DNA मराठी

ताज्या बातम्या

Navneet Rana : नवनीत राणा पुन्हा चर्चेत! ‘त्या’ प्रकरणात कोर्टाने फेटाळली याचिका

Navneet Rana : राज्याचे राजकारणात पुन्हा एकदा   अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा चर्चेत आले आहे.  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खासगी निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालीसा पठण केल्याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने निकाल दिला आहे. हा खटला रद्द करण्याची मागणी करणारी राणा दाम्पत्याची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसाचे पठण केल्याप्रकरणी अमरावतीचे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे आरोपी आहेत. त्याच्यावर खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. हे प्रकरण रद्द करण्यासाठी राणा दाम्पत्याने याचिका दाखल केली होती. ती याचिका न्यायालयाने फेटाळली. राणा दाम्पत्याने दावा केला होता की एफआयआर नोंदवण्यापूर्वीच अटक करण्यात आली होती, जी बेकायदेशीर होती. मात्र न्यायालयाने त्यांचा दावा फेटाळून लावला. या खटल्याची सुनावणी होऊन अतिरिक्त सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांनी निकाल राखून ठेवला होता, जो आज सुनावण्यात आला. तसेच खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना पुढील सुनावणीत हजर राहण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. मात्र, याचिका फेटाळल्यानंतर आता न्यायालयातून खटल्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याप्रकरणी आरोप निश्चित करण्याची प्रक्रिया पुढील वर्षी 5 जानेवारीला होणार आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या काळात अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा आणि त्यांच्या खासदार पत्नी नवनीत यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याची घोषणा केली होती. मात्र, बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत मुंबई पोलिसांनी त्यांना तसे न करण्याची नोटीस बजावली होती. मात्र, पोलिसांची नोटीस न जुमानता राणा दाम्पत्याने ठाकरे यांच्या विरोधात आंदोलनाचा गजर केला. त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी खार पोलिसांनी त्याला अटक केली. मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याविरुद्ध आयपीसी कलम 153अ, 34,37 आणि मुंबई पोलिस अधिनियम 135 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.  नंतर आयपीसीच्या कलम 124A अंतर्गत देशद्रोहाच्या गुन्ह्यातही वाढ करण्यात आली. वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. अनेक दिवस तुरुंगात घालवल्यानंतर नवनीत आणि रवी राणा यांना सशर्त जामीन मिळाला.

Navneet Rana : नवनीत राणा पुन्हा चर्चेत! ‘त्या’ प्रकरणात कोर्टाने फेटाळली याचिका Read More »

BJP News: मोठी बातमी! अहमदनगर लोकसभा निवडणूक समन्वयक पदी भानुदास बेरड यांची नियुक्ती

BJP News :  येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुक होणार आहे. यासाठी आत्तापासूनच भारतीय जनता पक्षाने तयारी सुरू केली आहे. यानुसार भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री व आ.चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी महा विजय 2024 अहमदनगर लोकसभा निवडणूक समन्वयक म्हणून प्रदेश कार्यकारणी सदस्य व माजी जिल्हाध्यक्ष प्रा भानुदास बेरड यांची निवड केली आहे.  मागच्या 35 वर्षापासून भानुदास बेरड हे भारतीय जनता पक्षाचे एकनिष्ठ निष्ठावंत म्हणून काम करीत आहेत.

BJP News: मोठी बातमी! अहमदनगर लोकसभा निवडणूक समन्वयक पदी भानुदास बेरड यांची नियुक्ती Read More »

Ahmednagar News:  दागिने व रोख रकमेची चोरी करणारी महिला आरोपींची टोळी जेरबंद

Ahmednagar News: बसमध्ये प्रवाशांचे दागिने व रोख रकमेची चोरी करणारी महिला आरोपींची टोळी 2 लाख 38 हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह जेरबंद करण्यात आली आहे. अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. 22 मे 2023 रोजी फिर्यादी रुपेश रोहिदास गायकवाड तारकपुर बस स्टँड अहमदनगर येथुन आळेफाटा जाणेकरीता बस मध्ये चढत असतांना अज्ञात आरोपींनी 10 ग्रॅम वजनाची सोन्याचे चैन चोरुन नेली होती. या गुन्ह्याची नोंद कलम 379 प्रमाणे तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली होती.  गुन्हाची नोंद झाल्यानंतर दिनेश आहेर यांच्या पथकाने तारकपुर बस स्टँड येथे सापळा रचुन तीन संशयीत महिलानां तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये पुढील तपासकामी हजर केले असून या प्रकरणाच्या पुढील तपास करत आहे. सदरची कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर , अनिल कातकाडे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Ahmednagar News:  दागिने व रोख रकमेची चोरी करणारी महिला आरोपींची टोळी जेरबंद Read More »

Ahmednagar News: इंस्टाग्रामवर ओळख अन् मुलींनी गाठले परराज्य; कोतवाली पोलिसांनी शोधून आणले!

