी प्राप्‍त झाल्‍या. नगर जिल्‍ह्यातूनही १० हजार सुचना संकल्‍प पत्रासाठी पाठविण्‍यात आल्‍याचे ना.विखे पाटील म्‍हणाले. नागरीकांच्‍या सुचनांमधून तयार झालेल्‍या या संकल्‍प पत्रात भारताच्‍या अंतरराष्‍ट्रीय संबधापासून ते देशाच्‍या सुरक्षा व्‍यवस्‍थेपर्यंत. समृध्‍द भारत, सुशासन, स्‍वस्‍थ भारत, शिक्षण, क्रिडा अशा सर्वच क्षेत्रांच्‍या विकासाबरोबरच इनोव्‍हेशन, टेक्‍नॉलॉजी आणि पर्यावरण यांना विशेष प्राधान्‍य देण्‍यात आल्‍याचे सांगून ना.विखे पाटील म्‍हणाले की, २०४७ सालापर्यंत विकसीत भारत निर्माण करण्‍याचे उदिष्‍ठ पुर्ण करण्‍यासाठी युवाशक्‍ती, नारीशक्‍ती, शेतकरी आणि गरीब यांना सशक्‍त करण्‍याचा संकल्‍प करण्‍यात आला असून, रोजगार निर्मितीवर लक्ष केंद्रीत करतानाच स्‍टार्टअप योजनेला प्रोत्‍साहन देण्‍याचा प्रयत्‍न  केला जाणार आहे. भारताला प्रक्रीया उद्योगाचे हब बनवून प्रक्रीया उद्योग ग्रामीण अर्थकारणाचे ग्रोथ इंजिन ठरेल असे उदिष्‍ठ या संकल्‍प पत्रातून ठेवण्‍यात आले असून, संस्‍कृती आणि परंपरेची जोपासणा करतनाच देशातील पर्यटन विकासाला गती देण्‍याचा मानस संकल्‍प पत्रातून व्‍यकत करतानाच मागील दहा वर्ष देशातील महिलांना संधीचे होते. आता भविष्‍यातील पाच वर्षे हे महिलांच्‍या भागीदारीचे असतील. याकरीता नारीशक्‍ती वंदना अधिनियम पंतप्रधान नरेंद्र मादी यांच्‍या  सरकारची मोठी उपलब्‍धी ठरली असल्‍याचे विखे पाटील म्‍हणाले .   भाजपाच्‍या संकल्‍प पत्राच्‍या अनुषंगानेच लोकसभा मतदार संघांचा वचननामाही लवकरच प्रकाशित करण्‍यात येणार असून,  जिल्‍ह्यात रोजगार निर्मिती, तिर्थक्षेत्र पर्यटन तसेच जिल्‍ह्यातील प्रलंबित  पाणी योजनांच्‍या सोडवणूकीसाठी प्राधान्‍य देण्‍यात येणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. याप्रसंगी भाजपाचे शहर जिल्‍हा ध्‍यक्ष अभय आगरकर, शिवसेनेचे जिल्‍हा प्रमुख बाबुशेठ टायरवाले, भाजपाचे सरचिटणीस नितीन दिनकर, धनंजय जाधव, निखील वारे आदि याप्रसंगी उपस्थित होते.

BJP Manifesto: भाजपाचे संकल्‍प पत्र देशातील सर्वसामान्‍य नागरीक, महिला, युवक आणि शेतकरी यांना समर्पित Read More »