Ahmednagar News: आज सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जण एकमेकांशी गप्पा गोष्टी करत असतात.  काहीजणांना सोशल मीडियावर प्रेम देखील होतो मात्र त्यानंतर अनेकांची फसवणूक झाल्याची अनेक बातम्या आपण वाचले आहेत.  अहमदनगर शहरात कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशीच एक घटना घडली आहे. अठरा वर्षे पुर्ण झालेल्या दोन मुली सोशल मिडीयाच्या इंस्टाग्रामवर अनोळखी तरुणांशी ओळख करून घरातून निघून गेल्या. पालकांनी शोधाशोध केली मात्र उपयोग झाला नाही.त्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनातून कोतवाली पोलिसांनी एका मुलीला बिहार आणि उत्तर प्रदेशच्या सीमारेषेवरून आणले आणि काही दिवस पाहुण्यांकडे अहमदनगरमध्ये आली आणि निघून गेलेल्या दुसऱ्या मुलीला मराठवाड्यातून आणले.  सोशल मिडीयावर झालेले प्रेम,मैत्री हे मृगजळासारखे असते. दिखाव्याच्या खोट्या गोष्टींमध्ये गुंतवून मुलांकडून जाळ्यात फसवले जाते. अशा दिखाव्याला मुली बळी पडतात. घरातील आई वडील नातेवाईकांचा जराही विचार न करता कल्पना विश्वाच्या जगात हरवून जातात. मात्र यातून कुटुंबाला होणारा त्रास, बदनामी अटळ असते. जेंव्हा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले तेंव्हा त्यांना आपण खूप मोठी चूक केली असल्याचे समजले. तपास लावल्यानंतर मुलींच्या परिसरातील नागरिकांनी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस जवान विश्वास गाजरे,रवी टकले, प्रमोद लहारे, सचिन लोळगे यांचा सत्कार केला. ‘याबाबत पालकांनी आपल्या पाल्यांवर कायम लक्ष देणे गरजेचे आहे. प्रत्येक विषयाबाबत वेळोवेळी संवाद साधावेत. पालकांचे आपल्या पाल्याची मैत्रीपूर्ण संबंध असावेत. मुलांमध्ये फक्त भीती नको तर, आदरयुक्त भीती असावी. पालकांनी या गोष्टीकडे विशेष लक्ष देण्याचे भावनिक आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी व्यक्त केले.’ …मग आयुष्याचा जोडीदार निवडताना का काळजी घेत नाही?  ‘सर्व शाळा-महाविद्यालयात मार्गदर्शन करताना चंद्रशेखर यादव एक आवर्जून उदाहरण सांगतात की,’आपण एक टिकलीचे पाकीट घ्यायचे असेल तर दहा ते बारा पाकीट चाळून पाहतो, चप्पल ड्रेस किंवा काहीही घ्यायचं म्हटलं तरी चार ते पाच दुकानात जाऊन पाहतो मग, आपण आयुष्याचा जोडीदार निवडताना किती काळजी घ्यायला पाहिजे? त्यामुळे मुलींनी अधिकची काळजी घ्यायला हवी’

Ahmednagar News: इंस्टाग्रामवर ओळख अन् मुलींनी गाठले परराज्य; कोतवाली पोलिसांनी शोधून आणले! Read More »

Ahmednagar Accident: महाराष्ट्र हादरला! संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; रस्ते अपघातात 12 जणांचा मृत्यू

Ahmednagar Accident: राज्यात कालरात्री पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या दोन भीषण रस्ते अपघातात 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर एक महिला जखमी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नगर – पुणे- कल्याण महामार्गावर डिंगोरे परिसरात तीन वाहनांच्या धडकेत आठ जणांचा जागीच मृत्यू झाला.  मृतांमध्ये दोन मुलांसह एकाच कुटुंबातील चार जणांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री अकराच्या सुमारास नगर-कल्याण महामार्गावरील डिंगोरे परिसरातील अंजिराची बाग येथे हा भीषण अपघात झाला. या अपघातात माळशेज घाटाजवळील मढ गावात राहणाऱ्या संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू झाला.  अपघातग्रस्ताचे कुटुंब जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे नातेवाइकाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी गेले होते व रात्री उशिरा घरी परतत होते. गणेश मस्करे (वय 30), कोमल मस्करे (वय 25), हर्षद मस्करे (वय 4), काव्या मस्करे (वय 6) अशी मृतांची नावे आहेत. तीन वाहनांची धडक… कुटुंब उद्ध्वस्त गणेश मस्करे हा भाजीविक्रीचा व्यवसाय करायचा. त्यामुळेच तो पिकअपमध्ये भाजीपालाही भरून आणत होता. कुटुंबाला घरी सोडून ते नेहमीप्रमाणे भाजी विकण्यासाठी जात होता.  पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. मस्करे हे आळेफाटा येथून भाजीपाला घेऊन पिकअपने ओतूरहून कल्याणच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या रिक्षाने पिकअपला धडक दिली. या अपघातात रिक्षाचालकासह दोन प्रवाशांचा मृत्यू झाला. चालक आणि मस्करे कुटुंब पिकअपच्या केबिनमध्ये बसले होते आणि मागे एक कुली बसला होता.  रिक्षाला धडकल्यानंतर पिकअपची कल्याणकडून येणाऱ्या ट्रकला धडक बसली. त्यामुळे पिकअपमधील 5 पुरुष, 1 महिला आणि दोन लहान मुलांचा जागीच मृत्यू झाला. कारवर टेम्पो उलटला पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेर येथे रविवारी रात्री भीषण अपघात झाला. त्यांच्या कारवर टेम्पो उलटल्याने चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी गावाजवळ हा अपघात झाला. समोरून येणाऱ्या कारवर भरधाव वेगात असलेला टेम्पो पलटी झाल्याने कारमधील चार जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर एक महिला थोडक्यात बचावली. या अपघातात सुनील धारणकर (वय 65 वर्षे), ओजस्वी धारणकर (वय 2 वर्षे), आशा सुनील धारणकर (वय 42 वर्षे) आणि अभय सुरेश विसाळ (वय 48 वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला. पुण्याहून नाशिकच्या दिशेने जाणारा टेम्पो एका वाहनाला ओव्हरटेक करत असताना रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की टोयोटा इटिओस कारचा चक्काचूर झाला.  या घटनेनंतर चंदनापुरी ग्रामस्थांनी घटनास्थळ गाठून तातडीने मदतकार्य सुरू केले, त्यामुळे महिलेचा जीव वाचला. मात्र या अपघातात अकोले तालुक्यातील एका दोन वर्षाच्या चिमुरडीसह चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Ahmednagar Accident: महाराष्ट्र हादरला! संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; रस्ते अपघातात 12 जणांचा मृत्यू Read More »

Weather Update: नागरिकांनो, अलर्ट जारी! मुंबईसह ‘या’ भागात बदलणार हवामान; पावसाची शक्यता