Modi Government : महिला सक्षमीकरणासाठी मोदी सरकार सदैव कटीबद्ध

Modi Government:  पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली विविध योजनांची निर्मिती करून महिलांना प्रगतीपथावर आणण्याचे काम मोदी सरकारच्या काळात झाले आहे. यामुळे महिला सर्वच क्षेत्रात आपली छाप पाडत आहे. महिलांना सामाजिकदृष्ट्या समान हक्क मिळवून सामाजिक न्याय देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याचे प्रतिपादन अहिल्यानगरचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे.  “मेरा बुथ सबसे मजबूत” कार्यक्रमाचेआयोजन बेलवंडी येथे करण्यात आले होते. यावेळी विक्रमसिंह पाचपुते, अण्णासाहेब शेलार व इतर प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आज भारत विकसनशील अर्थव्यवस्थेकडे चमकदार अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहे. देशाच्या या प्रगतीमागे महिलांचे मोठे योगदान आहे. एक काळ असा होता की महिलांसाठी घराबाहेर पडणेही फार कठीण होते. पण आता काळ बदलला आहे. महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात चुरशीची स्पर्धा करत आहेत. व्यवसाय, शिक्षण, मनोरंजनापासून ते आयटी आदी अनेक क्षेत्रात महिला प्रगती करत आहेत. महिलांना बळ देण्याचे सर्वाधिक  काम मोदी सरकारच्या काळात झाले असल्याचे खा. विखे पाटील म्हणाले.  मोफत शिलाई मशीन योजनेच्या माध्यामातून लाखो महिला स्वयंरोगारात आल्या, सुकन्या समृद्धी योजनेतून मुलींचे भविष्य सुरक्षित करण्याचे काम मोदी सरकारने केले.‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजनेमुळे महिला सक्षमीकरणाला चालना देण्यात आली.हिला शक्ती केंद्र योजना, पंतप्रधान उज्ज्वला योजना,लखपती दीदी योजना,प्रधानमंत्री मातृ वंदना योजना,जननी सुरक्षा योजना अशा विविध योजनांची प्रभावीपणे शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत अंमलबजावणी करण्यात आली. यामुळे मागील १० वर्षाच्या काळात मोदी सरकारने सर्वाधिक महिला विकासाच्या योजना राबवत देशातील महिलांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम केले. यामुळे यावेळी सुद्धा महिलांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंसती आहे. पुन्हा देशात मोदी सरकार येईल आणि आतापर्यंत ज्या पध्ततीने महिलांचा विकास झाला त्याहुन अधिक गतीने महिलांचा विकास होईल असा विश्वास खा. विखे यांनी बोलून दाखवला.   जिल्ह्यात महिलांच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करणार, महिला बचत गटाच्या माध्यातून जिल्ह्यातील महिलांना स्वंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याच बरोबर जिल्ह्यात महिलांसाठी विविध माध्यमातून रोजगार उभा करण्यावर भर दिला जाईल. त्याचबरोबर केंद्र आणि राज्य शासनाच्या महिलांसाठी असेलेल्या योजना प्रत्येक लाभार्थांपर्यंत पोहचविल्या जातील. असे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

Modi Government : महिला सक्षमीकरणासाठी मोदी सरकार सदैव कटीबद्ध Read More »

PM Modi : खासदार सुजय विखे पाटील यांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करा – अनुराधा नागवडे

PM Modi: अहमदनगरचे खासदार सुजय विखे पाटील यांना १ लाख मतांची आघाडी देणार आहेत, त्या अनुषंगाने श्रीगोंदा मधून मतांची आघाडी देण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांवर प्रचाराची धुरा असून श्रीगोंदाकरांची जबाबदारी वाढली आहे,  असे सांगतानाच खासदार सुजय विखे पाटील यांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे यांनी केले आहे. नागवडे ताई यांनी पुढे बोलताना सांगितले कि, पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री आमचे नेते अजित पवार यांच्या राज्य सरकारने चांगले काम केले आहे, लोककल्याणकारी कार्य करत आहे. खासदार विखे यांनी लोकसभेचा सदस्य म्हणून लोकांना अपेक्षित विविध कामे केली आहेत, रस्त्यांचे अनेक प्रश्न खासदार सुजय विखे पाटील मार्गी लावले, पुन्हा एकदा त्यांना मतदार संसदेत पाठवणार आहे पण मतांची आघाडी जास्त झाली पाहिजे यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यावर जबाबदारी आहे आणि ती पार पाडण्यासाठी श्रीगोंदा मतदारसंघात घरोघरी कमळ निशाणी पोहोचवा, असे सांगून सुजय विखे यांना प्रचंड मतांनी निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी केले. मोदीजींनी केलेली कामे आणि जगाचा त्यांनी जिकंलेला विश्वास हि आपल्या देशासाठी जमेची बाजू आहे. मोदीजी पुन्हा पंतप्रधान होणार हा संपूर्ण जगाला विश्वास आहे. त्यामुळे जगातील अनेक दिग्गज उद्योग भारतात येण्यासाठी आतुर आहेत. यामुळे आपल्या देशाची ख्याती जगात उंचाविण्याचे काम यापुढेही होणार असून अबकी बार ४०० सौ पार होणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.