IMD Weather News:  दक्षिण भारतात सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रामध्ये देखील झपाट्याने वातावरण बदलताना दिसत आहे.  बदलणाऱ्या हवामानामुळे राज्यातील बहुतेक भागात थंडीची तीव्रता वाढली आहे. अहमदनगर, मुंबई, पुणेसह राज्यातील इतर भागात पारा घसरल्याने थंडी जाणवू लागली आहे.   आठवड्याच्या शेवटी दक्षिण महाराष्ट्रातील बहुतांश भागात थंड वाऱ्यांनी प्रवेश केल्याने पारा सामान्यापेक्षा खाली घसरला. मात्र, दोन दिवसांत कमाल तापमानात पुन्हा वाढ होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. तर 20 डिसेंबरनंतर किमान तापमानातही वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई आणि पुण्यातही पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार सोमवारपासून तापमानात आणखी 2-3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. वास्तविक उत्तर भारतातून थंड वारे महाराष्ट्रात पोहोचत आहेत. राज्याच्या बहुतांश भागात आता किमान तापमान 13 ते 15 अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवले जात आहे. मात्र नवीन हवामान प्रणालीमुळे पारा चढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने काय म्हटले? IMD (पुणे) च्या हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांच्या म्हणण्यानुसार, 18 डिसेंबरपासून काही दिवस उत्तर-मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात 2-3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. या आठवडय़ात किमान तापमानात चढ-उतार दिसून येतील, परंतु 18-20 डिसेंबरच्या सुमारास राज्यातील रात्रीचे तापमान सामान्यापेक्षा किंचित कमी राहील. यानंतर रात्रीच्या तापमानात पुन्हा किंचित वाढ होऊ शकते. थंडी कमी होईल! IMD च्या अंदाजानुसार, पुढील दोन आठवड्यांत उत्तर-मध्य महाराष्ट्रात किमान तापमान सामान्यपेक्षा किंचित जास्त राहील. मात्र, या काळात राज्यातील उर्वरित भागात रात्रीचे तापमान सामान्यपेक्षा कमी राहू शकते. 20 ते 21 डिसेंबर दरम्यान राज्यात उत्तरेकडील वारे वाहू लागतील, त्यामुळे किमान तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. वास्तविक हे थंड वारे पश्चिम हिमालय आणि उत्तर-पश्चिम भारताच्या थंड प्रदेशातून येत आहेत. पाऊस का पडू शकतो? दुसरीकडे, हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे की पुढील काही आठवडे अंतर्गत महाराष्ट्रातील किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त आणि विदर्भ आणि मराठवाड्यात सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.  वाऱ्याची दिशा बदलल्याने राज्यातील हवामानात पुन्हा एकदा बदल होणार आहे. ओलसर आग्नेय-पूर्वेकडील वाऱ्यांमुळे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागात आजपासून 20 डिसेंबरपर्यंत ढगाळ वातावरण राहील आणि किमान तापमानात वाढ होईल. त्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्येही गुलाबी थंडी कमी होणार आहे. या आर्द्रतेमुळे पुण्यासह दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रातही तुरळक सरी पडू शकतात. राज्यात दरवर्षीच्या तुलनेत यंदा थंडी कमी असेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

Weather Update: नागरिकांनो, अलर्ट जारी! मुंबईसह ‘या’ भागात बदलणार हवामान; पावसाची शक्यता Read More »

Pune News: धक्कादायक! शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने नराधमांनी केलं असं काही.., परिसरात खळबळ

Pune Women Murder: राज्याची संस्कृती राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणेमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार पुणे मधील बिबवेवाडी परिसरात महिलेने शारीरिक संबंध ठेवण्यास नाकार दिल्याने त्याची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.   बिबवेवाडी परिसरातील एका मंदिराजवळ पोलिसांना महिलेचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृत महिलेचे बिबवेवाडी येथील गोयाला गार्डनसमोर एक दुकान होते, ज्यात आयुर्वेदिक औषधांची विक्री होत असे. 9 डिसेंबर रोजी ही महिला नेहमीप्रमाणे दुकानात झोपण्यासाठी आली. त्याचवेळी आरोपी दारूच्या नशेत तेथे पोहोचला आणि तिला शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले. महिलेने नकार दिल्यावर आरोपीने घटनास्थळी उपस्थित असलेल्या रॉडने तिच्यावर अनेक वार केले. गंभीर जखमी महिलेचा जागीच मृत्यू झाला. गुन्हा लपविण्यासाठी आरोपींनी क्रौर्याची परिसीमा ओलांडली. त्यांची ओळख पटू नये म्हणून त्यांनी महिलेच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा सोडल्या. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना एक संशयास्पद दुचाकी दिसली. पोलिसांच्या पथकाने बिबवेवाडी ते चाकणपर्यंत 250 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. रविसिंग चितोडिया आणि विजय मारुती पाटील अशी आरोपींची नावे आहेत. तपासादरम्यान दुचाकीवरून संशयित रविसिंगचे नाव समोर आले. पोलिसांनी त्याला नाशिक येथून अटक केली. चौकशीत त्याने विजय पाटीलचे नाव उघड केले. पोलिसांनी त्याला पालघर येथून ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

Pune News: धक्कादायक! शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने नराधमांनी केलं असं काही.., परिसरात खळबळ Read More »

Anna Hazare : आता मुख्यमंत्र्यांची पण चौकशी होणार!! जाणून घ्या नवीन कायद्याबद्दल सर्वकाही……

Anna Hazare: भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींचा समावेश करत विधान परिषदेने महाराष्ट्र लोकायुक्त विधेयकाला अखेर वर्षभरानंतर मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेतेमंडळींची चौकशी करणे शक्य होणार असून मुख्यमंत्री, मंत्री व आमदारही या कायद्याच्या कक्षेत येणार आहेत असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजार यांनी केले आहे. गेल्या वर्षी हिवाळी अधिवेशनातच लोकायुक्त हे विधेयक विधानसभेत मंजूर झाले होते. तब्बल वर्षभरानंतर हे विधायक विधान परिषदेत मंजूर करण्यात आले. मुख्यमंत्री देखील आता या कायद्याच्या चौकटीमधून सुटणार नाही लोकायुक्त कायदा व्हावा यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजार यांनी गेल्या अनेक वर्षांपासून लढा दिला. या दरम्यानच्या काळात अनेक मोठी आंदोलने देखील अण्णांनी केली. विधानसभेत मंजूर झालेला हा कायदा आता विधानपरिषदेत देखील मंजूर झाला.  तसेच पुढे बोलताना अण्णा म्हणाले, आम्ही केलेल्या मागणीनुसार लोकायुक्त कायद्याचा मसुदा तयार झाला होता. हा मसुदा विधानसभेत मंजूर करण्यात आला होता. विधान परिषदेत हे विधेयक आल्यानंतर यात सदस्यांच्या सूचनांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या लोकप्रतिनिधी, अधिकारी यांची चौकशी या माध्यमातून करता येणार आहे. मुख्यमंत्री देखील आता या कायद्याच्या चौकटीमधून सुटणार नाही. या कायद्याच्या आधारे आता मुख्यमंत्र्यांवर देखील कारवाई करणे शक्य होणार आहे असे यावेळी बोलताना अण्णा हजारे म्हणाले.

Anna Hazare : आता मुख्यमंत्र्यांची पण चौकशी होणार!! जाणून घ्या नवीन कायद्याबद्दल सर्वकाही…… Read More »

Sujay Vikhe Patil : आम्ही सदैव मराठा बांधवांच्या पाठीमागे! मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकार लवकरच तोडगा काढणार: डॉ. सुजय विखे पाटील

Sujay Vikhe Patil :  खासदार डॉ. सुजय विखे पाटील आज शेवगाव तालुक्याच्या बोधेगाव येथे साखर वाटपाच्या कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी सकल मराठा समाज, बोधेगाव यांनी त्यांची भेट घेऊन सकल मराठा समाज बाधवांना ओबीसी मधून सरसकट आरक्षण मिळावे हा मुद्दा लोकसभेत मांडून आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी यासाठी निवेदन दिले. खासदार विखेंनी त्यांचे निवेदन स्वीकारून सकारात्मक संवाद साधला. यावेळी मराठा आरक्षणावर भाष्य करताना ते म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या संदर्भात यापूर्वीही नामदार राधाकृष्ण विखे पाटील व मी सकारात्मक भूमिका मांडली आहे. आमचं समर्थन प्रत्येक वेळी सकल मराठा समाजाच्या बाजूने राहिले असून मराठा बांधवांच्या पाठीमागे आम्ही सदैव खंबीरपणे उभे आहोत. पालकमंत्री म्हणून नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व खासदार म्हणून मी यापूर्वीही मराठा समाजाची भूमिका स्पष्ट मांडली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून लवकरच मराठा आरक्षणावर योग्य तो तोडगा काढण्यात येईल असे मत त्यांनी व्यक्त केले. शेवगाव तालुक्याच्या विकासासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार मोनिकाताई यांच्या माध्यमातून आजवर कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू दिलेला नाही व इथून पुढेही निरनिराळ्या विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असे मत मांडून आपण माझ्यावर जो विश्वास दाखवून मतदान केलं, या विश्वासाला मी कधीच तडा जाऊ देणार नाही.  विशेष म्हणजे याची प्रचिती आपल्याला विविध विकासकामांच्या माध्यमातून वेळोवेळी आलीच आहे असे खासदार सुजय विखे यांनी व्यक्त केले. आज बोधेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या साखर वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.  खासदार विखे पुढे म्हणाले, बोधेगाव गावासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व स्वर्गीय दिलीप गांधी यांच्या माध्यमातून विविध विकास कामे पूर्णत्वास आली आहेत. यापुढे देखील भरीव निधी उपलब्ध करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत असे स्पष्ट केले. दरम्यान २२ जानेवारीला प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते होणार असून याच पार्श्वभूमीवर साखर व चणाडाळ वाटपाचे नियोजन चालू आहे असे सांगून २२ जानेवारीला आपण दुसरी दिवाळी साजरी करणार आहोत असे मत मांडले.  सर्व लाभधारकांनी या साखरेतून दोन लाडू बनवावे आणि श्रीरामाच्या चरणी नैवेद्य म्हणून ठेवावेत असे देखील आवाहन खासदार सुजय विखे यांनी उपस्थितांना केले. यावेळी ताराभाऊ लोंढे, बापूसो पाटेकर, नितीन भाऊ काकडे, रजाक शेख, बाबा सावळेकर, बाळासो कोळगे, महादेव घोरतळे, मयूर हुंडेकरी, बाळासाहेब कोळगे, संजय खेडकर, भगवान मिसाळ, बाळासाहेब डोंगरे, रामकाका केसभर, अमोल सागडे आदी मान्यवरांसह भाजपाचे विविध पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sujay Vikhe Patil : आम्ही सदैव मराठा बांधवांच्या पाठीमागे! मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकार लवकरच तोडगा काढणार: डॉ. सुजय विखे पाटील Read More »