PM Modi : खासदार सुजय विखे पाटील यांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करा – अनुराधा नागवडे Read More »

PM Modi Speech: पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या कार्याची माहीती मतदारांपुढे कणखरपणे मांडा -खा.विखे पाटील

PM Modi Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार आणि नगर मधून खा डॉ सुजय विखे पाटील निवडून जाणार एवढाच प्रचार करून महायुतीची बाजू मतदारासमोर कणखरपणे मांडा असे आवाहन महायुतीचे उमेदवार खा.सुजय विखे पाटील यांनी केले. तालुक्यातील गुहा येथे आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकारी कार्यकर्ता बैठकीत मार्गदर्शन केले.जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. आपल्या भाषणात खा.विखे पाटील म्हणाले की,केलेले काम आपण जनतेत जावून सांगत आहोत.कारण वर्षानुर्षे समाजासाठी  काम करण्याची परंपरा विखे पाटील परीवाराची आहे.सुसंसकृत राजकारण आजपर्यत झाल्यामुळे जनतेचे पाठबळ सातत्याने मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या कोणत्याही कार्यक्रमाला गेले की निवडणुकीची चर्चा होते.पण चर्चेत सहभागी होताना देशात पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार आणि नगर मधून सुजय विखे पाटील खासदार होणार एवढेच उतर देण्याचे आवाहन करून फार नकारात्मक वातावरणात जाण्याची गरज नाही.महायुतीला साथ देण्याची मतदारांची भूमिका ठाम असल्याने महायुती करीता ही निवडणूक फक्त मताधिक्यासाठी उरली असल्याचे विखे पाटील म्हणाले. समाजाच्या प्रत्येक प्रश्नासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून आपण उतर शोधले आहे.दुधाचे अनुदान शेतकार्यांच्या खात्यात वर्ग झाले. अनुदानापासून कोणीही वंचित राहाणार नाही याची काळजी घेतली जाईल आशी ग्वाही देवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या निर्णयाची योजनांची माहीती गावात आणि आपल्या बुथवर देण्याचे आवाहन करून आपले गाव आणि बुथ याचाच विचार करा उगाच बाकीच्या  तालुक्यात काय चालले याचा  विचार  करू नका असे आवाहन खा.विखे यांनी केले. राहुरी तलुक्यातील जनता सूज्ञ आहे.विखे पाटील परीवाराला नेहमीच या तालुक्याने पाठबळ दिले.एक परीवार म्हणून या तालुक्याकडे आपण पाहातो.मागील पाच वर्षात तालुक्यात झालेल्या विकास कामांचा लेखाजोखा सर्वाच्या समोर आहे.निळवंडे धरणाचे पाणी देण्याचा शब्द महायुती सरकारने पूर्ण केला.अद्यापही काही काम बाकी आहेत ही काम महायुती सरकारच पूर्ण करणार असल्याचे विखे पाटील याप्रसंगी शिवाजीराव कर्डीले यांनीही मार्गदर्शन केले. खा.विखे यांचे मोटार सायकल रॅली काढून स्वागत करण्यात आले.अनेक मतदारांच्या गाठीभेटी त्यांनी घेतल्या.सर्वच ठिकाणी कार्यकर्ते नागरीकांनी स्वागत केले.

PM Modi Speech: पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या कार्याची माहीती मतदारांपुढे कणखरपणे मांडा -खा.विखे पाटील Read More »

Sujay Vikhe latest Speech : राजकारण करताना व्हिडीओ नव्हे,कर्तृत्व दाखवावे लागते-खा.विखे

Sujay Vikhe latest Speech : राजकारण करायला कर्तृत्व दाखवावे  लागते,त्याग करावा लागतो.केवळ व्हिडीओ काढून जनता बरोबर येत नसल्याचा टोला महायुतीचे उमेदवार खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी लगावला. तालुक्यातील गोठण येथे आयोजित केलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खा डॉ सुजय विखे पाटील बोलत होते.आ.मोनिका राजळे यांची प्रमुख उपस्थिती होती. आपल्या भाषणात खा.विखे पाटील म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षात केलेल्या कामाची चर्चा लोकांमध्ये जावून करा.कोण काय बोलतो कोणते व्हिडीओ टाकतो यावर राजकारण होत नाही.राजकारण करण्यासाठी कर्तृत्व लागते त्याग लागतो.इथे बसलेला प्रत्येक कार्यकर्ता संघर्ष करणारा आहे.तीस चाळीस वर्ष त्याग केला त्यामुळेच जिल्हयातील जनता वर्षानुर्षे साथ आणि पाठबळ देत असल्याचे विखे पाटील म्हणाले. राज्यात महायुतीचे सरकार दिड वर्षापुर्वी आले.शक्य तेवढा निधी उपलब्ध करून प्रत्येक गावात विकास काम कशी होतील असा प्रयत्न केला.हेच सरकार पाच वर्षासाठी आले असते तर अधिक निधीची उपलब्धता करता आली असती.पण सरकार का आले नाही हे आपण सर्वजण जाणता.आता महायुती आहे.तेवढ्याच गतीने निर्णय होत असून काम मार्गी लागत असल्याचे विखे यांनी सांगितले. लोकसभेची निवडणूक ही देशाचे भवितव्य घडविणारी आहे.देशाला प्रगती पथावर नेतानाच देश सुरक्षित कसा राहीला याचे धोरण ठरविणारी निवडणूक असल्याने निवडणुकीकडे तेव्ढ्याच गांभिर्याने पाहाण्याचे आवाहन करून राजकारण प्रेमाने कमावलेल्या लोकांना बरोबर घेवून करायचे असते.

Sujay Vikhe latest Speech : राजकारण करताना व्हिडीओ नव्हे,कर्तृत्व दाखवावे लागते-खा.विखे Read More »

Ahmednagar Lok Sabha Election: कोव्हीड संकटात खा.विखे यांनी  सामाजिक बांधिलकीने काम केले : डॉ मृत्युंजय गर्जे