Maruti Jimny खरेदी करा ‘इतक्या’ स्वस्तात! मिळत आहे बंपर डिस्काउंट; पहा ऑफर

Maruti Jimny  :  मारुती सुझुकीने भारतीय बाजारात काही दिवसापूर्वी ऑफ-रोड SUV जिमनी लाँच केली आहे. यावेळी कंपनीने या ऑफ रोड एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत 12.74 लाख रुपये ठेवली होती.  मात्र आता कंपनी या कारवर जबरदस्त डिस्काउंट ऑफर देत आहे. ज्याच्या तुम्ही फायदा घेत स्वस्तात ही ऑफ रोड एसयूव्ही कार घरी आणू शकता.   आम्ही तुम्हाला सांगतो कंपनीने, आपल्या SUV – Thunder Edition  नवीन आणि स्वस्त व्हर्जन लाँच केला आहे. या एसयूव्हीचे हे मर्यादित-रन मॉडेल आहे. Maruti Jimny Thunder Edition तपशील कंपनीने 10.74 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत मारुती जिमनी थंडर एडिशन बाजारात लॉन्च केले आहे. त्याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 14.05 लाख रुपयांपर्यंत जाते.  कंपनीने थंडर एडिशन जिमनी लाइनअपच्या चारही व्हेरियंटमध्ये उपलब्ध करून दिली आहे. मात्र, त्याची विक्री डिसेंबर 2023 पर्यंतच केली जाईल.  जर आपण थंडर एडिशनची नियमित जिमनीच्या सुरुवातीच्या किंमतीशी तुलना केली तर त्याची किंमत 2 लाख रुपये कमी आहे. कंपनीने थंडर एडिशन जिमनीमध्ये फ्रंट बंपर, साइड डोअर क्लॅडिंग आणि डोअर व्हिझरवर सिल्व्हर गार्निश जोडले आहेत. त्याच्या ORVM, हुड आणि फ्रंट/साइड फेंडर्सवर देखील गार्निश केले गेले आहे.  इंटीरियर आकर्षकपणे डिझाइन केलेले आहेत आणि त्यात फ्लोअर मॅट्स (मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक व्हेरियंटसाठी वेगळे), आणि टॅन-फिनिश स्टिअरिंग व्हील देखील आहेत.  ही SUV 9-इंच टचस्क्रीन, क्रूझ कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP), रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, सहा एअरबॅग्ज आणि ऑटो क्लायमेट कंट्रोल यांसारख्या आधुनिक फीचर्ससह आहे. यात 1.5-लिटर K15B नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे. ज्याची कमाल 104 bhp पॉवर आणि 134 Nm पीक टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे. यामध्ये कंपनीने 5-स्पीड मॅन्युअल किंवा 4-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय दिला आहे.

Maruti Jimny खरेदी करा ‘इतक्या’ स्वस्तात! मिळत आहे बंपर डिस्काउंट; पहा ऑफर Read More »