Ahmednagar Lok Sabha Election:  कोव्हीड संकटात सर्व उपाय योजना आणि समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाण्याची भूमिका डॉक्टर या नात्याने खा.सुजय विखे पाटील यांनी घेतली.कुठेही स्टंटबाजी न करता त्यांनी जपलेल्या  सामाजिक बांधिलकीला जनता भक्कमपणे साथ देईल असा विश्वास  डॉ मृत्युंजय गर्जे यांनी व्यक्त केला. खा डॉ सुजय विखे यांची उमेदवारी अहिल्यानगर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असून मागील पाच वर्षात झालेल्या विकास कामामुळे भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांना पुन्हा उमेदावारी देण्यात आल्याने या मतदार संघातील जनता खा.विखे यांना समर्थन देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नगर येथे पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील रुग्णालयात स्वतंत्र कोव्हीड सेंटर सुरू करून जिल्ह्यातील रुग्णांना उपचारांची सोय उपलब्ध करून दिली.रूग्णांना प्राणवायू उपलब्ध होत नव्हता आशा काळात स्वतंत्र असा आॅक्सिजन प्रकल्प सुरू केला.रेमडीसिव्हर इंजक्शनची उपलब्धता  प्रत्येक रुग्णाला करून दिली.यामध्ये त्यांच्यावर आरोप करून बदनाम करण्यचा प्रयत्न झाला.पण थोडेही विचलित न होता खा.डॉ विखे पाटील कोव्हीड योध्दा म्हणून काम करीत राहीले. कोव्हीड कालावधीत इतर सर्व रुग्णालय बंद असताना खा.डॉ विखे यांनी विखे पाटील रूग्णालयात सुमारे सातशेहून अधिक महीलांच्या प्रसूती मोफत करून देत सामाजिक सामाजिक बांधिलकी जोपासली. सिंधू अन्नछत्र मोफत किरणा किटचे गरजू व्यक्तिना वाटप केले. जिल्ह्यातील २७०शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत.या कुटूबियांना दतक घेवून त्यांच्या परीवारात रोजगार आणि शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने या कुटूबियांची मोठी समस्या दूर करण्यात खा.विखे यांनी घेतलेली भूमिका सर्वाच्या दृष्टिने अभिमानास्पद राहील्याचे भाजपा पाथर्डी तालुकाध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे  यांनी सांगितले कोव्हीड संकटात केंद्र सरकारने खासदारांना मिळणारा सर्व निधी कोव्हीड फंडासाठी वापरण्यात आला. परंतू निधी नाही म्हणून कोणतेही कारण न सांगता खा.विखे अविरतपणे कोव्हीड संकटात मतदार संघातील जनतेच्या पाठीशी कोव्हीड योध्दा म्हणून उभे राहीले हे महत्वपूर्ण आहे. कारण राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते.परंतू कोव्हीड संकटातील उपाय योजना होवू शकल्या नव्हत्या.पण खा.विखे यांनी उपलब्ध असलेल्या सुविधांचा उपयोग करून कोव्हीड संकटावर मात करण्यासाठी केलेले प्रयत्न लक्षवेधी होते.कुठेही प्रसिध्दीचा डामडौल आणि स्टंट बाजी न करता डॉक्टर या नात्याने त्यांनी बजावलेली भूमिकाच लोकांना भावली असल्याचे भाजपा पाथर्डी तालुकाध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे  म्हणाले. विखे पाटील परीवाराच्या सामाजिक बांधिलकीची मोठी परंपरा असून तीन पिढ्यांचा वारसा खा.डॉ सुजय विखे पुढे घेवून जात आहेत.राजकारणाच्या पलीकडे जावून विखे पाटील परीवार कोणत्याही संकटात समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाण्याची घेत असलेल्या  भूमिकेला जनता चांगले पाठबळ देईल असा विश्वास यांनी व्यक्त केला.

Ahmednagar Lok Sabha Election: कोव्हीड संकटात खा.विखे यांनी  सामाजिक बांधिलकीने काम केले : डॉ मृत्युंजय गर्जे Read More »

Maharashtra News: भाजापाच्या जाहीरनाम्यात देश आणि समाज हिताचा संकल्प-ना.विखे पाटील

Maharashtra News: लोकसभा  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे संकल्प पत्र ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी आहे.जनतेच्या सूचानामधून तयार झालेला जाहीरनामा देशाच्या व प्रगतीसाठी आणि सामान्य माणसाच्या हितासाठी केलेला संकल्पच असल्याचे प्रतिपादन महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. बुथ सक्षमीकरण अभियानाच्या निमिताने तालुक्यातील मनोली रहीमपूर कोल्हेवाडी आणि जोर्वे येथे आयोजित केलेल्या पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत मंत्री विखे पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या संकल्प पत्राचे स्वागत करून निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाशित झालेल्या संकल्प पत्रामध्ये सामान्य माणसाच्या कल्याणासाठी योजनांची हमी प्रधानमंत्र्यांनी दिली असल्याचे सांगितले. मागील दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील सामान्य माणूस विकासाच्या मुख्य प्रवाहात आला.यासाठी योजनारूपी कवच केंद्र सरकारने दिले.सर्व योजना अविरतपणे सुरू आहेत.योजनांचा लाभ लाभार्थीना थेट मिळत असल्याने योजनेतील भ्रष्टाचार पूर्णपणे थांबला असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपाने आपल्या संकल्प पत्रात सध्या सुरू असलेल्या योजना पुढे घेवून जाण्याचा निर्धार केला आहे.पण सतर वर्षावरील जेष्ठ नागरीकांना आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून पाच लाख रुपायांच्या उपचाराचे सुरक्षा कवच देण्यात आले आहे.मोफत धान्य योजना सुरू ठेवण्याची ग्वाही संकल्प पत्रात देण्यात आली असून महीला बचत गटाकरीता सुरू करण्यात आलेल्या लखपती दिदि योजनेचा विस्तार करुन ३कोटी महीलांना लखपती दिदी बनविण्याचा महत्वपूर्ण संकल्प या निवडणुकीच्या माध्यमातून भाजपाने केला असल्याचे विखे पाटील म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली औद्यगिक गुंतवणूक देशात मोठ्या प्रमाणात येत आहे.भारत देश आज गुंतवणुकी करीता सुरक्षित वाटत असून उत्पादन निर्मीती बरोबरच रोजगाराची उपलब्ध करून देण्यावर  केंद्र सरकारने लक्ष केंद्रीत केल्याचै विखे पाटील यांनी सांगितले. शिर्डी लोकसभा मतदारसंघात केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची अंमलबजावणी यशस्वी झाली आहे.प्रत्येक तालुक्यात शासन आपल्या दारी उपक्रम राबविला गेल्याने त्याच लाभ सर्वसामान्य जनतेला झाला.महायुती सरकार सतेवर आल्यानंतर नगर जिल्ह्यात तीन औद्यगिक वसाहती करीता शेती महामंडळाच्या जमिनी उपलब्ध करून देण्यात आल्या.याठिकाणी उद्योग येण्यास प्रारंभ होणार असून जिल्ह्यातील दहा ते पंधरा हजार युवकांना रोजगाराची संधी मिळेल.एक रुपयात पीक विमा योजना आणि दूध उत्पादकांना पाच रूपये अनुदान देण्याचे आश्वासन महायुती सरकारने प्रत्यक्ष कृती करून पूर्ण केले असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खा डॉ सुजय विखे पाटील यांनाही प्रचारात भरघोस पाठींबा मिळत असून केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून मागील पाच वर्षात झालेल्या विकास कामामुळे महायुतीचे उमेदवार डॉ सुजय विखे पाटील आणि खा.सदाशिव लोखंडे यांचा  विजय होईल असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.

Maharashtra News: भाजापाच्या जाहीरनाम्यात देश आणि समाज हिताचा संकल्प-ना.विखे पाटील Read More »

Sujay Vikhe News: सूज्ञ जनता विकास कामाला साथ देते, पोपटपंची करणाऱ्यांना नाही-खा.विखे

Sujay Vikhe News: अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील सूज्ञ असून, पाच वर्षात झालेली विकास काम जनतेच्या समोर आहे.त्यामुळे महायुतीलाच जनतेचे पाठबळ असल्याने पोपटपंची आणि भूलथापा देणाऱ्यांना थारा देणार नाही असा विश्वास खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला. तालुक्यातील काष्टी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खा.विखे पाटील बोलत होते.माजी मंत्री आ.बबनराव पाचपुते,विक्रमसिंह पाचपुते यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. आपल्या भाषणात खा.विखे म्हणाले की लोकसभा निवडणुक देशाचे भवितव्य ठरवणारी आहे.विकास कामांवर ही निवडणूक होत आहे.कोव्हीड कालावधी सोडला तर केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विकास कामाचा निधी आणला.लोकासाठी असलेल्या प्रत्येक योजनेचा लाभ सामान्य माणसाला देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. या लोकसभा मतदारसंघाची परंपरा पाहीली तर काम करणार्या लोकांना साथ देण्याची मतदारसंघातील जनता सूज्ञ असल्याकडे लक्ष वेधून प्रामाणिक स्वाभिमानी नैतिकता असलेल्या उमेदवाराला मत टाकण्याची भूमिका आजपर्यत मतदारांनी बजावली.देशात पुन्हा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी जनतेचा निर्धार झाला आहे.त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला मिळणारे प्रत्येक मत केंद्रात पुन्हा भाजपाची सता येण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार असल्याचे विखे पाटील म्हणाले. सध्या कुठल्याही कार्यक्रमात फक्त निवडणुकीची चर्चा सुरू असल्याने कार्यकर्त्यांनी नकारात्मक चर्चेपासून दूर राहावे. पाच वर्षात तालुक्यात झालेल्या विकास कामाची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयांची माहीती जनतेला द्या असे आवाहन त्यांनी केले.

Sujay Vikhe News: सूज्ञ जनता विकास कामाला साथ देते, पोपटपंची करणाऱ्यांना नाही-खा.विखे Read More »

Bhim Jayanti 2024 : डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या एका मताच्या अधिकारामुळे लोकशाही मजबूत आहे:  खा. डॉ. सुजय विखे पाटील

Bhim Jayanti 2024 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडर यांना या देशाला दिलेले संविधान ही देशासाठी मोठी देणगी आहे. त्याच बरोबर संविधाने दिलेला सर्वांना समान एक मताचा अधिकार यामुळे देशाची लोकशाही मजबूत आहे. तिला कधीच धोका निर्माण होऊ शकत नाही.  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, एक विचारवंत आणि समाजाला दिशा देणारे एक व्यक्तिमत्त्व अशी ओळख असणाऱ्या बाबासाहेबांना माझे अभिवादन आहे. अशा शब्दात अहिल्यानगरचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली ते आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्य अहिल्यानगर जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कर्जत तालुक्यातील सिद्धार्थनगर डिकसळ, येथील एका कार्यक्रमात डॉ. सुजय विखे पाटील यांनी भेट देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी डॉ. सुजय विखे यांच्यासह आमदार प्रा राम शिंदे तसेच विविध प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.  भारतीय संविधानाचे शिल्पकार असण्यासोबतच बाबासाहेब सामाजिक एकोपा निर्माण करणारे नेते होते. त्यांनी कायमच समाजातील शोषित आणि वंचित घटकांच्या चांगल्यासाठी जीवन समर्पिक केलं. तसेच असे कोणतेही क्षेत्र नाही ज्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान नाही. देशाच्या अर्थव्यवस्थेपासून ते शेतीपर्यंत. सर्वच क्षेत्रात आपल्याला बाबसाहेबांचे काम दिसून येईल. खऱ्या अर्थाने महामानव असलेले बाबासाहेब हे भारतात जन्माला आले हे भारताचे भाग्य आहे. अशा महामानवाला मी शतश: नमन करतो. असे डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले.  डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचार दौऱ्यावर विविध गावांना गाठीभेटी करत आहेत. विकास हेच माझे ध्येय असे सांगत, पंतप्रधान मोदींच्या काळात झालेल्या कामांची माहिती ते लोकांना देत आहेत. त्याच बरोबर आपण खासदार असताना केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यातून जिल्ह्यासाठी आणलेला निधी आणि त्यातून झालेली कामे यांची माहिती ते लोकांना देत आहेत. त्यांच्या प्रचारात विरोधकांवर कोणत्याही टीका टिप्पण्या नसल्याने त्यांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अहिल्यानगर परिसरात मोठ्या प्रमाणात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. ठिकठिकाणी मिरवणुका, प्रबोधनात्मक कार्यक्रमाला डॉ. सुजय विखे पाटील भेटी देत आहेत.

Bhim Jayanti 2024 : डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या एका मताच्या अधिकारामुळे लोकशाही मजबूत आहे:  खा. डॉ. सुजय विखे पाटील Read More »